झटेतलं चांदणं 🔖 भाग : -- दहावा
पमन पमी नं पाट लावला ही बातमी पाहिली नी शिल्पा शुदध हरपली होती. तिची भारतात परतण्याची उरली सुरली आसच मेली. कुणासाठी परतायचं? कशासाठी परतायचं. जिवनात हेतू नसला की रोजचं जीणंच मरण यातना देतं. तिला आता प्रशांतने दररोज प्रयोग करत संपवावं असंच वाटू लागलं. तर प्रशांतला हिला पमननं पद्मासोबत लग्न केलं हे कळल्यावर तरी ही तयार होईल ही आशा होती.म्हणून तो आता तिच्यावर प्रयोग न करता तिला पूर्णपणे पूर्वपदावर आणू पाहत होता.
" शिल्पा, वॅक्सीनच्या अॅनिमल ट्रायल संपल्या, आता फर्स्ट ह्युमन ट्रायल सुरू होईल. या तीन ट्रायल सक्सेस झाल्या की साऱ्या जगात नाव होईल. फक्त त्यासाठी तू सोबत असलीस तर त्या यशाला किंमत राहिल. बघ विचार कर! ज्यासाठी तू थांबली होतीस तो थांबला नाही तुझ्यासाठी. अजुन ही मी तुला स्विकारायला तयार आहे!"
"......"
" बघ आता ह्युमन ट्रायलसाठी हेल्थी व्हालंटीअरचा शोध सुरू आहे. शंभर व्हालंटिअर झाले की लगेच ट्रायल सुरू होतील.डाॅ. आहुजा हे भारतीय शास्त्रज्ञ च लीडर आहेत!"
" मी तयार आहे व्हालंटिअर व्हायला! बघ मला जर होता येत असेल तर?"
प्रशांत जागेवरुन उडालाच.त्याचे सर्वांग कंप पावू लागले.
" का? का व्हावसं वाटतंय तुला व्हालंटिअर? त्यात प्राणही जाऊ शकतो हे माहीत आहे का तुला?" त्यानं नजर व श्वास तिच्यावर रोखत विचारलं.
" तूच सांगतोय ना, या व्हायरसनं साऱ्या जगाला हैराण केलंय. मग मानवाच्या कल्याणासाठी कुणीतरी पुढं यायलाच हवं!"
" पण यात प्राणावरही बेतू शकतं हे माहीत आहे का तुला?"
" जगातला उभरता महान शास्त्रज्ञ तू! तू असल्यावर यश येणारच.म्हणून प्राणाची भिती का?"
" एवढा विश्वास ? का? एकदम का टाकावासा वाटतो?" प्रशांत खोलात उतरू लागला.
" मी तयार आहे एवढंच.बाकी बघ तुला जे ठरवायचं ते? पण एक यात यश मिळालं तर मला काय देशील?"
" यश तर मिळेलच.तो विषयच नाही! तुला काय हवं ते सांग?"
" भारतात परत न्यावं तू!" ती त्याच्याकडं पाहत श्वास रोखत उत्तराची अपेक्षा करू लागली.
" का ? भारतात का परतायचं?"
" हा प्रश्न तुझ्यासारख्या शास्त्रज्ञास शोभत नाही. माणसाला वतनाची ओढ असते. आणि मला एक वेळ त्या पमनला दाखवायचंय की मी थांबली तसं तू का थांबला नाही?"
" मग तर अवश्य परत नेईल तुला भारतात! कारण लस यशस्वी झाली रे झाली मला ही भारतातच परतायचंय"
" मग तर मी व्हालंटिअर व्हायला तयार असल्याचं पेपरवर्क तयार कर.
पण प्रशांतला घाम फुटला. कारण आपण तर फोटो इडिटिंग केलेत. ही परतल्यावर पमन बाबत समजलं तर?" मग त्यानं वेगळीच योजना आखली. लस तयार करण्याच्या प्रयत्नासोबत त्याचं एक वेगळंच संशोधन चालू होतं. त्यासाठीच शिल्पा...... त्यानं मनात जुळवाजुळव केली. त्यात अयशस्वी झालोच तर ही अशीही लग्नास तयार नाहीच मग करावी इच्छा पूर्ण. आणि यश आलं तर पुढे आणखी काही तरी करताच येईल.त्यानं आहुझाची भेट घेतली .
" मि. प्रशांत कदम , आपण आपलं ज्ञान देतोय हे नसे थोडे! कृपा करून डाव खेळत रिस्क नका घेऊ. दुसरे व्हालंटिअर मिळत आहेत."
" सरजी ,तशी आमची दोघांची इच्छा आहे. व आपणास माझ्यावर भरवसा आहे ना!"
" कदम तुमच्यासारख्या शास्त्रज्ञावर तर भरवसा आहेच. पण तुमच्या दोघांच्या या त्यागानं अभिमान ही वाटतोय." आहुजाला कनव्हिंस करत प्रशांतनं साऱ्या परमिशन्स मिळवल्या.
पण शिल्पा व्हालंटिअर का होतेय हे त्याला अजुनही कळेनाच.
" शिल्पा, वॅक्सीनच्या अॅनिमल ट्रायल संपल्या, आता फर्स्ट ह्युमन ट्रायल सुरू होईल. या तीन ट्रायल सक्सेस झाल्या की साऱ्या जगात नाव होईल. फक्त त्यासाठी तू सोबत असलीस तर त्या यशाला किंमत राहिल. बघ विचार कर! ज्यासाठी तू थांबली होतीस तो थांबला नाही तुझ्यासाठी. अजुन ही मी तुला स्विकारायला तयार आहे!"
"......"
" बघ आता ह्युमन ट्रायलसाठी हेल्थी व्हालंटीअरचा शोध सुरू आहे. शंभर व्हालंटिअर झाले की लगेच ट्रायल सुरू होतील.डाॅ. आहुजा हे भारतीय शास्त्रज्ञ च लीडर आहेत!"
" मी तयार आहे व्हालंटिअर व्हायला! बघ मला जर होता येत असेल तर?"
प्रशांत जागेवरुन उडालाच.त्याचे सर्वांग कंप पावू लागले.
" का? का व्हावसं वाटतंय तुला व्हालंटिअर? त्यात प्राणही जाऊ शकतो हे माहीत आहे का तुला?" त्यानं नजर व श्वास तिच्यावर रोखत विचारलं.
