भाग 2....
आजोबा बोलले छे काही पण नको बोलूस भूत वैगैरे काही नसत एखादं जनावर असेल आणि रडायचं म्हणत असशील तर तुला कदाचित एकटी असल्याने भास झाला असेल. पण आजी म्हणाली तो भास नव्हता अहो खरंच मला त्या समोरच्या खोलीतून तो रडलेला आवाज ऐकू आला. आजोबा त्यावर फक्त हसले आणि म्हणाले देवावर विश्वास आहे ना तुझा मग झालं तर नको चिंता करुस कोणी भूत वैगैरे नाही येणार तुला घ्यायला. आजोबांच्या येण्याने आजीला जरा हायस वाटलं तेवढ्यात नेमके आजोबा म्हणाले माझ्याकडे आलेली केस अजून सुटली नाहीये कदाचित आणखी एक चंदगड चा दौरा होऊ शकतो. आजी त्यांना थांबवत म्हणाली,'तुम्ही जाता मला एकटं ठेऊन रात्रीच घर खायला उठत मला आणि त्यात तो घडलेला प्रसंग एकटी कशी राहू मी या घरात'. आजोबा म्हणाले नको काळजी करुस स्टेशन वरून एक हवालदार पाठवेल मी इथे लक्ष्य ठेवायला अस म्हणून आजोबा त्याच संध्याकाळी पुन्हा चंदगड कडे रवाना झाले आणि आजी पुन्हा एकटी पडली रात्री सुमारे साडे आठ च्या सुमारास दारावरची बेल वाजली दारात हवालदार उभा होता म्हणाला साहेबांनी पाठवलं आहे मला इथे तुमच्या सुरक्षिततेसाठी. आजीला बर वाटलं ती म्हणाली तुम्ही कुठे थांबताय त्यावर हवालदार उत्तरला,गेट पाशी आहे ना छोटी केबिन तिथे बसतो माझा रेडिओ ऐकत काही वाटलं तर वरच्या खिडकीतून आवाज द्या. आजी ठीक आहे म्हणाली आणि सगळं आवरून ती झोपायला गेली. रात्रीचे साडेबारा एक वाजला असेल कसलातरी आवाज झाला त्या आवाजाने आजीला जाग आली. ठक....ठक....ठक......ठक.... असा आवाज येत होता. अस वाटत होत की कोणीतरी काठी आपटत चालत आहे पण एवढ्या रात्री कोण असणारे इथे अस तिला वाटलं म्हणून ती वरच्या खिडकीकडे गेली गेटकडे पाहिलं तिथे केबिन पाशी रेडिओ चालू होता त्याचा आवाज येत होता पण दरवाजा बंद होता आणि अंधार पण होता त्यामळे हवालदार आजीला दिसला नाही. तिला वाटले हवालदार काठी आपटत चालत आहे. याची शहानिशा करावी म्हणून ती खाली जायला निघाली आणि तिने खोलीचा दरवाजा उघडला पण दरवाज्यात चप्पल नव्हती. तिच्या जीवात जीव आला. पुढे ती जस जसा जिना उतरुण खाली आली तिला समोर जे दिसलं ते फार भयंकर होत. तिला समोर एक मुलगी दिसली जिच्या एका पायात तिची एक चप्पल आणि डाव्या खांद्याला कुबड्या होत्या तिला एकच पाय होता. ती एक अपंग मुलगी होती काळेभोर केस,निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता तिने. आजी फार घाबरली आजीला फक्त भोवळ यायची बाकी होती. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली पण तिथे कोणी नव्हतं कदाचित गेटवरच्या हवालदाराचा पण डोळा लागला होता पण गाण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता त्यात रातकिड्यांची किरकिर होतीच आणि या मुलीचं ठक ठक चालणं सुरू होत. आजीने आरडाओरडा करताच त्या मुलीने आजीकडे वळून पाहिलं आणि तिला पाहताच आजी भोवळ पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली सतत वाजणाऱ्या बेल ने आजीला जाग आली. पाहते तर समोर हवालदार उभा पण रात्री जो हवालदार होता तो हा नव्हता हा वेगळाच कोणीतरी होता. आजीने त्याला विचारले, 'काय हो ते रात्रीचे दादा कुठे गेलेत? त्यावर हवालदार चपापला आणि म्हणाला, रात्रीचे हवालदार? अहो मॅडम साहेबांनी मला काल रात्री इथली ड्युटी लावली पण गावात जुन्या जाणत्या लोकांच्या कडून बरच काही वाईट ऐकलंय या बंगल्याबद्दल म्हणून मी रात्रीचा आलो नाही मला भीती वाटत होती. पण इथे रात्री दुसरा कोणी कसा येणार ही गोष्ट फक्त साहेब आणि माझ्यामधली आहे. आजीला हे सगळं ऐकून पुन्हा भोवळ आली ती पडली. आणि तिने डोळे उघडले ते दवाखान्यात च. समोर आजोबा उभे होते तो सकाळचा हवालदार उभा होता डॉक्टर उभे होते. शुद्ध येताच डॉक्टर म्हणाले, गुड न्यूज आहे तुम्ही आई होणार आहात....