इलाज भाग क्र :- २

लेखन :- शशांक सुर्वे (ह्या कथेचा पहिला भाग वरती माझ्या नावावर क्लिक करून वाचता येईल)आनंदा वाड्याच्या बाहेर उभा होता....न जाणो कस पण त्याला ह्या वाड्याची आता भीती वाटत नव्हती....एखादा व्यक्ती कित्येक दिवस घरापासून दूर राहिला आहे त्याला जशी घराची ओढ लागते अस काही आनंदाला त्या वाड्याकडे बघून वाटत होतं....दुपारची वेळ होती....कडक ऊन पडलं होतं....आनंदा थोडा सावधपणे त्या वाड्यात पोहोचला.....मागच्या वेळी भीतीने त्याने ह्या वाड्यात आजूबाजूला बघितले नव्हते पण आता आनंदाने ह्या वाड्यात चौफेर नजर फिरवली....खूपच सुंदर वाडा होता अस वाटत होतं की नुकताच बांधला आहे....फर्निचर पितळेची भांडी अगदी जशीच्या तशी रचून ठेवली होती.....आनंदा प्रत्येक खोलीत डोकावून बघू लागला....सगळं काही सुस्थितीत होत जस की आताच इथली साफसफाई झाली आहे....आनंदाने पूर्ण वाडा फिरून काढला पण ह्या वाड्यात एकही व्यक्ती दिसत नव्हता....एवढा आलिशान वाडा आत एवढ्या महागड्या वस्तू पण आत कुणीच कस राहत नाही?? ह्या प्रश्नाने आनंदा काही काळ चक्रावला....त्याला कसलीतरी वेगळीच चिंता होती ती म्हणजे आपला पुढचा महागडा इलाज होईल तरी कसा?? कारण पैसे तर नव्हतेच....आनंदा सतत सतत त्या उंबऱ्याजवळ जाऊन बघत होता....त्याला पूर्णपणे कल्पना होती की मागे मिळालेला सोन्याचा हार त्याला कुठल्या तरी विचित्र शक्तीने आणून दिला आहे....का दिला?? काहीच कल्पना नाही....पण पैशासाठी आणि काही चमत्कारासाठी आनंदा परत इथे आला होता..पण पूर्ण वाडा फिरल्यावर सुद्धा काहीच मिळालं नाही...आता पुढचा इलाज कसा करायचा??....आता हतबल होऊन तो त्या प्रशस्त हॉल मध्ये खांबाला डोकं टेकून विचार करीत बसला होता....आता पैसे कुठून आणायचे??...आनंदा हात जोडून विनवणी करत होता..कदाचित त्याचं कुणीतरी ऐकत असावं आणि काही मदत मिळावी..हा विचार करत असताना कसला तरी बारीक खरखर असा आवाज झाला....आनंदा इकडे तिकडे नजर फिरवत होता....बारीक आवाज होता तो....अखेर त्याने आपल्या पायाजवळ बघितले आणि झटकन पाय मागे घेतला....पायाजवळ एक छोटासा सोन्याचा दागिना अचानक प्रकट झाला होता....आनंदाने तो हातात घेतला....मातीने माखला होता तो दागिना....आनंदाने परत इकडे तिकडे बघून तो दागिना उचलला आणि सगळ्या दिशेला हात जोडून जोडून वाड्याच्या बाहेर पडला..त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाचे भाव होते...परत त्याच सोनाराकडे तो दागिना विकून त्याने आपली औषधे खरेदी केली...थोडं फार चमचमीत जेवण सुद्धा केलं....रात्र झाली होती....वाड्यात जावे का?? तिथले एक एक क्षण आनंदाला आठवत होते....सगळं काही डोक्याच्या बाहेरचं होतं....एवढा टापटीप वाडा कसा असू शकतो....रात्री ऐकू येणारी ती कुजबुज परवा दिसलेले भयानक चेहरे हे सगळं आनंदा विसरू शकणार नव्हता पण न जाणो कसली तरी ओढ त्याच्या मनात होती शेवटी जे काही व्हायचं ते होऊ दे असा विचार करून एक मोठी टॉर्च खरेदी करून आनंदा परत त्या वाड्याच्या दिशेने चालू लागला....टॉर्चच्या उजेडात आनंदा त्या वाड्याजवळ पोहोचला...भयाण शांतता..क्षणभर थांबून त्याने त्या वाड्यावर टॉर्च मारून निरखून पाहिले....कसलीच हालचाल नव्हती....वाडा अगदी थंडगार होता....आनंदाने जशी पहिली पायरी चढली तसा एक थंड हवेचा झुळूक सोबत एक मंद मोगऱ्याचा सुवास त्याच्या नाकात शिरला....काही कळायच्या आत वाड्यात सगळीकडे लख्ख प्रकाश पसरला....वाडयात सगळीकडचे कंदील आपोआप पेटले सगळा वाडा उजळून निघाला.....हे काही नवनवीन होत होते....पण आनंदा घाबरला नाही....आपल्याला आर्थिक मदत करणारा हा वाडा आपल्याला मारुच शकत नाही असं आनंदाला वाटत होतं....पण हा वाडा आनंदाच्या एका चुकीसाठी टपून बसला होता त्याला गिळंकृत करायला...आनंदा आत आला हॉल मध्ये एक काळी लाकडी खुर्ची कुणीतरी आणून ठेवली होती....इथे येण्यासाठी कोणतेही वाहन नव्हतं त्यामुळे आनंदा चालत चालत आला होता त्यामुळे त्याचे पाय दुखत होते समोर ती आलिशान खुर्ची बघून आनंदा त्या खुर्चीवर आरामात बसला....त्याची गोळ्यांची वेळ झाली होती त्याचे अंग थरथरत होते आनंदाने बॅग मधून गोळी काढली आणि बॅग मधील बॉटल चे पाणी पिऊन टाकले....आनंदाला दरदरून घाम फुटला होता....अचानक त्याला कसला तरी आवाज येत होता....आवाज खूपच मधुर आणि लयबद्ध होता.....पैंजनाचा आवाज होता तो.....सोन्याचे पैंजण होते ते आणि तिचा देह सोन्याहून उजळ होता.....ती हळुवार चालत आनंदाच्या दिशेने येत होती....वातावरणात एक मादक सुगंध पसरला होता....समोरून जगात नसेल इतकी सुंदर स्त्री येत होती....पूर्णपणे नग्न,मोकळे केस तिच्या अंगावर पुरातन सोन्याचे दागिने होते ती चालताना त्या दागिन्यांवरचे मोती हलत होते...तिचे काळेभोर लांबसडक कुरळे केस हलकेच हवेवर उडत होते....आपल्या लालभडक ओठावर आपल्या हाताचा अंगठा फिरवत डोळ्यात मादकता आणून ती सुंदर स्त्री आनंदाच्या अगदीच समोर उभी होती आनंदा तिला न्याहाळत होता....आपला नाजूक गुलाबी हात आनंदाच्या मळकट सुरकूतलेल्या चेहऱ्यावर फिरवीत ती स्त्री आनंदाच्या मांडीवर बसली....त्या स्त्री देहातून इतका मादक सुवास येत होता की कितीही मनाचा पक्का मनुष्य असता तरी त्याचा तोल गेला असता....पण आनंदाने तिला बघून मान फिरवली...अचानक समोरून एक दुसरी सुंदर स्त्री आली ती सुद्धा नग्न होती ती पंचपक्वान्नांने भरलेले ताट घेऊन आनंदासमोर ठेवून आनंदाच्या दुसऱ्या बाजूला उभी राहिली.....आनंदाने त्या ताटाकडे बघितलं...आयुष्यात त्याने कधी इतकं सुंदर ताट बघितलं नसेल....जेवणाचा वास नाकाजवळ दरवळत होता....पण आनंदाने परत मान फिरवली....हे बघून मांडीवर बसलेल्या सुंदरीने आनंदाचा हात पकडून आपल्या कंबरेवर ठेवला....आनंदाने तो हात झटकला आणि ताडकन उठून तो बाजूच्या एका खोलीत जाऊन दार लावून बसला...त्या स्त्रिया एकमेकांकडे बघू लागल्या काहीसे हताश भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते परत प्रयत्न..