" तूच सांगतोय ना, या व्हायरसनं साऱ्या जगाला हैराण केलंय. मग मानवाच्या कल्याणासाठी कुणीतरी पुढं यायलाच हवं!"
" पण यात प्राणावरही बेतू शकतं हे माहीत आहे का तुला?"
" जगातला उभरता महान शास्त्रज्ञ तू! तू असल्यावर यश येणारच.म्हणून प्राणाची भिती का?"
" एवढा विश्वास ? का? एकदम का टाकावासा वाटतो?" प्रशांत खोलात उतरू लागला.
" मी तयार आहे एवढंच.बाकी बघ तुला जे ठरवायचं ते? पण एक यात यश मिळालं तर मला काय देशील?"
" यश तर मिळेलच.तो विषयच नाही! तुला काय हवं ते सांग?"
" भारतात परत न्यावं तू!" ती त्याच्याकडं पाहत श्वास रोखत उत्तराची अपेक्षा करू लागली.
" का ? भारतात का परतायचं?"
" हा प्रश्न तुझ्यासारख्या शास्त्रज्ञास शोभत नाही. माणसाला वतनाची ओढ असते. आणि मला एक वेळ त्या पमनला दाखवायचंय की मी थांबली तसं तू का थांबला नाही?"
" मग तर अवश्य परत नेईल तुला भारतात! कारण लस यशस्वी झाली रे झाली मला ही भारतातच परतायचंय"
" मग तर मी व्हालंटिअर व्हायला तयार असल्याचं पेपरवर्क तयार कर.
पण प्रशांतला घाम फुटला. कारण आपण तर फोटो इडिटिंग केलेत. ही परतल्यावर पमन बाबत समजलं तर?" मग त्यानं वेगळीच योजना आखली. लस तयार करण्याच्या प्रयत्नासोबत त्याचं एक वेगळंच संशोधन चालू होतं. त्यासाठीच शिल्पा...... त्यानं मनात जुळवाजुळव केली. त्यात अयशस्वी झालोच तर ही अशीही लग्नास तयार नाहीच मग करावी इच्छा पूर्ण. आणि यश आलं तर पुढे आणखी काही तरी करताच येईल.त्यानं आहुझाची भेट घेतली .
" मि. प्रशांत कदम , आपण आपलं ज्ञान देतोय हे नसे थोडे! कृपा करून डाव खेळत रिस्क नका घेऊ. दुसरे व्हालंटिअर मिळत आहेत."
" सरजी ,तशी आमची दोघांची इच्छा आहे. व आपणास माझ्यावर भरवसा आहे ना!"
" कदम तुमच्यासारख्या शास्त्रज्ञावर तर भरवसा आहेच. पण तुमच्या दोघांच्या या त्यागानं अभिमान ही वाटतोय." आहुजाला कनव्हिंस करत प्रशांतनं साऱ्या परमिशन्स मिळवल्या.
पण शिल्पा व्हालंटिअर का होतेय हे त्याला अजुनही कळेनाच.
अवार्डचा कार्यक्रम होताच पद्मा परतणार होती.परतण्या आधी मनिष मायानं पमन व पद्मास रात्री चौपाटीवर फिरावयास नेलं. थंडी संपत मुबंईची उष्णता जाणवत होती. सागरावरील वारे अंगास झोंबत होते. सागर किनाऱ्यावरील वाळूत चालता चालता माया मुद्दाम हळू चालत होती. पमन व मनिष बरेच पुढे निघाली.
माया पद्मास समजावू लागली.
" पद्मा या सागराकडं बघ! याच्या शांत रूपात भयानक वादळ दडलं असतं तर कधी रौद्र रुपातही खोल डोहात शांतता नांदत असते. म्हणजे वादळ व शांत ही दोन्ही रुपं अंगाखाद्यावर खेळवतो हा. पाण्याचा एक थेंब ही मानव पिऊ शकत नाही.पण तरी अप्रत्यक्षपणे साऱ्या सृष्टीस हाच पाणी पुरवतो. जिवन ही तसंच असतं गं! केव्हा काय करू नये व केव्हा काय करावं हे परिस्थीतीनुरुप माणसानं ठरवावं!"
" मायडे! कळतंय गं! पण ज्याला कळायला हवं त्याला ही हे कळणं गरजेचं ना?"
" पमे! तुझ्या बरकतीचं कुणी हिसकवत असेल तर ते परत तुच मिळवलं पाहिजे. कोण परत करत नाही म्हटल्यावर थांबू नकोस! प्रसंगी हिसकावण्याची ताकद ठेवत पुढाकार घे!"
" माया........! कुणाची इच्छा नसतांना...का म्हणुन आपण लिप्सा ठेवावी!"
" खोल खोल गाढ गाडलेली लिप्सा जागृत करण्यासाठी....!" माया पमीत आत्मविश्वास भरू लागली.
पद्मा थरथरली. त़ोच मनिष व पमन थांबले. माया मनिषला बोलवत पुढे निघाली. पद्मा व पमन किनाऱ्यावर थांबले.
" पमे चल! मायडे पुढे गेली."
" पमन...! बस... मायडे मुद्दाम पुढे गेली!"
"..........!"
" पमन ?"
" काय?"
" किती बरं झालं असतं सागरात शिरण्यासारखंच भूतकाळात शिरत जगता आलं असतं तर?"
" माणसं, रेंगाळत राहिली असती,प्रगती ठप्प झाली असती!"
" माणसाचं जाऊ दे ,तू काय केलं असतं?"
" मी शिल्पाला शोधलं असतं!"पद्माच्या काळजात दुखरी कळ उठली.
" आणखी?"
" बस तितक्यात खोल शिरत ठप्प होत ना भूत ना भविष्य!"
" पम्या पुढंही उज्जवल भूतकाळ आहेना तुझा खोल शिर ना?" पमी संतापात कळवळू लागली नी त्याला बिलगली.
" या मायडीला नाही कळत रे! मी मना करत होते तिला. मला नाही जमणार कुणाची लिप्सा जागृत करायला. पण ती ऐकतच नाही. नी मग माझ्याकडून असलं काही तरी विपरीत घडतं!" पमी हमसून हमसून रडली.