हे ऐकताच आजीचा चेहरा खुलला आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. पण आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद फार काळ टिकला नाही. तिला ती रात्रीची मुलगी आठवली तिचा चेहरा आठवला. तिने ती सगळी हकीकत आजोबांना सांगितली,एका बाजूने पूर्ण भाजलेला होता त्या मुलीचा चेहरा आणि ती हसत हसत माझ्या कडे पाहत होती. पण आजोबांनी हे देखील हसण्यावारी नेलं आणि म्हणाले स्वप्न बघितलं असशील तू हे असलं सगळ्या गोष्टी फक्त चित्रपटात होतात खऱ्या आयुष्यात नाही. आजी त्यांना कस समजावणार होती तिच्या च हट्टापायी त्यांनी ते घर घेतलं होतं. संध्याकाळी ते घरी आले डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितले होते. म्हणून आजोबांनी त्यांच्या आईला पत्र लिहिले. पण त्यांची म्हणाली, अरे आठ दिवसांनी येते शेतात लगबग चालू आहे. आजोबांनी मनाशी पक्के केले या अवस्थेत आजीला सोडून कुठेही जायचं नाही. आजोबांनी त्यांची आई येत नाही तोवर आजीची पुरेपूर काळजी घेतली आजीला काही कमी पडू दिलं नाही. आठ दिवसांनी आजीची सासू आली सासूबाई जाम खुश घरात पाळणा हलणार या बातमीने.
आता आजोबा मोकळे झाले त्यांनी त्यांच्या आईवर आजीची सगळी जबाबदारी टाकली आणि ते आपली काम करायला मोकळे झाले. त्या दिवशी अमावस्या होती आजोबा कामानिमित्त मुंबई ला गेले होते घरात आजी आणि त्यांची सासू दोघीच. काम आवरली आणि दोघी जणी वरती झोपायला गेल्या दोघी एकाच खोलीत झोपल्या. तेव्हा आजीचा पाचवा महिना चालु होता.
आणि मध्यरात्र झाली होती एकाएकी आजीला काहीतरी पडल्याचा आवाज आला. ती दचकून जागी झाली तिने शेजारी पाहिलं सासूबाई गाढ झोपल्या होत्या. तेव्हढ्यात बाहेरून जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. हा तोच आवाज होता जो त्या दिवशी आजीला ऐकू आला होता. आजी फार घाबरली तिने सासूबाई ना उठवायचा प्रयत्न केला सासूबाई गाढ निद्रेत होत्या. त्या जाग होत म्हणाल्या, 'काय झालं बाई झोप ना गप धड स्वतः झोपत नाही आणि दुसऱ्याला झोपू देत नाही'. आजीला माहिती होत सासूबाईंना झोप फार प्रिय होती. आजी त्यांना म्हणाली अहो कोणीतरी रडल्याचा आवाज येतोय मोठमोठ्याने सासूबाई दचकून जाग्या झाल्या. उठून बसल्या त्यांनी कानोसा घेतला आणि म्हणाल्या, झोप गपचुप काही आवाज वैगैरे येत नाहीये पण आजीला मात्र आवाज ऐकू येत होता, आणि आजीला दाट संशय होता ही तीच मुलगी असणार आहे जी त्या दिवशी खाली तिला दिसली होती. आजीला घाम फुटला होता बाहेर उठून जायची हिम्मत होत नव्हती शेवटी तिने कानावर हात ठेवला आणि झोपी गेली. तास दीड तासानंतर तो आवाज पूर्ण शांत झाला आणि आजी झोपी गेली. दिवस उजाडला १० वाजत आले असतील आजीला रात्रीच्या उशिरा झोपण्याने तिल सकाळी जाग आली नाही सकाळी पण शेजारी ती पाहते तर सासूबाई नव्हत्या. आजी खाली उठून गेली तर सासूबाई खाली किचन मध्ये होत्या. त्या म्हणाल्या, उठलात का सुनबाई? बर झालं....सकाळी नाही उठवलं तुम्हाला शांत झोप लागली होती तुमची,पण मला एक सांगा सुनबाई तुमची एक चप्पल आपल्या खोलीबाहेर कशी काय आली?
