झटेतलं चांदणं
🔖 भाग :: -- सहावा.
मळ्यात शिल्पानं कार वामन भटाच्या विहीरीवर न नेता प्रतापरावांच्या विहीरीच्या धावेवरच नेली. सदा आबा पेरुच्या फांद्या छाटणास माणसांना सांगत बागेतून येत थाळण्यात पाय धूत मशीन घराच्या बंगलीत बसले.तोच शिल्पा आत आली.
आबानं कपाळावर हात आडवा धरत तिला निरखलं व त्यांना धक्काच बसला.ते काय बोलणार तेवढ्यात आबाच्या पलंगासमोर खाली बसत शिल्पाच सुरू झाली.
" आबा, धक्का बसला ना मला पाहून?"
" पोरी ,का आलीस इकडं? तुमचा मळा तिकडे आहे मग? "त्यांना ती का आली ते समजेना.
" आबा मी सरळ मुद्यावर येते! कारण वेळ कमी आहे."
" हो. पटकन सांग नी नी निघ इथनं "
" आबा, तुमच्या पमनशी लग्न करायचय मला!" ती ठाम होत आबाकडं पाहू लागली.
आबा ताडकन उठले.त्यांचा कानावर विश्वास बसेना.
" क्काय? काय बोललीस तू?"
" मला पमनशी लग्न करायचंय! "
आबानं तिचं बखोटं धरत बंगलीतून धक्का देत बाहेर काढलं.
" झिपरे! चल इथनं! काय बोलतेय कळतंय का?"
तिनं झटका देत बखोटं सोडवलं व पुन्हा बंगलीत परतली.आबा रागानं थरथरू लागले.त्यांचे भुवया पिकलेले डोळे विस्तवागत दिसू लागले.
" त्या अंजीनं मला बरबाद केलं,ते अपुरं पडलं म्हणून आता तुला पाठवलं का पवनला आयुष्यातून उठवायला? चल तोंड बंद कर नी मुकाट्यानं निघ!" आबा बेभान उधाणल्यागत गरजले.
" आबा, आत्यानं जे केलं त्याला तुम्हीच कायपण कुणीच माफ करणार नाही. पण आत्यानं जे केलं तेच मी करणार हे कशावरून ?"
" तू काय करणार याच्याशी मला देणंघेणं नाही.पण पमनशी लग्न कदापि शक्य नाही. चार दोन गाणी सोबत काय म्हटली नी चालली लग्न करायला! आणि त्या पम्याची ही तुझ्यासारखीच इच्छा असेल तर त्याला ही उभा फासडेन जागेवर!"
" आबा, पम्याची इच्छा काय त्यापेक्षा मला तुमची परवानगी हवीय!"
" मुळीच परवानगी मिळणार नाही!ज्या घराण्याशी उभ्या जन्माची दावेदारी आहे,त्या घराण्यातील कुत्रं ही मी सहन करणार नाही"
" आबा का? अंजा आत्या चुकली त्याची शिक्षा मी व पमननं का भोगावी!"
" जे गुण आत्यानं पाजळले तेच गुण भाची पाजळणार नाही याची कोण हमी?" आबा संतापात तिला फाडू की गिळू या आवेशात बोलले.
" आबा ,किती पाणकाळे खाल्लेले तुम्ही! तुम्हास मी आताची पोर काय सांगणार व काय हमी भरणार! पण नदीला पावसाळ्यात किती ही गढूळ पाणी असलं तरी तिच्या खाली पात्रात खोदलेल्या झिऱ्यातही गढूळ पाणीच असतं असं नाही.नदी गढूळ वाहत असली तरी तिच्याजवळच्या झऱ्यात पाणी नितळ असतं. आत्यानं धोखा दिला म्हणून मी पण तशीच वागेन असं नाही?"
" शिल्पे, तुझी दलील ऐकवू नकोस! चालती हो येथून! "
" आबा परवानगी घेऊनच जाईन मी! तुम्ही स्वत: पमनला माझ्याशी लग्न करायला सांगा तरच जाईन!"
" आणि नाही संमती दिली तर?"
" गाडीत घरूनच कापसावर मारण्याचा औषधाचा डबा आणलाय मी सोबत, इथेच घटाघटा पिते.कारण तुम्ही जगताहेत अंजा आत्याशिवाय पण माझ्यात तो संयम नाही पम्याशिवाय जगण्याचा! म्हणून पम्या मागून येतोय त्याला तुम्हीच मनवा लग्नासाठी! अन्यथा डबा खाली झालाच समजा! मग बसा तोच खाली डबा वाजवत काका - पुतणे! कारण एवी तेवी अंजा आत्यानं मला पमनचं आयुष्य बरबाद करायलाच तीन वर्षांपासून पमनच्या मागावर पाठवलंच आहे.पण त्याला बरबाद करता करता मीच त्याच्या प्रेमात बरबाद झाले. त्याच्या शिवाय नाही जगू शकत मी." शिल्पा डोळ्यात ज्वालामुखी फुलवत बोलली.
" शिल्पा नाही जगू शकत तर मग मर पण मला धमकी नको देऊ!" आबा शिल्पा आपणास घाबरवतेय पाहून सुनवू लागले.
" आबा, शेवटचं विचारतेय मी ,पमनला सांगणार की नाही?"
" हजार वेळा विचारलं तरी तेच उत्तर राहील माझं!"
शिल्पा उठली व गाडीकडं निघाली.
सदा आबास वाटलं शिल्पा आपणास घाबरवतेय. तिनं गाडीचा दरवाजा उघडला व सीटवरून डबा उचलला नी सदा आबा धावले.
" शिल्पा ऐक..ऐक...पोरी........"
पण शिल्पानं झाकणं फेकलं नी तोंडास डबा लावला.
तोच आबानं जोरात हात मारत डबा भिरकावला. रोगार हवेतून जमीनीवर सांडलं व डबा घरंगळू लागला. आबानं एकच आरोळी ठोकत गलका गेला तोच प्रतापराव व पमन समोरून आले.
" पम्या काही कर पण हिला वाचव!" म्हणत आबानं जोरानं आक्रोश केला. पमननं तिला उचलत गाडीवर बसवलं .मागून प्रतापराव बसले. बाईकनं चाळीसगाव व तेथून तात्पुरते उपचार करत अम्ब्युलंसनं जळगाव. जळगावला पोहोचताच सोमा, मंगा पोवार, कदम सर, चंदू ,सुरेश व मोठ्या आर्डीतल्या दोनेक गाड्या भरून आल्या . प्रतापरावांना हे घडणार हे माहित होतं.म्हणून त्यांनी चाळीसगावहुन त्यांना फोन करताच आपल्या भावकीतल्या लोकांना ही कळवलं होतं. त्यांच्या सोबत सदा आबा ही आले. शिल्पाला अम्ब्युलंस मधुन खाली उतरवून मध्ये घेऊन जातांना अर्धवट शुद्धीत आचके देणाऱ्या शिल्पानं पमनचा हात धरत त्याला ही मध्ये ओढलं.
तोच एकच गर्दी होऊ लागली.डाॅक्टरांनी साऱ्यांना बाहेर काढत उपचार सुरू केले. चंद्या, सुरेशनं पमनचं छाताडं धरत बाहेर ओढत 'पम्या आता तू नाही वाचत ' म्हणत मारणार तोच पमननं जवळच्या बाकड्याची खालची फळीच उखळत हातात घेतली. प्रतापरावानं पमनला पाठीशी घालत " सोम्या पोरांना आवर नाही तर परिणाम वाईट होतील.प्रसंग कोणता आधी त्याला तोंड देऊ ! मग नंतर काय तो राडा करायचा तो आर्डीत करू!"
" आमच्या शिल्पाचं काय बरं वाईट झालं तर पम्या तुझा गेमच समज!" चंद्या सुरेश ओरडले.
पमन मामाच्या पाठीमागून धावत धमकी देणाऱ्या चंद्या सुरेशवर लाथ घालणार तोच प्रतापराव इतरांनी त्याला आवरलं.