बाहेर त्या दोन सुंदर स्त्रिया आता एक विशिष्ट स्वरातले गाणे म्हणत होत्या क्षणभर आनंदा मोहित झाला पण त्याने उशी कानावर दाबून कान बंद केले....त्याच्या डोळ्यांसमोर त्या सुंदर नग्न स्त्रियांचा देह येत होता तरीही आनंदाने दार उघडले नाही....काही वेळानंतर त्या गाण्याचा सुमधुर आवाज येऊ लागला.....हे गाणं मोहित करणारे होते....खजिन्याच्या आशेने इथे वावरणाऱ्या काही लोकांनी हे गाणं ऐकूनच ह्या वाड्यात प्रवेश केला होता आणि आपला जीव गमावला होता पण आनंदाला हे गाणं ऐकून सुद्धा काहीच वाटत नव्हतं त्याने कानात बोटं घालून कान बंद केले....काही वेळानंतर हे गाणं बंद झालं होतं....सगळीकडे भयानक शांतता होती....आनंदाने परत दार उघडून बघितलं तर त्या हॉल मध्ये कुणीच नव्हतं....दाराच्या फटीतून आनंदा हे सगळं बघत होता....आनंदा हळूहळू त्या हॉल मध्ये पोहोचला तिथे बरोबर मध्ये एक मोत्याचा हार ठेवला होता त्यालाही माती लागली होती.....तो हार उचलून आनंदा चारी दिशांना नमस्कार करत करत परत त्या रूम मध्ये जाऊन झोपी गेला.....परत शहरात जाऊन त्याने स्वतःवर ट्रीटमेंट करून घेतली.....आता मात्र ह्या वाड्याकडे परत येण्याची ओढ त्याला सतावू लागली...दिवसेंदिवस तो वाडा आनंदाला स्वतःकडे आकर्षित करत होता..एक वेगळंच आकर्षण होतं हे....सुरवातीला भीती दाखवणारा हा वाडा आनंदाला मदत करत होता...आनंदाच्या तब्बेतीत सुद्धा सुधारणा होत होती....हे सगळं काय घडतंय ह्याची आनंदाला कल्पना नव्हती पण जे काही घडत होते ते चांगलं घडत होतं....रात्री परत आनंदा त्या वाड्यात आला...लांबूनच वाड्यात कंदीलाचा उजेड दिसत होता....आनंदा दाराजवळ आला तेव्हा त्याच्या परत लक्षात आलं की आपण इथं का आलोत.....इथे विचित्र प्रकार घडत आहेत कालच्या त्या नग्न सुंदर स्त्रिया??.....हे सगळं अमानवी आहे पण नंतर आणखी त्याच्या मनात विचार आला की हा वाडा तर आपल्याला पैशाची मदत करत आहे अजून उपचारासाठी खूप पैसे लागणार आहेत....आपला इलाज शेवट टप्पात आला आहे त्यामुळे आपण हा वाडा सोडता कामा नये....आनंदा परत त्या वाड्यात शिरला सावध पणे सगळीकडे नजर फिरवू लागला....वाड्यात शांतता होती....त्या मुख्य हॉल मध्ये ग्रामोफोन चालू होता...त्यावर मधुर संगीत चालू होतं....आता ह्या सगळ्या गोष्टीची आनंदाला सवय झाली होती हा वाडा आपल्याला हानी पोहचवणार नाही अशी काहीशी आनंदाची समजूत होती पण त्याला हे माहीत नव्हतं की हा वाडा आनंदाची परीक्षा घेत आहे.....ह्या वाड्याने 1,2 वेळेला आनंदाला गिळण्याचा प्रयत्न केला पण आनंदाने ती संधी येऊनच दिली नाही....मुळात आनंदा एवढा स्वार्थी नव्हताच की दिलेलं ओरबाडून खाइल असा....जे हा वाडा देईल ते तो घेत राहिला.....देणाऱ्या अदृश्य हाताचे आभार मानत राहिला.....आनंदा आता मुख्य हॉल मध्ये आला....समोर जे काही दिसले ते बघून आनंदाचे डोळे विस्फारले....हॉल मध्ये एक पायरी उतरून जाण्याइतकी एक चौरस जागा होती....त्या जागेच्या खाली हरिबाने सगळा खजिना पुरला होता.....कालपर्यंत सामान्य असलेली ती जमीन एका काचेसारखी नितळ झाली होती म्हणजे खाली जो अमाप सोन्याचा खजिना पुरला होता तो खाली दिसत होता....ती दगडी जमीन काचेसारखी नितळ झाली होती....आतले अमाप सोने अगदी काही फुटावर दिसत होते....काही मिनिटे आनंदा त्या सोन्याची झळाळी अनुभवत होता डोळ्यात साठवत होता....काही मिनिटांनी परत ती जमीन पूर्ववत झाली परत तिथे दगडी फरशी आली.....एक दोन दगड काढले की अमाप खजिना आनंदाला मिळणार होता....तो कायमचा श्रीमंत होणार होता....ह्या वाड्यात आल्यापासून त्याचा कॅन्सर सुद्धा बरा होत चालला होता...आणि आता हा खजिना घेऊन आनंदा श्रीमंतीत जगू शकत होता.....काही वेळ थक्क राहिल्यानंतर आनंदा भानावर आला....एक दोन कंदील विझले गेले आणि डाव्या कोपऱ्यात अंधार झाला....डाव्या कोपऱ्यातून परत कुजबुज ऐकू येऊ लागली.....अचानक शांतता आणि डाव्या कोपऱ्यातून त्या अंधारातून एक कुदळ बरोबर आनंदाच्या समोर येऊन पडली....आनंदा क्षणभर विचार करू लागला....त्याच्या डोक्यातून ते अमाप सोने जात नव्हते.....थरथरता हात त्या कुदळी कडे जात होता अचानक आनंदाने सर्रर्रर्रर्र कन हात मागे ओढला"न्हाई न्हाई......उपकार केलेल्याला लुटणार्याची जात न्हाई आमची....तुम्ही जो कुणी बी असशील....तुम्ही मला माझ्या इलाजाला पैस दिलाईसा तुम्ही माझं मालक हैसा....तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवणं म्हणजे पाप हाय जी....त्यो माझा शंकर मला माफ करणार न्हाई....आयुष्यभर प्रमाणिक आयुष्य जगलो आता मरताना ह्यो बट्टा लागून न्हाई मरायचा मी....ही दौलत मला काय कामाची?? उभं आयुष्य रानात काम करून गेलं आता हे श्रीमंतीचं आयुष्य न्हाई झेपायचं मला....माफ करा तुम्ही जो कुणी असशील त्यांना माझं हेच सांगणं हाय....मी हे पाप न्हाई करू शकत....मला माफ करा"आनंदा त्या अंधारात बघून बोलत होता....आनंदा त्या अंधारातून उत्तराची वाट बघत होता.....सर्रर्रर्रर्र कन ती कुदळ मागे अंधारात गायब झाली.....अंधार हळूहळू गायब होऊ लागला.....एक काळी आकृती त्या अंधारातून पुढे आली....म्हणजे ती आकृती हवेत तरंगत होती....5 फुटाच्या उंचीवरून आनंदाकडे बघत होती....आनंदा हे बघून घाबरला नाही....त्याने त्या आकृतीपुढे हात जोडले....त्या आकृतीचा चेहरा अस्पष्ट होता हवेच्या झोताने बदलत होता काळ्या धुराच्या रूपातील ती आकृती आनंदाकडे बघून म्हणाली कर्कश कापर्या आवाजात बोलू लागली"मी इथला मालक आहे....माझं नाव हरिबा आहे...."आनंदा गुडघ्यावर बसला तश्या त्याच्या आसपास अनेक काळ्या आकृती जमा झाल्या....आनंदाने आजूबाजूला बघितलं....चेहरा नसलेल्या पण मानवी आकार असलेल्या त्या आकृत्या अगदी दाटीवाटीने त्या हॉल मध्ये जमा झाल्या होत्या....परत तो करारी आवाज त्या हॉल मध्ये घुमला"आयुष्यात माणसाला एक आशा असते ती म्हणजे धन दौलत....मी लहान असताना खुप कष्ट सोसले....उपाशी रात्री काढल्या..