" पमे! तुझ्यासाठीच तर सारं सारं होतं गं. पण त्याच नादात गुरफटलो मी. आता नाही निघू शकत बाहेर! कोण काही ही सांगो पण ती वाट पाहत ठप्प बसली असेल माझ्यासाठी.म्हणून मला ही पुढे असलेल्या उज्जवल भुतकाळात नाही शिरता येत खोल तिला सोडून! पमे! मायडे समंजस वेडी आहे. पण तू तरी मला तिथंच थांबू दे!" तो मूक आक्रोस करत पमीला मिठीतून दूर सारू लागला.
दुसऱ्या दिवशी पमन रस्तोगीस भेटला.
" सरजी, तुम्ही सांगाल तर तुमच्या चित्रपटात आयुष्यभर गात राहिल. काही नको मला. पण फक्त एकच... एकच काम करा! शिल्पा पोवारास शोधायला मदत करा. हात जोडतो!"
" रस्तोगीस शांत सागरातील वादळ दिसत होतं की खवळलेल्या सागरातील जीवघेणी शांतता ते कळेना.
त्यांनी त्याला सारं सारं विचारलं. कोलंबीया, प्रशांत, अंजना,,, शास्त्रज्ञ हेच क्ल्यू...बाकी अथांग पसरलेला सागर. तरी रस्तोगीनं हात हातात घेत " पवन मी माझा शंभर टक्के प्रयत्न करतो!" दिलासा दिला.
पमन, पद्मा, तारामाय व मंजा मामी परतले.
भारतात काही दिवसानंतर लगेच लाॅकडाऊन जाहीर झालं. सारं आवागमन ठप्प.कोडं तसंच राहिलं मायाला ही यश मिळेना. पमीनंही आस सोडत भूतकाळाच्या ज्या ठप्प्यावर ती होती तेथून ती खोल जात होती पण उज्वल भविष्याकडं परतता येत नव्हतं.मग थांबली ती ही भूतकाळात. वाट पाहत.
कोलंबीयाहून आलेल्या आहुजाच्या नियंत्रणात अटलांटीक सागराच्या किनाऱ्यावर ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा सुरू झाला. सारे शास्त्रज्ञ सज्ज, पूर्ण यंत्रणा सज्ज. पहिल्या टप्प्यात व्हालंटिअर हे मुलं व वयस्कर घेतलेच नव्हते. पॅथोजेन्स इंजेक्टेड केल्यावर वा पाॅझिटिव्ह रूग्णास व्हॅक्सीन दिल्यावर त्याच्यात अॅन्टिबाॅडी स्ट्रक्चर किती प्रमाणात तयार होतं व काही इन्फेक्शन वा दुष्परिणाम होतात का याचं सुपरव्हीजन व निरीक्षणाची नोंद घेणं या टप्प्यावर महत्वाचं होतं.
प्रशांत नं आहुजा सरांना शिल्पास त्याच्याच सुपरव्हिजन राहु देण्याबाबत विचारल्यावर आहुजाला तेच योग्य वाटलं. तसं त्यावर त्यांची कमांड राहणार होतीच.
शिल्पास पॅथोजेन्स इंजेक्टेड करण्यात आले. पण प्रशांत अति महत्त्वाकांक्षा सिद्ध करण्यासाठी अनायासेच तिचा वापर करू पाहत होता.बाकी शास्त्रज्ञ आलेल्या व्हायरसवर लस शोधू पाहत होते तर हा, अनेक व्हायरल डिसीज एकाच लसीत क्युअर करण्याची लस शोधू पाहत होता व आणखी ही भविष्यकालीन काही बाही जे त्यालाच माहीत होतं.
आहुजा साऱ्या यंत्रनेवर बारकाईनं लक्ष ठेवून होता. पण प्रशांतवर अधिकचा विश्वास वा त्याचीच पत्नी असल्यानं तो काळजी घ्यायला सक्षम आहे म्हणून आहुजा तिकडे काचकसुर करू लागला.
रस्तोगीचा मित्र डिसुझा हा ही मोठा संगीत दिग्दर्शक होता. त्याचा भाऊ कोलंबीयाला होता.जो आहुझाचा मित्र होता. त्यानं आहुजास पवन व शिल्पाची गाजलेली गाणी पाठवत ऐकावयास लावलेली होती. व तो उरुग्वेला येण्यापुर्वीच एका महिन्यापुर्वी या गायिकेबाबत तपास करण्याचं ही सांगितलं होतं. बाॅलीवुडची गाणी असल्यानं भारतीय आहुजास ती खूप आवडली होती व ती गाणी सतत ऐके. एकदम हळू धून सुरू असतांना शिल्पानं ओझरती ऐकली होती. पण आता तिची लॅब बरीच दूर व स्वतंत्र होती.
प्रशांतनं पॅथोजेन्स इंजेक्टेड केले व व तो परिणाम पाहू लागला नोंदी घेऊ लागला. पण त्याला अपेक्षीत परिणाम न मिळता वेगळेच परिणाम मिळू लागले. तो चक्रावला. परत त्यानं काही बदल केले. पण ही बाब आहुजास कळवलीच नाही. आहुजानं इतर व्हालंटिअरच्या परिणामावर लक्ष होतंच .अॅन्टी बाॅडीज तयार होत होते, प्रतिकार शक्ती तयार होत होती. व इतर वाईट परिणाम काहीच दिसत नव्हते. अपेक्षित परिणाम दिसत असल्याने आहुजा खूश होता. त्याच खुशीत त्यानं शिल्पा व प्रशांतला गृहीत धरलं.प्रशांत प्रयोगावर प्रयोग करत सावरण्यासाठी झटत होता. तर शिल्पा मनात हसत होती. सुटका, मुक्ती मिळतेय म्हणुन! या जन्मात पमीनं मैदान मारलं तर आता वाट पाहण्यात अर्थ नाही. पण खंत एकच राहिलीय एकदा तरी पम्या साल्यास झंझोडत विचारायचं राहिलंच. मी वाट पाहत असतांना तो का थांबू शकला नाही. मायाला ही दटवायचं होतं की पमनवर लक्ष ठेव सांगितल्यावर ही तिनं लक्ष ठेवलंच नव्हतं म्हणुन तर पमन व पमी एक झाले होते. हीच खंत राहिली. पण तरी मुक्ती मिळावी, सुटका मिळावी ही कामनाच तनामनात प्रबळ असल्यानं प्रशांत प्रयत्न करत होता पण अॅन्टीबाॅडी स्ट्रक्चर तयार होत तर नव्हतेच पण साईड इफेक्ट वाढतच होते.
