झटेतलं चांदणं 🔖 भाग ::-- नववा
ज्या पमन पद्मास पाटावर बसवत प्रशांत शिल्पासमोर दोन्ही बाजुच्या कळा दाखवू पाहत होता; तो पमन व पद्मा माया जीव तोडत होती तरी दोन्ही अंतरातल्या कळांनी बेजार होत एक दिड वर्षांपासून मागच्या दु:खानाच कवटाळून बसलेली होती.
.
.
चाळीसगावचे मनिष निकम कांदिवलीस काॅलेजला प्राध्यापक होते. चाळीसगावला बरीच शेती .सुखवस्तू कुटूंब व दूरचं असलं तरी नात्यातलं. पमनचा विस्कोट झाला. प्रतापरावांनी तातडीनं निर्णय घेत मायाचे हात पिवळे केले. माया कांदिवलीला गेली. लग्नात पद्मानं सारं आवरत ताराबाईला मदत केली. माया जातांना आपला आतेभाऊ असला तरी पाठच्या भावापेक्षाही जास्त प्रेम असणाऱ्या पम्याकडं पाहून रडू लागली. पद्माकडं पाहून तर तिला हमसून हमसून रडू फुटलं. जातांना दोघाकडं पाहत न सुटणारं कोडं उरात घेत ती गेली.
मनिष निकमनं मायाचं राहिलेलं शिक्षण चालू ठेवलं. समंजस स्वभावाच्या मायास एकदम सालस, मायाळू जोडीदार मिळाला.
पमनला सुबोध राणे, रस्तोगी व इतर निर्देशक व निर्मात्याकडुनही सतत मागणी होऊ लागली. 'अंतरीच्या कळा' तून उभरलेला व पहिल्याच चित्रपटातील यशानं "' रायझिंग स्टार इन सिंगीग' म्हणुन दोघांचं नाव झालं. बाॅलीवुडमध्ये प्रत्येकाच्या तोंडी त्यांची नावं व गाणी घोळू लागली. पण शिल्पा तर अचानक गायब झाल्यागतच. सुलभा बहिणीकडून सुबोध राणेंनी सारी माहिती काढत घरच्यांशी संपर्क केला. पण कदम सर व सोमा पोवारांनी शिल्पानं लग्न करत गायन कायमचं सोडत परदेशात स्थायिक झाल्याचं सांगत सुबोधला कटवलं. रस्तोगीनं चित्रपटानं अपेक्षेपेक्षाही केवळ संगितामुळं जास्त गल्ला गोळा केल्यानं व आगामी चित्रपटात काम करावं म्हणून पमनला बुगाट्टी कार व मुंबईस फ्लॅट देत खुश करण्यास सुबोधला सांगितलं. पण पमन या साऱ्या पासून दूर दूर जाऊ पाहत होता. सुलभा मॅडमनं सुबोधला मुंबईतच राहणाऱ्या मायास भेटावयास लावलं. मायानं पमनला मुंबईस बोलवलं. मनिष निकम तर पमनच्या गाण्याचा फॅनच झाला. पमनमागं प्रसिद्धीचा झ्योत वळत गराडा वाढला. रस्तोगीनं मोठं सेलीब्रेशन ठेवलं. पमनचा जीव गुदमरू लागला. त्याला मागं मागं फिरणारे बेगडी चेहरे वीट आणू लागले. पण केवळ माया सांगतेय म्हणुन तो कसा बसा आला होता. तो सहसा काहीच न बोलता मनिष निकमच त्याच्या ऐवजी बोलत वेळ निभावू लागला. रस्तोगीनं त्याच्या समोर नाही शिल्पा तर इतर प्रथितयश गायिकेसोबत पुढच्या चित्रपटासाठी गायनासाठी विनवलं. पमननं तूर्तास माझी इच्छा नसल्यासं सांगत विनंती करत रस्तोगीस नम्रतेने नकार दिला. पण रस्तोगी ऐकेना.
फ्लॅटचा ताबा माया व निकम सरांनी घेत पमनला कारचे क्लास लावले. रस्तोगीनं पमननं निदान एक गाणं तरी चित्रपटात गावं या साठी राजी केलं.
मायास प्रतापरावांचा फोन आला तशी माया, पमन, निकम सर सारे परस्पर गडचिरोलीस निघाले. पद्मा ,मारोती, प्रतापराव, व सदा आबा हे आर्डीहून निघाले. गडचिरोलीहून लवकरात लवकर त्यांना बोलवलं होतं.
एका नक्षलीच्या ठाण्यावर हल्ला करत बऱ्याच नक्षलींना कंठस्नान घालत दोन नक्षलींना लष्करानं जिवंत पकडलं होतं. हे नक्षली पोलीस ठाणे, वनखात्यातील अधिकाऱ्यांना टारगेट करत प्रशासनास जेरीस आणत होते. जिवंत पकडलेल्या नक्षलींना लष्कर अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेत मागील त्यांच्या कारवायाबाबत बोलतं केलं. आपले सारे म्होरकेच गेल्यानं या दोन्ही नक्षलींनी टिकाव न धरता मागील साऱ्या कारवायाबाबत कबुली दिली. पोलीस अधिकारी वन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, यांचं अपहरण करत कुणास कसं संपवलं सारं सारं कळू लागलं. परकीय देशातील काही संघटनांकडून कशी मदत मिळते त्याबाबतही माहिती दिली. अनंत जगताप यास लग्नानंतर उचलत गडचिरोलीत आणत संपवल्याची माहिती ही त्यातच उजेडात आली. अड्ड्याच्या मागच्या दफन केलेल्या जागा उकरत हाडांचे सांगाडे काढले केले. नातेवाईकांना बोलवत उकरतांना निघालेल्या दागिन्यावरून ओळख होऊ लागली. नक्षल्यांनी काही नावासहीत कोणत्या जागेवर कुणास दफन केलं ही माहिती दिली. पद्माच्या सासुनं मुलाचे दागिने व मारोतीनं लग्नात केलेली साखळी व अंगठीची पावती दाखवताच ओळख पटली. ओळख पटताच सासुनं हंबरडा फोडला. पद्मा मायास बिलगली. जी पुसटशी आशा होती तिच मावळत सारं निवळलं. पद्मा तर ज्याच्याशी काही तासाची लग्नापुरती गाठ पडली त्याच्या नावानं काय रडणार? पण निटीलावर रेखलेल्या कुंकवासाठी म्हणा वा समाजमान्य विवाहसंस्थेचा पगडा म्हणा दु:ख तर होणारच. अनंत जगताप साठी परदेशातून सुपारी असल्याची माहिती मिळाली पण कोणी याबाबत जिवंत नक्षलींना सांगता येईना. मारल्या गेलेल्या म्होरक्यासोबत ते नाव राजच राहिलं.
सारा काडी मोड करत मारोतीनं दुःखद अंत:करणानं भाचीस आर्डीस आणलं. एका वर्षाच्या आतच उभा न राहिलेला संसार मोडला.
माया पद्मासोबत आर्डीस आली. दोन चार दिवस आर्डीस राहिली. पण लगेच विषय काढणं संयुक्तिक वाटेना. तरी पण मायानं मळ्यात सहज पम्यास नेलं व पद्माबाबत छेडलंच.
मळ्यात नुकताच आषाढ झरला तशा किरकोळ पेरण्या आटोपल्या होत्या. कोवळे कोवळे कोंळ आपल्या इटुकल्या पानांनी वाऱ्याच्या संगतीनं टाळ्या वाजवत आषाढ सरीत व वारीत दंग होत आकाशाकडं झेप घेत होती. कुंद नभात दोन तीन पारवे वेगवेगळ्या दिशेला तोंड करत झेपावत होती की घुटमळत होती ते कळेना.
मळ्याच्या बंगलीत सदा आबा ,माया पमन बसले. प्रतापराव मक्याच्या शेतात तुंबलेलं पाणी माणसांना बांध फोडायला लावत नाल्यात काढत होते.
