झटेतलं चांदणं 🔖 भाग :: -- आठवा
उरूग्वेच्या किनाऱ्यापासून दहा बारा किमी अंतरावर असलेल्या निर्जन बेटाच्या सागरी किनाऱ्यावर शिल्पा अर्धवट शुद्धीत अटलांटिक महासागराच्या लाटाकडं सुन्नतेने पाहत होती. मावळतीच्या सूर्यास्ताची सोन केशर किरणं लाटांवर नाचत होती. बेटातील झाडीत समुद्रपक्ष्यांची घरट्यात परतण्याची कलकल चाललेली होती. घरट्याकडं झेप घेणाऱ्या पाखराकडं पाहताच
' आपणासही अशी झेप घेत घरट्याकडं का परतता येत नाही?' म्हणून तिच्या कोरड्या पडलेल्या नजरेत पाणी दाटल्याचं तिला जाणवलं. अंजना बाईनं येत तिला मध्ये नेलं.
" शिल्पा, तुझे परतीचे सारे दोर कापले गेले. ऐक, प्रशांतचा अंगिकार कर!त्या शिवाय दोघांची सुटका नाही गं!" अंजना बाई म्हणताच ती उठली व मागच्या लॅबच्या गार्डनमध्ये गेली. जिकडे तिकडे पिंजरे व सापळेच सापळे. उंदीर, वटवाघळे, माकडे, ससे, कोल्हे पिंजऱ्यात कोंडलेले. काहीची वाढ खुंटलेली तर काही वाजवी फुगलेले. काहीच्या अंगावरचे केस, पिसे उडालेली. काही झिंगलेली तर काही अर्धवट बेशुध.काही माकडं उग्र तर काही एकदम असहाय. औषधाच्या मात्रा व प्रयोगांनी त्यांना उध्वस्त करत काही ना काही निष्कर्ष काढलेले.
" आपली गत ही यांच्यासारखीच! आपल्यावर व अंजना आत्या वरही परशा असाच प्रयोग करतोय! पमनला विसरत प्रशांतला मनात रोवण्याचा प्रयोग! त्यासाठी किती किती औषधं, चाटणं, गोळ्या, इंजेक्शन वापरतोय! पण निष्कर्ष काय! दिवसेंदिवस पम्याच्या आकर्षणाच्या पेशीचा कर्क वाढतच जातोय!" पमन...! पमन...! ये ना! मी नाही लांघू शकत हा महाकाय सागर! पण तू तरी ये! ती चित्कारणाऱ्या माकडापुढं फळ फेकत तिथंच बसली.
.
.
मागच्या दिड वर्षांपूर्वी आली तेव्हापासुन अर्धवट शुद्धीत येतांनाचं जे जे आठवेल ते आठवू लागली......
बाकी काळ तर ती बेशुद्ध वा गाढ झोपेतच....
' आपणासही अशी झेप घेत घरट्याकडं का परतता येत नाही?' म्हणून तिच्या कोरड्या पडलेल्या नजरेत पाणी दाटल्याचं तिला जाणवलं. अंजना बाईनं येत तिला मध्ये नेलं.
" शिल्पा, तुझे परतीचे सारे दोर कापले गेले. ऐक, प्रशांतचा अंगिकार कर!त्या शिवाय दोघांची सुटका नाही गं!" अंजना बाई म्हणताच ती उठली व मागच्या लॅबच्या गार्डनमध्ये गेली. जिकडे तिकडे पिंजरे व सापळेच सापळे. उंदीर, वटवाघळे, माकडे, ससे, कोल्हे पिंजऱ्यात कोंडलेले. काहीची वाढ खुंटलेली तर काही वाजवी फुगलेले. काहीच्या अंगावरचे केस, पिसे उडालेली. काही झिंगलेली तर काही अर्धवट बेशुध.काही माकडं उग्र तर काही एकदम असहाय. औषधाच्या मात्रा व प्रयोगांनी त्यांना उध्वस्त करत काही ना काही निष्कर्ष काढलेले.
" आपली गत ही यांच्यासारखीच! आपल्यावर व अंजना आत्या वरही परशा असाच प्रयोग करतोय! पमनला विसरत प्रशांतला मनात रोवण्याचा प्रयोग! त्यासाठी किती किती औषधं, चाटणं, गोळ्या, इंजेक्शन वापरतोय! पण निष्कर्ष काय! दिवसेंदिवस पम्याच्या आकर्षणाच्या पेशीचा कर्क वाढतच जातोय!" पमन...! पमन...! ये ना! मी नाही लांघू शकत हा महाकाय सागर! पण तू तरी ये! ती चित्कारणाऱ्या माकडापुढं फळ फेकत तिथंच बसली.
.
.
मागच्या दिड वर्षांपूर्वी आली तेव्हापासुन अर्धवट शुद्धीत येतांनाचं जे जे आठवेल ते आठवू लागली......
बाकी काळ तर ती बेशुद्ध वा गाढ झोपेतच....
प्लेन नं काका, काकू आत्या प्रशांतसोबत कोलंबीयाला यायला निघाले. त्या आधी आत्या कदम मामा, काका, चंद्या, सुरेश साऱ्यांनी आपल्यावर पमनसोबत तूच फसतेय व आपली योजना फसवतेय म्हणून झाडाझडती घेतली होती. पण शिल्पानही पमनचा व त्याच्या काकाचा विश्वास संपादन करण्यासाठी रोगार पिणं गरजेचं होतं, सांगत योजनेनुसार पमनला जाळ्यात ओढण्यासाठी केलं म्हणून त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास बसेना. त्यात प्रशांतच्या प्रबंधाची निवड झाल्यानं त्याच्या कार्यक्रमासाठी व वेब सिरीज साठी इथं येण्याचा आत्या प्रशांतनं घाट घातला. शिल्पानं पमनबाबत आपल्या मनात काही नाही ,आपण नाटक करत फसवत आहोत हा विश्वास दर्शवण्यासाठी एका महिन्यासाठी सोबत येण्याचं कबुल केलं.
आधीचे आठ दिवस त्यानं अनेक पेपर फिरवले. शिल्पाच्या ही बऱ्याच पेपरवर सह्या घेतल्या. कोलंबीयात राहण्यासाठी व कार्यक्रमाबाबतची ती प्रोसेज असल्याचं त्यानं सांगत भराभर सह्या घेतल्या. पण तो तर लग्न व नागरिकत्वाचा फास होता
पंधरा दिवस फिरण्यात गेले. मग आत्या व काका काकूंनी पत्ते उलघडण्यास सुरुवात केली.
