कर्मचक्र - लेखक : कुमार -भाग पहिला.......
स्वार्थ म्हणजे काय? स्वतः कडे आहे तरी अजून हवे आहे अशी अपेक्षा करणे म्हणजे स्वार्थ का? तसे सर्व जिवंत प्राणी स्वार्थी असतात .पण माझे मत आहे मनुष्य प्राणी सर्वात जास्त स्वार्थी आहे या भू तलावर, प्रेम, सत्ता आणि पैसा या गोष्टी साठी माणूस पहिल्या पासून स्वार्थी आहे आणि त्याचा हा स्वार्थ त्याला कोणत्या पातळीवर नेऊन ठेवेल याचा काही नेम नाही. सादर कथा हि अशीच स्वार्थी लोकांनी भरलेली आहे.
टेबलवर फोन वाजतो, फोन उचलला जातो तसा पलीकडून आवाज येतो. साहेब आज पुन्हा गावात बळी गेला आहे आजचा हा दहावा बळी आहे, हे दृष्ट चक्रातून आम्हाला वाचावा. काही तरी करा साहेब असेच सुरु राहिले तर गावात कोणीच जिवंत राहणार नाही. आवाज रडवेला होतो काही तरी करा साहेब इकडून कॉल कट केला जातो.
साधारण २० वर्षा नंतर मुंबई मध्ये, ये जास्त हुशारी करू नकोस समजले ना मी रोज रिक्षा ने प्रवास करते आणि तू काय मला सांगतोस किती भाडे झाले. रोज मी २० रुपयात घाटकोपर स्टेशन वरून इथं पर्यंत येते आणि तू काय २५ सांगतोस, मुलगी पाहून लूट करता काय? तेवढ्यात तो रिक्षा चालक म्हणतो मॅडम मीटर पहा ना मीटर २५ दाखवतो आहे आणि नेहमीच रस्ता घेतला असता तर तुम्हाला उशीर झाला असता कारण तिकडे गाडी बंद पडून ट्राफिक झाले होते म्ह्णून थोडं फिरून आलो आणि ५ रुपये साठी तुम्ही एवढे सुनावत आहात. हे बघ मी मानसी शिंदे या कीर्ती ग्रुप मध्ये अकाउंट मध्ये काम करते आणि तू मला पैस्यान बद्दल सांगतोस तुझा मीटर खराब असेल. मानसी आणि रिक्षा वाला यांचा होणारा वाद निशी ने पहिला, निशी प्रधान कीर्ती ग्रुप ऑफ कंपनी मध्ये स्टॉक मॅनेजर म्हणून कामाला त्याने गाडी लावली आणि जिकडे भांडण सुरु होते तिकडे गेला. काय झाले मानसी? निशी ने विचारले. अरे हा बघ ना ५ रुपये जास्त मागतो आहे मानसी नाराजी च्या स्वरात म्हणाली. साहेब २०रुपये भाडे होते मान्य पण आज नेहमीच्या रस्त्यावर गाडी बंद पडली मॅडम ला उशीर होईल म्हणून मी थोडा वळसा घालून आलो म्ह्णून ५ रुपये जास्त पडले तर मॅडम वाद घालत आहे त्याचे वाक्य पूर्ण होण्या आधी हो घालणार वाद मी नाही देणार जास्त पैसे हवे ते कर मानसी रागाने म्हणाली. निशी ने खिश्यात हात घालून ५ चा कॉइन काढून त्या रिक्षा वाल्याला दिला. अरे हे काय करतोस मानसी बोले पर्यंत रिक्षा वाला घेऊन निघून गेला. मानसी ने चिडून निशी कडे पहिले आणि म्हणाली, तू का दिले पैसे माझ्या कडे पण होते पण नियम त्याने मोडला फिरून आला तरी २ रुपये झाले असते ५ म्हणजे जरा जास्त बोला. त्यावर निशी ने तिला