खेळ.... -भाग १
सन १९७५ च्या आसपासचा तो काळ असेल. माझ्या आजोबांची पन्हाळ्याला बदली झाली होती. किशोर काकडे म्हणजे त्याकाळी एका मोठ्या हुद्द्यावर असलेले पोलीस अधिकारी त्यांच्या प्रामाणिकपणाने केलेल्या कामामुळे त्यांची अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची. आता यावेळेस त्यांची बदली पन्हाळ्याला झाली होती. कांचन(माझी आजी) सोबत नुकतंच नवीन लग्न झालं होतं.
लग्नानंतर अवघ्या १५ दिवसात पन्हाळा गाठायचा होता तर आजोबांचे वडील त्यांना म्हणाले, अरे बायकोला सोबत घेऊन जा आता लग्न झालं आहे तुझं अजून किती दिवस खानावळीत जेवण करणार. वडिलांचा शब्द डावलायचा कसा म्हणून त्यांनी आजीला सोबत घेत पन्हाळा गाठला. जुलै महिना उजाडला होता पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता त्यात पन्हाळा तर अगदी हिरवागार दिसत होता. आजी तर पन्हाळ्याच्या प्रेमात च पडली होती. खरंच सांगतो तिथल्या निसर्गसौंदर्यात काय जादु आहे काय माहिती जो पण तिथे जातो तो त्या जागेच्या अगदी प्रेमात पडतो. ते दोघे पन्हाळ्यावर पोचलो. त्यांना पोलीस क्वार्टर मध्ये खोली मिळाली होती त्यामध्ये त्यांनी संसार मांडला. आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला. एकदिवस आजोबांना सुट्टी होती आणि त्यांच्या मनात विचार आला लग्न झाल्यापासून हिला कुठे बाहेर फिरायला घेऊन गेलो नाही. तिला इकडे आणलं आणि कामात गुंतवून ठेवलं. त्या दिवशी त्यांनी आजीला surprise द्यायच्या हेतूने पन्हाळगड फिरायला नेले. गडावरून फेरफटका मारताना आजीला खाली दरीमध्ये एक घर दिसले,घर कसलं लांबून तर तो चांगला प्रशस्त बंगला वाटत होता, एकदम जंगलाच्या मधोमध आणि चारही बाजूने हिरवीगार झाडी. झालं आजीला ती जागा आवडली तिने लगेच आजोबांना तिच्या मनातली ईच्छा बोलून दाखवली.
'की आपण इथलं घर सोडून त्या बंगल्यावर राहायला जाऊया किती एकांत मिळेल तिथे' पण आजोबांनी कठोर शब्दात नकार दिला. आजी हिरमुसली आणि गुपचूप गाडीमध्ये जाऊन बसली आजोबा तिच्या मागोमाग गेले.
आजीला त्या बंगल्याने एवढं जाळ्यात ओढलं होत स्वप्नात तो बंगला तिला दिसे. तिने अनेकदा आजोबांना सांगितले पण आजोबा ऐकायला तयार नव्हते कारण पोलीस चौकी त्यांना क्वार्टर पासून जवळ होती. आजी खूप नाराज झाली आणि तिने खाणंपिणं सोडलं आजोबा खा बोलले तरी खायची नाही आजोबांना काळजी वाटू लागली मग त्यांनी आजीला शब्द दिला की आपण लवकरच त्या बंगल्यात जाऊया. आजोबांनी माहिती काढायला सुरुवात केली कोणाचा बंगला आहे,कशी जागा आहे असं. लोकांकडून काही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. एके दिवशी घरी येताना आजोबांनी त्यांच्या चालकाला विचारले कसा आहे तो बंगला कशी आहे ती जागा,त्यावर तो चालक गडबडला आणि म्हणाला, "सायेब मलाबी ठाऊक नाय पर लोक म्हणत्यात की ती जागा भुताची हाय भूत राहत्यात तिथं", आमचे आजोबा मुंबईत राहिलेले त्यांना या गोष्टीच हसू आलं आणि ते म्हणाले हे बघ रघुनाथ(चालकाचे नाव) आपण येत्या दोन दिवसात तिथे राहायला जातोय. रघुनाथ उचकला म्हणाला, "सायेब तुम्हाला जायचं तर जावा म्या नाय येत वाटल्यास मला नोकरी सोडावी लागली तरीबी चालण" आजोबा हसले आणि म्हणाले चल घरी सोड.
त्या रात्री नंतर रघुनाथ परत गावात दिसलाच नाही.
आजोबांनी आजीला सांगितले नव्हते की गावकरी त्या जागेला भुताची जागा म्हणतात ते कारण आजी भलतीच खुश होती तिला बंगल्यात जायला मिळणार होत.
आजोबांनी सगळा बंगला दोन गडी घेऊन व स्वतः तिथे उपस्थित राहून साफ करून घेतला कारण पोलीस ते होते त्यांच्या नकार देणं कोणाला खपणार होत. ततपप करत त्यांनी घर साफ करून घेतलं.
आणि दोन दिवसात आजी आणि आजोबा बंगल्यात राहायला गेले......
