---वासना----(भाग-१)
वीरभद्र कथा
काव्या व तिचा पती अमित.काव्या दिसायला देखणी.गोरा रंग,गोल चेहरा,चेहऱ्याला शोभणारे नाक,लांब केस,गुलाबाच्या पाकळीसारखे होट,गर्द निळे डोळे,कमनीय बांधा, नाजूक कंबर,उठावदार छाती अर्थात कुणालाही पहिल्या नजरेतच घायाळ करेल अशीच.तस पाहल तर सुखी संसार होता दोघांचा.अमित आय.टी. कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होता.मुंबईमध्ये त्याचा स्वतःचा फ्लॅट होता,चारचाकी गाडी होती.घरात कशाचीही कमतरता नव्हती.आई वडील लहानपणीच वारलेले होते.नुकतेच लग्न झालेला लहान भाऊ सुमित व त्याची पत्नी उर्मिला हे कोकणातल्या त्यांच्या गावी राहून वडिलोपार्जित शेती पाहत होते.कोकणातल्या गावी अमितची वडिलोपार्जित शेती व घर असल्यामुळे कधी कधी तो व काव्या गावाकडे जाऊन यायचे तर केव्हा केव्हा सुमीत दहा पंधरा दिवसांसाठी अमितकडे मुंबईला राहून जायचा.लहानपणी आई वडील वारल्यामुळे अमितच्या काकांनी गणेशराव यांनी अमित व सुमितला लहानाचे मोठे केले होते.काकांना पण अजय व अतुल नावाचे दोन मुले होते.दोघेही अजुन अविवाहित होते.
पावसाळा सुरू होऊन एखादा महिना झाला होता.गावावरून सुमितच्या पत्नीचे उर्मिलाचे भेटीसाठी गावाकडे येण्याबाबत काव्याला सतत फोन सुरू होते.काव्याने उर्मिलाला अमितला फोन करायला सांगितले.उर्मिलाने अमितला फोन करून वारंवार गावाकडे येण्याचा तगादा लावला परंतु अमित कंपनीच्या महत्वाच्या प्रोजेक्ट मध्ये गुंतलेला असल्याने जाऊ शकत नव्हता व आपल्या लहान भावाच्या पत्नीचे मन पण मोडु शकत नव्हता अशातच काव्याने पण गावी जाण्याचा आग्रह सुरू केला.सुदैवाने अमितच्या ऑफिस मधील त्याचा मित्र रोहित व पत्नी साधना कोकण फिरायला निघाले होते.ते ज्या पर्यटनस्थळी जाणार होते त्या ठिकाणापासून अमितचे गाव जवळ असल्यामुळे अमितने रोहितजवळ काव्याला गावी सोडण्याची विनंती केली.अमितची विनंती ऐकून रोहितला आकाश ठेंगणे झाले.जेव्हा जेव्हा तो अमितच्या घरी जात असे तेव्हा तेव्हा काव्याच्या अनावृत्त शरीराकडे हावरटलेल्या नजरेने पाहत असे.तीचा देह भोगायची त्याची तीव्र इच्छा निदान अजून तरी पूर्ण झालेली नव्हती.या निमित्ताने त्याला काव्याची जवळीक मिळणार होती आणि संधी मिळालीच तर.....रोहित तात्काळ काव्याला गावी सोडायला तयार झाला.दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित,काव्या व साधना कोकणाकडे जायला निघाले.तप्त उन्हाने होरपळून निघालेल्या धरतीने पांघरून घेतलेला हिरवा शालू डोळ्यांना सुखावत होता.पाण्याने तुंब भरलेले तलाव,अंगाला झोंबणारा थंड वारा मन प्रफुल्लीत करत होता.रोहित गाडी चालवीत होता.त्याच्या शेजारी साधना बसलेली होती तर मागच्या सीटवर काव्या बसलेली होती.रोहित आरश्यामधून काव्याच्या शरीराचे दर्शन घेत होता.ते काव्याच्या लक्षात आल्यावर काव्या अंगचोरुन दुसऱ्या बाजुला सरकली.संध्याकाळ होईपर्यंत अमितचे गाव आले.अमितच्या दऱ्या खोऱ्यांत वसलेल्या गावाला निसर्गाने भरभरून दान दिले होते.अमितच्या घरी त्याचा भाऊ सुमित व पत्नी उर्मिलाने तिघांचे स्वागत केले.उर्मिलाने काव्याची गळाभेट घेतली. ताजेतवाने झाल्यावर रोहित ने त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघण्याची अनुमती मागितली यावर उर्मिलाने त्यांना रात्र होत असून आजची रात्र त्यांच्याकडे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी त्यांचे शेत,बाजूचे जंगल व निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर पहायची विनंती केली.रोहितला काव्याचा सहवास हवा असल्यामुळे तो राजी झाला.रात्री मस्त चुलीवरच्या भाकरी,कोकणातील माश्यांच्या कालवणाचे जेवण करून सर्व जण झोपी गेले.दुसऱ्या दिवशी सकाळी उर्मिला,काव्या, साधना व रोहित शेत व जंगलांची सफर करायला निघाले.सुमितला वेळेवर काम निघाल्यामुळे तो येऊ शकला नाही.गर्द आमराईने वेढलेल्या शेतात फिरतांना सर्व मंडळी आनंदात होती.शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यावर एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून सर्वांनी मस्ती केली.साधना व उर्मिलाची नजर चुकवून रोहित काव्याशी लगट करत होता पण काव्या त्याला जवळ फिरकू देत नव्हती.असे करता करता दुपार झाली.