आहुजानं मध्यंतरी त्याला विचारणा केल्यावर त्यानं सारे परिणाम इतर पेशंटप्रमाणे असल्याचंच ढापलं होतं. पण आहुजा अचानक गेला व शिल्पाचे सारे आॅब्जर्व्हेशन पाहिल्यावर तो चक्रावला, भांबावला. त्यानं प्रशांतला कॅबीनला बोलवत स्पष्टीकरण मांगितलं. त्याला झापत कायदेशीर कारवाहीची तंबी दिली.
प्रशांत अतिमहत्वाकांक्षेनं बरंच काही करून बसला होता पण तरी त्याला यशाची खात्री होती. त्यानं परत प्रयोग बदलवले पण याच ठिकाणी त्याला अपयश आलं.का आलं ते मात्र त्याला समजेना. कारण एवढी यंत्रणा व बाबीतून गेल्यावर बाकी शंकाना वावच नव्हता मग तरी का व्हावं असं?
आहुजानं सारा ताबा घेत परत विविध टेस्ट करत उपचार सुरू केले. पण खूपच उशीर झाला होता. तो पावेतो तर शिल्पानं प्रशांतबाबत आपलं करावयाचं काम ही केलं होतं. ज्याची आहुजाला तर सोडाच पण प्रशांतलाही कल्पना नव्हती. आहुजा सारे शर्थीचे प्रयत्न करत होता. पण शिल्पाचं शरीर साथच देत नव्हतं व दुष्परिणाम वाढतच होते. आहुजा कंटाळला. ९९व्हालंटिअरची पहिली ह्युमन टेस्ट यशस्वी होऊन ही आहुजास समाधान मिळत नव्हतं.
आहुजा च्या भाषेवरून शिल्पाला तो भारतीय असल्याचं कळताच तिनं तिचं वाजत असलेलं गाणं एकदा वाजवायला लावलं. त्यानं हळुच सिस्टम सुरू करत गाणं लावलं. शिल्पा खुशीनं पडल्या पडल्या रडू लागली. त्यानं " गाणं आवडलं का ?" विचारलं.
धाप लागत असतांनाही व हाता पायातली संवेदना जाऊ पाहत असतांना ती बोलण्याचा प्रयत्न करत होती.
" आपली कलाकृती कुणाला आवडणार नाही?".या एका प्रश्नानं आहुजाला झंझाळलं. त्याला डिसुजा आठवला. तिच्या नावाची जाणीव झाली. त्यानं गुप्तता पाळायला लावत डिसुजाला सारं सांगितलं. डिसुजानं भाऊ, रस्तोगी माया लिंक लावली. पण सारं आवागमन बंद. करणार काय. वेब कॅम व इतर डिव्हाइसनं संपर्क करत पमन, पद्मा, माया, रस्तोगी कनेक्ट झाले. पण शिल्पाला काय व कशानं झालं याबाबत सारी गोपनियता. फक्त शिल्पा आता.......शक्य नाही याची कल्पना देण्यात आली. रस्तोगीनं शिल्पास शोधूनच काढलं होतं. केवळ संगिताच्या माध्यमातून. त्यानं डिसुजाला,डिसुजानं भावाला व भावानं आहुजाला महिन्यांपूर्वी कल्पना दिली होती व शिल्पानं गाणं लावायला लावलं तेव्हा आहुजास ज्यावेळेस हे तिचच गाणं आहे व डिसुजानं सांगितलेलं शिल्पा नाव यावरून सारा उलगडा झाला.
शिल्पाला आहुजानं विचारलं
" शिल्पा या गाण्याच्या गायकाशी बोलायचं का? त्याला पहायचं का?
शिल्पाचा श्वास वाढला, हाता पायात हालचाल आली. मेंदूत झितझिण्या उठल्या. आहुजा सारं नोंदत होता. अल्प प्रतिसाद देणारं शरीर खूपच प्रतिसाद देतंय.
" पमनला तर श्वास बंद पडतोय व आपण गुदमरतोय की तीव्र वेगानं आपला रक्तप्रवाह सुरू होत नसा फाटतील असंच. पमीला ही बोलवलं होतंच सारे काॅन्फरन्सवर वेब कॅमसमोर आले. मुबंईहून रस्तोगी, माया, निकम तर आर्डीतल्या छोट्याशा कॅफेतून पमन पमी प्रतापराव, मामी तर उरुग्वेहून आहुजा व शिल्पा.
अगदी निशब्द शांतता. तरी हजारो मैल दूर अंतरावर ही खोल गेलेले श्वास निशब्दतेत वादळ उठवू लागले. पमन तर ओक्साबोक्सी रडूच लागला.
शिल्पानं पम्यास पाहिलं व श्वास उफाळत आसवं गाळू लागली. ती माया, पमीला, पमनला आळीपाळीनं पाहु लागली. पमीचं सुनं कपाळ पाहिलं नी " पमे, नशीबवान आहेस जिंकलीस ना तू! मग कपाळावर माझ्या पमनच सौभाग्य लेणं तरी लाव ! कळत नाही का तुला!"
पमीला कळेना.
" शिल्पा ,तिचा नवरा मेलाय गं! ती सौभाग्य लेणं कशी लावेल?" मायानं तिला सांगितलं.
" पमनशी केलंय ना लग्न? मग?"
" शिल्पे ! कोण म्हणतंय?"
" म्हणजे?"
" अगं तुझी वाट पाहत तुझा पम्या.,...." नी मायाला पुढे बोलवेनाच.तसे पमन, पमी, रस्तोगी सारे रडू लागले.
शिल्पा समजली.
