काळरात्र (भयकथा) part 2 -by- वैभव नामदेव देशमुख
जय देशमुख. उमाचा जिवलग मित्र. भौतिकशास्त्राचा पदवीधर. 'प्रत्येक गोष्ट ही एका मूलभूत कणांनी बनलेली असते. निर्जीव गोष्टीत त्याला अनु आणि सजीव गोष्टी त्याला पेशी म्हणतात. याचा अर्थ प्रत्येक वस्तूची, जीवाची एक मूलभूत संरचना असते. ती संरचना समजून घेतली तर, प्रत्येक गोष्टीच्या समस्येचे उत्तर मिळते. जगात न सुटणारी अशी कोणतीच गोष्ट नाही. कोणतीच समस्या नाही. फक्त ती गोष्ट, समस्या मूलभूतपणे समजून घ्यायला हवी. प्रत्येक समस्येवर मात्रा असतेच. फक्त तिचे यथोचित ज्ञान हवे.'
अशी सर्वसाधारण धारणा असणारा. तो विज्ञानाचा पदवीधर असूनही नैसर्गिक, अनैसर्गिक दोन्ही गोष्टींचे अस्तित्व मान्य करायचा. देव-राक्षस, ईश्वर-भूत, सज्जन-दुर्जन, पाप-पुण्य, प्रकाश-अंधार या दोन्ही विरोधी गोष्टी अस्तित्वात आहेत, यावर त्याचा ठाम विश्वास होता. प्रत्येक गोष्टला एक वैज्ञानिक उत्तर असते, मग ती गोष्ट या जगातली असो वा अन्य जगातील. तिची मूलभूत संरचना समजून घेतली तर तिचे समर्पक उत्तर मिळू शकते. पाणी, अग्नी, जमीन, आकाश यातच प्रत्येक सजीव, निर्जीव अस्त पावतो. सगळ्या समस्यांचे उत्तर या चार घटकांतून मिळते. तो या गोष्टी सिद्धही करून दाखवे. विविध प्रयोग, थेअरीज, प्रात्यक्षिके दाखवून तो त्याचे म्हणणे सिद्ध करून दाखवे. अॅबनॉर्मल ऍक्टिव्हिटी या विषयावरही त्याने अभ्यास केला होता. अनेक कादंबर्या, लेख, प्रबंध, पुरातन साधने यांच्या वाचनातून त्याने मानवी मर्यादे बाहेरील जगाचा अभ्यास केला होता. त्याच्या मते प्रत्येक गोष्टीला उत्तर असते. प्रत्येक समस्येला उपाय असतो. याच तत्वांनी त्याला प्रसिद्ध केले होते. कॉलेजात तो चांगलाच प्रसिद्ध होता. उमाचा अगदी जिवाभावाचा मित्र!!अनेक अडचणींमध्ये या आधीही त्याने उमाला मदत केली होती. अॅबनॉर्मल अॅक्टिविटी या विषयावरही त्याने अभ्यास केला होता.अनेक कादंबऱ्या, लेख, प्रबंध, पुरातन साधने यांच्या वाचनातून त्याला मानवी मर्यादेबाहेरील जगाचा अभ्यास होता व तो या गोष्टींवर विश्वास ठेवायचा.
जयचे नाव डोळ्यांसमोर येताच, तिला थोडा धीर आला. जय आपली मदत नक्कीच करू शकेल. त्याला इथल्या सगळ्या घडामोडी सांगितल्या, की तो त्यावर नक्कीच काहीतरी उपाय सांगेल.पण त्याला संपर्क करायला मोबाईल मिळवायला हवा. देवघरातून बाहेर पडणे म्हणजे मृत्यूला स्वतःहून ओढवून घेण्यासारखे होते. बेडरूम मधला मोबाईल काहीही करून हस्तगत करावा लागेल, पण बेडरूमचा दरवाजा बंद होता. नाही! नाही! तो बंद नव्हता, तो त्या शक्तीने बंद केला होता. कदाचित तो आता उघडा असेल. त्याच्या चेहऱ्यावर जळती काडी फेकली, तेव्हा त्याचे हात सैल झाले होते. म्हणजे त्याच वेळी दरवाजावरील त्याची शक्तीही, सैल झाली असेल. दरवाजा आता उघडा असेल. हो असणारच. आता काहीही करून मोबाईल मिळवावा लागेल. देवघरातील दिवा संथपणे जळत होता. त्या उजेडाचा परीघ आजूबाजूला पसरला होता. पण त्या परिघाबाहेरील काहीही डोळ्यासमोर दिसत नव्हते. बेडरूमचा दरवाजा हॉलला खेटूनच होता. कसेही करून बेडरूममधे जावे लागेल.
एव्हाना पावसाचा जोर अजून वाढला होता. साऱ्या वर्षभराचा पाऊस जसा काही आजच कोसळत होता. या सगळ्या समस्येला कारणीभूत हा पाऊस आहे. सगळ्या घडामोडी मागे या पावसाचाच हात आहे. तोच आज वैरी बनला आहे. पाऊस सृष्टीला नवचैतन्य देतो, असे आजपर्यंत वाटत होते, पण तोच पाऊस मला अचेतन करण्यावर टपला होता. याच पावसामुळे नवरा अडकून पडला. बाहेर कुठे मदत मागता येईना. सगळ्या समस्यांचे कारण हा पाऊस बनला आहे. लोकांना जीवन देणारा पाऊस, आज माझ्या मरणाचे कारण बनत आहे. तिच्या डोक्यात कसेही विचार येऊ लागले.
देवघरातील दिवा जळत आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. तोच एकमेव प्रकाशाचा स्रोत आहे. तो स्त्रोत विझला की, पुन्हा तो घनघोर अंधार. ते भितीदायक वातावरण. ते सरपटणारे. तेच ते तीन फुटांचे. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. देवाचा धावा करण्याचा तिने, कसोशीने प्रयत्न केला. परंतु जीचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला आहे, तिला देव तरी कसा विश्वास देणार. कृष्ण मंत्राची मिळालेली ऊर्जा कधीच आटून गेली होती. ती आता केवळ साधा मानवी देह उरली होती. बेडरूममध्ये जाण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागणार होता.
पण सर्वात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे बेडरूममध्ये कसे जाणार? देवघर सोडले तर सगळीकडे अंधार होता. आणि सर्वात मोठे संकट बेडरूमच्या दाराजवळ होते, ते तीन फुटाचे! हे सगळे अडथळे पार करून बेडरूममध्ये पोहोचावे लागणार होते. पण आता येथून बेडरूम मध्ये कसे जायचे? तिची भीती जरा दडपली होती. तिचा मेंदू काम करू लागला. तिला आश्चर्य वाटत होते, एवढ्या अशा प्रचंड भीतीतही ती अजून टिकून आहे. अजून स्वतःच्या पायावर सही सलामत उभी आहे. माणूस संकटात अजून मजबूत बनतो, याचा तिला आज प्रत्यय आला. बेडरूम मध्ये जाण्याचा काहीतरी मार्ग नक्की असेल. काहीतरी गोष्ट असेल, जी आपल्याला त्या संकटातून वाचवत, सहीसलामत बेडरूम मध्ये पोहोचवेल. त्यासाठी आधी त्या शक्तीची काहीतरी कमजोरी शोधावी लागेल. अशी काहीतरी गोष्ट, ज्याने त्याची शक्ती थोडी क्षीण होईल, तिचा दबाव थोडा कमी होईल, ते भीतीने मागे सरकेल, पण अशी कोणती गोष्ट असेल?