मायानंही तुंबलेल्या मनाचा निचरा करण्यास सुरुवात केली.
" पमन?"
"......... काय?"
" मागे मळ्यात अशाच पावसात तुझ्या पायात काच घुसला होता ना रे!"
" माया सावरलीय ती जखम!"
"पण तरी टाचेवरच्या अंगाला व्रण पडलाच ना?"
" माया ,जखमा भरतात पण खोल व्रण तसेच राहतात!"
" मी काच काढतांना पद्मानं तुला धरलं होतं ! किती वेदनानं विव्हळत होता तू! पण पद्मानं तुझ्या वेदना सुसह्य केल्या होत्या!"
" माया त्याच वेळी पेरूच्या बागेतून शिल्पा ही आली होती! आठवतं का तुला?" पमन पेरुच्या बागेकडे निश्चल नजरेनं पाहत होता.
" पमन, माणसाला व्रण लक्षात दिसतो पण आत भरून आलेली जखम लक्षात येत नाही ना?"शिल्पेचा उल्लेख होताच मायाचा स्वर कडवट झाला.
" मायडे, व्रण हा माणसास दु:ख देत नाही, उलट त्यावर हात फिरवतांना माणसास जखम भरून आल्याचं एक समाधान मिळतं.पण जखमाचं तसं नसतं.खपली निघाली वा मध्ये जखम चिघळत राहिली तर परिणाम वाईट होतात गं!"
" पमन , पद्माचं आयुष्य ही असंच जखम झालंय रे! याचं काय?"
" पद्माबाबत झालं ते वाईटच.पद्मानं त्यातून सावरत पुढे पाहत विचार करावा!"
" तेच म्हणतेय मी! हा विचार तिच्याबरोबर तूही करावा!"
" म्हणजे.....?"
" पमन, दुरुन गंमत पाहणारे, लोकांना संकटात टाकत मैदान सोडणारे यांचा विचार करण्यापेक्षा शाश्वततेने जीव तुटेपर्यंत पाठीमागं उभ्या राहणाऱ्या लोकांना ते संकटात असतांना साथ द्यावी!"
" मायडे, तुला काय सांगायचं ते स्पष्ट सांग?"
" पम्या ,सारं समजतंय तुला मग का माझ्या तोंडून वदवतोय? काच घुसली तेव्हा वेदनेनं तडपत असतांना गंमत पाहणाऱ्या तिच्यापेक्षा तुला गच्च आवळत लिंबोणीच्या सुवासानं गोंजारणाऱ्या पमीला आठव. खो खो त ऐन वेळी नाशिकला पळणाऱ्या तिच्यापेक्षा पाठीमागं भक्कम उभी राहणारी पमी आठवं. लग्नाचा वादा करत परदेशात गुल होणाऱ्या तिच्यापेक्षा नशीबानं पुन्हा अन्याय करत का असेना पण जवळ आलेल्या पमीला आठव!" माया रागानं व काकुळतीच्या संमिश्र भावनेनं विनवू लागली.
" मायडे! मामा सांगतात, माय सांगते तेच खरं.खरच तू किती समंजस आहेस! न जाणत्या वयात माझ्यासाठी तू माय पासून दूर होत खाटेखाली पडे पण मायचं तुझ्या हक्काचं अमृत मला देई! शाळेत ही कायम माझ्या हूडपणाचा सारा जाच अंगावर घेत मला वाचवी. पण मायडे,तुझ्यासारखं समंजस मला नाही होता येत गं! तुला काय वाटतं? पमीचं माझ्या प्रती असलेलं प्रेम मला कळलं नसावं का? तिच्या निरागस प्रेमासाठी तर मी शिल्पेस छळत होतो गं! माझ्या पमीच्या साध्या प्रेमाचा मजाक करणाऱ्या शिल्पाची मी कायम जिरवत राहिलो. तिला हरवण्या साठी खो खो शिकलो.तिला हरवण्यासाठी गायनात रूची घेत गायन शिकलो. तिलाच हरवण्यासाठी काय काय शिकलो? मायडे मळ्यातला तुला काचेचा प्रसंग लक्षात राहिला. तिथंही तिला समोर उभी पाहिली.व तिलाच हरवण्यासाठी मायाला गच्च गच्च मिठी मारली. पण मायडे जेव्हा याच बंगलीत बसत नंतर याच धावेवर त्या शिल्पीनं घरून दिलेलं सरबत फेकत रोगार भरलं व जेव्हा प्याली. तेव्हाच आमच्या सदा आबानं कच खाल्ली. आबांनी जेव्हा दवाखान्यात साऱ्यांसमोर वाघासारखी डरकाळी फोडली. " पवन्या, रामजी पोवाराच्या वाड्यातली अंजी नांदली नाही पण त्याच वाड्यातली शिल्पा आपल्या खडकीत नांदली पाहिजे!" बस्स तिथं तिथंच शिल्पानं माझ्यावर मात दिली.
कारण या आबांनीच.... या माझ्या बाप माणसानेच किती राती जागून काढल्या हे मी प्रत्येक सुटीत खडकीस जातांना पाहिलंय गं! केवळ माझ्यासाठी या माझ्या बाप माणसानं दुसरं लग्न न करता अंजना काकुच्या वेदनेत जळत राहिला. प्रत्येक सुटीत आबा यायचे. आख्खी सुटी ते मला खांद्यावर घेऊन फिरायचे. बारा वर्षाचा द्वाड झालो तरी आबांच्या नजरेत लहानच होतो. या माझ्या बाप माणसास तिनं रोगार पित जिंकलं व शिल्पीनं पमी व मला हरवलं.
त्याक्षणापासुनच शिल्पानं असा काही शिकंजा आवळला की पमीची पिछेहाटच होत गेली. व मनात नसानसात शिल्पा भिनली. आता तर शिल्पीनं माझं सारं अवकाश व्यापलंय. सारे सारेच धूसर झालं. शिल्पाशिवाय काही काही च दिसत नाही.
" पमन पण तीच जर सोडून गेलीय तर मग पुन्हा पमीस .....!"
" मायडे... इतकं सोपं नसतं गं.. ज्या पमीच्या प्रेमाखातर मी शिल्पास हरवत गेलो पण आबाखातर तिच्यावर मनापासून प्रेम करत बुडतोय मी. पण लक्षात ठेव माझ्या प्रेमातही सातपुड्यातील कातळमायेचा भुमीगत पाझर आहे. तिला हरवेलच. शिल्पा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं ही असू दे! कोणी कितीही कैद करू दे ही कातळ माया ती मरणापर्यंत विसरूच शकत नाही.ती ही माया सोडून दुसऱ्यावर मरूच शकत नाही. एक चांदण्या रात्रीची....... जाऊ दे... एक चांदणी रात्र साऱ्या अवकाशात दिपवते त्याप्रमाणं आता ना ती माझ्याशिवाय राहू शकत, ना मी?"
" म्हणजे तुला अजुन ही वाटतं की शिल्पा तुझ्यासाठी थांबलीय? अरे मूर्ख माणसा त्या प्रशांत सोबत तिच्या लग्नाचे फोटो साऱ्या आर्डीनं पाहिलेत नी तू अजुन ही कोणत्या भ्रमात जगतोय?"
" पमे उन्हाळ्यात रात्री आबा मला सातपुड्यातला वणवा दाखवायचे. 'पवन्या लोकांना ही सातपुड्यातली होळी वाटते ; पण हा मोठा वणवा असतो बाळा! ही छोटीशी वाटणारी होळी किती तरी परीघ व्यापत किती विध्वंस करते.'तसचं साऱ्यांना हे लग्न वाटत असलं तरी शिल्पा माझ्या कातळमायेचा पाझर विसरूच शकत नाही. आणि समजा विसरलीच तरी निदान प्रेमासाठी, दुसऱ्यासाठी जळत जळत विझणं काय असतं हे दाखवत पमीसाठी तिला हरवण्यासाठी आता आबाच्याच पावलावर पाऊल......प्रवास.....रात्री.......!"