" साले जे काय केलं ते तिनंच केलं नी वरून मला...." पमन ओरडू लागला. तोच पोलीस आले व दोन्हीकडं आवरा आवर झाली.
सायंकाळ पर्यंत सारे आवारात बसून होते.ठिणगी केव्हा उडेल काहीच नेम नव्हता. सायंकाळी डाॅक्टरांनी
" सदा कोण?" विचारत सदा आबास व पेशंटच्या वडिलांना मध्ये बोलवलं.
सदा आबा थरथरत मध्ये गेले.
शिल्पा शांत पहुडली होती.तिच्या शरीरात भिणलेलं सारं विष काढलं गेलं होतं. डाॅक्टरांनी आधी सदा आबास मध्ये सोडलं.
" शिल्पा......का ? का केलंस?"
" आबा....काय ठरवलं? आता पोलीस येत आहेत जबाब नोंदवण्या साठी?" शिल्पा तुटक तुटक विचारू लागली.
" शिल्पा तुला जबाब काय द्यायचे ते तू दे! पण माझी खात्री झालीय माझ्या पम्यावर तुझ्याशिवाय जास्त कुणीच मरू शकणार नाही!" आबा डोळे पुसत म्हणाले.
शिल्पानं हातात सलाईनची निडल असुनही हात पुढं केला. सदा आबांनी थरथरत हात पुढं केला. शिल्पानं क्षीण हसत तोंड फिरवत डोळे मिचकावले. आबा बाहेर निघाले.
मग मंगा पोवारांना आत सोडलं.
" पप्पा, का? कुणी डब्यातलं सरबत बदललंल? मी सदा नकाशेकडं जातेय हे तर फक्त तुम्हालाच माहीत होतं ना?" मंगा पोवार भिंतीकडं पाहत शून्यात पाहू लागले.
" पप्पा बोला! काय जबाब देऊ पोलीसांना?" शिल्पा विचारू लागली.पण मंगा पोवाराकडं आपल्या पोरीला द्यायला उत्तरच नव्हतं.
" पप्पा, काका, आत्याचा नाद सोडा मग!" शिल्पा बोलली नी मंगा पोवारांनी आसवं पुसत तिला भरोसा भरला.
पोलीस चाळीसगावलाही आले होते पण शिल्पा त्या वेळेस जबाब देण्याच्या स्थितीत नाही पाहताच उपचारानंतर डाॅक्टरांनी सांगताच येत होते.
शिल्पानं कुणालाच दोष न देता कापसात फवारणी चालू असतांना काम करतांना रिअॅक्शन आल्याचं जबाब नोंदवले. नंतर सारं प्रकरण प्रतापरावांनी मिटवलं.
रात्री शिल्पाजवळ तिची आई थांबली. शिल्पानं पमनला थांबायला लावलं. पण प्रतापरावांनी पमन थांबला तरी धोखा व नाही थांबला तरी धोखा हे ओळखत पमन सोबत केसा व भावकीतले दोन तीन जणांना थांबवलं.
" पम्या, रामजी पोवारातल्या वाड्यातली पहिली मुलगी नाही नांदली आपल्या खडकीत! पण ही दुसरी मुलगी नांदली पाहिजेच पोरा! मी तुझा आबा सांगतोय हे पक्क लक्षात ठेव! मागचं मी सांगितलेलं सारं विसर नी शिल्पास जप पोरा! शिल्पा हीच......" सदा आबा साऱ्यांसमोर बोलले नी कदम, सोमा पोवार, चंदू, सुरेश वाघागत जागच्या जागी चरफडू लागले.
सारे परतले.
पमननं 'शिल्पीनं आबांना विरघवळच' हे ओळखलं.
रात्री शिल्पाची आई तिच्या जवळ बसलेली. पमन खोलीतच दूर भिंतीला टेकून स्टुलावर बसला.
" पम्या ,अजुनही दूर का पळतोस रे! साल्या रणछोड! मी मरणाच्या दारातून परत आली ना रे! "
पमन उठला व जवळ येत " शांत झोप शिल्पे!" म्हणत तिला समजावू लागला.
" पम्या तुझा काका रोगारच्या दोन चार घोटातच विरघळला रे!"
" शिल्पे, आज तू साऱ्यांनाच कसल्या पेचात टाकत होतीस हे कळतंय का तुला!" आतून कळवळत तो तरारल्या डोळ्यांनी विचारू लागला.
" पम्या त्या शिवाय या अंजनाबाईच्या भाचीवर तुम्ही काका - लेकांनी विश्वासच ठेवला नसता!" ती तोंड फिरवत रडू लागली नी पमननं तिचा हात हातात घेतला.
शिल्पानं त्याला आपल्याकडं ओढलं नी दोन्ही ढसाढसा रडू लागले.
शिल्पाच्या आईला पक्की खात्री झाली की आपल्या पोरीनं बंड करून खूप मोठा धोका पत्करलाय. तिनं दोघांना रात्रभर समजावलं.
चारेक दिवसांनी शिल्पाला घरी आणलं.
मळ्यात शिल्पाची कार प्रतापरावाच्या विहीरीवर जाताच वामन भटाच्या मळ्यात असलेल्या सुरेशनं पाहिलं होतं व त्याला शंका आली म्हणुन लिंबुच्या बागेतून तो मशीन घराच्या मागच्या बाजूस येऊन सदा नकाशे व शिल्पामधील सारा संवाद ऐकला होता. अंजना आत्या व वडिलांनी शिल्पास सांगितलंय काय नी आता तर शिल्पाच गारद होत शत्रुपक्षास सामील होतेय हे ऐकल्यावर तो जागीच चाट झाला. तोच शिल्पानं औषध घेतलं. तो मदतीला धावणार तितक्यात पमन व प्रतापराव येताच तो भिंतीमागंच स्तब्ध उभा राहिला. ते निघताच सदा आबा घराकडं पळाले नी त्यानं शिल्पाच्या कारला चावी दिसताच तीच कार काढत घर गाठलं व सारा प्रकार वडिल व काकास सांगितला. मंगा पोवार बिनधास्त होते.कारण शिल्पानं काल त्यांना सांगितल्यावर त्यांनी
' औषधाच्या जागी पाणी वा सरबत घे पोरी! नाहक जिवाशी खेळ नको करूस' सांगितलं होतं. त्यामुळे शिल्पानं विष पिल्याचं नाटक केलं असंच त्यांना वाटत होतं. पण तरी त्यानं मौन पाळलं. सोमा पोवार नंतर आलेले कदम शिल्पावर दात ओठ खात " शिल्पा आपल्या विरोधात जातेय तर मरू द्या !" म्हणत संतापू लागले. पण प्रतापरावांचा चाळीसगावावरून फोन आला नी मग ते सारे निघाले. शिल्पा वाचणार हे पाहताच ते पमनवर उलटू लागले. पण खरा धक्का मंगा पोवारास पोरीनं मध्ये 'डब्यातलं सरबत कुणी बदलवलं?' विचारलं तेव्हा लागला.
शिल्पा घरी येणार हे कळताच सोमा पोवार, कदम व नंतर आलेली अंजनाबाईनं सुरेशनं ऐकलेलं मनात ठेवत आपणास कळलं हे शिल्पास न कळू देत तिच्याशी आपल्या आधीच्या योजनेप्रमाणेच तूर्तास वागण्याचं ठरवलं. आता ही बाब त्यांनी मंगा पोवारास ही कळू दिली नाही.