" पम्या साल्या.... मी पण थांबलेय रे वाट पाहत .पण या प्रशांतनं लग्नाचे फोटो दाखवले नी मग माझा धीर खचला. पण आता वाईट नाही वाटत! कारण एकच आस होती. तु दिसावा...माझा पम्या! चढ्ढीत फटाके फोडणारा पम्या! खो खोत चित्त्याची झेप घेणारा पम्या! खांबाजवळ बेल मारत छाताडं फोडणारा पम्या! विसर्जन मिरवणूकीत 'लख लख सोनानी...' या गाण्यावर गावाला मदहोश करणारा पम्या! जिवाची बाजी लावत आबाच्या शब्दाखातर रोगार पिऊनही वाचवणारा पम्या! त्याच आबाच्या शब्दाखातर पमीस विसरत माझ्यावर मरणारा पम्या! चांदण्या रात्रीत चांदणं पाजणारा पम्या! झटा खाऊन ही चांदणं फुलवणारा पम्या! ही सारी रुपं पाहायची होती मला!"
" शिल्पा ! किती वाट पहावी गं माणसानं! लबाड आहेस तू! एक महिन्याचं नाव करून गेलीस नी ....!"
" पम्या ,नुसती वाटच पाहत बसला! कधी घ्यायला आलाच नाही?माझ्या आसवांनी अटलांटीक खारट झाला!"
शिल्पा रडत नव्हती पण श्वास उखडू लागला. आहुजा बंद करायला विनवू लागला.
" आहुजा सर, मला आता परत जगावंसं वाटतंय! शास्त्रज्ञ ना तुम्ही कराल काही तरी!" न उचलले जाणारे हात ती उचलत जोडू लागली. पण व्यर्थ.
" शिल्पा , तुला काहीच होणार नाही. तु घाबरू नकोस!" पमन टाहो फोडत सांगू लागला.
" मायडे ,मैनाना हुसकावून लावलं होतं गं मी! राघू ही कह्यात आला! पण दुसऱ्या राघूनच घात केला. पण पमी प्लिज ऐक माझं......" पमी टाहो फोडत स्क्रीनकडं हात करू लागली.
" पम्या आबांची इच्छा शिल्पीनं खडकीत नांदावी अशीच होती. पण आता पमीलाच शिल्पा समज....!"
पमन पमी हंडरडा फोडू लागले.
" पम्या ऐक, आबांना सांग. अंजा आत्यानं तिच्या कर्माची फळं भोगलीत . नी पम्या ,तु ज्याच्या चढ्ढीत फटाके लावले होते त्याला ही उध्वस्त केलंय मी,घाबरू नकोस! बघ एक दिड वर्षाचाच अवकाश एवढी कळ मार.खडकीत येतेच मी तुझ्या घरात;कोणत्या ना कोणत्या रूपात!"
आहुजानं स्क्रिन आॅफ केली.
.
.
.
शिल्पा गेली.....
माया, मनिष, रस्तोगी, सुबोध आर्डीला आले. मायाला पाहताच पमन ढासळला. मायाला बिलगत तो ढोरासारखा हमसू लागला. पमीही जवळच भिंतीला टेकत हंबरत होती.
" पमन! मी चूक की तू चूक?
पमी चूक की प्रशांत चूक? शिल्पा चूक की पमन चूक? या साऱ्या प्रश्नाचा गुंथनकाला निवरू देत आता!
शिल्पा भले कायम मैदान सोडत हारत राहिली. मला, पमीला बुचकळ्यात पाडत राहिली पण जगाचं मैदान सोडतांना ती माझ्या पद्माचं आभाळ नितळ करून जात शेवटची बाजी जिंकून गेली."
रस्तोगी, सुबोध, प्रतापराव सोमा पोवाराच्या घरी जात सारं सांगितलं. प्रशांतनं त्यांच्यांशी संपर्क तोडलाच होता. रस्तोगीनं आहुजाशी संपर्क साधला. पण तो पावेतो आहुजा शिल्पालाच काय पण प्रशांतलाही वाचवू शकले नाही. अंजना बाई तर शिल्पा आधीच अटलांटीक महासागराच्या किनारी गाडल्या गेल्या.
पमन पमीला मायानं एक केलंच. प्रश्न हा नाही.
पण
खरे प्रश्न वेगळेच पडतात.
शिल्पाला प्रशांतने मारलं की प्रशांतला शिल्पानं?
की दोन्ही अनावधानानं शिकार झालेत?
शिल्पा स्वखुशीनं मेली की ?
बरं याची उत्तरं प्रशांतला ठाऊक होती का?
शिल्पाला ?
शास्त्र खूप खूप प्रगत आहे!
पुढे ही प्रगत व्हावंच!
मानवजातीच्या कल्याणासाठी तेच योग्य.पण त्यात भावनेचा खून होऊ नये.
काही प्रश्नाना उत्तरेच नसतात?
एकच उत्तर असावं !
' असल्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही' हेच समाधान न करणारं उत्तर.
समाधान करायचं असेल तर स्वत:च धुंडाळा.अटलांटीक महासागराचा किनारा धुंडाळत थडगी उकरा! शिल्पीला उठवा! प्रशांतला उठवा! अंजाला उठवा, चिरनिद्रेतून! न जाणो मिळतीलही उत्तरे(!)?
माया पद्मास समजावू लागली.
" पद्मा या सागराकडं बघ! याच्या शांत रूपात भयानक वादळ दडलं असतं तर कधी रौद्र रुपातही खोल डोहात शांतता नांदत असते. म्हणजे वादळ व शांत ही दोन्ही रुपं अंगाखाद्यावर खेळवतो हा. पाण्याचा एक थेंब ही मानव पिऊ शकत नाही.पण तरी अप्रत्यक्षपणे साऱ्या सृष्टीस हाच पाणी पुरवतो. जिवन ही तसंच असतं गं! केव्हा काय करू नये व केव्हा काय करावं हे परिस्थीतीनुरुप माणसानं ठरवावं!"
" मायडे! कळतंय गं! पण ज्याला कळायला हवं त्याला ही हे कळणं गरजेचं ना?"
" पमे! तुझ्या बरकतीचं कुणी हिसकवत असेल तर ते परत तुच मिळवलं पाहिजे. कोण परत करत नाही म्हटल्यावर थांबू नकोस! प्रसंगी हिसकावण्याची ताकद ठेवत पुढाकार घे!"
" माया........! कुणाची इच्छा नसतांना...का म्हणुन आपण लिप्सा ठेवावी!"
" खोल खोल गाढ गाडलेली लिप्सा जागृत करण्यासाठी....!" माया पमीत आत्मविश्वास भरू लागली.
