कर्मचक्र |लेखक : कुमार तिसरा भाग........
सकाळी जेव्हा अंगद फिरायला जायला उठला तेव्हा त्याला कीर्ती दिसली आणि ती हॉल मध्ये बेशुद्ध अवस्थे मध्ये पडली होती. अंगद ने तिला उचलून सोफ्यावर झोपले आणि निशी ला आवाज दिला तसे निशी झोपतेतून खडबडून जागा झाला आणि खाली आला. काय रे काय झाले हिला? आणि हि अशी सोफ्यावर का झोपली आहे? निशी ने विचारले.माहित नाही पण झोपली नाही बेशुद्ध झाली आहे एक काम कर आतून पाणी घेऊन ये अंगद म्हणाला आणि निशी आत गेला आणि पाणी घेऊन आला. अंगद ने तिच्या चेहऱ्यावर पाणी मारले तसे तिला हळू हळू शुद्ध येऊ लागली. अंगद ने हळू हळू तिला आधार दिला आणि उठवले, तशी ती अंगद ला समोर पाहून त्याच गळ्यात पडून रडू लागली. निशी आणि अंगद दोघांना पण समजत नव्हते काय झाले आहे? अंगद ने तिला शांत केले आणि तिला विचारले काय झाले? तू इकडे कशी आणि मानसी कुठे आहे? तसे रडत रडत काल जे झाले आणि पहिले ते सर्व सांगितले. काय? अरे पण तू कशाला एकटी तिला घेऊन गेली शिट्ट यार आता मानसी पण वैतागलेल्या स्वरात अंगद बोला आणि त्याने आपली मूठ जोरात आपटली तशी कीर्ती अजून घाबरली आणि रडू लागली. निशी ने कीर्ती कडे पाहिले आणि अंगद ला म्हणाला अरे आता त्रागा करून काही उपयोग नाही जे झाले त्याचे दुःख मला पण आहे,माझे मानसी वर प्रेम होते जे मी तिला बोलू शकलो नाही आणि आता कधी सांगू शकणार नाही,मला माहित आहे जे झाले ते चांगले नाही पण आत ते बदलता येणार आहे का? आणि तिने प्रयन्त केला होता तिला वाचवण्याचा पण नाही जमलं कदाचित देवाच्या मनात नसेल बोलून निशी पण रडू लागला.अंगद ने दोघांना पण शांत केले आणि राजे याना कॉल करून बोलावले. राजे यांनी येऊन ती बॉडी हस्तगत केली हत्या त्या प्रकारे आणि त्या खोलीत झाली होती. तिचे पण हृदय गायब होते.पंचनामा करून बॉडी पोस्टमोर्टम ला पाठवली. अंगद मला सांग मी इकडे हवालदार उभे केले होते ते कुठे गेले? राजे यांनी विचारले. तसे अंगद ने त्यांना सांगितले कि त्या दोघांना भीती वाटत होती म्ह्णून ते दोघे दहा ला निघून गेले होते. ठीक आहे त्यांना पोलीस स्टेशन मध्ये पाहतो पण मॅडम तुम्हाला यावे लागेल चोकशी साठी राजे कीर्ती ला पाहून म्हणाले. पण मी काय केले आहे इकडे चौकशी करा ना? कीर्ती रडत म्हणाली. मॅडम माफ करा पण तुम्हाला स्टेशन ला यावे लागेल. कीर्ती ना इलाजाने त्याचा सोबत पोलीस स्टेशन ला गेली.
