🙏🙏🙏घावटी🙏🙏🙏
भाग::-- तिसरा
सदाला अध्यापन क्षेत्रात पदार्पण करतांना सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, भरपूर स्ट्रेन्थ, संपन्न वातावरण, मोठा शिक्षकवृंद या सर्व बाबी मिळाल्या.सोबत जोडीला जिवाभावाचा मित्र दत्ता होताच पण त्यात सर्वात मोठी आव्हानेही होती.ती म्हणजे संस्थेतील काटशहाचं राजकारण, गुणवत्तेचा अभाव.
दत्ता व सलिता हे अप्पांचे निकटवर्तीय असल्याने व अप्पांचं वय थकल्याने याच्याच ताब्यात संस्था.पण दोघात वर्चस्वावरुन वैर.तसं पाहता दत्तानं रक्ताचं पाणी करून संस्था उभारली.मात्र सलिता आयतीच येऊन 'कानामागून आली नी तिखट झाली'या प्रमाणं वरटांग करत होती हेच दत्ताला सलत होतं.
सदानं दोघांच्या राजकारणापासून दूर राहत कामास प्राधान्य देत कठोर मेहनत करण्यास सुरुवात केली.चार पाच महिन्यातच तो विद्यार्थ्यात व इतर शिक्षकातही आवडता झाला.पण सलिता त्याला दत्ताचा मित्र म्हणून मुद्दाम डिवचत असे.
सलितानं मावशीला मध्यस्थी करत सर्व संस्थेचे आर्थिक व्यवहार आपल्याकडं मिळवले.म्हणून ज्युनिअर कॉलेज व प्राथ.ताब्यात असुनही दत्ताला अडचणी येऊ लागल्या.त्याचा त्रास नलू मॅडमांनाही होऊ लागला. सलिता नलू,सदा व दत्ता यांना सतत काहीना काही कारणानं सर्वासमोर डिवचत असे. पण सदात वेगळंच पाणी आहे हे तिने ओळखलं.
सदा व दत्तानं पोरांची तयारी प्राथ. व माध्य.स्तरावरच पक्की व्हावी म्हणून यावर काय काम करता येईल याचा प्लॅन आखला.पण त्यांना हायस्कूल मध्ये हस्तक्षेप करता येईना म्हणून त्यांनी पोराना येता जाता,उठता-बसता अभ्यासक्रम दिसावा म्हणून घर,गल्ली ,गाव रंगवायचं ठरवलं.त्याच्या नशिबाने नुकतच घरकुलाचं काम पुर्ण होऊन निम्याच्या वर गाव झोपड्या जाऊन पक्की घरकुलं बांधली गेली होती.मग त्यांनी नलू मॅडम व काही शिक्षकांना मदतीला घेत शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हे काम करण्याचं ठरवलं.पण पैशासाठी सलितानं स्पष्ट नकार दिला.दत्ता अप्पाकडे गेले पण तो पावेतो मावशीमार्फत अप्पांचे कान भरले गेल्याने अप्पांनी ही वाटाण्याच्या अक्षता लावल्यात.सदा व दत्ताला कुठल्याही स्थितीत काम करायचंच होतं.मार्च महिना असल्यानं लग्न सिजन सुरू होता.सदाला अन्वर मियाची आठवण आली.त्यांनी नाशिकला येत अगदी जवळच्या चार-पाच तारखा घ्यायला लावल्या.मध्यंतरी सदा चार-पाच वेळा नाशिकला जाऊन आला.अन्वर मियानं आपल्या हिश्शाचे पैशे ही सदाकडंच दिले .पैशाचा प्रश्न सुटताच सदा व दत्ता कामाला लागले. लोकांनाही मदतीला घेतलं.घराच्या भिंतींना भराभर कलर मारला जाऊ लागला.सदा सर, दत्ता सर, ड्राईंगचे साठे,निकम सर भराभर विषयवार अभ्यासक्रम भिंतीवर,झाडाच्या खोडावर उतरवू लागले.जेथे जागा मिळेल तेथे अभ्यासक्रम उतरवला.सारं गाव रंगीत दिसू लागलं.येता जाता मुलं , पालक वाचू लागले.जे अडू लागलं त्याची चर्चा होऊ लागली.या कामाची दखल वृत्तपत्रांनी घेतली.सदा सर, दत्ता सरांचं नाव झालं.पुढच्या चार पाच महिन्यात मुलांमध्ये यांचे परिणाम झिरपायला लागले.मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढू लागली.सलिता मात्र यानं दुखावली गेली.सदा सर,दत्तासर,नलू मॅडम अधिक जोमानं कामाला लागले.