अचानक तिला त्या गोष्टीची जाणीव झाली. जेव्हा तिने प्रथम काडीपेटी पेटवली होती, तेव्हा त्या पेटत्या काडीचा उजेड, त्या तीन फुटाच्या शरीरावर पडला, तेव्हा त्याचा तिच्याकडे येण्याचा वेग कमी झाला होता. त्याच्या चेहर्यावर क्रोध दाटला होता. ते त्रासिक नजरेने तिच्याकडे पाहत होते. कदाचित ते त्या उजेडाला घाबरले होते. त्या उजेडाचा त्याला त्रास होत असावा. कदाचित ते उजेडात अनुकूल होत नसावे. त्याला अंधाराची सवय असावी. अंधारातच त्याचे अस्तित्व सक्रिय होत असावे. म्हणजे प्रकाश त्याची कमजोरी आहे. प्रकाशात ते थोडेसे निष्क्रिय होत असावे. त्याने जेव्हा तिचा गळा पकडला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तिने जळती काडी फेकली, तेव्हा काहीतरी जळाल्या सारखा चर्रर्रssss आवाज झाला होता. त्याने वेदनेने एक मोठी किंकाळी फोडली होती. म्हणजे नक्कीच त्याला प्रकाश सहन होत नसावा. प्रकाश जवळ असेल तर तो नक्कीच आपल्याला इजा करणार नाही. आपल्यापासून थोडेतरी दूर राहील. ती विचारचक्रात तशीच बुडून गेली. तिने मनात एक पक्का निर्धार केला. काहीही करून बेडरूममध्ये पोहोचावे लागणार होते.
तिने एकदा देव्हाऱ्यातील त्या देवाकडे नजर टाकली, मनोभावे हात जोडले. दिव्याची वात थोडी पुढे केली. वात संपत आली होती. काहीच क्षणांची ती सोबती होती. ती कधीही विझू शकते. तेवढीच एक आशा हातात होती. ती एकदा विझली, की मग तिचा पराजय नक्की होता. तिने गडबड केली. दिवा अलगद उचलून हातात घेतला. एकदा हॉलकडे नजर टाकली. काही दिसते का ते बघू लागली. पण आता हॉलमध्ये शांतता पसरली होती. कदाचित ते कुठेतरी लपून बसले असावे. तिची देवघरातून बाहेर पडण्याची वाट बघत, कुठल्यातरी कोपऱ्यात दबा धरून बसले असावे.
तिने अलगद देवघराबाहेर पाऊल टाकले. एका हाताने दिवा झाकत, ती अलगद पावले टाकत, बेडरूमकडे जाऊ लागली. दिव्याच्या उजेडाचे वर्तुळ आजूबाजूला पसरू लागले. जिथपर्यंत प्रकाश जात होता, तिथपर्यंत काही हालचाल जाणवत नव्हती. पण त्या उजेडाच्या बाहेर त्या अंधारात काहीतरी इकडून तिकडे फिरू लागले. ते चिडलेले होते. ते क्रोधीत झाले होते. ते त्वेषाने फुत्कार टाकत होते. वेगाने इकडून तिकडे सरपटत होते. त्याची ती मिळमिळीत हालचाल तिला जाणवत होती. त्याची अनुभूती तिला येत होती. आपल्या हातात दिवा आहे, म्हणून आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव तिला झाली. ती बेडरुमच्या दरवाज्याजवळ आली. तिने एकदा आजूबाजूला नजर टाकली. अचानक कोपर्यात तिला काहीतरी हालचाल जाणवली. कोणीतरी त्या कोपऱ्यातून, वर भिंतीवर चढत होते. वर छताकडे जात होते. तिला भीतीने घेरले. लवकर आत जावे. दिवा विझत आला होता. त्याचा उजेड मंद होत होता. जसा जसा दिव्याचा प्रकाश मंद होत होता, तसे तसे ते तिच्याजवळ येत होते. ते छताकडे जात होते. तेथून ते तिच्यावर झडप घालायच्या तयारीत होते. दिवा काही क्षणात विझणार होता. तिने झटक्यात बेडरूमचा दरवाजा उघडला, आत गेली, आणि वेगाने तो आतून बंद केला. दिवा विझला होता. दाराबाहेर धडका बसत होत्या. त्याचे छोटे छोटे हात त्या दारावर धक्के मारू लागले. तिला आता भीतीने घेरले. दरवाजा तोडून ते आत आले तर? या प्रश्नाने तिला हैराण केले.
वातावरण क्षणाक्षणाने घनघोर होत होते. भीतीचा संसर्ग आजूबाजूला पसरत होता. तिच्या मनातील भय वाढत होते. आता त्याच्याशी प्रत्यक्ष सामना होणार होता. पण त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी, अजून तिच्यात आत्मविश्वास आला नव्हता. किंवा तिच्यात तेवढी शक्तीही नव्हती. ती खूप सामान्य होती त्याच्यापुढे. आता साधनेही कमी उरले होते. तिने काडेपेटी उघडून पाहिली. केवळ एक काडी त्यात शिल्लक होती. तिने पटकन मोबाईल उचलला. त्यात जेमतेम दहा टक्के चार्जिंग उरली होती. सगळं काही संपत आले होते. तिचा कंठ दाटून आला. सगळेच काही तिच्या विरोधी घडत होते. तिची भीती वाढू लागली. तिने मोबाईलच्या उजेडात तेलाच्या वाटीवर नजर टाकली. वाटीतले तेलही संपत आले होते. एकच काडी काडीपेटीतील शिल्लक होती. आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. जय ला फोन करावाच लागेल.
तिने क्षणाचाही वेळ न दवडता जयला फोन केला. एवढ्या रात्री तो झोपेत असेल तर? पण नाही! आपला फोन तो उचलणारच. असे विचार तिच्या डोक्यात फिरू लागले. पाचव्या रिंगलाच जयने फोन उचलला.
अशी सर्वसाधारण धारणा असणारा. तो विज्ञानाचा पदवीधर असूनही नैसर्गिक, अनैसर्गिक दोन्ही गोष्टींचे अस्तित्व मान्य करायचा. देव-राक्षस, ईश्वर-भूत, सज्जन-दुर्जन, पाप-पुण्य, प्रकाश-अंधार या दोन्ही विरोधी गोष्टी अस्तित्वात आहेत, यावर त्याचा ठाम विश्वास होता. प्रत्येक गोष्टला एक वैज्ञानिक उत्तर असते, मग ती गोष्ट या जगातली असो वा अन्य जगातील. तिची मूलभूत संरचना समजून घेतली तर तिचे समर्पक उत्तर मिळू शकते. पाणी, अग्नी, जमीन, आकाश यातच प्रत्येक सजीव, निर्जीव अस्त पावतो. सगळ्या समस्यांचे उत्तर या चार घटकांतून मिळते. तो या गोष्टी सिद्धही करून दाखवे. विविध प्रयोग, थेअरीज, प्रात्यक्षिके दाखवून तो त्याचे म्हणणे सिद्ध करून दाखवे. अॅबनॉर्मल ऍक्टिव्हिटी या विषयावरही त्याने अभ्यास केला होता. अनेक कादंबर्या, लेख, प्रबंध, पुरातन साधने यांच्या वाचनातून त्याने मानवी मर्यादे बाहेरील जगाचा अभ्यास केला होता. त्याच्या मते प्रत्येक गोष्टीला उत्तर असते. प्रत्येक समस्येला उपाय असतो. याच तत्वांनी त्याला प्रसिद्ध केले होते. कॉलेजात तो चांगलाच प्रसिद्ध होता. उमाचा अगदी जिवाभावाचा मित्र!!अनेक अडचणींमध्ये या आधीही त्याने उमाला मदत केली होती. अॅबनॉर्मल अॅक्टिविटी या विषयावरही त्याने अभ्यास केला होता.अनेक कादंबऱ्या, लेख, प्रबंध, पुरातन साधने यांच्या वाचनातून त्याला मानवी मर्यादेबाहेरील जगाचा अभ्यास होता व तो या गोष्टींवर विश्वास ठेवायचा.
