कर्मचक्र | लेखक : कुमार - चौथा भाग शेवट ........
रात्री पावणे अकरा वाजता राजे आले, काय मॅडम कोणत्या बाबा च्या नादी लागत आहात तुम्हला काय माहित हे बाबा बुआ सर्व फसवे असतात गेले ते दिवस जेव्हा स्वामी आणि साईबाबा सारखे माणसे होते आता आहेत ते फक्त पैसे कमवण्यासाठी राजे म्हणाले आणि जोरात हर हर महादेव चा जय घोष ऐकू आला. तसे सर्व बाहेर आले गेट जवळ भैरव उभा होता त्याचा खांद्यावर एक छोटी पिशवी होती. राजे मनात विचार करू लागले हा माणूस निर्दोष सिद्ध करणार आहे पण कसा? बेटा त्याची काळजी तू करू नको आणि या जगात अजून अवतारी पुरुष आहेत मी स्वामी किंवा साईबाबा एवढा मोठा नाही पण मी अनेक सामान्य पुरुष पण नाही भैरव म्हणाला. अरे हे तर मी आत बोलो होतो आणि ते पण आता आधी म्हणजे तेव्हा हे आले पण नव्हते मग याना कसे समजले राजे विचार करत असताना भैरव पुन्हा म्हणाला एवढा विचार नको करू तू कधी काही बोला किंवा कधी कोणता विचार केला हे मला तुझ्या आधी समजते राजे त्या मुळे नको विचार करू आता जे होईल ते पहा बोलून भैरव आत गेला आणि त्याचा मागे सर्व आत गेले. तो थेट त्या जागेवर जाऊन थांबला जिकडे खून झाले होते.भैरव ने दरवाजा उघडला तसे परत गरम हवेचा झोत बाहेर आला. भैरव ने पिशवीत हात घातला आणि दोन लिंबे बाहेर काढली आणि हातात घेऊन तो कसले तरी मंत्र पुटपुटू लागला. ते लिंबू घेऊन तो सर्व ठिकाणी फिरू लागला मग एका ठिकाणी तो थांबला आणि त्याने लिंबू पहिले तर ते आधी लाल झाले नंतर ते काळे पडले होते. भैरव ने आता सर्वांकडे एक नजर फिरवली आणि म्हणाला या जागी एक अनुष्ठान झाले होते अवदसा ला इकडे बोलवले गेले होते आणि तिच्या काही अटी होत्या कारण कोणते प्रेत किंवा डाकीण अटी शिवाय कामाला तयार होत नाही. भैरव ने डोळे बंद केले आणि काही वेळ तसाच गेला. एक काम करा तुम्ही बाहेर थांबा मी तुम्हाला बोलावतो. पण बाहेर तर ती आहे ना निशी घाबरत म्हणाला. तिची काळजी तू करू नकोस ती तिला काही करणार नाही बोलून दरवाजा बंद केला. इकडे बाहेर सर्व घाबरले होते, विचित्र आवाज येत होते कोणाचे तरी गरम श्वास मानेवर जाणवत होता, सतत कोणी तरी पाहत आहे असे वाटत होते. प्रत्येक सेकंड हा तास सारखा भासत होता मध्ये कोणी तर हसत आहे असे वाटत होते.साधारण अर्धा तास गेला आणि भैरव ने दरवाजा उघडला. रात्रीचे साधारण साडेबारा वाजले होते. भैरव ने एक कुंकवाचे मोठे रिंगण तयार केले होते, त्यात हळदीची चांदणी बनवली होती त्यावर हवनकुंड ठेवले होते, समिधा आणि काळे उडीद कणकेच्या पिठाची बाहुली जिला कोणता तरी काळा कापड गुंडाळले होते सोबत एक लिंबू मध्ये चिरून त्याला कुंकू लावले होते. आता मी जे काही सांगतो आहे ते नीट लक्ष देऊन ऐका, या रिंगणाच्या बाहेर तुम्ही सुरक्षित राहणार नाही, अवदसा तुम्हाला सर्व प्रकारचे आवाज काढून बोलावेल पण तुम्ही कोणी बाहेर जायचे नाही. विशेष म्हणजे राजे तुम्ही कारण तुमचा अजून या सर्वावर विश्वास नाही आहे. भैरवाने विधी सुरु केले.