कीर्ती मला सांगा तुम्ही शिव आणि मानसी ला किती वर्ष झाले ओळखता? राजे यांनी विचारलं. साधारण मी फर्स्ट इयर ला होते तेव्हा पासून म्हणजे आज त्याला आठ वर्ष झाली असतील. मानसी आणि तुमच्या मध्ये काही वाद होते का? राजे यांनी पुन्हा विचारले. वाद, नाही अजिबात नाही ती तर माझी सर्वात चांगली मैत्रीण होती. मला सांगा तुम्ही हवेत जे राउंड फायर केले ते किती होते?राजे ने विचारले त्यावर कीर्ती वैतागून म्हणाली असतील चार पण त्याचा इकडे काय समंध?आहे म्हणून विचारलं कारण तुम्ही चार नाही पाच राऊड फायर केले होते,तुम्हाला माहित होते खाली कोणी पोलीस नाही आहे तुम्ही दार उघडले तेव्हा तुम्हाला समजले होते, तुम्ही एकट्या न जात तुमच्या सोबत तुमच्या मैत्रिणीला घेऊन गेलात तिकडे खतरा होता आणि ते तुम्हाला माहित होते तरी तुम्ही गेलात म्हणजे तुम्हाला माहित होते तिकडे काही होऊ शकते आणि मुद्दाम तुम्ही मानसीला घेऊन गेलात जेणे करून तिचा मृत्यू होईल आणि तुमचे जर काही जुने वैर असेल तर ते संपून जाईल आणि कदाचित तुम्ही पण सामील असला पाहिजे ह्या सर्व मध्ये असे माझे मत आहे राजे म्हणाले आणि कीर्ती जोरात ओरडली थांबा काही पण आरोप करू नका मी माझ्या मैत्रिणीला का मारेन. कारण तुम्ही सांगा? राजे म्हणाले आणि बाहेरून आवाज आला कारण मी सांगतो. आत मध्ये एक सूट घातलेला साधारण पंचावन्न वर्षाचे एक गृहस्थ आले होते त्याचा सोबत त्याचे दोन वकील होते. आवाज ऐकून राजे बाहेर आले. आपण कोण राजे यांनी विचारले. नमस्कार मी गोरखनाथ कीर्ती चा बाबा राजे यांनी त्याला पहिले आणि बसायला सांगितले. आपण स्वतः एवढया दूर आलात राजे मिश्किल पणे म्हणाले. हो काय करणार तुम्ही माझ्या मुलीला गेले चार तास पोलीस स्टेशन मध्ये ठेवले आहे मग मला मुंबई वरून यावे लागले गोरखनाथ म्हणाले. आता माझे वकील बोलतील गोरखनाथ यांनी आपल्या वकिलांकडे हात दाखवत म्हणले. राजे तुम्ही चौकशी कमी आणि आमच्या अशिलावर खूनी असल्याचा दबाव आणत आहेत आणि चौकशी करताना एक लेडी ऑफिसर असावी याचे तुम्हाला ज्ञान नाही वाटते कारण तिकडे कोणती लेडी ऑफिसर दिसत नाही. या साठी आम्ही तुम्हाला कोर्ट मध्ये घेऊ शकतो आणि चौकशी झाली असेल तर आम्ही आमचे अशील याना परत घेऊन जाऊ इच्छितो. त्यावर राजे काही न बोलता एका लेडी हवालदार ला कीर्ती ला बाहेर घेऊन येणास सांगितले. शेवटचे पुरावे असल्या शिवाय माझ्या मुलीला आत टाकू नको ती काय रस्त्यावर चालणारी सामान्य व्यक्ती नाही कीर्ती इंडस्ट्रीएस ची मालकीण आहे गोरखनाथ म्हणाले आणि कीर्ती ला घेऊन परत निघाले, गोरखनाथ साहेब एक मिनिट राजे म्हणाले, आज पुरावा नाही म्हणून नाही तर किती पण वकील घेऊन आलात तरी तिला घेऊन जाता येणार नाही कारण कायदा सर्वाना सारखा असतो मग ते कोणी असू द्या आणि अजून एक गोष्ट केस संपली नाही त्या मुळे ती गाव सोडून जाऊ शकत नाही.
कीर्ती सोबत ते गाडी मध्ये बसतात, हे बघ बेटा इकडे तू सुरक्षित नाही आहेस तू परत चल त्या राजे चे काय करायचे ते मी पाहतो. तू खून नाही केला माहित आहे मला आणि जर तू इकडे राहिली तर मी तुला पण गमावेन म्हणून सांगतो आहे चल सोबत समजत आहे ना मी काय बोलतो आहे ते? गोरखनाथ म्हणाला आणि कीर्ती ने पण शांत पणे ऐकून म्हणाली, बाबा त्या अवदसे ला मी पहिले आहे आपल्या डोळ्यांनी तिने माझ्या मित्राचा जीव घेतला तिला हरवल्याशिवाय मी या गावातून बाहेर जाणार नाही त्या साठी काही झाले तरी चालेल. तुला वेड लागले आहे का? हे दिसते तेवढे सरळ नाही आहे?ती माणूस नाही अवदसा आहे, तिच्या सोबत टक्कर आपण नाही देऊ शकत समजून घे बेटा समजावणीच्या सुरात गोरखनाथ म्हणले.बाबा हि जागा सुरक्षित नाही, मला बंगलो वर सोडा आणि तुम्ही घरी जा, माझी काळजी मी घेईन कीर्ती च्या चेहऱ्यावर कोणते भाव नव्हते. तुम्हाला कोणी सांगितले कि मला पोलीस स्टेशन ला घेऊन गेले आहेत कीर्ती ने विचारले. मला अंगद चा कॉल आला आणि मी ताबडतोब निघालो आणि त्याने मला हे पण सांगितले कि तुम्ही तिला घेऊन जा इकडे मी बाकी सर्व बघतो गोरखनाथ म्हणाले. बाबा तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही इकडे थांबू नका मी अंगद सोबत याच्या मुळाशी जाते तुम्ही काळजी घ्या. गाडी बंगलो जवळ अजून थांबते आणि कीर्ती उतरते. बेटा अजून बघ विचार कर चल परत मुंबई ला गोरखनाथ म्हणतात त्या वर कीर्ती फक्त बाय बाबा काळजी घ्या बोलून बंगलो कडे चालू लागते. तिला गेट कडे जाताना पाहून गोरखनाथ गाडी सुरु करायला सांगतो.