विज्ञान प्रदर्शन आलं. सदा सर व दत्ता सरांनी उपकरण बनवायला सुरुवात केली.पण सदा सरांच्या मनात वेगळंच होतं.त्यांनी प्राथमिक व माध्यमिक गटात एकाच विषयावर वेगवेगळं उपकरण बनवायचं ठरवलं.त्यांनी प्राथ. गटात पदार्थाच्या तीन अवस्था ,त्यांच्या अवस्थांतरणात उष्णतेचा रोल व मानवी जिवन यावर उपकरण बनवायचं तर माध्यमिक गटात पदार्थांच्या पाच अवस्था, त्यांचे अवस्थांतरणात उष्णतेचा रोल व मानवी जीवन यावर उपकरण बनवलं.एकच विषय पण काठिण्य पातळीत फरक.पण पुन्हा प्रश्न तोच आला.हायस्कुलनं वेगळंच उपकरण बनवलं.यावेळेस सदानं स्वत:हून सलिता मॅडमची भेट घेतली.
"मॅडम उपकरण बनवलंय फक्त विद्यार्थी द्या"
"काय नाव तुमचं?सदा शिंदे ना?सध्या आपली खूप फडफड चाललीय.चांगलं आहे उडण्याची उर्मी असली की पंख फडफडावे लागतातच .पण मि. शिंदे!नविन माणसांनी मोठ्यांच्या भानगडीत पडायचं नसतं.तुम्ही उपकरण तयार करू शकतात नी आमच्या हाताला काय काकणं बांधली आहेत"
"मॅम तसं नाही नाव तुमचंच राहिल फक्त संस्थेत एकसुत्रता नी दोन्ही गटात एकाच विषयावर उपकरण म्हणून.."
"मि.शिंदे नावासाठी तुमची मदत घेण्या इतपत नादार वाटलो का आम्ही तुम्हास?,चालते व्हा"सलिताचा स्वर चढला.
"तसं नाही मॅम. पण राज्यावर राष्ट्रीय पातळीवर मोठी चुरस असते म्हणुन विषय व उपकरण ही त्या तोडीचं असावं व संस्थेसाठीच विनंती होती.."
"मि. शिंदे तालुक्याचा जिल्ह्याचा विचार करा आधी.कुठं राष्ट्रीय पातळीच्या भराऱ्या मारता आहेत"डिवचत सलिता उद्गारली.
"नाही मॅम हे उपकरण घेतलं तर निवड तर होईलच"ठाम निर्धारानं डोळ्यात लाली उतरवत सदा म्हणाला.
"आणि नाही झाली निवड तर?"सलिताचा स्वरही अधिक चढला.
"मी ही संस्थाच काय पण अध्यापणाचं हे क्षेत्रच सोडेल" थरथरत्या सर्वांगानं सदा उद्गारला.
"तसं असेल तर मग तुमचं चॅलेंज स्विकारण्यासाठी दिलीत मुलं तुम्हास.हवे ते विद्यार्थी घ्या नी तालुकास्तरीय नंतर शब्दाला जागून घाशा गुंडाळा तुमचा".
सदा निघाला.हायस्कुलातून इतर शिक्षकांच्या मदतीनं आठ दहा हजरजबाबी ,हुशार मुलं निवडली.
आठ दहा दिवस त्यांची तयारी करवून दोन मुलं निवडली.उच्च गटात ज्युनीअरची मुलं होतीच.
दत्ता व सदाला जवळ पाहताच सलितानं क्लर्कला सांगत तोफ डागली.
"मि. माने जाहीरात तयार करा ज्युनिअर सेक्शनला एक जागा लवकरच रिक्त होतेय नविन कॅन्डीडेट भरायचाय".
सदाला समजलं पण दत्ताला समजलं नाही.पण ज्यावेळेस समजलं त्या वेळेस त्यानं सदाला बोलवत"सद्या फसलास ना तिच्या डिवचण्यावर?मर आता!"संतापातच तो उद्वेगानं म्हणाला.
"दत्ता पाहूया!त्या शिवाय पर्यायच नव्हता.ही तेढ, काटशहाचं राजकारण संपवण्यासाठी.नी गेली तर गेली नोकरी.वयाच्या दहाव्या वर्षापासून संघर्ष करून पोट भरतोच आहे ना मग पुढे भरणार नाही का?"
या बोलण्यानं व सदानं एखादी गोष्ट ठरवली तर तो कोणत्याही स्थितीच करतोच यावर दत्ताचा पक्का भरोसा असल्यानं दत्ता शांत झाला.पण दोन्ही गटातून राष्ट्रीय पातळी गाठणं स्वप्नच आहे ही वास्तविकता दत्ताची झोप उडवून गेली.