पद्मा थरथरली. त़ोच मनिष व पमन थांबले. माया मनिषला बोलवत पुढे निघाली. पद्मा व पमन किनाऱ्यावर थांबले.
" पमे चल! मायडे पुढे गेली."
" पमन...! बस... मायडे मुद्दाम पुढे गेली!"
"..........!"
" पमन ?"
" काय?"
" किती बरं झालं असतं सागरात शिरण्यासारखंच भूतकाळात शिरत जगता आलं असतं तर?"
" माणसं, रेंगाळत राहिली असती,प्रगती ठप्प झाली असती!"
" माणसाचं जाऊ दे ,तू काय केलं असतं?"
" मी शिल्पाला शोधलं असतं!"पद्माच्या काळजात दुखरी कळ उठली.
" आणखी?"
" बस तितक्यात खोल शिरत ठप्प होत ना भूत ना भविष्य!"
" पम्या पुढंही उज्जवल भूतकाळ आहेना तुझा खोल शिर ना?" पमी संतापात कळवळू लागली नी त्याला बिलगली.
" या मायडीला नाही कळत रे! मी मना करत होते तिला. मला नाही जमणार कुणाची लिप्सा जागृत करायला. पण ती ऐकतच नाही. नी मग माझ्याकडून असलं काही तरी विपरीत घडतं!" पमी हमसून हमसून रडली.
" पमे! तुझ्यासाठीच तर सारं सारं होतं गं. पण त्याच नादात गुरफटलो मी. आता नाही निघू शकत बाहेर! कोण काही ही सांगो पण ती वाट पाहत ठप्प बसली असेल माझ्यासाठी.म्हणून मला ही पुढे असलेल्या उज्जवल भुतकाळात नाही शिरता येत खोल तिला सोडून! पमे! मायडे समंजस वेडी आहे. पण तू तरी मला तिथंच थांबू दे!" तो मूक आक्रोस करत पमीला मिठीतून दूर सारू लागला.
दुसऱ्या दिवशी पमन रस्तोगीस भेटला.
" सरजी, तुम्ही सांगाल तर तुमच्या चित्रपटात आयुष्यभर गात राहिल. काही नको मला. पण फक्त एकच... एकच काम करा! शिल्पा पोवारास शोधायला मदत करा. हात जोडतो!"
" रस्तोगीस शांत सागरातील वादळ दिसत होतं की खवळलेल्या सागरातील जीवघेणी शांतता ते कळेना.
त्यांनी त्याला सारं सारं विचारलं. कोलंबीया, प्रशांत, अंजना,,, शास्त्रज्ञ हेच क्ल्यू...बाकी अथांग पसरलेला सागर. तरी रस्तोगीनं हात हातात घेत " पवन मी माझा शंभर टक्के प्रयत्न करतो!" दिलासा दिला.
पमन, पद्मा, तारामाय व मंजा मामी परतले.
भारतात काही दिवसानंतर लगेच लाॅकडाऊन जाहीर झालं. सारं आवागमन ठप्प.कोडं तसंच राहिलं मायाला ही यश मिळेना. पमीनंही आस सोडत भूतकाळाच्या ज्या ठप्प्यावर ती होती तेथून ती खोल जात होती पण उज्वल भविष्याकडं परतता येत नव्हतं.मग थांबली ती ही भूतकाळात. वाट पाहत.
कोलंबीयाहून आलेल्या आहुजाच्या नियंत्रणात अटलांटीक सागराच्या किनाऱ्यावर ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा सुरू झाला. सारे शास्त्रज्ञ सज्ज, पूर्ण यंत्रणा सज्ज. पहिल्या टप्प्यात व्हालंटिअर हे मुलं व वयस्कर घेतलेच नव्हते. पॅथोजेन्स इंजेक्टेड केल्यावर वा पाॅझिटिव्ह रूग्णास व्हॅक्सीन दिल्यावर त्याच्यात अॅन्टिबाॅडी स्ट्रक्चर किती प्रमाणात तयार होतं व काही इन्फेक्शन वा दुष्परिणाम होतात का याचं सुपरव्हीजन व निरीक्षणाची नोंद घेणं या टप्प्यावर महत्वाचं होतं.
प्रशांत नं आहुजा सरांना शिल्पास त्याच्याच सुपरव्हिजन राहु देण्याबाबत विचारल्यावर आहुजाला तेच योग्य वाटलं. तसं त्यावर त्यांची कमांड राहणार होतीच.
शिल्पास पॅथोजेन्स इंजेक्टेड करण्यात आले. पण प्रशांत अति महत्त्वाकांक्षा सिद्ध करण्यासाठी अनायासेच तिचा वापर करू पाहत होता.बाकी शास्त्रज्ञ आलेल्या व्हायरसवर लस शोधू पाहत होते तर हा, अनेक व्हायरल डिसीज एकाच लसीत क्युअर करण्याची लस शोधू पाहत होता व आणखी ही भविष्यकालीन काही बाही जे त्यालाच माहीत होतं.
आहुजा साऱ्या यंत्रनेवर बारकाईनं लक्ष ठेवून होता. पण प्रशांतवर अधिकचा विश्वास वा त्याचीच पत्नी असल्यानं तो काळजी घ्यायला सक्षम आहे म्हणून आहुजा तिकडे काचकसुर करू लागला.
रस्तोगीचा मित्र डिसुझा हा ही मोठा संगीत दिग्दर्शक होता. त्याचा भाऊ कोलंबीयाला होता.जो आहुझाचा मित्र होता. त्यानं आहुजास पवन व शिल्पाची गाजलेली गाणी पाठवत ऐकावयास लावलेली होती. व तो उरुग्वेला येण्यापुर्वीच एका महिन्यापुर्वी या गायिकेबाबत तपास करण्याचं ही सांगितलं होतं. बाॅलीवुडची गाणी असल्यानं भारतीय आहुजास ती खूप आवडली होती व ती गाणी सतत ऐके. एकदम हळू धून सुरू असतांना शिल्पानं ओझरती ऐकली होती. पण आता तिची लॅब बरीच दूर व स्वतंत्र होती.