प्रशांतचं बी.एस.एम.एस. चं शेवटचं वर्ष होतं हे. त्यानं मागे कोलंबीया विद्यापिठात प्रबंध सादर केला होता. तो सिलेक्ट होत त्याला परिषदेसाठी बोलावलं होतं. त्याच्या या शोधपर प्रबंधानं चांगलीच खडबड उडवली. तेथूनच त्याला दक्षिण अमेरिकेत संशोधनासाठी विचारणा झाल्यावर कायदेशीर बाबी पूर्ण करत तो संशोधनासाठी उरुग्वे येथे थांबला होता.त्याला ही शिल्पाची बाब कळताच त्यानं दोन महिन्यात परतणार असल्याचं कळवलं. पण त्या आधी त्यानं व कदम सरांनी पाच लोकासाठी व्हिसा व पासपोर्ट ची गुप्ततेत तयारी सुरू केली.
पमन व शिल्पास आबांनी परवानगी दिल्याची आणखी एका जणास जोराची कळ लागली होती!.....कुणाला?...पमीला!
पद्मास साऱ्या आशा सुटत चालल्याचं समजताच उभा दाह दाह होत वणवा पेटला. तिनं मायाकडं येणंच टाळायला सुरूवात केली. मारोती मामाकडनं वडिलास निरोप गेला. वडिलांनी आठच दिवसात बोधवडच्या मुलास गडचिरोलीतून बोलवत आर्डी गाठली. तत्पूर्वी
माया पमीस भेटायला गेली.
" पमे!...."
".........!"
" पमे, अजुन धीर सोडू नको! शिल्पानं गरळ घोटलं नी आबा घाबरले गं! प्रकरण शांत झालं की आबा शिल्पाला नकारच देतील!"
" मायडे, प्रकरण शांत होईल गं! पण मनात आग पेटली की सारं क्षणात खाक होत गं!" पमी मारोती मामाच्या मोडू पाहत असलेल्या आढ्याकडं शून्य नजरेनं पाहत बोलत होती.
" पमे, पमनवर विश्वास ठेव!"
" मायडे, आता माझा माझ्या प्रारब्धावरच विश्वास नाही राहिला!"
माया रडू लागली.तसं पमी मायास बिलगली व दोघी रडू लागल्या.
" मायडे, आपण शिल्पीला नाही ओळखू शकलो, की तिच्या इतकं प्रेम नाही करू शकलो हेच मला कळत नाही मला!"
" पमी...!"
" माया उद्या मुलगा येतोय पहायला!"
" पमी नकार दे त्याला! "
" बघू!" इतकंच तुटक बोलत पमी शांत बसली.
दुसऱ्या दिवशी अनंत जगताप आला. वन खात्यात चांगली नोकरी असलेला. दिसायला चांगला अनंत आला. पद्माला पाहताच त्यानं पसंत केली.
वडिलांनी घरात येत पद्मास विचारलं.
पमीचा आता नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. खोपडी उठली की लग्न लगेच करण्याचं ठरवत मुलगा परतला.
लग्न मारोती मामा आर्डीतच सांगत होते पण वडिलांनी न ऐकता गावाला-सनावदला करण्याचं ठरवलं. मात्र पैसा? हातात काहीच नव्हतं. सारी उठाठेव मारोती मामालाच करावी लागणार होती. मारोती मामाचं या वर्षी नियोजनच नव्हतं. पण मेव्हण्याची तब्येत व नंतर पमीचा होकार म्हणून अचानक सारं ठरल्यावर मग मामांनी बाकी कर्ज उचलायचं ठरवत तयारी सुरू केली.
मायानं आई-वडिलांना पमीबाबत सांगताच ताराबाई तीळ तीळ तुटल्या.
" अहो, पमीकडं पाहिल्यावर मला कायम असंच वाटायचं हो! पण नियतीनं सारे फासेच पालटवले."
प्रतापरावांना ही पद्माबाबत मायासारखी लेकच वाटे. पद्मा व तिची मामी, मारोती कायम मळ्यात राबतात म्हणून त्यांनी मारोतीस भेटत पद्माच्या लग्नासाठी भरपूर मदत केली. लग्नातील सारा जेवणाचा खर्च त्यांनी उचलायचं व आणखी ही लागले तर विना संकोच सांगण्याचं मारोतीस सांगितलं.
सुबोध राणे यांचेकडून निरोप येताच पमन व शिल्पा मुंबईस परतले.
शिल्पास वाटलं घरचे विरोध करतील.पण कुणीच विरोध न करता लवकर परतण्याबाबत सांगत परवानगी दिली.
पमन मुंबई ला निघणार त्या आधी मायानं पद्माला घरी बोलवलं. पद्मास जावंसं वाटेना. पण माया स्वत: आली व तिला घेऊन गेली.
" पमे! काय झालंय गं तुझ्या नोकरीचं?" पमी ला मायासोबत पाहताच पमननं विचारलं.
" लेखी परीक्षा झालीय! कळेल आता तोंडीचा काॅल येतो की नाही!" पद्मा नजर टाळत बोलत होती.
" पमे नोकरी लागली की आम्हास ओळखशील का नाही!" तो हसत म्हणाला नी पमीस आतून कालवल्यासारखं झालं.
ती मायाचा हात दाबत हुंदका दाबण्याचा प्रयत्न करू लागली.
" पमन! पमीचं लग्न ठरलंय!" माया तरळू पाहणारी आसवे रोखत बोलली
पमन जागेवरून उठला.
" पमी तू तर शिल्पेपेक्षा वस्ताद निघालीस गं! कळू ही दिलं नाही! लग्नाला तरी बोलवशील की नाही?"
पमीचं तोंड मायाकडं होतं.शिल्पीचं नाव ऐकताच उरातील हुंदका डोळ्यातून वाहू लागला.
" पम्या, प्रेम हे माणसानं असंच करावं की ज्यावर करतोय त्याला ही समजू नये!" पमी बोलली नी मायाच्या काळजावर तप्त कढत तेल पडू लागलं.
" पमन, एकादशी होताच तिच्या गावाला लग्न ठरलंय.चित्रीकरण असलं तरी ये!" माया त्याला जरबेनं म्हणाली.
" माया, शिल्पीनं आबास मनवलं नसतं ना तर या पमीशीच केलं असतं मी लग्न! हिचा नेम खूप अचूक आहे गं! हिनं मारलेल्या पेरूनं कितीदा माझं कपाळ फुटलंय!" तो हसू लागला.
पण पद्मा तिकडं आवाज न करता आक्रदू लागली. मायाला तिचा आक्रोश सहन न झाल्यानं ती पम्यावर खवळली
" पम्या ,हिम्मत असेल तर स्विकार पमीला!" माया तळतळत बोलली नी पमीनं तिला घट्ट धरत आवरलं.
पमननं मायाचा घोगरा आवाज ऐकला.
" माया , काय झालं गं?"
" काही नाही रे! आता ही पमी चालली जाणार म्हणून ..... भरून आलं!"
" माया हे मात्र खरं गं! पमी जाणार हे ऐकुणच काळीज कुणी तरी कुरतडल्यागत होतंय गं!कायम आठवण येणार पमीची! कच्चे पेरू मारणारी पमी!खो खो मैदानात बिनधास्त बिलगणारी पमी! गणपतीत गुलाल उधळत शिल्पास हूल देणारी पमी!"
" पम्या! बस्स! " पद्मानं तोंड फिरवत आसवे आवरत्या डोळ्यानं पाहिलं नी पमननं तिच्या खांद्यांना हातानं थोपटत तिच्या डोळ्यात पाहिलं.
पमीला हा निमीष मात्र क्षण अनंत युगे असाच थबकावा वाटत ती त्याला शेवटचंच नजरेनं पिऊ पाहत होती.
" पमे तू चालली, ही माया ही जाईल मग! मग मी कसं राहू गं!"
" शिल्पा आहे नं!" पमी बोलली नी त्याला अचानक तोच धुंद धुंद करणारा वास दरवळत असल्याचं जाणवू लागलं.
" पमे, लिंबोणीचा वास कुठून दरवळतोय बघ! किती मस्त धुंदाळ भारी!" आता पमीला थांबणं असह्य झालं. तिला एकवेळ तीव्रपणे वाटलं.द्यावं सारं झुगारून,नी याला गच्च गच्च आवळत खोलावं सारं आतल्या खोल खोल गर्तेत दडवू पाहत असलेलं! पण क्षणात पमीनं सारा मोह आवरला व ती तडक निघाली.....