प्रशांत शास्त्रज्ञ झालाय म्हणून लग्नाबाबत तयारी सुरू केली. प्रथम शिल्पानं विरोध नको म्हणून लग्नास होकार दिला पण भारतात परतून गावावरच लग्न करण्याबाबत सांगितलं.
" शिल्पा लग्न करायचं मग इथं काय नी भारतात काय?" नकार देणाऱ्या शिल्पास सारे सांगू लागले.
शिल्पा समजून चुकली की यांनी आपणास याठिकाणी लग्नासाठीच आणलंय. आपली योजना आपल्यावरच उलटतेय आता.
" आत्या, तसं नाही म्हणायचं मला.लग्न तर करायचंच पण लग्नासाठी पप्पा व आई तर हवेत! म्हणून त्यांच्या समोर भारतात परतून करू हवं तर!" शिल्पा आता कसं ही करून भारतात परतू पाहत होती.
" शिल्पा! काका - काकू आहेतच ना! मग? मग मंगा असला काय नी नसला काय? काय फरक पडणार!" अंजनाबाई दात कडकड वाजवत समजावू लागली.
" नाही, आई वडीलांसमोरच लग्न होईल!" शिल्पा रागानं म्हणाली.
." आई ठिक आहे! त्या मामाला इथंच बोलवतो मी!" प्रशांत मार्ग काढत प्रथमच म्हणाला.
शिल्पाला आता घाम फुटू लागला. भारतात हे आता परतू देणार नाहीत लग्नाशिवाय हे ती समजून चुकली.मग ती साफ साफ उत्तरली.
" आत्या, मला एका महीन्यासाठी आणलंय ना! मग आता मला नाही रहायचं इथं! परत चला!"
" शिल्पे सरळ सांग ना, तुला प्रशांतशी नाही तर पमनशी लग्न करायचं व त्यासाठी भारतात परतायचंय!म्हणजे तू पमनशी नव्हे तर आमच्याशीच नाटक करत होती आतापर्यंत!" सोमा पोवार रागात बोलला.
शिल्पा आता समजून चुकली. आपलं नाटक हे समजूनच चुकलेत. तर मग आता सरळ स्पष्टच करावं लागेल.
" हो! मी नाही राहू शकत पमन शिवाय! मला त्याच्याशीच लग्न करायचंय!" शिल्पा संतापानं फुत्कारली.
" शिल्पे, लहानपणापासून तुझं प्रशांतशी पक्कं असतांना तू त्या कुत्र्यांचं नाव तरी कसं काढतेय!" अंजनाबाई संतापल्या.
" आत्या त्याला जाळ्यात ओढत उध्वस्त करायला तुम्हीच सांगितलं.तुमची दुश्मनी काढण्यासाठी मला वापरत होते तुम्ही. पण त्याला प्रेमात ओढता ओढता मीच त्याच्या प्रेमात केव्हा पडलेय हे मलाच समजलं नाही. आता त्याच्याशिवाय नाही राहू शकत मी! म्हणुन हात जोडते व मला परत भारतात सोडा!"
" शिल्पे! त्या भिकारड्या सदाच्या भिकारड्या पम्यात काय ठेवलंय! त्याचा नाद सोड व प्रशांतशी लग्न कर! " सोमा पोवार संतापले.
" काका ,तो भिकारडा असो की काही ही असो! मला तोच जोडीदार हवा!"
" शिल्पा!....शिल्पा!!, लहानपणापासून आपण सोबत वावरलो. दहावीत तू गावास गेली.नी त्या पमनशी ....जोडी? अगं फालतू गायक! लग्नात फडतूस बॅण्ड मध्ये गाणं काय म्हणतो! आज मला पहा! किती प्रबंध माझ्या नावावर! कमी वयात शास्त्रज्ञ झालो. आज किती तरी देश मला आॅफर देत आहेत संशोधनासाठी. नामांकित संशोधन संस्थेत आज काम करतोय. एका देशानं तर मला स्वतंत्र एक बेटावर सारी सुविधा पुरवत संशोधनासाठी बोलवलंय! ऐक ,मामा मामी आई सांगतेय त्याप्रमाणं कर!"
" प्रशांत, कमी वयात तू खूप काही मिळवलंय! त्याबद्दल तुझा मला ही अभिमान वाटतो! पण कुणी ही कुणाच्या ऐश्र्वर्यावरच प्रेम करतं असं नाही रे! प्रेम भावना ही अलवार असते तर कधी वज्राहुन ही कठिण! ती कधी कुणावर बरसेल सांगता येत नाही! म्हणून मी पण हात जोडते, पण मला पमनला विसरणं शक्य नाही!"
" एवढं काय ठेवलंय त्या बोकडागत माजलेल्या निर्बुद्ध बैलात!" प्रशांत रागानं उफाणला.
" त्याच्यात काय आहे ! हे नाही कळणार तुला! त्याच्या खेळात कुणालाही शिंगावर घेत फाडून जिंकण्याची ताकद आहे! दुश्मनाच्या घरात घुसून पेटवण्याची ताकद आहे त्याच्यात!" शिल्पा बोलली व प्रशांतला ओसरीवरून लाथेनं फेकणारा, कापुस पेटवणारा व नंतर आपल्याच चढ्ढीत पेटती लड धरत कोंबणारा लहाना पमन आठवला. समोर टांगलेल्या पिंजऱ्यात पोपट ओरडत होता. संतापानं प्रशांतनं पिंजऱ्याचं दार उघडत त्याची मान दोन्ही बोटाच्या चिमटीत धरत पिरगाळली. पोपट ची ची करत हवेत पाय व पंख फडफडवत शांत झाला.
" मूर्ख बोलायला शिकवलं म्हणजे केव्हाही बोलायचं का?समजत नाही दोन लोक किती महत्वाचं बोलतायत!" तो मेलेल्या पोपटाला संताप करत समजावू लागला.
" शिल्पे, ऐक ना! लग्नास तयार हो!" अंजनाबाई ...
" आई पुरे! तू पण माझ्या सारखाच मूर्खपणा करतेय! मी या मेलेल्या पोपटाला शिकवतोय नी तू ही..."