जयचे नाव डोळ्यांसमोर येताच, तिला थोडा धीर आला. जय आपली मदत नक्कीच करू शकेल. त्याला इथल्या सगळ्या घडामोडी सांगितल्या, की तो त्यावर नक्कीच काहीतरी उपाय सांगेल.पण त्याला संपर्क करायला मोबाईल मिळवायला हवा. देवघरातून बाहेर पडणे म्हणजे मृत्यूला स्वतःहून ओढवून घेण्यासारखे होते. बेडरूम मधला मोबाईल काहीही करून हस्तगत करावा लागेल, पण बेडरूमचा दरवाजा बंद होता. नाही! नाही! तो बंद नव्हता, तो त्या शक्तीने बंद केला होता. कदाचित तो आता उघडा असेल. त्याच्या चेहऱ्यावर जळती काडी फेकली, तेव्हा त्याचे हात सैल झाले होते. म्हणजे त्याच वेळी दरवाजावरील त्याची शक्तीही, सैल झाली असेल. दरवाजा आता उघडा असेल. हो असणारच. आता काहीही करून मोबाईल मिळवावा लागेल. देवघरातील दिवा संथपणे जळत होता. त्या उजेडाचा परीघ आजूबाजूला पसरला होता. पण त्या परिघाबाहेरील काहीही डोळ्यासमोर दिसत नव्हते. बेडरूमचा दरवाजा हॉलला खेटूनच होता. कसेही करून बेडरूममधे जावे लागेल.
एव्हाना पावसाचा जोर अजून वाढला होता. साऱ्या वर्षभराचा पाऊस जसा काही आजच कोसळत होता. या सगळ्या समस्येला कारणीभूत हा पाऊस आहे. सगळ्या घडामोडी मागे या पावसाचाच हात आहे. तोच आज वैरी बनला आहे. पाऊस सृष्टीला नवचैतन्य देतो, असे आजपर्यंत वाटत होते, पण तोच पाऊस मला अचेतन करण्यावर टपला होता. याच पावसामुळे नवरा अडकून पडला. बाहेर कुठे मदत मागता येईना. सगळ्या समस्यांचे कारण हा पाऊस बनला आहे. लोकांना जीवन देणारा पाऊस, आज माझ्या मरणाचे कारण बनत आहे. तिच्या डोक्यात कसेही विचार येऊ लागले.
देवघरातील दिवा जळत आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. तोच एकमेव प्रकाशाचा स्रोत आहे. तो स्त्रोत विझला की, पुन्हा तो घनघोर अंधार. ते भितीदायक वातावरण. ते सरपटणारे. तेच ते तीन फुटांचे. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. देवाचा धावा करण्याचा तिने, कसोशीने प्रयत्न केला. परंतु जीचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला आहे, तिला देव तरी कसा विश्वास देणार. कृष्ण मंत्राची मिळालेली ऊर्जा कधीच आटून गेली होती. ती आता केवळ साधा मानवी देह उरली होती. बेडरूममध्ये जाण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागणार होता.
पण सर्वात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे बेडरूममध्ये कसे जाणार? देवघर सोडले तर सगळीकडे अंधार होता. आणि सर्वात मोठे संकट बेडरूमच्या दाराजवळ होते, ते तीन फुटाचे! हे सगळे अडथळे पार करून बेडरूममध्ये पोहोचावे लागणार होते. पण आता येथून बेडरूम मध्ये कसे जायचे? तिची भीती जरा दडपली होती. तिचा मेंदू काम करू लागला. तिला आश्चर्य वाटत होते, एवढ्या अशा प्रचंड भीतीतही ती अजून टिकून आहे. अजून स्वतःच्या पायावर सही सलामत उभी आहे. माणूस संकटात अजून मजबूत बनतो, याचा तिला आज प्रत्यय आला. बेडरूम मध्ये जाण्याचा काहीतरी मार्ग नक्की असेल. काहीतरी गोष्ट असेल, जी आपल्याला त्या संकटातून वाचवत, सहीसलामत बेडरूम मध्ये पोहोचवेल. त्यासाठी आधी त्या शक्तीची काहीतरी कमजोरी शोधावी लागेल. अशी काहीतरी गोष्ट, ज्याने त्याची शक्ती थोडी क्षीण होईल, तिचा दबाव थोडा कमी होईल, ते भीतीने मागे सरकेल, पण अशी कोणती गोष्ट असेल?
अचानक तिला त्या गोष्टीची जाणीव झाली. जेव्हा तिने प्रथम काडीपेटी पेटवली होती, तेव्हा त्या पेटत्या काडीचा उजेड, त्या तीन फुटाच्या शरीरावर पडला, तेव्हा त्याचा तिच्याकडे येण्याचा वेग कमी झाला होता. त्याच्या चेहर्यावर क्रोध दाटला होता. ते त्रासिक नजरेने तिच्याकडे पाहत होते. कदाचित ते त्या उजेडाला घाबरले होते. त्या उजेडाचा त्याला त्रास होत असावा. कदाचित ते उजेडात अनुकूल होत नसावे. त्याला अंधाराची सवय असावी. अंधारातच त्याचे अस्तित्व सक्रिय होत असावे. म्हणजे प्रकाश त्याची कमजोरी आहे. प्रकाशात ते थोडेसे निष्क्रिय होत असावे. त्याने जेव्हा तिचा गळा पकडला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तिने जळती काडी फेकली, तेव्हा काहीतरी जळाल्या सारखा चर्रर्रssss आवाज झाला होता. त्याने वेदनेने एक मोठी किंकाळी फोडली होती. म्हणजे नक्कीच त्याला प्रकाश सहन होत नसावा. प्रकाश जवळ असेल तर तो नक्कीच आपल्याला इजा करणार नाही. आपल्यापासून थोडेतरी दूर राहील. ती विचारचक्रात तशीच बुडून गेली. तिने मनात एक पक्का निर्धार केला. काहीही करून बेडरूममध्ये पोहोचावे लागणार होते.
तिने एकदा देव्हाऱ्यातील त्या देवाकडे नजर टाकली, मनोभावे हात जोडले. दिव्याची वात थोडी पुढे केली. वात संपत आली होती. काहीच क्षणांची ती सोबती होती. ती कधीही विझू शकते. तेवढीच एक आशा हातात होती. ती एकदा विझली, की मग तिचा पराजय नक्की होता. तिने गडबड केली. दिवा अलगद उचलून हातात घेतला. एकदा हॉलकडे नजर टाकली. काही दिसते का ते बघू लागली. पण आता हॉलमध्ये शांतता पसरली होती. कदाचित ते कुठेतरी लपून बसले असावे. तिची देवघरातून बाहेर पडण्याची वाट बघत, कुठल्यातरी कोपऱ्यात दबा धरून बसले असावे.