शांत करत म्हणाला, तू शांत हो माझी आई आधीच आपल्या उशीर झाला आहे आणि त्यात हा वाद वाढला असता तर त्याला काही नाही पण आपला लेट मार्क लागला असता. तेवढयात मानसी घड्याळ पाहते, शिट्ट फक्त ५ मिन आहे म्हणत दोघे धावत लिफ्ट जवळ जातात लिफ्ट येते आणि दोघे आत जातात आज पडणार वाटत निशी बोलतो. पंच करून दोघे पण आपल्या जागेवर बसतात तेवढयात त्यांचा जवळ शिव येतो. आलात या अरे तुम्ही कधी सुधारणार तुमच्या साठी तिकडे बॉस ला रोज नवीन कारण द्यावे लागते जरा तरी वेळेचे भान ठेवा शिव म्हणाला. शिव कंपनी मध्ये मशीन चा हिशोब ठेवत असे तसेच कामगारांचे किती दिवस भरले आणि किती सुट्टी याची यादी पण त्याचा कडे होती. हेय गाईज एक मधुर आवाज कानावर पडला तसे तिघे पण शांत आणि भीती ने पाहत उभे होते. काय काम नाही का गप्पा मारायला उभे राहायला हे काय तुमचे कॉलेज नाही समजले का चला कामाला लागा कीर्ती कंपनी च्या मालक गोरखनाथ यांची एककूलती एक मुलगी कीर्ती त्यांचा समोर उभी होती. त्या तिघांची पडलेली तोंडे पाहून कीर्ती हसू लागते. अरे मी मस्करी करत होते एवढे सिरीयस का झालात कीर्ती हसत म्हणाली. कीर्ती तू पण ना कधी कशी वागशील सांगता येत नाही निशी म्हणाला. अरे काय करू आहे तर मी मालकीण मग म्हंटल बघू जमत का ते, पण जमले रे कीर्ती हसत म्हणाली, हा आणि आमची भीती ने वाट लागली शिव म्हणाला. तू भेट नंतर मी बघते आता ऑफिस मध्ये आहे नंतर बाहेर भेट मानसी म्हणाली. निशी, मानसी, शिव आणि कीर्ती चौघे पण एकच कॉलेज मध्ये शिक्षण घेतले नंतर कीर्ती ने त्याची नोकरी तिच्या कंपनी मध्ये लावली होती. गाईस तुम्ही अंगद ला पहिले का? कीर्ती ने इकडे तिकडे पाहत विचारले. नाही बुआ का? तुझे काही महत्वाचे काम आहे का अंगद कडे? शिव ने लाडिक पणे विचारले. त्यावर कीर्ती थोडे लाजून म्हणाली नाही काही नाही. तिचे असे लाजणे पाहून मानसी म्हणाली तुला अंगद आवडतो तर तू त्याला विचारून का नाही टाकत. मी काय आता विचारेन पण तो समोर आला ना कि माझ्या तोंडातून शब्द फुटत नाही. मग मी विचारतो? हसत निशी म्हणाला. काही गरज नाही मी विचारेन योग्य वेळ आल्यावर सध्या चला काम करा बोलून ती तिच्या केबिन मध्ये जाते आणि इकडे अंगद येतो. सहा फूट उंच, पिळदार शरीरयष्टी त्यावर पिळदार मिश्या अगदी चित्रपटामध्ये कोणी हसत हिरो म्हणून घेऊन असा आणि त्याच्यावर कोणती हि ललना पाहताच प्रेमात पडेल. प्रोजेक्ट मॅनेजर पोस्ट ला होता कमी बोलायचा. निशी, अंगद,शिव ,मानसी यांचा मोबाईलवर एक मॅसेज येतो. मीटिंग संद्याकाळी ०४ वाजता हा मॅसेज कंपनी चे मालक गोरखनाथ यांनी पाठवलेला असतो.