त्या रात्री शिल्पावर अंजना आत्या, काका, काकी व प्रशांत यांनी चौघांनी मारहाण धाक दपटशा दाखवत लग्नासाठी होकार मिळवण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. शिल्पानं अन्न सोडलं. चार दिवस अन्नाचा कण घेतला नाही. तिला आशा एकच आपण जेवण घेतलं नाही तर ढासळती तब्येत पाहुन हे आपणास परत पाठवतील. पण तिच्याकडून मोबाईल तर आधीच घेतलेला. नंतर खोलीत कोंडत प्रशांतनं तिला इंजेक्शनं सुरू केली. नशेत तिला जिकडे तिकडे पमनच दिसू लागला. तिच्यासाठी लग्नाचं महावस्त्र व इतर वस्तू आणणारा पमन! तिला प्रेमानं आलिंगन देत आपल्या बाहुपाशात घेणारा पमन. चार पाच दिवस पमन सोबत नशेत ती एकदम तरंगत राहिली. मग पमननं तिला सोबत घेत आत्या,काका व काकी यांना घेत महावस्त्र नेसवत मंदिरात नेलं. छोटंसं मदिर .जणू आताच उभारलेलं. तिनं नशेतच खुशीनं पमनला पुष्पहार घातला व मग पमननं. मग पमन तिला कुठल्याशा आॅफिसात नेत तिच्या लग्नाची नोंद करू लागला. या साऱ्या धावपळीत तिला प्रशांत कुठेच दिसेना. विशेष पमन सोबत आत्या काका काकीही एकदम खूश. मग त्याच नशेत ती ही खूश. सारी रात्र पमनसोबत ती सागरात फिरली. पण सकाळी तिचं डोकं उठलं. सणका उफाणत तिचं अंग अंग ठणकू लागलं. डोळ्यापुढं अंधारी दाटू लागली. त्याच अंधारीत कुठून तरी प्रशांत आला. त्यानं नाकासमोर काही धरलं. जिभेवर काही चाटवलं नी मग कमरेत एक दणका. इंजेक्शन टोचल्यागत.
मग पुन्हा पमन आला तसं शिल्पा त्याला बिलगली. प्रशांत गायब.
हाच खेळ किती दिवस चालू होता. तिला कळेना. रात्र दिवस काहीच समजेना. फक्त नशा, झोप, जीभेवर चाटण, नाकात वास नंतर कमरेत झिणझिण्या व सणका आणणारी सुयी. नी मग धुंद धुंद पमन!
काका काकी केव्हाच परतले होते. कोलंबियाहून ती उरुग्वेत येत किनाऱ्यापासून दूर बेटावर आणली गेली.
बेटावर कसलाच संपर्क नाही, जाळं नाही, माणूस नाही. फक्त एक बार्ज येई. ती प्रशांतला आणणं व सोडणं एवढं काम करत निघून जाई.
शरीर रोजच्या नशेला झोपीला साथ देईना झालं. मग उंदरा सोबत माकडासोबत तिच्यावरील प्रयोग ही बदलले. चाटणं बदलली, मात्रा बदलल्या, इंजेक्शनं बदलली. कृती बदलली, निरीक्षणे व निष्कर्ष नव्याने चाचपून घेतले जाऊ लागले.
आताशी शिल्पाला दुपारून चारच्या आसपास थोडी शुद्ध येऊ लागली. डोक्यावर ताण देत ती आठवे. मग आपल्यावर चाललेले प्रयोग कळू लागले. आपलं सर्वस्व गेलं, आर्डी गेलं, आई वडील गेले, पमन गेला. ती असहाय पणे रडत राही. परतीचे दोर कापत दरवाजे बंद झाले. मूळत: कोलंबिया हून आपणास कुठं आणलं हेच कळेना. अंजना आत्याला विचारून ही काहीच हाती लागत नव्हतं. आता आत्याच प्रशांतच्या हातातील बाहुलं होतं. तिच्यावर ही प्रयोग सुरू ठेवत स्मृती गारठल्यागतच झालं होतं. पण त्यात निदान या
सुनसान जागी आत्या देहानं समोर आहे याचं तरी तिला सुधेत समाधान वाटे. चारनंतर तिला थोडं समजू लागलं की ती पमनला आठवे.व रडत राही. तोच सायंकाळी प्रशांत येई. पण तिच्या शरीरानं हल्ली औषधाची सवय करत परिणाम दाखवणं बंद करत रात्रीचं पमन दिसणं तिच्या चेतनानी अव्हहेरलं होतं.त्यामुळं प्रशांतचा जळफळाट होऊ लागला.
त्यानं पुन्हा प्रयोग बदलवले. शिल्पा व आत्यास पूर्वपदावर आणू लागला.
त्याच वेळी जगात एक मोठ्या प्रलयाची घंटा घणघणू लागली.. चीन, फ्रान्स करत करत अमेरिका पादाक्रांत होऊ लागली. ब्राझील, ऊरुग्वे सुरुवात झाली. सारं आवागमन बंद झालं. मग त्याला थोडा दिलासा वाटला. तूर्तास शिल्पानं किती ही प्रयत्न केला तरी ही परतू शकत नाही. कारण परतण्याची साधनंच नाही. म्हणून त्यानं शिल्पा व आईस सैल सोडलं. नशा व प्रयोग बंद झाले. बेटावर त्यानं विश्वासू माणसं ठेवली. जी मुकी होती. तो आलेल्या व्हायरसची लस शोधण्याच्या कामात गुंग झाला. बेटापासून अंतरावर असणाऱ्या किनाऱ्यावर त्याच्या संस्थेचं कार्यालय होतं. तो रात्रभर त्या ठिकाणी संशोधन करत दिवसा बेटावर परतू लागला. त्यांच्या व त्याच्या साथीदारांना संशोधनात यश येऊ लागलं. व्हॅक्सीनच्या अॅनिमल ट्रायल सुरू झाल्या.
शिल्पा आता आधीसारखी नाॅर्मल होऊ लागली. पण त्यानं पमनची आठवण आली की ती रात्र रात्र जागू लागली. मग त्याच वेळी आपल्या देहाकडं पाहताच तिला आपलीच घृणा वाटू लागली. पमनच्या आठवणीतही त्याच्या नजरेस नजर देण्याचं तिला धाडस होईना. तरी रात्री प्रशांत गेला की ती सुनसान बेटावर बाहेर बंगल्याच्या समोर फिरत चांदण्या आकाशात पाहत राही.तर कधी फेसाळणाऱ्या सागराकडं.
चांदण्या रातीत फेसाळणारा महासागर पाहताच तिला पमनसोबतची गोव्यातील रात आठवली.