" पम्या पण त्या पमीचं काय?" तिनं का तुमच्या हरण्या जिंकण्यासाठी आयुष्याचा डाव लावावा?"
" पमीला...! माझी समंजस मायडी तिला समजावेलच! दुसरा पाट....."
" पम्या ऐकेल ती?"
" मायडे तू सांगशील ते पमी टाळूच शकत नाही!"
सदा आबा सारं ऐकत होते. त्यांच्या डोळ्यातून एक टिपूस ही गळला नाही. आयुष्यभराचं दु:ख जणू जळत वाफ व्हावी तसंच. आपला मार्गच पोराच्या नशिबी यावं या दु:खाची वाफ! आसवे नव्हतीच!
मायानं आताच पद्माला काही सांगणं योग्य नाही. कारण अनंत जगताप जाऊन काही दिवसच लोटले होते. तिनं मारोती काकास मुंबईला घेऊन येण्याचं सांगत ती निघण्यापूर्वी पमीस तरी भेटलीच.
पद्माला घेत ती एकांतात आली. समोरच्या खिडकीतून बाहेर आषाढ सरी गावास झोडपत असतांना दिसत होत्या.गल्लीत पाण्याचे छोटे छोटे ओघळ एकत्र होत गल्लीच्या मधोमधच्या चारीतील प्रवाहास मिळत होते.
" पमा, मी निघतेय! खरं तर तुला आठ दहा दिवस सोबतच नेणार होते! पण मला माहितीय तू लगेच येणार नाहीस! मारोती काकांना सांगितलंय. पमनच्या गाडीत या. आठ दिवस रहा. तेवढीच हवापालट!"
" .........!”फक्त डोळ्यातून आसवांची धार!
" पमे खिडकीत बघ! पावसात किती भिजायचो गं! शाळेत जातांना पम्याचं दफ्तर धरत आपण कधी पुढं तर कधी मागं चालायचो. नी तो हळूच पायानं पाणी उडवत द्वाडपणे ओलं करी! ओलं केल्याचा किती ही राग आला तरी आत खोल खोल कुठं तरी यानं पाणी उडवावंच असं वाटेच!"
" माया, गेलेले पावसाळे आठवण्यानं पाण्यात भिजता येत नाही गं! उलट आसवातच भिजतं माणूस!" पमीच्या एका वाक्यानंच माया थिजली. आपण आता पमीला न समजावण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच हे तिला कळलं.डोळ्यात व उरात कढ दाटताच पमीनं मायाचे हात हातात घेतले पण मायानं हात जोरात झटकत तिला छातीशी लावलं नी पमीच्या उरातली श्रावणझड आषाढातच गळू लागली. दोन्ही बहिणी मूक आक्रोश किती तरी वेळ करत राहिल्या. कधी कधी परमेश्वराकडून दोन जिवांना एकाच पोटी जन्माला न घालण्याची घालण्याची चूक होत असावी! मग तो असं नातं निर्माण करत दोन जिवांना मायेच्या नात्यानं जवळ आणत असावा. भर ओसरल्यावर मायानं पमीस समजावलं.
" पमे, गल्लीत तो छोटासा ओघळ बघ! नालीत येण्यासाठी किती प्रयत्न करतोय. आडवा येणाऱ्या मातीच्या ढिगानं त्याचा मार्ग अडवलाय. पण तरी तो न थांबता आपला मार्ग बदलत बाजूनं धावत, वाहत चारीत मिळतोयच बघ! जीवनाचं ही तसंच असतं पमे!"
"मायडे, बांध छोटा असला तर ठिक अन्यथा पुढच्या पावसाळ्यापर्यंत( जन्मापर्यंत) पाण्याला तुंबत सडावं ही लागत कधी कधी!"
माया समजली पण मनातल्या मनात म्हणाली. " पमे ही तुझी बहिण तुझा जीवन प्रवाह अडू देणारच नाही!"
माया गेली. पमनला रस्तोगी व राणेचा ससेमिरा नको वाटे म्हणून तो माया सोबत मुंबईला न जाता आर्डीला थांबला. तो आता मळ्यातच थांबे. त्याला माया बोलली ते आठवू लागलं.
" शिल्पेनं प्रशांतशी......!" त्याची आग आग झाली. पण आपण सोमा पोवाराच्या वाड्यावर गेलो तेव्हा शिल्पाची आई काही तरी सांगत होती. नंतर मंगा मामा ही आपणास बोलला. नी शिल्पा गेल्यानंतर आधी तिचा काॅल आला तेव्हा तिचं बोलणं. हे सारं सारं तिला कुठं तरी दबाव आणला जातोय हेच अधोरेखीत करतंय! फक्त आपणास काही ही करून ती कुठं याचा शोध घेणं महत्वाचं. त्यासाठी आर्डीत थांबावच लागेल. कारण ती कुठं हे मोठ्या आर्डीकडूनच समजेल.
तो मळ्यात सुरेश व चंद्या वर भटाच्या मळ्यात लक्ष ठेवू लागला. पण त्याला यश येईना. अखेर त्याला थोडी संधी मिळाली.
पमा ला मामानं मोपेड गाडी घेऊन दिलेली. त्या गाडीनं मळ्यालगत नाल्याच्या रस्त्यानं रेल्वे स्टेशन व तेथून ड्युटीच्या गावावर जाई. अनंत गेला त्या नंतर महिनाभर पमानं रजाच टाकली होती. आता ती ड्युटीवर जाऊ लागली. मळ्यावरून जातांना ना कधी ती थांबे ना पमन तिला पाही.
पण भटाच्या मळ्यातून सुरेश तिच्या येण्या जाण्याच्या वेळेवर पाळतीला थांबू लागला. ग्रामसेविका झालेली व हळदीच्या डागावर बसलेली पमा व आता तर नवरा गेल्याचंही कळलं. तो तिला छेळण्याची संधी शोधू लागला. कारण एकच वचपा काढणं.
सायंकाळी परतत असतांना मळ्याच्या खालच्या बाजूस सुऱ्यानं पमीच्या रस्त्यात काटे अडवत गाडी थांबवली.
त्या आधी मळ्यात पमन नसल्यानं त्यानं पाहिलं होतं. पण पमन लिंबूच्या बागेत दक्षिणेकडच्या बांधाकडं त्याला दिसलाच नव्हतं.
" या पद्माबाई! खो खो च्या खेळात तर खूपच मैदान मारत होता! पण संसाराच्या खो-खो त फाऊल वर फाऊल करुन बसलात!"
पद्मा घाबरली! थरथरली ती गाडी पुढे निघणार नाही म्हणून माग फिरवत स्टेशनाकडं परतू लागली. तोच सुरेशनं गाडीची चाबी फिरवत त्यानं हिसकावली. पद्मानं गाडी त्याच्या अंगावर फेकत नाल्याच्या वर चढू लागली.सुऱ्या फणकाऱ्यात वर चढत तिच्या समोर उभा राहिला व शीळ फुंकत " फाऊल!...फाऊल...!" काढा आधी! पद्माबाई!"
" पमनsssssss!.....पमनsssss! बेंबीच्या देठापासून मळ्याकडं पाहत पद्मानं रडत आरोळी ठोकली. पमन मळ्यात आहे की नाही हे तिला माहित नव्हतं पण मळ्यात कुणी तरी असेलच म्हणून ती ओरडू लागली.
ती त्याला धक्का देत मळ्याकडं पळू लागली तोच आवाज ऐकत पमन आला.
पमनच्या मागं उभं राहत
" पमन! पमन !" थरथरतच ती बोलली.
पमननं सुऱ्याला पाहिलं.सुऱ्या भटाच्या मळ्यात तुरकू लागला.
पमननं एकाच झटक्यात त्याला पकडलं.
" पमन या कुत्र्याचं तोंड फोड!"
