कर्मचक्र- दुसरा भाग........-लेखक : कुमार
सकाळी दारावरची बेल वाजते तशी शेवंता काकू दरवाजा उघडतात, समोर २ माणसे उभी असतात त्यांचा हातात सामान असते. कोण पाहिजे? शेवंता काकू विचारतात. शिव सर यांनी बोलावले होते सफाई साठी एक जण हातातले सामान खाली ठेवत बोलतो. शेवंता त्यांना आत घेते आणि बसायला सांगून शिव ला उठवायला त्याचा रूम कडे जाते. दारावरची टकटक ऐकून शिव जागा होतो आणि जांभळी देत तो दरवाजा उडतो. शिव साहेब ते २ माणसे आले आहेत तुम्हाला भेटायचे आहे बोलत आहे शेवंता निरोप देते तसे शिव ची झोप उडते आणि तो म्हणतो काकू त्याच्या चहा आणि नास्ता चे पहा मी येतो यावरून बोलून शिव दार लावून घेतो. साधारण ३० मिन मध्ये शिव खाली येतो तर ते अंगद सोबत बोलत असतात. शिव आणि अंगद त्यांना कामाचे स्वरूप सांगतात आणि त्यांना मिल कडे घेऊन जातात. गेट जवळ पोचल्यावर शिव सांगतो हि काही झाडी आहे ती साफ करून घ्या आणि पुढे जातात मिल च्या दरवाजावर एक कुलूप असते त्यावर अनेक गंडे दोरे बांधलेले असता, ते शिव तोडतो आणि म्हणतो हे गावकरी पण ना असली अंधश्रद्धा पळून बसतात काय माहित? बोलून शिव टाळे उघडतो तसे आतून गरम हवा आणि एक घाण दर्प येतो. बहुतेक जास्त वर्ष बंद असल्या मुळे असेल शिव मनात विचार करतो आणि आत जातो. मिल जास्त मोठी नव्हती पण एका दिवसात काम पूर्ण होईल असे पण नव्हते कमीत कमी त्या दोघांना ५ दिवस तरी लागले असते. शिव, अंगद आणि ते दोघे मिल पाहत हो ते. हे बघा इकडे मॅनेजर केबिन आहे तिकडे तुमची राहायची सोय होईल बाथरूम आहे बाजूला नदी पण आहे त्या मुळे अंघोळीची सोय पण झाली आणि जेवण आणि ब्रेकफास्ट बंगलो मधून मिळेल.लाईट ची सोय आहे दिवा मी आणून देतो. सर्व सूचना देताना शिव ला जाणवत होते कि तो एकटा नाही आहे त्याचा सोबत अजून कोणी तरी आहे जे दिसत नाही आहे. शिव ने त्यांना काम समजावले तसे ते बाहेर गेले आणि बाहेरचे काम करू लागले. इकडे तो आणि अंगद मिल मध्ये फेरफटका मारू लागले.अंगद मशीन खुप जुन्या आहेत आणि ४-५ मशीन यातून किती माल निघणार, बॉस ला पण का सुरु करायचे आहे काय माहित? शिव म्हणाला. एवढा मोठा कारखाना आहे करोडो चे उत्पन्न आहे मग या छोट्या मिल मध्ये आहे काय? जे त्यांना सुरु करायची आहे? अंगद सोबत बोलत असताना शिवला कोणी तरी मागे असल्याचा भास होतो तो झटकन मागे वळून पाहतो तर मागे कोणी नसते. अंगद तुला पण जाणवले का कि आपल्या दोघांशिवा अजून कोणी आहे इकडे म्हणून शिव ने अंगद ला विचारले. त्यावर अंगद ने मानेने नकार दिला. ते दोघे परत बंगलो मध्ये आले. ब्रेकफास्ट करून सर्व मिल वर येतात. वाह्ह काय मिल आहे म्हणजे मोठी नाही पण छान आहे कीर्ती मिल पाहून म्हणते.अरे पण कीर्ती मिल खुप जुनी आहे मशीन पण जुन्या आहेत चालू होऊन १ महिना फक्त सुरु असतील अश्या आहेत आणि बॉस ला स्वतः चा एवढा मोठा कारभार असताना हि मिल का सुरु करायची आहे शिव ने विचारले. मानसी ने शिव ला दुजोरा दिला आणि म्हणाली या मिल मध्ये आहे काय एवढे जे बॉस ला सुरु करायचे आहे? गाईज हि मिल सुरु करायचे कारण म्हणजे लोकांना काम मिळेल इकडे हि मिल सुरु झाली आणि बंद झाली पण आता मी व्यवसाय करणार त्या आधी काही अनुभव असावा म्हणून बहुतेक बाबानी मला हि मिल सुरु करायला सांगिले असेल कारण छोटी मिल हाताळून मी मोठा व्यवसाय सांभाळू शकेन आणि इकडे जे लोक आहेत त्यांना पण हाताला काम आणि पैसे मिळतील. वाह्ह काय छान विचार आहेत अंगद च्या सासऱ्याचे निशी बोलतो आणि ते ऐकून अंगद त्याला मारायला धावतो. पळता पळता तो एका दरवाजा समोर थांबतो. दरवाजा बंद होता आणि त्याचे कुलूप पण गंजलेले दिसत होते. इतक्यात अंगद त्याचा मागे पळत असतो तो त्याला असा थांबलेला पाहून तो पण थांबतो. काय रे काय झाले, असे काय बघतो दरवाजा कडे अंगदने आपल्या श्वासावर नियंत्रण आणत निशी ला विचारले. अरे हि खोली मिलचा मागे आहे आणि दरवजा पण बंद आहे आणि टाळा पण गंजला आहे का आहे यात निशी ने शिव ला आवाज