शिकाऱ्याची, हाॅटेलची सारी सोय रस्तोगीनं केलेली होती. शिकारा अरबी सागरात शांत तरंगत होता. आजुबाजुला कनाती लावत वरचं आभाळ मोकळं दिसत होतं. पमनच्या छातीवर ती पहुडलेली.
" शिल्पे!"
" हू!"
" समजा तुझ्या घरच्यांनी लग्नास नकार दिला तर?"
शिल्पा या प्रश्नाने घाबरली.कारण सदा आबाला आपण मनवलं. पण घरी तर आपले वडीलच तयार आहेत. काका काकी, चंद्या आत्या यांना आपण पमनला उध्वस्त करण्यासाठीच नाटक करतोय हेच माहीत आहे मग!
" शिल्पे बोल ना!" शिल्पा बोलत नाही पाहून पमन विचारू लागला.
" पम्या साल्या.. तुझा प्रश्न तर लाख मोलाचा आहे! त्यावर एक जालीम उपाय आहे माझ्याकडं!" शिल्पी हसत म्हणाली.
" शिल्पे हसू नको! सांग!"
" आपण लग्न इकडेच उरकवू!" म्हणत शिल्पानं त्याला आपल्या बाहुपाशात घेतलं. शिकारा जसजसा खोल सागरात जात होता तसं मांडवी नदीनं आपलं अस्तित्व अरबी समुद्राला अर्पण करत ती सागरातच विलीन झाली. आता कोणी कितीही प्रयत्न केला तरी मांडवी नदीस सागरातून अलग करूच शकत नव्हतं.
सकाळी उठल्यावर शिल्पानं पमनला विचारलं.
" पमन आता माझ्या घरचेच काय पण विधाता ही आपणास विरोध करणार नाही" पमन हसू लागला. तोच पमनला मायाचा फोन आला. माया पमीच्या लग्नाबाबत काही तरी विचारत होती व तिनं बोलता बोलता पमीला फोन दिला असेल बहुतेक पमी फोनवरून तिकडनं बोलत असावी.
शिल्पा शिकाऱ्यातून बाहेर पाहू लागली तर शिकारा सागरातून मांडवी मुखात शिरत होता. जणू सागरापासुन मांडवी नदीच अलग होत असावी.
मांडवी नदीकडं पाहत शिल्पानं पमीस मनात शिवी हासडली.
.
.
शिल्पास आठवलं नी आपण आर्डीतून कोलंबीयाला येतांना मायाला बजावून आलो होतो.
" माया या पमनवर लक्ष ठेव गं, मी येईपर्यंत!" त्यावेळेस आपण पमीबाबत बोलतोय हे मायाला कळलं होतं. म्हणून माया आपल्याकडं रागानं पाहत होती. हे शिल्पास आठवलं. ती रडू लागली.
" पम्या साल्या! तू पमीचा झालास तरी मला हवा आहे रे! पमीसहीत सुखानं नांद हवं तर नाही मायानं लक्ष ठेवलं तर! पण तरी मला हवा आहेस! पमे, मला माफ कर! तू राधा आहेस? तू मिरा आहेस? की तिलोत्तमा? मला माहीत नाही! मी कोण हे ही माहीत नाही मला! पण माझा कृष्णसखा पम्या मला हवा आहे! ती त्या चांदण्या रात्रीत किती तरी वेळ ढसाढसा रडत आपले अश्रू अटलांटीक सागरात मिसळत राहिली. पण तिचं रूदन, आक्रोश त्या मुक्या बहिऱ्या गार्डशिवाय कोण ऐकणार होतं.
सकाळी सकाळीच प्रशांतनं तिला बोलवलं. त्याच्याकडं लॅपटाॅप होता .
" शिल्पा तुला एक आनंदाची बातमी दाखवायचीय!"
" प्रशांत! पाया पडते मला निदान आई बाबाशी तरी बोलू दे!"
" डिअर इथं नेटवर्क नाही माहितेय ना तुला!"
" हरामखोर ते मला माहितेय पण तुला आॅफिस काम करतांना या सर्व बाबी उपलब्ध करता येतात हे ही माहितीय मला! प्लिज बोलू देना!"
" हा, तू बरी आठवण केलीस बघ तुला एक गंमत दाखवतो आधी ती पहा!" म्हणत तो आपला हात तिच्या हाताकडं नेऊ लागला. तोच त्याच्या
गालावर शिल्पाच्या थरथरणाऱ्या हाताची चपराक बसली.
" हरामखोरा! हात लावायचा नाहीस अंगाला! लांबून बोल!"
" अंगाला हात? सारं सारं हिणवल्यावर?"
" हरामखोर नशेची औषधं, वेगवेगळी इंजेक्शनं देत तू काय पाप केलंस ते तुलाच माहित पण एक मात्र निश्चीत या साऱ्या प्रयोगातून तू किन्नरआहेस हे मात्र तूच सिद्ध केलंस! कारण तुझ्या पौरूषत्वात ती हिम्मत नव्हतीच! मग तु धोक्यानं वागलास. पण तरी नशेत मी माझ्या पमनलाच शील अर्पण केलं. तू किन्नरच ठरला व पमन मर्द होता मर्दच ठरला."
प्रशांतनं आपल्या समोरचा स्टूल उचलत किंकाळी भरत आपल्याच डोक्यावर आदळला. स्टुलचा कोना लागत डोक्यातून रक्त वाहू लागला. त्याच अवस्थेत त्यानं संतापात तिचा हात धरत लॅपटाॅपकडं नेत लॅपटाॅप सुरू केला. त्यानं साईट सर्च करत महाराष्ट्रातलं दैनिक काढलं. गडचिरोली आवृती होती ती जुनी. मराठी दैनिक दिसताच शिल्पाला आपल्या मातीच्या खुणा दिसल्या व ती त्या ही स्थितीत हपापल्या सारखी पाहू लागली. दिडेक वर्षानंतर तिला मराठी अक्षरं वाचावयास मिळत होती.
बातमी वाचून तिला कडी मागून कडी उलघडू लागली.
अनंत जगताप...पद्मा अनंत जगताप....पवन मदन नकाशे,...प्रतापराव....मारोती समक्ष ओळख....अनंतचा नक्षलवाद्यानी खून...... एका वर्षानंतर ओळख पटली....बातमी पेक्षा तिला झूम करून दाखवलेला पमनचा फोटो प्रशांतनं दाखवला व ती थरथरत लॅपटाॅपला बिलगत पम्या पम्या म्हणत ओरडू लागली. तोच प्रशांतनं साईट बंद केली.