आता न फिरणे माघारी!
पमनला कारवर सोबत घेत शिल्पा निघाली. मायाला पमन शेजारी शिल्पा दिसताच पमी आठवली व ती मनात संतापली.
मुंबईला काही गाण्याचं रेकाॅर्डींग होऊ लागलं. पण रस्तोगीला गाण्यात थीम साॅंगवर वरचढ ठरणारा जो कसीला, कातर आवाज हवा होता तो जाणवेना. शिल्पानं त्यांनी सुचवलेल्या धूनवर आपलंच एक गाणं ऐकवलं. रस्तोगीनं तेच गाणं दोघांना गायला लावलं. पमनच्या आवाजातील शिल्पानं सुचवलेलं गाणं ऐकताच रस्तोगीला जे हवं होतं ते सापडलं. त्यानं शिल्पास कथेला अनुसरून चार पाच अशी काही गाणी तयार करायला सांगितली. मूळ गितकार आपलं गाणं बाजूला होताच फणकाऱ्यात निघून गेला. रस्तोगीनं त्याच्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही.
रस्तोगीनं चार पाच दिवस शिल्पा व पमनला मोकळीक देत चार पाच गाणी सांगितली व त्यांना गोव्यास पाठवलं. पुढचं रेकाॅर्डींग चार पाच दिवसांनी असल्यानं शिल्पा व पमन गोव्याकडं निघाले. पाऊस ओसरून दिवाळीनंतर थंडी परतत होती. गारठा, निळा पसरलेला समुद्र, निळी निळाई आभाळाची यानं सारं काही रम्य, भव्य व दिव्य वाटत होतं. कार वळणा वळणानं लाल मातीतून नारळा- पोफळीच्या बागातून वळसे घेत मांडवी नदी जवळ करू पाहत होती.
" पमन?"
" काय?"
" तुझे आबा इतके लवकर मानलेच नसते!"
" काय बरळलीस तू नी आबा एकदम बदलले,हे मला ही कोडंच आहे?"
" पम्या, खरं तर तू संगीत ग्रॅज्युएशनला आला नी त्याच वेळी आत्यानं तुला जवळ करत जाळ्यात ओढायला लावलं होतं! शिल्पा याला इतका जीव लाव की वेड लागलं पाहिजे. आत्यानं हे सांगितलं नी मी तुझ्या मागे लागले. पण त्यात मीच फसत गेली व परत फिरताच आलं नाही मला!"
आत्या तुला वेडा करत उध्वस्त करणार होती. मी हेच आबांना सांगितलं. मग आबांनी तरी मरायचं तर मर सांगितलं. मग काय प्याली मी घटाघट पप्पांनी भरलेलं सरबत फेकून माझ्याच हातांनी भरलेलं डब्यातलं रोगार! आबाची बत्ती गुल!" नी ती हसायला लागली.
" मूर्ख ,थोडाही उशीर झाला असता तर? वा मदतीला कुणी आलं नसतं तर?"
" मी मरण्यासाठीच तर निघाले होते!"
गाडी गोव्यात हाॅटेलच्या कडेला उभी राहिली. थंड रात्री शिकारा चांदण्या रात्रीत समुद्रात शिरला नी शिकाऱ्यात शिल्पा पमनच्या कुशीत.... धुंद गोवा! गोव्याचा सागर! धुंद सागरातील शिकारा! नी शिकाऱ्यातील शील अल्पवणारी शिल्पा!
तीन दिवसानंतर पमन व शिल्पा परतले व पुढच्या दोन दिवसात शिल्पानं लिहीलेली पाच गाणी रेकाॅर्ड केली. रस्तोगी कसलेला संगितकार होता. जोडी एका समेवर येत एकसूर झाल्याशिवाय गाणं टिपेला पोहोचूच शकत नाही व तो पावेतो गाण्यात काळीच कातरता वा मिठास जो हवा तो येत नाही म्हणून तर त्यानं गोव्यास त्यांना फिरायला पाठवलं होतं व जुन्या गीतकारास जातोय तर जाऊ दिलं होतं.
रेकाॅर्डिंग होताच त्यांनी पुण्यात काॅलेजला PG चं उर्वरीत काम केलं व आर्डीस परतले.आबाच्या सांगण्यावरून प्रतापराव स्वत: रामजी बाबाच्या वाड्यात किती तरी वर्षांनी पायरी चढले. पायरी चढतांना जुन्या आठवणींनी त्यांचं तोंड कडवट झालं.पण तरी कडवटपणा विसरत त्यांनी सोमा व मंगा पोवाराकडं शिल्पा व पवनच्या वाङनिश्चयाचा प्रस्ताव ठेवला.
" अमेरिकेत विद्यापिठाकडुन संशोधन कार्याबद्दल प्रशांतचा मोठा सत्कार असल्यानं शिल्पासहीत आम्ही एका महिन्यासाठी जातोय. तेथून परतलो की साखरपुडा व लग्न लगेच उरकवू!" सांगत सोमा पोवार व कदमांनी प्रतापरावास परत पाठवलं.
प्रशांत आला. त्यानं येताच शिल्पास हाॅलीवूडमध्ये एका वेब सिरीजसाठी गाण्याची तुला गोल्डन अपार्च्युनिटी मिळतेय म्हणून अमेरिकेसाठी राजी केलं. त्याचा सत्कार व वेब सिरीज यासाठी आधी ती पमनला ही सोबत सांगत तयार झाली. पण आता पमनचा व्हिसा व पासपोर्ट लगेच शक्य नसल्याचं सांगत नंतर त्याला ही बोलवण्याचं कबुल करत प्रशांतनं शिल्पास मनवलं.
सोमा पोवार, सुमनबाई, अंजाबाई,शिल्पा, व प्रशांत पाच जण निघाले. निघण्यापूर्वी तिनं पमनची भेट घेतली.
" पमन ,हाॅलीवुड वेब सिरीजला संधी मिळतेय! येशील ना ?"
" शिल्पे, तू लवकर परत ये! मला गाण्यापेक्षा आता तू हवी आहेस!"
" अरे ,एका महिन्याचीच तर बात आहे! यू जाते नं यू येते! मध्येच प्रशांतनं जर पासपोर्ट बनवला तर पंधरा दिवसात तू ही येशीलच!"
पण पमनला तिकडे जाण्यात स्वारस्य नव्हतंच. फक्त शिल्पानं लवकर यावं हेच महत्वाचं.
आर्डीतून निघतांना ती प्रतापरावांच्या घरी आली.आबा व तारा काकुंचा पाया पडली.
" माया, पम्यावर लक्ष ठेव गं! मी येईपर्यंत याला एकटं सोडू नको! त्या पमीचा भरवसा नाही! तिच्यामागं पळेल हा!" बोलत हसली. पण पमीचं नाव निघताच मायाच्या अंतरात कळा निघाल्या. ती बळे बळे हसली.शिल्पानं साऱ्यांसमोर पम्याचे हात हातात घेत त्याच्या डोळ्यात पाहत कपाळावर आपले ओठ टेकवले.तिच्या डोळ्यात आसवे तरळली.
शिल्पा गेली.
.
.
पमनची शिल्पा कोलंबीया विद्यापिठातून उरुग्वेच्या अटलांटीक महासागरातील निर्जन बेटावर.....
शिल्पा गेली नी पमीच्या लग्नासाठी माया, पमन, प्रतापराव, तारामाय, सदाआबा, केसा, लिना सारे पमीच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगतच्या सनावदला निघाले.
पमीपासून पमन दूर जात होता...तर पमनपासून शिल्पा.....कोण कोणाजवळ येत होतं नी कोण कोणापासून दूर जात होतं सारं सारं अकल्पितासारखं की पूर्वसंचितासारखं...काहीच कळत नव्हतं.
