गहिरे पाणी… (भाग – ७)
त्या संध्याकाळी आकाश चांगलंच काळवंडून आलेलं होतं. लाईट्स देखील गेलेले होते. संपदा आणि वरुण स्वयंपाकघरात थांबून वसुधाबाईंची वाट पहात होते. जेवणाची ताटं देखील वाढलेली होती. फडफडणाऱ्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे अस्वस्थपणे पहात दोघेही आईची वाट पहात होते.
काही वेळाने वसुधा तिथे आली आणि तिघेही जेवायला बसले.
“आई... आमचा अंधारबावला येण्याचा निर्णय पक्का झालेला आहे.” वरुणने आईला आपला विचार सांगितला. मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशात वसुधाबाईंच्या चेहेऱ्यावर एक गूढ हास्य प्रकटले.
“ठीक तर मग. आत्ताच आपल्या बॅगा भरून ठेवा. आपण उद्या सकाळीच निघूयात.”
“पण आई तिथे आपण रहायचे कुठे?” संपदाने वरुणकडे पहात आश्चर्याने प्रश्न विचारला.
“ती काळजी करु नका. आपलं जुनं घर अजूनही आहे तिथे. तिथेच रहायचं आपण.”
“आई पण गेली वीस पंचवीस वर्षे ते घर बंद होतं. आत्ता लगेच तिथे कसं रहायला जाऊ शकतो आपण?” वरुणने वैतागून विचारले.
“घर बंद नाहीये. त्याची काळजी व देखभाल आजही घेतली जात आहे. आपल्या जुन्या भास्कर नावाच्या गड्याकडून. तुझे वडील त्याला दरवर्षी पैसे पाठवत आलेले आहेत त्यासाठीच.”
“मग ठीक आहे तर. आम्ही दोघेही आत्ताच बॅग्ज भरून ठेवतो. आपण उद्या पहाटे लवकर निघूयात. बाकी घर जर चांगलं असेल तर आता यावेळीस कायमचे विकून टाकूनच माघारी येऊ. भरपूर पैसे येतील त्या जागेचे.” वरुण उत्साहाने बोलला.
यानंतर मग मात्र विशेष काही बोलणी न होता त्यांची जेवणे शांतपणे उरकली. जेवणे झाल्यावर रात्री बराच उशिरपर्यंत तिघेसुद्धा आपापल्या बॅग्ज भरत होते.
पहाटे मात्र सहा वाजता उठून तिघांनी पण लवकर आवरले आणि साडेसातच्या सुमारास घराला कडीकुलुप लावून मंडळी गाडीत जाऊन देखील बसली. वरुण त्यांचे शेजारी सबनीसकाका यांना पाच मिनिटांकरीता भेटून येऊन ‘आपण एक वर्षभराकरीता गावी जात असल्याची’ याची थोडक्यात कल्पना देऊन आला.
आठच्या सुमारास त्यांनी सांगली शहर मागे टाकलेलं होतं…
दुपारी अडीच तीनच्या दरम्यान गाडी ‘काळदरी’ घाट उतरू लागली होती.
“वरुण, आता गाडी सावकाश आणि सावधपणे चालव! इथून पुढे अतिशय प्रतिकूल निसर्गाशी आपली गाठ पडणार आहे.” वसुधाबाई काळजीच्या स्वरांत उद्गारल्या.
गाडी खाली उतरू लागली तसा भणाणा वाहणारा वारा जाणवू लागला. दूरवर नजर जाईल तिकडे दऱ्या आणि डोंगरच! सगळं सगळं काही हिरव्यागार अरण्याने झाकलेलं! रस्ता हलक्याश्या धुक्यात गुरफटून आडवातिडवा मैलोगणती पसरलेला! भर दिवसाची वेळ असून देखील उंच उंच डोंगरांची सावली सगळ्या चराचराला व्यापून उरलेली होती. जे काही सूर्यकिरण आत येण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांची वाट उंच उंच वृक्षवेलींच्या जाळ्याने अडविलेली होती.
एवढं घनदाट अरण्य! पण एकदम शांत पसरलेलं. कसलीही हालचाल नाही की खुसफुस नाही. त्या प्राचीन साधुचा शाप ही एक सत्यकथाच होती की काय असे वाटायला लावणारे भयानक वातावरण!
क्वचितच एखादी गाडी सोबतीने जाताना दिसत होती. अन्यथा सर्व रस्त्यावर शुकशुकाट होता. अधून मधून एखादी पंधरा वीस घरांची वाडी अचानक दिसत होती आणि क्षणार्धात परत त्या गूढगहन अरण्याच्या कराळ मुखात जाऊन अदृश्य होत होती.
गाडीच्या खिडकीतून बोचरे वारे आणि धुक्याचे तलम रेशमी लोट आत येत होते. संपदाला आता खूप थंडी जाणवू लागलेली होती. तिने वरुणला चहा पिण्यासाठी गाडी कुठे तरी थांबवण्यास सांगितले. त्याप्रमाणे एका मोठ्या वडाच्या झाडाखाली असलेल्या चहाच्या टपरीजवळ त्याने गाडी थांबवली.
