झटेतलं चांदणं 🔖 भाग :: -- सातवा
पमीच्या लग्नात प्रतापरावांनी मोठ्या थाटामाटात साऱ्या सनावदला गावदरवाज्यास टिळा लावत पंगत दिली. मारोती मामानं ही आपल्या भाचीस भरपूर दागिने चढवत मूळ ही मोठं केलं. अनंत जगताप व जिजाबाई एकदम खुश झाल्या. त्यांच्याकडची एकदम मोजकीच मंडळी होती. पमीच्या वडिलांना फक्त पमीच्या लग्नाची हौस होती बाकी कर्तव्य म्हणून शून्य. पण तरी बापाचं काळीज. अंगात उभं राहण्याची ही ताकद नसतांना थरथरत आधार घेत डोक्यावर कांजी मारलेली टोपी घालून गडी उभा.
पमन, केसा, पमीचा भाऊ सकाळपासून राबत होते. पमनला अंतरीच्या कळा या कार्यक्रमापासुन खेडोपाडी लोक ओळखायला लागले होते. एक मोठा गायक म्हणून आदर देत होते. रात्री हळदीच्या नाचगाण्यात तरी सारा मोठेपणाचा आब बाजूला ठेवत त्यानं एक दोन गाणी म्हटली. पमीस नवरदेवासोबत नाचायला उठवलं. पमीनं मायाला सोबत घेतलं. मायानं हळूच पमनला पमीमाग उभं केलं. पमनला गातांना पमी थरथरली व पुन्हा तोच लिंबोणीचा भास पमनला जाणवला. त्याला त्या वासासरसी शिल्पा आठवली.
अनंतला पमी,पमीला पमन तर पमनला शिल्पा! सारे लिंबोणीच्या वासात धुंद होत रात जागवू लागले.
लग्न लागलं. पंगती उठल्या. नवरदेव पद्मास घेऊन बोधवडला जाण्यासाठी निघाला. आपली पडकी माडी, व त्या पडक्या माडीच्या आधीच ढासळू पाहणारा खंगलेला बाप पाहताच पद्मा घायाळ हरणीगत हंबरू लागली. पण या हंबराचे दावेदार कोण कोण होते.आधीच गेलेली आई! आजारी बाप! जीव लावणारे मामा- मामी! बहिणीपेक्षाही अधिक मायाळू माया! की आपलाच जीव ज्याच्यात गुंतलाय तो पमन? हे सारे कायमचेच दुरावणार? माहेर , आर्डी आता दूर दूर? या जाणिवेनं ती हंबरू लागली. आजारी बाप धापा टाकत आधारानं पोरीजवळ गेला.
" पमी! माझे बया! रडू नकोस! तुझा मामा तुझं माहेर तुटू देणार नाही गं!" नी मग पमी मामा मामीस बिलगली.
" पम्मी, का रडतेस! तू फक्त हाक मार. हा मारत्या बोधवडच काय गडचिरोलीही एका फर्लांगात जवळ करत भेटायला येईल!" मामा तिला छातीशी लावत दिलासा देऊ लागला.
मग पमी मायाला बिलगली. मूक मूक आक्रंदन.जे फक्त त्या दोन जिवांनाच कळणारं. मायानं तिच्या पाठीवर हात फिरवत भर ओसरू देत सांत्वन केलं. मग प्रतापराव व पमननं तिला धरत गाडीत बसवलं. पमनकडं पाहताच ह्रदयात महासागर वादळत नयनात भरतू लागले.
पमी निघाली. पमन मारोती व प्रतापरावांनी सारी आवरा आवर करत आर्डीचा रस्ता धरला. परतीच्या मार्गावर प्रतापरावांना ' आता एक महिना शिल्पा व पवनच जमणं शक्य नाही तर तेवढ्यात आपल्या मायाचं तरी जमवावं' विचार तरळला. कारण भिका बाबा, आई, तारा त्यांच्यामागं एक वर्षापासून तगादा लावत होते. पण त्यांना जगातली सारी लेकरं वाढतांना दिसत होती ,पण आपली मायडी अजून लहानच वाटत होती.पण पमीला उराशी लावत समजावणाऱ्या समंजस मायाला त्यांनी पाहिलं व आपली पोर किती समंजस आहे याची जाणीव होत अभिमान ही वाटला.
शिल्पा जशी गेली तसा पाच सहा दिवसांनी अननोन नंबरवर काॅल आला होता आधी. भरभरून बोलत होती.
" पम्या खरच अमेरिका खूपच सुंदर आहे रे! प्रशांत तुझा ही व्हिसा व पासपोर्ट करतोय. लवकर ये इकडं! तुझ्या शिवाय या स्वर्गातही मजा नाही वाटत!"
" शिल्पे! मी तिकडे येण्यापेक्षा तूच लवकर ये ना इकडे!"
" पम्या! स्वर का कातर झाला रे! आठवण येते ना माझी! नाही करमत ना?"
" शिल्पे! करमतं की नाही ते माहीत नाही! पण तू लवकर ये!"
" पम्या, आपलं माणूस जवळ असलं तर गल्लीत स्वर्ग वाटतो! अन्यथा स्वर्गात ही ...!" शिल्पाचा ही आवाज घोगरा झाला.
" वेब सिरीजचं काय झालं?"
" अरे, या प्रशांतच्या कार्यक्रमातच अजुन बिझी आहे तो! या प्रशांतची इकडं खूपच धूम आहे रे! हे बावळट ध्यान अचानक शास्त्रज्ञ कसं झालं हेच समजत नाही!"
नंतर शिल्पानं लवकरच नवीन काॅन्टॅक्ट नंबर कळवते सांगत काॅल कट केला होता.
पद्मा लग्नानंतर रात्रीच्या दहाच्या सुमारास बोधवडला पोहोचली.
दोन दिवसांनी भाऊ सोबत नवी नवरी पद्मा काही दिवसासाठी आर्डीला परतणार होती.
