वारसदार भाग @ ५
मध्यरात्रीच्या सुमारास एका उंच माळरानावर दोन डोंगराच्या मध्ये कोणाची तरी पाठमोरी अशी भलीमोठी आकृती निद्राव्यस्थेत बसली होती, गडद अंधार असल्याने नीटस दिसत नव्हतं. पण अस भासत होत की ती आकृती दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोकं ठेवून शांतपणे कोणालाही, कसला ही त्रास न देता झोपली होती. शिवाय तिच्या उजव्या हातात एक लहानसा लेकरू होत, ज्याला त्या आकृतीने घट्ट पकडून ठेवलं होतं. आणि त्याच डोंगराच्या पलीकडच्या बाजूने अगदीच धूसर, काळ्या रंगांची दुसरी आकृती होती, जी त्या लहान बाळाला आपल्या कडे ओढत होती. बाळ जस जस त्या काळ्या रंगाच्या आकृती कडे खेचलं जात होतं, तस बाळ हळू हळू रडत होत, पण पाठमोरी बसलेली आकृतीने थोडासाच म्हणजे अगदीच थोडा जोर लावून बाळाला स्वतःकडे ओढून घेतले, आता बाळा शांत होतं. पण ती काळ्या रंगाची आकृती डोळे मिचकवत हळू हळू बाळाला स्वतःकडे ओढून घेण्यासाठी पुढे येत होती. ह्यावेळेस मात्र पाठमोऱ्या आकृतीला तिचा राग आला आणि झोपेतून उठून तिने त्या काळ्या आकृती ला जोरात लाथ मारून बाळाला स्वतःजवळ अगदी कुशी मध्ये सामावून घेतलं.
बाप रे ...! काय भयानक स्वप्न होत, काय होत हे, ह्या स्वप्नाचा अर्थ काय असेल ? हुश्श ... कपाळावरचा घाम पुसत अजिंक्य बिछान्यावरून उठला. हे अस विचित्र स्वप्न मला का पडलं असेल...? ह्या स्वतःशीच पुटपुटत अजिंक्य फ्रेश होऊन गावात फेरफटका मारण्यासाठी निघाला.
***
बाबा ...! धापा टाकत सुनील आणि सगळी मुलं डॉ. सापळेंच्या क्लिनिकमध्ये पोहचली. बाबा...! काय झालं आहे, अण्णा ला ..! तुम्ही एवढ्या घाईत का बोलवलं मला ? काही प्रॉब्लेम झाला आहे का ? एका दमातच सुनील बोलला. सुनीलच्या वडिलांना समोर बघून सरिता स्वतःला चाचपडू लागली, की ती ठीक दिसतेय ना ...! सुनील ला शांत करून टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास देऊन मि. मोहिते बोलू लागले की, सुनील..! अण्णा आपल्याला सोडून गेले, डॉक्टरांच्या रिपोर्ट मध्ये अस दाखवत आहे की, हृदयाच्या तीव्र धक्यामुळे त्यांचा जीव गेला. सुनील तु अजून कोणाला काही सांगितलं आहेस का ? डॉ. सापळेंनी त्याला प्रश्न केला. हो..! त्याने आम्हाला थोड्यावेळापूर्वी सगळंच नाही म्हणता येणार, पण थोडस सांगितलं आहे ज्यामुळे आम्हाला व्यवस्थित अस काहीच कळलं नाही. अस बोलून महादेवने डॉ. सापळेंच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. व पुढे होऊन त्याने स्वतःची आणि इतरांची ओळख सांगितली, आम्ही सगळे सुनीलचे जिवलग मित्र आहोत, मी महादेव आणि ही सरिता, निशा, प्रिया...! डॉ. सापळेंनी सगळ्यांसाठी चहा मागवला. चहा पित असताना मि. मोहितेंनी सुनील सांगितले की, घरी अण्णा बद्दल कळलं नाही पाहिजे. सुनील होकारार्थी मान हलवली. चला डॉक्टर आम्ही निघतो, चला रे पोरांनो..! मि मोहिते सर्वांना घेऊन क्लिनिकच्या बाहेर आले.
एक मिनिटं सुनील आणि मोहिते काका, हा सगळा काय प्रकार आहे ? हे काय चाललं आहे ? आणि हे अण्णा कोण आहे, i mean कोण होते ? ह्या सारखी असंख्य प्रश्न सगळी मुलं मिळून त्या दोघांना विचारू लागली. बाळांनो मी आता काहीच सांगू शकत नाही, संध्याकाळचे ५ वाजलेत त्यामुळे मला घरी जावं लागेल. सुनील बाळा चल पटकन, अस बोलून मि. मोहिते निघू लागले. पण महादेवने त्यांना अडवलं, काका..! हे बघा, आम्हाला काय ते कळलं पाहिजे, कदाचित आम्ही तुमची काही मदत करू शकू, आणि काही मजबुरीच असेल तर ठीक आहे नका सांगू, मग आम्हाला सर्वांना तुमच्यासोबत घरी येऊ द्या. आज नको महादेव...! प्लिज, सुनील बोलू लागला. आज शेवटचा दिवस आहे त्याचा, आज फक्त मी तुम्हाला भेटायला आलो तर त्याने अण्णाला मारून टाकलं जर तुम्ही घरी आलात तर नाही, ( स्वतःशीच पुटपुटत ) ... नको, महादेव आज नाही प्लिज हट्ट नको करुस म्हणून सुनील त्याला विनवणी करू लागला. सुनीलच्या विनवणीला बघून महादेवला बघवत नव्हते, सुनील अरे काय रे, बरं नाही येत आम्ही, ठीक आहे. आम्ही उद्या येऊ चालेल ना ... म्हणून महादेव बोलला. त्यावर सुनीलने होकार दर्शवला.
ट्रिंग ssss... ट्रिंग sss.... प्रिया आताच्या आता घरी ये, पलीकडून गुरुजींचा आवाज होता. हो बाबा, आम्ही सुनील च्या घरी जाणार आहोत, त्यानंतर मी घरी येते..प्रिया ग्रुपमधून बाजूला होऊन फोनवर बोलत होती. नाही...! पोरी तिकडे नको जाऊस, तु आधी घरी ये, मी सगळं सांगतो तुला आणि सध्या त्या पोराला काही विचारूही नकोस ग पोरी... कृपया ह्या म्हाताऱ्याचं ऐक... गुरुजींच्या शब्दांचा प्रियाच्या मनावर जबरदस्त आघात झाला. गाईज, मला घरी जावं लागले. थांब प्रिया, आपण सगळेच निघुया आता आणि आपण उद्या सुनील च्या घरी जाऊया, महादेव बोलला. सगळेजण आपापल्या वाटेने निघाले, पण महादेव आणि निशा हे प्रिया सोबत तिच्या घरी गेले. सरिताची आई घरी आजारी असते त्यामुळे तिच्या औषधांची वेळ झाली होती म्हणून ती घरी गेली.
***
वाह...! शहरांपेक्षा गावातील सकाळ तर मनाला अगदी प्रसन्न करते आणि त्यात हा नैसर्गिक वारा तर शरीरासाठी फायदेशीरच ठरतोय, अगदी फ्रेश सकाळ वाटतेय, स्वतःचीच पुटपुटत अजिंक्य खिश्यात दोन्ही हात घालून गावात फेरफटका मारत होता. चालता चालता तो एका वाड्या पाशी येऊन थांबला. कौलारू छत होती, जुनंच बांधकाम होत पण मजबूत होत, पण वाडा अतिशय पाहण्याजोगा होत. अजिंक्य पुढे जाणार तितक्यात त्याची नजर वाड्याच्या दारावर गेली त्या दारावर नावाचं फलक होतं आणि त्या फलकावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, " पंडित राघव शास्त्री निवास ". अजिंक्य ला लगेच आठवलं, अरे हे तर शास्त्री बुवा आहेत जे काल मला जत्रेत भेटले होते, माझ्या आजोबांचे शिष्य, अच्छा म्हणजे शास्त्री बुवांचा आहे तर हा वाडा. आता इथे आलोच आहे तर एकदा त्यांना भेटून घेतो म्हणून अजिंक्य वाड्याच्या दिशेने चालू लागला. तिथे पोहचल्यावर त्याने लाकडी दरवाज्यावर थाप दिली, कोणी आहे का ? मी अजिंक्य आहे, तो बोलला. दरवाजा उघडण्याचा आवाज आला आतून फिक्कट तांबूस रंगाच्या नऊवारी साडीमध्ये, कपाळावर भलंमोठं अस लाल कुंकू लावलेली एक बाई आली. वय जेमतेम पन्नास च्या जवळपास असेल, कदाचित त्या शास्त्री बुवांच्या पत्नी गोदाबाई शास्त्री होत्या. त्यांना अजिंक्य ने त्याची ओळख सांगितली आणि जत्रेमध्ये शास्त्री बुवांसोबत झालेली भेट ही सांगितली. गोदाबाईंनी अजिंक्यला आत बोलवले आणि त्याला पाणी दिले व त्या बोलू लागल्या, अरे अजिंक्य बाळा...! आमचे हे तर तालुक्याला गेलेत थोड्यावेळा पूर्वीच काहीतरी काम होत त्यांचं म्हणून आता सरळ संध्याकाळीच येतील. तुझं काही काम होत का त्यांच्याकडे ? अजिंक्य म्हणाला, नाही मावशी..! माफ करा पण मी तुम्हाला मावशी म्हंटल तर चालेल ना, गोदाबाईंनी होकारार्थी मान हलवली. मी सहजच सकाळीच घराबाहेर गावचा फेरफटका मारायला निघालो होतो तर वाटेत तुमचा वाडा दिसला म्हणून विचार केला की शास्त्री बुवा असतील तर त्यांना भेटतो, त्यामुळे सहजच ह्या दिशेला आलो होतो. चला आता मी निघतो, गावची जत्रा सुरू आहे, मला तिथे जायचं आहे. गोदाबाईंना निरोप देत अजिंक्य जत्रेच्या वाटेला निघाला.
***
प्रियाच्या घरी महादेव, प्रिया, निशा आणि प्रियाचे बाबा ( गुरुजी ) चहा घेत बोलू लागले. बाबा...! तुम्ही मला फोन करून अस का बोललात की, सुनील च्या घरी जाऊ नका आणि त्याला काही विचारूही नका, प्रिया म्हणाली. त्यावर गुरुजींनी आधी सर्वांकडे बघून विचारलं, मी प्रियाकडे एक धागा दिला होता तो सर्वांनी मनगटावर बांधला का ? तिघांनी होकारार्थी मान डोलवली. गुरुजी पुढे बोलू लागले, हे बघा पोरांनो...! तुमचा मित्र सुनील, त्याच्या सोबत अथवा त्याच्या परिवाराच्या एखाद्या व्यक्तीसोबत काहीतरी विपरीत घडलं आहे पण काहीतरी आहे ज्याचा धोका तुम्हालाही झाला असता म्हणून मी प्रियाला तातडीने घरी ये बोललो. विपरीत म्हणजे अस काय गुरुजी, महादेव बोलला. ते काय मला ह्या क्षणाला नीटस सांगता येणार नाही पण तुम्ही सावध रहा, अर्थात तुम्हाला काही होणार नाही, मी तुम्हाला सुरक्षारक्षक म्हणून धागा दिला आहेच, गुरुजी म्हणाले व हातातली रुद्राक्ष माळ घेऊन देव्हाऱ्यात गेले. तेव्हड्यात निशाला काहीतरी आठवलं, गाईज, गुरुजी जे सांगत आहेत, म्हणजे जे काही विपरीत घडलं असेल, ते कदाचित सुनीलच्या दीदी सोबत तर घडलं नसेल ना ..? कारण सुनील तिच्या दीदी बद्दलच आपल्याला सांगत होता आणि पुढे तो सांगणारच होता पण अचानक त्याचा फोन वाजला त्यानंतर आपण सगळे डॉ. सापळेंच्या क्लिनिक मध्ये गेलो. त्यामुळे सुनील च बोलणं अर्धवटच राहील. हो बरोबर बोललीस तु निशा, तुला काय वाटत महादेव, प्रिया म्हणाली.
पण, महादेव वेगळ्याच विचारात पडला, सुनीलचं आम्हाला दीदी बद्दल येऊन सांगणं, अन त्याच वेळेला क्लिनिक मधून फोन येणं, सुनीलच्या ओळखीचे अण्णा त्यांचा जीव जाण, मोहिते काकांचा आपल्या प्रश्नांना टाळाटाळ करणं, शिवाय गुरुजींनी आम्हाला तातडीने घरी बोलवून घेणं ह्या सगळ्यांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहेच, आणि ते काय आहे ह्याचा शोध घेतलाच पाहिजे. लहानपणाचा जिगरी दोस्त होता सुनील, आणि त्याची ही अशी अवस्था नाही बघू शकत. महादेव ने निश्चय केला की जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळापाशी जातं नाही, तोपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. निशा ने महादेवला हाताची कोण्ही मारली, हा...! बरोबर बोलताय तुम्ही, तंद्रीतून बाहेर पडून महादेव बोलला. चल प्रिया आता आम्ही पण निघतो, निशा ला घरी सोडून मी सुद्धा घरी जातो, अस बोलून महादेव व निशा दोघेही प्रियाला बाय करून निघाले.
.
.
.
.
.
क्रमशः