प्रशांतनं पॅथोजेन्स इंजेक्टेड केले व व तो परिणाम पाहू लागला नोंदी घेऊ लागला. पण त्याला अपेक्षीत परिणाम न मिळता वेगळेच परिणाम मिळू लागले. तो चक्रावला. परत त्यानं काही बदल केले. पण ही बाब आहुजास कळवलीच नाही. आहुजानं इतर व्हालंटिअरच्या परिणामावर लक्ष होतंच .अॅन्टी बाॅडीज तयार होत होते, प्रतिकार शक्ती तयार होत होती. व इतर वाईट परिणाम काहीच दिसत नव्हते. अपेक्षित परिणाम दिसत असल्याने आहुजा खूश होता. त्याच खुशीत त्यानं शिल्पा व प्रशांतला गृहीत धरलं.प्रशांत प्रयोगावर प्रयोग करत सावरण्यासाठी झटत होता. तर शिल्पा मनात हसत होती. सुटका, मुक्ती मिळतेय म्हणुन! या जन्मात पमीनं मैदान मारलं तर आता वाट पाहण्यात अर्थ नाही. पण खंत एकच राहिलीय एकदा तरी पम्या साल्यास झंझोडत विचारायचं राहिलंच. मी वाट पाहत असतांना तो का थांबू शकला नाही. मायाला ही दटवायचं होतं की पमनवर लक्ष ठेव सांगितल्यावर ही तिनं लक्ष ठेवलंच नव्हतं म्हणुन तर पमन व पमी एक झाले होते. हीच खंत राहिली. पण तरी मुक्ती मिळावी, सुटका मिळावी ही कामनाच तनामनात प्रबळ असल्यानं प्रशांत प्रयत्न करत होता पण अॅन्टीबाॅडी स्ट्रक्चर तयार होत तर नव्हतेच पण साईड इफेक्ट वाढतच होते.
आहुजानं मध्यंतरी त्याला विचारणा केल्यावर त्यानं सारे परिणाम इतर पेशंटप्रमाणे असल्याचंच ढापलं होतं. पण आहुजा अचानक गेला व शिल्पाचे सारे आॅब्जर्व्हेशन पाहिल्यावर तो चक्रावला, भांबावला. त्यानं प्रशांतला कॅबीनला बोलवत स्पष्टीकरण मांगितलं. त्याला झापत कायदेशीर कारवाहीची तंबी दिली.
प्रशांत अतिमहत्वाकांक्षेनं बरंच काही करून बसला होता पण तरी त्याला यशाची खात्री होती. त्यानं परत प्रयोग बदलवले पण याच ठिकाणी त्याला अपयश आलं.का आलं ते मात्र त्याला समजेना. कारण एवढी यंत्रणा व बाबीतून गेल्यावर बाकी शंकाना वावच नव्हता मग तरी का व्हावं असं?
आहुजानं सारा ताबा घेत परत विविध टेस्ट करत उपचार सुरू केले. पण खूपच उशीर झाला होता. तो पावेतो तर शिल्पानं प्रशांतबाबत आपलं करावयाचं काम ही केलं होतं. ज्याची आहुजाला तर सोडाच पण प्रशांतलाही कल्पना नव्हती. आहुजा सारे शर्थीचे प्रयत्न करत होता. पण शिल्पाचं शरीर साथच देत नव्हतं व दुष्परिणाम वाढतच होते. आहुजा कंटाळला. ९९व्हालंटिअरची पहिली ह्युमन टेस्ट यशस्वी होऊन ही आहुजास समाधान मिळत नव्हतं.
आहुजा च्या भाषेवरून शिल्पाला तो भारतीय असल्याचं कळताच तिनं तिचं वाजत असलेलं गाणं एकदा वाजवायला लावलं. त्यानं हळुच सिस्टम सुरू करत गाणं लावलं. शिल्पा खुशीनं पडल्या पडल्या रडू लागली. त्यानं " गाणं आवडलं का ?" विचारलं.
धाप लागत असतांनाही व हाता पायातली संवेदना जाऊ पाहत असतांना ती बोलण्याचा प्रयत्न करत होती.
" आपली कलाकृती कुणाला आवडणार नाही?".या एका प्रश्नानं आहुजाला झंझाळलं. त्याला डिसुजा आठवला. तिच्या नावाची जाणीव झाली. त्यानं गुप्तता पाळायला लावत डिसुजाला सारं सांगितलं. डिसुजानं भाऊ, रस्तोगी माया लिंक लावली. पण सारं आवागमन बंद. करणार काय. वेब कॅम व इतर डिव्हाइसनं संपर्क करत पमन, पद्मा, माया, रस्तोगी कनेक्ट झाले. पण शिल्पाला काय व कशानं झालं याबाबत सारी गोपनियता. फक्त शिल्पा आता.......शक्य नाही याची कल्पना देण्यात आली. रस्तोगीनं शिल्पास शोधूनच काढलं होतं. केवळ संगिताच्या माध्यमातून. त्यानं डिसुजाला,डिसुजानं भावाला व भावानं आहुजाला महिन्यांपूर्वी कल्पना दिली होती व शिल्पानं गाणं लावायला लावलं तेव्हा आहुजास ज्यावेळेस हे तिचच गाणं आहे व डिसुजानं सांगितलेलं शिल्पा नाव यावरून सारा उलगडा झाला.
शिल्पाला आहुजानं विचारलं
" शिल्पा या गाण्याच्या गायकाशी बोलायचं का? त्याला पहायचं का?
शिल्पाचा श्वास वाढला, हाता पायात हालचाल आली. मेंदूत झितझिण्या उठल्या. आहुजा सारं नोंदत होता. अल्प प्रतिसाद देणारं शरीर खूपच प्रतिसाद देतंय.
" पमनला तर श्वास बंद पडतोय व आपण गुदमरतोय की तीव्र वेगानं आपला रक्तप्रवाह सुरू होत नसा फाटतील असंच. पमीला ही बोलवलं होतंच सारे काॅन्फरन्सवर वेब कॅमसमोर आले. मुबंईहून रस्तोगी, माया, निकम तर आर्डीतल्या छोट्याशा कॅफेतून पमन पमी प्रतापराव, मामी तर उरुग्वेहून आहुजा व शिल्पा.
अगदी निशब्द शांतता. तरी हजारो मैल दूर अंतरावर ही खोल गेलेले श्वास निशब्दतेत वादळ उठवू लागले. पमन तर ओक्साबोक्सी रडूच लागला.