पण सकाळी सकाळी उठलेला अनंत अंघोळ करून तयार झाला तोच त्याला काॅल आला. काॅलवर तो दहा पंधरा मिनिटे बोलला. व तावा तावानं बोलत " आई मी भुसावळ हून लगेच आलो गं! आॅफीसची महत्वाची फाईल रेल्वेनं पाठवायचीय!" घाईत बाहेर पडला.
अनंत गेला.दुपारी परतणार असं सांगून हळदीच्या अंगानं गेलेला अनंत चार वाजले तरी परतला नाही. आईनं त्याचा फोन दुपारपासून ट्राय करूनही लागेना. त्याच्या मित्रांना भुसावळला पाठवलं. मित्रांनी रेल्वस्टेशन, बस स्टॅण्ड, त्याच्या थांबण्याची नेहमीची हाॅटेल धुंडाळत परत फिरले. रात्र झाली तसे सारेच घाबरले. त्याच्या गडचिरोलीच्या आॅफिसशीही संपर्क करण्यात आला. तेथून उलट त्यांचं लग्न असल्यानं गावाकडंच गेल्याचं कळवलं. मग पोलीस स्टेशन, नंतर नातेवाईक , गडचिरोलीतही शोधाशोध झाली. पण व्यर्थ. नवी नवरी पद्मा सुन्न. औट घटकेची साथ करत न बोलता, न स्पर्श करता अनंत कुठं लापता झाला ? आकाशानं गिळला की पाताळानं! आठ दिवस पद्मा सासूसोबत अश्रू गाळत बसली. प्रतापराव मारोती व आणखी इतर सारी बोदवडला गेली. तिथल्या स्थानिक पुढारी,व पोलीस यंत्रणेस भेटत पुन्हा शोधाशोध! त्याचा फोन ही भुसावळ पर्यंत लोकेशन दाखवत नंतर शून्य. पोलीस यंत्रणेनं त्याच्या. कार्यालयाशी ही संपर्क करत तिथलं काही वैमनस्य यादृष्टीनं ही शोध घेतला. फक्त आलेला काॅल जो होता तो क्रमांक असलेला हॅण्डसेट गडचिरोलीतलाच होता व त्याची घटनेच्या चार दिवस आधीच मिसींग केस दाखल होती. तपासास दिशाच मिळत नव्हती.
मारोती मामानं पद्मास काही दिवसासाठी आर्डीला न्यायचं ठरवलं पण काही झालं तरी ऊर फोडणाऱ्या सासुस सोडून परतणं पद्मास योग्य वाटलंच नाही. ती सासुसोबतच राहिली. आपल्या संस्कृतीत या हळदीच्या व कुंकवाच्या डागात इतकी ताकद आहे की एकदाचे ज्याच्या नावानं हे लागले की क्षणात आयुष्याचं समर्पण घडतं. एक महिना सासुबरोबर अनंतची वाट पाहत पद्मा बोदवडला थांबली. सरते शेवटी गावातील भाऊबंदकी व सासुनच मारोतीरावांना बोलवत निदान आठ पंधरा दिवस तरी पद्मास घेऊन जाण्याची विनंती केली. नी पद्मा आर्डीत आली.
आर्डीत पद्मा आली व लगेच तोंडीचा आदेश आला. तसल्या दु:खातच तिनं तोंडी परीक्षा जळगावला दिली.व एका महिन्यात तिचं ग्रामसेवक पदी पोस्टींग झाली. प्रतापरावांनी आपल्या ओळखीच्या मदतीनं पद्माबाबत सारी हकीकत सांगत आर्डीजवळचंच गाव बसवलं. पद्मा आर्डीतूनच चार किमीवरील गावास ये जा करू लागली. अनंतचं शोधकार्य सुरूच होतं.
एका महिन्यानं परत येणारी शिल्पा दोन अडिच महिने झाले तरी परत येईना व तिच्याशी संपर्क ही होईना.पमन बिथरला. प्रतापराव व सदा आबा इच्छा नसतांनाही पमनसाठी रामजी बाबाच्या वाड्यावर गेले. आधी सोमा पोवारानं येणार, येणार सांगत त्यांना परतवलं. पण काहीच संपर्क नाही व धड काहीच कळत नाही म्हटल्यावर पमन स्वत:च मोठ्या आर्डीत गेला.
दहावीत असतांना दिवाळीला गेलेला व कापूस पेटवून परतलेला पमन सहा सात वर्षानं रामजी बाबाच्या वाड्याच्या चौकात गेला. चौकात त्याला पाहताच चंदू व सुरेश उंच ओट्यावर पुढे सरकू लागले. पण तोच सोमा पोवार व कदम सर पुढे येत त्यांना मागं काढलं.
" या पवनराव! पाणी आणा रे पवनरावांना! " सोमा पोवार बोलले.
" मामा!"
" बोला!"
" शिल्पा केव्हा परतणार?"
" पवनराव! परतेन ना! एवढी काय घाई?"
" घाई नाही, पण रस्तोगी सरांना लगेच दुसऱ्या चित्रपटाची रेकाॅर्डींग सुरू करायचीय! ते घाई करता हेत!"
" रस्तोगी सरांना घाई आहे का? आम्हाला वाटलं तुमच्या आबांनाच लग्नाची घाई लागली? "
पमनला तिरकस बोलणं वर्मी लागलं.पण त्यानं संयम पाळत नमतं घेतलं.
" मामा तिचा नंबर तरी द्या! आधीचा नंबर लागतच नाही व तिकडून ती ही करत नाही!"
" पवन, अरे त्यांच्याशी आम्हालाही फोन करता येत नाही. प्रशांत तिकडून करतो तेव्हढंच!" कदम सर पहिल्यांदाच बोलले.
" मग तो नंबर तरी द्या?"