कीर्ती ला गेट मधून येताना अंगद पाहतो आणि तिला धावत जाऊन बिलगतो, कीर्ती त्याला कसलाच प्रतिसाद देत नाही ते पाहून तो बाजूला होतो आणि तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. कीर्ती तू ठीक आहेस ना?अंगद तिला पाहून विचारतो. हो मी ठीक आहे पण हे बोलताना कीर्ती च्या चेहऱ्यावर कोणते भाव नव्हते. आत जाऊन ती शेवन्ता ला आवाज देते तशी शेवंता बाहेर येते. काय झाले ताई साहेब? शेवंता घाबरत विचारते. मला त्या अवदसे बद्दल सर्व ऐक्यचे आहे सर्व म्हणजे सर्व ती कधी आली तेव्हा पासून तिला कसे रोखले तुला माहित असलेले सर्व मला जाणून घायचे आहे कीर्ती म्हणाली तसे निशी आणि अंगद यांची आश्चर्याने भरलेली नजर तिच्यावर पडली. सांगते ताईसाहेब सर्व सांगते जे मला माहित आहे ते सर्व सांगते तुम्हाला बोलून शेवंता बोलू लागली.
साधारण २० वर्ष झाली असतील त्या गोष्टीला गावात एक माणूस आला रामनाथ नाव त्याचे त्याला गावात एक कपड्यची मिल सुरु करायची होती, गावाने त्याला हि माळावरची जमीन दिली कारण त्याने गावाला वचन दिले होते कि मिल साठी लागणार कच्चा माल तो गावातून घेणार आणि गावात जे तरुण आहेत त्यांना मिल वर कामाला ठेवणार जेणे करून गावात राहणार तरुण नोकरी साठी बाहेर जात काम नये आणि जे शेतकरी आहेत त्यांना पण गावात आपला काही माल विकत येईल आणि त्या साठी योग्य तो मोबदला ते देणार होते. गिरणी आणि बंगलो याचे बांधकाम एकत्र सुरु झाले होते एकदा एक मजूर काम करताना पडला तर त्याला स्वतः च्या मोटारीने त्यानी डॉक्टर कडे नेला आणि त्याचा सर्व खर्च पण केला शिवाय तो कामाला नव्हता पण त्याचा रोज त्याला त्याची घरी जात होता असा देव माणूस होता. गावकरी तर त्याला देव म्हणून पूजा करायचे. मिल सुरु झाली गावात लोकांना काम मिळाले हा तोच बंगलो आहे ज्याला बांधायला मी पण आले होते. पण नियतीला काही तरी वेगळे मंजूर होते गिरणी सुरु झाली आणि साधारण १५ दिवसात त्या देव माणसाच्या पत्नीचा अपघातमध्ये मृत्यू झाला पण नशीब बलवत्तर म्हणून त्याची ५ वर्षाची मुलगी वाचली. निराश आणि हताश झाले होते असेच एक महिना गेला आणि त्याच्या वर पण हल्ला झाला असाच रात्री आणि त्याचे प्रेत पण तिकडे सापडले तसेच जसे आता सापडत आहे.पोलीस याना पण काहीच सुगावा लागला नाही . त्या नंतर मिल जास्तीत जास्त तीन महिने सुरु राहिली पण त्या तीन महिन्यात असे दहा प्रेत मिळाले. त्या नंतर सर्वानी इकडे येणे बंद केले लोक भीतीने कामावर येत नव्हते. कारभार रामनाथ यांचा भाऊ याने हातात घेतला होता पण त्याने हत्या सुरु झाल्यावर मिल बंद केली. त्या अवदसेला बाहेर येत येऊ नये म्ह्णून गावकर्यांनी गावातला पुजारी आहे त्याला घेऊन मंत्राने पवित्र केलेला धागा बांधून तिला आत बंद केले नाही तर आज तिने गाव गिळून टाकला असता.तरी भितीनी ने लोकांनी गाव सोडला.