पमन समजून चुकला हा पमीस काही बोलला असावा.त्याशिवाय पमा तोंड फोडायला सांगणारच नाही. त्यानं मागूनच त्याची मानगूट पकडत दुसऱ्या हातात खाली पडलेला दगड उचलला. मानगुट सोडत केस ओढताच सुऱ्या गर्रकन फिरला.नी दगडाच्या एका दणक्यात ओठात चार पाच दात व दातात ओठ घुसत सुऱ्या रक्ताच्या गुळण्या फेकत पमनला लटकत दगडाचा मार चुकवू लागला.
पमा मळ्यात आबाकडं येत आबास बिलगत रडू लागली.
पमन सुऱ्यास घोळवतच होता.
" पमन सोड आता! झाली चूक.आता नाही होणार! पाया पडतो!"
" शिल्पा कुठं?" अचानक रोख बदलला.
तोंड सुजलेला व रक्तमाखला सुऱ्या समजून चुकला की डबल कचाट्यात सापडलोय आपण.मळ्यातनं चंद्याही धावत आला पण पमनपुढं जाण्याची त्याची ही हिम्मत होईना. तो अंतर राखून उभा राहिला.
" शिल्पा कुठं? सांग. नाहीतर विहीरीतच फेकतो तुला!" पमन थंड रक्तागत शांत बोलला.
" पम्या कोलंबिया हून बाबा व आईस परत पाठवल्यावर प्रशांतनं तिला तेथून कुठं तरी हलवलंय. आता तो ना बाबाशी बोलतोय ना कदम मामाशी. आता आत्या व शिल्पा कुठं हे आम्हाला देखील माहित नाही व त्याचा काॅल ही नाही!"
पमननं सुऱ्या खरं बोलतोय लगेच ओळखलं.
" पमाच्या सावलीलाही गेला तर रामजी पोवारातल्या बिवाडच शिल्लक ठेवणार नाही! इतकच काय कुणी ही तिच्या वाटेला गेलं तरी आधी तुम्हाला बघेन मग इतरांना!" कमरेत लाथ घालत डुकरागत सुऱ्याला शेतात फेकत पमन चाबी घेत गाडी वर विहीरीकडं आला. पमीस बसवलं व घरी आणलं. पमीला मागून त्याला मिठी मारत बसावं असंच वाटत होतं पण.....कुंकू पुसलं तरी सुनं कपाळ त्याची जाणीव देतच होतं.मग ती अंग चोरुन बसली.
" पमे घरी गाडी घसरली एवढंच सांग! ती कुत्री आता पुन्हा आडवी येणार नाहीत.मी आबांनाही सांगतो.म्हणत तो घरी परतला. रात्रभर लिंबोणीचा वास नाकात घुमत राहिला व पमन शिल्पा कुठं या वावटळीत फिरत राहिला. दिवस जात राहिले. नभात तीन पारवे तीन दिशांना तोंड करत मेघडंबर धुमसवत होते.
मायाला माहित पडलंच नी टाळाटाळ करणाऱ्या पद्मास तिनं बोलवलंच.
मायानं फोन करताच पमी नाही सांगत असतांना मंजा मामी, तारामाय व पमीला घेऊन पमन मुंबईस निघाला. त्यांना सोडत तो परतू लागला.
पण सुबोध राणेचा निरोप असल्यानं माया व मनिष निकमनं त्याला निघूच दिलं नाही. त्याचा दम घुटू लागला.
रस्तोगीच्या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कारासाठी उत्कृष्ठ गायक, संगीत, व गीतकार अशी तीन नाॅमीनेशन मिळाली होती.
" पमन! तुम्ही गायलेली गाणी ऐकलीत का तू!"
" माया! का पुन्हा पुन्हा नको असलेल्या गोष्टी काढतेस!"
" जे विचारलं तेवढं सांग?"माया डोळे वटारत बोलली.
" होय! का?"पमन नमतं घेत बोलला.
"त्या गाण्याचे गीतकार कोण ?"
" शिल्पा!" पमन बोलला
" चित्रपट पाहिलाय का तू?"
" नाही?"
" श्रेय नामावली पाहिलीय वा गाणं ऐकतांना ऐकलंय का?"
" नाही ,पण का?"
" सुबोध राणे व रस्तोगी विचारत होते ही पद्मा कोण? गीतकाराचं नाॅमीनेशन झालंय?"
" माया, शिल्पा गीतकार आहे ना त्या गाण्याची!"
मायानं चित्रपट सुरू करत पळवत शेवट श्रेय नामावली दाखवली.
पद्माचं नाव पाहताच त्याला गाण्याचं रेकाॅर्डिंग संपवल्यावर तो स्टुडीओतून बाहेर पडत असतांना शिल्पा परत फिरत रस्तोगीच्या व सुबोधच्या कानात काही तरी सांगत होती.म्हणजे तिनंच पद्माचं नाव दिलं असावं.
पण मग तिनं पद्माचं नाव का दिलं असावं?
" पमन, तु पद्माकडून वही घेऊन गेला होता ती कुठेय? ती वाचली होती का?" माया विचारू लागली.
" माया, ऐक ना!" पमा तिला शांत बसवू लागली.
आता पमनला क्लिअर झालं. आपण वही घेऊन पहिलीच कविता वाचली असतांनाच शिल्पानं ती घेतली होती. याचा अर्थ शिल्पा व आपण गायिलेली गाणी पद्माचीच.
" पमन ,शिल्पानं यु ट्युबवर गाणी आपल्या नावावर अपलोड केली पण ती भन्नाट गाजली .मग नंतर तिलाच आपलं नाव कट करत पद्मा घालावयास लावल्याचं रस्तोगी सांगत होता. त्याला वाटलं ही टोपणनावानं टाकत असेल. पण आता ती नाही म्हणून नेमकं कुणास उभं करावं हा त्यांना प्रश्न पडलाय!"
पमनला गातांना तोच सुगंध का जाणवत होता ते कळलं पण त्याच वेळी गोव्याहुन परतल्यावर शिल्पानं हा बदल केला म्हणून त्याच्या डोळ्यात आसवे तरळली व तो तेथून उठत खोलीत गेला व आकांत करत आठवू लागला.
चांदण्या रातीची पहाट..." पम्या साल्या, आता घरचेच काय पण तुला माझ्यापासून कुणीच दूर करू शकत नाही.अगदी अगदी पमी ही!"
पमन ढसाढसा रडू लागला
शिल्पा......! कुठं.....? कुठं आहेस गं!
आकांत...! आकांत... !आकांत...!
मायानं रस्तोगीला कळवत पद्मास उजेडात आणलं. सुबोध राणेकडं शिल्पानं ठेवलेली वही मायानं आणत पमनला दाखवली.
गायक व गीतकार म्हणुन एकत्रीत रित्या पुरस्कार स्टेजवर पमन पद्मानं स्विकारला. पद्मा कार्यक्रमालाच जायचं नाही म्हणत होती. पण मायानं तिचं काही एक न ऐकता तिला समजावत तयार केलं. मनिष निकमांनी व्यावसायिक गाईड कडं नेत पद्मास स्टेजवर कसं वावरायचं पुरस्कार कसा स्विकारावं शिकवलं.त्याबरोबर ड्रेस डिझायन व हेअर ...सारं सारं...
पद्मानं कात टाकली.
गायक व गीतकार यांना एकाच क्लिकवर घेत फोटो बाॅलीवुड....नेट सोशलमिडीयात फिरला. तोच फोटो नेटवर ...तीच बातमी ...प्रशांतनं शिल्पास दाखवली.फक्त फोटो एडीटींग करत दोघांच्या अंतरीच्या कळा दाखवण्यासाठी त्यानं दोघांना लग्नाच्या पाटावर बसवलं. फूट पाडत शिल्पास ओढण्याचा अखेरचा टोला तो हाणू पाहत होता!
.
.
रस्तोगीनं आता पद्मास दर्दभरे नविन लिहावयास लावलं. तो पमनकडं दर्दभरे नगमा लोकांना ऐकवू पाहत होता की पद्माचं पमनसाठी गाण्यात उतरलेलं दु:ख शिल्पाच्या दु:खाच्या रूपात पमन कडुन गावून घेणार होता! हा कलाकार रस्तोगी लोकांची दु:खं विकणार होता? की त्यांच्या दु:खास वाचा फोडणार होता?