" याराना.....पुराना..... आतून कळ उठते..... हीच कळ मला ही उठली होती अंतरीच्या कळा मध्ये तुम्हाला एकत्र गातांना! नंतर ही अशीच कळ उठली होती चित्रपटाच्या गाण्याचं प्रोमो पाहतांना. नी तसाच भारतात आलो व उचलली तुला...."
आधीचे आठ दिवस त्यानं अनेक पेपर फिरवले. शिल्पाच्या ही बऱ्याच पेपरवर सह्या घेतल्या. कोलंबीयात राहण्यासाठी व कार्यक्रमाबाबतची ती प्रोसेज असल्याचं त्यानं सांगत भराभर सह्या घेतल्या. पण तो तर लग्न व नागरिकत्वाचा फास होता
पंधरा दिवस फिरण्यात गेले. मग आत्या व काका काकूंनी पत्ते उलघडण्यास सुरुवात केली.
प्रशांत शास्त्रज्ञ झालाय म्हणून लग्नाबाबत तयारी सुरू केली. प्रथम शिल्पानं विरोध नको म्हणून लग्नास होकार दिला पण भारतात परतून गावावरच लग्न करण्याबाबत सांगितलं.
" शिल्पा लग्न करायचं मग इथं काय नी भारतात काय?" नकार देणाऱ्या शिल्पास सारे सांगू लागले.
शिल्पा समजून चुकली की यांनी आपणास याठिकाणी लग्नासाठीच आणलंय. आपली योजना आपल्यावरच उलटतेय आता.
" आत्या, तसं नाही म्हणायचं मला.लग्न तर करायचंच पण लग्नासाठी पप्पा व आई तर हवेत! म्हणून त्यांच्या समोर भारतात परतून करू हवं तर!" शिल्पा आता कसं ही करून भारतात परतू पाहत होती.
" शिल्पा! काका - काकू आहेतच ना! मग? मग मंगा असला काय नी नसला काय? काय फरक पडणार!" अंजनाबाई दात कडकड वाजवत समजावू लागली.
" नाही, आई वडीलांसमोरच लग्न होईल!" शिल्पा रागानं म्हणाली.
." आई ठिक आहे! त्या मामाला इथंच बोलवतो मी!" प्रशांत मार्ग काढत प्रथमच म्हणाला.
शिल्पाला आता घाम फुटू लागला. भारतात हे आता परतू देणार नाहीत लग्नाशिवाय हे ती समजून चुकली.मग ती साफ साफ उत्तरली.
" आत्या, मला एका महीन्यासाठी आणलंय ना! मग आता मला नाही रहायचं इथं! परत चला!"
" शिल्पे सरळ सांग ना, तुला प्रशांतशी नाही तर पमनशी लग्न करायचं व त्यासाठी भारतात परतायचंय!म्हणजे तू पमनशी नव्हे तर आमच्याशीच नाटक करत होती आतापर्यंत!" सोमा पोवार रागात बोलला.
शिल्पा आता समजून चुकली. आपलं नाटक हे समजूनच चुकलेत. तर मग आता सरळ स्पष्टच करावं लागेल.
" हो! मी नाही राहू शकत पमन शिवाय! मला त्याच्याशीच लग्न करायचंय!" शिल्पा संतापानं फुत्कारली.
" शिल्पे, लहानपणापासून तुझं प्रशांतशी पक्कं असतांना तू त्या कुत्र्यांचं नाव तरी कसं काढतेय!" अंजनाबाई संतापल्या.
" आत्या त्याला जाळ्यात ओढत उध्वस्त करायला तुम्हीच सांगितलं.तुमची दुश्मनी काढण्यासाठी मला वापरत होते तुम्ही. पण त्याला प्रेमात ओढता ओढता मीच त्याच्या प्रेमात केव्हा पडलेय हे मलाच समजलं नाही. आता त्याच्याशिवाय नाही राहू शकत मी! म्हणुन हात जोडते व मला परत भारतात सोडा!"
" शिल्पे! त्या भिकारड्या सदाच्या भिकारड्या पम्यात काय ठेवलंय! त्याचा नाद सोड व प्रशांतशी लग्न कर! " सोमा पोवार संतापले.
" काका ,तो भिकारडा असो की काही ही असो! मला तोच जोडीदार हवा!"
" शिल्पा!....शिल्पा!!, लहानपणापासून आपण सोबत वावरलो. दहावीत तू गावास गेली.नी त्या पमनशी ....जोडी? अगं फालतू गायक! लग्नात फडतूस बॅण्ड मध्ये गाणं काय म्हणतो! आज मला पहा! किती प्रबंध माझ्या नावावर! कमी वयात शास्त्रज्ञ झालो. आज किती तरी देश मला आॅफर देत आहेत संशोधनासाठी. नामांकित संशोधन संस्थेत आज काम करतोय. एका देशानं तर मला स्वतंत्र एक बेटावर सारी सुविधा पुरवत संशोधनासाठी बोलवलंय! ऐक ,मामा मामी आई सांगतेय त्याप्रमाणं कर!"
" प्रशांत, कमी वयात तू खूप काही मिळवलंय! त्याबद्दल तुझा मला ही अभिमान वाटतो! पण कुणी ही कुणाच्या ऐश्र्वर्यावरच प्रेम करतं असं नाही रे! प्रेम भावना ही अलवार असते तर कधी वज्राहुन ही कठिण! ती कधी कुणावर बरसेल सांगता येत नाही! म्हणून मी पण हात जोडते, पण मला पमनला विसरणं शक्य नाही!"
" एवढं काय ठेवलंय त्या बोकडागत माजलेल्या निर्बुद्ध बैलात!" प्रशांत रागानं उफाणला.
" त्याच्यात काय आहे ! हे नाही कळणार तुला! त्याच्या खेळात कुणालाही शिंगावर घेत फाडून जिंकण्याची ताकद आहे! दुश्मनाच्या घरात घुसून पेटवण्याची ताकद आहे त्याच्यात!" शिल्पा बोलली व प्रशांतला ओसरीवरून लाथेनं फेकणारा, कापुस पेटवणारा व नंतर आपल्याच चढ्ढीत पेटती लड धरत कोंबणारा लहाना पमन आठवला. समोर टांगलेल्या पिंजऱ्यात पोपट ओरडत होता. संतापानं प्रशांतनं पिंजऱ्याचं दार उघडत त्याची मान दोन्ही बोटाच्या चिमटीत धरत पिरगाळली. पोपट ची ची करत हवेत पाय व पंख फडफडवत शांत झाला.