त्या अवदसेला ज्याने पहिले तो मेला फक्त एक जिवंत वाचला तो म्हणजे माझा मुलगा तो वेडा झाला आहे त्याने तिला समोरून पहिले आहे आणि वाचला हाये पण तो वेडा झाला आहे. अंगद च्या नजरेसमोर तो गावात फिरणारा वेडा आला. एकमेव नाही मी पण तिला पहिले आहे, पण तिला आणले कोणी आणि का? आणि जर सुरुवात आहे तर शेवट पण असणार तिचा कीर्ती म्हणाली. तिचा अंत आता आपल्याला शोधावा लागणार आहे आणि तो आपण शोधू बोलून कीर्ती वरती गेली. सर्व कीर्ती असे बोलून कुठे गेली याचा विचार करत होते तेवढया कीर्ती कपडे बदलून खाली आली. मी त्या अवदसेचा अंत करणार ज्यांनी माझ्या मित्रांना ना माझा पासून हिरावून घेतले जिच्या मुळे आज मला आणि माझ्या बाबा ना त्रास झाला तिला मी संपवणार आणि जर कोणाला साथ देण्याची असेल तर त्याने घरी जावे मी काही बोलणार नाही. एकदा का माझ्या सोबत आला तर जीवन किंवा मरण काही होऊ शकते कीर्ती म्हणाली. तसे अंगद ने तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला आता काही झाले तरी तुझी साथ नाही सोडणार. माझे पण प्रेम त्या अवदसे ने हिरावून घेतले मानसीचा बदला मी घेणार. ताई साहेब मी पण आहे तुमचा सोबत माझा पोरगा पण तिने वेडा केला तुम्ही सांगा काय करायचे शेवंता म्हणाली. आता आपण त्या पुजारी कडे जाऊ ज्यांनी तिला कैद केले होते. सर्व बाहेर पडतात आणि गावाच्या वाटेल लागतात.
गावात महादेवाचं खुप जुने मंदिर होते, त्या मंदिराच्या शेजारी त्या पुजारी चे घर होते. शेवंता दरवाजा वाजवते तसे एक आतून एक कापरा आवाज येतो कोण आहे?, मी शेवन्ता पुजारी बाबा दार उघडा शेवंता बोलते आणि साधारण ५ सेक मध्ये दरवाजा उघडला जातो. घरात एक वृद्ध साधारण ७५-८० वय असलेले आजोबा असतात त्यांना नीट दिसत पण नसते आणि चालता पण येत नसते कुबडीच्या साहाय्याने ते चालत असतात. पुजारी बाबा हि कीर्ती आहे यांनी ती मिल उघडली आहे शेवंता च्या त्या वाक्यावर पुजारी एकदम गंभीर होतात आणि त्याचा चेहऱ्यावर भीतीची छाया दिसू लागते. पुजारी बाबा ना अजून तिकडे काय झाले ते सर्व शेवंता सांगते. शेवंता तुला माहित आहे ना ती मिल किती भयानक आहे? मग तू का नाही अडवले याना? पुजारी कापऱ्या आवाजात बोलतात. पुजारी बाबा माफ करा त्यांनी सांगितले होते पण आम्ही त्यांचे ऐकले नाही आम्हाला वाटले तसले काही नसेल तिकडे म्ह्णून मग आम्ही उघडली कीर्ती म्हणाली. तुमच्या तरुण आणि शहराकडे राहणाऱ्या मुलाचे हेच समजत नाही मला म्हणजे एखादी गोष्ट नको सांगितलं तर तुम्ही ती जास्त करता. आता काय हवं आहे तुम्हाला इकडे? पुजारी रागात म्हणाले आणि त्यांना खोकल्याची उबळ आली तसे अंगद ने त्यांना पाणी दिले. मला माहित आहे आम्ही मूर्ख पणा केला आहे पण आता यातून बाहेर कसे पडायचे कारण आम्हाला तिला कायमचे संपवायचे आहे आणि तिने आमच्या मित्रांचा खून केला आहे निशी रागात म्हणाला. पुजारी बाबा मदती साठी तुमचा कडे आले आहेत काही तरी उपाय सांगा शेवंता म्हणाली. उपाय सांगू , काय उपाय सांगू म्ह्णून पुजारी हसतात.