हॅलो टीम, गोरखनाथ त्या चार जणांकडे पाहत म्हणाले. आज मी खुप खुश आहे, आज आपल्या कंपनीचे शेअर खुप जास्त प्रमाणात मार्केट मध्ये विकले गेले आणि आपल्याला आत आपला कारभार वाढवायला हवा आणि त्या साठी आजची हि मीटिंग ठेवली आहे. शिरोळे पुणे जवळ एक छोटे गाव आहे तिकडे एक कपड्याची मिल आहे पण काही कारणाने ती मिल बंद झाली होती आणि आता मार्केट मध्ये आपले स्थान आणि आपले काम पाहता मी ती मिल पुन्हा सुरु करायचा विचार करतो आहे. गाव छोटे आहे आणि तिकडे लोकांना मिल मुळे आर्थिक हातभार लागेल.वाह्ह काय छान विचार आहे बाबाचे कीर्ती मनात म्हणाली. बाबा हि तर खरंच चांगली बातमी आहे म्हणजे मला आठवत नाही पण लहानपणी मी ते नाव ऐकले होते कीर्ती म्हणाली. गोरखनाथ ने एक स्मित करत पुन्हा सर्वांकडे पहिले आणि म्हणाले. मला या कामासाठी अत्यंत हुशार, मेहनती आणि विश्वासू माणसे हवी आहेतआणि म्हणून तुम्ही सर्व इकडे आहात ना कि तुम्ही कीर्ती चे मित्र आहात. तुमचे काम आणि काम करण्याची पद्धत पाहून मी तुमची निवड त्या प्रोजेक्ट साठी केली आहे. हि कंपनी कीर्ती एकटी स्वतंत्र पणे सांभाळणार तुम्ही चौघे तिला रिपोर्ट करणार परवा तुम्ही शिरोळ ला जाणार आणि तिकडे मशीन तिकडे काही लागले ते सर्व तुम्ही कीर्ती ला सांगून घेणार आता ती तुमची बॉस बोलून गोरखनाथ हसू लागले आणि त्यांना पाहून सर्व हसू लागले. तुमची राहण्याची सोय तिकडे कंपनी चा बंगलो आहे तिकडे केली आहे तुम्ही परवा निघायची तयारी करा गोरखनाथ म्हणाले. त्यावर कीर्ती आनंदानं ओरडली आणि जोरात म्हणाली मी पण येणार तुमच्या सोबत तिचे वाक्य पूर्ण होई पर्यंत नाही तू नाही जायचे तिकडे गोरखनाथ बोला. पण का? कीर्ती ने आश्चर्याने विचारले. कारण, कारण मला इकडे तुझी मदत लागणार म्हणून तू इकडे हवी आहे गोरखनाथ विचार करत म्हणाला. कीर्ती ने त्यावर फक्त मान डोलावली. मीटिंग संपली तसे सर्व बाहेर पडले आणि शिव, मानसी आणि निशी तिघे पण जिन्याकडे गेले तिकडे तिघांनी पण सिग्रेट शिलगावली आणि झुरके घेत निशी म्हणाला,अचानक बॉस ला काय झाले, कीर्ती येत होती तर अचानक तिला नाही का बोले? काय माहित नक्की काय झाले? नाही तर बॉस कधी नाही बोलत नाही कसला मानसी धूर सोडत म्हणाली.तेवढयात कीर्ती येताना दिसली.
कीर्ती, काय झाले बॉस ला असे अचानक नाही का बोले आणि कारण जे दिले ते पण विचार करून दिले असे वाटत आहे शिव म्हणाला. काय माहित यार? मला पण एक दे, डोकं जड झाले आहे. म्हंटलं मस्त चान्स आहे अंगद सोबत राहण्याचा तर त्यात पण आमचा बाप मध्ये आला. बघते काय काम आहे नाही तर मधेच जॉईन कारेन तुम्हाला तिकडे चला जाऊ म्हणून कीर्ती आणि सर्वानी सिगरेट विझवली.