" अरे पवन, तुला कसं सांगायचं! प्रशांत आता कोणी आर्डीतला सर्वसामान्य माणूस नाही राहिला बाबा! तो मोठा शास्त्रज्ञ असल्यानं महत्वाच्या व्यक्तीत त्याची गणना होत असल्यानं त्याच्याशी सुरक्षेच्या कारणास्तव कुणालाही थेट बोलता येत नाही! तरी आठ दिवसात त्याचा तिकडनं काॅल येतोच.आला की नंबर व वेळ घेत कळवतो आम्ही तुला!"
" सर, पण शिल्पाला लवकर परत बोलवा ना!"
" आता मी कसं बोलवेन तिला! हे तिच्या काका वडिलांना समजायला हवं! " कदम छद्मी हास्य दाबत बोलले.
पमन परतू लागला. परततांना
त्याला घरात खिडकीच्या आडोशाला शिल्पाची आई ओझरती दिसली. काही तरी इशाऱ्यानं ती पमनला सांगू पाहत होती.पण पमनला थांबणं उचित वाटेना. तो निघाला.
एक दिड महिन्यापूर्वीच सोमा पोवार, पत्नी कोलंबीयाला थांबत परतले होते. कोलंबीयाला प्रशांत शिल्पा व अंजना बाईच होते. सोमा पोवार परतताच मंगा पोवारशी त्याचं कडाक्याचं भांडण झालं होतं. तेच तिला पमनला सांगायचं होतं. पण सोमा पोवार व कदमसर समोर असल्यावर तिला पमनला सांगावं कसं हे समजेना.
पमन परतला.
" मायडे, त्या आर्डीवाल्यांच्या मनात काही तरी काळं बेरं दिसतंय मला!"
" का रे? असं का वाटतंय?"
" आज मी गेलो होतो. तर त्यांचं बोलणं खटकणारं होतं!"
" पमन ,शिल्पाशी थेट संपर्क कर ना! त्या शिवाय खरं काय ते समजणार नाही."
" मायडे, तिच्याशी बोलणं होत नाही म्हणून तर त्यांच्या वाड्यात पाय ठेवावा लागला!"
" पमन? एक विचारू?"
" काय मायडे?"
" तुझा संपर्क होत नाही, पण तिकडून शिल्पा का करत नाही फोन? मला तर ....."
" मायडे असलं अभद्र बोलू नको ना? मी शिल्पाला ओळखतो गं! हे हराम खोर सारे पालटले तरी ती माझ्यासाठी आग लावेल!"
" पमन देव करो नी तसच होवो! पण एका महिन्यासाठी गेलेली शिल्पा काका काकू सोबत का परतली नाही. तिथं प्रशांत सोबत थांबण्याचं काय प्रयोजन?"
" मायडे, वेब सिरीजचं काम लांबलं असेल गं! आणि संपर्काबाबत काही तरी अडचण असेल म्हणून गं!"
" पमन ,धीर सुटतो रे आता! कारण शिल्पा आपल्या दाराशी आली नी विचीत्र घटना घडायला सुरुवात झाली. त्याच दिवशी तिचं औषध पिणं, पमी माझ्यापासून दुरावणं, त्यातल्या त्यात त्या बिचारीच्या अंगाला फक्त हळद लागावी नी अनंतचं गायब होणं, आणि आता शिल्पाचं न येणं... सारं मला अघटीता सारखंच वाटतं!"
" मायडे असलं अभद्र बोलू नकोस! शिल्पा आपल्या घरी आली नी नंतर बघ पहिल्याच चित्रपटातील गाणी साऱ्या भारतात किती गाजताहेत! या बाजूनं तू विचार कर ना!" पमन जीव तोडून स्पष्टीकरण देत होता.
" पमन ! पमीचं पुढे काय रे? किती विचीत्र नी टांगती अवस्था झालीय बिचारीची! एका दिवसाचा नवरा! त्यानं तिला शिवलं ही नाही! पण केवळ सप्तपदी चालला नी नवरा बनून गेला! आज कुठाय तो? आहे की नाही ते ही माहीत नाही! आहे या भरवशावर दररोज कपाळावर गल्का लावते बिचारी त्याच्या नावाने! गल्का लावते म्हणून जिवंत समजायचं की मेला नाही हे जगाला कंठशोष करत सांगण्यासाठी गल्का लावायची? सारं सारं अनिश्चीत!"
" मायडे! पमीबाबत जीव तुटतो गं! पण करणार काय!"
पमन बोलला नी मायाच्या डोळ्यात महापूर दाटला. पमीचीच तिला चिंता खात होती.
पमनला रात्री स्वप्नात शिल्पा आली.
" पम्या! झोपलास! अरे उठ ना! ये ना रे ! मी वाट पाहतेय रे!"
पमन खाडकन जागा झाला व शिल्पे, शिल्पे ओरडत दार उघडत ओसरीवर आला. सदा आबा उठले. त्यांनी पम्यास हात धरत खाटेवर बसवलं. तोच घरातून आवाज ऐकत मामा तारामाय बाहेर आले.
पमन अजुन ही " आबा, शिल्पा आली होती हो! मला बोलवतेय ती!" बोलत उठत ओसरीतून अंगणात उतरू पाहत होता.
" पम्या उठ! , झोपेतून जागा हो!" आबा त्याला धरत झिंझोळू लागले व
प्रतापरावाकडं व ताराकडं पाहत आर्त स्वरात उरफोड करू लागले.
" तारे, मी भोगलं तेच माझ्या पम्याच्या नशिबी आलं तर तो आर्डीस पेटवेल गं! प्रताप मी सहन केलं! पण माझा पम्या नाही सहन करणार रे!"
तारामायनं पमनला उठवत मध्ये नेलं.
" पमा, काय झालं बाळा?"
" माय, ही मायडे मला काही बाही सांगते गं! माझी शिल्पा नाही गं तशी" पमन बोलला नी मायच्या मांडीवर डोकं खुपसत ढोरागत रडू लागला.