एव्हाना चांगलंच आभाळ भरून आलेलं होतं. सों सों वारा सुटलेला होता. अंधारबावच्या अंधार भरलेल्या वातावरणाच्या भयानकतेत पावसाळी हवेमुळे अधिकच भर पडलेली होती. वटवृक्षाची लाखो लाखो पाने जोरजोरात सळसळू लागलेली होती. टपरी तशी दिसायला साधीच होती. परंतु चहा मात्र चांगलाच बनवलेला होता. तो उबदार व गोड चहा पिऊन सगळ्यांनाच बरं वाटलं.
वरुणने चहावाल्यास येथून पुढच्या प्रवासाचा अंदाज विचारला. चहावाल्याने थोड्या तुटकपणेच अंधारबावचा रस्ता आणि लागणारं अंतर व वेळ यांची वरुणला माहिती दिली.
बाकी अंधारबांव नाव काढल्या काढल्या तिथे उभे असणारे दोन चार लोक थोडे अस्वस्थ झाले होते, हे वरुणच्या नजरेने हेरले. परंतु विशेष काहीच न बोलता तो परत गाडीकडे वळला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली.
धुक्याने भरलेल्या अंधारवाटा आता पावसाळी हवेने अधिकच गूढ भासू लागलेल्या होत्या. काही अंतर गेल्यावर एकदम मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूला उंचच उंच वृक्ष पावसात उभे राहून अंग अंग निथळत होते.
चहावाल्याने सांगितलेल्या खुणांनुसार वरुण आता अंधारबाव फाट्यावर पोहोचलेला होता. समोर अंतहीन पसरलेला व धुक्यात हरवलेला रस्ता! डाव्या बाजूला ‘अंधारबाव २ कि.मी.’ सांगणारी सरकारी पाटी आणि भयावह वाटणाऱ्या अरण्यात आत आत कुठेतरी जाणारा तो रस्ता...
वरुणने संपदा आणि वसुधाबाईंकडे पाहिले. संपदा थोडी अस्वस्थ होती. मात्र वसुधाबाई एकदम निवांत होत्या.
“वरुण चल पुढे! आपण बरोबर पोहोचलोय.” शुष्क आवाजात वसुधाबाई उद्गारल्या.
आणि गाडीचा पुढचा प्रवास सुरु झाला…
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर
त्या संध्याकाळी आकाश चांगलंच काळवंडून आलेलं होतं. लाईट्स देखील गेलेले होते. संपदा आणि वरुण स्वयंपाकघरात थांबून वसुधाबाईंची वाट पहात होते. जेवणाची ताटं देखील वाढलेली होती. फडफडणाऱ्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे अस्वस्थपणे पहात दोघेही आईची वाट पहात होते.
काही वेळाने वसुधा तिथे आली आणि तिघेही जेवायला बसले.
“आई... आमचा अंधारबावला येण्याचा निर्णय पक्का झालेला आहे.” वरुणने आईला आपला विचार सांगितला. मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशात वसुधाबाईंच्या चेहेऱ्यावर एक गूढ हास्य प्रकटले.
“ठीक तर मग. आत्ताच आपल्या बॅगा भरून ठेवा. आपण उद्या सकाळीच निघूयात.”
“पण आई तिथे आपण रहायचे कुठे?” संपदाने वरुणकडे पहात आश्चर्याने प्रश्न विचारला.
“ती काळजी करु नका. आपलं जुनं घर अजूनही आहे तिथे. तिथेच रहायचं आपण.”
“आई पण गेली वीस पंचवीस वर्षे ते घर बंद होतं. आत्ता लगेच तिथे कसं रहायला जाऊ शकतो आपण?” वरुणने वैतागून विचारले.
“घर बंद नाहीये. त्याची काळजी व देखभाल आजही घेतली जात आहे. आपल्या जुन्या भास्कर नावाच्या गड्याकडून. तुझे वडील त्याला दरवर्षी पैसे पाठवत आलेले आहेत त्यासाठीच.”
“मग ठीक आहे तर. आम्ही दोघेही आत्ताच बॅग्ज भरून ठेवतो. आपण उद्या पहाटे लवकर निघूयात. बाकी घर जर चांगलं असेल तर आता यावेळीस कायमचे विकून टाकूनच माघारी येऊ. भरपूर पैसे येतील त्या जागेचे.” वरुण उत्साहाने बोलला.
यानंतर मग मात्र विशेष काही बोलणी न होता त्यांची जेवणे शांतपणे उरकली. जेवणे झाल्यावर रात्री बराच उशिरपर्यंत तिघेसुद्धा आपापल्या बॅग्ज भरत होते.