तिचा बंदोबस्त करणे माझ्या हातात नाही असते तर मी तिला बंद केले नसते तेव्हाच तिचा नाश केला असता आणि आता तिला बंद करणे माझ्या हातात नाही कारण मी आता तरुण नाही आणि माझी प्रकृती माझी साथ देत नाही. तिला मारणारे कोणी तरी असेल ना या जगात कारण तिला कोणी तरी घेऊन आले आहे म्हणजे ती कोणाचे तरी आदेश मानते आहे कीर्ती चिंते च्या स्वरात म्हणाली. हे बघ मुली या अवदसा म्हणजे डाकिनी असतात त्यांना कोणी तरी घेऊन येते ज्याचा नाश करायचा असतो त्याचा जवळ सोडते पण त्या बदल्यात ती काही तरी अटी ठेवते आणि त्या पूर्ण झाल्याशिवाय ती स्वतः कधी जात नाही आता हिच्या अटी काय आहेत हे ज्याने आणली आहे त्याला माहित आहे आणि तिला हरवणे शक्य नाही पुजारी म्हणतात. पण पुजारी बाबा असे कोणी तरी असेल या पृथीवर जो तिचा सामना करेल. तो कुठे हि असला तरी मी त्याला शोधून घेऊन येईन कीर्ती म्हणाली. थोडा विचार करून पुजारी म्हणतात अश्या विद्या चे नाश फक्त एकच माणूस करू शकतो तो म्हणजे भैरव. भैरव हा कोण आहे पुजारी काका निशी ने विचारले. भैरव हा सामान्य पुरुष नाही तो अघोरी आहे तो एका जागी कधीच थांबत नाही त्याला स्वयंम महादेव प्रसन्न आहेत आणि सिद्धी प्राप्त करून तो अश्या विद्या सोबत लढतो तोच या अवदसेचा नाश करू शकतो तो सर्व जाणतो भूत भविष्य वर्तमान सर्वांचे त्याला ज्ञान आहे पुजारी आनंदाने म्हणले.पण पुजारी बाबा हे भैरव आम्हाला सापडणार कुठे आणि ते आमचे काम करतील अंगद ने विचारले. त्यावर हसून पुजारी म्हणाले, पोरा भैरव आपल्या मर्जीने काम करतो तो एका जागेवर कधीच राहत नाही, पण तो दर अमावसेला गावाबाहेर जे पडके शिव मंदिर आहे तिकडे पूजा करायला येतो आणि जर पूजा करून झाल्यावर जर कोणी त्या मंदिरात महादेव समोर त्याचा कडे मदत मागितली तर तो नाही म्हणत नाही. अजून दोन दिवसानी अमावस्या आहे तिकडे जे मंदिर आहे त्याचा रस्ता जंगल मधून जातो आणि तिकडे लांडगे पण आहेत त्या मुळे सावधान आणि हो त्या अवदसे पासून वाचण्यासाठी मी काही तरी तुम्हाला देतो म्हणून पुजारी उठले आणि आपल्या घरातील छोट्या मंदिरात काही काळे दोरे ठेवले होते ते चौघांच्या मनगटावर बांधले. हे दोरे महादेवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे याना काढू नका साधारण तीन दिवस हे तुमचे रक्षण करतील पण एक लक्षात ठेवा हे काढू नका. पुजारी बाबा मला एक विचारायचे? होते कीर्ती म्हणाली. ती अवदसा गावात किंवा बंगलो मध्ये का येत नाही? त्यावर पुजारी हसले आणि म्हणाले बेटा गावात येण्यासाठी तिला हे महादेवाचे मंदिर पार करावे लागेल जे तिला शक्य नाही आणि बंगलो मध्ये येत नाही असे नाही तिने प्रयन्त केला असेल पण तिला ते जमले नाही कारण दारावर एक नारळ आणि सिद्ध यंत्र आहे त्याने ती आत येऊ शकली नाही म्हणून ती गेट वाजून तुम्हाला आकर्षित करत राहिली आणि शिकार करत राहिली. सर्वानी पुजारी बाबाच्या पाय पडले आणि निघाले.