राबून काही मिळत नाही..नंतर मी भेटलेल्या एका साधूच्या उपदेशाने तंत्र साधना केली आणि मांत्रिक झालो....ह्या विद्येच्या जोरावर हे सगळं वैभव मिळवलं....पारलौकिक जगातून तंत्र विद्येच्या सहाय्याने अनेक दास दासी बनवल्या ज्या माझ्या शब्दखातर काहीही करतील....पण एका गोष्टीत माझा जीव अडकून होता ते म्हणजे सोनं.....काहीतरी होत सोन्यात ह्यासाठी मी एवढा का वेडा होतो कल्पना नाही....पण आयुष्य भर खूप सांभाळलं.....मेल्यानंतर सुद्धा मी आणि माझे हे नोकर मिळून ह्या सगळ्या सोन्याची रक्षा करत होतो....पण आता नाही माझा अंतिम क्षण जवळ आला...माझा इथला कार्यकाळ संपला....माझ्या आत्माला पुढच्या प्रवासाला निघालं पाहिजे.....कितिदिवस इथे गुंतून राहणार?? मुक्ती मिळालीच पाहिजे....पण मला माझ्या ह्या सोन्याच्या देखभालीसाठी एक वारस हवा होता...ज्याच्या मनात स्वार्थ नसेल तोच व्यक्ती मला ह्या सोन्याचा वारस म्हणून निवडायचा होता....आणि माझा शोध आता संपला आहे....तूच होणार इथला वारस""काय??....म्या....नाही जी नाही....मी आजारी म्हातारा किती दिवस ह्या तुमच्या सोन्याची देखभाल करणार??..."हरिबा उडत उडत आनंदाजवळ आला"तू जेवढं जगशील तेवढं माझ्या सोन्याचे रक्षण कर नंतर तू हा वारसा दुसऱ्याला दे.....मी माझ्या काही शक्ती ज्या मी खूप साधना करून कमावल्या आहेत...त्या शक्ती मी तुला देतो"आनंदा गयावया करू लागला....हरिबा आनंदाच्या जवळ येऊ लागला....आनंदा आता काकुळतीला आला होता....तो एक सामान्य आयुष्य जगत होता ह्या शक्ती वैगेरे असलं त्याला काहीच नको होतं....हरिबाने आपले तोंड उघडले....त्याचा जबडा वाढत चालला होता...फूटभर तरी हरिबाचा जबडा लांबडा झाला होता हे बघून आनंदा घाबरला मागे सरकू लागला....हरिबाच्या सेवकांनी म्हणजेच त्या काळ्या आकृतींनी आनंदाला मागून पकडले....हरिबाच्या तोंडून एक काळा धूर निघू लागला.....तो हॉल त्या काळ्या धुराने गच्च भरला.....तो धूर आता आनंदाच्या भोवती गोळा झाला.....आनंदाचे तोंड उघडले गेले सगळा काळा धूर ती काळी विद्या जी हरिबाने आयुष्यभर साधना करून कमावली होती ती धुरात परावर्तित होऊन आनंदाच्या तोंडात जाऊ लागली....आनंदाचे डोळे विस्फारले होते....अचानक एवढी ऊर्जा अंगात घुसत असल्याने तो तळमळत होता पण त्या काळ्या आकृतींनी त्याला मागून घट्ट पकडले होते....आनंदाच्या नसा ताणल्या होत्या....डोळे सताड उघडे होते सगळा काळा धूर आनंदाच्या तोंडातून शरीरात समावू लागला....आनंदाला ही ताकत आता जाणवत होती....त्याचं शरीर काटक बनलं होतं....त्यांने आजूबाजूला बघितलं....आता समोर ते विद्रुप चेहरे नव्हते समोर एक लोकांचा समुह दिसत होता जो इथे हरिबाने बंदिस्त केला होता....समोर सगळ्या आत्मा होत्या पण आता त्या मनुष्यासारख्या आनंदाला वाटत होत्या....काही वेगवेगळी पिशाच्च हरीबाने आपल्या शक्तीने पकडून ठेवल्या होत्या त्यात पंख असलेले असुर,रूप बदलणाऱ्या सुंदर मोहिनी स्त्रिया अनेक अमानवी दिसणारे जीव सुद्धा समोर दिसत होते....ह्या सगळ्यांचा ताबा आता आपल्याकडे आहे असं आनंदाला जाणवलं होतं तो आता ह्या सगळ्या बंदिस्त शक्तींचा मालक होता.....आनंदाने स्वतःच्या हाताकडे बघितलं हाताच्या शिरा काळ्या पडल्या होत्या....काळ्या शक्ती शरीरात उतरल्या होत्या.....त्याने समोर तरंगणाऱ्या हरिबाच्या आकृतीकडे बघून नमस्कार केले आणि म्हणाला"मालक मी तुम्हाला वचन देतो की शेवटच्या श्वास अस पर्यंत तुमच्या सोन्याच्या खजिन्याच रक्षण करीन"हरिबाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले आणि तो धूर स्वरूपात उडून हवेत विरून गेला पुढच्या प्रवासाला निघाला....हरिबाने आता स्वतःच्या आत्म्याला मुक्त केलं होतं.....आता आनंदा ह्या वाड्याचा आणि अनेक अघोरी काळ्या शक्तींचा मालक होता....हरिबाच्या शक्तींचा वारस होता....आनंदा जमलेल्या सगळ्या आत्म्यांना इशारा केला.....हे आत्मे बंदिस्त होते आणि हरिबा नंतर आता आनंदाला जोडले गेले होते त्यामुळे हा संवाद आतून होत होता....आनंदाने इशारा केला तसे ते आत्मे इथून गायब झाले म्हणजे परत ह्या वाड्याचा एक भाग झाले....त्या हॉल मध्ये आनंदा एकटा होता....एक वेगळेच समाधान त्याच्या चेहऱ्यावर होते.....समोर ठेवलेल्या एका आलिशान खुर्चीवर तो आरामात बसला.....कसल्या तरी विचारात तो हरवून गेला होता....त्याने आपल्या खिशातून आपलं पाकीट काढलं त्या पाकिटाला काळ्या धाग्याने गुंडाळले होते....आनंदाने आपल्या हातातील काळा दोरा सुद्धा ओढून काढला....डाव्या पायातला काळा दोरा सुद्धा ओढून काढला....त्याने आपल्या शेंडीला सुद्धा एक छोटा काळा दोरा गुंडाळला होता तो सुद्धा काढून टाकला.....त्याने पाकीट उघडले....काही पैसे,atm कार्ड असा ऐवज त्या पाकिटात होता....त्याने एक पासपोर्ट साईझ फोटो आतल्या कप्प्यातुन बाहेर काढला आणि त्या पासपोर्ट साईझ फोटोकडे बघू लागला....एक 30-32 वर्ष्याच्या तरुणाचा फोटो होता तो.....तो फोटो बघताच आनंदाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले....हातपाय थरथरू लागले....त्याने डोळे बंद केले आणि वाड्यातील दोन पिशाच्याना बोलावून घेतले....अमानवी काळेकुट्ट मानवी देह सोबत वटवाघळा सारखे पंख असलेले दोन विद्रुप पिशाच्च आनंदा समोर आले.....आनंदाने त्या दोन पिशाच्याना तो तरुणाचा फोटो दाखवा....आणि आंतरिक भाषेतून न बोलता आनंदा त्या दोन पिशाच्च सोबत संवाद साधू लागला.....ते पिशाच्च गुरगुरत होते....खट खट खट असे दात खात होते....आनंदाने डोळ्यांनी इशारा केला तसे ते पिशाच्च दारातून बाहेर उडाले आणि आनंदाने एक दीर्घ श्वास सोडला...........(क्रमशः)
इलाज-भाग क्र :- १

(ह्या कथेचे एकूण ३ भाग आहेत...तिन्ही लिहून तयार आहेत...रोज रात्री 8 वाजता एक एक भाग पोस्ट होईल)