तालुकास्तरीय, जिल्हास्तरावर दोन्ही गटात 'अप्पासाहेब विंचुर्णीकर'संस्थेनं प्रथमच प्रथम क्रमांक पटकावला.सलिताला आश्चर्य वाटलं.दत्ता व सदाची जोड केव्हा फुटेल याची वाट पाहायला तिला मजा वाटू लागली.विभागावर निभाव लागणारच नाही याची तिला खात्री होती.
आता स्पर्धेत चुरस वाढेल.एरवी जिल्ह्यात क्रमांक आला असता तर कोण आनंद झाला असता पण क्रमांक येऊनही पुढच्या चिंतेंनं दत्ता बावचळला.सदानं मात्र शांतता ठेवत मुलांची कोण काय विचारू शकतो व त्यांना नेमकी चपखल उत्तरं कशी द्यायची याची रात्रंदिवस तयारी करवून घेतली.
विभागावरही निवड होताच दत्तानं सदाला उचलत गच्च मिठी मारली.दोन्ही उपकरण पुढच्या स्तरावर सरळ जात राहिली.मध्यंतरी अप्पांनी दोघांचा विद्यार्थ्यांसहित मोठा सत्कार करत आर्थिक मदत देण्याच्या सुचना सलिताला केल्या.सलितानं वेगळचं आखलं होतं नी घडत वेगळंच होतं.तरी राज्यावर डावललं गेलं तरी सदा जाईल ही आशा होतीच. सदानं आता राहुरी विद्यापीठ, मुंबई विज्ञान केंद्रास भेट देऊन पदार्थांच्या अवस्थांबाबत विविध रिसर्च व थेसीसचा अभ्यास केला व विद्यार्थ्यांची तयारी करत राज्यावर उपकरण नेलं.राज्यावर माध्यमिक गटाचं उपकरण सलिताच्या (मार्गदर्शन)नावारच असल्यानं ती ही ऐनवेळी उपस्थित राहिली.तिला निवड न झाल्यावर सदा व दत्ताचा चेहरा पहायचा होता.
तिन दिवसात उपकरणास चांगला प्रतिसाद मिळाला पण परिक्षकांवर सारं काही होतं.परिक्षण झालं.सदानं निवड झाली नाहीच तर मुंबईहूनच परस्पर नाशिकला अन्वर मियाकडच परतायचं ठरवलं होतं.कारण दिलेल्या शब्दानुसार थरवाडीत परतणं शक्यच नव्हतं.सदा व दत्ता एकमेकाकडं पाहण्याचं टाळू लागले.निकालाच्या वेळी सदा मुद्दाम मागेच बसला.दत्ताला विद्यार्थ्यांसोबत पुढे बसवलं.
निकाल लागला उच्चगटात प्रथम व प्राथ. गटात द्वितीय क्रमांक येताच सदाच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली. त्याला हरणाऱ्या आपल्या बापाचा चेहरा पुन्हा पुन्हा दिसू लागला. एकांतात हताश रडणाऱ्या बापाचा चेहरा दिसला की मग तो अधिकच पेटे नी मग काही तरी अचाट बोलून जाई.त्या दिवशीही सलिता बोलली होती तेव्हा तेच घडलं होतं. त्याला हाॅलमधलं काहीच दिसेना.विद्यार्थ्यांनी सदाला बिलगत मिठी मारली.दत्ता तर रडतच गर्दीतच सदावर खेकसला "सद्या मुर्ख लेका यापुढे केव्हाही काही ठरवतांना आधी या दत्त्याला निदान एक वेळा तरी आठव!माझी शपथ आहे.जीव टांगणीला लावून मला ही मारतोस."
सदानं त्याला गच्च छातीशी आवळत "दत्ता माझ्यावर भरोसा नाही का?"
"एक वेळा स्वत:वर भरोसा नाही पण तुझ्या कर्तृत्वावर त्यापेक्षा ही जास्त!म्हणूनच लोकांच्या नजरा तुला लागू नयेत म्हणून जीव तुटतो रे!"सलिताला जवळ येतांना पाहताच दत्ता बोलला.पण त्या आधीच सलिताच्या नजरेत सदा भरल्यानं तिची नजर तर लागणारच होती.
”मि. शिंदे सर हार्दिक अभिनंदन"
सलितानं हातात हात घेत शुभेच्छा दिल्या.
गरमीतही त्या थंड स्पर्शानं सदा शहारला.त्यानं हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत "मॅम आपणासही शुभेच्छा!"म्हणत प्रथमच नजरेत नजर मिळवली.
सलितानं हातानं हात दाबत हात सोडला.
राष्ट्रीय पातळीचं प्रदर्शन उटीत होणार होतं.पण आता सदाला ,दत्ताला मुळीच फिकीर नव्हती.कारण या पातळीवर निवड होवो अथवा न होवो सदाच्या नोकरीवर परिणाम होणार नव्हता.सदालाही आता जाणवू लागलं आपण भावनेच्या भरात किती मोठा धोका पतकरला होता.पण पदार्थाच्या अवस्था मांडतांना त्यानं प्लाझमा व बोस-आईनस्टाईन कन्डेनसेट अवस्था बाबत जी माहिती प्रस्तुत केली होती त्याबाबत आजपावेतो बरीच अनभिज्ञता होती.