परमेश्वरा! मिलनोन्मुख दोन जिवांना सुखानं का येऊ देत नाहीस तू! निर्मीका तुझ्या मनात कोणता खेळ चालतोस?
?
?
?
क्रमशः
आबानं कपाळावर हात आडवा धरत तिला निरखलं व त्यांना धक्काच बसला.ते काय बोलणार तेवढ्यात आबाच्या पलंगासमोर खाली बसत शिल्पाच सुरू झाली.
" आबा, धक्का बसला ना मला पाहून?"
" पोरी ,का आलीस इकडं? तुमचा मळा तिकडे आहे मग? "त्यांना ती का आली ते समजेना.
" आबा मी सरळ मुद्यावर येते! कारण वेळ कमी आहे."
" हो. पटकन सांग नी नी निघ इथनं "
" आबा, तुमच्या पमनशी लग्न करायचय मला!" ती ठाम होत आबाकडं पाहू लागली.
आबा ताडकन उठले.त्यांचा कानावर विश्वास बसेना.
" क्काय? काय बोललीस तू?"
" मला पमनशी लग्न करायचंय! "
आबानं तिचं बखोटं धरत बंगलीतून धक्का देत बाहेर काढलं.
" झिपरे! चल इथनं! काय बोलतेय कळतंय का?"
तिनं झटका देत बखोटं सोडवलं व पुन्हा बंगलीत परतली.आबा रागानं थरथरू लागले.त्यांचे भुवया पिकलेले डोळे विस्तवागत दिसू लागले.
" त्या अंजीनं मला बरबाद केलं,ते अपुरं पडलं म्हणून आता तुला पाठवलं का पवनला आयुष्यातून उठवायला? चल तोंड बंद कर नी मुकाट्यानं निघ!" आबा बेभान उधाणल्यागत गरजले.
" आबा, आत्यानं जे केलं त्याला तुम्हीच कायपण कुणीच माफ करणार नाही. पण आत्यानं जे केलं तेच मी करणार हे कशावरून ?"
" तू काय करणार याच्याशी मला देणंघेणं नाही.पण पमनशी लग्न कदापि शक्य नाही. चार दोन गाणी सोबत काय म्हटली नी चालली लग्न करायला! आणि त्या पम्याची ही तुझ्यासारखीच इच्छा असेल तर त्याला ही उभा फासडेन जागेवर!"
" आबा, पम्याची इच्छा काय त्यापेक्षा मला तुमची परवानगी हवीय!"
" मुळीच परवानगी मिळणार नाही!ज्या घराण्याशी उभ्या जन्माची दावेदारी आहे,त्या घराण्यातील कुत्रं ही मी सहन करणार नाही"
" आबा का? अंजा आत्या चुकली त्याची शिक्षा मी व पमननं का भोगावी!"
" जे गुण आत्यानं पाजळले तेच गुण भाची पाजळणार नाही याची कोण हमी?" आबा संतापात तिला फाडू की गिळू या आवेशात बोलले.
" आबा ,किती पाणकाळे खाल्लेले तुम्ही! तुम्हास मी आताची पोर काय सांगणार व काय हमी भरणार! पण नदीला पावसाळ्यात किती ही गढूळ पाणी असलं तरी तिच्या खाली पात्रात खोदलेल्या झिऱ्यातही गढूळ पाणीच असतं असं नाही.नदी गढूळ वाहत असली तरी तिच्याजवळच्या झऱ्यात पाणी नितळ असतं. आत्यानं धोखा दिला म्हणून मी पण तशीच वागेन असं नाही?"
" शिल्पे, तुझी दलील ऐकवू नकोस! चालती हो येथून! "
" आबा परवानगी घेऊनच जाईन मी! तुम्ही स्वत: पमनला माझ्याशी लग्न करायला सांगा तरच जाईन!"
" आणि नाही संमती दिली तर?"
" गाडीत घरूनच कापसावर मारण्याचा औषधाचा डबा आणलाय मी सोबत, इथेच घटाघटा पिते.कारण तुम्ही जगताहेत अंजा आत्याशिवाय पण माझ्यात तो संयम नाही पम्याशिवाय जगण्याचा! म्हणून पम्या मागून येतोय त्याला तुम्हीच मनवा लग्नासाठी! अन्यथा डबा खाली झालाच समजा! मग बसा तोच खाली डबा वाजवत काका - पुतणे! कारण एवी तेवी अंजा आत्यानं मला पमनचं आयुष्य बरबाद करायलाच तीन वर्षांपासून पमनच्या मागावर पाठवलंच आहे.पण त्याला बरबाद करता करता मीच त्याच्या प्रेमात बरबाद झाले. त्याच्या शिवाय नाही जगू शकत मी." शिल्पा डोळ्यात ज्वालामुखी फुलवत बोलली.
" शिल्पा नाही जगू शकत तर मग मर पण मला धमकी नको देऊ!" आबा शिल्पा आपणास घाबरवतेय पाहून सुनवू लागले.
" आबा, शेवटचं विचारतेय मी ,पमनला सांगणार की नाही?"
" हजार वेळा विचारलं तरी तेच उत्तर राहील माझं!"
शिल्पा उठली व गाडीकडं निघाली.
सदा आबास वाटलं शिल्पा आपणास घाबरवतेय. तिनं गाडीचा दरवाजा उघडला व सीटवरून डबा उचलला नी सदा आबा धावले.
" शिल्पा ऐक..ऐक...पोरी........"
पण शिल्पानं झाकणं फेकलं नी तोंडास डबा लावला.
तोच आबानं जोरात हात मारत डबा भिरकावला. रोगार हवेतून जमीनीवर सांडलं व डबा घरंगळू लागला. आबानं एकच आरोळी ठोकत गलका गेला तोच प्रतापराव व पमन समोरून आले.
" पम्या काही कर पण हिला वाचव!" म्हणत आबानं जोरानं आक्रोश केला. पमननं तिला उचलत गाडीवर बसवलं .मागून प्रतापराव बसले. बाईकनं चाळीसगाव व तेथून तात्पुरते उपचार करत अम्ब्युलंसनं जळगाव. जळगावला पोहोचताच सोमा, मंगा पोवार, कदम सर, चंदू ,सुरेश व मोठ्या आर्डीतल्या दोनेक गाड्या भरून आल्या . प्रतापरावांना हे घडणार हे माहित होतं.म्हणून त्यांनी चाळीसगावहुन त्यांना फोन करताच आपल्या भावकीतल्या लोकांना ही कळवलं होतं. त्यांच्या सोबत सदा आबा ही आले. शिल्पाला अम्ब्युलंस मधुन खाली उतरवून मध्ये घेऊन जातांना अर्धवट शुद्धीत आचके देणाऱ्या शिल्पानं पमनचा हात धरत त्याला ही मध्ये ओढलं.
तोच एकच गर्दी होऊ लागली.डाॅक्टरांनी साऱ्यांना बाहेर काढत उपचार सुरू केले. चंद्या, सुरेशनं पमनचं छाताडं धरत बाहेर ओढत 'पम्या आता तू नाही वाचत ' म्हणत मारणार तोच पमननं जवळच्या बाकड्याची खालची फळीच उखळत हातात घेतली. प्रतापरावानं पमनला पाठीशी घालत " सोम्या पोरांना आवर नाही तर परिणाम वाईट होतील.प्रसंग कोणता आधी त्याला तोंड देऊ ! मग नंतर काय तो राडा करायचा तो आर्डीत करू!"
" आमच्या शिल्पाचं काय बरं वाईट झालं तर पम्या तुझा गेमच समज!" चंद्या सुरेश ओरडले.
पमन मामाच्या पाठीमागून धावत धमकी देणाऱ्या चंद्या सुरेशवर लाथ घालणार तोच प्रतापराव इतरांनी त्याला आवरलं.
" साले जे काय केलं ते तिनंच केलं नी वरून मला...." पमन ओरडू लागला. तोच पोलीस आले व दोन्हीकडं आवरा आवर झाली.