दुसऱ्या दिवशी तयारी साठी चौघे पण सुट्टी वर होते, इकडे कीर्ती ला करमत नव्हते. वेळ साधून कीर्ती ने मेरी जी गोरखनाथ यांचे मीटिंग सांभाळत होती तिला कॉल केला. मेरी मला सांग या ८-१० दिवसात बाबांची अशी कोणती मीटिंग आहे का जिकडे मी असणे गरजचे आहे किंवा माझी काही गरज असेल मुंबई मध्ये कीर्ती ने विचारले. मेरी ने डायरी पाहून पाच मिन मध्ये उत्तर दिले सरानी अशी कोणती मीटिंग नाही ठेवली जिकडे तुम्ही हवे आहात आणि सर उद्या गुजरात ला जाणार आहेत मेरी ने उत्तर दिले आणि कीर्ती चा चेहरा उतरला. पुन्हा कधी येणार आहे कीर्ती ने विचारले. पुन्हा मेरी ने डायरी पाहून म्हणाली उद्या जाऊन दुसऱ्या दिवशी पहाटे माघारी येणार हे ऐकताच कीर्तीच्या चेहऱ्यावर हसू आले आणि तिने फोन ठेऊन दिला. तिने लगेच एक मेसेज आपल्या मित्राच्या ग्रुप वर टाकला कि उद्या मी पण येत आहे आणि या बाबत अंगद ला कोणी सांगू नये. ग्रुप मध्ये ख़ुशी चे स्टिकर पाठवले. ठरल्या प्रमाणे गोरखनाथ आवश्यकत्या सूचना कीर्तीला देऊन गुजरात साठी निघाले. इकडे गोरखनाथ बाहेर पडले आणि तिकडे कीर्ती त्यांचा मागून स्वतःची गाडी घेऊन निघाली. तिने शिव, मानसी आणि निशी ला पिकअप केले आणि वाटेत तिने अंगद ला पिकअप केले. तू इकडे कशी कीर्तीला पाहून अंगद ने आश्चर्याने विचारले. बाबा सकाळी लवकर गुजरात ला गेले आणि मी निघले आता ते येतील उद्या आणि त्यांना मी दिसली नाही तर ते थोडे चिडतील किंवा ओरडतील समोर मी नसेन तर कॉल करून मी त्यांना शांत करू शकेन कीर्ती म्ह्णणाली. हो, म्हणजे आणि तिला कोना सोबत तरी वेळ घालवायला मिळेल ना हसत मानसी म्हणाली जे अंगद ला काही समजले नाही. गाणी, गप्पा आणि मस्ती करत ते शिरोळे ला साधारण ४ पर्यंत पोचले.
शिरोळे, पुणे जवळ असेलेले एक छोटे खेडेगाव होते मुंबई पासून साधारण १४५ किलोमीटर वर गावात साधारण ४०० घरे आणि सर्व मिळून मिसळून राहत होते. गावच्या वेशी बाहेर गावकऱ्यांची शेती आणि तिकडे एक सफेद बंगलो आणि एक बंद पडलेली मिल, त्या मिल कडे पाहून असे वाटत नव्हते कि त्या मिल मध्ये एक तागा पण तयार झाला असेल.
इकडे गप्पा आणि गाणी म्हणत कीर्ती आणि टीम गावाकडे जात असताना त्यांना एक गाई घेऊन जाणारा तरुण दिसतो. अरे मित्र हे शिरोळे गाव किती लांब आहे अजून निशी ने विचारले. त्यावर तो तरुण हसत म्हणाला. हे काय साहेब इकडे एक वळण घेऊन ५ मिन पुढे गेले कि आले शिरोळे गाव, तिकडे कोणती मिल आहे ना तिकडे जायचे आहे निशी म्हणाला तसे त्या तरुणाचा हसरा चेहरा एकदम पडला आणि तो भीती ने त्यांचा कडे पाहू लागला. हॅलो काय रे काय झाले नाही माहित तर काही प्रॉब्लेम नाही असे भूत पहिल्या सारखा चेहरा का केला आहेस निशी म्हणाला तसे सर्व हसू लागतात. साहेब पत्ता माहित आहे पण ती जागा चांगली नाही तो तरुण म्हणाला. म्हणजे का रे काय आहे तिकडे? शिव ने हसत विचारले. तिकडे, तिकडे अवदसा आहे अवदसा तो तरुण भयाने कापत म्हणतो. त्या जागेत जो कोणी गेला तो परत कधी आला नाही. अवदसा म्हणजे काय? मानसी विचारते. अवदसा म्हणजे स्त्री भूत किंवा हडळ म्हणू आपण अंगद म्हणतो. हो का, तुला बरीच माहिती आहे भूताची निशी म्हणतो आणि हसू लागतो हो रे मला पण पाहायचे आहे कशी दिसते ते शिव म्हणाला आणि सर्व हसू लागतात. साहेब हसू नका, हे सर्व हसण्यावारी घेऊन जाऊ नका तिकडे जे आहे ते तुमच्या आमच्या समजण्या पलीकडे आहे. गावाच्या वेशीवर ते घर आणि ती मिल आहे तुम्ही शहराकडे राहणारे तुम्हाला काय माहित गावी काय असते? जपून जा आणि सांभाळून राहा तो तरुण बोलतो आणि त्याचा कडे एक विचित्र नजर टाकून कीर्ती गाडी सुरु करून ते तिकडून निघतात.