" अहो, सकाळीच साऱ्यांना गोळा करा नी एकदाचं काय ते सोक्षमोक्ष करा! माझा पमन नव्हता गेला! तीच सटवी आली होती दाराशी! मग आता का हे चाळे करत आहेत!" ताराबाई नवऱ्यावर संतापली.
प्रतापरावांनी सकाळी पुन्हा आबांना घेत आर्डीतल्या पंधरा वीस लोकांना घेत सोमा पोवारास गाठलं. साऱ्यांनी एकच गलका करताच सोमा पोवारानं हात झटकले.
" हे पहा, शिल्पा मंगाची पोर! तिचं काय करायचं ते तोच ठरवेल! मी काय सांगणार?"
" सोम्या, अंजीनं माझ्या सदा आबाचं वाटोळं केलं! ते सारं विसरत आम्ही नवीन नातं जोडू पाहतोय तर तू आडवा मुततोय! याद राखा माझ्या पम्यास जर शिल्पा मिळाली नाही तर तो एकेकाला फाडेन! मिसरूड फुटलं नसतांना जो तुझ्या लेकाच्या चढ्ढीत फटाके फोडू शकतो आता तर तो वाघ झालाय! विचार कर नी येत्या पंधरा दिवसात शिल्पाला आणा!"
" प्रताप, शिल्पा काय लहान मुलगी आहे का तिला कडेवर घेऊन येईन! तिचीच इच्छा नसेल तर?"
" सोमा, जी पमन साठी वेडी होत रोगार पिऊ शकते तिची इच्छा नाही कसं शक्य आहे? तिला एक वेळा समोर आणा.ती जर नकार देत असेल तर अजुन ही मी पम्यास मनवेल.पण तिची इच्छा असतांना तुम्ही पाय घातला तर कमरेतून पाय हासडेन!"
प्रतापरावाच्या सरळ धमकीनं बाचा बाची होऊ लागली. चंद्या व सुरेश झाड होत अंगावर धावू लागले. लोकांनी प्रतापरावांना शांत करत आम्ही बोलतो सांगत त्यांना घरी पाठवलं.
नंतर आलेल्या लोकांनी परत येत 'सोमा वर हात करतोय' हे सांगताच पमन बिथरला.तो चवताळला नी त्यानं सोमा पोवाराचं घरं जवळ केलं.
चौकात येताच त्याला सार्वजनिक नळाचं स्टॅण्डपोस्ट दिसलं. त्याला पाहताच चंद्या ,सुरेश, कदम सोमा पोवार ओसरीवरून हातात सापडेल ते घेत पमनवर चालून आले.पमननं स्टॅण्डपोस्टच्या नळाचा गॅनोलाईसचा पाईपचं उखळला. एक दिड इंची व्यासाचा तीनेक फुटाचा तुकडा त्याच्या हातात आला.चंद्याकडं वेताचं दांडकं होतं ते त्यानं पमनच्या डोक्यात टाकलं व पमनच्या डोक्यातून रक्ताची चिरकांडी उडाली. पमननं पाईप फिरवला व त्याच्या पोटरीत पाईप घातला. पायाची हाडकं डिचत चंद्या चौकात आडवा पडला. मागून आलेल्या सुरेशला त्यानं एका हातानं कमरेतल्या पॅंटीत पकडत उचललं व पाईपानं पायाच्या पाटरीवर सपासप वार करू लागला. सोमा पोवार व कदमसरांनी मिळून त्याच्या हातातील पाईप हिसकवत फेकला व लाथा घालू लागले.
" या कुत्र्यांना लोढवल्यावर तुमचा मार खातोय याचा काही ही अर्थ काढू नका. एका दणक्यात धोतरं ओली करणार तुम्ही.पण मर्यादा राखतोय! सोडा.नाहीतर.....?"
तोच लंगडत येत मागून चंद्यानं वेताचं दांडकं घातलंच. आता पमनच्या डोक्यात तीव्र कळ उठली. त्यानं समोर कारसाठी उभारलेल्या शेडच्या उभ्या पत्र्यास लाथा घालत पाडलं. बारा फुटी टाटाचा पत्रा दोन्ही हातानं उचलत नळाचा पाईप घेऊन धावत येणाऱ्या सोमा पोवार व चंद्यावर भिरकावला अंगावर पत्रा घेत चिरल्या अंगानं ते खाली कोसळले. पमन पत्र्यावर उडी मारत त्यांना दाबू लागला. कदम ते पाहून चिरकत मागे पळाला. पमननं गाडीला वट म्हणून लावलेला दगड उचलत कदमाच्या पाठीत मारला. कदम तोंडावर आपटला. पमननं दुसऱ्या चाकास लावलेला मोठा दगड उचलला नी सुरेशच्या तोंडावर टाकणार तोच घरातून आलेल्या मंगा पोवारानं त्याच्या हातातील दगड हिसकावत
" पमन, या हरामींनी मला ही फसवलं रे! माझी पोर कुठं ते मला ही सांगत नाहीत पण यांनी काही तरी करत प्रशांतशी तिचं तिकडंच उरकलं रे!" रडत रडत सांगितलं नी पमननं तोच दगड उचलत आपल्याच डोक्यावर वरून सोडला.
" शिल्पाsssssss...! शिल्पाsssss! "करत तो तिथेच रक्तात न्हात कोसळला. पण तरी चंदू व सुरेशची नवीन हिम्मतच झाली नाही. कुणी तरी कळवलं असावं म्हणून प्रतापराव येण्याआधीच आऊटपोष्टमधुन पोलीस आले. अॅम्ब्युलन्स आली.
एकमेकावर केस दाखल झाली.
साऱ्यांना जामीन झाली.
" मामा मला जामिनावर सोडू नका, बाहेर आलो तर आर्डीत रक्ताचे पाटच वाहायला लावेन! मामा व आबानं समजावत त्याला जामीनावर सोडत खडकीस नेलं. खडकीस केसा ,
सदा आबा व माया पंधरा दिवस थांबले.