सायंकाळ पर्यंत सारे आवारात बसून होते.ठिणगी केव्हा उडेल काहीच नेम नव्हता. सायंकाळी डाॅक्टरांनी
" सदा कोण?" विचारत सदा आबास व पेशंटच्या वडिलांना मध्ये बोलवलं.
सदा आबा थरथरत मध्ये गेले.
शिल्पा शांत पहुडली होती.तिच्या शरीरात भिणलेलं सारं विष काढलं गेलं होतं. डाॅक्टरांनी आधी सदा आबास मध्ये सोडलं.
" शिल्पा......का ? का केलंस?"
" आबा....काय ठरवलं? आता पोलीस येत आहेत जबाब नोंदवण्या साठी?" शिल्पा तुटक तुटक विचारू लागली.
" शिल्पा तुला जबाब काय द्यायचे ते तू दे! पण माझी खात्री झालीय माझ्या पम्यावर तुझ्याशिवाय जास्त कुणीच मरू शकणार नाही!" आबा डोळे पुसत म्हणाले.
शिल्पानं हातात सलाईनची निडल असुनही हात पुढं केला. सदा आबांनी थरथरत हात पुढं केला. शिल्पानं क्षीण हसत तोंड फिरवत डोळे मिचकावले. आबा बाहेर निघाले.
मग मंगा पोवारांना आत सोडलं.
" पप्पा, का? कुणी डब्यातलं सरबत बदललंल? मी सदा नकाशेकडं जातेय हे तर फक्त तुम्हालाच माहीत होतं ना?" मंगा पोवार भिंतीकडं पाहत शून्यात पाहू लागले.
" पप्पा बोला! काय जबाब देऊ पोलीसांना?" शिल्पा विचारू लागली.पण मंगा पोवाराकडं आपल्या पोरीला द्यायला उत्तरच नव्हतं.
" पप्पा, काका, आत्याचा नाद सोडा मग!" शिल्पा बोलली नी मंगा पोवारांनी आसवं पुसत तिला भरोसा भरला.
पोलीस चाळीसगावलाही आले होते पण शिल्पा त्या वेळेस जबाब देण्याच्या स्थितीत नाही पाहताच उपचारानंतर डाॅक्टरांनी सांगताच येत होते.
शिल्पानं कुणालाच दोष न देता कापसात फवारणी चालू असतांना काम करतांना रिअॅक्शन आल्याचं जबाब नोंदवले. नंतर सारं प्रकरण प्रतापरावांनी मिटवलं.
रात्री शिल्पाजवळ तिची आई थांबली. शिल्पानं पमनला थांबायला लावलं. पण प्रतापरावांनी पमन थांबला तरी धोखा व नाही थांबला तरी धोखा हे ओळखत पमन सोबत केसा व भावकीतले दोन तीन जणांना थांबवलं.
" पम्या, रामजी पोवारातल्या वाड्यातली पहिली मुलगी नाही नांदली आपल्या खडकीत! पण ही दुसरी मुलगी नांदली पाहिजेच पोरा! मी तुझा आबा सांगतोय हे पक्क लक्षात ठेव! मागचं मी सांगितलेलं सारं विसर नी शिल्पास जप पोरा! शिल्पा हीच......" सदा आबा साऱ्यांसमोर बोलले नी कदम, सोमा पोवार, चंदू, सुरेश वाघागत जागच्या जागी चरफडू लागले.
सारे परतले.
पमननं 'शिल्पीनं आबांना विरघवळच' हे ओळखलं.
रात्री शिल्पाची आई तिच्या जवळ बसलेली. पमन खोलीतच दूर भिंतीला टेकून स्टुलावर बसला.
" पम्या ,अजुनही दूर का पळतोस रे! साल्या रणछोड! मी मरणाच्या दारातून परत आली ना रे! "
पमन उठला व जवळ येत " शांत झोप शिल्पे!" म्हणत तिला समजावू लागला.
" पम्या तुझा काका रोगारच्या दोन चार घोटातच विरघळला रे!"
" शिल्पे, आज तू साऱ्यांनाच कसल्या पेचात टाकत होतीस हे कळतंय का तुला!" आतून कळवळत तो तरारल्या डोळ्यांनी विचारू लागला.
" पम्या त्या शिवाय या अंजनाबाईच्या भाचीवर तुम्ही काका - लेकांनी विश्वासच ठेवला नसता!" ती तोंड फिरवत रडू लागली नी पमननं तिचा हात हातात घेतला.
शिल्पानं त्याला आपल्याकडं ओढलं नी दोन्ही ढसाढसा रडू लागले.
शिल्पाच्या आईला पक्की खात्री झाली की आपल्या पोरीनं बंड करून खूप मोठा धोका पत्करलाय. तिनं दोघांना रात्रभर समजावलं.
चारेक दिवसांनी शिल्पाला घरी आणलं.
मळ्यात शिल्पाची कार प्रतापरावाच्या विहीरीवर जाताच वामन भटाच्या मळ्यात असलेल्या सुरेशनं पाहिलं होतं व त्याला शंका आली म्हणुन लिंबुच्या बागेतून तो मशीन घराच्या मागच्या बाजूस येऊन सदा नकाशे व शिल्पामधील सारा संवाद ऐकला होता. अंजना आत्या व वडिलांनी शिल्पास सांगितलंय काय नी आता तर शिल्पाच गारद होत शत्रुपक्षास सामील होतेय हे ऐकल्यावर तो जागीच चाट झाला. तोच शिल्पानं औषध घेतलं. तो मदतीला धावणार तितक्यात पमन व प्रतापराव येताच तो भिंतीमागंच स्तब्ध उभा राहिला. ते निघताच सदा आबा घराकडं पळाले नी त्यानं शिल्पाच्या कारला चावी दिसताच तीच कार काढत घर गाठलं व सारा प्रकार वडिल व काकास सांगितला. मंगा पोवार बिनधास्त होते.कारण शिल्पानं काल त्यांना सांगितल्यावर त्यांनी
' औषधाच्या जागी पाणी वा सरबत घे पोरी! नाहक जिवाशी खेळ नको करूस' सांगितलं होतं. त्यामुळे शिल्पानं विष पिल्याचं नाटक केलं असंच त्यांना वाटत होतं. पण तरी त्यानं मौन पाळलं. सोमा पोवार नंतर आलेले कदम शिल्पावर दात ओठ खात " शिल्पा आपल्या विरोधात जातेय तर मरू द्या !" म्हणत संतापू लागले. पण प्रतापरावांचा चाळीसगावावरून फोन आला नी मग ते सारे निघाले. शिल्पा वाचणार हे पाहताच ते पमनवर उलटू लागले. पण खरा धक्का मंगा पोवारास पोरीनं मध्ये 'डब्यातलं सरबत कुणी बदलवलं?' विचारलं तेव्हा लागला.
शिल्पा घरी येणार हे कळताच सोमा पोवार, कदम व नंतर आलेली अंजनाबाईनं सुरेशनं ऐकलेलं मनात ठेवत आपणास कळलं हे शिल्पास न कळू देत तिच्याशी आपल्या आधीच्या योजनेप्रमाणेच तूर्तास वागण्याचं ठरवलं. आता ही बाब त्यांनी मंगा पोवारास ही कळू दिली नाही.
प्रशांतचं बी.एस.एम.एस. चं शेवटचं वर्ष होतं हे. त्यानं मागे कोलंबीया विद्यापिठात प्रबंध सादर केला होता. तो सिलेक्ट होत त्याला परिषदेसाठी बोलावलं होतं. त्याच्या या शोधपर प्रबंधानं चांगलीच खडबड उडवली. तेथूनच त्याला दक्षिण अमेरिकेत संशोधनासाठी विचारणा झाल्यावर कायदेशीर बाबी पूर्ण करत तो संशोधनासाठी उरुग्वे येथे थांबला होता.त्याला ही शिल्पाची बाब कळताच त्यानं दोन महिन्यात परतणार असल्याचं कळवलं. पण त्या आधी त्यानं व कदम सरांनी पाच लोकासाठी व्हिसा व पासपोर्ट ची गुप्ततेत तयारी सुरू केली.