शेवंता आपले काम आटपून निघत होती, तेवढयात कीर्ती ने तिला आवाज दिला आणि तिच्या हातावर काही पैसे ठेवले. अहो ताई साहेब हे काय करतंय पैसे कसला. त्यावर कीर्ती हसून म्हणाली राहू दे तू आज आमची एवढी मदत केली म्ह्णून तुला ठेव. पैसे नको ताई साहेब आणि मदत म्हणाल तर माझा पण स्वार्थ आहे कि त्यात माझ्या पोराला जिने वेडे केले तिच्यावर सुड घेण्याची संधी मिळाली आहे, तुम्ही काय पण काळजी करू नका मी आहे तुमचा सोबत मी दाखवेन तुम्हाला पोचवेन त्या मंदिरा जवळ बोलून शेवन्ता निघते. त्या रात्री तिघांना पण झोप आली नाही,ते तिघे पण हॉल मध्ये बसले होते. आपण आलो कशासाठी आणि काय होऊन बसले होते. सर्व जुन्या आठवणी त्या तिघांच्या डोळ्यासमोर येत असतात आणि अचानक एक च्या सुमारास हा आवाज तसाच होता जसा शिव आणि मानसी ने ऐकला होता.सर्व जण दरवाजा च्या दिशने धावतात आणि दरवाजा उघडता आणि पाहतात कि तीच काली आकृती त्याचा समोर उभी राहून त्याचा कडे पाहून हसत होती. आता मात्र कीर्ती चा राग अनावर झाला आणि ती बाहेर पडू लागली तसे अंगद ने तिला पकडले आणि पुन्हा घरात घेऊन आला. कीर्ती ओरडत होती मला जाऊ दे मी तिला नाही सोडणार तिने माझे मित्र माझ्या पासून हिरावून घेतले आहेत मला जाऊ दे कीर्ती रागात ओरडत होती. अंगद ने तिला मिठी मारली आणि तिला शांत केले आणि म्हणाला, कीर्ती हे ती वेळ नाही आपण तिचा मुकाबला करू शकत नाही तिला पण हेच पाहिजे कि तू रागात तिकडे जावे म्हणजे ती तुला पण शिव आणि मानसी सारखी मारून टाकेल, तिच्या समोर तुझा निभाव लागणार नाही ऐक माझे, आपण तिला मात देणारा भैरव ला घेऊन येणार आहे फक्त दोन दिवस थांब मला पण राग येतो आहे पण मला माहित आहे मी तिचे काही वाकडे करू शकनार नाही थांब आपण करू तिचा बंदोबस्त अंगद म्हणाला आणि रडू लागला त्याला पाहून कीर्ती पण रडू लागली त्या दोघाना पण निशी ने मिठी मारली.पुढचे दोन दिवस उदास गेले जेवणात कोणाचे मन लागत नव्हते, त्या वेळी गोरखनाथ यांनी पण कीर्तीला कॉल करून परत येणास सांगितले पण कीर्ती ने त्याला नकार दिला होता. पोलिसानी आपला तपास सुरु ठेवला होता पण त्याचा हाताला काही लागत नव्हते. दोन रात्री ती अवदसा येऊन गेट वाजून त्यांना पाहून हसून जायची त्याचा कडे इलाज नव्हता म्हणून ते गप्प होते. शेवटी तो दिवस आला जेव्हा ते पहिल्यांदा भैरव ला भेटणार होते. ताई साहेब आपण एक काम करू आपण चार ला निघू म्हणजे उजेड असताना तिकडे पोहचू आणि जनावराची भीती अंधारात जास्त असते शेवंता म्हणाली. तसे सर्व गाडी ने जंगल जवळ पोचले तिकडे त्याना साधारण त्यांना पाच वाजले होते अजून आत मध्ये साधारण आठ किलोमीटर जायचे होते. रस्ता सरळ नव्हता झाडी तुन वाट होती मधेच कुठे तरी पक्षाचा विचित्र आवाज कानावर पडत होता. साधारण साडेसात च्या आसपास ते मंदिर च्या जवळ आले तिकडे दोन मंदिरे होती एक होते शिवाचे आणि दुसरे मारुतीचे दोन्ही मंदिरे बाजूला होती. बाहेर गुप्प अंधार होता मधेच कोणते तरी जनावर आवाज करत होते वातावरण गूढ झाले होते. शेवंता, निशी आणि कीर्ती झोपले होते अंगद एकटा जागा होता. साधारण मध्य रात्री जेव्हा अमावस्या सुरु झाली शिव मंदिरातून कोणाचे तरी स्वर कानावर पडले तसे अंगद ने सर्वाना उठवले. सर्व सावध होते. पूजा संपन्न झाली आणि शेवट चा हर हर महादेव चा जयघोष कानावर आला तसे ते सर्व हळू हळू शिव मंदिरात प्रवेश करता झाले. मशालीच्या उजेड पसरला होता, समोर त्याचा कडे पाठ करून एक जटा धारी अंगावर वाघाचे चर्म परिधान केलेला हातात त्रिशुळ असलेला आणि दुसऱ्या हातात