काय माणसे आहेत, काय तर म्हणे अवदसा अरे कोणत्या शतकात जगतात काय माहित हे लोक निशी म्हणतो. शिरोळे गावात आपले स्वागत अशी पाटी तिकडे लावलेली असते पाटी जुनी झाली होती आणि खराब पण ते गावाच्या वेशीमध्ये प्रवेश करतात आणि त्यांना एक सफेद बंगलो दिसतो त्याचा शेजारी मिल सारखे काही तरी असते. बंगलो बाहेरून अगदी विचित्र वाटत होता म्हणजे आजूबाजूला कुंपण होते, त्याचा कलर गेला होता बाहेरून अगदी भेसूर वाटत होता त्याचा बरोबर शेजारी ती मिल होती जिच्या बाहेर पण कुंपण होते आणि आजूबाजूला झाडी वाढली होती. कीर्ती गाडी पार्क करते, आई शपत हा तर भूत बंगलो वाटत आहे शिव म्हणाला. इकडे कोणी रामू काका आहे का जो आपले कंदील घेऊन स्वागत करेल मानसी बोली आणि सर्व हसू लागले. नाही इकडे रामू काका नाही पण शेवन्ता काकी आहेत कीर्ती म्हणाली.म्हणजे? मानसीने विचारले आणि कीर्ती ने दारावरची बेल वाजवली. मानसी चे उत्तर तिचा समोर होते, साधारण ५०-५५ वर्ष असलेल्या स्त्री ने दरवाजा उघडला. कीर्ती ताई तुम्हीच का? त्या काकी ने विचारलेल्या प्रश्नावर कीर्ती ने मानेने होकार दिला.कीर्ती ने आत प्रवेश केला आणि तिचा मागे सर्व आत आले. तुमच्या फोन आला आणि मी कामाला लागले. सर्व घर स्वच्छ केले आहे वरती ३ रूम पण तयार करून ठेवल्या आहेत. जेवण करून ठेवले आहे. मी सकाळी येईन आणि नास्ता दुपारचे आणि संध्याकालचे जेवण करून जाईन.या भागात तसे फारसे कोणी येत नाही पण तरी देखील जमलं तर घरी थांबा बाहेर रात्री पडू नका आणि तिकडे मिल कडे जायचा रात्री प्रयन्त करू नका नाही म्हणजे खुप झाडी वाढली आहे त्या मुळे जनावर असेल म्ह्णून म्हंटले हसत शेवंता म्हणाली. काकी त्या मिल कडे सफाई साठी कोणी असले तर पहा जरा कीर्ती म्हणाली तसे शेवंता चा चेहरा एकदम उतरला. हो ताईसाहेब बघते आता मी घरी जाते मला उशीर होतो आहे. सर्व माहिती भराभर सांगून शेवंता निघाली. काय सॉलिड आहे हि सर्व सूचना भरभर सांगून निघून पण गेली शेवंता च्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून अंगद म्हणाला.