पमन व शिल्पास आबांनी परवानगी दिल्याची आणखी एका जणास जोराची कळ लागली होती!.....कुणाला?...पमीला!
पद्मास साऱ्या आशा सुटत चालल्याचं समजताच उभा दाह दाह होत वणवा पेटला. तिनं मायाकडं येणंच टाळायला सुरूवात केली. मारोती मामाकडनं वडिलास निरोप गेला. वडिलांनी आठच दिवसात बोधवडच्या मुलास गडचिरोलीतून बोलवत आर्डी गाठली. तत्पूर्वी
माया पमीस भेटायला गेली.
" पमे!...."
".........!"
" पमे, अजुन धीर सोडू नको! शिल्पानं गरळ घोटलं नी आबा घाबरले गं! प्रकरण शांत झालं की आबा शिल्पाला नकारच देतील!"
" मायडे, प्रकरण शांत होईल गं! पण मनात आग पेटली की सारं क्षणात खाक होत गं!" पमी मारोती मामाच्या मोडू पाहत असलेल्या आढ्याकडं शून्य नजरेनं पाहत बोलत होती.
" पमे, पमनवर विश्वास ठेव!"
" मायडे, आता माझा माझ्या प्रारब्धावरच विश्वास नाही राहिला!"
माया रडू लागली.तसं पमी मायास बिलगली व दोघी रडू लागल्या.
" मायडे, आपण शिल्पीला नाही ओळखू शकलो, की तिच्या इतकं प्रेम नाही करू शकलो हेच मला कळत नाही मला!"
" पमी...!"
" माया उद्या मुलगा येतोय पहायला!"
" पमी नकार दे त्याला! "
" बघू!" इतकंच तुटक बोलत पमी शांत बसली.
दुसऱ्या दिवशी अनंत जगताप आला. वन खात्यात चांगली नोकरी असलेला. दिसायला चांगला अनंत आला. पद्माला पाहताच त्यानं पसंत केली.
वडिलांनी घरात येत पद्मास विचारलं.
पमीचा आता नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. खोपडी उठली की लग्न लगेच करण्याचं ठरवत मुलगा परतला.
लग्न मारोती मामा आर्डीतच सांगत होते पण वडिलांनी न ऐकता गावाला-सनावदला करण्याचं ठरवलं. मात्र पैसा? हातात काहीच नव्हतं. सारी उठाठेव मारोती मामालाच करावी लागणार होती. मारोती मामाचं या वर्षी नियोजनच नव्हतं. पण मेव्हण्याची तब्येत व नंतर पमीचा होकार म्हणून अचानक सारं ठरल्यावर मग मामांनी बाकी कर्ज उचलायचं ठरवत तयारी सुरू केली.
मायानं आई-वडिलांना पमीबाबत सांगताच ताराबाई तीळ तीळ तुटल्या.
" अहो, पमीकडं पाहिल्यावर मला कायम असंच वाटायचं हो! पण नियतीनं सारे फासेच पालटवले."
प्रतापरावांना ही पद्माबाबत मायासारखी लेकच वाटे. पद्मा व तिची मामी, मारोती कायम मळ्यात राबतात म्हणून त्यांनी मारोतीस भेटत पद्माच्या लग्नासाठी भरपूर मदत केली. लग्नातील सारा जेवणाचा खर्च त्यांनी उचलायचं व आणखी ही लागले तर विना संकोच सांगण्याचं मारोतीस सांगितलं.
सुबोध राणे यांचेकडून निरोप येताच पमन व शिल्पा मुंबईस परतले.
शिल्पास वाटलं घरचे विरोध करतील.पण कुणीच विरोध न करता लवकर परतण्याबाबत सांगत परवानगी दिली.
पमन मुंबई ला निघणार त्या आधी मायानं पद्माला घरी बोलवलं. पद्मास जावंसं वाटेना. पण माया स्वत: आली व तिला घेऊन गेली.
" पमे! काय झालंय गं तुझ्या नोकरीचं?" पमी ला मायासोबत पाहताच पमननं विचारलं.
" लेखी परीक्षा झालीय! कळेल आता तोंडीचा काॅल येतो की नाही!" पद्मा नजर टाळत बोलत होती.
" पमे नोकरी लागली की आम्हास ओळखशील का नाही!" तो हसत म्हणाला नी पमीस आतून कालवल्यासारखं झालं.
ती मायाचा हात दाबत हुंदका दाबण्याचा प्रयत्न करू लागली.
" पमन! पमीचं लग्न ठरलंय!" माया तरळू पाहणारी आसवे रोखत बोलली
पमन जागेवरून उठला.
" पमी तू तर शिल्पेपेक्षा वस्ताद निघालीस गं! कळू ही दिलं नाही! लग्नाला तरी बोलवशील की नाही?"
पमीचं तोंड मायाकडं होतं.शिल्पीचं नाव ऐकताच उरातील हुंदका डोळ्यातून वाहू लागला.
" पम्या, प्रेम हे माणसानं असंच करावं की ज्यावर करतोय त्याला ही समजू नये!" पमी बोलली नी मायाच्या काळजावर तप्त कढत तेल पडू लागलं.
" पमन, एकादशी होताच तिच्या गावाला लग्न ठरलंय.चित्रीकरण असलं तरी ये!" माया त्याला जरबेनं म्हणाली.
" माया, शिल्पीनं आबास मनवलं नसतं ना तर या पमीशीच केलं असतं मी लग्न! हिचा नेम खूप अचूक आहे गं! हिनं मारलेल्या पेरूनं कितीदा माझं कपाळ फुटलंय!" तो हसू लागला.
पण पद्मा तिकडं आवाज न करता आक्रदू लागली. मायाला तिचा आक्रोश सहन न झाल्यानं ती पम्यावर खवळली
" पम्या ,हिम्मत असेल तर स्विकार पमीला!" माया तळतळत बोलली नी पमीनं तिला घट्ट धरत आवरलं.
पमननं मायाचा घोगरा आवाज ऐकला.
" माया , काय झालं गं?"
" काही नाही रे! आता ही पमी चालली जाणार म्हणून ..... भरून आलं!"
" माया हे मात्र खरं गं! पमी जाणार हे ऐकुणच काळीज कुणी तरी कुरतडल्यागत होतंय गं!कायम आठवण येणार पमीची! कच्चे पेरू मारणारी पमी!खो खो मैदानात बिनधास्त बिलगणारी पमी! गणपतीत गुलाल उधळत शिल्पास हूल देणारी पमी!"
" पम्या! बस्स! " पद्मानं तोंड फिरवत आसवे आवरत्या डोळ्यानं पाहिलं नी पमननं तिच्या खांद्यांना हातानं थोपटत तिच्या डोळ्यात पाहिलं.
पमीला हा निमीष मात्र क्षण अनंत युगे असाच थबकावा वाटत ती त्याला शेवटचंच नजरेनं पिऊ पाहत होती.
" पमे तू चालली, ही माया ही जाईल मग! मग मी कसं राहू गं!"
" शिल्पा आहे नं!" पमी बोलली नी त्याला अचानक तोच धुंद धुंद करणारा वास दरवळत असल्याचं जाणवू लागलं.
" पमे, लिंबोणीचा वास कुठून दरवळतोय बघ! किती मस्त धुंदाळ भारी!" आता पमीला थांबणं असह्य झालं. तिला एकवेळ तीव्रपणे वाटलं.द्यावं सारं झुगारून,नी याला गच्च गच्च आवळत खोलावं सारं आतल्या खोल खोल गर्तेत दडवू पाहत असलेलं! पण क्षणात पमीनं सारा मोह आवरला व ती तडक निघाली.....
आता न फिरणे माघारी!