शिल्पानं पम्यास पाहिलं व श्वास उफाळत आसवं गाळू लागली. ती माया, पमीला, पमनला आळीपाळीनं पाहु लागली. पमीचं सुनं कपाळ पाहिलं नी " पमे, नशीबवान आहेस जिंकलीस ना तू! मग कपाळावर माझ्या पमनच सौभाग्य लेणं तरी लाव ! कळत नाही का तुला!"
पमीला कळेना.
" शिल्पा ,तिचा नवरा मेलाय गं! ती सौभाग्य लेणं कशी लावेल?" मायानं तिला सांगितलं.
" पमनशी केलंय ना लग्न? मग?"
" शिल्पे ! कोण म्हणतंय?"
" म्हणजे?"
" अगं तुझी वाट पाहत तुझा पम्या.,...." नी मायाला पुढे बोलवेनाच.तसे पमन, पमी, रस्तोगी सारे रडू लागले.
शिल्पा समजली.
" पम्या साल्या.... मी पण थांबलेय रे वाट पाहत .पण या प्रशांतनं लग्नाचे फोटो दाखवले नी मग माझा धीर खचला. पण आता वाईट नाही वाटत! कारण एकच आस होती. तु दिसावा...माझा पम्या! चढ्ढीत फटाके फोडणारा पम्या! खो खोत चित्त्याची झेप घेणारा पम्या! खांबाजवळ बेल मारत छाताडं फोडणारा पम्या! विसर्जन मिरवणूकीत 'लख लख सोनानी...' या गाण्यावर गावाला मदहोश करणारा पम्या! जिवाची बाजी लावत आबाच्या शब्दाखातर रोगार पिऊनही वाचवणारा पम्या! त्याच आबाच्या शब्दाखातर पमीस विसरत माझ्यावर मरणारा पम्या! चांदण्या रात्रीत चांदणं पाजणारा पम्या! झटा खाऊन ही चांदणं फुलवणारा पम्या! ही सारी रुपं पाहायची होती मला!"
" शिल्पा ! किती वाट पहावी गं माणसानं! लबाड आहेस तू! एक महिन्याचं नाव करून गेलीस नी ....!"
" पम्या ,नुसती वाटच पाहत बसला! कधी घ्यायला आलाच नाही?माझ्या आसवांनी अटलांटीक खारट झाला!"
शिल्पा रडत नव्हती पण श्वास उखडू लागला. आहुजा बंद करायला विनवू लागला.
" आहुजा सर, मला आता परत जगावंसं वाटतंय! शास्त्रज्ञ ना तुम्ही कराल काही तरी!" न उचलले जाणारे हात ती उचलत जोडू लागली. पण व्यर्थ.
" शिल्पा , तुला काहीच होणार नाही. तु घाबरू नकोस!" पमन टाहो फोडत सांगू लागला.
" मायडे ,मैनाना हुसकावून लावलं होतं गं मी! राघू ही कह्यात आला! पण दुसऱ्या राघूनच घात केला. पण पमी प्लिज ऐक माझं......" पमी टाहो फोडत स्क्रीनकडं हात करू लागली.
" पम्या आबांची इच्छा शिल्पीनं खडकीत नांदावी अशीच होती. पण आता पमीलाच शिल्पा समज....!"
पमन पमी हंडरडा फोडू लागले.
" पम्या ऐक, आबांना सांग. अंजा आत्यानं तिच्या कर्माची फळं भोगलीत . नी पम्या ,तु ज्याच्या चढ्ढीत फटाके लावले होते त्याला ही उध्वस्त केलंय मी,घाबरू नकोस! बघ एक दिड वर्षाचाच अवकाश एवढी कळ मार.खडकीत येतेच मी तुझ्या घरात;कोणत्या ना कोणत्या रूपात!"
आहुजानं स्क्रिन आॅफ केली.
.
.
.
शिल्पा गेली.....
माया, मनिष, रस्तोगी, सुबोध आर्डीला आले. मायाला पाहताच पमन ढासळला. मायाला बिलगत तो ढोरासारखा हमसू लागला. पमीही जवळच भिंतीला टेकत हंबरत होती.
" पमन! मी चूक की तू चूक?
पमी चूक की प्रशांत चूक? शिल्पा चूक की पमन चूक? या साऱ्या प्रश्नाचा गुंथनकाला निवरू देत आता!
शिल्पा भले कायम मैदान सोडत हारत राहिली. मला, पमीला बुचकळ्यात पाडत राहिली पण जगाचं मैदान सोडतांना ती माझ्या पद्माचं आभाळ नितळ करून जात शेवटची बाजी जिंकून गेली."
रस्तोगी, सुबोध, प्रतापराव सोमा पोवाराच्या घरी जात सारं सांगितलं. प्रशांतनं त्यांच्यांशी संपर्क तोडलाच होता. रस्तोगीनं आहुजाशी संपर्क साधला. पण तो पावेतो आहुजा शिल्पालाच काय पण प्रशांतलाही वाचवू शकले नाही. अंजना बाई तर शिल्पा आधीच अटलांटीक महासागराच्या किनारी गाडल्या गेल्या.
पमन पमीला मायानं एक केलंच. प्रश्न हा नाही.
पण
खरे प्रश्न वेगळेच पडतात.
शिल्पाला प्रशांतने मारलं की प्रशांतला शिल्पानं?
की दोन्ही अनावधानानं शिकार झालेत?
शिल्पा स्वखुशीनं मेली की ?
बरं याची उत्तरं प्रशांतला ठाऊक होती का?
शिल्पाला ?
शास्त्र खूप खूप प्रगत आहे!
पुढे ही प्रगत व्हावंच!
मानवजातीच्या कल्याणासाठी तेच योग्य.पण त्यात भावनेचा खून होऊ नये.
काही प्रश्नाना उत्तरेच नसतात?
एकच उत्तर असावं !
' असल्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही' हेच समाधान न करणारं उत्तर.
समाधान करायचं असेल तर स्वत:च धुंडाळा.अटलांटीक महासागराचा किनारा धुंडाळत थडगी उकरा! शिल्पीला उठवा! प्रशांतला उठवा! अंजाला उठवा, चिरनिद्रेतून! न जाणो मिळतीलही उत्तरे(!)?
समाप्त.
कथा पूर्णतः काल्पनिक....
कथा पूर्णतः काल्पनिक....
वा....पा.