तिने अलगद देवघराबाहेर पाऊल टाकले. एका हाताने दिवा झाकत, ती अलगद पावले टाकत, बेडरूमकडे जाऊ लागली. दिव्याच्या उजेडाचे वर्तुळ आजूबाजूला पसरू लागले. जिथपर्यंत प्रकाश जात होता, तिथपर्यंत काही हालचाल जाणवत नव्हती. पण त्या उजेडाच्या बाहेर त्या अंधारात काहीतरी इकडून तिकडे फिरू लागले. ते चिडलेले होते. ते क्रोधीत झाले होते. ते त्वेषाने फुत्कार टाकत होते. वेगाने इकडून तिकडे सरपटत होते. त्याची ती मिळमिळीत हालचाल तिला जाणवत होती. त्याची अनुभूती तिला येत होती. आपल्या हातात दिवा आहे, म्हणून आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव तिला झाली. ती बेडरुमच्या दरवाज्याजवळ आली. तिने एकदा आजूबाजूला नजर टाकली. अचानक कोपर्यात तिला काहीतरी हालचाल जाणवली. कोणीतरी त्या कोपऱ्यातून, वर भिंतीवर चढत होते. वर छताकडे जात होते. तिला भीतीने घेरले. लवकर आत जावे. दिवा विझत आला होता. त्याचा उजेड मंद होत होता. जसा जसा दिव्याचा प्रकाश मंद होत होता, तसे तसे ते तिच्याजवळ येत होते. ते छताकडे जात होते. तेथून ते तिच्यावर झडप घालायच्या तयारीत होते. दिवा काही क्षणात विझणार होता. तिने झटक्यात बेडरूमचा दरवाजा उघडला, आत गेली, आणि वेगाने तो आतून बंद केला. दिवा विझला होता. दाराबाहेर धडका बसत होत्या. त्याचे छोटे छोटे हात त्या दारावर धक्के मारू लागले. तिला आता भीतीने घेरले. दरवाजा तोडून ते आत आले तर? या प्रश्नाने तिला हैराण केले.
वातावरण क्षणाक्षणाने घनघोर होत होते. भीतीचा संसर्ग आजूबाजूला पसरत होता. तिच्या मनातील भय वाढत होते. आता त्याच्याशी प्रत्यक्ष सामना होणार होता. पण त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी, अजून तिच्यात आत्मविश्वास आला नव्हता. किंवा तिच्यात तेवढी शक्तीही नव्हती. ती खूप सामान्य होती त्याच्यापुढे. आता साधनेही कमी उरले होते. तिने काडेपेटी उघडून पाहिली. केवळ एक काडी त्यात शिल्लक होती. तिने पटकन मोबाईल उचलला. त्यात जेमतेम दहा टक्के चार्जिंग उरली होती. सगळं काही संपत आले होते. तिचा कंठ दाटून आला. सगळेच काही तिच्या विरोधी घडत होते. तिची भीती वाढू लागली. तिने मोबाईलच्या उजेडात तेलाच्या वाटीवर नजर टाकली. वाटीतले तेलही संपत आले होते. एकच काडी काडीपेटीतील शिल्लक होती. आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. जय ला फोन करावाच लागेल.
तिने क्षणाचाही वेळ न दवडता जयला फोन केला. एवढ्या रात्री तो झोपेत असेल तर? पण नाही! आपला फोन तो उचलणारच. असे विचार तिच्या डोक्यात फिरू लागले. पाचव्या रिंगलाच जयने फोन उचलला.
"उमा, एवढ्या रात्री फोन केलास?"
त्याने फोन उचलल्या उचलल्या तिला प्रतिप्रश्न केला.
त्याने फोन उचलल्या उचलल्या तिला प्रतिप्रश्न केला.
" जय! जय! मी खूप मोठ्या संकटात सापडले आहे रे. मरणाच्या दारात उभी आहे मी. खूप कमी वेळ आहे रे माझ्याकडे. काय करावे काहीच कळेना.प्रचंड घाबरले आहे मी."
" उमा! उमा! आधी शांत हो. काय घडले ते आधी सांग. आपण मार्ग निश्चित काढू. फक्त तू आधी शांत हो. काही कळाल्याशिवाय आपण मार्ग तरी कसा काढणार? आणि असा धीर सोडू नकोस. काय झाले ते नीट सांग."
" जय, अरे मानवी संकट असते तर मी लढले असते. पण हे मानवी संकट नाही. काहीतरी अमानवी, एकदम अघोरी आहे ते. अवघ्या तीन फुटांचे संकट. एकदम थंड आणि लिबलिबीत."
" उमा, तुझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे असे तुला वाटते?"
" जय, खूप झाले तर, अजून एक तास मी त्याच्यापासून वाचू शकेल. एकदा का माझ्या जवळचे प्रकाशाचे साधन संपले की, माझा अंत झालाच म्हणून समज!"
" उमा, आता एक काम कर.मला प्रथम पासून सगळं काही सांग. अगदी एकही गोष्ट टाळू नकोस. सगळं सांग. पण अगदी कमी वेळात. आपल्याकडे वेळ कमी आहे."
"जय, याला सुरुवात संध्याकाळच्या सात-आठ च्या सुमारास झाली."
तिने जयला सगळे काही सांगायला सुरुवात केली. त्या गरम लहरी पासून, आत्ताच्या क्षणापर्यंत तिने सगळ्या घडामोडी जयला सांगितल्या. जय तिकडे शांतपणे ऐकून घेत होता. तिने एकेक छोट्यात छोटी गोष्ट त्याला सांगितली.काहीही सोडले नाही.
तिने जयला सगळे काही सांगायला सुरुवात केली. त्या गरम लहरी पासून, आत्ताच्या क्षणापर्यंत तिने सगळ्या घडामोडी जयला सांगितल्या. जय तिकडे शांतपणे ऐकून घेत होता. तिने एकेक छोट्यात छोटी गोष्ट त्याला सांगितली.काहीही सोडले नाही.
"जय, काहीतरी मार्ग काढ. तुझ्यावरच आशा आहे आता. खूप कमी साधने हातात उरली आहेत. एक काडी, दिव्यात थोडेसे तेल आणि मोबाईलमध्ये दहा टक्के चार्जिंग."
"हे बघ उमा, ते हवेद्वारे आतमध्ये आले, म्हणजे सूक्ष्म रूप धारण करणारा जीव आहे तो. तो मानवी नक्कीच नाही. ब्रह्मसमंध, प्रेत, पिशाच, गिर्हा, क्षेत्रपाल, शाकीनी, चेतन, जिन्न या कुठल्यातरी योनीतील ते असावे. पण ते खूप शक्तिशाली असावे. स्वतःला सूक्ष्म रुपात परिवर्तीत करू शकणारे ते, इतर अनेक शक्तीने परिपूर्ण असावे. तु ज्याप्रमाणे सांगितले कि, ते तीन फुटांचे उंच आहे. थंड आणि लिबलिबीत शरीराचे आहे. म्हणजे हेही रूप त्याने धारण केलेले असावे. ते त्याचे मूलभूत रूप नसावे. पण कुठल्यातरी रुपात दृश्यमान होण्यासाठी, त्याने ते बीभत्स रूप धारण केलेले असावे. मानवी दृष्टीला त्याचे ते रूप बिभत्स वाटत असेल. पण त्याच्या दृष्टीने ते सामान्य शरीर आहे. त्याच शरीरात राहून ते तुला मारण्याचा प्रयत्न करेल. स्वतःचे संरक्षण आणि त्याच्याशी निर्भीडपणे सामना, या दोन गोष्टी तुला त्यापासून वाचू शकणार आहेत."