पण त्या आधीच भारतात ही महामारी चोरपावलानं आलीच.
.
.
.
क्रमशः
.
.
चाळीसगावचे मनिष निकम कांदिवलीस काॅलेजला प्राध्यापक होते. चाळीसगावला बरीच शेती .सुखवस्तू कुटूंब व दूरचं असलं तरी नात्यातलं. पमनचा विस्कोट झाला. प्रतापरावांनी तातडीनं निर्णय घेत मायाचे हात पिवळे केले. माया कांदिवलीला गेली. लग्नात पद्मानं सारं आवरत ताराबाईला मदत केली. माया जातांना आपला आतेभाऊ असला तरी पाठच्या भावापेक्षाही जास्त प्रेम असणाऱ्या पम्याकडं पाहून रडू लागली. पद्माकडं पाहून तर तिला हमसून हमसून रडू फुटलं. जातांना दोघाकडं पाहत न सुटणारं कोडं उरात घेत ती गेली.
मनिष निकमनं मायाचं राहिलेलं शिक्षण चालू ठेवलं. समंजस स्वभावाच्या मायास एकदम सालस, मायाळू जोडीदार मिळाला.
पमनला सुबोध राणे, रस्तोगी व इतर निर्देशक व निर्मात्याकडुनही सतत मागणी होऊ लागली. 'अंतरीच्या कळा' तून उभरलेला व पहिल्याच चित्रपटातील यशानं "' रायझिंग स्टार इन सिंगीग' म्हणुन दोघांचं नाव झालं. बाॅलीवुडमध्ये प्रत्येकाच्या तोंडी त्यांची नावं व गाणी घोळू लागली. पण शिल्पा तर अचानक गायब झाल्यागतच. सुलभा बहिणीकडून सुबोध राणेंनी सारी माहिती काढत घरच्यांशी संपर्क केला. पण कदम सर व सोमा पोवारांनी शिल्पानं लग्न करत गायन कायमचं सोडत परदेशात स्थायिक झाल्याचं सांगत सुबोधला कटवलं. रस्तोगीनं चित्रपटानं अपेक्षेपेक्षाही केवळ संगितामुळं जास्त गल्ला गोळा केल्यानं व आगामी चित्रपटात काम करावं म्हणून पमनला बुगाट्टी कार व मुंबईस फ्लॅट देत खुश करण्यास सुबोधला सांगितलं. पण पमन या साऱ्या पासून दूर दूर जाऊ पाहत होता. सुलभा मॅडमनं सुबोधला मुंबईतच राहणाऱ्या मायास भेटावयास लावलं. मायानं पमनला मुंबईस बोलवलं. मनिष निकम तर पमनच्या गाण्याचा फॅनच झाला. पमनमागं प्रसिद्धीचा झ्योत वळत गराडा वाढला. रस्तोगीनं मोठं सेलीब्रेशन ठेवलं. पमनचा जीव गुदमरू लागला. त्याला मागं मागं फिरणारे बेगडी चेहरे वीट आणू लागले. पण केवळ माया सांगतेय म्हणुन तो कसा बसा आला होता. तो सहसा काहीच न बोलता मनिष निकमच त्याच्या ऐवजी बोलत वेळ निभावू लागला. रस्तोगीनं त्याच्या समोर नाही शिल्पा तर इतर प्रथितयश गायिकेसोबत पुढच्या चित्रपटासाठी गायनासाठी विनवलं. पमननं तूर्तास माझी इच्छा नसल्यासं सांगत विनंती करत रस्तोगीस नम्रतेने नकार दिला. पण रस्तोगी ऐकेना.
फ्लॅटचा ताबा माया व निकम सरांनी घेत पमनला कारचे क्लास लावले. रस्तोगीनं पमननं निदान एक गाणं तरी चित्रपटात गावं या साठी राजी केलं.
मायास प्रतापरावांचा फोन आला तशी माया, पमन, निकम सर सारे परस्पर गडचिरोलीस निघाले. पद्मा ,मारोती, प्रतापराव, व सदा आबा हे आर्डीहून निघाले. गडचिरोलीहून लवकरात लवकर त्यांना बोलवलं होतं.
एका नक्षलीच्या ठाण्यावर हल्ला करत बऱ्याच नक्षलींना कंठस्नान घालत दोन नक्षलींना लष्करानं जिवंत पकडलं होतं. हे नक्षली पोलीस ठाणे, वनखात्यातील अधिकाऱ्यांना टारगेट करत प्रशासनास जेरीस आणत होते. जिवंत पकडलेल्या नक्षलींना लष्कर अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेत मागील त्यांच्या कारवायाबाबत बोलतं केलं. आपले सारे म्होरकेच गेल्यानं या दोन्ही नक्षलींनी टिकाव न धरता मागील साऱ्या कारवायाबाबत कबुली दिली. पोलीस अधिकारी वन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, यांचं अपहरण करत कुणास कसं संपवलं सारं सारं कळू लागलं. परकीय देशातील काही संघटनांकडून कशी मदत मिळते त्याबाबतही माहिती दिली. अनंत जगताप यास लग्नानंतर उचलत गडचिरोलीत आणत संपवल्याची माहिती ही त्यातच उजेडात आली. अड्ड्याच्या मागच्या दफन केलेल्या जागा उकरत हाडांचे सांगाडे काढले केले. नातेवाईकांना बोलवत उकरतांना निघालेल्या दागिन्यावरून ओळख होऊ लागली. नक्षल्यांनी काही नावासहीत कोणत्या जागेवर कुणास दफन केलं ही माहिती दिली. पद्माच्या सासुनं मुलाचे दागिने व मारोतीनं लग्नात केलेली साखळी व अंगठीची पावती दाखवताच ओळख पटली. ओळख पटताच सासुनं हंबरडा फोडला. पद्मा मायास बिलगली. जी पुसटशी आशा होती तिच मावळत सारं निवळलं. पद्मा तर ज्याच्याशी काही तासाची लग्नापुरती गाठ पडली त्याच्या नावानं काय रडणार? पण निटीलावर रेखलेल्या कुंकवासाठी म्हणा वा समाजमान्य विवाहसंस्थेचा पगडा म्हणा दु:ख तर होणारच. अनंत जगताप साठी परदेशातून सुपारी असल्याची माहिती मिळाली पण कोणी याबाबत जिवंत नक्षलींना सांगता येईना. मारल्या गेलेल्या म्होरक्यासोबत ते नाव राजच राहिलं.
सारा काडी मोड करत मारोतीनं दुःखद अंत:करणानं भाचीस आर्डीस आणलं. एका वर्षाच्या आतच उभा न राहिलेला संसार मोडला.
माया पद्मासोबत आर्डीस आली. दोन चार दिवस आर्डीस राहिली. पण लगेच विषय काढणं संयुक्तिक वाटेना. तरी पण मायानं मळ्यात सहज पम्यास नेलं व पद्माबाबत छेडलंच.
मळ्यात नुकताच आषाढ झरला तशा किरकोळ पेरण्या आटोपल्या होत्या. कोवळे कोवळे कोंळ आपल्या इटुकल्या पानांनी वाऱ्याच्या संगतीनं टाळ्या वाजवत आषाढ सरीत व वारीत दंग होत आकाशाकडं झेप घेत होती. कुंद नभात दोन तीन पारवे वेगवेगळ्या दिशेला तोंड करत झेपावत होती की घुटमळत होती ते कळेना.
मळ्याच्या बंगलीत सदा आबा ,माया पमन बसले. प्रतापराव मक्याच्या शेतात तुंबलेलं पाणी माणसांना बांध फोडायला लावत नाल्यात काढत होते.
मायानंही तुंबलेल्या मनाचा निचरा करण्यास सुरुवात केली.
" पमन?"
"......... काय?"
" मागे मळ्यात अशाच पावसात तुझ्या पायात काच घुसला होता ना रे!"
" माया सावरलीय ती जखम!"