सर्वानी आपले रूम निवडून घेतले. निशी आणि शिव एका रूम मध्ये, मानसी आणि कीर्ती एका रूम मध्ये तर अंगदने शेवटची छोटी रूम एकट्या साठी घेतली. सर्व रूम च्या खिडकी मधून मिल चा गेट दिसत होता. संध्याकाळी जेऊन सर्व जण आपल्या रूम मध्ये झोपले. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाटाने कीर्ती ला जाग आली आणि तिने स्वतःचा मोबाईल पहिला ९ वाजले होते आणि गोरखनाथ यांचे १२ मिस कॉल होते सोबत काही टेक्स्ट पण होते. तिला माहित होते काय होणार आहे तिने झोपतेतच कॉल केला. हॅलो गुड मॉर्निंग बाबा कीर्ती म्हणाली, खड्यात घाल तुझे गुड मॉर्निंग तुला सांगितलं होते ना तिकडे जाऊ नको म्हणून तरी तू का गेलीस? गोरखनाथ यांनी चिडून विचारले. बाबा एवढे का रागवत आहेत, तुम्ही तर म्हणता ना कि माझ्या नंतर तुलाच सर्व सांभाळायचे आहे मग मला माझ्या कंपनी चे पाहायला नको का? आणि तसे पण हा प्रोजेक्ट तुम्ही मला दिला आहे मी याचे सर्व पाहणार आहे आणि ते मला मुंबई मध्ये बसून बघणे शक्य नाही कीर्ती थोडी रागात बोली. म्हणजे तू माझे काही ऐकणार नाही का? ते एक गाव आहे आणि तिकडे तू कशी राहणार गोरखनाथ काळजीच्या स्वरात विचारले. बाबा तुम्ही माझी काळजी नका करू इकडे आपले एवढे मोठे घर आहे शेवन्ता काकू आहेत शिवाय माझे मित्र आहेत मी माझी काळजी घेईन आणि आज नाही तरी उद्या मला इकडे यावे लागले असते ना? चला मी नंतर बोलते मला भूक लागली आहे ब्रेकफास्ट कार्याला जाते बाय बाबा लव्ह यू बोलून पुढचे काही न ऐकता ती कॉल ठेऊन देते. गोरखनाथ यांच्याकडे फक्त हॅलो, हॅलो करण्याशिवाय काहीच उरले नव्हते. त्यांना माहित होते कि कीर्ती हट्टी आहे आणि तिला जे हवे ते करणार.
नास्ता च्या टेबले वर सर्व तयारी शेवन्ता काकू ने करून ठेवली होती तिकडे आता फक्त एकटा अंगद बसला होता.कीर्ती त्याचा शेजारी जाऊन बसली. झोप झाली का नीट? कीर्ती ने विचारले. त्या वर अंगद ने तिच्या कडे न पाहता मानेने होकार दिला. तू रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करतोस कीर्ती ने विचारले,तसे अंगद ने पुन्हा मानाने होकार दिला. हा बोलत का नाही मुका झाला आहे का? कि मी याला मारणार आहे, बोल मेल्या काही तरी बोल इकडे कोणी नाही तो पर्यंत तरी बोल आपला वेळ आहे बोल ना? मंद कुठला कीर्ती मनातून अंगद ला बोलत होती. हि माझ्या बाजूला का बसली आहे? आणि एवढे का विचारते आहे? काही प्रॉब्लम तर झाला नाही ना? विचारू का? बोलू का हिच्या सोबत नाही तरी एक मैत्रीण म्हणून बोलत आहे. कसा सांगू ती मला आवडते. अंगद पण मनात विचार करत होता. तेवढयात निशी आणि शिव आले, हे काय सुरु केला पण तुम्ही शिव ने विचारले. अरे तू काय आंधळा आहेस का? अजून सुरु केला ते दिसते का? आम्ही गप्पा मारत होतो कीर्ती म्हणाली. आंम्ही म्हणजे तू आणि अंगद निशी ने विचारले आणि तो हसू लागला. हसतोस काय? खरच आम्ही बोलत होतो कीर्ती म्हणाली. त्यावर अंगद म्हणाला हो आम्ही बोलत होतो. सॉरी आम्ही काही व्यत्यय नाही ना