शिल्पा प्रशांतशी लग्न करूच शकत नाही. पमन आतून तुटला....शिल्पा का? का हा खेळ खेळलास गं?
पण शिल्पानं तरी कुठं हा खेळ खेळला होता...
ती महासागराच्या किनारी तळमळत पमन ये रे! पम्या साल्या .....ये ना! विनवत तळमळत दिवस कंठीत होती!
पमन, केसा, पमीचा भाऊ सकाळपासून राबत होते. पमनला अंतरीच्या कळा या कार्यक्रमापासुन खेडोपाडी लोक ओळखायला लागले होते. एक मोठा गायक म्हणून आदर देत होते. रात्री हळदीच्या नाचगाण्यात तरी सारा मोठेपणाचा आब बाजूला ठेवत त्यानं एक दोन गाणी म्हटली. पमीस नवरदेवासोबत नाचायला उठवलं. पमीनं मायाला सोबत घेतलं. मायानं हळूच पमनला पमीमाग उभं केलं. पमनला गातांना पमी थरथरली व पुन्हा तोच लिंबोणीचा भास पमनला जाणवला. त्याला त्या वासासरसी शिल्पा आठवली.
अनंतला पमी,पमीला पमन तर पमनला शिल्पा! सारे लिंबोणीच्या वासात धुंद होत रात जागवू लागले.
लग्न लागलं. पंगती उठल्या. नवरदेव पद्मास घेऊन बोधवडला जाण्यासाठी निघाला. आपली पडकी माडी, व त्या पडक्या माडीच्या आधीच ढासळू पाहणारा खंगलेला बाप पाहताच पद्मा घायाळ हरणीगत हंबरू लागली. पण या हंबराचे दावेदार कोण कोण होते.आधीच गेलेली आई! आजारी बाप! जीव लावणारे मामा- मामी! बहिणीपेक्षाही अधिक मायाळू माया! की आपलाच जीव ज्याच्यात गुंतलाय तो पमन? हे सारे कायमचेच दुरावणार? माहेर , आर्डी आता दूर दूर? या जाणिवेनं ती हंबरू लागली. आजारी बाप धापा टाकत आधारानं पोरीजवळ गेला.
" पमी! माझे बया! रडू नकोस! तुझा मामा तुझं माहेर तुटू देणार नाही गं!" नी मग पमी मामा मामीस बिलगली.
" पम्मी, का रडतेस! तू फक्त हाक मार. हा मारत्या बोधवडच काय गडचिरोलीही एका फर्लांगात जवळ करत भेटायला येईल!" मामा तिला छातीशी लावत दिलासा देऊ लागला.
मग पमी मायाला बिलगली. मूक मूक आक्रंदन.जे फक्त त्या दोन जिवांनाच कळणारं. मायानं तिच्या पाठीवर हात फिरवत भर ओसरू देत सांत्वन केलं. मग प्रतापराव व पमननं तिला धरत गाडीत बसवलं. पमनकडं पाहताच ह्रदयात महासागर वादळत नयनात भरतू लागले.
पमी निघाली. पमन मारोती व प्रतापरावांनी सारी आवरा आवर करत आर्डीचा रस्ता धरला. परतीच्या मार्गावर प्रतापरावांना ' आता एक महिना शिल्पा व पवनच जमणं शक्य नाही तर तेवढ्यात आपल्या मायाचं तरी जमवावं' विचार तरळला. कारण भिका बाबा, आई, तारा त्यांच्यामागं एक वर्षापासून तगादा लावत होते. पण त्यांना जगातली सारी लेकरं वाढतांना दिसत होती ,पण आपली मायडी अजून लहानच वाटत होती.पण पमीला उराशी लावत समजावणाऱ्या समंजस मायाला त्यांनी पाहिलं व आपली पोर किती समंजस आहे याची जाणीव होत अभिमान ही वाटला.
शिल्पा जशी गेली तसा पाच सहा दिवसांनी अननोन नंबरवर काॅल आला होता आधी. भरभरून बोलत होती.
" पम्या खरच अमेरिका खूपच सुंदर आहे रे! प्रशांत तुझा ही व्हिसा व पासपोर्ट करतोय. लवकर ये इकडं! तुझ्या शिवाय या स्वर्गातही मजा नाही वाटत!"
" शिल्पे! मी तिकडे येण्यापेक्षा तूच लवकर ये ना इकडे!"
" पम्या! स्वर का कातर झाला रे! आठवण येते ना माझी! नाही करमत ना?"
" शिल्पे! करमतं की नाही ते माहीत नाही! पण तू लवकर ये!"
" पम्या, आपलं माणूस जवळ असलं तर गल्लीत स्वर्ग वाटतो! अन्यथा स्वर्गात ही ...!" शिल्पाचा ही आवाज घोगरा झाला.
" वेब सिरीजचं काय झालं?"
" अरे, या प्रशांतच्या कार्यक्रमातच अजुन बिझी आहे तो! या प्रशांतची इकडं खूपच धूम आहे रे! हे बावळट ध्यान अचानक शास्त्रज्ञ कसं झालं हेच समजत नाही!"
नंतर शिल्पानं लवकरच नवीन काॅन्टॅक्ट नंबर कळवते सांगत काॅल कट केला होता.
पद्मा लग्नानंतर रात्रीच्या दहाच्या सुमारास बोधवडला पोहोचली.
दोन दिवसांनी भाऊ सोबत नवी नवरी पद्मा काही दिवसासाठी आर्डीला परतणार होती.
पण सकाळी सकाळी उठलेला अनंत अंघोळ करून तयार झाला तोच त्याला काॅल आला. काॅलवर तो दहा पंधरा मिनिटे बोलला. व तावा तावानं बोलत " आई मी भुसावळ हून लगेच आलो गं! आॅफीसची महत्वाची फाईल रेल्वेनं पाठवायचीय!" घाईत बाहेर पडला.