दिला तसे सर्व धावत आवाजाच्या दिशने आले. शिव या टाळायची चावी आहे का बघ जरा? निशी ने शिव आणि दरवाजा कडे पाहत म्हणाला. थांब बघतो म्ह्णून त्याने खिश्यातुन एक चावी चा जुडगा बाहेर काढला आणि त्यातली प्रत्येक चावी ते लावून पाहू लागले. पण कोणती चावी लागत नव्हती म्हणून मग कीर्ती ने टाळा तोडायला एक दगड घेऊन आली गाईज बाजूला व्हा, आणि तिने तो दगड टाळयावर मारला तसे टाळा तुटला आणि मानसी म्हणाली, वाह्ह शोभतेस बरं का अंगद ला तो पहेलवान आणि तू त्याची पहेलवान तसे कीर्तीने लाजून खाली पहिले. शिव ने दरवाजा ढकलण्याचा प्रयन्त केला पण जाम झाला होता तेव्हा अंगद ने दारावर जोरात लाथ मारून दार उघडले. वाह्ह काय जोडी है, एक टाळा तोडते तर दुसरा दरवजा भगवान ये जोडी हमेशा सलामत रहे निशी च्या या वाक्यावर सर्व दिल खुलासा हसतात.
दरवाजा उघडला तसे आतून तशीच गरम हवा आणि तसाच कुजका वास बाहेर येतो. आत मध्ये गुप्प अंधार असतो समोरच काही दिसत नसते.सर्व आपले मोबाईल मधील लाईट सुरु करतात तर तिकडे कोणता तरी विधी झाल्या प्रमाणे काही जळकी लाकडे पडलेली असतात आणि बरच सामान तसेच पडलेले होते. असा वाटत होते कि इकडे कोणी तरी होम केला आहे आणि सर्व सामुग्री इकडे टाकून ते दार बंद केले आहे मानसी म्हणाली. पण कशाला कोणी असे करेल म्हणजे होम केला तरी असे दार नंतर बंद का करेल?निशी म्हणाला. गाईज आपल्याला काय करायचे आहे वस्तू करून बंद केला असेल रूम शिव एक काम कर ते जे काम करत आहेत ना त्यांना मॅनेजर केबिन पेक्षा इकडे झोपायला सांग म्हणजे त्याची गैरसोय होणार नाही आणि तसे पण दिवे अंगद घेऊन येईल गावातून ते घेऊन येईल. सर्व बाहेर आले आणि शिव ने त्या दोघांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि तो पण बाहेर आला आणि म्हणाला चला गावात फेर फटका मारून येऊ, तसा पण मिल सुरु झाली कि आपल्यला गावात जावे लागेल मिल सुरु झाली हे सांगायला. एकदा का काम सुरु झाले कि मग मात्र वेळ कसा जाईल काही सांगू शकत नाही निशी म्हणाला. आता दुपार झाली आहे आपण जेऊन निघू अंगद ने सुचवले आणि सर्वानी ते मान्य केले. गावात फिरत असताना एक लहान मुलगा त्याचा जवळ आला आणि त्याने सांगितलं कि सरपंचानी तुम्हाला बोलावले आहे. आम्हाला आणि का?कीर्ती ने विचारले. ते काय माहित नाही पण मला म्हणाले ते पावणे दिसले तर माझ्या घरी घेऊन ये. चल तर पाहून बघू कशाला बोलावले आहे शिव म्हणाला आणि त्या मुलाच्या मागे ते चालू लागले. थोडे अंतर गेल्यानंतर तिकडे एक मोठे दुमजली घर होते. प्रशस्त असे आणि तिकडे बरीच माणसे बसून बोलत होती. कीर्ती आणि सर्व त्या मुलाच्या मागोमाग त्या घरात गेले. सरपंच ते मुंबई चे पाहुणे बोलून मुलगा पळून गेला. या बसा, एक भारदस्त आवाज आला, समोरचे सरपंच पण भारदस्त होते, सफेद केस, वय साधारण ६०-६५ च्या आसपास असेल, सफेद शर्ट आणि सफेद विजार, चेहरा अगदी गंभीर आणि त्यावर पिळदार मिश्या या वयात पण करसातीची आवड दिसत होती त्याचा घरात त्याचे अनेक फोटो होते ज्या मध्ये ते लंगोट आणि हातात गदा घेऊन होते म्हणजे ते तरुण पणी पहिलवान असावे असा सर्वानी अंदाज बांधला. मंडळी आपण उद्या बोलू आता मला जरा पाहुण्या सोबत एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे सरपंच बोले तसे तिकडे असलेले सर्व हळू हळू निघून गेले. नाव काय आपले सरपंच ने विचारले. मी कीर्ती आणि बाकी सर्वानी आपली ओळख करून दिली. अंगद कडे पाहून सरपंच म्हणाले वाह्ह पोरा शरीर तर भारी कमावले आहे. मी माझी ओळख करून देतो मी विलासराव सांगळे या गावचा सरपंच आणि तुम्हाला इकडे बोलावले आहे कारण तुम्ही जे ती मिल सुरु करायचा विचार करत आहात तो आधी मनातून काढून टाका कारण ती जागा चांगली नाही आहे तिकडे भयानक अवदसा आहे एकदा आम्ही तिला पहिले आहे आणि तिला बंद केले आहे आता परत तिला मोकळे करू नका सरपंच म्हणाले.