पहाटे मात्र सहा वाजता उठून तिघांनी पण लवकर आवरले आणि साडेसातच्या सुमारास घराला कडीकुलुप लावून मंडळी गाडीत जाऊन देखील बसली. वरुण त्यांचे शेजारी सबनीसकाका यांना पाच मिनिटांकरीता भेटून येऊन ‘आपण एक वर्षभराकरीता गावी जात असल्याची’ याची थोडक्यात कल्पना देऊन आला.
आठच्या सुमारास त्यांनी सांगली शहर मागे टाकलेलं होतं…
दुपारी अडीच तीनच्या दरम्यान गाडी ‘काळदरी’ घाट उतरू लागली होती.
“वरुण, आता गाडी सावकाश आणि सावधपणे चालव! इथून पुढे अतिशय प्रतिकूल निसर्गाशी आपली गाठ पडणार आहे.” वसुधाबाई काळजीच्या स्वरांत उद्गारल्या.
गाडी खाली उतरू लागली तसा भणाणा वाहणारा वारा जाणवू लागला. दूरवर नजर जाईल तिकडे दऱ्या आणि डोंगरच! सगळं सगळं काही हिरव्यागार अरण्याने झाकलेलं! रस्ता हलक्याश्या धुक्यात गुरफटून आडवातिडवा मैलोगणती पसरलेला! भर दिवसाची वेळ असून देखील उंच उंच डोंगरांची सावली सगळ्या चराचराला व्यापून उरलेली होती. जे काही सूर्यकिरण आत येण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांची वाट उंच उंच वृक्षवेलींच्या जाळ्याने अडविलेली होती.
एवढं घनदाट अरण्य! पण एकदम शांत पसरलेलं. कसलीही हालचाल नाही की खुसफुस नाही. त्या प्राचीन साधुचा शाप ही एक सत्यकथाच होती की काय असे वाटायला लावणारे भयानक वातावरण!
क्वचितच एखादी गाडी सोबतीने जाताना दिसत होती. अन्यथा सर्व रस्त्यावर शुकशुकाट होता. अधून मधून एखादी पंधरा वीस घरांची वाडी अचानक दिसत होती आणि क्षणार्धात परत त्या गूढगहन अरण्याच्या कराळ मुखात जाऊन अदृश्य होत होती.
गाडीच्या खिडकीतून बोचरे वारे आणि धुक्याचे तलम रेशमी लोट आत येत होते. संपदाला आता खूप थंडी जाणवू लागलेली होती. तिने वरुणला चहा पिण्यासाठी गाडी कुठे तरी थांबवण्यास सांगितले. त्याप्रमाणे एका मोठ्या वडाच्या झाडाखाली असलेल्या चहाच्या टपरीजवळ त्याने गाडी थांबवली.
एव्हाना चांगलंच आभाळ भरून आलेलं होतं. सों सों वारा सुटलेला होता. अंधारबावच्या अंधार भरलेल्या वातावरणाच्या भयानकतेत पावसाळी हवेमुळे अधिकच भर पडलेली होती. वटवृक्षाची लाखो लाखो पाने जोरजोरात सळसळू लागलेली होती. टपरी तशी दिसायला साधीच होती. परंतु चहा मात्र चांगलाच बनवलेला होता. तो उबदार व गोड चहा पिऊन सगळ्यांनाच बरं वाटलं.
वरुणने चहावाल्यास येथून पुढच्या प्रवासाचा अंदाज विचारला. चहावाल्याने थोड्या तुटकपणेच अंधारबावचा रस्ता आणि लागणारं अंतर व वेळ यांची वरुणला माहिती दिली.
बाकी अंधारबांव नाव काढल्या काढल्या तिथे उभे असणारे दोन चार लोक थोडे अस्वस्थ झाले होते, हे वरुणच्या नजरेने हेरले. परंतु विशेष काहीच न बोलता तो परत गाडीकडे वळला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली.
धुक्याने भरलेल्या अंधारवाटा आता पावसाळी हवेने अधिकच गूढ भासू लागलेल्या होत्या. काही अंतर गेल्यावर एकदम मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूला उंचच उंच वृक्ष पावसात उभे राहून अंग अंग निथळत होते.
चहावाल्याने सांगितलेल्या खुणांनुसार वरुण आता अंधारबाव फाट्यावर पोहोचलेला होता. समोर अंतहीन पसरलेला व धुक्यात हरवलेला रस्ता! डाव्या बाजूला ‘अंधारबाव २ कि.मी.’ सांगणारी सरकारी पाटी आणि भयावह वाटणाऱ्या अरण्यात आत आत कुठेतरी जाणारा तो रस्ता...
वरुणने संपदा आणि वसुधाबाईंकडे पाहिले. संपदा थोडी अस्वस्थ होती. मात्र वसुधाबाई एकदम निवांत होत्या.
“वरुण चल पुढे! आपण बरोबर पोहोचलोय.” शुष्क आवाजात वसुधाबाई उद्गारल्या.
आणि गाडीचा पुढचा प्रवास सुरु झाला…
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर