अधिक संदर्भासाठी #गढी या कथेचा शेवटचा भाग वाचावा
जमुडा_भाग_१
"जमुडा.."गणेशच्या गालावर चापट मारत तो म्हणाला.जयला घेऊन गणेश तलावात ऊतरलेल्या सुनिताकडे निघाला.तीला सगळ्यांपासून लांब घेऊन गेला...
"तुला सांगितल होत ना याच्याकडे नीट लक्ष ठेव.तुझ्या चुकीमुळे दोन लोकांचा जीव घेतला याने... "रागाने तिच्याकडे पाहत गणेश म्हणाला.सुनिता चेहरा हाताच्या ओंजळीत घेऊन रडू लागली..
"जमुडा.... "दोघांकडे आळीपाळीने बघत जय एकसारखा बोलत होता...
"जे घडल ते जाऊदे ईथू पुढे नीट लक्ष ठेव,काही दिवसांचाच प्रश्न आहे.नंतर आपल्या जयची सुटका होणार आहे... "
"जमुडा... "गणेशची मान हाताने पकडत जय म्हणाला...सुनिताने आपल्या पर्समधून एक पांढर्या रंगाची बाटली काढली.तीला दुधाचे रबरी बुच लावले होते.वरुन जरी ती दुधाची बाटली वाटत असली तरी आत वेेगळेच काहीतरी होते.जयने घटाघटा ती बाटली संपवली,लालसर द्रवाचे थेंब त्याच्या ओठांवर पडले.सुनिताच्या खांद्यावर मान टाकून तो झोपी गेला... झोपलेल्या जयचा चेहरा अगदी निरागस दिसत होता... त्याला पाहून दोघांच्या डोळ्यात पाणी आले.सागरने आवाज दिल्यावर सगळे गाडीत जाऊन बसले.
सागर गाडी वेगाने शहराकडे नेत होता.सीटवर मान टेकवून बाकीचे झोपले होते... सुनिताला काही झोप येत नव्हती.एक वर्षापूर्वी दोघांसोबत घडलेली घटना तीला जशीच्या तशी आठवली
एक वर्षापूर्वी कंपनीच्या कामानिमीत्त गणेश एका गावात आला होता... तिथल्या एका घरात काही दिवस त्याचा मुक्काम होता... ते एक जुन्या पध्दतीच दगडमातीचा वापर करुन बनविलेल घर होत.एकूण दोन खोल्या होत्या,दुसर्या खोलीत आंघोळीची मोरी आणि एक चूल होती... खालची जमीन शेणान सारवली होती.जेवणाची सोय गावातील एका घरात झाली होती... रात्री एक वेळेच जेवण घरपोच मिळणार होत.काही दिवसांचा प्रश्न होता,काम संपल कि तो लगेच शहराकडे निघणार होता... त्याचा संपूर्ण दिवस काम चालू असलेल्या साईटवर जायचा.काम संपेपर्यंत चांगलाच अंधार पडायचा... रात्री गावात त्याला करमत नव्हत,लोक खूप लवकर झोपायची...अंधार पडल्यावर काही वेळातच गावात सामसूम व्हायची... भटकी कुत्री तेवढी फिरताना दिसायची... तो परत यायचा तेव्हा दरवाजा जवळ जेवणाचा डबा ठेवलेला असायचा... सुट्टीच्या दिवशी तो साईटवरील कामगारांमध्ये रमून जायचा... त्यांच्यासाठी उभारलेल्या पत्र्याच्या खोलीत पत्ते खेळत बसायचा... पण कामगारांचा रात्रीचा कार्यक्रम वेगळा असायचा.दिवसभरच्या कामाने आलेला शीण गावठी दारुनेच जायचा.रात्री आठनंतर त्यांना जेवण करायची शुध्द राहत नव्हती... त्यांचा कार्यक्रम चालू झाला कि गणेश गावाकडे निघायचा. झाली
एका सकाळी तो साईटवर पोहोचला तेव्हा कामगारांच्या घरासमोर खूप गर्दी होती... महादू नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला होता... त्याच्या दोन्ही पायांच्या तळव्यांना राख लागली होती... पत्र्याच्या खोलीबाहेर एका ठिकाणी खूप राख पसरली होती... महादू पहाटे नैसर्गिक विधी करायला उठला... विधी उरकून परत झोपला पण सकाळी उशीरापर्यंत ऊठलाच नाही... डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.मृत्यू कशामुळे झाला हे समजण्यासाठी त्यांनी पोस्टमार्टन करण्याचा सल्ला दिला... पण त्याची चिरफाड करायची नाही असे सगळ्या कामगारांनी ठरवले.त्याचे गाव दूर कोठेतरी होते शिवाय तो अनाथ होता... महादूच्या नातेवाईकांबद्दल कोणाला माहित नव्हते... अजून त्याचे लग्न झाले नव्हते... गावाबाहेरील स्मशानभूमीत त्याला पुरण्यात आले.दोन दिवस कोणीच कामावर आले नाही,गणेश प्रत्येकाला दारु कमी पित जा असे सांगत होता... दोन दिवसानंतर सर्व कामावर हजर झाले.सर्व शांतपणे आपापले काम करीत होते.
गावातील लोकांशी गणेशचा जास्त संबंध येत नव्हता... डबा कोणत्या घरातून येते हे सुध्दा त्याला माहित नव्हते.ईथल काम संपल कि जेवणाचे पैसे तो देणारच होता... त्या जेवणाची चव अतिशय उत्तम होती.साधच जेवण पण खूप रुचकर लागायच... एका रात्री तो साईटवरुन लवकर परत आला.गाडी स्टॅडवर लावली तेवढ्यात एक मुलगी डबा घेऊन तिथे आली... गणेशकडे न पाहता डबा ठेऊन ती माघारी वळाली.तीने गुलाबी रंगाची साडी घातली होती.चेहरा पदराने झाकला होता,ती लगबगीन तिथून निघाली.काहीतरी बोलाव म्हणून तो म्हणाला...
"आज खूप ऊशीर डबा ठेवायला..."
"हो... "अस म्हणत ती पुढे निघाली...
"रात्र खूपच लवकर होते या गावात...."
"या नाही सगळ्याच गावात रात्र लवकर होते..."तीचा आवाज खूप गोड होता..
"होत असेल,बाकी जेवण खूप छान असत तुमच... "
बराच वेळ दोघ बोलत होते,त्या मुलीच नाव सुनिता होत... सुनिता आईवडीलांची एकुलती एक मुलगी होती.गावातील ईतर मुलींप्रमाने तीने लवकर लग्न केले नव्हते... तीला शिक्षणाची आवड होती,दूर गावातील कॉलेजमध्ये ती रोज चालत जायची... गाव तसे थोडे मागासलेले होते,लोकांचा शहराशी जास्त संबंध येत नव्हता... लोकांच्या गरजा कमी असल्यामुळे ती सुखी होती.सुनिताचे आई-वडील शेती करायचे... तिच्या वयाच्या मुलींची कधीच लग्न झाली होती,म्हणून ते सुनिताला लग्नाचा आग्रह करीत होते.
"बापरे किती वेळ झाला चला निघते मी... "असे म्हणत ती निघून गेली.ती गेल्यावर गणेश बराचवेळ बाहेर ऊभा राहिला.
नंतर एक-दोन वेळा त्याची पुन्हा सुनिताशी भेट झाली... ती नेहमी चेहरा झाकूनच यायची,गणेश तिच्याशी एखादा दुसरा शब्द बोलायचा... पण ती जास्त बोलत नव्हती.डबा देऊन लगेच माघारी फिरायची,त्या रात्री तो लवकर गावात आला,डबा अजून आला नव्हता.वाट बघत तो बाहेरच ऊभा राहिला... काही वेळाने सुनिता आली,चेहरा तसाच पदराने झाकलेला... तीने डबा गणेशच्या हातात दिला आणि माघारी वळाली.तेवढ्यात लाईट गेली,सगळ्या गावात अंधार पसरला.समोरच काही दिसेनास झाल,अंदाज घेत सुनितान पाय टाकला पण तो रस्त्यावरील एका लहान खड्यात पडला... तीचा पाय दुखावला गेला,ती खाली पडता पडता वाचली.
"आई ग !!..."
"काय झाल...."मोबाईलचा टॉर्च चालू करत गणेशने विचारले...
"पाय मुरगाळला.... "
गणेश तिच्याजवळ गेला टॉर्चच्या प्रकाशात त्याने पाहिले.सुनिताच्या चेहर्यावरील पदर खाली सरकला होता.डोक्यावरील केस चेहर्यावर पसरले होते... एका हाताने केस मागे सारत तीने गणेशकडे पाहिले.तो एकटक सुनिताकडे पाहत होता लांबसडक कमरेपर्यंत लोंबणारे केस,गोरापान चेहरा,काळेभोर डोळे,दाट भुवया...गुलाबी ओठावर असणारे लहान तीळ कुणाची नजर लागू नये म्हणून निसर्गांने जन्मताच तीला बहाल केल्यासारखे वाटत होते.सुनिताला आधाराशिवाय चालता येणे शक्य नव्हते.गणेशने तीचा हात आपल्या हातात घेतला.तशी ती लाजली आणि मान खाली घातली,सावकाश पावल टाकीत दोघे घराकडे निघाले... तिच्या श्वासांचा वेग वाढला होता... तीने आपले अंग अगदी चोरुन घेतले होते.घर येईपर्यंत दोघे शांतच होते...
"ईथून पुढे जाईन मी...."घरापासून थोड्या अंतरावर थांबत सुनिता म्हणाली.
"मग मी जाऊ... "गणेश म्हणाला,खाली बघत तीने मान हलवीली... तीचा हात सोडून गणेश आपल्या घराकडे निघाला.अंधारात त्याच्या पुसट होत जाणार्या आकृतीकडे सुनिता बराच वेळ बघत राहिली.नंतर गालात हसत माघारी वळाली.अर्ध्या वाटेत पोहोचलेला गणेश अचानक जागेवरच थांबला... त्याच्या पुढे चार पाच मानवी आकृत्या चालल्या होत्या.एकाच्या खांद्यावर पाच सहा पाय असणारा भलामोठा जीव लोंबकाळत होता... तर बाकी लोकांच्या खांद्यावर सुध्दा काहीतरी दिसत होती.ती लोक खूप घाईत होती,हळू आवाजात कुजबूजत ती निघाली होती... त्यातील एकाने गावाच्या मध्यभागी आल्यावर हातातल्या काठीने जमीनीवर काहीतरी आखले... गणेशने पाहिले तर जमीनीवर रेषा मारल्या होत्या,तो त्या माणसांच्या मागे निघाला...
त्यांच्यामागे जात तो गावाबाहेरील माळरानात पोहोचला.एका मोकळ्या जागेवर त्यांनी लाकड टाकून जाळ पेटविला होता.पाच सहा पाय असणारा तो केसाळ जीव त्यांनी आगीत टाकला.बाकीच्या लोकांनी आपल्या खांद्यावर जे काही होत ते आगीत टाकल... तसा एक भयंकर उग्र वास तिथे पसरला.गणेशने नाक दाबून धरल,त्या आगीच्या प्रकाशात त्याने एकाचा चेहरा पाहिला... त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना काही दिवसांपूर्वी मरण पावलेला महादू तिथे ऊभा होता... अंत्यसंस्कार करताना जे कपडे त्याच्या अंगावर होते तेच आता सुध्दा होते... तो एकसारखा काहीतरी खात होता,हाताच्या पाचही बोटांवरुन एक काळाकुट्ट द्रव खाली सांडत होता... त्याच्या हातात असलेला पदार्थ सुध्दा काळा होता.
आगीत टाकलेला तो जीव जळताना चट..चट असा आवाज येत होता.आगीतून ऊडालेली एक मोठी ठिणगी गणेशपर्यंत येता येता सूक्ष्म झाली... तरी तीचा एक हलकासा चटका त्याच्या हातावर बसला.तसा तो एकदम भानावर आला,मागे सरकत सरकत अंधारातून दगड धोंड्यातून,काट्यातून पळत घरी आला... घरी पोहोचताच दरवाजा लाऊन घेतला,एवढी भीती त्याला आतापर्यंत कधीच वाटली नव्हती.आत्ताच बॅग भरुन शहरात निघून जावे असे त्याच्या मनात आले... पण असे अर्धवट काम सोडून त्याला जाता येणार नव्हते.हलकासा चटका बसलेल्या ठिकाणची त्वचा जळाली होती.एक काळाकुट्ट डाग त्या ठिकाणी पडला होता.
पुढे रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही... अंगाला दरदरुन घाम फुटला पहाटे विलक्षण थंडी वाजून आली.सकाळी ऊठला तेव्हा अंगात ताप भरला होता... साईटवर जायचा कसलाच ऊत्साह राहिला नव्हता.डोक्यावर हात ठेऊन पडला असतानाच बाहेर चालू असलेला गोंगाट त्याच्या कानी आला.अंग झटकत तो ऊठून बाहेर आला.काही घर सोडून असलेल्या एका घराभोवती खूप गर्दी होती.तिथे एकसारखी रडारड चालू होती,काय झाल असेल तो विचार करु लागला.तिथे जाऊन पहावे असे त्याच्या मनात आले... पण तो गावात नवीन होता असे लोकांच्या गर्दीत घुसने त्याला बरोबर वाटले नाही.तसेही तो आज कुठे जाणार नव्हता,त्याची तब्येत थोडी बिघडली होती.रात्री आगीसमोर दिसलेला महादू त्याच्या डोळ्यासमोर सारखा उभा राहत होता.तो ऊग्र वास अजूनही जाणवत होता,चटका बसलेल्या जागी काळा ठिपका पडला होता..
मोरीत जाऊन त्याने सपासप चेहर्यावर पाणी मारले,आंघोळ ऊरकून दरवाजासमोर ऊभा राहिला.समोरुन भर्रकन एक गाडी धूळ ऊडवत गेली... पण गाडीमागे ऊडालेली धूळ नव्हती तर राख होती... ती राख उडत त्याच्यासमोर आली तसा रात्री त्या आगीसमोर आलेला ऊग्र वास अधिकच जाणवला... तो सहा पायाचा विचित्र जीव आगीत टाकताच तिथे तो वास पसरला होता.अगदी तसाच...तसाच नाही तर तोच वास त्या राखेतून आला होता..
तो चालत रस्त्याच्या मध्यभागी गेला,तिथे काळीकुट्ट राख पसरली होती... राखचे काही कण चमकत होते.राखेशिवाय त्यात अजूनही काहीतरी वस्तू होत्या,ज्या जळाल्या नव्हत्या.बहुतेक आगीतही पूर्णपणे जळू शकणार्या नव्हत्या.छोटे छोटे काटेरी पाय,गोल आकाराचे खवले,टोकदार काटे,मोठमोठ्या केसांचे पुंजके अजून बरच काही दिसत होत... तेवढ्यात त्याला आठवल रात्री त्या लोकांनी खूणा केलेल्या जागेवरच ही राख पसरली होती.लोकांच्या ये जा करणारी जागा हेरुन मुद्दाम ही राख पसरली असावी असे वाटत होते.पण राख पसरण्याचा ऊद्देश काय हे त्याला समजत नव्हते.ती लोक कोण हे तर त्याला माहितच नव्हते.आगीसमोर दिसलेल्या महादूचा चेहरा ईच्छा नसतानाही डोळ्यासमोर येत होता.तो प्रकार न आठवण्याचा प्रयत्न करुनही सारखा नजरेसमोर येत होता..
तेवढ्यात एकजण त्याच्यासमोर आला,त्याने बहुतेक गणेशला या अगोदर पाहिले असावे.कामानिमित्त तो गावात राहतोय हे सुध्दा त्याला माहित असावे... त्याचे नाव रमेश होते,दोघांची ओळख झाली,गर्दी झालेल्या घरात एका तरुण मुलाचा मृत्यू झाला होता... मृत्यूचे कारण डॉक्टरांना समजले नव्हते,त्यांनी पोस्टमार्टन करण्याचा सल्ला दिला... पण घरातील लोकांनी त्याची चिरफाड करण्यास नकार दिला...
"चला पाव्हण शेवटच बघून येऊ त्याला... "
"नको मी त्याला ओळखतही नव्हतो.... "
"आव अशा टायमला वळख लागत नसतीया चला... "
गणेश त्याच्या मागोमाग गेला आणि लांब ऊभा राहिला.नुकतीच त्याला आंघोळ घालून नवीन कपडे घातले होते.त्याच्या चेहर्यावरुन गणेशची नजर पायावर गेली... त्या मुलाच्या पायाला चिकटलेली राख आंघोळ घालूनही निघाली नव्हती.दोन्ही पायांचे तळवे राख लागल्याने पांढरे पडले होते... त्याला महादूचा मृत्यू आठवला,त्याच्याही पायाला अशीच राख लागली होती.मृत्यूच कारण समजल नव्हत,कामगारांनी चिरफाड करण्यासही नकार दिला होता.महादू आणि या मुलाच्या मृत्यूत बरच साम्य होत.लग्न न झाल्यामुळे यालाही असाच पुरणार होते.हा सुध्दा महादूसारखा काही दिवसांनी परत जीवंत तर नाही होणार ना.त्याने डोके गरगर फिरवत मनात आलेले विचार झटकून टाकले..
तिरडीवर झोपवून त्याची अंत्ययात्रा स्मशानाकडे निघाली.सगळ्यात मागे असलेल्या रमेशचा निरोप घेऊन तो घरी गेला... आज दिवसभर आराम करायचा अस ठरवून तो आडवा पडला.त्याची जेवण करायची आजिबात ईच्छा नव्हती.काही वेळातच त्याचा डोळा लागला तसा तो गाढ झोपी गेला.जाग आली तेव्हा बाहेर कडक ऊन पडल होत,पोटात भुकेने कावळे ओरडत होते.चेहरा धुवून तो बाहेर पडला.या आडगावात हॉटेल मिळने शक्य नव्हते... आपल्या साईटवर जाऊन काहीतरी खाण्याचा विचार त्याच्या मनात आला.
गाडीला किक मारुन तो साईटवर निघाला,अर्ध्या वाटेतच त्याला सुनिता भेटली... ती कॉलेजवरुन घरी परतत होती,त्याला पाहताच तीने चेहरा झाकून घेतला.सुनितासमोर त्याने गाडी थांबवली,
"सोडू का घरापर्यंत.... "
"नको मी जाईन एकटी... "
"ठीक आहे...येतो मी... "अस म्हणत गणेशने गाडीला किक मारली... दुपारची वेळ सगळे कर्मचारी सावलीत आराम करत होते.तात्पुरत्या बनविलेल्या टपरीमध्ये तो जाऊन बसला.तिथ चहाबिस्कीट खाऊन कामगारात जाऊन मिसळला... साईटचे काम अजून बरेच शिल्लक होते,ऊन ऊतरेपर्यंत तो तिथेच थांबला... परत गावाकडे परतताना त्याने महादूच्या एका जवळच्या मित्राला सहज विचारले..
"महादूला एखादा जुळा भाऊ होता का रे.... "
"त्याच या जगात कुणीच नव्हत,तो एकटाच राहायचा... "
महादूच्या मृत्यूच्या दिवशी जिथ राख पसरली होती... त्या पत्र्याच्या घरासमोर तो ऊभा राहिला,त्या राखेतही काही न जळालेल्या वस्तू होत्या,छोटे काटेरी पाय,गोल आकाराचे खवले,केसांचे पुंजके अजून बरच काही... अशीच राख गावातील रस्त्यावर सुध्दा पसरली होती.येण्या जाण्याच्या रस्त्यावर अशी राख ठेवण्यामागे काय ऊद्देश असू शकतो... हा एखाद्या काळया जादूचा प्रकार तर नाही... विचार करत तो गाडी घेऊन माळरानावर आला,तिथून थोडे आतच रात्री आग पेटवलेली जागा होती.गाडी तिथपर्यंत जाणे शक्यच नव्हते,तो चालतच त्या जागेकडे निघाला... अशा दगडधोंडे असलेल्या रस्त्यावरुन रात्री आपण पळत गेलो हे त्याला खरच वाटेना... रात्री ती माणस बसलेल्या जागेच्या तो अगदी जवळ गेला,कालचा ऊग्र वास अजूनही हवेत शिल्लक होता... आग पेटविलेली जागा पूर्ण साफ होती,तिथ करपलेली माती आणि नुसती दगडच दिसत होती... राखेचा एक कणही तिथे शिल्लक नव्हता.ईथे असलेली राखच गावातील रस्त्यावर टाकली होती यात कसलाच वाद नव्हता... ती राख सामान्य राखेपेक्षा वेगळी होती... आगीत बर्याच विचित्र वस्तू टाकून ती बनवली होती... ते काटेरी पाय,गोल आकाराचे खवले,केसांचे पुंजके एखाद्या प्राण्याचे वाटत होते.ते प्राणी ईतर प्राण्यांपेक्षा नक्की वेगळे असणार... तो माघारी फिरला.
गावात पोहोचेपर्यंत दिवस मावळला होता,सुनिता घराच्या उंबर्यावर त्याची वाट बघत होती.चेहरा अजूनही झाकलेलाच होता...
"या गावात चेहरा झाकून फिरायची पध्दत आहे वाटत... "तिच्याजवळ येत गणेश म्हणाला..
"तस नाही फक्त अनोखळी लोकांसमोर..."
"म्हणजे मी अजूनही अनोळखी..."
"तस नाही..."पायान जमीन ऊकरीत ती म्हणाली..
"विसरलेच आज जेवायला घरीच या हे सांगायला आले होते...थोड लवकर आलात तर बर होईल... "अस म्हणत ती निघून गेली.
आठ वाजता तो सुनिताच्या घरी पोहोचला,घर बर्यापैंकी मोठे होते.सुनिताने आई बाबांशी त्याची ओळख करुन दिली.गणेश तिच्या बाबांशी बोलत बसला.पण त्याचे लक्ष सुनिताकडे होते,तीने चेहरा झाकला नव्हता.त्याच्याशी नजर मिळवताच सुनिता खाली बघायची... एकूण तीन जणांच कुटूंब होत,सुनीताच लग्न झाल कि घरात ते दोघेच राहणार होते.
"किती दिवस मुक्काम आहे गावात..."सुनिताच्या बाबांनी विचारले...
"एक महिनाभर तरी आहेच..."
"तर मग ऐक तू राहतोस ते आमच जुन घर आहे..घरात सगळी सोय आहे.रात्री अपरात्री घरातून बाहेर पडायच नाही... कोणी दरवाजा वाजविला तरी ऊघडायचा नाही... "एवढ्या सूचनांनी गणेश गोंधळून गेला.
"चोरांची खूप भीती आहे वाटत ईथ..."
"तसच काहीतरी समज.... "गणेशने यावर नुसतीच मान हलवली जेवण झाले.सगळ्यांचा निरोप घेऊन तो बाहेर पडला.खिडकीत ऊभ्या असलेल्या सुनिताने त्याला हात केला..वाटेत त्याला बिडी फुंकत असलेला रमेश भेटला.दोघही बोलत बसले.महादूचा विचार अजूनही त्याच्या डोक्यात चालू होता..गावात नेहमीप्रमाणे सामसूम होती..
"तू एकदा मेलेल्या माणसाला परत जीवंत बघितले आहे का....?"
"हो.... "संपलेली बिडी पायाखाली चिरडत रमेश शांतपणे म्हणाला...
गणेशने चमकून त्याच्याकडे पाहिले,रमेशने शांतपणे दुसरी बिडी पेटवली होती.
"हो मी एका मेलेल्या माणसाला परत माझ्या समोर जीवंत झालेला पाहिला आहे... "
"काय बोलतोस... "
"खर आहे... "
आता जरी हे गाव शांत वाटत असल तरी पहिल अस नव्हत... ईथल्या स्मशानभूमीवर पोलीसांचा कडक पहारा असायचा... रात्रीच कोणालाही तिकडे फिरायला मनाई होती... स्मशानावर पहारा देण्यामागे एक कारण होते.काही वर्षांपूर्वी ईथ कुठेही खोदल तर नुसती हाडेच सापडायची.ती पण माणसांची जमीनीत सोनं,चांदी,हिरे असला खजिना सापडतो अस ऐकल होत.पण ईथे जमीनीच्या गर्भात हाड होती.या हाडांमुळच हे गाव प्रसिध्दीस आल,खर सांगायच तर ही हाड विकून गावातील लोकांचा प्रपंच चालायचा.बाहेरुन येणारे मांत्रिक मागेल ती किंमत देऊन अशा वस्तू विकत घ्यायचे.नंतर हाड सापडन बंद झाल,जमीनीच्या पोटातील त्यांचा साठा संपला आणि तो ऊद्योग बंद पडला.तो पर्यंत ईथली पडीक जमीन शेती करण्यायोग्य बनली होती.लोक आपल्या पारंपारीक व्यवसाय शेतीकडे वळाले... पण काळे कपडे घातलेले मांत्रिक,शरीर गोंदवलेली काही माणस गावात येतच राहिले..
आसपासच्या काही गावात मिळून ईथ एकच स्मशानभूमी होती... रात्री स्मशानात काळे कपडे घातलेले मांत्रिक जमायचे.अमावस्येला तर खूप गर्दी व्हायची त्यांचा तिथे काय कार्यक्रम चालायचा माहित नाही... पण लोक त्यांना खूप घाबरायची,त्यांच्यासोबत आडदांड शरीराची माणस असायची मांत्रिक सांगेल तशी ती वागायची... पण ती लोक सदानकदा काहीतरी खातच असायची बघाव तेव्हा त्यांच तोंड चालूच असायची... त्यांच खाणही पूर्णत: मांसाहारी प्रकाराच होत.एवढी धिप्पाड माणस किरकोळ शरीराच्या मांत्रिकाच्या आज्ञेत राहतात म्हणजे त्यांच्याकडे बर्याच शक्ती असल्या पाहिजे.लोक त्यांना जरा भिऊनच असायची,कधीकधी स्मशानातून अंगावर काटा आणणारे आवाज यायचे.असे आवाज आले कि गावातील कुत्री एकसुरात ओरडू लागायची.मांत्रिक जाताना दिसले तरी घराचे दरवाजे पटापट बंद व्हायचे.एवढी त्यांची दहशत होती.
तिथ काय चालत हे जाणून घ्यायला काही धीट लोकांनी त्यांच्यावर पाळत ठेवली.त्यात मी सुध्दा होतो,त्यांना दिसणार नाही अशा पध्दतीने आम्ही झुडूपात लपून त्यांच्यावर लक्ष ठेऊ लागलो.पहिल्यांदा विशेष काही जाणवले नाही.मांत्रिक यायचे झोळीतील वस्तू बाहेर काढायचे,तोंडाने काहीतरी पुटपुटत एका जागी बसून राहायचे... त्यांच्यासोबत असलेली धिप्पाड माणसे बाहेर पहारा द्यायची... पहाट होताच आपल सामान आवरुण निघून जायचे... ही सगळी भोंदूगिरी आहे हे खरे मांत्रिक नसतील अशी लोकांना शंका वाटू लागली.शेवटी शेवटी लोक या प्रकाराला कंटाळली,त्यांच्यावर पाळत ठेवणारी लोक कमी झाली... पण या लोकांचा स्मशानात येण्यामागे काहीतरी हेतू असावा,ऊगाच कोण रात्रभर तिथे बसून राहणार आहे.एक गोष्ट मला कळू लागली होती,कि स्मशानातील तापमान अचानक वाढायचे तर कधी एकदम कमी व्हायचे... मधेच जोरात वारा सुटायचा पालापाचोळा डोळ्यात जायचा... स्मशानातील प्रत्येक सूक्ष्म हालचाल माझ्या डोळ्यांनी टिपली होती... तिथे फिरणार्या कित्येक पुसट आकृत्या मी पाहिल्या होत्या... बाकीची लोक फक्त त्या मांत्रिकावर लक्ष ठेवायची.
मी लोकांना खूप समजवल ही एखाद्या भयानक प्रकाराची सुरुवात सुध्दा असू शकते.पण माझ्याकडे कोणीच लक्ष दिले नाही.लोकांनी हात झटकले रात्रभर जागरण करणे आम्हाला जमणार नाही.असे सांगून टाकले,मग मी एकटाच त्यांच्यावर पाळत ठेऊ लागलो.त्या रात्री स्मशानात थोडा वेगळा प्रकार घडला.मांत्रिक स्मशानात विचित्र दिसणारे प्राणी घेऊन आले.... त्यात एक भल्यामोठ्या किड्यासारखा दिसणारा जीव होता,त्याला सहा काटेरी पाय होते... तोंडासमोर दोन मोठ्या नांग्या होत्या... दुसरा एक ओबडधोबड आकाराचा मासा होता,संपूर्ण अंगावर लोखंडासारखे टणक खवले होते.तोंडात त्रिकोणी दात होते,त्याच्या शरीरातून धूर निघत होता... तिसरा जीव पक्षासारखा दिसत होता,त्याला चोच नव्हती.त्या जागी मोठमोठे सुळ्यासारखे दात होते,अंगावर पिसांच्या जागी काळे केस होते... माणसासारखे दोन हात त्यालाच कातडीसारखे दोन पंख होते...
असे प्राणी मी कुठेच बघितले नव्हते,एवढे विचित्र दिसणारे प्राणी यांनी कुठून आणले असतील.त्यांच्यासमोर जंगलातील वाघ,सिंहच काय तर हत्तीसुध्दा टिकू शकत नव्हता... जणू ते या ग्रहावरचे नव्हतेच.त्यांनी मोठी आग पेटवली आणि तीनही प्राणी त्यात टाकले... क्षणात ते प्राणी जळाले पण त्यांना आगीत टाकताच एक भयंकर वास तिथे पसरला... आग विझल्यावर त्याची राख एकाने आपल्या झोळीत भरली.ती भरताना त्याने राखेला हातही लावला नाही.एवढ्या आगीतही त्या प्राण्यांचे काही अवयव जळाले नव्हते.काटेरी पाय,गोल खवले,मोठे केसांचे पुंजके तसेच होते.पुढे पहाट झाली तसे सगळे स्मशानातून बाहेर पडले आणि आपल्या मार्गाने निघून गेले.पण मला त्या प्राण्याबद्दल कुतूहल वाटत होते.कुठून आणले असतील हे चमत्कारी प्राणी...
त्या दिवशी आसपासच्या गावात चार अविवाहित तरुणांचा मृत्यू झाला... मृत्यूचे कारण डॉक्टरांना समजले नव्हते,लोक जुन्या विचारांची होती त्यांनी प्रेताची चिरफाड करण्यासही नकार दिला... त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजलेच नाही.मृतांच्या नातेवाईकांनी स्मशान भरुन गेले होते... सर्वात एक गोष्ट समान होती.प्रत्येकाच्या पायांचे तळवे पांढरेफट्ट पडले होते.सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी पुरण्यात आले.
ती रात्र अमावस्येची होती,स्मशानाबाहेरील एका झाडावर मी भुतासारखा बसलो होतो... सगळीकडे गडद अंधार पसरला होता... सकाळी झालेल्या अंत्यविधीच काही सामान अजून तिथच पडला होता.जिथ प्रेत पुरली होती त्या जागी मातीचा ऊंचवटा दिसत होता.मांत्रिक आले त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी तिथ पडलेल्या वस्तू खायला सुरुवात केली.मग एक विचित्र प्रकार घडला त्या लोकांनी जमीनीचा वास घेत प्रेत पुरलेली जागा शोधून काढली... एखाद्या जनावरासारखी आरोळी ठोकत हाताने जमीन ऊकरली... संपूर्ण शरीर ताठ झालेली प्रेत बाहेर काढली आणि चक्क त्यांचे लचके तोडू लागले.... या भयानक दृश्याने मी डोळे झाकून घेतले,पण मांत्रिकांनी आज्ञा देताच प्रेत सोडून ते बाजूला झाले.
ती धिप्पाड लोक त्यांच्याभोवती गुरगुरत फिरत होती... तोंड ऊघड असलेल्या त्या प्रेताकडे पाहून कसेतरीच वाटत होते.पुढे काय होणार मी श्वास रोखून बघत होतो.मांत्रिकांनी अघोरी मंत्राचा जाप सुरु केला,तशा स्मशानात काळ्या आकृत्या फिरु लागल्या... ते अतृप्त राहिलेले आत्मे होते,त्यातील बर्याच जणांना मी ओळखत होते... काही आमच्या गावातील होते,वेगवेगळ्या कारणांनी त्यांचा मृत्यू झाला होता... यातील एकाच्याही पिंडाला कावळा शिवला नव्हता.प्रत्येक आकृती प्रेताभोवती येण्याचा प्रयत्न करीत होती.पण मांत्रिकांना घाबरुन परत जात होती.बहुतेक त्यांना यांची गरज नव्हती.
झोळीतील पांढरी राख चारही बाजूला फेकत त्यांनी तिथे तिथे जमलेले आत्मे पळवून लावले... अघोरी मंत्राचा जाप चालूच होता,थोडा वेळ गेला... एकाने आपल्या झोळीतून बाटली काढली त्यातील काळ्याकुट्ट रक्ताचे काही थेंब चारही प्रेतांवर शिंपडले... स्मशानात तशी जमीन थोडी हादरली,मी झाडावरुन पडण्याच्याच बेतात होतो... त्या जागी जोरजोरात श्र्वास घेण्याचा आवाज घुमू लागला.एका चितेच्या राखेत थोडी हालचाल झाली,राख खाली जाऊन जमीनीतील काळी भुसभुशीत माती वर येऊ लागली.खालून एक भयानक राक्षस वर आला त्याला राक्षसच म्हणाव लागेल... कारण कथा कादंबरीत राक्षसांच जे वर्णन केल तशीच आकृती बाहेर आली होती.आसपासच्या झाडामागूनही तशीच भूत बाहेर आली... त्याच्या डोक्यावर लांब केस होते जे चेहर्यावर पसरले होते... केसातूनही चेहर्याचा थोडाफार वर्णन न करता येणारा भाग दिसत होता.रक्ताचा वास घेत ते सगळे प्रेताच्या दिशेने जात होते.त्यांची चाल खूप मंद होती,त्यांच्या अंगात कसली ताकतच नव्हती.ती परत मिळवायलाच ते जणू चालले होते.चालताना त्यांचा धापा टाकण्याचा आवाज येत होता.मांत्रिकाने काळ्याकुट्ट रक्तानी ती प्रेत पूर्ण भिजवून टाकली...
ती भूत खाली ठेवलेल्या प्रेताजवळ जवळ पोहोचली,त्यांनी प्रेताला लागलेल्या रक्ताचा वास घेतला.तस प्रेतावरच रक्त गायब होऊ लागल.आपली काळी जीभ रक्ताने पूर्ण भिजवण्यात ते मग्न झाले.ईकड मांत्रिकांनी झोळीतील पांढरी राख त्यांच्या अंगावर फेकायला सुरुवात केली.सगळीकडे राख पसरली,ती भूत,प्रेत सगळच त्या राखेत गायब झाल.काही वेळ गेला मांत्रिक मागे सरकले.पांढरी राख हवेत मिसळत चालली होती.राख पूर्णपणे हवेत मिसळली आणि समोरचा देखावा स्पष्ट दिसू लागला.ती भूत गायब झाली होती,अंगावर राख पडल्यामुळ खाली ठेवलेली प्रेत पांढरीफट्ट दिसत होती.मी सावध झालो....
ती चारही भूत कुठच दिसत नव्हती.पांढर्या राखेबरोबर हवेत तर विरुन नाही गेली.माझी नजर सगळीकडे फिरत होती.थंड हवेचा एक झोत अंगावर आला तसे हातावरील केस ताठ झाले.
"बजरंगा रक्षण कर रे माझ... "असे म्हणत गळ्यातील हनुमानाचे लॉकेट मुठीत घट्ट दाबून धरले.खाली पडलेल्या चारपैकी तीन प्रेतांनी हालचाल केली.त्यांनी डोळे उघडले आणि मांत्रिकासमोर येऊन उभे राहिले.काही तासात एवढी भयंकर दृश्य पाहिली होती.त्यामुळे आताचे दृश्य एवढे भीतीदायक वाटले नाही.चौथे प्रेत आहे त्या जागेवर पडून होते.
"हे कस शक्य आहे,चारही नरभक्षी भुतांच आपण आवाहन केल होत.तरीही एकाचा संचार यात कसा झाला नाही... "
मांत्रिकांच्या पायाखाली असणार्या जमीनीला भेग पडली.काही अंतरावर जमीन फाटत चालली होती.फाटलेल्या जमीनीतून दोन लहान हात बाहेर आले..हातावर दाब देत आतून एक लहान मुलगा बाहेर आला.त्याचा चेहरा पांढराफट्ट होता,तोंडात किडलेल्या दातांची मालिका होती.त्या खड्यातूनच चौथ्या भूताने डोके बाहेर काढले.मुलाने त्याला लाथेने आत ढकलल तो बाहेर येताच जमीन एकसारखी झाली.दोन्ही हात वर करत त्याने जांभई दिली..
"सत्यानाश याला कोणी बोलवले होते..."कपाळावर हात मारत एक मांत्रिक म्हणाला.ते एक लहान मुलाच अतिशय भयंकर भूत होत.
"खी..खी..खी.. " दोन्ही पायावर ऊभ राहत ते भूत हसू लागल.सर्व मांत्रिक घाबरुन नुसते थरथर कापत होते.ते लहान मुलाच भूत मांत्रिकाकडे धावल..
"अरे बघता काय...धरा त्याला... "मांत्रिकासोबत असलेली ती धिप्पाड माणस त्याच्याकडे धावली... लहान भुताच्या अंगात प्रचंड ताकद होती वीजेच्या वेगाने हालचाल करीत त्याने एकाची मान पिरगाळली.त्याला खाली लोळवला एवढेच नाही तर सगळ्यांच्या शरीराच्या चिंध्या करुन टाकल्या... या लहान भूताला रोखायची शक्ती मांत्रिक लोकांकडे नव्हती.जीव वाचवण्यासाठी ते स्मशानाबाहेर पळाले.लहान भूताला स्मशाना बाहेर जाता येत नव्हते.
आतमध्ये ऊभ्या असलेल्या तीन प्रेतांचे त्यांने लचके तोडले.त्यांची अवस्था ईतरांपेक्षा भयानक केली... त्याची नजर खाली पडलेल्या प्रेताकड गेली.
"जमुडा... "जोरात हसत ते भूत पांढरी राख फासलेल्या प्रेताकड निघाल... त्याच्या छातीवर जाऊन बसल तिथे जोरात बुक्की मारु लागल.अचानक त्या प्रेतात घुसल काही क्षण गेले... निपचीत पडलेल ते प्रेत जोरात खिदळल आणि लटपटत ऊभ राहिल... त्याला व्यवस्थित चालता येत नव्हत ते मधेच खाली पडायच परत धडपडत ऊठायच... अस करत ते तिथच फिरत राहिल... तो आता स्मशानाबाहेर जाऊ शकत होता.लोखंडी गेट ऊपसून तो बाहेर आला.त्याचबरोबर कोल्हेकुई सुरु झाली त्याच्या डोक्यावर वटवाघळ फिरु लागली.पक्षी आपल घरट सोडून दूर डोंगराकडे निघून गेले...
"जमुडा.... "त्याने एक मोठा श्वास घेतला त्याला आसपास रक्ताचा वास आला.माझी नजर क्षणभर दुसरीकड गेली.तेवढ्या वेळात तो गायब झाला दुसर्याच क्षणी मी बसलेल झाड कोलमडून पडल.रक्ताच्या वासावरुन त्याने माझा तपास लावला होता.मी दूर फेकला गेलो दगडावर पाय आपटून तो दुखावला.पण त्या भूताची मंद चाल माझ्या कामी आली.जमीनीवर पाय घासत मी अंधारात गायब झालो.मांत्रिक लोकांनी कधीच काढता पाय घेतला होता.