पण आम्ही तर इकडे लोकांना काम भेटेल या हिशोबाने ती मिल सुरु करतोय कीर्ती म्हणाली. हे बघ मुली काही गोष्टी ह्या पैस्या पेक्षा मोठ्या नसतात त्या मुळे बंद करा. त्यावर वाद नको म्हणून अंगद ने ठीक आहे बोलून तिकडून सर्वानी काढता पाय घेतला. परमेश्वर याना ती बंद ठेवायची सुबुद्धी दे मनात सरपंच म्हणाले. अंगद का तू बोलू दिला नाही, इकडे मी गावचे भले कसे होईल लोकांना काम कसे भेटेल याचा विचार करते आहे आणि हे मला ती अवदसा आणि तिची गोष्ट सांगत आहे मी त्यांना गप्प केले असते पण बोल तू दिला नाहीस कीर्ती रागात म्हणाली. हे बघ पाहिले म्हणजे हे वेळ वाद घालायची नाही आणि दुसरे म्हणजे ते या गावचे सरपंच आहे त्या मुळे उद्या जर त्यांनी ठरवले तर ते आपल्याला गावात येऊ देणार नाही अंगद म्हणाला. का नाही येऊ देणार गाव चे काय राजा आहे तो? मानसी म्हणाली. हे बघ मानसी अंगद ने जे केले आणि जे बोलतो आहे ते एकदम बरोबर आहे कारण सरपंच हा गावचा राजा असतो आणि गाव त्याचा पुढे काही बोलणार नाही उलट तो जे सांगेल ते ऐकेल आणि पूर्ण गावासमोर आपण काही करू शकणार नाही त्या मुळे त्याने जे केले ते बरोबर आहे शिव म्हणाला. हा आणि एकदा का मिल सुरु झाली कि मग आपण त्यांना सांगू त्याची अवदसा आणि सर्व खोटे होते निशी म्हणाला तशी कीर्ती शांत झाली आणि अंगद ला सॉरी बोली. यार मला ना एक काम आठवले आहे तुम्ही एक काम करा अंगद आणि कीर्ती तुम्ही पुढे जा आम्ही जरा गावातून ते लाईट चे पाहून येतो निशी ने बाकीच्यांना डोळा मारत म्हणाला तसे बाकी दोघांनी पण निशी ला साथ देत त्याचा हो ला हो केले. आणि अंगद आणि कीर्ती दोघे गप्पा मारत माघारी आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे अंगद जॉगिंग करून येत होता तेव्हा त्याची नजर मिल च्या उघड्या गेट कडे गेली. त्याने विचार केला कामगार उठले असतील आणि बाकी राहिलेले काम करायला सुरुवात केली असेल, काल दोघांनी मिळून बाहेरच सर्व आवरून घेतले होते. त्याने आत डोकावून पाहायचे ठरवले, तो आत गेला तर आत मध्ये अंधार होता अजून पूर्ण उजाडले नव्हते. आत मध्ये जाऊन त्याने आवाज दिला पण काहीच उत्तर मिळाले नाही. त्याने मिल च्या मागे जायचे ठरवले. आवाज देत तो मिल च्या मागे जी त्यांना राहायला जागा करून दिली होती तिकडे पोहचला दरवाजा पुढे ढकलून पहिले तर दरवाजा उघडा होता. त्याने मोबाईल मधील लाईट लावली समोर जे त्याने पहिले त्याने त्याचा अंगावर काटा आला. समोर त्या दोघांचे प्रेत पडले होते , जमिनीवर रक्त होते ते पाहून त्याचे रक्त गोठले आणि तिकडे त्याला असे जाणवले कि कोणी तरी त्याच्या मागे अंधारात उभे राहून त्याचा कडे पाहत आहे तो तसाच स्वतः ला सावरत बंगलो च्या दिशेने पळाला आणि सर्वाना उठवून त्या दोन कामगाराचा खून झाला आहे ते सांगितले. त्याचा ह्या बोलण्यावर सर्वांची झोप उडाली. काय? काय बोलतोस ते समजत आहे ना तुला, हे बघ हि वेळ मस्करी करायची नाही शिव थोडा चिडून अंगद ला म्हणाला. अरे मी मस्करी नाही करत आहे तुम्हाला खरे वाटत नसेल तर चला माझ्या सोबत आणि पहा आपल्या डोळ्यांनी अंगद बोलतो आणि सर्व त्याचा सोबत बाहेर पडतात तेवढयात शेवंता येते आणि ते ती पण सोबत जाते. या माझ्या सोबत बोलून शिव मिल मध्ये प्रवेश करतो आणि लाईट लावतो,समोरची प्रेत पाहून मानसी उलटी करते. गाईज आपल्यला पोलिसाना कळवावे लागेल निशी म्हणतो. बरोबर आहे,पण हा खून कोणी आणि का केला यांची आणि आपली ओळख तर कालची आहे ते पण कामासाठी झाली होती. मग याना असे कोणी मारले असेल? कीर्ती च्या ह्या प्रश्नावर कोणाकडे उत्तर नव्हते.निशी पोलीस याना फोन करतो. साधारण अर्धातास मध्ये पोलीस आणि गावचे सरपंच घटना स्थळी दाखल होतात. घटना स्थळ आणि प्रेत यांची पाहणी करताना त्यांचा हे लक्षात येते कि दोन्ही प्रेतामधून हृदय गायब आहे. नमस्कार मी इन्स्पेक्टर राजे मला सांगा तुमचा पैकी पहिले प्रेत कोणी पहिले. अंगद पुढे येऊन सर्व सांगतो. बरं आणि हि मिल कोणाच्या मालकीची आहे त्यावर कीर्ती पुढे येते आणि सांगते आमच्या म्हणजे कीर्ती इंडस्ट्रीएस चे मालक गोरखनाथ यांची आहे. आणि तुम्ही कोण? राजे पुन्हा विचारतात. मी त्याची मुलगी कीर्ती.