आणला बोलून पुन्हा शिव आणि निशी हसू लागतात त्यांना पाहून कीर्ती आणि अंगद पण हसू लागतात सर्वाना माहित होते कीर्ती चे अंगद वर प्रेम आहे पण कोणाला हे माहित नव्हते कि अंगद चे पण प्रेम आहे कीर्तीवर पण मालकाची मुलगी म्ह्णून त्याने कधी उघड केले नव्हते. मानसी येते आणि विचारते गाईस आज चा काय प्लॅन आहे? आज काय करूया? तेवढयात शेवंता येते, काकू काल मी काही माणसे सांगितली होती मिल च्या सफाई साठी त्याचे काही झाले कीर्ती ने विचारले, तसे शेवंता चा चेहरा एकदम भीती ने पांढरा पडला. माफ करा, इकडे कोणी येत नाही मी विचारले पण कोणी नाही येणार म्हणाले आणि ताट घेऊन आत निघून जाते. तिच्या चमत्कारी वागण्याचे आश्चर्य वाटून अशी काय हि, मिल मध्ये काय भूत आहे काय? एवढे काय घाबरायचे मानसी म्हणाली. आणि खरचं भूत असेल तर ते तुला पाहून पळून जाईल निशी म्हणाला आणि सर्व हसू लागतात. मिल जुनी आहे आणि आजूबाजूला झाडी पण आहे सुरु करायच्या आधी तिला नीट साफ केली पाहिजे अंगद म्हणाला.एक काम करा, अंगद तू आणि शिव तुम्ही दोघे गावात जा आणि तिकडे कोणी भेटते का पहा. तो पर्यंत मी, निशी आणि मानसी आज आजूबाजूचं तरी साफ करून घेऊ आणि तुमचे झाले कि आम्हाला जॉईन करा ठीक आहे कीर्ती म्हणाली त्याला सर्वानी दुजोरा दिला.
ठरल्या प्रमाणे शिव आणि अंगद दोघे पण मिल च्या सफाई साठी कोणी भेटत आहे का पाहायला गावात आले. गाव तसे मोठे होते पण सुखसुविधा हव्या तेवढ्या नव्हत्या, घरी काही मातीची होती तर काही फक्त विटांची मोठे घर असे कोणते नव्हते. थोडे पुढे गेल्यावर एका पारावर तरुण मुलाचा एक घोळका बसला होता. शिव त्याचा कडे गेला आणि त्याने विचारले. काम हवे आहे का? त्यातला एक जण म्हणाला कसले काम आहे? गावाबाहेर जी मिल आहे तिची सफाई करायची आहे त्याचे वाक्य पूर्ण होण्या आधी मुले तिकडून निघाली. एका जाणाऱ्या मुलाला अंगद ने हटकले, काय रे पैसे देऊ ना चांगले, त्यावर तो मुलगा म्हणाला, साहेब पैसे घेऊन काय करणार जर जीव नाही राहिला तर त्याचे ते वाक्य दोघाना पण नाही समजले. म्हणजे ?शिव ने विचारले. म्हणजे त्या मिल मध्ये अवदसा आहे तुम्ही पण ती उघडण्याचा प्रयन्त करू नका नाही तर कोणी वाचणार नाही त्याचे वाक्य ऐकून ते दोघे एकमेकांकडे पाहत होते तो पर्यंत तो मुलगा तिकडून निघून गेला होता. त्या नंतर त्यांनी अजून ४-५ लोकांना विचारले पण कोणी तयार झाले नाही. तेवढयात त्याचा समोरून एक मळके कपडे घातलेला आणि स्वतःशी काही तरी बडबडणारा माणूस येत होता. सुरुवातीला वाटले तो भिकारी आहे म्हणून अंगद ने त्याला हटकले. ये अंगद ने आवाज दिला तसे त्या माणसाने मागे वळून पहिले हा तू अंगद म्हणाला. अंगद त्याचा जवळ गेला आणि त्याला विचारले पैसे हवे का? त्याने हसून मान डोलावली. माझ्या जवळ एक काम आहे करशील तर मी तुला पैसे देईन अंगद त्याला नोटा दाखवत म्हणाला. तो माणूस हसत म्हणाला काय काम आहे? गावाबाहेर जी मिल आहे, ना तिला साफ करायची आहे अंगद बोला तसे तो माणूस जोरात हसू लागला आणि म्हणाला साहेब ती मिल नाही मृत्यू आहे त्यात जो गेला तो परत नाही आला तुम्ही पण जाऊ नका नाही तर मराल तिकडे अवदसा आहे अवदसा कोणाला नाही सोडणार आणि हसत हसत तो तिकडून निघून गेला. जातांना शिव आणि अंगद त्याचा कडे आश्चर्याने पाहत होते.