" मूर्ख बोलायला शिकवलं म्हणजे केव्हाही बोलायचं का?समजत नाही दोन लोक किती महत्वाचं बोलतायत!" तो मेलेल्या पोपटाला संताप करत समजावू लागला.
" शिल्पे, ऐक ना! लग्नास तयार हो!" अंजनाबाई ...
" आई पुरे! तू पण माझ्या सारखाच मूर्खपणा करतेय! मी या मेलेल्या पोपटाला शिकवतोय नी तू ही..."
त्या रात्री शिल्पावर अंजना आत्या, काका, काकी व प्रशांत यांनी चौघांनी मारहाण धाक दपटशा दाखवत लग्नासाठी होकार मिळवण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. शिल्पानं अन्न सोडलं. चार दिवस अन्नाचा कण घेतला नाही. तिला आशा एकच आपण जेवण घेतलं नाही तर ढासळती तब्येत पाहुन हे आपणास परत पाठवतील. पण तिच्याकडून मोबाईल तर आधीच घेतलेला. नंतर खोलीत कोंडत प्रशांतनं तिला इंजेक्शनं सुरू केली. नशेत तिला जिकडे तिकडे पमनच दिसू लागला. तिच्यासाठी लग्नाचं महावस्त्र व इतर वस्तू आणणारा पमन! तिला प्रेमानं आलिंगन देत आपल्या बाहुपाशात घेणारा पमन. चार पाच दिवस पमन सोबत नशेत ती एकदम तरंगत राहिली. मग पमननं तिला सोबत घेत आत्या,काका व काकी यांना घेत महावस्त्र नेसवत मंदिरात नेलं. छोटंसं मदिर .जणू आताच उभारलेलं. तिनं नशेतच खुशीनं पमनला पुष्पहार घातला व मग पमननं. मग पमन तिला कुठल्याशा आॅफिसात नेत तिच्या लग्नाची नोंद करू लागला. या साऱ्या धावपळीत तिला प्रशांत कुठेच दिसेना. विशेष पमन सोबत आत्या काका काकीही एकदम खूश. मग त्याच नशेत ती ही खूश. सारी रात्र पमनसोबत ती सागरात फिरली. पण सकाळी तिचं डोकं उठलं. सणका उफाणत तिचं अंग अंग ठणकू लागलं. डोळ्यापुढं अंधारी दाटू लागली. त्याच अंधारीत कुठून तरी प्रशांत आला. त्यानं नाकासमोर काही धरलं. जिभेवर काही चाटवलं नी मग कमरेत एक दणका. इंजेक्शन टोचल्यागत.
मग पुन्हा पमन आला तसं शिल्पा त्याला बिलगली. प्रशांत गायब.
हाच खेळ किती दिवस चालू होता. तिला कळेना. रात्र दिवस काहीच समजेना. फक्त नशा, झोप, जीभेवर चाटण, नाकात वास नंतर कमरेत झिणझिण्या व सणका आणणारी सुयी. नी मग धुंद धुंद पमन!
काका काकी केव्हाच परतले होते. कोलंबियाहून ती उरुग्वेत येत किनाऱ्यापासून दूर बेटावर आणली गेली.
बेटावर कसलाच संपर्क नाही, जाळं नाही, माणूस नाही. फक्त एक बार्ज येई. ती प्रशांतला आणणं व सोडणं एवढं काम करत निघून जाई.
शरीर रोजच्या नशेला झोपीला साथ देईना झालं. मग उंदरा सोबत माकडासोबत तिच्यावरील प्रयोग ही बदलले. चाटणं बदलली, मात्रा बदलल्या, इंजेक्शनं बदलली. कृती बदलली, निरीक्षणे व निष्कर्ष नव्याने चाचपून घेतले जाऊ लागले.
आताशी शिल्पाला दुपारून चारच्या आसपास थोडी शुद्ध येऊ लागली. डोक्यावर ताण देत ती आठवे. मग आपल्यावर चाललेले प्रयोग कळू लागले. आपलं सर्वस्व गेलं, आर्डी गेलं, आई वडील गेले, पमन गेला. ती असहाय पणे रडत राही. परतीचे दोर कापत दरवाजे बंद झाले. मूळत: कोलंबिया हून आपणास कुठं आणलं हेच कळेना. अंजना आत्याला विचारून ही काहीच हाती लागत नव्हतं. आता आत्याच प्रशांतच्या हातातील बाहुलं होतं. तिच्यावर ही प्रयोग सुरू ठेवत स्मृती गारठल्यागतच झालं होतं. पण त्यात निदान या
सुनसान जागी आत्या देहानं समोर आहे याचं तरी तिला सुधेत समाधान वाटे. चारनंतर तिला थोडं समजू लागलं की ती पमनला आठवे.व रडत राही. तोच सायंकाळी प्रशांत येई. पण तिच्या शरीरानं हल्ली औषधाची सवय करत परिणाम दाखवणं बंद करत रात्रीचं पमन दिसणं तिच्या चेतनानी अव्हहेरलं होतं.त्यामुळं प्रशांतचा जळफळाट होऊ लागला.
त्यानं पुन्हा प्रयोग बदलवले. शिल्पा व आत्यास पूर्वपदावर आणू लागला.
त्याच वेळी जगात एक मोठ्या प्रलयाची घंटा घणघणू लागली.. चीन, फ्रान्स करत करत अमेरिका पादाक्रांत होऊ लागली. ब्राझील, ऊरुग्वे सुरुवात झाली. सारं आवागमन बंद झालं. मग त्याला थोडा दिलासा वाटला. तूर्तास शिल्पानं किती ही प्रयत्न केला तरी ही परतू शकत नाही. कारण परतण्याची साधनंच नाही. म्हणून त्यानं शिल्पा व आईस सैल सोडलं. नशा व प्रयोग बंद झाले. बेटावर त्यानं विश्वासू माणसं ठेवली. जी मुकी होती. तो आलेल्या व्हायरसची लस शोधण्याच्या कामात गुंग झाला. बेटापासून अंतरावर असणाऱ्या किनाऱ्यावर त्याच्या संस्थेचं कार्यालय होतं. तो रात्रभर त्या ठिकाणी संशोधन करत दिवसा बेटावर परतू लागला. त्यांच्या व त्याच्या साथीदारांना संशोधनात यश येऊ लागलं. व्हॅक्सीनच्या अॅनिमल ट्रायल सुरू झाल्या.