कोणाला ठाऊक होतं इथं खरंच भूत आहे का की लोक अफवा पसरवतात. दिवस चांगले जात होते चालक पळून गेला होता त्यामुळे आजोबांना रात्री एकट्याला गाडी चालवत यावं लागत असे. आजोबांना किती पण उशीर होऊदेत आजी त्यांची वाट पाहत बसायची रात्रीचे बारा वाजतील एक वाजेल पण ते आल्याशिवाय काही ती घास खायची नाही. आता या त्या काळच्या प्रथा किंवा त्या काळची प्रेम व्यक्त करायची पद्धत. ते काहीही असो. पण मात्र आजी वाट पहायची. आणि एक दिवस अचानक आजोबांना एका गुन्ह्याच्या तपासासाठी चंदगड(महाराष्ट्र व कर्नाटक च्या सीमेवरील गाव) या ठिकाणी जायचं होतं. आजोबा काळजी मध्ये पडले. एवढ्या मोठ्या घरात हिला एकटीला कस ठेवायचे पण आजी आमची धीट म्हणाली या जाऊन राहते मी एकटी काही काळजी करू नका.
आजीने बोललेल्या या शब्दांनी आजोबांना धीर आला आणि म्हणाले काळजी करू नकोस चार दिवसांत मि परत येईल अस म्हणत आजोबा निघून गेले. आजी चा नंतरचा दिवस कामातच गेला. कारण बंगला फार प्रशस्त अगदी चित्रपटात दाखवतात तसा. आत प्रवेश केल्यावर मोठा हॉल, डाव्या बाजूला किचन, हॉल मधून उजव्या बाजूला गेलं वरच्या खोल्यांमध्ये जायला जिना वरती तीन खोल्या होत्या पण आजीने त्यांच्यासाठी एकच खोली उघडली होती. बाकी दोन खोल्यांची दार बंद च होती. सूर्य मावळला अंधार पडला आजी घरात एकटी नशीब तेव्हा विजेची सोया तिकडं झाली होती एक मिणमिणता बल्ब चालू केला. पण रात्र झाली आणि आजीला ते घर खायला उठू लागलं तिला भीती वाटू लागली.ती अस्वस्थ झाली आणि त्या दिवशी ती जेवली देखील नाही. पाणी पिऊन झोपायला गेली. त्या दिवशी तिला शांत झोप लागली नाही सतत आजोबांची काळजी लागून राहत होती. सकाळ झाली आणि ती खोलीच्या बाहेर आली तर खोलीबाहेर तिला तिच्या डाव्या पायातली एक चप्पल दिसली. मुख्य दरवाजाबाहेर काढलेली चप्पल अक्खा एक जिना चढून तिच्या खोलीपर्यंत आली कशी हा प्रश्न तिला पडला. तिला वाटलं कोणी मांजर वैगैरे असेल त्याने ठेवली असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं.आणि ती चप्पल घेऊन खाली आली. आजीला आजोबांची काळजी वाटत होती त्यावेळी आत्ताच्या सारखे मोबाईल नव्हते त्यामुळे संपर्क व्हायचा काही संबंध च नव्हता. तो ही दिवस कामात गेला आजीचा रात्री आजी झोपायला गेली. दुसरा दिवस उजाडला आजी उठून खाली यायला लागली तर जिन्याच्या सुरुवातीला पुन्हा ती चप्पल तिला दिसली आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कोणी चोर वैगरे घुसला की काय घरात अस तिला वाटलं म्हणुन तिने सगळं घर तपासलं पण काही नव्हतं सगळं व्यवस्थित आणि जागच्या जागी होत. पण ती चप्पल आली कुठून परत एकदा ते तिला समजलं नाही. तो ही दिवस गेला रात्र झाली आजी झोपायला गेली पण आजीला शांत झोप लागेना. रात्रीचा दीड वाजत आला असेल ती या कुशिवरून त्या कुशीवर होत होती. थोडीशी अस्वस्थ होती तिला तहान लागली होती ती पाणी प्यायला खाली निघाली खोलीचा दरवाजा तिने उघडला आणि तिला धक्का च बसला पुन्हा तिची चप्पल दरवाजात आली होती. ती हादरून च गेली कारण आता रोज रोज हे अस होत होत. तिने चप्पल हातात उचलून घेतली आणि तिला खूप मोठ्यामोठ्याने समोरच्या बंद असलेल्या खोलीतून रडायचा,किंकाळी फोडल्याचा आवाज येऊ लागला. आजी पुरती घामाघूम झाली होती.
तिकडून आवाज येत होता आणि आवाज मुलीचा वाटत होता ती ओरडत होती 'वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा'.
हे सगळं ऐकून आजी धाडकन चक्कर येऊन पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा आले दरवाजा वाजवून देखील दरवाजा उघडला जात नाही म्हटल्यावर काहीतरी काळबेर असेल याची जाणीव त्यांना झाली दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि थेट त्यांच्या खोलीकडे धावले आणि खोलीच्या दरवाज्यातच आजी पडली होती. ते फार घाबरले त्यांनी तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती काही उठली नाही शेवटी त्यांनी खाली जाऊन पाणी आणून तोंडावर मारले तेव्हा आजी थोडीशी शुद्धीवर आली. त्यांनी तिला हळूच खोलीमध्ये नेले आणि आराम करायला सांगितला. पण आजीच्या डोक्यात तोच रात्रीचा रडलेला आवाज ऐकू येत होत्या तेच तेच विचार करून तिच्या डोक्यात मुंग्या येत होत्या. तेवढ्यात आजोबा चहा घेऊन आले. आजीची विचारपूस केली. तेव्हा आजीने रात्री घडलेली सगळी हकीकत सांगितली तो चप्पलचा किस्सा ते रडणं वैगैरे सगळं काही. आजोबा बोलले छे काही पण नको बोलूस भूत वैगैरे काही नसत एखादं जनावर असेल आणि रडायचं म्हणत असशील तर तुला कदाचित एकटी असल्याने भास झाला असेल....
दुसऱ्या भागाची लिंक