साधारण पावणे एक ला त्याने मंत्र पठाण ला सुरुवात केली. आपल्याला आजूबाजूला कोणी दिसु नये किंवा कोणाचा आवाज येऊ नये म्हणून कीर्ती ने आपले हाताने कान झाकून घेतले आणि डोळे गच्च बंद केले.अचानक कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. सर्व भीती ने कापू लागले. ये गोसाव्या बंद कर तुझी थेरं तुला काय वाटत कि तू हे सर्व करून याना वाचवशील का? पण एक लक्षात ठेव कोणी नाही सुटणार माझ्या पासून आणि हासनायचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाला भीक न घालता भैरवाने आपले मंत्र सुरु ठेवले.आता त्या अवदसे ने आपला पवित्रा बदलला आता ती शिव चा आवाज काढून त्यांना भुलवणायचा प्रयन्त सुरु केले. अंगद, निशी अरे मला इकडे खुप त्रास होतो आहे रे माझी मदत करा मला सोडवा यातून आणि ती रडू लागली. थोडा वेळ गेला आणि मग मानसी च्या रडण्याचा आवाज येऊ लागला. कीर्ती अगं तू तरी ये माझी मदत कर मी इकडे एकटी आहे तुझ्यासाठी मी माझा जीव घालवला आणि तू तिकडे बसली आहेस तू तरी माझी मदत कर ना आणि मानसी रडू लागली. मागचा पुढचा विचार न करता कीर्ती उभी राहिली आणि मागे वळून जोरात ओरडली जा तू मला माहित आहे माझी मानसी गेली आहे ती पुन्हा नाही येणार तू जा इकडून तू जा आणि कीर्ती रडू लागली तसे अचानक तिला कोणी तरी जोरात धक्का दिला आणि ती वर्तुळाच्या बाहेर पडली. तिने मागे वळून पहिले तर तिच्या मागे निशी हसत उभा होता. निशी तू ?कीर्ती म्हणाली आणि तिला अवदसा घेऊन जाते. रागात अंगद ने निशी ची कॉलर पकडली आणि म्हणाला, निशी हे काय केले तू तुझा डोकं फिरले आहे का? अरे ती आपली कीर्ती होती. निशी त्याचा कडे पाहून फक्त हसत होता. अंगद ने त्याला बाजूला फेकले आणि तो बाहेर पडणार तेवढ्यात त्याला भैरव ने अडवले आणि म्हणाला थांब अंगद तिला आता काही होणार नाही कारण त्या अवदसा ने तिचे कापड पहिले आणि तिला माहित आहे जर तिने कीर्तीला काही केले तर ती पण नाही वाचणार, पण एक शक्यता आहे ती कीर्तीवर हावी होईल आणि तिच्या शरीराचा ताबा घेऊन ती हे कापड मिळवणायचा पर्यन्त करेल जर तू आता बाहेर गेलास तर ती तुझा बळी घेईल. मग महाराज मी करू काय हातावर हात ठेऊन तिला मारताना नाही पाहू शकत मी अंगद म्हणाला त्यावर निशी हसत म्हणाला ते तर तुला करावे लागेल कारण ती परत नाही येणार ती तर मारणार आणि पुन्हा हसू लागला अंगद चा राग अनावर होऊन त्याने निशी ला जोरात ठोसा लगावला तसे निशी जमिनीवर पडला आणि त्याला राजे यांनी पकडून ठेवले. अंगद मला सोडावं अंगद मी इकडे आहे अंगद माझे प्रेम आहे तुझ्यावर मला सोडावं अंधारात उभी राहून कीर्ती अंगद ला आवाज देत होती. अंगद ने भैरव कडे पहिले, भैरव ने त्याला मानेने नकार दिला. अंगद त्याचा कडे काय पाहतो , मला पहा तुझे प्रेम आहे ना माझ्यावर बोलत हळू हळू ती पुढे येऊ लागली. भैरव ने हळूच त्याला एक पूड दिली आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, हि पूड जशी ती जवळ येईल तशी तिच्या अंगावर टाकून दे म्हणजे ती अवदसा तिचा पासून वेगळी होईल आणि जशी ती वेगळी होईल तसे लगेच कीर्तीला या रिंगणात खेचून घे. कीर्ती माझे पण खुप प्रेम आहे तुझ्यावर