पमनला कारवर सोबत घेत शिल्पा निघाली. मायाला पमन शेजारी शिल्पा दिसताच पमी आठवली व ती मनात संतापली.
मुंबईला काही गाण्याचं रेकाॅर्डींग होऊ लागलं. पण रस्तोगीला गाण्यात थीम साॅंगवर वरचढ ठरणारा जो कसीला, कातर आवाज हवा होता तो जाणवेना. शिल्पानं त्यांनी सुचवलेल्या धूनवर आपलंच एक गाणं ऐकवलं. रस्तोगीनं तेच गाणं दोघांना गायला लावलं. पमनच्या आवाजातील शिल्पानं सुचवलेलं गाणं ऐकताच रस्तोगीला जे हवं होतं ते सापडलं. त्यानं शिल्पास कथेला अनुसरून चार पाच अशी काही गाणी तयार करायला सांगितली. मूळ गितकार आपलं गाणं बाजूला होताच फणकाऱ्यात निघून गेला. रस्तोगीनं त्याच्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही.
रस्तोगीनं चार पाच दिवस शिल्पा व पमनला मोकळीक देत चार पाच गाणी सांगितली व त्यांना गोव्यास पाठवलं. पुढचं रेकाॅर्डींग चार पाच दिवसांनी असल्यानं शिल्पा व पमन गोव्याकडं निघाले. पाऊस ओसरून दिवाळीनंतर थंडी परतत होती. गारठा, निळा पसरलेला समुद्र, निळी निळाई आभाळाची यानं सारं काही रम्य, भव्य व दिव्य वाटत होतं. कार वळणा वळणानं लाल मातीतून नारळा- पोफळीच्या बागातून वळसे घेत मांडवी नदी जवळ करू पाहत होती.
" पमन?"
" काय?"
" तुझे आबा इतके लवकर मानलेच नसते!"
" काय बरळलीस तू नी आबा एकदम बदलले,हे मला ही कोडंच आहे?"
" पम्या, खरं तर तू संगीत ग्रॅज्युएशनला आला नी त्याच वेळी आत्यानं तुला जवळ करत जाळ्यात ओढायला लावलं होतं! शिल्पा याला इतका जीव लाव की वेड लागलं पाहिजे. आत्यानं हे सांगितलं नी मी तुझ्या मागे लागले. पण त्यात मीच फसत गेली व परत फिरताच आलं नाही मला!"
आत्या तुला वेडा करत उध्वस्त करणार होती. मी हेच आबांना सांगितलं. मग आबांनी तरी मरायचं तर मर सांगितलं. मग काय प्याली मी घटाघट पप्पांनी भरलेलं सरबत फेकून माझ्याच हातांनी भरलेलं डब्यातलं रोगार! आबाची बत्ती गुल!" नी ती हसायला लागली.
" मूर्ख ,थोडाही उशीर झाला असता तर? वा मदतीला कुणी आलं नसतं तर?"
" मी मरण्यासाठीच तर निघाले होते!"
गाडी गोव्यात हाॅटेलच्या कडेला उभी राहिली. थंड रात्री शिकारा चांदण्या रात्रीत समुद्रात शिरला नी शिकाऱ्यात शिल्पा पमनच्या कुशीत.... धुंद गोवा! गोव्याचा सागर! धुंद सागरातील शिकारा! नी शिकाऱ्यातील शील अल्पवणारी शिल्पा!
तीन दिवसानंतर पमन व शिल्पा परतले व पुढच्या दोन दिवसात शिल्पानं लिहीलेली पाच गाणी रेकाॅर्ड केली. रस्तोगी कसलेला संगितकार होता. जोडी एका समेवर येत एकसूर झाल्याशिवाय गाणं टिपेला पोहोचूच शकत नाही व तो पावेतो गाण्यात काळीच कातरता वा मिठास जो हवा तो येत नाही म्हणून तर त्यानं गोव्यास त्यांना फिरायला पाठवलं होतं व जुन्या गीतकारास जातोय तर जाऊ दिलं होतं.
रेकाॅर्डिंग होताच त्यांनी पुण्यात काॅलेजला PG चं उर्वरीत काम केलं व आर्डीस परतले.आबाच्या सांगण्यावरून प्रतापराव स्वत: रामजी बाबाच्या वाड्यात किती तरी वर्षांनी पायरी चढले. पायरी चढतांना जुन्या आठवणींनी त्यांचं तोंड कडवट झालं.पण तरी कडवटपणा विसरत त्यांनी सोमा व मंगा पोवाराकडं शिल्पा व पवनच्या वाङनिश्चयाचा प्रस्ताव ठेवला.
" अमेरिकेत विद्यापिठाकडुन संशोधन कार्याबद्दल प्रशांतचा मोठा सत्कार असल्यानं शिल्पासहीत आम्ही एका महिन्यासाठी जातोय. तेथून परतलो की साखरपुडा व लग्न लगेच उरकवू!" सांगत सोमा पोवार व कदमांनी प्रतापरावास परत पाठवलं.
प्रशांत आला. त्यानं येताच शिल्पास हाॅलीवूडमध्ये एका वेब सिरीजसाठी गाण्याची तुला गोल्डन अपार्च्युनिटी मिळतेय म्हणून अमेरिकेसाठी राजी केलं. त्याचा सत्कार व वेब सिरीज यासाठी आधी ती पमनला ही सोबत सांगत तयार झाली. पण आता पमनचा व्हिसा व पासपोर्ट लगेच शक्य नसल्याचं सांगत नंतर त्याला ही बोलवण्याचं कबुल करत प्रशांतनं शिल्पास मनवलं.
सोमा पोवार, सुमनबाई, अंजाबाई,शिल्पा, व प्रशांत पाच जण निघाले. निघण्यापूर्वी तिनं पमनची भेट घेतली.
" पमन ,हाॅलीवुड वेब सिरीजला संधी मिळतेय! येशील ना ?"
" शिल्पे, तू लवकर परत ये! मला गाण्यापेक्षा आता तू हवी आहेस!"
" अरे ,एका महिन्याचीच तर बात आहे! यू जाते नं यू येते! मध्येच प्रशांतनं जर पासपोर्ट बनवला तर पंधरा दिवसात तू ही येशीलच!"
पण पमनला तिकडे जाण्यात स्वारस्य नव्हतंच. फक्त शिल्पानं लवकर यावं हेच महत्वाचं.
आर्डीतून निघतांना ती प्रतापरावांच्या घरी आली.आबा व तारा काकुंचा पाया पडली.
" माया, पम्यावर लक्ष ठेव गं! मी येईपर्यंत याला एकटं सोडू नको! त्या पमीचा भरवसा नाही! तिच्यामागं पळेल हा!" बोलत हसली. पण पमीचं नाव निघताच मायाच्या अंतरात कळा निघाल्या. ती बळे बळे हसली.शिल्पानं साऱ्यांसमोर पम्याचे हात हातात घेत त्याच्या डोळ्यात पाहत कपाळावर आपले ओठ टेकवले.तिच्या डोळ्यात आसवे तरळली.
शिल्पा गेली.
.
.
पमनची शिल्पा कोलंबीया विद्यापिठातून उरुग्वेच्या अटलांटीक महासागरातील निर्जन बेटावर.....
शिल्पा गेली नी पमीच्या लग्नासाठी माया, पमन, प्रतापराव, तारामाय, सदाआबा, केसा, लिना सारे पमीच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगतच्या सनावदला निघाले.
पमीपासून पमन दूर जात होता...तर पमनपासून शिल्पा.....कोण कोणाजवळ येत होतं नी कोण कोणापासून दूर जात होतं सारं सारं अकल्पितासारखं की पूर्वसंचितासारखं...काहीच कळत नव्हतं.
परमेश्वरा! मिलनोन्मुख दोन जिवांना सुखानं का येऊ देत नाहीस तू! निर्मीका तुझ्या मनात कोणता खेळ चालतोस?
?
?
?
क्रमशः
✒ वा....पा....