लेखन :- शशांक सुर्वेत्या रात्री पावसाने नुसते थैमान घातले होते थैमान.....कुणीतरी पाण्याची कळशी डोक्यावर ओतावी ना तसा तो त्या आधीच जीर्ण असलेल्या वृद्धावर बरसत होता....पाठीतून वाकलेला हा 60-65 वर्षाचा म्हातारा थंडीने कुडकुडत फक्त आणि फक्त चालत होता....समोरची वाट मात्र काहीच दिसत नव्हती....एखादी वीज चमकली की तिच्या उजेडात हा जीर्ण देह तोंडवरचे पाणी पुसत चालत होता....पायातले चप्पल चिखलात रुतून तुटून कधीच वाहून गायब झाले होते...आधीच ब्लड कॅन्सरने त्रस्त असलेला हा म्हातारा...आजची रात्र आपली शेवटची रात्र आहे हा धो धो पाऊस आणि वादळी वारे आपल्याला वाहून घेऊन जाणार अस समजून जीवाच्या आकांताने चप चप आवाज करत चालत होता....आजूबाजूला एकही घर नव्हतं....एका तासापूर्वी रेल्वे स्टेशन वरून वाट विचारत विचारत तो दवाखाण्याकडे चालला खरा पण वाटेत पावसाने गाठले...असा भयानक पाऊस त्याने प्रथमच बघितला असावा....वादळी वाऱ्याने विद्युत वाहिन्या तुटल्याने लाईट सुद्धा गेली होती सगळीकडे मिट्ट काळोख होता....त्यात चालत चालत कुठला तरी आडोसा मिळेल ह्या आशेने हा म्हातारा चालत होता पण मुख्य रस्त्यावरून भटकून तो कधी ह्या माळरानावर आला हे त्याचं त्याला समजलं नाही....कदाचित तो उतारावर होता कारण वरून वाहत येणाऱ्या पाण्याचा लोट म्हाताऱ्याच्या पायाला लागत होता आपला तोल सावरत तो एखादे झाड वैगेरे शोधू लागला पण त्या माळरानावर एकही झाड दिसत नव्हतं.....म्हातारा प्रचंड घाबरला....वादळी वारे,पाऊस,कडाडत्या विजा ह्याचा एकत्रित आवाज त्या माळरानावर एखाद्या राक्षसी आवाजासारखा भासत होता सोबत हा मिट्ट काळोख.....तरी म्हातारा चिवाट होता....तोंडावरचे पाणी पुसत पुसत तो त्या अंधारात चौफेर नजर मारत होता....एखादी दिवाबत्ती किंवा प्रकाश दिसला की त्या दिशेने जायचं अस त्याने ठरवलं होतं...पण तो काळा काळोख इतका मिट्ट होता की कधी तो आपल्याला गिळंकृत करून ढेकर देईल सांगता येत नव्हतं....भीतीचं एक वादळ म्हाताऱ्याच्या मनात घोंघावत होते.....अचानक एक मोठा आवाज झाला....वीज पडली होती अगदी 100 मीटर अंतरावर.....सगळीकडे नुसता लख्ख प्रकाश पडला....काही सेकंद तो उजेड होता आणि त्या उजेडात त्या म्हाताऱ्याला दिसलं एक घर.....त्याच्यावरच वीज पडली होती.....म्हातारा आता ह..ह..ह...ह...ह असा जोर लावीत त्या घराच्या दिशेने जाऊ लागला.....आनंदा हे तसे एका मोठ्या शहरात एकटेच रहायचे...सगळं काही निवांत चालू होतं...पण अचानक त्यांना ह्या ब्लड कॅन्सरने ग्रासले....त्याच्या गावात उपचार नव्हता....एकाच्या सल्ल्याने तो ह्या शहरात आला होता....इथे स्वस्तात कॅन्सरवर उपचार होतात म्हणून जेमतेम सगळेच पैसे घेऊन आनंदा ह्या शहरात आला पण आता ह्या पावसात सापडला होता....शेवटी त्याला हे ह्या माळरानावर एकटेच उभे असलेले घर दिसले आणि त्या घराच्या दिशेने आनंदा चालू लागलापावसापासून वाचण्यासाठी आनंदा त्या घराच्या दिशेने चालू लागला खरा पण तिथून परत येईल का??...ह्या वाक्याचे एक वेगळेच कारण होते ..इथे आजूबाजूला वस्ती ह्या कारणास्तव नव्हती कारण ही 40-50 एकर जागा शापित आहे असं इथले लोक मानतात....म्हणून इथे आजूबाजूला एक साधे चिटपाखरू सुद्धा नव्हते....कसला तरी जबरदस्त श्राप होता ह्या जागेला म्हणून तर ह्या एवढ्या जागेत एकही झाड उगवत नव्हतं....भयानक श्राप होता ह्या जागेला.....म्हणजे कथा अशी सांगितली जाते की 1940 च्या काळात इथे एक मांत्रिक राहत होता....तंत्र विद्येने त्याने खूप सारा पैसा सोने-नाणे,हिरे मानके कमावले....सगळं काही आपल्या अघोरी शक्तीच्या जोरावर....त्याची शक्ती एवढी भयानक होती की लोक घरातील सोने नाणे आणून त्याच्या ह्या वाड्यात आणून ठेवत.....हा वाडा अगदी सोन्याने भरला होता.....धान्याची पोती रचून ठेवावी तस सोनं ह्या वाड्यात भरलं होतं.....लोक भ्रमिष्ट होऊन इथे आपले सोने ठेवून जात अशी मांत्रिक शक्ती असलेला हरिबा इथे राहत होता.....एक चांगले आयुष्य त्याने इथे घालवले....त्याचे वय वाढत चालले होते....मृत्यू घटिका आता त्याला समोर दिसत होती पण आपण कमावलेल्या सोन्या वरून त्याचा मोह सुटत नव्हता.....म्हणून त्याने एक शेवटची साधना केली.....तो स्वतःला ह्या वाड्यात कैद करवून कायमचा इथे राहणार होता.....आपल्या शक्ती ह्या वाड्यात गुंतवून ठेवणार होता....म्हणून त्याने अखेरची पूजा मांडली......आधी त्याने आजूबाजूच्या असंख्य आत्म्यांना आपल्या मंत्र शक्तीच्या जोरावर इथे ह्या वाड्यात बोलावून घेतले....नंतर आपल्या तंत्र विद्येने ह्या आत्म्यांना इथे बंदिस्त केले.....हरिबा आता त्या असंख्य आत्म्यांचा मालक होता....अनेक हजारो तृप्त,अतृप्त,अघोरी,पिशाच्च आत्मे ह्या वाड्यात कैद झाले....आता हरिबा ह्या असंख्य आत्म्यांचा मालक होता....त्याने आधी ह्या आत्म्यांचा कडून ह्या वाड्याच्या मधोमध एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात सगळे सोने पुरून टाकले.....नंतर त्या पुरलेल्या जागेवर त्याने एक यज्ञ मांडला आजूबाजूला काळेकुट्ट आत्मे फिरत होते....सगळा विधी पूर्ण झाला...यज्ञ जळत होता....हरिबा अघोरी मंत्र म्हणत होता त्याने एका आत्म्याला इशारा केला तशी ती काळीकुट्ट उंच आकृती समोर आली आणि बाजूला पडलेल्या कोयत्याने हरिबाचा शिरच्छेद केला....ते मुंडके त्या काळ्या सावलीने हरीबाने दिलेल्या आदेशानुसार यज्ञात टाकले.....तसा तो उग्र जळत असलेला यज्ञ शांत झाला...हरिबाने स्वतःचा बळी दिला पण हा त्याग नव्हता तर सुरवात होती....त्या सोन्याच्या खजिन्यामध्ये हरिबाचा जीव अडकला होता त्याच्या सुरक्षेसाठी हरिबा आता त्या असंख्य आत्म्यांचा गर्दीत सामील झाला होता....पण अजूनही तो त्या आत्म्यांचा मालक होता....आपल्या मर्जीप्रमाणे त्यांना वागवत होता...हे अतृप्त आत्मे हरिबाचे गुलाम होते,सैन्य होते....अस म्हणतात की हरिबाचा आत्मा अजूनही त्या वाड्यात आहे त्या सोन्याच्या खजिन्याची रक्षा करत आहे....जो कुणी जाईल तो परत कधीच आला नाही तिथून....तिथला खजिना शोधून काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण नंतर त्यांचे हाड सुद्धा कुणाला सापडले नाही....