ये जवळ ये आणि मला घेऊन जा हा गोसावी मला इकडून जाऊ देत नाही मला येऊन घेऊन जा इकडून कीर्ती लवकर ये अंगद म्हणत होता आणि निशी हे सर्व काय होते आहे ते आश्चर्याने पाहत होता. कीर्ती ये आणि मला सोडावं यातून कीर्ती ये ना कीर्ती अंगद प्रेमाने आवाज देत होता. तो थोडा रिंगणा बाहेर आला आणि त्याने कीर्ती कडे हात पसरले कीर्ती ते पाहून त्याचे हात हातात घेण्यासाठी जवळ आली आणि अंगद ने तिच्यावर ती पूड तिच्यावर टाकली तशी ती अवदसा तिचा मधून बाहेर आली आणि संधी साधून अंगद ने कीर्तीला जवळ ओढले आणि दोघे आत गेले. आयते हातात आलेलं शिकार निसटून गेल्या मुळे अवदसा आता जोराने ओरडू लागली. हे सर्व पाहून राजे भीती ने कापू लागले. अरे गोसाव्या तू स्वतःला खुप मोठा समजतोस का? मला हरवणे सोपे नाही समजे का? आणि ती त्याचा भोवती घिरट्या घालू लागते. भैरव ने तिच्याकडे पहिले आणि समिधा टाकत म्हणाला, मी मोठा नाही माझा भूतनाथ मोठा आहे, त्याचे राज्य सर्व ठिकाणी आहे आणि त्याने मला पाठवले आहे तुमचा सारख्या लालसेने भरलेल्या आत्माचा खात्मा करायला. आता पर्यंन्त जेवढे बळी तू घेतले आहेस त्याचे हिशोब तुला महादेव ला द्यावे लागतील. त्याने ती बाहुली आणि काही उडीद हातात घेतले आणि मंत्र म्हणू लागला तसे ती अवदसा जोरात ओरडू लागली. भैरव ने ती बाहुली आणि कापलेले लिंबू आणि काळ्या उडीद सोबत अग्नी मध्ये विसर्जित केले. जस जसे ते जळू लागले तस तसे ती जोरात ओरडू लागली. एक काळा धूर जमिनी मधून आकाशाकडे जाऊ लागला आणि भैरव ने मंत्र पठाण थांबवले. पोरांनो तुमची मिल मुक्त झाली आणि तुमचा आरोपी तुमचा कडे आहे पण हा एकटा नाही आहे ह्याचा मागे अजून कोणी तरी आहे. त्याचे उत्तर तोच देईल बोलून भैरव ने सर्व जागा साफ केली आणि चला माझे काम झाले सुखी रहा आशीर्वाद देऊन हर हर महादेव चा जय घोष करून भैरव तिकडून निघाला.
राजे आणि अंगद ने आपला मोर्चा निशी कडे वळवला. निशी भीती ने कापत होता.निशी खरं सांग तू असे का वागलास?बोलून अंगद ने त्याला ठोसा लगावला. त्या ठोश्याने निशी जमिनीवर पडला.राजे यांनी त्याला उचलला आणि बाहेर आले आणि त्याला खुर्चीवर बसवला आणि म्हणाले, हे बघ घाबरू नको तू असे का केले खरं सांग नाही तर तुला या मिल मध्ये मारून टाकू आणि नाव अवदसे चे येईल त्या पेक्षा खरे सांग तू असे का केले? आणि हो स्वतः चा जीव वाचवण्यासाठी हे कारण देऊ नको कारण तसे असते तर कोणाला हि ढकललं असते मग कीर्ती ला का? आणि जर तुला वाटत असेल आम्ही इकडे गम्मत करत आहोत तर पोलीस एन्काऊंटर तुला माहित आहेत पण इकडे अवदसा इनकॉउंटर होईल तर पटपट बोल. बोल लवकर राजे जोरात ओरडले तसे निशी दचकला आणि सांगू लागला. माझे नाव निशिकांत गोरखनाथ कारखानीस माझे वडील गोरखनाथ कारखानीस जे कीर्ती इंडस्ट्रीएस मध्ये आहेत ते म्हणजे तू कीर्तीचे, निशी चे वाक्य मधेच तोंडात अंगद म्हणाला. हो मी कीर्तीचा भाऊ पण सखा नाही चुलत कारण तिचे बाबा हे माझे मोठे काका होते त्याचे नाव रामनाथ कारखानीस जशे निशी ने नाव घेतले तसे कीर्ती चा चेहरा उतरला आणि ती जोरात ओरडली नाही हे सर्व खोटे आहे तू खोटे बोलत आहेस बाबा बद्दल तुला माझ्या मनात विष कालवयचे