ह्या प्रेत आणि तुमचा काय संबंध ? राजे विचारात. त्यावर शिव सांगतो मिल ची सफाई साठी मी माझ्या मित्राच्या कंपनी मधून २ माणसे मागवली होती ते हेच आहेत. तुमच्या मित्राचे नाव, नंबर आणि पत्ता द्या राजे म्हणले.साहेब तरी मी याना बोलो होतो कि इकडे मिल सुरु करू नका पण यांनी माझे ऐकले नाही सरपंच म्हणाले. सरपंच तुम्ही शांत राहा आणि आम्हाला आमचे काम करू द्या राजे म्हणाले. दोन्ही प्रेत मधून हृदय गायब आहे राजे सर्वांकडे पाहत म्हणाले. रात्री तुम्ही सर्व कुठे होता? राजे विचारतात. आम्ही सर्व बंगलो मध्ये होतो जेऊन मग थोड्या गप्पा आणि मग ड्रिंक्स झाले मग आम्ही आपल्या खोलीत जाऊन झोपलो आणि आम्ही का मारू त्यांना आम्ही तर त्यांना नीट ओळखत पण नाही मानसी म्हणाली. मानसी मॅडम ते ओळख आणि बाकी सर्व नंतर पाहू आपण सध्या कारवाही पूर्ण होई पर्यंत तुमच्या पैकी कोणी हे गाव सोडून जात काम नये. शिंदे बॉडी पोस्ट मॉर्टेम ला घ्या आणि पंचनामा करून जागा सील करून टाका आदेश देऊन राजे निघाले. कीर्ती ने तिच्या वडिलांना म्हणजे गोरखनाथ ला कॉल केला. हॅलो, बाबा इकडे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि तिने सर्व हकीगत त्यांना सांगितली. त्यावर गोरखनाथ म्हणाले बेटा तू काळजी करू नकोस मी तुला तिकडून निघणायची व्यवस्था करतो नाव काय इन्स्पेक्टर चे राजे, ठीक आहे बघतो मी तू काळजी करू नको. इकडे गोरखनाथ ने कॉल ठेवला आणि तिकडे लगेच वरिष्ठ पोलीस अधिकारी ला कॉल केला. हॅलो मी गोरखनाथ बोलतो आहे कीर्ती इंडस्ट्रीएस मधून, हा सर बोला तुम्हाला कोण नाही ओळखत, आज आमची आठवण कशी आली, पलीकडून आवाज आला.हे पहा सावंत शिरोळे मध्ये माझी एक जागा आहे तिकडे एक जुनी मिल आहे तिथे एक खून झाला आहे आणि माझे काही कर्मचारी आणि माझी मुलगी तिकडे अडकले आहेत तिकडे कोणी राजे म्हणून आहेत त्यांनी त्याना ते गाव तपस सुरु असे पर्यंत सोडून जाऊ शकत नाही असे सांगितले आहे. तुम्ही काही तरी करा आणि त्यांना समजावा कोणी इन्स्पेक्टर राजे म्ह्णून आहे गोरखनाथ बोले तसा पलीकडून आवाज आला, साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका मी बघतो काही होते का? आणि कॉल कट होतो. हॅलो इन्स्पेक्टर राजे बोलतो आहे, हॅलो राजे मी सावंत बोलतो आहे, सर राजे कडक आवाजात बोलतो. राजे तिकडे एक खून झाला आहे त्या खूणा मध्ये कीर्ती इंडस्ट्रीएस चे काही कर्मचारी आणि त्याची मुलगी तिकडे आहेत. हो साहेब राजे ने सावंत याना उत्तर दिले. ती केस काय आहे? सावंत ने विचारले तसे संपूर्ण केस राजे यांनी समजून सांगितली. हे पहा राजे तिच्या वडिलांचा मला कॉल आला होता तिला जाऊ द्या म्ह्णून पण कायद्या ला कोणी मोठे नाही तुम्ही तुमचा तपास पूर्ण होई पर्यंत त्यांना जाऊ देऊ नका आणि दोषी असतील तर शासन करा आणि त्यात जर तुमच्यावर कोणी दबाव आणला तर मला कॉल करायला सांगा ठीक आहे सावंत म्हणाले तसे राजे थँक यू म्हणून कॉल ठेऊन दिला. इकडे कीर्ती ला कॉल करू गोरखनाथ ने आपण पोलीस यांचा शी बोलून तुला सोडायला सांगितले आहे असे सांगितले. त्यावर कीर्ती म्हणाली, नको बाबा आता पूर्ण तपास लागल्या शिवाय मी जाणार नाही कारण मला वाटत आहे हे काम गावातल्या कोणी तरी केले आहे तसे पण इकडे मिल सुरु करू देत नव्हते. आणि याचा तपास लागे पर्यंत मी कुठे जाणार नाही. तिचे कॉल वरचे बोलणे ऐकून शेवंता ने तिला किचन मध्ये बोलावले. काय झाले काकू आता तू का किचन मध्ये बोलवले आहे थोडे वैतागून कीर्ती म्हणाली. ताई साब हे पहिले प्रकरण नाही या आधी असे १० माणसे मारली गेली आहेत पण कोणी काही करू शकले नाही, सर्वाना माहित आहे हे काम त्या अवदसेचे आहे.त्या मुळे तुम्ही कोणी पण तिकडे परत फिरकू नका. कीर्ती फक्त तिच्याकडे पाहत होती आणि मनात विचार करत होती हे अवदसा आहे तरी कोण आणि ती ह्या सर्व हत्या का करते आहे?