अस म्हणतात हा वाडा म्हणजे एक राक्षस आहे हा वाडा लोकांना गिळंकृत करतो....स्थानिक तर ह्या अपशकुनी वाड्याकडे बघत सुद्धा नाहीत...आसपास भटकत सुद्धा नाहीत...ज्यांनी ह्या वाड्यात प्रवेश केला ते परत आलेच नाहीत म्हणून तर सरकारने ही जागा निषिद्ध यादीत टाकली होती....आजूबाजूला काटेरी तारा लावल्या होत्या पण न जाणो आजच्या वादळाने ह्या तारा उखडून गेल्या होत्या...एवढ्या मोठ्या पावसाने माती वाहून गेल्याने खांब उखडून पडल्या होत्या....सगळं काही विचित्र अनपेक्षित घडलं होतं आणि वाड्याजवळ पोहोचला आनंदा.....वाड्याला आत्मा रुपी नवीन सेवेकरी मिळणार होता....पण ह्या सगळ्याची कल्पना आनंदाला नव्हती....तो एक रोगी होता....रोगी माणसाला स्वतःचे भान कधीच नसते....दुखण्याने त्याचे शरीर खंगुण गेले असते तरी जगण्याची एक आशा मनात असतेच....आनंदा हळूहळू त्या वाड्याजवळ जाऊ लागला....वाड्याजवळ जाताना त्याची नजर त्या वाड्याकडे होती....आनंदा जवळ जाताच विजांचा कडकडाट वाढला काही सेकंद पूर्ण आकाश लख्ख प्रकाशने उजळून जायचं तेव्हा तो काळा दगडी वाडा स्पष्ट दिसत असे....पाऊस थांबला होता पण पायजवळून जणू ओढा वाहत होता.... पाऊस बंद झाल्याने पाण्याचा खळ खळ आवाज कानावर पडत होता....अचानक त्या वाहत्या पाण्यात कुणी चालण्याचा आवाज करत होत....हा आवाज जिथून येत असे त्या दिशेने आनंदाची मान वळत असे....आधीच ह्या पावसाने तो गारठला होता म्हणून त्याची पावले वाड्याच्या दिशेने चालत होती....आनंदा सावधपणे पाऊल टाकत होता कारण त्याच्या पायात चप्पल नव्हते....पण ह्या अंधारात हा सावधपणा काहीच कामाचा नव्हता सर्रर्रर्रर्र कण एक कळ त्याच्या मस्तकात घुसली.....पायाला काहीतरी कापले होते....आ...आ...आ....आई ग.....एक पाय काहीवेळ हवेत उचलून आनंदा परत आपला जीर्ण देह त्या वाड्याच्या दिशेने नेऊ लागला....अधून मधून विजा चमकत होत्या भिजलेला वाडा उजळून निघत होता.....आता सगळं पाणी सुद्धा वाहून गेले होते त्यामुळे एक भयानक शांतता वातावरणात होती....ओल्या गवतावरून कुणीतरी सर्रर्रर्रर्र सर्रर्रर्रर्र आवाज करत आनंदाच्या बाजूने जात होतं....आनंदा थोडा शहराला होता...जेव्हा वीज चमकत होती तेव्हा त्याला दिसायचं की आजूबाजूला तर कुणीच नाही....परत थोडं मनाला सावरत आनंदा चालू लागायचा.....वाडा आता जवळ येत होता....वरती बघत बघत आनंदा चालला होता....अचानक तो जागेवरच थबकला....त्या वाड्याची जी कमान होती त्यावर कुणीतरी बसलं होतं. ..चमकलेल्या विजेच्या उजेडात आनंदाने स्पष्ट बघितलं होत....डोळे अंधारात चमकत होते रोखून आनंदाकडे बघत होते....एक शेपटी सारखा भाग खाली लोम्बत होता....हे दर्शन फक्त काही सेकंदाचे होते....पुढच्या वेळी जेव्हा वीज चमकली तेव्हा तिथे कुणीच नव्हते....आत जावे की नाही???.....आनंदाला प्रश्न पडला पण पुढच्या क्षणी त्याला दिसले की त्या वाड्यात कसला तरी दिवा लागला आहे....म्हणजे ह्या वाड्यात कुणीतरी आहे....आनंदा परत एका आशेने वाड्याच्या दिशेने चालू लागला....कुडकुडत होता तो...त्याचे पहिले पाऊल वाड्याच्या दगडी फरशीवर पडले....आता तो त्या उजेडाच्या दिशेने जाऊ लागला.....पायऱ्या चढत चढत तो ह्या मोठ्या चिरेबंदी वाड्याच्या मुख्य दरवाज्याजवळ आला....दारातच एक जुना चमकदार कंदील ठेवला होता.....आनंदा दारातच उभा राहिला....डावीकडे उजवीकडे मान फिरवीत फिरवीत तो आत नजर फिरवू लागला.....कसलीतरी कुजबुज त्याला ऐकू येत होती.....शेवटी त्याला राहवलं नाही आपल्या कापर्या आवाजात त्याने हाळी मारली"कुणी हाय का घरात???"आतून काहीच उत्तर येत नव्हतं....एक दोन वेळा हाच प्रश्न करून झाल्यावर मात्र आनंदाचा धीर सुटला आणि दारात ठेवलेला कंदील घेऊन तो ह्या वाड्यात शिरला....वाड्यात शिरताच एक थंड हवेचा झोका त्याला चाटून गेला....दातावर दात आपटत होते...."कुणी....कुणी हाय का घरात??" अश्या आरोळ्या देतच आनंदा वाड्यात शिरला....वाड्याच्या मधोमध व्हरांड्यात एक शेकोटी जळत होती...आधीच कॅन्सरने जीर्ण देह आणि त्यात ही थंडी....आनंदा मटकन खाली शेकोटीजवळ बसला....आपलं अंग गरम करत करत तो आजूबाजूला नजर मारत होता.....त्या शेकोटीचा उजेड काही ठराविक भाग प्रकाशित करत होता....बाकी सगळीकडे कुट्ट अंधार होता....त्या उजेडात त्या वाड्याचा काही भाग दिसत होता....तो भाग अगदीच नीटनेटका होता....म्हणजे इथे कुणीतरी राहत आहे अशी समजूत आनंदाची झाली.....बसल्या बसल्या तो "वाट चुकलेला वाटसरु तुमच्या दारी आलाय जी".....अस त्या अंधारात ऐकू जाईल असे बोलत होता पण उत्तर काही येत नव्हतं....पण आनंदाला अस जाणवत होतं की ह्या शेकोटीच्या गोलाकार मर्यादित उजेडाच्या पलीकडे कुणीतरी उभं आहे आणि आपल्याला बघत आहे...हलकीशी कुजबुज त्याला ऐकू येत होती....इतका वेळ एवढ्या हाका मारून कुणीच कसं बाहेर येत नाही??....आनंदा थोडा गोंधळला.....त्या जळत्या शेकोटीमुळे आनंदा आता जरा गरम झाला होता त्यामुळे आता आनंदा उठून उभा राहिला....ज्या दिशेने कुजबुज ऐकू येत होती त्या दिशेने आनंदा हातात कंदील घेऊन चालू लागला....ह्या अंधारात असंख्य लोक गच्च भरले आहेत असं आनंदाला जाणवत होतं....त्याचा सिक्स सेन्स त्याला काहीतरी सांगत होता....त्याचे दबके पाऊल पडत होते....हातातला कंदील वर धरून तो त्या अंधारात चालू लागला....त्या शांततेत असंख्य श्वासांचा आवाज येत होता कुणीतरी त्या अंधारातुन चालत येत होतं....अगदी उंचीपूरी आकृती वाटत होती.....त्याला बघण्यासाठी आनंदाने आपल्या हातातला कंदील वर उचलला.....तो आता समोर आला होता.....त्याला बघून आनंदाचा आवाज गळ्यातच अडकला.....हातपाय थरथरू लागले....दबक्या आवाजात आनंदा किंचाळला....एक बीभत्स चेहऱ्याचा माणूस.....ज्याचा अर्धा चेहरा डाव्या बाजूला लटकत होता....डोक्यात एक कुदळ घुसली होती....अर्धा चेहरा रक्ताने माखला होता....त्याचे डोळे चमकत होते....त्याला बघून आनंदा किंचाळला...."भ...भ...भ....