आहे आणि तू फसला आहेस म्हणून तू त्याचे खोटे नाव घेते आहे. त्यांनी तर माझ्यासाठी लग्न पण नाही केले तू खोटे बोलत आहे कीर्ती मोठयाने रडत म्हणाली. मी खोटे बोलत नाही हवे तर शेवन्ता ला विचार कारण तिने माझ्या बाबाना पहिले आहे निशी म्हणाला. तशी कीर्ती शेवंता कडे गेली आणि तिने गोरखनाथ चा फोटो दाखवला शेवंता याना ओळखते का? शेवंताने फोटो नीट पहिला आणि म्हणाली होय हे तर गोरखनाथ साहेब आहेत रामनाथ साहेब यांचे भाऊ आणि शेवन्ताचे हे वाक्य ऐकून कीर्ती च्या पाया खालची जमीन सरकली.कीर्ती तिकडे जमिनीवर बसुन राहिली अंगद ने तिला सहारा दिला . त्या पुजारी ला पण तू मारले ना? त्याची बॉडी घेऊन जाताना त्याची बोटे निळी झाली होती राजे म्हणाले. हो, मी मारले कारण मारले नसते तर त्याने बाबा चे नाव घेतले असते आणि मग सर्व खेळ वाया गेला असता. संपत्ती कीर्ती च्या नावावर होती., तिला २५ वर्ष पूर्ण होत नाही तो पर्यंत बाबा तिचे राखणदार होते जर त्या आधी कीर्ती ला काही झाले असते तर पूर्ण संपत्ती अनाथाश्रम ला दान झाली असती. म्हणून मग मी आणि बाबा ने एक प्लॅन केला आम्हाला माहित होते ह्या मिल मध्ये अवदसा आहे आणि हिच्या बापाला जसे मारले तसे हिला पण मारून टाकायचे. वीस वर्षांपूर्वी पुजारी ने बाबा ला कॉल केला होता अवदसे साठी आणि बाबा ने तिला बंद करायला सांगितले होते. कार अपघात किंवा असा कोणता अपघात आम्ही करू शकत नव्हतो जो समोर दिसेल आणि आमचे नाव त्यात येईल म्हणून मग बाबा ने हा प्लॅन केला आणि आम्ही सर्व आलो आधी शिव गेला तेव्हा मी जागा होतो पण झोपचे सोंग घेतले होते. मग मानसी तिला मारायचे नव्हते कारण ती पण यात सामील होती आणि आम्ही लग्न करणार होतो पण ती पण गेली सर्व ह्या कीर्ती ची चुकी तिच्या जागी मानसी गेली माझी आणि आज हि गेली असती पण माझी संधी वाया गेली. हे त्या भैरव ला माहित होते आणि ते मला मंदिरात समजले होते निशी म्हणाला. कीर्ती रडत होती आणि निशी तिचा कडे पाहून हसत होता. चला आता तुम्हाला तुमचा बंगलो देतो म्ह्णून राजे त्याला पकडून बाहेर आले आणि दोन हवलदारानी त्याला पोलीस जीप मध्ये बसवले. पहाटेचे पाच वाजले होते, कीर्ती ने रडत रडत अंगद कडून फोन घेतला आणि गोरखनाथ ला फोन लावला. हॅलो, काय म्हणू बाबा ,काका कि खूनी मला सर्व समजले आहे, एकदा मागितली असती हसत सर्व संपत्ती दिली असती त्या साठी एवढे करायची काय गरज होती. काही वेळ शांती मध्ये गेला आणि मग एक गोळी चा आवाज फोन मधून आला आणि कॉल कट झाला.
ह्या घटने नंतर कीर्ती तिकडे राहिली आणि तिने मिल सुरु केली तिकडे गावात लोकांना पुन्हा रोजगार मिळाला आणि त्या मिल चे नाव तिने शिव टेक्सटाईल ठेवले. कीर्ती ने अंगद सोबत लग्न केले आता दोघे मिळून कीर्ती इंडस्ट्रीएस चा सर्व कारभार पाहत आहेत पण अजून त्याचा मनात त्या आठवणी ताज्या आहेत आणि अजून हि ते महिन्यातून एकदा शिरोळे गावी जातात आणि मिल ला भेट देऊन जुन्या आठवणी जगतात.
मित्रानो लालच बुरी बला है। असे म्हणतात ते उगीच नाही. अहो हाव लोभ कश्याचा पण असू द्या पण तो अती झाला तर त्याचा अंत भयानक होतो. जे आहे त्यात खुश राहा आणि समाधानी राहा आणि आनंदाने जगा.