थाळी होती ज्यात भस्म होते. काय हवे आहे तुम्हाला? त्यांचा कडे न पाहता एका भारदस्त आवाजात भैरव ने विचारले. महाराज एक अडचण आहे त्याचे निवारण करायचे होते कीर्ती घाबरत म्हणाली. तुम्हाला कोणी सांगिले मी तुमच्या अडचणी चे निवारण करेन भैरव ने विचारले. महाराज ते शिरोळे गाव चे पुजारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितले निशी बोला तसे भैरव ने पलटून त्याचा कडे पहिले. त्याचे ते रूप पाहून कीर्ती घाबरून दोन पावले मागे सरकली. चेहरा आणि शरीर पूर्ण भस्माने रंगले होते.कपाळावर कुंकवाचा मळवट भरला होता आणि मध्ये एक हळदीचा गोल होता. डोळे आग ओकत होते एवढे लाल होते.दाढी आणि मिशी भरदार होती. हर हर महादेव चा जयघोष करून ते कीर्ती जवळ आले आणि म्हणाले जाणले मी तुम्ही का आला आहात. कीर्ती पुन्हा घाबरून मागे सरकली. त्यानी तिच्या कपाळावर भस्म लावले. तुमचे दोन मित्र आणि त्या आधी दोन माणसे मारली गेली आहेत ना? बोलताना त्यांनी अंगद च्या कपाळावर पण भस्म लावले आणि त्या आधी दोन माणसे आता ते शेवन्ता कडे गेले आणि म्हणले तुझा मुलगा वेडा झाला आहे तिच्या मुळे, शेवंताने त्याचे पाय धरले आणि म्हणाली महाराज काही तरी करा पण तिला शिक्षा करा. आता ते निशी समोर उभे राहिले आणि म्हणले काही माणसे हि आपल्याला जवळची वाटतात पण ती नसतात काही माणसे पाठी मध्ये खंजीर खुपसतात. ते पुन्हा कीर्ती जवळ आले आणि म्हणाले बेटा तुझ्यावर जो खूनाचा आरोप आहे तो खोटा आहे.त्या पुजारी ने तुम्हाला सांगितले कि माझ्याकडे या मी पूजा करताना मी कोणाला नाही म्हणत नाही पण त्याने हे नाही सांगितलं कि मी काही लपवत पण नाही. म्हणजे काही समजले नाही महाराज अंगद ने विचारले. त्या पुजारी ने ती अवदसा तिकडे पाठवली आहे भैरव चे हे वाक्य ऐकून सर्वाना आश्चर्यचा धक्का बसला. भैरव कधी खोटे बोलत नाही, जाऊन त्या पुजारी ला विचारा त्याने कोणाच्या सांगण्यावरून त्या अवदसा तिकडे पाठवले आहे आणि त्याने निशी कडे एक कटाक्ष टाकला.मी उद्या रात्री तिकडे येईन एक अनुष्ठान करायला तेव्हा तिकडे पोलीस इन्स्पेक्टर राजे याना पण बोलून घ्या त्यांना पण समजू द्या कशी असते अवदसा त्याने त्या दोन हवालदाराना नोकरी वरून काढायला लावले होते कारण ते रात्री थांबले नाही. अंगद च्या लक्षात आले महाराज कशाबद्दल बोलत आहेत. तुम्हा सर्वाना मी उद्या अकरा वाजता त्या गेट जवळ भेटेन तेव्हा तयार राहा आणि हो तू तुझ्या आयुष्यात अत्यंत जवळ आणि विश्वासू माणूस गमावणार आहे ज्याचा ज्याच्यावर तुझे प्रेम आहे पण त्याचे तुझा संपत्तीवर हर हर महादेव बोलून भैरव तिकडून निघून जातो. त्याचा पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत कीर्ती विचार करत बसते.सकाळ पर्यंत ते तिकडे थांबतात आणि मग ते पुजारी चे घर गाठतात.
पुजारी बाहेर बसलेले असतात, कीर्ती आणि सर्वाना पाहून ते आंनदाने उठतात आणि त्यांना हसून विचारतात झाले का काम पोरांनो मिळाला का भैरव? त्यावर अंगद म्हणतो बाबा थोडे बोलायचे होते आत जाऊया का? आणि सर्व आत जातात. बाबा तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगिले कि त्या अवदसेला तिकडे तुम्ही घेऊन आलात म्ह्णून आम्हाला भैरव ने सर्व सांगिले आहे पण तेच आता तुमचा तोंडून ऐकायचे आहे कीर्ती रागात म्हणाली. त्यावर पुजारी रडत म्हणाले माफ कर मला पोरी मला सांगण्याची हिम्मत नाही झाली बघ आणि मला माहित होते भैरव तुम्हाला सर्व सांगणार आणि तुम्ही परत येणार माझ्याकडे मी सर्व सांगतो पहिल्या पासून बसा इकडे पुजारी म्हणले.