त्या रात्री खबरदारी म्हणून सर्वानी दारे खिडक्या लावून घेतल्या होत्या, सर्वजण आपल्या रूम मध्ये शांत पाने झोपले होते. साधारण रात्री एक च्या सुमारास कसल्या तरी विचित्र आवाजानं शिव ची झोप मोड होते. शिव उठून बाथरूम ला जाऊन येतो तर त्याला पुन्हा तोच आवाज येतो तो आवाज कोणी तरी गेट वाजवत आहे असा होता म्ह्णून शिव खिडकीतून बाहेर पाहतो, मिल च्या गेट जवळ कोणी तरी उभे आहे असे शिव ला जाणवते पण अंधार असल्याने चेहरा नीट दिसत नाही. तो शेजारी झोपलेल्या निशी ला हलवतो आणि त्याला उठवतो. निशी, ये निशी बाहेर बघ ना मिल जवळ कोणी तरी आहे गेट वाजवत आहे निशी अरे उठ ना. काय रे शिव काय झाले कशाला उठवतो आहे झोपू दे ना निशी झोपेत बोलतो. अरे तिकडे गेट जवळ कोणी तरी आहे मला वाटत आहे खूनी किंवा कोणी चोर असेल बघ ना जरा शिव म्हणाला तसे निशी नाईलाजाने उठला आणि खिडकीतून बाहेर पहिले तर बाहेर कोणी नव्हते. काय शिव काय फालतूपणा आहे ? कोणी नाही आहे तिकडे झोप मोड केली माझी आता परत उठवू नकोस समजले ना नाही तर मी जीव घेईन तुझा झोप आता चिडून निशी बोला आणि झोपला. शिव ने पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पहिले पण बाहेर कोणी नव्हते मग तो पण झोपला.
दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स्पेक्टर राजे आणि एक लेडी हवालदार ला घेऊन बंगलो वर जातात, तिकडे सर्व नास्ता करत असतात. या साहेब समजले का खूनी कोण आणि कशा साठी खून झाला ते? निशी ने विचारले. त्यावर मानेने नकार देत राजे म्हणाले, खून कधी आणि कसा झाला हे समजले आहे आणि खूनी पण सापडेल लवकरच पण आता मी इकडे आलो आहे ते पोस्ट मॉर्टम रिपोर्ट घेऊन त्यात असे आहे कि खून हा एक ते अडीज या दरम्यान झाला आहे आणि त्याचा खून नख असलेल्या हत्याराने झाला आहे, भीती ने त्याचे डोळे सफेद झाले होते आणि त्यांचे हृदय गायब केले गेले होते. मला शंका आहे कि हा खून कोणी एकटा नाही तर गॅंग ने केला असेल. तुमचे मोबाईल लोकेशन रूम चे दाखवत असले तरी पण तुम्ही रूम मध्ये होतात याची मला खात्री नाही आहे.सध्या तरी तुमच्या बद्दल माझा कडे कोणता पुरावा नाही त्या मुळे खूनी सापडे पर्यंत तुम्ही संशयित आहात. या बंगलो च्या बाहेर जाण्याचा प्रयन्त करू नका कदाचित तुमच्या जीवाला पण धोका असू शकतो. रात्री दार खिडकी नीट लावा आणि झोपा आणि कोणासाठी रात्री दरवाजा उघडू नका येतो मी बोलून राजे निघाले.