घरून आणलेली शिदोरी खाल्ल्यानंतर सर्व शेताशेजारील जंगल पहायला निघाले.जंगलात फिरता फिरता अचानक आकाशात काळे ढग दाटून आले.सर्वत्र अंधार झाला.इतका वेळ चिवचिवाट करणारे पक्षी शांत झाली. झाडांच्या पानांची सळसळ जागीच थांबली.वातावरणात भेसूरता येऊन पावसाला सुरुवात झाली.आकस्मिक आलेल्या पावसामुळे चौघांची त्रेधातिरपीट उडाली. उर्मिला व साधनाने एका मोठया वृक्षाखाली आश्रय घेतला तर काव्या व रोहित आश्रय शोधत शोधत पुढे आलेले असतांना त्यांना एक वाडा दिसतो.वाड्याच्या जाडजूड भिंती वाड्याच्या भक्कमतेची साक्ष देत होत्या.बुलंद दरवाजा व भव्यता तो वाडा कुण्या जमीनदार अथवा सरदाराचा असल्याचे सांगत होते.काव्या व रोहितने त्या वाड्याच्या दरवाज्यातून आत पाऊल टाकले.पडवीत काव्या भिंतीला टेकून उभी असताना रोहितचे लक्ष तिच्याकडे गेले.पावसाने ओली झालेली साडी तिच्या अंगाला चिटकल्यामुळे तीचे शरीर अजूनच उठावदार दिसत होते.ब्लाऊज ओले होऊन पदर खाली पडल्यामुळे उन्नत वक्षस्थळांचे दर्शन होऊन रोहित चेकाळून तिच्याजवळ गेला.त्याने तिच्या वक्षस्थळांवर हात ठेवून तिचे ओठ दातात घेतले.काव्याला विरोध करायचा होता पण जे होत होते ते हवेहवेसे वाटत होते.ती मंत्रमुग्ध होऊन भारावल्यासारखी प्रतिसाद देत होती.रोहितने तिला खाली झोपवून तिच्या अंगावरील कपड्यांचा अडसर दूर करत तिच्यावर ओनवा झाला आणि दोघांचीही शुद्ध हरपली.काव्याला जाग आली ती कुणीतरी त्यांच्या नावाने देत असलेले आवाज ऐकून.सर्वप्रथम डोळे उघडल्यावर आपण कोठे आहोत हेच तिला कळेना,थोडया वेळाने घडलेल्या घटनांची सुसंगती तिला लागली.आपल्या अंगावर एकही कपडा नसल्याची व बाजूला रोहित नग्न झोपलेला असल्याचे जाणीव तीला झाल्यावर ती हादरली.तीने उठून कपडे घातले व रोहित ला उठवून कपडे घालायला लावले.साधना व उर्मिला त्यांना आवाज देत होत्या.दोघंही वाड्याच्या बाहेर निघून आवाजाच्या दिशेने निघाले. थोड्या अंतरावर त्यांना साधना व उर्मिला भेटल्या,त्यांना दोघांनी काही न सांगण्यासारखा भाग वगळून वाड्याची हकीकत सांगितली.हकीकत ऐकतांना उर्मिला रोहित कडे पाहत स्वतःशीच हसत होती.तिचे डोळे वेगळ्याच आनंदात चमकत होते.रोहितचे तिकडे लक्ष नव्हते,तो वेगळ्याच अतीव तृप्तीत होता.त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग ठणकत होता.रात्र होत असल्यामुळे ते घराकडे निघाले.