रामनाथ नाव सारखा राम होता,या भागात दुष्काळ होता आणि कपाशीला भाव पण मिळत नव्हता. एकदा एका कार्यक्रमात आमचे सरपंच यांनी त्यांना अडचण बोलून दाखवली आधीच श्रीमंत आणि त्यात समाजसेवक त्यांनी सरपंचांना शब्द दिला कि ते गावासाठी काही तरी करतील. ते गावात आले त्यानी इकडे सारे पहिले आणि त्यांनी एक कापडाची मिल बनवायचे ठरवले त्या साठी गावकऱयांनी त्याना माळावर जमीन पण दिली त्याची पत्नी आणि पाच वर्षाची मुलगी पण आले होते.मिल सुरु झाली गावातले कामगार आणि कच्चा माल घेऊन त्यांनी गावात लोकांना पैसे दिले रोजगार दिले, राहायला तिकडे एक घर बांधले जेणे करून हाताला काम मिळेल. त्यांचे नाव आणि वाढत असलेला व्यापार पाहून त्यांचा भावाच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्याने एक षडयंत्र रचले त्यात त्याने मला आणि गावातली दोन तीन माणसे घेतली. पैसेचे आमिष दाखून रामनाथ आणि त्याचे कुटुंब याचा खून करायचा ठरवलं पण तो खून न वाटता अपघात आहे असे वाटले पाहिजे म्हणून एकदा गाडी ने जाताना त्याने त्याचा अपघात घडवला पण त्यात त्याची पत्नी गेली पण रामनाथ आणि त्याची मुलगी वाचली. साधारण दोन महिने गेले रामनाथ आणि त्याची मुलगी एकत्र राहू लागले पण त्याचा भावाला ते मान्य झाले नाही आणि त्याने मला काळ्या शक्तीचा वापर करायला सांगितलं मी पुजारी आहे पण मला काली विद्या पण येते हे त्याला माहित होते. त्याने मला पैसे दुपटी ने दिले आणि त्या पैसे पायी मी आंधळा झालो. त्या दिवशी रात्री साधारण दीड च्या सुमारास मी आणि त्याने एक अनुष्ठान केले मिल च्या मागचा खोलीत आणि एका अवदसा बोलावली आणि तिला रामनाथ च्या मार्गावर सोडले पण तिने एक अट ठेवली. जर तिने पहिला खून केला तर ती अजून सोळा खून करेल आणि जो सोळावा खून करेल त्याचा शरीराचा ताबा घेईल. मी मजुरी दिली पण मला माहित होते अवदसा आपला शब्द कधी पण फिरवू शकते म्हणून मी तिच्या नकळत तिचा शरीरावरचा कपड्याचा एक तुकडा कापून घेतला आणि त्या अनुष्ठान च्या ठिकाणी गाडून टाकला. ज्या रात्री रामनाथ चा खून झाला तेव्हा पण तिने गेट वाजवून त्यांना बोलावले होते आणि त्याचे हृदय खाले होते जेणे करून तिला शक्ती मिळते आणि त्यांचा खून तिकडे झाला जिकडे अनुष्ठान केले होते. मला फक्त नाव सांगा जायचा मुळे मी माझे मित्र गमावले आणि अजून तो जीवनात आहे का? कीर्ती रागात म्हणाली. कीर्ती रडत होती आणि तिने धागा तोडून टाकला. आहे तो जिवंत आहे आणि आता खुप श्रीमंत झाला आहे बोलून पुजारी ला ठसका लागला. त्याचे नाव खोकत बोलते होते पण समजत नव्हते निशी ने पाणी दिले थोडे पाणी पिऊन पुजारी वारले.बाबा, बाबा अंगद ने त्यांना हलवले पण काहीच उत्तर नाही आले. शिट्ट, डॉक्टर ला बोलावले पण तो पर्यंत उशीर झाला होता डॉक्टर ने त्यांना मृत घोषित केले. यार हा पण दरवाजा बंद झाला निशी म्हणाला. हरकत नाही भैरव आहे ना तो सांगेल नाव आपल्याला बोलून त्यांनी राजे याना कॉल केला आणि पुजारी कडे बोलावले. राजे याना सर्व सांगून बॉडी ताब्यात दिली आणि रात्री ठीक अकरा वाजत यायला सांगितलं.
क्रमश