" पण जय, हे माझ्याच वाट्याला का यावे? मी त्याचा काय अपराध केला आहे? पुन्हा वरून त्याने, उमा मी आलोयss हे शब्द का उच्चारावे? "
" उमा, तोच प्रश्न मी तुला आता विचारणार होतो. ते तुझ्याकडेच का आले? किंवा त्याने तुझे नाव का घेतले? याला काहीतरी कारण असावे. काहीतरी घटना त्याच्या पाठीमागे असावी. अशी काहीतरी घटना तुझ्या आजूबाजूला घडली असेल, की तिच्याशी तुझा काहीतरी संबंध आला असावा. दुरून किंवा जवळून, काही तरी संबंध आला असावा. अशी एखादी घटना जी मृत्यू, अपघात, घातपात क
संबंधी असावी. कोणाचातरी या पद्धतीने तुझ्या आसपास मृत्यू झाला असावा. या काही दिवसांमध्ये, तुझ्या आसपास कोणी मृत्यू पावले आहे का? तुझ्याशी काहीतरी त्याचा संबंध असावा, असे कोणी या काळात गेले आहे का? तो संबंध चांगला, वाईट कसाही असू शकतो. काहीतरी आठव. काहीतरी नक्कीच कारण असेल. ते तुला आठवावे लागेल."
संबंधी असावी. कोणाचातरी या पद्धतीने तुझ्या आसपास मृत्यू झाला असावा. या काही दिवसांमध्ये, तुझ्या आसपास कोणी मृत्यू पावले आहे का? तुझ्याशी काहीतरी त्याचा संबंध असावा, असे कोणी या काळात गेले आहे का? तो संबंध चांगला, वाईट कसाही असू शकतो. काहीतरी आठव. काहीतरी नक्कीच कारण असेल. ते तुला आठवावे लागेल."
तीने काहीतरी आठवायचा प्रयत्न केला. आपल्या संबंधित कोणाचा मृत्यू, अलीकडील काळात झाला, हे तिला त्या भीतीमुळे काहीच आठवेना. आणि अचानक तिला आठवले.
तिच्या इमारतीचा तो वॉचमन! तिच्या अंगावर सरसरून काटा आला.
तिच्या इमारतीचा तो वॉचमन! तिच्या अंगावर सरसरून काटा आला.
"जय, आता मला आठवले. तो वॉचमन आहे. हो तोच! तोच असणार! आमच्या इमारतीखाली असायचा तो. जाता-येता माझ्याकडे बघायचा. हपापल्या नजरेने. त्याच्या नजरेत नेहमी वासना असायची. एकदा संध्याकाळच्या वेळी, मी इमारतीत जात असताना, त्याने मला मुद्दाम धक्का दिला. माझ्या डोक्यात सणक गेली. मी त्याच्या गालात दोन तीन फटके ठेऊन दिले. आजूबाजूच्या माणसांनीही त्याला बेदम चोप दिला. पण त्याने हात पाय जोडून माझी माफी मागितली, तेव्हा ते प्रकरण तिथेच मिटले. पण त्याच्या नजरेतील ती वासना कधीच मिटली नाही. त्या दिवसापासून त्याच्या नजरेत माझ्याविषयी प्रचंड क्रोध दिसत होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. पण अचानक पाच दिवसांपूर्वी, जेव्हा नुकताच पाऊस सुरु झाला होता, तेव्हा इमारतीच्या खालील विजेच्या सब स्टेशनला स्पर्श होऊन तो मृत्यू पावला. याच इमारतीच्या खाली त्याचा मृत्यू झाला. तो कुठला होता, कुठून आला होता, हे काहीच माहीत नव्हते. या इमारतीच्या पाठीमागील बाजूस स्मशानभूमी आहे, तिथे त्याला पुरले होते. दफन केले होते. पाच दिवसांपूर्वीच तो मेला होता."
"उमा,आता ऐक! हे जे काही आहे, ते वॅाचमनचेच मृत सत्त्व आहे. मरणानंतरचा अंश आहे. त्याची इच्छा अतृप्त आहे. तू त्याला मारले, तेव्हा त्याची वासना क्रोधात परिवर्तित झाली. तो तुझ्यावर चिडला होता. तुझ्या मारण्याचा सूड घेण्यासाठी तो आला आहे. पाच दिवसापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याला दफन केले होते. पावसाचा जोर वाढल्याने, त्याला ज्या ठिकाणी दफन केले असेल, तिथे पावसाचे पाणी शिरले असेल. त्या पाण्याने त्याचा अंश मोकळा झाला असेल. पाणी त्याला कदाचित अनुकूल असेल. त्या पाण्याचा आधार घेऊनच, तो त्याच्या थडग्यातून बाहेर आला असेल.
आपल्या पुरातन शास्त्रानुसार, प्रत्येक गोष्टीचा एक विधी असतो. तो विधी ती गोष्ट करताना पूर्ण व्हायला हवा. नाहीतर काहीतरी अघटीत घडण्याची शक्यता असते. विधी म्हणजे एक प्रकारे, त्या प्रत्येक गोष्टीचे समाधान असते. त्या विधीने ती प्रत्येक गोष्ट समाधान पाहते. लग्नात विधिवत मंत्रपठण केले जाते, नवीन घर बांधल्यावर वास्तुदोष राहू नये म्हणून सत्यनारायणाची पूजा केली जाते, काही विशिष्ट वयात मुंज केली जाते, या सगळ्या विधी त्या त्या घटकांच्या समाधानासाठी असतात. जेणेकरून त्यात कुठले विघ्न येऊ नयेत.त्यातील घटक त्या विधींनी संतुष्ट होतात. अगदी तसेच, माणूस मरण पावतो तेव्हा, त्याचा अंत्यविधी व्हायला हवा. सामान्य पद्धतीने का होईना पण तो व्हायला हवा. तरच मरणानंतर त्या माणसाला समाधान मिळते. तो अतृप्त राहत नाही. तृप्त मनाने तो जगाचा निरोप घेतो. काही इच्छा असेल, तर ती अंत्यविधी त्याची इच्छा पूर्ण करते. तो समाधान पावतो. परंतु हा वॉचमन मेला तेव्हा, असा कुठला विधी केलाच नसेल. तो परका आहे, तो साधारण माणूस आहे म्हणून त्याचा काहीच अंत्यविधी न करता, त्याला तसेच दफन केले असेल. त्यामुळे तो असमाधानात मृत्यू पावला. त्याची इच्छा अतृप्त राहिली. आणि आता तो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडे आला आहे. त्या तीन फुटाच्या रूपात त्याच्या त्या शरीरात आता वासना, क्रोध, सूड या भावना उसळत असतील. तुझ्यावर तो प्रचंड क्रोधित असेल. आता त्याचा सामना तुला खंबीरपणे करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचे, तुला त्याच्यासोबत लढताना त्याची कमजोरी शोधावी लागेल. त्या कमजोरीचा शोध घे. त्या कमजोरीच्या सहाय्याने आपण त्याचा अंत करू शकतो."