शिल्पा आता आधीसारखी नाॅर्मल होऊ लागली. पण त्यानं पमनची आठवण आली की ती रात्र रात्र जागू लागली. मग त्याच वेळी आपल्या देहाकडं पाहताच तिला आपलीच घृणा वाटू लागली. पमनच्या आठवणीतही त्याच्या नजरेस नजर देण्याचं तिला धाडस होईना. तरी रात्री प्रशांत गेला की ती सुनसान बेटावर बाहेर बंगल्याच्या समोर फिरत चांदण्या आकाशात पाहत राही.तर कधी फेसाळणाऱ्या सागराकडं.
चांदण्या रातीत फेसाळणारा महासागर पाहताच तिला पमनसोबतची गोव्यातील रात आठवली.
शिकाऱ्याची, हाॅटेलची सारी सोय रस्तोगीनं केलेली होती. शिकारा अरबी सागरात शांत तरंगत होता. आजुबाजुला कनाती लावत वरचं आभाळ मोकळं दिसत होतं. पमनच्या छातीवर ती पहुडलेली.
" शिल्पे!"
" हू!"
" समजा तुझ्या घरच्यांनी लग्नास नकार दिला तर?"
शिल्पा या प्रश्नाने घाबरली.कारण सदा आबाला आपण मनवलं. पण घरी तर आपले वडीलच तयार आहेत. काका काकी, चंद्या आत्या यांना आपण पमनला उध्वस्त करण्यासाठीच नाटक करतोय हेच माहीत आहे मग!
" शिल्पे बोल ना!" शिल्पा बोलत नाही पाहून पमन विचारू लागला.
" पम्या साल्या.. तुझा प्रश्न तर लाख मोलाचा आहे! त्यावर एक जालीम उपाय आहे माझ्याकडं!" शिल्पी हसत म्हणाली.
" शिल्पे हसू नको! सांग!"
" आपण लग्न इकडेच उरकवू!" म्हणत शिल्पानं त्याला आपल्या बाहुपाशात घेतलं. शिकारा जसजसा खोल सागरात जात होता तसं मांडवी नदीनं आपलं अस्तित्व अरबी समुद्राला अर्पण करत ती सागरातच विलीन झाली. आता कोणी कितीही प्रयत्न केला तरी मांडवी नदीस सागरातून अलग करूच शकत नव्हतं.
सकाळी उठल्यावर शिल्पानं पमनला विचारलं.
" पमन आता माझ्या घरचेच काय पण विधाता ही आपणास विरोध करणार नाही" पमन हसू लागला. तोच पमनला मायाचा फोन आला. माया पमीच्या लग्नाबाबत काही तरी विचारत होती व तिनं बोलता बोलता पमीला फोन दिला असेल बहुतेक पमी फोनवरून तिकडनं बोलत असावी.
शिल्पा शिकाऱ्यातून बाहेर पाहू लागली तर शिकारा सागरातून मांडवी मुखात शिरत होता. जणू सागरापासुन मांडवी नदीच अलग होत असावी.
मांडवी नदीकडं पाहत शिल्पानं पमीस मनात शिवी हासडली.
.
.
शिल्पास आठवलं नी आपण आर्डीतून कोलंबीयाला येतांना मायाला बजावून आलो होतो.
" माया या पमनवर लक्ष ठेव गं, मी येईपर्यंत!" त्यावेळेस आपण पमीबाबत बोलतोय हे मायाला कळलं होतं. म्हणून माया आपल्याकडं रागानं पाहत होती. हे शिल्पास आठवलं. ती रडू लागली.
" पम्या साल्या! तू पमीचा झालास तरी मला हवा आहे रे! पमीसहीत सुखानं नांद हवं तर नाही मायानं लक्ष ठेवलं तर! पण तरी मला हवा आहेस! पमे, मला माफ कर! तू राधा आहेस? तू मिरा आहेस? की तिलोत्तमा? मला माहीत नाही! मी कोण हे ही माहीत नाही मला! पण माझा कृष्णसखा पम्या मला हवा आहे! ती त्या चांदण्या रात्रीत किती तरी वेळ ढसाढसा रडत आपले अश्रू अटलांटीक सागरात मिसळत राहिली. पण तिचं रूदन, आक्रोश त्या मुक्या बहिऱ्या गार्डशिवाय कोण ऐकणार होतं.
सकाळी सकाळीच प्रशांतनं तिला बोलवलं. त्याच्याकडं लॅपटाॅप होता .
" शिल्पा तुला एक आनंदाची बातमी दाखवायचीय!"
" प्रशांत! पाया पडते मला निदान आई बाबाशी तरी बोलू दे!"
" डिअर इथं नेटवर्क नाही माहितेय ना तुला!"
" हरामखोर ते मला माहितेय पण तुला आॅफिस काम करतांना या सर्व बाबी उपलब्ध करता येतात हे ही माहितीय मला! प्लिज बोलू देना!"
" हा, तू बरी आठवण केलीस बघ तुला एक गंमत दाखवतो आधी ती पहा!" म्हणत तो आपला हात तिच्या हाताकडं नेऊ लागला. तोच त्याच्या
गालावर शिल्पाच्या थरथरणाऱ्या हाताची चपराक बसली.
" हरामखोरा! हात लावायचा नाहीस अंगाला! लांबून बोल!"
" अंगाला हात? सारं सारं हिणवल्यावर?"
" हरामखोर नशेची औषधं, वेगवेगळी इंजेक्शनं देत तू काय पाप केलंस ते तुलाच माहित पण एक मात्र निश्चीत या साऱ्या प्रयोगातून तू किन्नरआहेस हे मात्र तूच सिद्ध केलंस! कारण तुझ्या पौरूषत्वात ती हिम्मत नव्हतीच! मग तु धोक्यानं वागलास. पण तरी नशेत मी माझ्या पमनलाच शील अर्पण केलं. तू किन्नरच ठरला व पमन मर्द होता मर्दच ठरला."
प्रशांतनं आपल्या समोरचा स्टूल उचलत किंकाळी भरत आपल्याच डोक्यावर आदळला. स्टुलचा कोना लागत डोक्यातून रक्त वाहू लागला. त्याच अवस्थेत त्यानं संतापात तिचा हात धरत लॅपटाॅपकडं नेत लॅपटाॅप सुरू केला. त्यानं साईट सर्च करत महाराष्ट्रातलं दैनिक काढलं. गडचिरोली आवृती होती ती जुनी. मराठी दैनिक दिसताच शिल्पाला आपल्या मातीच्या खुणा दिसल्या व ती त्या ही स्थितीत हपापल्या सारखी पाहू लागली. दिडेक वर्षानंतर तिला मराठी अक्षरं वाचावयास मिळत होती.