भूत" एवढेच कापरे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले...आणि तो मागे फिरला....तो बीभत्स चेहऱ्याचा माणूस आनंदाच्या दिशेने पुढे सरकत होता...त्याला तस बघून आनंदाने आपली दिशा बदलली....तो त्या अंधारात दुसरीकडे धावू लागला....तेव्हा त्याला जाणवलं की कुणीतरी त्याचा पाय घट्ट पकडला आहे....आनंदाने घाबरत घाबरत कंदिलचा उजेड खाली नेला....आता मात्र आनंदा प्रचंड घाबरला....एक तुटलेल्या हाताच्या पंज्याने त्याचा पाय पकडला होता....आनंदा सर्व ताकतीनिशी आपली सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत होता पण ती पकड कमालीची मजबूत होती....आनंदाला हलताही येत नव्हता....अचानक आनंदाच्या ह्रदयाची धडधड वाढली....कारण त्या अंधारातून लोक बाहेर येत होते....समोर जे काही होतं ते सगळं अमानवी होतं....असंख्य छिन्नविच्छिन्न देह त्या अंधारातून बाहेर पडत होते त्याची त्वचा पांढरीफेक होती त्यामुळे कंदिलाच्या मंद उजेडात सुद्धा त्यांचे शुभ्र अस्तित्व आनंदाला दिसत होते....आनंदाने चौफेर नजर फिरवली....डोकं गरगरू लागलं.....छिन्नविच्छिन्न देह चारी बाजूने चालत येत होते....अनेकांच्या डोक्यात कुदळ मारून त्यांच्या डोक्याचे दोन भाग केल्यासारखे भासत होते....अस्थाव्यस्त देह होते ते अस वाटत होते कुणीतरी भयानक पद्धतीने ह्यांना संपवले आहे....कुणाची आतडी बाहेर आली होती कुणाच्या धडावर शीर नव्हते....कुणी दोन तुकड्यात फरफटत आनंदाजवळ येऊ पाहत होते...आनंदा हे सगळं बघून जिवाच्या आकांताने ओरडू लागला....तो सगळा हॉल गच्च भरला होता अश्या भुतांनी....अचानक उजवा कोपरा रिकामा होऊ लागला....एक आगीचा लोट त्या रिकाम्या जागेतून येत असल्याचे भासत होते....आनंदा पुरता गोठला होता....त्याच्या ह्रदयाची धडधड एवढी वाढली होती की समोरचं हे जे काही आहे ते बघून कोणत्याही क्षणी त्याच ह्रदय फुटू शकणार होतं....समोरून एका काळ्या वेशात एक आकृती येत होती....ती येत असताना ह्या बाजूच्या चित्रविचित्र भयानक आकृत्या बाजूला सरकत होत्या....जणू ह्या काळ्या वेशातल्या व्यक्तीचे ते गुलाम असावेत ती आकृती येताच सगळ्या आकृत्या बाजूला सरकल्या.....काळी आकार बदलणारी धिप्पाड आकृती जी एक प्रकारे हवेत तरंगतच इथे येत होती....पण आनंदाला समोरची ती आकृती भयानक वाटत होती....एखाद्याचा जीव गेला असता बघून.....ती आकृती मानवी वाटत होती पण तिच्या मानेवर शीर नव्हते....ते शीर बाजूला तरंगत होते आणि एखाद्या विस्तवा सारखे पेटत होते.....आनंदा हे सगळं बघून प्रचंड घाबरला....त्याची शुद्ध हरपत चालली होती....अचानक तो खाली कोसळला....तोंडातून रक्ताची उलटी होऊन तो बेशुद्ध पडला...त्याचं अंग थरथरत शांत झालं....बेशुद्ध झाला होता तोआनंदाला काहीच कल्पना नव्हती की हा वाडा शापित आहे....ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात कुदळ घुसली होती ते सर्व जण इथे सोन्याचा खजाना शोधायला आले होते आणि हरिबाच्या अधीन ज्या काळ्या शक्ती होत्या त्यांनी मोठ्या निर्दयी पण ह्या लोकांना ठार केले होते....इथे मरून पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्यांना हरिबाने इथेच ह्या वाड्यात कैद करून ठेवले होते सेवेकरी म्हणून....आणि ती शीर नसलेल्या व्यक्तीची आकृती प्रत्यक्ष हरिबाची होती....आपलं शीर त्याने यज्ञात अर्पण करून ह्या वाड्याला बाधित केलं होतं.....अजूनही त्याचा सोन्यावरचा मोह संपला नव्हता....तो अजूनही ह्या सोन्याची रखवाली करत होता.....आनंदाला सुद्धा ठार करून इथे बंदीस्त करण्याचे ठरले होते पण तसं काही झालं नाही कारण आनंदाच्या मनात इथल्या सोन्याबद्दल कोणताच वाईट विचार नव्हता....त्याला इथल्या सोन्याबद्दल माहिती सुद्धा नव्हते....त्यामुळे कदाचित हरिबाने त्याला ठार केले नव्हते...रक्ताची उलटी करून आनंदा बेशुद्ध कोसळला होता....अधून मधून आनंदाचे डोळे उघडत होते....कसलीतरी कुजबुज त्याला ऐकू येत होती.....आज आपला शेवटचा दिवस आहे असं समजून त्याच्या डोळ्यांतून अश्रू सुद्धा वाहत होते....अखेर त्याचे डोळे मिटलेएक तीव्र सूर्यप्रकाश आनंदाच्या डोळ्यांवर पडला....त्यानेच त्याला जाग आली....ताडकन तो उठून बसला....त्याने जी रक्ताची उलटी केली होती त्यातच तो लोळत होता....त्याने आजूबाजूला बघितलं सुंदर दगडी भक्कम वाडा.....आनंदा कॅन्सरच्या लास्ट स्टेजला होता....अंगात अगदी थोडेच त्राण होते....त्याचा आधार घेत तो उभा राहिला....आपले कपडे सावरत त्याने एकवार नजर सगळीकडे फिरवली....अजूनही तिथलं वातावरण जडजड वाटत होतं...कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असं भासत होतं.....डोकं बधिर झालं होतं....अचानक त्याला रात्रीची दृशे ते भयानक चेहरे आठवले.....ते चेहरे आठवतच आनंदा तार तार चालू लागला....त्याचं अंग थरथरत होतं....कधी एकदा ह्या वाड्यातून बाहेर पडतो अस त्याला झालं होतं....अंगातले सगळे बळ एकवटून तो मुख्य दाराच्या दिशेने चालत होता....अचानक तो त्या दाराजवळ थबकला.....10 वाजले होते ऊन पडले होते....त्या उन्हात समोरचे विस्तीर्ण मैदान दिसत होते....बाहेर पडणारे पाय अचानक गोठले कारण उंबऱ्यावर काहीतरी चमकदार होतं.....सोन्याचा हार होता तो.....तो हार बघूनच आनंदा जागेवर थांबला होता....क्षणभर तो सगळं काही विसरला....त्याने आजूबाजूला बघितलं....तो सोन्याचा हार हातात घेतला....आजूबाजूला कुणीच नव्हतं....त्याने एक दोनदा हाक मारून बोलावण्याचा प्रयत्नही केला त्या शांत वातावरणात त्याचा आवाज घुमत होता पण एकदाही प्रतिसाद आला नाही....तो घाबरून आधी वाड्याच्या बाहेर आला....आणि वाड्याच्या आजूबाजूला फिरून कुणी दिसत का ते बघत होता पण आजूबाजूला कुणीच नव्हतं....अचानक त्याच लक्ष आपल्या कंबरेला गेलं....त्याचा बटवा कुठे पडला होता....आनंदा ह्या शहरात कॅन्सरच्या इलाज साठी आला होता....त्याने साठवलेली रक्कम इथे येईपर्यंत त्याच्याजवळ होती....