आपल्या पुरातन शास्त्रानुसार, प्रत्येक गोष्टीचा एक विधी असतो. तो विधी ती गोष्ट करताना पूर्ण व्हायला हवा. नाहीतर काहीतरी अघटीत घडण्याची शक्यता असते. विधी म्हणजे एक प्रकारे, त्या प्रत्येक गोष्टीचे समाधान असते. त्या विधीने ती प्रत्येक गोष्ट समाधान पाहते. लग्नात विधिवत मंत्रपठण केले जाते, नवीन घर बांधल्यावर वास्तुदोष राहू नये म्हणून सत्यनारायणाची पूजा केली जाते, काही विशिष्ट वयात मुंज केली जाते, या सगळ्या विधी त्या त्या घटकांच्या समाधानासाठी असतात. जेणेकरून त्यात कुठले विघ्न येऊ नयेत.त्यातील घटक त्या विधींनी संतुष्ट होतात. अगदी तसेच, माणूस मरण पावतो तेव्हा, त्याचा अंत्यविधी व्हायला हवा. सामान्य पद्धतीने का होईना पण तो व्हायला हवा. तरच मरणानंतर त्या माणसाला समाधान मिळते. तो अतृप्त राहत नाही. तृप्त मनाने तो जगाचा निरोप घेतो. काही इच्छा असेल, तर ती अंत्यविधी त्याची इच्छा पूर्ण करते. तो समाधान पावतो. परंतु हा वॉचमन मेला तेव्हा, असा कुठला विधी केलाच नसेल. तो परका आहे, तो साधारण माणूस आहे म्हणून त्याचा काहीच अंत्यविधी न करता, त्याला तसेच दफन केले असेल. त्यामुळे तो असमाधानात मृत्यू पावला. त्याची इच्छा अतृप्त राहिली. आणि आता तो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडे आला आहे. त्या तीन फुटाच्या रूपात त्याच्या त्या शरीरात आता वासना, क्रोध, सूड या भावना उसळत असतील. तुझ्यावर तो प्रचंड क्रोधित असेल. आता त्याचा सामना तुला खंबीरपणे करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचे, तुला त्याच्यासोबत लढताना त्याची कमजोरी शोधावी लागेल. त्या कमजोरीचा शोध घे. त्या कमजोरीच्या सहाय्याने आपण त्याचा अंत करू शकतो."
"जय, त्याची कमजोरी काय आहे, ते मी ओळखलेय. ते अग्नीला घाबरते. उजेडात ते थोडे थोडे निष्क्रिय होते. अंधार त्याला अनुकूल आहे. पण प्रकाश त्याची कमजोरी आहे."
"उमा, प्रत्येक गोष्ट अग्नी, पाणी, आकाश, जमीन यातच नष्ट होते. यालाही अग्नीत मरण आहे. स्वतःवर विश्वास ठेव. स्वत:वर विश्वास ठेवणाऱ्या माणसालाच, ईश्वर मदत करतो. तो कधीच डळमळीत होऊ देऊ नकोस. स्वतःवर, अग्नीवर, देवावर विश्वास ठेव. तो अग्निच तुझे शस्त्र बनणार आहे.
"अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम ! प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम."
अग्निहोत्र विधी हेच सांगतो.आगीत सगळे अस्त पावते. तुझा शत्रूही नष्ट पावेल. विश्वास ठेव."
"अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम ! प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम."
अग्निहोत्र विधी हेच सांगतो.आगीत सगळे अस्त पावते. तुझा शत्रूही नष्ट पावेल. विश्वास ठेव."
फोनने मान टाकली. चार्जिंग संपली होती. आतापर्यंत आधार देणारा, जयचा आवाज थांबला होता. तिला कसेतरी झाले. एकदम एखादा आधार काढून घ्यावा तसे झाले. पण जयने मोठा विश्वास दिला होता. लढण्याचे बळ दिले होते. हा स्वतःवरचा विश्वास आता डळमळून चालणार नाही.तो तसाच ठेवावा लागणार.
''ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।। प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।''
तिने मंत्र पुटपुटला. तिला थोडे समाधान वाटले .ती जरा सावरली. मनात काही आकडेमोड केली. काहीतरी योजना बनवली. काही साधने, हत्यारे बनवावे लागतील. आहे त्या वस्तूंचा वापर करावा लागेल. फक्त हिम्मत कायम ठेवायची. काही होऊ.
हॉलमधील अंधारात ते बसले होते. या कोपर्यातून त्या कोपऱ्यात हालचाल करत होते. त्याच्यातील क्रोध, वासना वाढत होती. सूडाने त्याच्या अंगात शक्ती निर्माण केली. जोपर्यंत अंधार होता तोपर्यंत ते शक्तिशाली होते. ते वाट बघत होते तिच्या बाहेर येण्याची. नाहीतर दरवाजा तोडून आत जाण्याची संधी शोधत होते. ते स्वस्थ नव्हते. त्याची हालचाल सुरू होती. त्याचीही योजना होती. तेही सक्रिय होते.
बेडरूम मध्ये अंधार होता. दिवा पेटवायचा होता, पण काडेपेटीत एकच काडी होती.ती काडी व्यर्थ घालवावी असे तिला वाटेना. त्या काडीचा आपल्याला काहीतरी उपयोग होऊ शकतो, असे तिचे मन तिला सांगत होते. अचानक तिला काहीतरी जाणवल. काही तरी सूक्ष्म हालचाल जाणवली. काहीतरी खर्जातला आवाज अस्पष्टपणे येऊ लागला. तो आवाज, ती गरम हवा जाणवू लागली. गरम हवेचा झोत चोहोबाजूंनी अंगाला झोंबू लागला. हसण्याचे, रडण्याचे, हेल काढण्याचे, किंचाळण्याचे, चिडवण्याचे आवाज येऊ लागले. आणि बेडरूमचे दार किलकिले झाले. सरपटण्याचा आवाज येऊ लागला. फक्त आवाज. अंधारात काहीच दिसेना. पण तिला माहित होते ते तेच होते. ते तीन फुटाचे. आपल्या इवल्याशा पावलांनी ते सरपटत येत होते. आता ती मुळापासून घाबरली. बेडरूम तिला सुरक्षित वाटत होते पण, ते बेडरूम मध्ये आले होते. आता ती हताश झाली. लवकर काय करावे कळेना. बेडरूमचा दरवाजा पुर्ण उघडला होता. ते तिच्याच दिशेने येत होते. आता त्याला आवाज होता. शब्द होते.
''ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।। प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।''
तिने मंत्र पुटपुटला. तिला थोडे समाधान वाटले .ती जरा सावरली. मनात काही आकडेमोड केली. काहीतरी योजना बनवली. काही साधने, हत्यारे बनवावे लागतील. आहे त्या वस्तूंचा वापर करावा लागेल. फक्त हिम्मत कायम ठेवायची. काही होऊ.