घरी पोहचल्यावर जेवून झोपीजाण्यापर्यंत काव्या तुटक तुटक बोलत होती,कदाचित झालेल्या प्रसंगाची दिला शरम वाटत होती.दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित व साधना त्यांच्या सहलीकरिता निघून गेले.काव्या काही दिवस गावी राहून मुंबईला आली.सर्व आपापल्या कामात मग्न झाले.रोहित जेव्हाही अमितच्या घरी यायचा तेव्हा काव्या त्याच्या नजरेला नजर देणे टाळायची.अमितच्या एक गोष्ट निरीक्षणात आली की रोहित दिवसेंदिवस खंगत आहे.दुबळा होत आहे.तब्येत खराब असेल म्हणून अमितनेही तिकडे जास्त लक्ष दिले नाही. महिनाभर रोहित ऑफिस ला न आल्यामुळे अमित त्याच्या घरी भेटायला गेला.साधनाने दरवाजा उघडून त्याला आता घेतले असता त्याला घरात नातेवाईकांची गर्दी दिसली.अमितने रोहितबद्दल विचारताच साधनाने रडत रडत त्याला सांगितले की दिवसेंदिवस रोहितची तब्येत ढासळत असून तो अशक्त होत आहे.आश्चर्य या गोष्टींच आहे की दोन वेळ भरपेट जेवत असूनही तो खंगत जात आहे.डॉक्टर सुध्दा बुचकळ्यात पडलेले आहेत.सर्व रिपोर्ट नॉर्मल येत असून जर अशीच अवस्था राहली तर रोहित जास्तीत जास्त दोन दिवसांचा सोबती आहे,म्हणूनच रोहितचे सर्व नातेवाईक, आईवडील यांना बोलावून घेतले आहे. रोहितला पाहताच अमितला घाम फुटला.बलदंड शरीरयष्टीचा रोहित वाळक्या काट्यांवाणी झाला होता.त्याच्या शरीरावर फक्त हड्यांचा सापळा शिल्लक होता.गाल आत जाऊन हाडांना चिपकले होते.घशात घरघर होती.सुन्न मनाने त्याच्याकडे पाहत असतांना रोहितने त्याला व साधनाला मोठ्या कष्टाने हाताचा इशारा करून जवळ करून बोलाविले. खूप प्रयास करून तो त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता पण तोंडातून शब्द फुटत नव्हते.दोघांनी कान त्याच्या तोंडाजवळ नेताच त्यांना तुटक्या शब्दांत ऐकू आले, त..त..ती..प.. प.. प रत आ...आ...ललल..लिलिली...यययय...ती परत आलीय...
पावसाळा सुरू होऊन एखादा महिना झाला होता.गावावरून सुमितच्या पत्नीचे उर्मिलाचे भेटीसाठी गावाकडे येण्याबाबत काव्याला सतत फोन सुरू होते.काव्याने उर्मिलाला अमितला फोन करायला सांगितले.उर्मिलाने अमितला फोन करून वारंवार गावाकडे येण्याचा तगादा लावला परंतु अमित कंपनीच्या महत्वाच्या प्रोजेक्ट मध्ये गुंतलेला असल्याने जाऊ शकत नव्हता व आपल्या लहान भावाच्या पत्नीचे मन पण मोडु शकत नव्हता अशातच काव्याने पण गावी जाण्याचा आग्रह सुरू केला.सुदैवाने अमितच्या ऑफिस मधील त्याचा मित्र रोहित व पत्नी साधना कोकण फिरायला निघाले होते.ते ज्या पर्यटनस्थळी जाणार होते त्या ठिकाणापासून अमितचे गाव जवळ असल्यामुळे अमितने रोहितजवळ काव्याला गावी सोडण्याची विनंती केली.अमितची विनंती ऐकून रोहितला आकाश ठेंगणे झाले.जेव्हा जेव्हा तो अमितच्या घरी जात असे तेव्हा तेव्हा काव्याच्या अनावृत्त शरीराकडे हावरटलेल्या नजरेने पाहत असे.तीचा देह भोगायची त्याची तीव्र इच्छा निदान अजून तरी पूर्ण झालेली नव्हती.या निमित्ताने त्याला काव्याची जवळीक मिळणार होती आणि संधी मिळालीच तर.....रोहित तात्काळ काव्याला गावी सोडायला तयार झाला.दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित,काव्या व साधना कोकणाकडे जायला निघाले.तप्त उन्हाने होरपळून निघालेल्या धरतीने पांघरून घेतलेला हिरवा शालू डोळ्यांना सुखावत होता.पाण्याने तुंब भरलेले तलाव,अंगाला झोंबणारा थंड वारा मन प्रफुल्लीत करत होता.रोहित गाडी चालवीत होता.त्याच्या शेजारी साधना बसलेली होती तर मागच्या सीटवर काव्या बसलेली होती.रोहित आरश्यामधून काव्याच्या शरीराचे दर्शन घेत होता.ते काव्याच्या लक्षात आल्यावर काव्या अंगचोरुन दुसऱ्या बाजुला सरकली.संध्याकाळ होईपर्यंत अमितचे गाव आले.