रक्ताचा वास घेत तो गावात आला.तिथे तर त्याने नुसती दहशत माजवली.बाहेर वार्याला शांतपणे झोपलेल्या लोकांचा त्याने घात केला.दोन तीन जणांचा तर झोपेतच शेवट झाला.लोकांच्या चादरी आणि त्या भुताचे तोंड रक्ताने माखून गेले.त्याच्या गुरगुरण्याने तिथल्या तिथल्या शांततेचा भंग झाला.गोठ्यातील गुरांनी हंबरण्यास सुरुवात केली.एरवी रात्री हलक्याशा आवाजाची चाहूल येताच भुंकून गाव ऊठवणारी कुत्री अंधार्या कोपर्यात निर्वीकारपणे बसली होती. घरांचे दरवाजे पटापट ऊघडले गेले.अंगावर धावून येणारा तो नरभक्षी दैत्य पाहून लोक गोंधळली.त्याला चोर समजून काठ्यांनी झोडायला सुरुवात केली.आया बहिणींनी घराच्या खिडकीतून शिव्यांची लाखोली वाहिली.पण लवकरच त्यांना समजले हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे.त्याला मारुन लोकांचे हात सुजले तरी तो हसतच होता.लोक दमली कमरेवर हात ठेऊन त्याच्याकड पाहत राहिली.बळकट शरीराच्या एका पहिलवान त्याच्याजवळ गेला.जवळ आलेला तो मोठ्या दाढीमिशांचा पहिलवान त्याने हातानेच फाडला.त्याचे ऊष्ण रक्त आपल्या शरीरात शोषून घेतले.कुणाला काही कळायच्या आत हे घडले.डोळ चोळीत लोक हे दृश्य पाहत होती.त्यांची पळापळ चालू झाली.जो त्याच्या हाती सापडला तो त्याने संपवला.आपली पोरबाळ त्याच्या हाती लागू नये म्हणून लोकांनी त्यांना गोठ्यात लपवले.या भूताची तहाण भागतच नव्हती सापडेल त्या माणसाच्या मानेत दात घुसवून तो रक्त पित होता.गावातील निम्मे लोक त्याला घाबरुन पळून गेले.बाकीच्या लोकांनी आसपासच्या गावातील भगत झोपेतून ऊठवले.हातापाया पडत त्यांना गावात घेऊन आले... तो एखाद्या लहान मुलासारखा वागत होता,त्याचे दोन्ही हात,चेहरा रक्ताने माखला होता.भूतांना मंदीरात प्रवेश नसतो पण हे भूत मंदीराच्या पायर्याही चढल.भगत लोकांनी तेव्हाच हे काम आपल्या हाताबाहेरच आहे हे ओळखल.
त्याने गावात घातलेला धुडगूस पाहून एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरने आपल्या रायफलमधील सगळ्या गोळ्या त्याला घातल्या. त्याच्या शरीरावर असंख्य भोक पडली,कपाळाच्या मधोमध एक गोळी लागली... ऊजवा डोळा फुटून बाहेर आला... छातीची चाळण झाली तरी रक्ताचा एक थेंबही निघाला नाही.लोक रानात पळून गेली ऊसाच्या दाट शेतात लपून बसली... रक्ताचा वास घेत त्याने आपला मोर्चा दुसर्या गावात वळवला... या गावातून पळालेल्या काही लोकांनी अगोदरच तिथे आश्रय घेतला होता... तो गावात आल्यावर काय होणार याची कल्पना लोकांना आली होती... नुसत नजरेनच भुतांना संपवणारे सिध्द साधू त्यांनी बोलवले होते...
वाकडेतिकडे पाय टाकीत ते भूत गावाच्या वेशीतून आत शिरल... सगळी लोक आपापल्या घरात शिरुन खिडक्यातून,दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहू लागली... गावात प्रवेश करताच ते भूत खाली पडल.जोराने खिदळत पुन्हा उठल.दोन्ही भगव्या कपड्यातील साधू गावाच्या मधोमध ऊभे होते..
"याला संपवता येणार नाही.जिथून आला तिथेच परत पाठवू... "एकमेकांच्या कानात कुजबूजत त्यांच बोलण चालू होत.ते भूत दोघांच्या अगदी जवळ आल त्यांना पकडणार तोच दोघे गायब झाले... भूत पुन्हा खाली पडलं..
भूत ऊठल पण आता ते गावात नव्हत तर स्मशानभूमीच्या गेटजवळ ऊभ होत.त्याची नजर आत ऊभ्या असलेल्या साधूंवर गेली.ते भूत ईच्छा नसतानाही आत ओढल गेल.स्मशानात शांतता होती काही वेळापूर्वी चिरफाड केलेली प्रेत तिथे पडली होती... जिथून तो बाहेर आला होता ती जागा परत फाटली... मागून आलेल्या एका हाताने त्याच्या कपाळी भस्म लावले... तसे प्रेत धप्पकन खाली कोसळल त्याची माती झाली. प्रेतातून बाहेर आलेल लहान भूत घाबरुन एका झाडामागे लपून बसल.जमीन तिथपर्यंत फाटत गेली.झाडासकट ते भूत जमीनीत गायब झाल..
दुसर्या दिवशी स्मशानातील प्रकार पाहून लोकांनी पोलीसांना बोलवले... त्या मांत्रिकांचा त्यांनी खूप शोध घेतला पण ते कुठे सापडले नाही.असला प्रकार पुन्हा घडू नये म्हणून काही महिने स्मशानभूमीवर पोलीसांनी कडक पहारा दिला. रात्रीचा कुणालाही आत प्रवेश नव्हता.अंधार पडल्यावर अंत्यसंसकार करायला सुध्दा परवानगी नव्हती.मांत्रिकांचा शोध चालू होता पण ते शेवटपर्यंत हाती लागले नाही.
"भयानकच आहे सगळ... "गणेश म्हणाला...
"यापेक्षा भयानक प्रकार मला नंतर समजला. काळ्या जादूचे प्रयोग करणार्या एकाने मला सांगितला... "
"कोणता.... "
"त्या आगीत टाकलेल्या प्राण्यांच्या राखेवरुन जर एखादा चालला.तर काही तासांकरीता त्याची चेतना गायब होते.सर्व अवयव बंद पडतात पण तो मरत नाही.तो मेला अस समजून लोक त्याला पुरतात,मग असे मांत्रिक काळी जादू वापरुन त्याची चेतना परत आणतात.त्यावेळी तो पूर्णपणे मांत्रिकाच्या नियंत्रणाखाली असतो... पण त्याला भूक फार लागते... तो सदैव काहीतरी खातच असतो.भूक सहन झाली नाही तर ते मांत्रिकावर सुध्दा हल्ले करतात... अशा लोकांच्या शरीरात एखाद्या अतृप्त आत्म्याचा संचार करवून त्यांची ताकत वाढवता येते... असे संचार झालेली लोक नरभक्षी असतात...