शिट्ट यार काय करायला आलो आणि काय होऊन बसले निशी रागात टेबल वर मूठ आपटत म्हणाला. निशी शांत हो आपल्या जीवाला पण धोका आहे त्या मुळे आपण पण आपली काळजी घेतली पाहिजे मानसी म्हणाली. तो पूर्ण दिवस त्यांनी बंगलो मध्ये घालवला आणि रात्री थोडी ड्रिंक घेऊन ते झोपायला गेले.कालच्या रात्री सारखा आज पण गेट च्या आवाजाने शिव ला जाग येते तो घड्याळ पाहतो तर रात्रीचे ठीक एक वाजला होता. शिव हळूच खिडकीतून पाहतो तर कोणी तरी गेट जवळ उभे राहून त्यांच्या बंगलो कडे पाहत होते असे त्याला वाटत असते म्हणून तो निशी ला उठवणायचा प्रयन्त करतो, निशी ये निशी उठ ना ते बघ आज पण कोणी तरी आहे तिकडे निशी पण निशी उठत नाही नशेचा अमल आणि झोप त्या मुळे निशी उठत नाही. निशी अरे उठ ना तिकडे कोणी तरी आहे बघ तरी पण निशी हालत पण नाही शिव ला समजते कि दारू चा अमल आहे त्या मुळे तो उठू शकत नाही. बहुतेक मला जाऊन पाहायला हवे जर कोणी चोर असेल तर उद्या राजे ना सांगून तिकडे काही पोलीस बोलावून त्यांना अटक करता येईल शिव मनात विचार करतो आणि टॉर्च घेऊन निघतो. हॉल चा दरवाजा उघडतो तसे बाहेर रातकिड्या चा आवाज आणि त्यात कुत्रे भुंकत असतात. शिव बाहेर पडून बाहेरून दाराला कडी घालतो. थंडी आणि धुके या मध्ये शिव टॉर्च घेऊन त्या आकृतीच्या दिशने पुढे सरकत असतो. हळू हळू ती आकृती आत मध्ये जाते तसे शिव तिचा मागे आत जातो त्याला जवळ येताना पाहून ती आकृती पळू लागते तसे शिव तिच्या मागे कोण आहे थांब अरे थांब म्हणतो ना म्ह्णून पळू लागतो. ती आकृती त्या खोलीकडे जाते जिकडे आधी दोन खून झाले होते. आकृती खोलीत जाते आणि शिव तिच्या मागे त्या खोलीत जातो आणि एक आर्त किंकाळी गगन भेदून टाकते नंतर सर्वत्र पुन्हा शांतता पसरते.
सकाळी निशी ला जाग येते ते अंगद च्या उठवण्याने निशी, निशी उठ निशी अंगद आवाज देतो. तसे निशी झोपेतून खडबडून जागा होतो. निशी शिव कुठे आहे? अंगद विचारतो. शिव हा काय शेजारी म्हणून तो बाजूला पाहतो तर तिकडे शिव नसतो. बाथरूम मध्ये असेल निशी जाम्भळी देत म्हणतो. नाही, बाथरूम मध्ये पण नाही हॉल किचन कुठे नाही आहे आणि बाहेरून कडी आहे मेन दरवाजाला त्या मुळे तो आत नाही आहे अंगद म्हणाला. गेला असले येईल परत तू नको काळजी करू बोलून निशी बाथरूम मध्ये जातो आणि अंगद खाली जातो. तसे बाहेरून कडी खोलण्याचा आवाज येतो आणि अंगद दरवाजा जवळ येतो तर दारात शेवन्ता काकू असतात. काय झाले असे बाहेरून कडी का लावली आहे? काकू ने विचारले. माहित नाही, शिव आत नाही तो बाहेर गेला त्याने लावली असेल अंगद म्हणाला. एवढया सकाळी गेले कुठे? शेवंता काकू म्हणतात आणि तेवढद्यात मानसी आणि कीर्ती खाली येतात. काय झाले अंगद? कीर्ती ने विचारले. अगं शिव नाही आहे रूम मध्ये म्हणजे इकडे कुठे नाही आहे आणि बाहेरून कडी लावली होती ते काकू ने उघडली. तेवढयात निशी आला आणि म्हणाला असेल इकडे कुठे तरी कसला काळजी करत आहात. नाही असे नाही एकतर इकडे खून होत आहे आणि हा असा ना सांगता कसा गेला त्याला कॉल कर मानसी म्हणाली. काही उपयोग नाही मोबाईल रूम मध्ये आहे निशी म्हणाला. मग हा गेला कुठे? अंगद म्हणाला. एक काम करू आपण आसपास पाहू कुठे आहे का? कीर्ती म्हणाली तसे सर्व तयार झाले. बाहेर पडले तसे त्यांना गेट उघडा दिसला तो बंद करायला निशी पुढे गेला आणि त्याने बाकी सर्वाना आवाज दिला गाईज इकडे या तसे सर्व पळत तिकडे गेले. निशी ने बोटाने त्यांना मिल चा दरवाजा उघडा आहे ते दाखवले तसे सर्व आत पळाले. शिव ला आवाज देत ते आत मध्ये जातात. एक काम करा कीर्ती तू आणि निशी पुढे पहा मी आणि मानसी आम्ही मागे बघतो म्ह्णून अंगद आणि मानसी शिव ला आवाज देत मागे जातात. जो दरवाजा पोलीस यांनी बंद केला होता तो उघडा पाहून मानसी आत जाते. आत मध्ये अंधार असतो आणि पुढे सरकत असताना ती कसला तरी अडकून पडते तिच्या हाताला काही तरी ओले आणि चिकट लागते म्हणून ती मोबाईल टॉर्च मध्ये पाहते तर ते लाल रक्त असते ती घाबरून मोबाईल खाली टाकते तर त्या प्रकाशात तिला शिव चे प्रेत दिसते जे तिला पाहत असते.मानसी जोरात किंचाळते ते ऐकून बाकी सर्व धावत तिकडे येतात पाहतात तर मानसी बेशुद्ध पडली होती तिच्या कपड्यावर रक्त होते आणि शिव चे प्रेत तिकडे बाजूला पडले होते. खून त्याच प्रकारे झाला होता जसा पहिले झाले होते.अंगद राजे ना कॉल करतो आणि ते ताबडतोब घटनास्तळी दाखल होतात.