अनंत गेला.दुपारी परतणार असं सांगून हळदीच्या अंगानं गेलेला अनंत चार वाजले तरी परतला नाही. आईनं त्याचा फोन दुपारपासून ट्राय करूनही लागेना. त्याच्या मित्रांना भुसावळला पाठवलं. मित्रांनी रेल्वस्टेशन, बस स्टॅण्ड, त्याच्या थांबण्याची नेहमीची हाॅटेल धुंडाळत परत फिरले. रात्र झाली तसे सारेच घाबरले. त्याच्या गडचिरोलीच्या आॅफिसशीही संपर्क करण्यात आला. तेथून उलट त्यांचं लग्न असल्यानं गावाकडंच गेल्याचं कळवलं. मग पोलीस स्टेशन, नंतर नातेवाईक , गडचिरोलीतही शोधाशोध झाली. पण व्यर्थ. नवी नवरी पद्मा सुन्न. औट घटकेची साथ करत न बोलता, न स्पर्श करता अनंत कुठं लापता झाला ? आकाशानं गिळला की पाताळानं! आठ दिवस पद्मा सासूसोबत अश्रू गाळत बसली. प्रतापराव मारोती व आणखी इतर सारी बोदवडला गेली. तिथल्या स्थानिक पुढारी,व पोलीस यंत्रणेस भेटत पुन्हा शोधाशोध! त्याचा फोन ही भुसावळ पर्यंत लोकेशन दाखवत नंतर शून्य. पोलीस यंत्रणेनं त्याच्या. कार्यालयाशी ही संपर्क करत तिथलं काही वैमनस्य यादृष्टीनं ही शोध घेतला. फक्त आलेला काॅल जो होता तो क्रमांक असलेला हॅण्डसेट गडचिरोलीतलाच होता व त्याची घटनेच्या चार दिवस आधीच मिसींग केस दाखल होती. तपासास दिशाच मिळत नव्हती.
मारोती मामानं पद्मास काही दिवसासाठी आर्डीला न्यायचं ठरवलं पण काही झालं तरी ऊर फोडणाऱ्या सासुस सोडून परतणं पद्मास योग्य वाटलंच नाही. ती सासुसोबतच राहिली. आपल्या संस्कृतीत या हळदीच्या व कुंकवाच्या डागात इतकी ताकद आहे की एकदाचे ज्याच्या नावानं हे लागले की क्षणात आयुष्याचं समर्पण घडतं. एक महिना सासुबरोबर अनंतची वाट पाहत पद्मा बोदवडला थांबली. सरते शेवटी गावातील भाऊबंदकी व सासुनच मारोतीरावांना बोलवत निदान आठ पंधरा दिवस तरी पद्मास घेऊन जाण्याची विनंती केली. नी पद्मा आर्डीत आली.
आर्डीत पद्मा आली व लगेच तोंडीचा आदेश आला. तसल्या दु:खातच तिनं तोंडी परीक्षा जळगावला दिली.व एका महिन्यात तिचं ग्रामसेवक पदी पोस्टींग झाली. प्रतापरावांनी आपल्या ओळखीच्या मदतीनं पद्माबाबत सारी हकीकत सांगत आर्डीजवळचंच गाव बसवलं. पद्मा आर्डीतूनच चार किमीवरील गावास ये जा करू लागली. अनंतचं शोधकार्य सुरूच होतं.
एका महिन्यानं परत येणारी शिल्पा दोन अडिच महिने झाले तरी परत येईना व तिच्याशी संपर्क ही होईना.पमन बिथरला. प्रतापराव व सदा आबा इच्छा नसतांनाही पमनसाठी रामजी बाबाच्या वाड्यावर गेले. आधी सोमा पोवारानं येणार, येणार सांगत त्यांना परतवलं. पण काहीच संपर्क नाही व धड काहीच कळत नाही म्हटल्यावर पमन स्वत:च मोठ्या आर्डीत गेला.
दहावीत असतांना दिवाळीला गेलेला व कापूस पेटवून परतलेला पमन सहा सात वर्षानं रामजी बाबाच्या वाड्याच्या चौकात गेला. चौकात त्याला पाहताच चंदू व सुरेश उंच ओट्यावर पुढे सरकू लागले. पण तोच सोमा पोवार व कदम सर पुढे येत त्यांना मागं काढलं.
" या पवनराव! पाणी आणा रे पवनरावांना! " सोमा पोवार बोलले.
" मामा!"
" बोला!"
" शिल्पा केव्हा परतणार?"
" पवनराव! परतेन ना! एवढी काय घाई?"
" घाई नाही, पण रस्तोगी सरांना लगेच दुसऱ्या चित्रपटाची रेकाॅर्डींग सुरू करायचीय! ते घाई करता हेत!"
" रस्तोगी सरांना घाई आहे का? आम्हाला वाटलं तुमच्या आबांनाच लग्नाची घाई लागली? "
पमनला तिरकस बोलणं वर्मी लागलं.पण त्यानं संयम पाळत नमतं घेतलं.
" मामा तिचा नंबर तरी द्या! आधीचा नंबर लागतच नाही व तिकडून ती ही करत नाही!"
" पवन, अरे त्यांच्याशी आम्हालाही फोन करता येत नाही. प्रशांत तिकडून करतो तेव्हढंच!" कदम सर पहिल्यांदाच बोलले.
" मग तो नंबर तरी द्या?"
" अरे पवन, तुला कसं सांगायचं! प्रशांत आता कोणी आर्डीतला सर्वसामान्य माणूस नाही राहिला बाबा! तो मोठा शास्त्रज्ञ असल्यानं महत्वाच्या व्यक्तीत त्याची गणना होत असल्यानं त्याच्याशी सुरक्षेच्या कारणास्तव कुणालाही थेट बोलता येत नाही! तरी आठ दिवसात त्याचा तिकडनं काॅल येतोच.आला की नंबर व वेळ घेत कळवतो आम्ही तुला!"
" सर, पण शिल्पाला लवकर परत बोलवा ना!"
" आता मी कसं बोलवेन तिला! हे तिच्या काका वडिलांना समजायला हवं! " कदम छद्मी हास्य दाबत बोलले.
पमन परतू लागला. परततांना
त्याला घरात खिडकीच्या आडोशाला शिल्पाची आई ओझरती दिसली. काही तरी इशाऱ्यानं ती पमनला सांगू पाहत होती.पण पमनला थांबणं उचित वाटेना. तो निघाला.
एक दिड महिन्यापूर्वीच सोमा पोवार, पत्नी कोलंबीयाला थांबत परतले होते. कोलंबीयाला प्रशांत शिल्पा व अंजना बाईच होते. सोमा पोवार परतताच मंगा पोवारशी त्याचं कडाक्याचं भांडण झालं होतं. तेच तिला पमनला सांगायचं होतं. पण सोमा पोवार व कदमसर समोर असल्यावर तिला पमनला सांगावं कसं हे समजेना.
पमन परतला.
" मायडे, त्या आर्डीवाल्यांच्या मनात काही तरी काळं बेरं दिसतंय मला!"
" का रे? असं का वाटतंय?"
" आज मी गेलो होतो. तर त्यांचं बोलणं खटकणारं होतं!"
" पमन ,शिल्पाशी थेट संपर्क कर ना! त्या शिवाय खरं काय ते समजणार नाही."
" मायडे, तिच्याशी बोलणं होत नाही म्हणून तर त्यांच्या वाड्यात पाय ठेवावा लागला!"
" पमन? एक विचारू?"
" काय मायडे?"
" तुझा संपर्क होत नाही, पण तिकडून शिल्पा का करत नाही फोन? मला तर ....."
" मायडे असलं अभद्र बोलू नको ना? मी शिल्पाला ओळखतो गं! हे हराम खोर सारे पालटले तरी ती माझ्यासाठी आग लावेल!"
" पमन देव करो नी तसच होवो! पण एका महिन्यासाठी गेलेली शिल्पा काका काकू सोबत का परतली नाही. तिथं प्रशांत सोबत थांबण्याचं काय प्रयोजन?"
" मायडे, वेब सिरीजचं काम लांबलं असेल गं! आणि संपर्काबाबत काही तरी अडचण असेल म्हणून गं!"
" पमन ,धीर सुटतो रे आता! कारण शिल्पा आपल्या दाराशी आली नी विचीत्र घटना घडायला सुरुवात झाली. त्याच दिवशी तिचं औषध पिणं, पमी माझ्यापासून दुरावणं, त्यातल्या त्यात त्या बिचारीच्या अंगाला फक्त हळद लागावी नी अनंतचं गायब होणं, आणि आता शिल्पाचं न येणं... सारं मला अघटीता सारखंच वाटतं!"
" मायडे असलं अभद्र बोलू नकोस! शिल्पा आपल्या घरी आली नी नंतर बघ पहिल्याच चित्रपटातील गाणी साऱ्या भारतात किती गाजताहेत! या बाजूनं तू विचार कर ना!" पमन जीव तोडून स्पष्टीकरण देत होता.
" पमन ! पमीचं पुढे काय रे? किती विचीत्र नी टांगती अवस्था झालीय बिचारीची! एका दिवसाचा नवरा! त्यानं तिला शिवलं ही नाही! पण केवळ सप्तपदी चालला नी नवरा बनून गेला! आज कुठाय तो? आहे की नाही ते ही माहीत नाही! आहे या भरवशावर दररोज कपाळावर गल्का लावते बिचारी त्याच्या नावाने! गल्का लावते म्हणून जिवंत समजायचं की मेला नाही हे जगाला कंठशोष करत सांगण्यासाठी गल्का लावायची? सारं सारं अनिश्चीत!"
" मायडे! पमीबाबत जीव तुटतो गं! पण करणार काय!"
पमन बोलला नी मायाच्या डोळ्यात महापूर दाटला. पमीचीच तिला चिंता खात होती.
पमनला रात्री स्वप्नात शिल्पा आली.
" पम्या! झोपलास! अरे उठ ना! ये ना रे ! मी वाट पाहतेय रे!"
पमन खाडकन जागा झाला व शिल्पे, शिल्पे ओरडत दार उघडत ओसरीवर आला. सदा आबा उठले. त्यांनी पम्यास हात धरत खाटेवर बसवलं. तोच घरातून आवाज ऐकत मामा तारामाय बाहेर आले.
पमन अजुन ही " आबा, शिल्पा आली होती हो! मला बोलवतेय ती!" बोलत उठत ओसरीतून अंगणात उतरू पाहत होता.
" पम्या उठ! , झोपेतून जागा हो!" आबा त्याला धरत झिंझोळू लागले व
प्रतापरावाकडं व ताराकडं पाहत आर्त स्वरात उरफोड करू लागले.
" तारे, मी भोगलं तेच माझ्या पम्याच्या नशिबी आलं तर तो आर्डीस पेटवेल गं! प्रताप मी सहन केलं! पण माझा पम्या नाही सहन करणार रे!"
तारामायनं पमनला उठवत मध्ये नेलं.
" पमा, काय झालं बाळा?"
" माय, ही मायडे मला काही बाही सांगते गं! माझी शिल्पा नाही गं तशी" पमन बोलला नी मायच्या मांडीवर डोकं खुपसत ढोरागत रडू लागला.
" अहो, सकाळीच साऱ्यांना गोळा करा नी एकदाचं काय ते सोक्षमोक्ष करा! माझा पमन नव्हता गेला! तीच सटवी आली होती दाराशी! मग आता का हे चाळे करत आहेत!" ताराबाई नवऱ्यावर संतापली.
प्रतापरावांनी सकाळी पुन्हा आबांना घेत आर्डीतल्या पंधरा वीस लोकांना घेत सोमा पोवारास गाठलं. साऱ्यांनी एकच गलका करताच सोमा पोवारानं हात झटकले.