आजी निरुत्तर झाली. सांगणार तर काय आणि कोणाला? सांगितलं असत तर तिलाच येड्यात काढलं असत या लोकांनी म्हणून ती गप्प बसली. त्या दिवशी तिने दिवसभर आराम च केला. रात्री झोपण्यापूर्वी सासूबाई तिला म्हणाल्या, मी खालीच झोपते तुझ्या खोलीत मला काही बाई झोप येत नाही. आजी म्हणली मला भीती वाटते हो त्यावर त्या म्हणाल्या अग कोणी नाही येत नको काळजी करुस. मी आहे की खालीच झोपलेली. आणि भीती वाटते तर खोलीचा दरवाजा उघडा ठेव बंद नको करुस.आजीला हा पर्याय आवडला तिने दरवाजा उघडा ठेवला आणि झोपायला गेली. मध्यरात्र झाली होती अचानक आजीला ठक ठक....त्या दिवशी आला तसा आवाज येत होता. आणि तिला तो आवाज फार जवळून येत होता. आजी जागी झाली पण डोळे काही तिने उघडले नाहीत. आवाज शांत झाला तिने डोळे उघडले आणि पाहते समोर काय....ती उभी होती काळ्या रंगाचा कुर्ता, दोन्ही हातात कुबड्या, अर्धा चेहरा भाजलेला, डोळे रडून रडून सुजलेले,लाल भडक झालेले, ते सगळं पाहून आजीची दातखीळ बसली. ती मुलगी हळूच घोगऱ्या आवाजात आजीजवळ येऊन म्हणाली, तुम्ही माझ्या घरात राहायला आला आहात हे माझं घर आहे आणि आता तुला तेच ऐकावं लागेल जे मी सांगेल, आता ऐक मी काय म्हणते ते तुझ्या नवऱ्याचं आणि माझं लग्न लावून दे आपण दोघी या घरात बहिणीसारख्या राहू... बोल आहे का कबूल??? आजी गप्प च होती.तिचा जीव जायचा बाकी होता फक्त. ती मुलगी म्हणाली तुझा नवरा आला की त्याला सांग सगळं मी काय म्हणाले ते आणि माझं लग्न लावून दे नाहीतर तुझं बाळ आहे आणि मी आहे ध्यानात ठेव. अस म्हणून ती मुलगी मागे वळाली. आणि इकडे आजीने मान टाकली...
सकाळी सासूबाई उठून आजीच्या खोलीत आल्या पण खोलीच्या बाहेर त्यांना ती आजीची चप्पल दिसली. त्यांनी दुर्लक्ष करत खोलीत आल्या आणि आजीची ती अवस्था पाहून त्यांना धक्का च बसला.आजी आडवी पडली होती बेडवर तीच डोकं बेडच्या बाहेरील बाजूस लटकत होतं. त्यांनी पळत जाऊन आजीला नीट केलं आणि त्यांच्या हाताला चटका बसला आजी तापाने फनफनत होती. सासूबाई ना काय करावे सुचेना त्यांनी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आणून ठेवल्या. थोड्यावेळाने आजोबा आले त्यांनी आजीला हात लावला अंग फार गरम होत तीच. ते ताबडतोब जाऊन डॉक्टर ला घेऊन आले. डॉक्टर हो नाही हो नाही करत शेवटी आले. त्यांनी आजीला तपासलं. इंजेक्शन दिलं. डॉक्टर म्हणाले, साहेब तुमच्या मिसेस ने खुप काहीतरी मोठा मानसिक ताण घेतला आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या अवस्थेत ताण तणाव नाही घ्यायला पाहिजे त्यांनी. बाळावर परिणाम होतात, मी त्यांना इंजेक्शन दिल आहे त्यांना वाटेल बर काळजी नसावी. आजी हळूहळू शुद्धीवर येत होती ताप पण कमी झाला होता. आजोबा तिच्या समोर गेले आणि ती लग्न,लग्न...अस म्हणाली आणि परत तिची शुद्ध हरपली. आजोबांना वाटले हा सगळा डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शन चा प्रकार आहे पण तसं नव्हतं आजीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती आजोबांच्या शेजारीच हसत हसत उभी होती.पण आजी सोडून ती कोणालाच दिसत नव्हती. अस का?
पुढील भाग लवकरचं.......