कुठे पडली?? कुणी चोरली?? की पावसात वाहून गेली काहीच कल्पना नव्हती....आता आपला इलाज कसा होणार?? आपण बरं कसं होणार???बरे करणारे पैसे तर गेले.....आनंदा हवालदिल झाला....त्याला आता रडू कोसळत होतं....अचानक त्याच्या लक्षात आलं की आपल्या हातात हा सोन्याचा हार आहे....डोळे पुसून त्याने त्या सोन्याच्या हारावरची माती झटकली....बाजूच्या एका डबक्यात तो हार स्वच्छ धुतला आणि ह्या वाड्यापासून लांब जाऊ लागला....मागे बघत इकडे तिकडे बघत हार छातीला घट्ट आवळून आनंदा चालत होता....2,3 किलोमीटर चालल्यावर मुख्य रस्ता आला.....एक व्यक्तीकडे लिफ्ट मागून आनंदा आता शहरात आला....त्याचं काळीज धडधड उडत होतं...पैशाची सोय नाही झाली तर??.....आनंदा आता एका सोन्याच्या दुकानात आला त्याने सोनारासमोर तो हार ठेवला तो हार बघून सोनाराने आश्चर्याने आनंदाकडे बघितले कारण तो हार 200 वर्ष तरी जुना होता....त्याकडे निरखून बघत असताना आनंदा थोडा अस्वस्थ झाला...उगाच अपराधी भावना येऊन त्याने सोनारापुढे आपले दवाखान्याचे रिपोर्ट ठेवले"आमच्या पूर्वजांचा हार हाय ह्यो....मला उपचार घ्यायला पैशे पाहिजेत म्हणून ईकायला काढलाय"सोनाराने ते रिपोर्ट एकवार बघितले आणि कोणते प्रश्न केले नाहीत.....5 लाख आनंदाच्या हातावर ठेवले...आनंदा ती रक्कम घेऊन भलताच खुश झाला...आधी तो एका चांगल्या दवाखान्यात ऍडमिट झाला....थोडी रक्कम तिथे भरली.....डॉक्टरने तुम्ही बरे व्हाल अस सांगताच आनंदाच्या डोळ्यातून अश्रू आले....एक वेगळंच बळ त्याच्यात आलं....चार पाच दिवस तो ह्या दवाखान्यात ऍडमिट होता....त्याला थोडं बर वाटत होतं....पैसा अमाप खर्च होत होता.....पाच लाख जवळपास संपत आले होते.....आनंदा कॅन्सर मधून अचानक पणे बरा होऊ लागला पण न जाणो त्याला त्या वाड्याकडे जायची ओढ लागली....हे अस का होतंय त्याला कल्पना नव्हती पण सतत त्याला वाटत होते की त्या वाड्यात परत जावे....आणि रात्री झोपेत त्याला त्या वाड्याची स्वप्ने पडू लागली....कुणीतरी रात्री त्याच्या कानात कसलेसे मंत्र पुटपुटत असे....कदाचित त्यामुळे त्या शापित वाड्या विषयी ओढ निर्माण झाली असावी....आनंदाच्या तब्बेतीत चमत्कारिक रित्या बदल होत होते तो चालू फिरू शकत होता....कदाचित त्या वाड्याची इच्छा असावी की आनंदाने इथे परत यावे....आनंदाचे सगळे पैसे संपले होते....डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की पूर्ण महिना एक दिवस आड चेकअप साठी यावे लागेल....आनंदाचे तर सगळे पैसे संपले होते....औषधांचा आणि पुढील ट्रीटमेंटचा अजून 4 लाख तरी खर्च होणार होता.....त्या भयानक वाड्यात परत जावे का?? एकवार ते कुदळीने फोडलेली डोकी आनंदासमोर आली तो शहारला....पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरले...."जर मारून टाकायचे असते तर केव्हाच त्या वाड्याने मला खाऊन टाकलं असतं....पण तसं झालं नाही....उलट त्या वाड्यानं आपली पैसे देऊन मदतच केली"असा एक विचार करून आनंदा परत त्या वाड्याच्या दिशेने निघाला....तब्बेतीत थोडी सुधारणा झाली होती....आनंदा माळरान तुडवीत त्या वाड्यासमोर परत पोहोचला....त्याला गरज होती पैशाची....दुसऱ्या वेळी हा वाडा आपली मदत करेल का?? ह्या प्रश्नाचं वादळ घेऊन आनंदा त्या वाड्याच्या दारात उभा होता....आणि वाड्याच्या आतून अंधारातून त्या काळ्या शक्ती आनंदा आत येण्याची वाटच बघत होत्या.....जेवढे जास्त आत्मे इथे वाड्यात कैद होतील तितकाच मजबूत नीटनेटका हा वाडा टिकून राहणार होता....ह्या वेळी आनंदाला गिळंकृत करण्यास हा वाडा तयार होता.....(क्रमशः)
भास्कर...
©® लेखक: रूद्रदमन8265077252मी स्वभावाने अत्यंत मनमिळावू... कोणत्याही कार्यक्रमात गेलो की लोकांशी मैत्री करणे हा माझा छंदच... गप्पांची गाडी एकदा का रूळावर आली, की त्याचे रूपांतर गूढ आणि थरारक विषयात कसे करायचे यात मी जणू पीएचडीच केली आहे.... असाच एक किस्सा मी एका मित्राकडून ऐकला, जो त्याच्याच गावात घडला होता... हा अनुभव मी ज्याच्या बरोबर घडला त्याच्या शब्दांत मांडतोय...माझे नाव कुणाल... मी एका शेतकरी कुटुंबात जन्मलो.... परिस्थिती बेताचीच.... आई-वडील, एक मोठी बहीण आणि मी असे आमचे छोटे कुटुंब.... शेती ही मोजकीच त्यामुळे तिच्यावर जेमतेम मीठ-मिरचीचा प्रपंच होत असे... आई वडील जास्त करून दुसऱ्यांच्या शेतीवर कामाला जात असत..पण मला शिक्षणाची ओढ होती... फाटलेल्या पॅंटवर ठिगळ लावून का होईना मी शाळेत जायचोच... मनात एक खात्री होती की शिक्षणाशिवाय हे दारिद्र्य संपणार नाही... आणि ते उमजल्यामुळेच मी स्वतःला अभ्यासात झोकून दिले...अखेर नियती प्रसन्न झाली आणि माझी निवड नवोदय विद्यालया साठी झाली.... घर सोडताना मन द्विधा होते, पण बहिणीचे ते जुने फाटके कपडे आणि माझी गरिबी मला खुणावत होती... नवोदयला गेल्यावर घरातील एक जणाच्या जेवणाचा खर्च वाचला, याचे समाधान मोठे होते...सुरुवातीला मी वर्षातून तीनदा घरी येत असे... पण पुढे ध्येयाने झपाटलो आणि फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतच घरी येऊ लागलो.... त्या काळी मोबाईल हे गरिबांसाठी दिवास्वप्नच होते... केवळ पत्रांद्वारे खुशाली कळायची... एकदा बहिणीचे पत्र आले.... तिने रक्षाबंधनाला येण्यासाठी खूप विनंती केली होती....लग्नाचे वय झालेल्या बहिणीचा हट्ट मी मोडू शकलो नाही... मनात विचार आला..तिला न कळवता, दोन दिवस आधीच मी गावात येऊन धडकलो... तिला झालेला आनंद पाहून माझे मन भरून आले होते...दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होते....राखीचा मुहूर्त उशिरा असल्यामुळे सोहळा उरकायला संध्याकाळचे चार वाजले... थोडा वेळ गावात चक्कर मारून येतो असे आईला सांगून मी बाहेर पडलो.... गावात शांतता होती... बहुतेक जण शेजारच्या गावात जत्रेसाठी गेले होते.... पाय आपोआप नदीकडे वळले.... पाऊस चांगला झाल्याने नदी ला बऱ्यापैकी पाणी होते... काठावरच्या एका शिळेवर बसून मी मावळत्या सूर्याचा केशरी प्रकाश न्याहाळत होतो.... सूर्य मावळला तसा काळोख दाटून येण्यास सुरुवात झाली.. थोड्याच वेळात त्या निसर्गरम्य देखाव्याला तो आपल्या कवेत घेणार असल्याचे मला जाणवले...