" हे पहा, शिल्पा मंगाची पोर! तिचं काय करायचं ते तोच ठरवेल! मी काय सांगणार?"
" सोम्या, अंजीनं माझ्या सदा आबाचं वाटोळं केलं! ते सारं विसरत आम्ही नवीन नातं जोडू पाहतोय तर तू आडवा मुततोय! याद राखा माझ्या पम्यास जर शिल्पा मिळाली नाही तर तो एकेकाला फाडेन! मिसरूड फुटलं नसतांना जो तुझ्या लेकाच्या चढ्ढीत फटाके फोडू शकतो आता तर तो वाघ झालाय! विचार कर नी येत्या पंधरा दिवसात शिल्पाला आणा!"
" प्रताप, शिल्पा काय लहान मुलगी आहे का तिला कडेवर घेऊन येईन! तिचीच इच्छा नसेल तर?"
" सोमा, जी पमन साठी वेडी होत रोगार पिऊ शकते तिची इच्छा नाही कसं शक्य आहे? तिला एक वेळा समोर आणा.ती जर नकार देत असेल तर अजुन ही मी पम्यास मनवेल.पण तिची इच्छा असतांना तुम्ही पाय घातला तर कमरेतून पाय हासडेन!"
प्रतापरावाच्या सरळ धमकीनं बाचा बाची होऊ लागली. चंद्या व सुरेश झाड होत अंगावर धावू लागले. लोकांनी प्रतापरावांना शांत करत आम्ही बोलतो सांगत त्यांना घरी पाठवलं.
नंतर आलेल्या लोकांनी परत येत 'सोमा वर हात करतोय' हे सांगताच पमन बिथरला.तो चवताळला नी त्यानं सोमा पोवाराचं घरं जवळ केलं.
चौकात येताच त्याला सार्वजनिक नळाचं स्टॅण्डपोस्ट दिसलं. त्याला पाहताच चंद्या ,सुरेश, कदम सोमा पोवार ओसरीवरून हातात सापडेल ते घेत पमनवर चालून आले.पमननं स्टॅण्डपोस्टच्या नळाचा गॅनोलाईसचा पाईपचं उखळला. एक दिड इंची व्यासाचा तीनेक फुटाचा तुकडा त्याच्या हातात आला.चंद्याकडं वेताचं दांडकं होतं ते त्यानं पमनच्या डोक्यात टाकलं व पमनच्या डोक्यातून रक्ताची चिरकांडी उडाली. पमननं पाईप फिरवला व त्याच्या पोटरीत पाईप घातला. पायाची हाडकं डिचत चंद्या चौकात आडवा पडला. मागून आलेल्या सुरेशला त्यानं एका हातानं कमरेतल्या पॅंटीत पकडत उचललं व पाईपानं पायाच्या पाटरीवर सपासप वार करू लागला. सोमा पोवार व कदमसरांनी मिळून त्याच्या हातातील पाईप हिसकवत फेकला व लाथा घालू लागले.
" या कुत्र्यांना लोढवल्यावर तुमचा मार खातोय याचा काही ही अर्थ काढू नका. एका दणक्यात धोतरं ओली करणार तुम्ही.पण मर्यादा राखतोय! सोडा.नाहीतर.....?"
तोच लंगडत येत मागून चंद्यानं वेताचं दांडकं घातलंच. आता पमनच्या डोक्यात तीव्र कळ उठली. त्यानं समोर कारसाठी उभारलेल्या शेडच्या उभ्या पत्र्यास लाथा घालत पाडलं. बारा फुटी टाटाचा पत्रा दोन्ही हातानं उचलत नळाचा पाईप घेऊन धावत येणाऱ्या सोमा पोवार व चंद्यावर भिरकावला अंगावर पत्रा घेत चिरल्या अंगानं ते खाली कोसळले. पमन पत्र्यावर उडी मारत त्यांना दाबू लागला. कदम ते पाहून चिरकत मागे पळाला. पमननं गाडीला वट म्हणून लावलेला दगड उचलत कदमाच्या पाठीत मारला. कदम तोंडावर आपटला. पमननं दुसऱ्या चाकास लावलेला मोठा दगड उचलला नी सुरेशच्या तोंडावर टाकणार तोच घरातून आलेल्या मंगा पोवारानं त्याच्या हातातील दगड हिसकावत
" पमन, या हरामींनी मला ही फसवलं रे! माझी पोर कुठं ते मला ही सांगत नाहीत पण यांनी काही तरी करत प्रशांतशी तिचं तिकडंच उरकलं रे!" रडत रडत सांगितलं नी पमननं तोच दगड उचलत आपल्याच डोक्यावर वरून सोडला.
" शिल्पाsssssss...! शिल्पाsssss! "करत तो तिथेच रक्तात न्हात कोसळला. पण तरी चंदू व सुरेशची नवीन हिम्मतच झाली नाही. कुणी तरी कळवलं असावं म्हणून प्रतापराव येण्याआधीच आऊटपोष्टमधुन पोलीस आले. अॅम्ब्युलन्स आली.
एकमेकावर केस दाखल झाली.
साऱ्यांना जामीन झाली.
" मामा मला जामिनावर सोडू नका, बाहेर आलो तर आर्डीत रक्ताचे पाटच वाहायला लावेन! मामा व आबानं समजावत त्याला जामीनावर सोडत खडकीस नेलं. खडकीस केसा ,
सदा आबा व माया पंधरा दिवस थांबले.
शिल्पा प्रशांतशी लग्न करूच शकत नाही. पमन आतून तुटला....शिल्पा का? का हा खेळ खेळलास गं?
पण शिल्पानं तरी कुठं हा खेळ खेळला होता...
ती महासागराच्या किनारी तळमळत पमन ये रे! पम्या साल्या .....ये ना! विनवत तळमळत दिवस कंठीत होती!
क्रमश:....
✒ वा... पा...