"पण तरी टाचेवरच्या अंगाला व्रण पडलाच ना?"
" माया ,जखमा भरतात पण खोल व्रण तसेच राहतात!"
" मी काच काढतांना पद्मानं तुला धरलं होतं ! किती वेदनानं विव्हळत होता तू! पण पद्मानं तुझ्या वेदना सुसह्य केल्या होत्या!"
" माया त्याच वेळी पेरूच्या बागेतून शिल्पा ही आली होती! आठवतं का तुला?" पमन पेरुच्या बागेकडे निश्चल नजरेनं पाहत होता.
" पमन, माणसाला व्रण लक्षात दिसतो पण आत भरून आलेली जखम लक्षात येत नाही ना?"शिल्पेचा उल्लेख होताच मायाचा स्वर कडवट झाला.
" मायडे, व्रण हा माणसास दु:ख देत नाही, उलट त्यावर हात फिरवतांना माणसास जखम भरून आल्याचं एक समाधान मिळतं.पण जखमाचं तसं नसतं.खपली निघाली वा मध्ये जखम चिघळत राहिली तर परिणाम वाईट होतात गं!"
" पमन , पद्माचं आयुष्य ही असंच जखम झालंय रे! याचं काय?"
" पद्माबाबत झालं ते वाईटच.पद्मानं त्यातून सावरत पुढे पाहत विचार करावा!"
" तेच म्हणतेय मी! हा विचार तिच्याबरोबर तूही करावा!"
" म्हणजे.....?"
" पमन, दुरुन गंमत पाहणारे, लोकांना संकटात टाकत मैदान सोडणारे यांचा विचार करण्यापेक्षा शाश्वततेने जीव तुटेपर्यंत पाठीमागं उभ्या राहणाऱ्या लोकांना ते संकटात असतांना साथ द्यावी!"
" मायडे, तुला काय सांगायचं ते स्पष्ट सांग?"
" पम्या ,सारं समजतंय तुला मग का माझ्या तोंडून वदवतोय? काच घुसली तेव्हा वेदनेनं तडपत असतांना गंमत पाहणाऱ्या तिच्यापेक्षा तुला गच्च आवळत लिंबोणीच्या सुवासानं गोंजारणाऱ्या पमीला आठव. खो खो त ऐन वेळी नाशिकला पळणाऱ्या तिच्यापेक्षा पाठीमागं भक्कम उभी राहणारी पमी आठवं. लग्नाचा वादा करत परदेशात गुल होणाऱ्या तिच्यापेक्षा नशीबानं पुन्हा अन्याय करत का असेना पण जवळ आलेल्या पमीला आठव!" माया रागानं व काकुळतीच्या संमिश्र भावनेनं विनवू लागली.
" मायडे! मामा सांगतात, माय सांगते तेच खरं.खरच तू किती समंजस आहेस! न जाणत्या वयात माझ्यासाठी तू माय पासून दूर होत खाटेखाली पडे पण मायचं तुझ्या हक्काचं अमृत मला देई! शाळेत ही कायम माझ्या हूडपणाचा सारा जाच अंगावर घेत मला वाचवी. पण मायडे,तुझ्यासारखं समंजस मला नाही होता येत गं! तुला काय वाटतं? पमीचं माझ्या प्रती असलेलं प्रेम मला कळलं नसावं का? तिच्या निरागस प्रेमासाठी तर मी शिल्पेस छळत होतो गं! माझ्या पमीच्या साध्या प्रेमाचा मजाक करणाऱ्या शिल्पाची मी कायम जिरवत राहिलो. तिला हरवण्या साठी खो खो शिकलो.तिला हरवण्यासाठी गायनात रूची घेत गायन शिकलो. तिलाच हरवण्यासाठी काय काय शिकलो? मायडे मळ्यातला तुला काचेचा प्रसंग लक्षात राहिला. तिथंही तिला समोर उभी पाहिली.व तिलाच हरवण्यासाठी मायाला गच्च गच्च मिठी मारली. पण मायडे जेव्हा याच बंगलीत बसत नंतर याच धावेवर त्या शिल्पीनं घरून दिलेलं सरबत फेकत रोगार भरलं व जेव्हा प्याली. तेव्हाच आमच्या सदा आबानं कच खाल्ली. आबांनी जेव्हा दवाखान्यात साऱ्यांसमोर वाघासारखी डरकाळी फोडली. " पवन्या, रामजी पोवाराच्या वाड्यातली अंजी नांदली नाही पण त्याच वाड्यातली शिल्पा आपल्या खडकीत नांदली पाहिजे!" बस्स तिथं तिथंच शिल्पानं माझ्यावर मात दिली.
कारण या आबांनीच.... या माझ्या बाप माणसानेच किती राती जागून काढल्या हे मी प्रत्येक सुटीत खडकीस जातांना पाहिलंय गं! केवळ माझ्यासाठी या माझ्या बाप माणसानं दुसरं लग्न न करता अंजना काकुच्या वेदनेत जळत राहिला. प्रत्येक सुटीत आबा यायचे. आख्खी सुटी ते मला खांद्यावर घेऊन फिरायचे. बारा वर्षाचा द्वाड झालो तरी आबांच्या नजरेत लहानच होतो. या माझ्या बाप माणसास तिनं रोगार पित जिंकलं व शिल्पीनं पमी व मला हरवलं.
त्याक्षणापासुनच शिल्पानं असा काही शिकंजा आवळला की पमीची पिछेहाटच होत गेली. व मनात नसानसात शिल्पा भिनली. आता तर शिल्पीनं माझं सारं अवकाश व्यापलंय. सारे सारेच धूसर झालं. शिल्पाशिवाय काही काही च दिसत नाही.
" पमन पण तीच जर सोडून गेलीय तर मग पुन्हा पमीस .....!"
" मायडे... इतकं सोपं नसतं गं.. ज्या पमीच्या प्रेमाखातर मी शिल्पास हरवत गेलो पण आबाखातर तिच्यावर मनापासून प्रेम करत बुडतोय मी. पण लक्षात ठेव माझ्या प्रेमातही सातपुड्यातील कातळमायेचा भुमीगत पाझर आहे. तिला हरवेलच. शिल्पा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं ही असू दे! कोणी कितीही कैद करू दे ही कातळ माया ती मरणापर्यंत विसरूच शकत नाही.ती ही माया सोडून दुसऱ्यावर मरूच शकत नाही. एक चांदण्या रात्रीची....... जाऊ दे... एक चांदणी रात्र साऱ्या अवकाशात दिपवते त्याप्रमाणं आता ना ती माझ्याशिवाय राहू शकत, ना मी?"
" म्हणजे तुला अजुन ही वाटतं की शिल्पा तुझ्यासाठी थांबलीय? अरे मूर्ख माणसा त्या प्रशांत सोबत तिच्या लग्नाचे फोटो साऱ्या आर्डीनं पाहिलेत नी तू अजुन ही कोणत्या भ्रमात जगतोय?"
" पमे उन्हाळ्यात रात्री आबा मला सातपुड्यातला वणवा दाखवायचे. 'पवन्या लोकांना ही सातपुड्यातली होळी वाटते ; पण हा मोठा वणवा असतो बाळा! ही छोटीशी वाटणारी होळी किती तरी परीघ व्यापत किती विध्वंस करते.'तसचं साऱ्यांना हे लग्न वाटत असलं तरी शिल्पा माझ्या कातळमायेचा पाझर विसरूच शकत नाही. आणि समजा विसरलीच तरी निदान प्रेमासाठी, दुसऱ्यासाठी जळत जळत विझणं काय असतं हे दाखवत पमीसाठी तिला हरवण्यासाठी आता आबाच्याच पावलावर पाऊल......प्रवास.....रात्री.......!"
" पम्या पण त्या पमीचं काय?" तिनं का तुमच्या हरण्या जिंकण्यासाठी आयुष्याचा डाव लावावा?"
" पमीला...! माझी समंजस मायडी तिला समजावेलच! दुसरा पाट....."