घरी जाण्यासाठी मी उठलो आणि गावाच्या दिशेने चालू लागलो, इतक्यात मागून हाक आली,"कुणाल, कधी आलास रे?"मी वळून पाहिले, तो भास्कर होता.... माझा जुना शाळकरी मित्र...नदीच्या काठावर उभा राहून बोलत होता.."अरे भास्कर! मी कालच आलो... इतक्यावेळ कुठे होता.. मला दिसला नाही तो.. आणि तू जत्रेला नाही गेलास का? " मी विचारले..तो शून्यात बघत म्हणाला, "नाही रे, यावर्षी नाही जमले जायला.... इथेच तर होतो.. तुला लपून बघत होतो.. तू जाण्यासाठी उठला की तुला धप्पा करण्यासाठी.."तो बोलत बोलत पुढे आला... एक ओलसर शेवाळलेला वास त्याच्या आजूबाजूला दरवळत असल्यासारखे मला जाणवले.. मी त्याकडे दुर्लक्ष केले..आम्ही जवळच्याच शिळेवर बसून गप्पा मारू लागलो..पण तो फारसा बोलत नव्हता...अचानक माझा हात पकडत तो म्हणाला, "कुणाल, चल पोहायला जाऊया!"मी त्या अचानक मागणीने आणि त्याच्या हाताच्या त्या ओलसर बटबटीत स्पर्शाने दचकलो..."अरे, आता तर पार अंधार झालाय. उद्या येऊ की..."बोलत मी त्याच्या हातातून हात सोडवून घेतला..तो हट्टाला पेटला, "नाही, आताच चल... या वेळच्या पाण्याची मजा तुला माहीत नाही... मी रोज याच वेळी पाण्यात असतो."त्याचा स्पर्श त्याचा आग्रह विचित्र वाटत होता... इतक्यात दुरून बॅटरीचा प्रकाश दिसला..."कुणाल... अरे कुणाल!" वडिलांचा आवाज आला...मी आलो आलो म्हणून प्रतिसाद दिला....भास्करकडे वळून म्हणालो, "मी निघतो, बाबा आलेत. उद्या नक्की भेटू."भास्कर काहीच न बोलता नदीच्या पात्राकडे चालू लागला आणि वळून म्हणाला, "कुणाल, मी रात्री तुला भेटायला घरी येईन... भेटशील ना?"मी केवळ हो म्हटले आणि बाबांच्या दिशेने धावलो....बाबा खूप चिडलेले होते. "एवढ्या रात्री नदीवर काय करतोयस?" त्यांनी चिडून विचारले.....मी त्यांना शांत करण्यासाठी बोललो, "बाबा, मी एकटा नव्हतो. भास्कर भेटला होता, त्याच्याशी गप्पा मारत होतो."माझे बोलणे ऐकताच बाबांच्या हातातील बॅटरी क्षणभर थरथरली... त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, "चल, लवकर घर गाठूया."घरी गेल्यावर वातावरणात एक विचित्र ताण होता... जेवताना बाबा एक शब्दही बोलले नाहीत... जेवण उरकून मी माझ्या खोलीत गेलो... थोड्या वेळाने बाबा आले आणि त्यांनी माझ्या खोलीच्या खिडक्या आणि दरवाजा लावून घेतला. "खिडकी अजिबात उघडू नकोस," असा सज्जड दम देऊन ते निघून गेले...मध्यरात्रीची वेळ झाली असेल... घरातील सर्व जण झोपले होते... सगळीकडे स्मशानशांतता पसरलेली... अचानक खिडकीवर टक-टक असा आवाज झाला....मी खिडकीकडे बघितले...कोणीतरी बाहेरून खिडकी हलवत होते...मी घाबरून विचारले, "कोण आहे?"आवाज थांबला.... मला वाटले मांजर असेल मी सावधपणे खिडकी उघडली... समोर पाहतो तर काय, अंधारात भास्कर उभा होता... त्याचे डोळे निर्जीव दिसत होते....चेहरा आणि केसांवरून पाणी गळत होते... जसा तो नुकताच पाण्यात पोहून आला होता..तो म्हणाला, "कुणाल, बाहेर ये ना... मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. दरवाजा उघड..." त्याच्या बोलण्यात एक अर्जव होते..मला त्याला निघून जा असे म्हणावेसे वाटत होते पण नाही करू शकलो.. मी त्याला मुख्य दरवाजापाशी यायला सांगितले...मी हॉलमध्ये आलो आणि दरवाजाची कडी काढणार, तोच मला जाणवले की दरवाजाला तर आतून मोठे कुलूप लावलेले होते...दरवाजावर टकटक करत बाहेर उभ्या भास्कर ने लवकर दरवाज उघडण्याची विनंती केली..मी त्याला आतून लावलेल्या कुलूप विषयी सांगत, मी यावेळी बाहेर येण्यास असमर्थ असल्याचे सांगितले...माझ्या त्या नकारा बरोबरच बाहेर काही तरी बदलले...भास्करचा आवाज आता बदलला होता. तो आता विनंती करत नव्हता, तर ओरडत होता..."दरवाजा उघड कुणाल... उघड..."तो जोराने दरवाजावर धडका मारू लागला... त्याचा आवाज आता घोगरा आणि अमानवीय वाटू लागला होता.... मी नखशिखांत घाबरलो आणि दरवाजा पासून दूर जाऊ लागलो...मागे सरकताना माझा हात टेबलावरच्या ग्लासवर आदळला आणि तो काचेचा ग्लास जोरात जमिनीवर आपटून फुटला...त्याच्या आवाजाबरोबर बाबा मागच्या खोलीतून धावत बाहेर आले..."कुणाल! काय करतोयस?" ते जोरात ओरडले...बाबांचा आवाज ऐकताच बाहेरून दरवाजावर पडणाऱ्या धडका थांबल्या.... सगळीकडे एक जीवघेणी शांतता पसरली...त्या घनघोर शांततेत एक जड पावलांचा आवाज घरापासून दूर जाताना ऐकू आला आणि त्या पाठोपाठ एक भयानक ध्वनी माझ्या कानात घुमला..."वाचलास कुणाल... आज वाचलास..."ते शब्द ऐकून माझा थरकाप उडाला होता...मी भिंतीला चिटकून थरथर कापत उभा होतो...बाबांनी मला जवळ घेतले आणि शांत केले.... मी त्यांना सगळे सांगितले....बाबा गंभीरपणे म्हणाले, "कुणाल, जेव्हा तू संध्याकाळी भास्करचं नाव घेतलंस, तेव्हाच काळजात धस्स झालं होतं. पण तुला घाबरवायचं नव्हतं म्हणून मी तेव्हा शांत राहिलो आणि रात्री दरवाजाला आतून कुलूप लावलं."भास्कर विषयी अनेक प्रश्न माझ्या मनात रेंगाळू लागले होते..मी बाबांना विचारले, "पण बाबा,भास्कर असा का वागत होता?"बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, "भास्कर दोन महिन्यांपूर्वीच नदीत बुडून मेला होता रे... त्याचं प्रेत तीन दिवसांनी सापडलं होतं.."माझ्या पायाखालची जमीनच सरकली... बाबा पुढे सांगू लागले, "त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरा शेजारी राहणारा विशाल सुद्धा गावात परतल्यावर दुसऱ्याच दिवशी नदीत मृतावस्थेत सापडला होता.... तुला तर माहीतच आहे विशाल पण बाहेर शिकायला होता... आज तो तुझ्यासाठी आला होता..."सर्व ऐकून मला तर भोवळ यायचीच बाकी होती... त्यादिवशी माझ्या नशिबाने आणि बाबांच्या सतर्कतेने मला खऱ्या अर्थाने पुनर्जन्म मिळाला होता...समाप्त...©® लेखक: रूद्रदमन8265077252#मराठीभयकथा#HorrorMarathi#TrueHorror#मराठीकथा