अमितच्या दऱ्या खोऱ्यांत वसलेल्या गावाला निसर्गाने भरभरून दान दिले होते.अमितच्या घरी त्याचा भाऊ सुमित व पत्नी उर्मिलाने तिघांचे स्वागत केले.उर्मिलाने काव्याची गळाभेट घेतली. ताजेतवाने झाल्यावर रोहित ने त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघण्याची अनुमती मागितली यावर उर्मिलाने त्यांना रात्र होत असून आजची रात्र त्यांच्याकडे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी त्यांचे शेत,बाजूचे जंगल व निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर पहायची विनंती केली.रोहितला काव्याचा सहवास हवा असल्यामुळे तो राजी झाला.रात्री मस्त चुलीवरच्या भाकरी,कोकणातील माश्यांच्या कालवणाचे जेवण करून सर्व जण झोपी गेले.दुसऱ्या दिवशी सकाळी उर्मिला,काव्या, साधना व रोहित शेत व जंगलांची सफर करायला निघाले.सुमितला वेळेवर काम निघाल्यामुळे तो येऊ शकला नाही.गर्द आमराईने वेढलेल्या शेतात फिरतांना सर्व मंडळी आनंदात होती.शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यावर एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून सर्वांनी मस्ती केली.साधना व उर्मिलाची नजर चुकवून रोहित काव्याशी लगट करत होता पण काव्या त्याला जवळ फिरकू देत नव्हती.असे करता करता दुपार झाली.
घरून आणलेली शिदोरी खाल्ल्यानंतर सर्व शेताशेजारील जंगल पहायला निघाले.जंगलात फिरता फिरता अचानक आकाशात काळे ढग दाटून आले.सर्वत्र अंधार झाला.इतका वेळ चिवचिवाट करणारे पक्षी शांत झाली. झाडांच्या पानांची सळसळ जागीच थांबली.वातावरणात भेसूरता येऊन पावसाला सुरुवात झाली.आकस्मिक आलेल्या पावसामुळे चौघांची त्रेधातिरपीट उडाली. उर्मिला व साधनाने एका मोठया वृक्षाखाली आश्रय घेतला तर काव्या व रोहित आश्रय शोधत शोधत पुढे आलेले असतांना त्यांना एक वाडा दिसतो.वाड्याच्या जाडजूड भिंती वाड्याच्या भक्कमतेची साक्ष देत होत्या.बुलंद दरवाजा व भव्यता तो वाडा कुण्या जमीनदार अथवा सरदाराचा असल्याचे सांगत होते.काव्या व रोहितने त्या वाड्याच्या दरवाज्यातून आत पाऊल टाकले.पडवीत काव्या भिंतीला टेकून उभी असताना रोहितचे लक्ष तिच्याकडे गेले.पावसाने ओली झालेली साडी तिच्या अंगाला चिटकल्यामुळे तीचे शरीर अजूनच उठावदार दिसत होते.ब्लाऊज ओले होऊन पदर खाली पडल्यामुळे उन्नत वक्षस्थळांचे दर्शन होऊन रोहित चेकाळून तिच्याजवळ गेला.त्याने तिच्या वक्षस्थळांवर हात ठेवून तिचे ओठ दातात घेतले.काव्याला विरोध करायचा होता पण जे होत होते ते हवेहवेसे वाटत होते.ती मंत्रमुग्ध होऊन भारावल्यासारखी प्रतिसाद देत होती.रोहितने तिला खाली झोपवून तिच्या अंगावरील कपड्यांचा अडसर दूर करत तिच्यावर ओनवा झाला आणि दोघांचीही शुद्ध हरपली.काव्याला जाग आली ती कुणीतरी त्यांच्या नावाने देत असलेले आवाज ऐकून.सर्वप्रथम डोळे उघडल्यावर आपण कोठे आहोत हेच तिला कळेना,थोडया वेळाने घडलेल्या घटनांची सुसंगती तिला लागली.आपल्या अंगावर एकही कपडा नसल्याची व बाजूला रोहित नग्न झोपलेला असल्याचे जाणीव तीला झाल्यावर ती हादरली.तीने उठून कपडे घातले व रोहित ला उठवून कपडे घालायला लावले.साधना व उर्मिला त्यांना आवाज देत होत्या.दोघंही वाड्याच्या बाहेर निघून आवाजाच्या दिशेने निघाले. थोड्या अंतरावर त्यांना साधना व उर्मिला भेटल्या,त्यांना दोघांनी काही न सांगण्यासारखा भाग वगळून वाड्याची हकीकत सांगितली.हकीकत ऐकतांना उर्मिला रोहित कडे पाहत स्वतःशीच हसत होती.तिचे डोळे वेगळ्याच आनंदात चमकत होते.रोहितचे तिकडे लक्ष नव्हते,तो वेगळ्याच अतीव तृप्तीत होता.त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग ठणकत होता.रात्र होत असल्यामुळे ते घराकडे निघाले.