बातमी वाचून तिला कडी मागून कडी उलघडू लागली.
अनंत जगताप...पद्मा अनंत जगताप....पवन मदन नकाशे,...प्रतापराव....मारोती समक्ष ओळख....अनंतचा नक्षलवाद्यानी खून...... एका वर्षानंतर ओळख पटली....बातमी पेक्षा तिला झूम करून दाखवलेला पमनचा फोटो प्रशांतनं दाखवला व ती थरथरत लॅपटाॅपला बिलगत पम्या पम्या म्हणत ओरडू लागली. तोच प्रशांतनं साईट बंद केली.
" याराना.....पुराना..... आतून कळ उठते..... हीच कळ मला ही उठली होती अंतरीच्या कळा मध्ये तुम्हाला एकत्र गातांना! नंतर ही अशीच कळ उठली होती चित्रपटाच्या गाण्याचं प्रोमो पाहतांना. नी तसाच भारतात आलो व उचलली तुला...."
"प्रशांत! कळा या दोन्ही बाजूतून उठल्या तर त्यांना अर्थ असतो किन्नरा!" ती कळकळून बोलली.
" अरे हा! बघ दोन्ही बाजुच्या कळा राहिल्याच दाखवायच्या तुला!" म्हणत त्यानं रस्तोगीच्या चित्रपटाची साईट ओपन करत काही तरी सर्च केलं.
" बघ ! बघ! दोन्ही बाजुच्या कळा!"
शिल्पा पाहू लागली. तिनं व पमननं गायिलेल्या गाण्याचं चित्रीकरण व चित्रपटाच्या बाईट होत्या. व नंतर त्या गाण्याचे गायक व गीतकार यांना नॅशनल अवार्ड जाहीर होत पमन स्विकारत होता तर गीतकार म्हणून पद्मा स्विकारत होती. पमन व पद्माला पाहताच ती गदगद झाली. आर्डीत ती पद्मास पाण्यात पाही. पण आज या परक्या मुलूखात ही आपली माणसं पाहून ती रडू लागली.
" शिल्पा डिअर रडू नको! हा किन्नर तुला आणखी अंतरीच्या दोन्ही कडच्या कडा दाखवतो बघ!"
त्यानंतर पाठमोरे पाटावर बसलेले नवरा नवरी स्क्रीनवर आले. भटजी मंगलाष्टक म्हणत होता तोच ते माळा घेत उठले व चेहरे दिसले नी शिल्पा बेशुद्ध पडली. चेहरे तिला स्पष्ट दिसणार नाहीत तोच प्रशांतनं लॅपटाॅप बंद केला.
तिच्या तोंडावर पाणी मारत तिला शुद्धीवर आणलं.
" याला म्हणतात दोन्हीकडच्या कळा! पहिला नवरा मेला नी पद्मानं आपल्या अंतरात दाबलेली कळ उठवत पमनशी लग्न केलं. पमन तर अंतरात कळ दाबूनच बसला होता. झाल्या दोन्ही कडंच्या कळा एक! नी साली तू त्याच्यासाठी मला किन्नर म्हणतेस!बघ या व्हॅक्सीनच्या अॅनिमल ट्रायल यशस्वी झाल्याच आहेत.ह्यूमन ट्रायल सक्सेस करतो नी तुला भारतातच नेतो परत त्याच्या दोन्ही कडच्या कळा दाखवायला!"
.
.
शिल्पा सुन्न सुन्न झाली.
पमी जरी पमनवर मरत होती पण पमन ला आपण रोगार घेतलं नी त्याच ठिकाणी वळवलं होतं. पमन आपल्याला सोडून पमीला स्विकारणारच नाही! यावर ती ठाम होती. तरी साऱ्या बातम्या पाहून तिचा उरला सुरला धीरही खचलाच!
" अरे हा! बघ दोन्ही बाजुच्या कळा राहिल्याच दाखवायच्या तुला!" म्हणत त्यानं रस्तोगीच्या चित्रपटाची साईट ओपन करत काही तरी सर्च केलं.
" बघ ! बघ! दोन्ही बाजुच्या कळा!"
शिल्पा पाहू लागली. तिनं व पमननं गायिलेल्या गाण्याचं चित्रीकरण व चित्रपटाच्या बाईट होत्या. व नंतर त्या गाण्याचे गायक व गीतकार यांना नॅशनल अवार्ड जाहीर होत पमन स्विकारत होता तर गीतकार म्हणून पद्मा स्विकारत होती. पमन व पद्माला पाहताच ती गदगद झाली. आर्डीत ती पद्मास पाण्यात पाही. पण आज या परक्या मुलूखात ही आपली माणसं पाहून ती रडू लागली.
" शिल्पा डिअर रडू नको! हा किन्नर तुला आणखी अंतरीच्या दोन्ही कडच्या कडा दाखवतो बघ!"
त्यानंतर पाठमोरे पाटावर बसलेले नवरा नवरी स्क्रीनवर आले. भटजी मंगलाष्टक म्हणत होता तोच ते माळा घेत उठले व चेहरे दिसले नी शिल्पा बेशुद्ध पडली. चेहरे तिला स्पष्ट दिसणार नाहीत तोच प्रशांतनं लॅपटाॅप बंद केला.
तिच्या तोंडावर पाणी मारत तिला शुद्धीवर आणलं.
" याला म्हणतात दोन्हीकडच्या कळा! पहिला नवरा मेला नी पद्मानं आपल्या अंतरात दाबलेली कळ उठवत पमनशी लग्न केलं. पमन तर अंतरात कळ दाबूनच बसला होता. झाल्या दोन्ही कडंच्या कळा एक! नी साली तू त्याच्यासाठी मला किन्नर म्हणतेस!बघ या व्हॅक्सीनच्या अॅनिमल ट्रायल यशस्वी झाल्याच आहेत.ह्यूमन ट्रायल सक्सेस करतो नी तुला भारतातच नेतो परत त्याच्या दोन्ही कडच्या कळा दाखवायला!"
.
.
शिल्पा सुन्न सुन्न झाली.
पमी जरी पमनवर मरत होती पण पमन ला आपण रोगार घेतलं नी त्याच ठिकाणी वळवलं होतं. पमन आपल्याला सोडून पमीला स्विकारणारच नाही! यावर ती ठाम होती. तरी साऱ्या बातम्या पाहून तिचा उरला सुरला धीरही खचलाच!