" पम्या ऐकेल ती?"
" मायडे तू सांगशील ते पमी टाळूच शकत नाही!"
सदा आबा सारं ऐकत होते. त्यांच्या डोळ्यातून एक टिपूस ही गळला नाही. आयुष्यभराचं दु:ख जणू जळत वाफ व्हावी तसंच. आपला मार्गच पोराच्या नशिबी यावं या दु:खाची वाफ! आसवे नव्हतीच!
मायानं आताच पद्माला काही सांगणं योग्य नाही. कारण अनंत जगताप जाऊन काही दिवसच लोटले होते. तिनं मारोती काकास मुंबईला घेऊन येण्याचं सांगत ती निघण्यापूर्वी पमीस तरी भेटलीच.
पद्माला घेत ती एकांतात आली. समोरच्या खिडकीतून बाहेर आषाढ सरी गावास झोडपत असतांना दिसत होत्या.गल्लीत पाण्याचे छोटे छोटे ओघळ एकत्र होत गल्लीच्या मधोमधच्या चारीतील प्रवाहास मिळत होते.
" पमा, मी निघतेय! खरं तर तुला आठ दहा दिवस सोबतच नेणार होते! पण मला माहितीय तू लगेच येणार नाहीस! मारोती काकांना सांगितलंय. पमनच्या गाडीत या. आठ दिवस रहा. तेवढीच हवापालट!"
" .........!”फक्त डोळ्यातून आसवांची धार!
" पमे खिडकीत बघ! पावसात किती भिजायचो गं! शाळेत जातांना पम्याचं दफ्तर धरत आपण कधी पुढं तर कधी मागं चालायचो. नी तो हळूच पायानं पाणी उडवत द्वाडपणे ओलं करी! ओलं केल्याचा किती ही राग आला तरी आत खोल खोल कुठं तरी यानं पाणी उडवावंच असं वाटेच!"
" माया, गेलेले पावसाळे आठवण्यानं पाण्यात भिजता येत नाही गं! उलट आसवातच भिजतं माणूस!" पमीच्या एका वाक्यानंच माया थिजली. आपण आता पमीला न समजावण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच हे तिला कळलं.डोळ्यात व उरात कढ दाटताच पमीनं मायाचे हात हातात घेतले पण मायानं हात जोरात झटकत तिला छातीशी लावलं नी पमीच्या उरातली श्रावणझड आषाढातच गळू लागली. दोन्ही बहिणी मूक आक्रोश किती तरी वेळ करत राहिल्या. कधी कधी परमेश्वराकडून दोन जिवांना एकाच पोटी जन्माला न घालण्याची घालण्याची चूक होत असावी! मग तो असं नातं निर्माण करत दोन जिवांना मायेच्या नात्यानं जवळ आणत असावा. भर ओसरल्यावर मायानं पमीस समजावलं.
" पमे, गल्लीत तो छोटासा ओघळ बघ! नालीत येण्यासाठी किती प्रयत्न करतोय. आडवा येणाऱ्या मातीच्या ढिगानं त्याचा मार्ग अडवलाय. पण तरी तो न थांबता आपला मार्ग बदलत बाजूनं धावत, वाहत चारीत मिळतोयच बघ! जीवनाचं ही तसंच असतं पमे!"
"मायडे, बांध छोटा असला तर ठिक अन्यथा पुढच्या पावसाळ्यापर्यंत( जन्मापर्यंत) पाण्याला तुंबत सडावं ही लागत कधी कधी!"
माया समजली पण मनातल्या मनात म्हणाली. " पमे ही तुझी बहिण तुझा जीवन प्रवाह अडू देणारच नाही!"
माया गेली. पमनला रस्तोगी व राणेचा ससेमिरा नको वाटे म्हणून तो माया सोबत मुंबईला न जाता आर्डीला थांबला. तो आता मळ्यातच थांबे. त्याला माया बोलली ते आठवू लागलं.
" शिल्पेनं प्रशांतशी......!" त्याची आग आग झाली. पण आपण सोमा पोवाराच्या वाड्यावर गेलो तेव्हा शिल्पाची आई काही तरी सांगत होती. नंतर मंगा मामा ही आपणास बोलला. नी शिल्पा गेल्यानंतर आधी तिचा काॅल आला तेव्हा तिचं बोलणं. हे सारं सारं तिला कुठं तरी दबाव आणला जातोय हेच अधोरेखीत करतंय! फक्त आपणास काही ही करून ती कुठं याचा शोध घेणं महत्वाचं. त्यासाठी आर्डीत थांबावच लागेल. कारण ती कुठं हे मोठ्या आर्डीकडूनच समजेल.
तो मळ्यात सुरेश व चंद्या वर भटाच्या मळ्यात लक्ष ठेवू लागला. पण त्याला यश येईना. अखेर त्याला थोडी संधी मिळाली.
पमा ला मामानं मोपेड गाडी घेऊन दिलेली. त्या गाडीनं मळ्यालगत नाल्याच्या रस्त्यानं रेल्वे स्टेशन व तेथून ड्युटीच्या गावावर जाई. अनंत गेला त्या नंतर महिनाभर पमानं रजाच टाकली होती. आता ती ड्युटीवर जाऊ लागली. मळ्यावरून जातांना ना कधी ती थांबे ना पमन तिला पाही.
पण भटाच्या मळ्यातून सुरेश तिच्या येण्या जाण्याच्या वेळेवर पाळतीला थांबू लागला. ग्रामसेविका झालेली व हळदीच्या डागावर बसलेली पमा व आता तर नवरा गेल्याचंही कळलं. तो तिला छेळण्याची संधी शोधू लागला. कारण एकच वचपा काढणं.
सायंकाळी परतत असतांना मळ्याच्या खालच्या बाजूस सुऱ्यानं पमीच्या रस्त्यात काटे अडवत गाडी थांबवली.
त्या आधी मळ्यात पमन नसल्यानं त्यानं पाहिलं होतं. पण पमन लिंबूच्या बागेत दक्षिणेकडच्या बांधाकडं त्याला दिसलाच नव्हतं.
" या पद्माबाई! खो खो च्या खेळात तर खूपच मैदान मारत होता! पण संसाराच्या खो-खो त फाऊल वर फाऊल करुन बसलात!"
पद्मा घाबरली! थरथरली ती गाडी पुढे निघणार नाही म्हणून माग फिरवत स्टेशनाकडं परतू लागली. तोच सुरेशनं गाडीची चाबी फिरवत त्यानं हिसकावली. पद्मानं गाडी त्याच्या अंगावर फेकत नाल्याच्या वर चढू लागली.सुऱ्या फणकाऱ्यात वर चढत तिच्या समोर उभा राहिला व शीळ फुंकत " फाऊल!...फाऊल...!" काढा आधी! पद्माबाई!"
" पमनsssssss!.....पमनsssss! बेंबीच्या देठापासून मळ्याकडं पाहत पद्मानं रडत आरोळी ठोकली. पमन मळ्यात आहे की नाही हे तिला माहित नव्हतं पण मळ्यात कुणी तरी असेलच म्हणून ती ओरडू लागली.
ती त्याला धक्का देत मळ्याकडं पळू लागली तोच आवाज ऐकत पमन आला.
पमनच्या मागं उभं राहत
" पमन! पमन !" थरथरतच ती बोलली.
पमननं सुऱ्याला पाहिलं.सुऱ्या भटाच्या मळ्यात तुरकू लागला.
पमननं एकाच झटक्यात त्याला पकडलं.
" पमन या कुत्र्याचं तोंड फोड!"
पमन समजून चुकला हा पमीस काही बोलला असावा.त्याशिवाय पमा तोंड फोडायला सांगणारच नाही. त्यानं मागूनच त्याची मानगूट पकडत दुसऱ्या हातात खाली पडलेला दगड उचलला. मानगुट सोडत केस ओढताच सुऱ्या गर्रकन फिरला.नी दगडाच्या एका दणक्यात ओठात चार पाच दात व दातात ओठ घुसत सुऱ्या रक्ताच्या गुळण्या फेकत पमनला लटकत दगडाचा मार चुकवू लागला.