पंचनामा सुरु होतो आणि राजे याचे प्रश्न पण, प्रेत पहिले कोणी पहिले? आणि मानसी च्या कपड्यावर रक्त आले कुठून? त्यावर अंगद आणि निशी जे काही घडले होते ते सांगतात. तीन दिवसात तीन खून आणि तिघांची पण हृदय गायब संशय पूर्ण पणे त्या चौघांवर जातो कारण त्याचा शिवाय तिकडे कोणी नव्हते शेवंता ची पण चैकशी केली जाते पण तिचा कडून खून होईल असे वाटत नव्हते. हे खून झाले आणि याचे हृदय काढून नेले आहे म्हणजे हे सर्व खून पैसा या साठी झाले नाहीत तर यांचे उद्दिष्ट काही तरी वेगळे पण असू शकते म्हणजे जी मिल आणि तिची जागा पण मग एवढे वर्ष मिल बंद होती जर कोणाला हवी असती तर त्याने पहिलेच त्या मिल चा ताबा मिळवला असता पण तसे पण काही नव्हते. शेवंता च्या बोलण्या प्रमाणे हे सर्व अवदसेचे काम तर नसेल कारण इकडे या सर्व आणि मारणारे याशिवाय कोणाच्या बोटाचे ठसे पण नव्हते. पण खून करायचा उद्देश तरी काय? राजे यांच्या डोक्यात विचार सुरु होते.
बंगलो मध्ये सर्व काळजी मध्ये बसलेले असतात मानसी आणि कीर्ती ने रडून डोळे सुजलेले असतात. तेवढयात राजे येतात, मला सांगा तुम्ही मुलं एकत्र झोपला होतात. त्यावर निशी म्हणाला नाही साहेब मी आणि शिव एकत्र होतो आणि अंगद एकटा एका रूम मध्ये होता. काल रात्री काय झाले होते का? म्हणजे काही विचित्र असे राजे यांनी विचारले. काल च माहित नाही कारण मला ड्रिंक जास्त झाली होती आणि मी हॉल मध्ये झोपलो होतो मग मला कदाचित शिव ने बेडरूम मध्ये घेऊन गेला असेल, हा पण त्याचा आधल्या रात्री शिव ने मला एकच्या सुमारास उठवले होते आणि गेट जवळ कोणी आहे म्ह्णून बोलत होता पण मी पहिले तर तिकडे कोणी नव्हते निशी म्हणाला. याचा अर्थ शिव ने खूनी ला पहिले होते आणि काल पण तो खुनी आला होता आणि त्याला पुन्हा शिव ने पहिले होते. शिव ने त्याचा पाठलाग केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.ठीक आहे काही लागले तर कॉल करा आणि एकटे बाहेर पडू नका तसे मी २ पोलीस हवालदार पाठवून देईन पण तुम्ही तुमची काळजी घ्या बोलून राजे निघाले. तू आम्हाला का नाही सांगितले शिव ने जे तुला सांगितले ते मानसी ने रडत विचारले. मला पण नव्हते माहित कारण जेव्हा मी पहिले तेव्हा तिकडे कोणी नव्हते आणि मला वाटले दारू मुळे शिव ला तसे भास होत असतील म्हणून मी पण लक्ष नाही दिले. जे झाले ते झाले आपण आपला चांगला मित्र गमावला आहे, या पुढे कुठे एकटे जायचे नाही सर्व सोबत जाऊ निशी म्हणाला. बंगलो मध्ये बसून कंटाळा आला होता शिवाय शिव ची पण आठवण येत होती त्याचे ते प्रेत ते भीतीने उघडे डोळे सर्व डोळ्यासमोर येत होते. संध्याकाळी सर्व नदीवर गेले पण पहिल्या सारखी मस्ती न करता सर्व शांत बसून होते. हवालदार आले होते पण अचानक रात्री १० च्या सुमारास त्यांना भीती वाटू लागली. सारखी नजर त्या मिल कडे जात होती आणि गावात प्रसिद्ध असलेली अवदसेची कहाणी याने अजून त्यांना भीती वाटू लागली, त्यांनी घराची बेल वाजवली तसे अंगद ने दरवाजा उघडला. साहेब आम्हाला इकडे भीती वाटत आहे ती मिल चांगली नाही अशी गावात चर्चा आहे आणि म्हणून आम्हाला घरी जायचे आहे तर तुम्ही साहेबाना काही सांगू नका आम्ही सकाळी पुन्हा येऊ आणि हो बाहेर काही झाले तरी पडू नका. हवालदार म्हणाले आणि पळत तिकडून निघाले त्याचा कडे पाहत हसत अंगद ने दरवाजा बंद केला.