हॉलमधील अंधारात ते बसले होते. या कोपर्यातून त्या कोपऱ्यात हालचाल करत होते. त्याच्यातील क्रोध, वासना वाढत होती. सूडाने त्याच्या अंगात शक्ती निर्माण केली. जोपर्यंत अंधार होता तोपर्यंत ते शक्तिशाली होते. ते वाट बघत होते तिच्या बाहेर येण्याची. नाहीतर दरवाजा तोडून आत जाण्याची संधी शोधत होते. ते स्वस्थ नव्हते. त्याची हालचाल सुरू होती. त्याचीही योजना होती. तेही सक्रिय होते.
बेडरूम मध्ये अंधार होता. दिवा पेटवायचा होता, पण काडेपेटीत एकच काडी होती.ती काडी व्यर्थ घालवावी असे तिला वाटेना. त्या काडीचा आपल्याला काहीतरी उपयोग होऊ शकतो, असे तिचे मन तिला सांगत होते. अचानक तिला काहीतरी जाणवल. काही तरी सूक्ष्म हालचाल जाणवली. काहीतरी खर्जातला आवाज अस्पष्टपणे येऊ लागला. तो आवाज, ती गरम हवा जाणवू लागली. गरम हवेचा झोत चोहोबाजूंनी अंगाला झोंबू लागला. हसण्याचे, रडण्याचे, हेल काढण्याचे, किंचाळण्याचे, चिडवण्याचे आवाज येऊ लागले. आणि बेडरूमचे दार किलकिले झाले. सरपटण्याचा आवाज येऊ लागला. फक्त आवाज. अंधारात काहीच दिसेना. पण तिला माहित होते ते तेच होते. ते तीन फुटाचे. आपल्या इवल्याशा पावलांनी ते सरपटत येत होते. आता ती मुळापासून घाबरली. बेडरूम तिला सुरक्षित वाटत होते पण, ते बेडरूम मध्ये आले होते. आता ती हताश झाली. लवकर काय करावे कळेना. बेडरूमचा दरवाजा पुर्ण उघडला होता. ते तिच्याच दिशेने येत होते. आता त्याला आवाज होता. शब्द होते.
"मला मारतेस. माझ्यासारख्या पुरुषाने तुझ्यासारख्या मादक तरुणीकडे पाहणे पाप आहे का ? ते पाप असेल तर, मला ते पाप करायचे होते.तेव्हा ते करण्याचा प्रयत्न केला. पण तू मारलेस मला. त्या सगळ्या लोकांनी मारले मला. नाही सोडणार मी तुला. तेव्हा जे जमले नाही ते आता करणार. तुझा भोग घेणार. त्यानंतर तुझा जीव घेणार. मी आलोय. आता माझे रूप बघ. शरीर बघ. केवढे सुंदर आहे! अतिसुंदर! बघ बघ ! जरा ये, इकडे ये ये. नाहीतर थांब मीच येतो! अगदी सरपटत, सरपटत येतो!"
त्याचे शब्द शिशासारखे तिच्या कानात गेले. तो वॉचमनच होता. तो मृत्यू देणार होता. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. सगळे शांत झाले. अचानक तिच्या कमरेला त्या इवल्या इवल्या हातांनी मिठी मारली. ते पाठीमागून आले होते. तिच्या सर्वांगावर शहारा आला. ते आनंदाने फुत्कारत होते. त्याचे हात कमरेभोवती घट्ट होते. तिने एक मोठा झटका मारला. त्याचे हात ढिले पडले. तेवढ्यात ती त्याच्या मिठीतून सुटून दरवाज्याकडे पळाली. पण हे काय, आता ते तिच्या पाठीमागेच पळत होते. त्या दुडूदुडू पळण्याचा आवाज तिला येऊ लागला. ती हॉलमध्ये आली. इकडून तिकडे पळू लागली. तेही तिच्यापाठी मागे पळू लागले. ते आता भिंतीवर चढू लागले. छताला लटकू लागले. तिला भीती दाखवू लागले. तिला काहीच कळेना. काय करावे? पण तिला काहीतरी आठवले. जयचे शब्द आठवले. त्याचे ते धीराचे बोलणे आठवले. 'स्वतःवर विश्वास ठेव. तोच तुला या लढाईत जिंकून देईल.' हे शब्द तीच्या मनःपटलावर उमटले.
ती तशीच किचनकडे धावली. वाटेत देवघर होते. ती त्या देवघराजवळ थांबली, पण देवघरात अंधार होता. तिला वाटले आता ते देवघरात येणार नाही पण, ते देवघराकडे येत होते. तिला जाणीव झाली, आपली शक्ती क्षीण होत आहे. देवही आता आपल्या मदतीला येणार नाही. देवघर सुन्न पडले होते. त्यातील देवही निष्क्रिय झाले होते. ते तसेच पुढे होत देवघरात आले. आता मात्र तीचे ञाण गळाले. ती हतबल झाली. ती पुन्हा देवघरातून तशीच किचनमध्ये आली. तेही किचनमध्ये आले. आता पळायला कुठेच जागा उरली नव्हती. किचनच्या दरवाज्यावर ते होते. अगदी अंधुक अंधुक दिसत होते. अंगावरच्या पांढऱ्या मांसामुळे दिसत तरी होते. ती मागे मागे सरकत होती पण, पाठीला पाठीमागची भिंत लागली. आता मागे सरकायला जागा उरली नव्हती. पाठीमागे भिंत, पुढे ते आणि त्या दोन्हीमध्ये अडकलेली ती! ती हताश झाली. नकारात्मक विचार मनात पिंगा घालू लागले. ते फिदीफिदी हसत होते. आपले छोटे छोटे हात ते पुढे करू लागले. तिच्यावर झडप घालण्याची तयारी करू लागले. आता मात्र निर्वाणीचा क्षण होता. हीच शेवटची संधी होती. काहीतरी हालचाल करावी लागणार होती. असं मरण त्याच्या हातात देण्यापेक्षा, त्याच्याशी दोन हात करून मरू. तिचे मन हळूहळू ताळ्यावर येऊ लागले. जयचे शब्द आठवू लागले. स्वतःवरचा विश्वास वाढू लागला. देवावरची श्रद्धा साथ देऊ लागली. स्वतःची शक्तिस्थाने कळू लागली. त्याची कमजोरी दिसू लागली. देवघर प्रकाशमान होताना दिसू लागले. ते हळूहळू पावले टाकत तिच्याकडे येत होते. ती झटक्यात डावीकडे सरकली. मनात तीने काही अंदाज बांधले. गॅसच्या जवळ मघाशी ठेवलेली, ती गोडेतेलाची कॅन तिने उचलली. एव्हाना ते जवळ आले होते. अगदी दोन फूटांवर. त्याचे ते हिडीस शरीर हलत होते. फुत्कारत होते. आणि अचानक ते गडबडले. त्याच्या अंगावर गोडेतेल पडले होते. तिने ती सगळी गोड्या तेलाची कॅन, त्याच्या त्या तीन फुटाच्या शरीरावर ओतली होती. हातात काडेपेटी होती. पण त्यात केवळ एकच काडी होती. ती एक काडीच तिचे सर्वात मोठे शस्ञ होते. तिने पुन्हा एकदा विचार केला आणि झटक्यात गॅस फिरवला. गॅस सुरू झाला. पटकन ती एकमेव काडी तिने पेटवली. गॅसवर धरली. गॅस पेटला होता, त्याची संथ जळणारी ज्योत दिसत होती. ते अजूनही गडबडलेले होते. तिने मघाशी वात करायला घेतलेले कापड हातात घेतले. ते गॅसवर धरले. क्षणात ते पेटले.तिने ते तसेच हातात घेतले. ओठात श्रीकृष्णाचा मंत्र पुटपुटला. जयचा चेहरा डोळ्यांसमोर आणला.तिच्या चेहर्यावर आत्मविश्वास आला. डोळ्यांत अंगार फुलला. आणि तिने ते कापड त्याच्या अंगावर फेकले.