पमा मळ्यात आबाकडं येत आबास बिलगत रडू लागली.
पमन सुऱ्यास घोळवतच होता.
" पमन सोड आता! झाली चूक.आता नाही होणार! पाया पडतो!"
" शिल्पा कुठं?" अचानक रोख बदलला.
तोंड सुजलेला व रक्तमाखला सुऱ्या समजून चुकला की डबल कचाट्यात सापडलोय आपण.मळ्यातनं चंद्याही धावत आला पण पमनपुढं जाण्याची त्याची ही हिम्मत होईना. तो अंतर राखून उभा राहिला.
" शिल्पा कुठं? सांग. नाहीतर विहीरीतच फेकतो तुला!" पमन थंड रक्तागत शांत बोलला.
" पम्या कोलंबिया हून बाबा व आईस परत पाठवल्यावर प्रशांतनं तिला तेथून कुठं तरी हलवलंय. आता तो ना बाबाशी बोलतोय ना कदम मामाशी. आता आत्या व शिल्पा कुठं हे आम्हाला देखील माहित नाही व त्याचा काॅल ही नाही!"
पमननं सुऱ्या खरं बोलतोय लगेच ओळखलं.
" पमाच्या सावलीलाही गेला तर रामजी पोवारातल्या बिवाडच शिल्लक ठेवणार नाही! इतकच काय कुणी ही तिच्या वाटेला गेलं तरी आधी तुम्हाला बघेन मग इतरांना!" कमरेत लाथ घालत डुकरागत सुऱ्याला शेतात फेकत पमन चाबी घेत गाडी वर विहीरीकडं आला. पमीस बसवलं व घरी आणलं. पमीला मागून त्याला मिठी मारत बसावं असंच वाटत होतं पण.....कुंकू पुसलं तरी सुनं कपाळ त्याची जाणीव देतच होतं.मग ती अंग चोरुन बसली.
" पमे घरी गाडी घसरली एवढंच सांग! ती कुत्री आता पुन्हा आडवी येणार नाहीत.मी आबांनाही सांगतो.म्हणत तो घरी परतला. रात्रभर लिंबोणीचा वास नाकात घुमत राहिला व पमन शिल्पा कुठं या वावटळीत फिरत राहिला. दिवस जात राहिले. नभात तीन पारवे तीन दिशांना तोंड करत मेघडंबर धुमसवत होते.
मायाला माहित पडलंच नी टाळाटाळ करणाऱ्या पद्मास तिनं बोलवलंच.
मायानं फोन करताच पमी नाही सांगत असतांना मंजा मामी, तारामाय व पमीला घेऊन पमन मुंबईस निघाला. त्यांना सोडत तो परतू लागला.
पण सुबोध राणेचा निरोप असल्यानं माया व मनिष निकमनं त्याला निघूच दिलं नाही. त्याचा दम घुटू लागला.
रस्तोगीच्या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कारासाठी उत्कृष्ठ गायक, संगीत, व गीतकार अशी तीन नाॅमीनेशन मिळाली होती.
" पमन! तुम्ही गायलेली गाणी ऐकलीत का तू!"
" माया! का पुन्हा पुन्हा नको असलेल्या गोष्टी काढतेस!"
" जे विचारलं तेवढं सांग?"माया डोळे वटारत बोलली.
" होय! का?"पमन नमतं घेत बोलला.
"त्या गाण्याचे गीतकार कोण ?"
" शिल्पा!" पमन बोलला
" चित्रपट पाहिलाय का तू?"
" नाही?"
" श्रेय नामावली पाहिलीय वा गाणं ऐकतांना ऐकलंय का?"
" नाही ,पण का?"
" सुबोध राणे व रस्तोगी विचारत होते ही पद्मा कोण? गीतकाराचं नाॅमीनेशन झालंय?"
" माया, शिल्पा गीतकार आहे ना त्या गाण्याची!"
मायानं चित्रपट सुरू करत पळवत शेवट श्रेय नामावली दाखवली.
पद्माचं नाव पाहताच त्याला गाण्याचं रेकाॅर्डिंग संपवल्यावर तो स्टुडीओतून बाहेर पडत असतांना शिल्पा परत फिरत रस्तोगीच्या व सुबोधच्या कानात काही तरी सांगत होती.म्हणजे तिनंच पद्माचं नाव दिलं असावं.
पण मग तिनं पद्माचं नाव का दिलं असावं?
" पमन, तु पद्माकडून वही घेऊन गेला होता ती कुठेय? ती वाचली होती का?" माया विचारू लागली.
" माया, ऐक ना!" पमा तिला शांत बसवू लागली.
आता पमनला क्लिअर झालं. आपण वही घेऊन पहिलीच कविता वाचली असतांनाच शिल्पानं ती घेतली होती. याचा अर्थ शिल्पा व आपण गायिलेली गाणी पद्माचीच.
" पमन ,शिल्पानं यु ट्युबवर गाणी आपल्या नावावर अपलोड केली पण ती भन्नाट गाजली .मग नंतर तिलाच आपलं नाव कट करत पद्मा घालावयास लावल्याचं रस्तोगी सांगत होता. त्याला वाटलं ही टोपणनावानं टाकत असेल. पण आता ती नाही म्हणून नेमकं कुणास उभं करावं हा त्यांना प्रश्न पडलाय!"
पमनला गातांना तोच सुगंध का जाणवत होता ते कळलं पण त्याच वेळी गोव्याहुन परतल्यावर शिल्पानं हा बदल केला म्हणून त्याच्या डोळ्यात आसवे तरळली व तो तेथून उठत खोलीत गेला व आकांत करत आठवू लागला.
चांदण्या रातीची पहाट..." पम्या साल्या, आता घरचेच काय पण तुला माझ्यापासून कुणीच दूर करू शकत नाही.अगदी अगदी पमी ही!"
पमन ढसाढसा रडू लागला
शिल्पा......! कुठं.....? कुठं आहेस गं!
आकांत...! आकांत... !आकांत...!
मायानं रस्तोगीला कळवत पद्मास उजेडात आणलं. सुबोध राणेकडं शिल्पानं ठेवलेली वही मायानं आणत पमनला दाखवली.
गायक व गीतकार म्हणुन एकत्रीत रित्या पुरस्कार स्टेजवर पमन पद्मानं स्विकारला. पद्मा कार्यक्रमालाच जायचं नाही म्हणत होती. पण मायानं तिचं काही एक न ऐकता तिला समजावत तयार केलं. मनिष निकमांनी व्यावसायिक गाईड कडं नेत पद्मास स्टेजवर कसं वावरायचं पुरस्कार कसा स्विकारावं शिकवलं.त्याबरोबर ड्रेस डिझायन व हेअर ...सारं सारं...
पद्मानं कात टाकली.
गायक व गीतकार यांना एकाच क्लिकवर घेत फोटो बाॅलीवुड....नेट सोशलमिडीयात फिरला. तोच फोटो नेटवर ...तीच बातमी ...प्रशांतनं शिल्पास दाखवली.फक्त फोटो एडीटींग करत दोघांच्या अंतरीच्या कळा दाखवण्यासाठी त्यानं दोघांना लग्नाच्या पाटावर बसवलं. फूट पाडत शिल्पास ओढण्याचा अखेरचा टोला तो हाणू पाहत होता!
.
.
रस्तोगीनं आता पद्मास दर्दभरे नविन लिहावयास लावलं. तो पमनकडं दर्दभरे नगमा लोकांना ऐकवू पाहत होता की पद्माचं पमनसाठी गाण्यात उतरलेलं दु:ख शिल्पाच्या दु:खाच्या रूपात पमन कडुन गावून घेणार होता! हा कलाकार रस्तोगी लोकांची दु:खं विकणार होता? की त्यांच्या दु:खास वाचा फोडणार होता?
पण त्या आधीच भारतात ही महामारी चोरपावलानं आलीच.
.
.
.
क्रमशः
वा...पा...