मला नाही वाटत आपली कोणी मदत करेल इकडे शिव निराश स्वरात म्हणाला त्याला अंगद ने दुजोरा दिला. खेडेगाव आहे ना त्या मुळे इकडे कोणाला बोलावता पण येत नाही चला परत फिरू आणि सांगू कीर्ती मॅडम ला अंगद म्हणाला आणि काही पावले चालले असतील तसे शिव जोरात ओरडला आयडिया त्याचा अश्या ओरडण्याने अंगद दचकला. शिव ने कोणाला तरी कॉल केला आणि बोलणे झाले आणि फोन ठेऊन अंगद झाले आपले काम खुशीत शिव म्हणाला. म्हणजे झाले काय? अंगद ने विचारले. अरे माझा एक मित्र आहे तो सफाई साठी माणसे पुरवतो मी त्याला बोलो तो उद्या आपल्या साठी २ माणसे पाठवतो आहे, खर्च होईल थोडा पण काम होईल आपले आहे कि नाही चांगली बातमी शिव ने हसत विचारले. हो यार, खरचं बरे झाले नाही तर कसे झाले असते आणि कीर्ती मॅडम ना नाही बोलावे लागले असते अंगद म्हणाला. अंगद मला सांग तुला कीर्ती आवडते ना? खरे सांग शिव ने विचारले तसे अंगद लाजला आणि गालात हसून म्हणाला असे काही नाही. शिव काय समजायचे होते ते समजला, एक सल्ला देऊ विचारून टाक कदाचित तिचा होकार असेल शिव म्हणाला तसे लाजून अंगद म्हणाला, अरे कुठे काय कुठे ते गुलाब आणि कुठे मी धोतरच फुल माझी लायलकी नाही रे तिच्या पर्यंत जायची आणि बॉस ला समजले तर नोकरी पण गेली आणि छोकरी पण गेली त्या पेक्षा जे चालूं आहे ते बरे आहे बोलत बोलत ते मिल जवळ आले. तिकडे कारभार पूर्ण थंड होता शेवंता ने आणलेलं सरबत पीत सर्व बसले होते. काम अजून निम्मे पण झाले नव्हते. काय रे काय झाले? मानसी ने विचारले.काही नाही आपले काम झाले आहे शिव म्हणाला. पण तुम्ही अजून मिल पण नाही उघडली अंगद ने आश्चर्याने विचारले. नाही रे इकडे काम करताना अर्धे झालो निशी म्हणाला. ठीक आहे, उद्या २ माणसे येतील कामाला त्यांना थोडे जास्त पैसे लागतील पण काम व्यवस्तीत करणार शिव म्हणाला. कोण रे गावातले आहेत का? कीर्ती ने विचारले. नाही, मुंबई वरून येणार आहे शिव चा मित्र आहे त्याचे कामगार आहेत अंगद म्हणाला. हुश्श, सुटलो बुआ एकदाचे बोलून मानसी तिकडे बसते. का रे गावातले कोणी नाही येत आहेत का? निशी ने विचारले. नाही आणि तिकडे जे झाले ते सर्व शिव ने त्यांना सांगिले. अवदसा आहेच का? असे काही नसते कधी समजणार या लोकांना काय माहित? मानसी म्हणाली. तेवढयात शिव म्हणाला चला मिल पण उद्या ओपन करू आता जेऊन थोडा आराम करू आणि मग संध्याकाळी नदीवर जाऊ आणि तिकडे जर कोणाला मनातले काही सांगायचे असेल तर त्याने सांगा बरं का ? शिव म्हणाला आणि त्याने कीर्ती आणि अंगद कडे नजर टाकली तसे कीर्ती पळत बंगलो कडे गेली. त्याचे बोलणे ऐकून शेवन्ता मनात म्हणाली देवा याना मिल न उघडणायची सुबुद्धी दे आणि ती पण बंगलो कडे जाते.
क्रमश