शिव चा खून झाल्या मुळे निशी ला एकटे राहायला भीती वाटत होती म्हणून तो अंगद च्या रूम मध्ये गेला होता. त्या रात्री गर्मी होत असल्याने मानसी ने खिडकी थोडी उघडी ठेवली होती. साधारण एक वाजता पुन्हा जोरात गेट वाजत होता आणि त्याचा आवाज मानसीच्या कानावर पडला तशी ती ताडकन उठून बसली आणि ती घाबरत घाबरत खिडकी जवळ आली. तिला मिल च्या गेट जवळ कोणी तरी उभे दिसत होते. तिने हळूच बाजूला झोपलेल्या कीर्ती ला हलवले तसे कीर्ती दचकून जागी झाली. कीर्ती बाहेर गेट जवळ कोणी तरी आहे आणि ते आपल्या कडे पाहत आहे मानसी घाबरत म्हणाली. काय? कसे शक्य आहे खाली तर पोलीस आहेत ना? कीर्ती ने विचारले. ते काही माहित नाही पण कोणी तरी आहे काळे कपडे घातले आहे कि अंधार जास्त आहे म्हणून वाटत आहे काहीच समजत नाही पण आहे कोणी तरी एवढे नक्की मानसी घाबरत म्हणाली.थांब मी पाहते म्ह्णून कीर्ती ने हळूच डोकावून पहिले तर तिकडे कोणी तरी उभे होते. चल माझ्या सोबत कीर्ती म्हणाली आणि तिने बॅग उघडली पण कुठे आणि आपण दोघी जायचे मानसी घाबरत म्हणाली. तू काळजी करू नको माझ्यावर विश्वास ठेव आणि चल कीर्ती म्हणाली तिला कीर्ती ने तिच्याकडचे रिव्हॉल्वर दाखवले. खाली उतरली मानसी तिच्या मागे मागे येत होती. कीर्ती ने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर पहिले तर बाहेर दोन्ही पोलीस नव्हते. याचा अर्थ एक तर त्यांना गायब केले असेल किंवा त्यांचा पण खून झाला असेल. कीर्ती हळू हळू पुढे चालू लागली आणि तिच्या मागे मानसी दबकत दबकत चालत होती. त्या दोघी रात्रीच्या अंधारातून हळू हळू पुढे सरकत होत्या, कुत्रे भुंकत होते आणि गेट चा आवाज अजून येत होता. त्या पुढे आल्या तसे कोणी तरी आत पळताना दिसले. त्या दोघी पण हळू हळू आत गेल्या आणि त्यांनी टॉर्च सुरु केली. आत ,मध्ये गेल्यावर कोणाचा तरी हसण्याचा आवाज आला. आता मात्र दोघी घाबरल्या का का का कोण आहे? मानसी ने घाबरत विचारले. तसे अगदी तिचा कानाजवळ कोणी तरी भसाड्या आवाजात म्हंटले मी आहे. मानसी ने दचकून मागे पहिले तर तिकडे कोणी नव्हते. मानसी का का काय झाले? कीर्ती ने विचारले. मला इकडे काही ठीक नाही वाटत चल आपण जाऊ बोलून मानसी ने कीर्तीचा हात पकडला आणि ती पळू लागली तशी एका मजबूत हाताने त्या दोघीना धक्का दिला आणि आत ढकलले. त्या दोघी पण जोरात आपटल्या आता त्याचा भोवती कोणी तरी घिरट्या घालत होते. अंधारात पण दिसत होते ते त्याचे लाल डोळे जे त्यांचा रोखाने पाहत होते.मानसी ने त्यावर टॉर्च मारली तसे त्याचा चेहरा स्पस्ट दिसला. केस मोकळे सोडले होते, लाल चमकणारे डोळे, सडलेला चेहरा आणि तोंडातून हातभार लांब बाहेर आलेली लाल जीभ जणू आताच कोणाचे रक्त पिली असेल, हाताची बोटे लांब होती त्यावर लांब नखे आणि त्यातून रक्त गळत असले पाहिजे,दात पण लाल होते आणि तिच्या हातात काही तरी होते जे ती तोडून खात होती ते साधारण हृदय सारखे काही तरी दिसत होते. काळे कपडे आणि पाय पण उलटे होते आणि ते जमिनीच्या वर तरंगत होते. ते रूप पाहून दोघी पण जोरात ओरडल्या आणि कीर्ती ने ती तिच्यावर लागोपाठ ५ गोळ्या झाडल्या आता दोघी उठून पळू लागल्या तसे कशात तरी पाय अडकून मानसी पडली आणि तिने तिच्यावर झडप घातली आणि तिला फरफटत मिल च्या मागे घेऊन जाऊ लागली. ती ओरडत होती कीर्ती कडे मदत मागत होती पण कीर्ती भीती ने पूर्ण गोठून गेली होती तिला काय करावे ते समजत नव्हते.कीर्ती तिला तिकडे सोडून पळत बाहेर आली आणि तिला मानसीची शेवटी किंकाळी ऐकू आली. कीर्ती रडत आणि पळत हॉल मध्ये आली आणि बेशुद्ध पडते.
क्रमश