घरी पोहचल्यावर जेवून झोपीजाण्यापर्यंत काव्या तुटक तुटक बोलत होती,कदाचित झालेल्या प्रसंगाची दिला शरम वाटत होती.दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित व साधना त्यांच्या सहलीकरिता निघून गेले.काव्या काही दिवस गावी राहून मुंबईला आली.सर्व आपापल्या कामात मग्न झाले.रोहित जेव्हाही अमितच्या घरी यायचा तेव्हा काव्या त्याच्या नजरेला नजर देणे टाळायची.अमितच्या एक गोष्ट निरीक्षणात आली की रोहित दिवसेंदिवस खंगत आहे.दुबळा होत आहे.तब्येत खराब असेल म्हणून अमितनेही तिकडे जास्त लक्ष दिले नाही. महिनाभर रोहित ऑफिस ला न आल्यामुळे अमित त्याच्या घरी भेटायला गेला.साधनाने दरवाजा उघडून त्याला आता घेतले असता त्याला घरात नातेवाईकांची गर्दी दिसली.अमितने रोहितबद्दल विचारताच साधनाने रडत रडत त्याला सांगितले की दिवसेंदिवस रोहितची तब्येत ढासळत असून तो अशक्त होत आहे.आश्चर्य या गोष्टींच आहे की दोन वेळ भरपेट जेवत असूनही तो खंगत जात आहे.डॉक्टर सुध्दा बुचकळ्यात पडलेले आहेत.सर्व रिपोर्ट नॉर्मल येत असून जर अशीच अवस्था राहली तर रोहित जास्तीत जास्त दोन दिवसांचा सोबती आहे,म्हणूनच रोहितचे सर्व नातेवाईक, आईवडील यांना बोलावून घेतले आहे. रोहितला पाहताच अमितला घाम फुटला.बलदंड शरीरयष्टीचा रोहित वाळक्या काट्यांवाणी झाला होता.त्याच्या शरीरावर फक्त हड्यांचा सापळा शिल्लक होता.गाल आत जाऊन हाडांना चिपकले होते.घशात घरघर होती.सुन्न मनाने त्याच्याकडे पाहत असतांना रोहितने त्याला व साधनाला मोठ्या कष्टाने हाताचा इशारा करून जवळ करून बोलाविले. खूप प्रयास करून तो त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता पण तोंडातून शब्द फुटत नव्हते.दोघांनी कान त्याच्या तोंडाजवळ नेताच त्यांना तुटक्या शब्दांत ऐकू आले, त..त..ती..प.. प.. प रत आ...आ...ललल..लिलिली...यययय...ती परत आलीय...
क्रमशः
टीप-सदर कथा ही पुर्णपणे काल्पनिक असून निव्वळ
मनोरंजनासाठी लिहिलेली आहे.कथेचा वास्तविक जीवनाशी
कुठलाही संबंध नाही.
मनोरंजनासाठी लिहिलेली आहे.कथेचा वास्तविक जीवनाशी
कुठलाही संबंध नाही.
माझी या अगोदरची भयकथा वाचून कृपया प्रतिक्रिया द्या
khupch bhayanak, interesting stories astat tumchya. mast.
ReplyDeletepudhcha part kuthe ahe
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteNext part???
ReplyDeleteThanks
ReplyDeleteNice
ReplyDelete