चर्रर्रssssss असा जोरात आवाज झाला. त्या पाठोपाठ एक मोठी किंकाळी बाहेर पडली. ते तीन फुटाचे पेटले होते. त्याला वेदना होत होत्या. ते तडफडत होते. चर्रर्रssअसा आवाज वाढत होता. अग्नीवर मांस भाजावे तसा आवाज येऊ लागला. गंध येऊ लागला. ते जळत होते. ते भाजत होते. ते मरत होते. त्याच्या किंकाळ्या वाढत होत्या. पण त्या किंकाळीला ती आता घाबरली नाही. ती आता खंबीर होती. तिच्या ओठात कृष्णाचा जप सुरू होता.
एक मोठा फट्sssssss असा आवाज झाला. त्याचे शरीर संपले होते. शरीरातून काहीतरी धुसर आकृती बाहेर पडून त्या हवेत ती विरून गेली. त्याचा अंश असावा. तो हवेत विरून गेला होता. त्याला अग्नी मिळाला होता. तो मुक्त झाला होता. खाली काहीच अवशेष शिल्लक राहिला नाही. ते संपले होते. अगदी कायमचे!!
सकाळ प्रसन्न करणारी होती. पाऊस, वारा थांबला होता. फटफटीत कोवळे ऊन पडले होते.तिचा नवरा घरी आला.आल्याआल्या त्याच्या मिठीत पडून ती मनसोक्त रडली. ती का रडते हे तिच्या नवर्याला कधीच कळले नसते. मात्र त्या मिठीत तिला जयचा चेहरा आठवला.तिच्या जिवाभावाच्या जयचा...!
ती तशीच किचनकडे धावली. वाटेत देवघर होते. ती त्या देवघराजवळ थांबली, पण देवघरात अंधार होता. तिला वाटले आता ते देवघरात येणार नाही पण, ते देवघराकडे येत होते. तिला जाणीव झाली, आपली शक्ती क्षीण होत आहे. देवही आता आपल्या मदतीला येणार नाही. देवघर सुन्न पडले होते. त्यातील देवही निष्क्रिय झाले होते. ते तसेच पुढे होत देवघरात आले. आता मात्र तीचे ञाण गळाले. ती हतबल झाली. ती पुन्हा देवघरातून तशीच किचनमध्ये आली. तेही किचनमध्ये आले. आता पळायला कुठेच जागा उरली नव्हती. किचनच्या दरवाज्यावर ते होते. अगदी अंधुक अंधुक दिसत होते. अंगावरच्या पांढऱ्या मांसामुळे दिसत तरी होते. ती मागे मागे सरकत होती पण, पाठीला पाठीमागची भिंत लागली. आता मागे सरकायला जागा उरली नव्हती. पाठीमागे भिंत, पुढे ते आणि त्या दोन्हीमध्ये अडकलेली ती! ती हताश झाली. नकारात्मक विचार मनात पिंगा घालू लागले. ते फिदीफिदी हसत होते. आपले छोटे छोटे हात ते पुढे करू लागले. तिच्यावर झडप घालण्याची तयारी करू लागले. आता मात्र निर्वाणीचा क्षण होता. हीच शेवटची संधी होती. काहीतरी हालचाल करावी लागणार होती. असं मरण त्याच्या हातात देण्यापेक्षा, त्याच्याशी दोन हात करून मरू. तिचे मन हळूहळू ताळ्यावर येऊ लागले. जयचे शब्द आठवू लागले. स्वतःवरचा विश्वास वाढू लागला. देवावरची श्रद्धा साथ देऊ लागली. स्वतःची शक्तिस्थाने कळू लागली. त्याची कमजोरी दिसू लागली. देवघर प्रकाशमान होताना दिसू लागले. ते हळूहळू पावले टाकत तिच्याकडे येत होते. ती झटक्यात डावीकडे सरकली. मनात तीने काही अंदाज बांधले. गॅसच्या जवळ मघाशी ठेवलेली, ती गोडेतेलाची कॅन तिने उचलली. एव्हाना ते जवळ आले होते. अगदी दोन फूटांवर. त्याचे ते हिडीस शरीर हलत होते. फुत्कारत होते. आणि अचानक ते गडबडले. त्याच्या अंगावर गोडेतेल पडले होते. तिने ती सगळी गोड्या तेलाची कॅन, त्याच्या त्या तीन फुटाच्या शरीरावर ओतली होती. हातात काडेपेटी होती. पण त्यात केवळ एकच काडी होती. ती एक काडीच तिचे सर्वात मोठे शस्ञ होते. तिने पुन्हा एकदा विचार केला आणि झटक्यात गॅस फिरवला. गॅस सुरू झाला. पटकन ती एकमेव काडी तिने पेटवली. गॅसवर धरली. गॅस पेटला होता, त्याची संथ जळणारी ज्योत दिसत होती. ते अजूनही गडबडलेले होते. तिने मघाशी वात करायला घेतलेले कापड हातात घेतले. ते गॅसवर धरले. क्षणात ते पेटले.तिने ते तसेच हातात घेतले. ओठात श्रीकृष्णाचा मंत्र पुटपुटला. जयचा चेहरा डोळ्यांसमोर आणला.तिच्या चेहर्यावर आत्मविश्वास आला. डोळ्यांत अंगार फुलला. आणि तिने ते कापड त्याच्या अंगावर फेकले.
चर्रर्रssssss असा जोरात आवाज झाला. त्या पाठोपाठ एक मोठी किंकाळी बाहेर पडली. ते तीन फुटाचे पेटले होते. त्याला वेदना होत होत्या. ते तडफडत होते. चर्रर्रssअसा आवाज वाढत होता. अग्नीवर मांस भाजावे तसा आवाज येऊ लागला. गंध येऊ लागला. ते जळत होते. ते भाजत होते. ते मरत होते. त्याच्या किंकाळ्या वाढत होत्या. पण त्या किंकाळीला ती आता घाबरली नाही. ती आता खंबीर होती. तिच्या ओठात कृष्णाचा जप सुरू होता.
एक मोठा फट्sssssss असा आवाज झाला. त्याचे शरीर संपले होते. शरीरातून काहीतरी धुसर आकृती बाहेर पडून त्या हवेत ती विरून गेली. त्याचा अंश असावा. तो हवेत विरून गेला होता. त्याला अग्नी मिळाला होता. तो मुक्त झाला होता. खाली काहीच अवशेष शिल्लक राहिला नाही. ते संपले होते. अगदी कायमचे!!
सकाळ प्रसन्न करणारी होती. पाऊस, वारा थांबला होता. फटफटीत कोवळे ऊन पडले होते.तिचा नवरा घरी आला.आल्याआल्या त्याच्या मिठीत पडून ती मनसोक्त रडली. ती का रडते हे तिच्या नवर्याला कधीच कळले नसते. मात्र त्या मिठीत तिला जयचा चेहरा आठवला.तिच्या जिवाभावाच्या जयचा...!
*(समाप्त)
अभिप्राय नक्की कळवा.
वैभव नामदेव देशमुख.