सलिता बक्षिस समारंभात मोठमोठ्या मान्यवरांनी सदाचं केलेलं अभिनंदन व कौतुक यानं भारली.शिवाय राज्यातल्या दैनिकात त्याचं होणारं नाव यानं तिचं मन सदाकडं कसं झुकू लागलं ते तिलाही कळेना.आता सदाला नाही काढता आलं पण यालाच साथीला घेत दत्ताला आपल्या मार्गातून काढायचं.
दत्ताला तीन महिन्यासाठी अमरावतीच्या संस्थेत जाण्याचा अप्पासाहेबांचा निरोप ऐन उटीला जायच्या वेळीच आल्यानं तिथं जावं लागलं.सदाला सोबत कुणाला न्यावं हा मोठा पेच पडला.उपकरणासाठी तर कुणाची तरी मदत हवीच.पण कुणालाही घेतलं तरी दत्ता किंवा सलिता मॅम नाराज होईलच.दत्तानं नलू मॅडमचं नाव सुचवलं.पण सदास वस्तू उचलणं पटकणं यासाठी जेन्ट शिक्षक हवा होता.त्यातच सलिताचं त्याला बोलावणं आलं.
"या शिंदे सर! बसा!"
सदा बसायला संकोच करू लागला.ते पाहून "अहो तुम्ही आता मोठ्या हस्ती झाल्यात निसंकोच बसा" सलितानं गाॅगल्सच्या कोपऱ्यातून निरखतच म्हटलं.
"काय ठरवलं उटीला जायचं"
"तेच कोण येणार सोबतीला काहीच कळत नाही"सदा सरळतेने म्हणाला.
"त्यात काय एवढं.नलू मॅडम व श्री. ठाकूर सर व एक शिपाई जातील विद्यार्थी व साहित्य घेऊन रेल्वेने .नी मग माझ्या गाडीनं आपण सोबत निघू" , सलिता वेध घेत बोलली.
"क्काय आपण?येणार आधी?" विस्मयानं सदा उद्गारला.
"का मला नाही न्यायचं का सोबत?"
"नाही मॅम मला तसं नव्हतं म्हणायचं"
"मग काय म्हणायचं होतं?"
"मला आपलंच मार्गदर्शन असल्यानं आपण ही येऊ शकता हे कळलंच नाही!"
"नाही तरी आपणास बऱ्याच गोष्टी कुठं कळतात!"सलितानं फासा टाकून वाघरू कितपत अडकतंय याचा अदमास काळ्या गाॅगल्समधून घेऊ घेतला.
सदानं मात्र काही तरी वेगळच घडतंय म्हणून बापाचा हताश चेहरा आठवत चेहऱ्यावर वेगळाच ताठर भाव आणत "आपण ठरवाल तसं!पण तरी नलू मॅम आपल्या सोबत असल्या तर त्यांचाही रेल्वेचा त्रास वाचेल" इतकंच त्रोटकपणे बोलत निघू लागला.
रेल्वेने बाकी गेल्यावर सलिताच्या स्काॅर्पियोने दुसऱ्या दिवशी नलू, सदा, सलिता निघाली.सलितानं काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.पुढच्या सीटवर स्वत: गाडी चालवायला सलिता बसली.नलू मॅम ही तिच्या शेजारी पुढेच बसली.मागच्या सीटवर सदा बसला.गाडी धावू लागली.सदानं मस्त ताणून दिली. तसा आरशाचा अॅंगल झोपलेल्या सदाच्या चेहऱ्यावर होऊ लागला.सदा मागं गाढ झोपलेला.नलू अनभिज्ञ.पण सलिताचं सारखं कोन साधणं सुरूच होतं.गौर वर्णीय उणापुरा सहा फूट उंच, कष्टानं कमावलेला तगडा देह दोन नयन सारखे प्राशत होते.सूर्य वर चढू लागताच सदा उठला.त्याचं लक्ष समोर आरशात गेलं.भेदक डोळे पाठशिवणीचा खेळ खेळू लागले.तो सावध झाला.त्यानं आळस झटकत सीटवर जागा किचींतशी बदलवत आरशाचा कोन घालवला.पण काही वेळच.पुन्हा सलितानं आरसा फिरवला.तोच पाठशिवणीचा खेळ.काळ्या पैठणीच्या पार्श्वभुमीवर
सुवर्ण कांती, त्यावर डाळिंबी ओठाची लाली.काळ्या झाकेचे आय ब्रो,बट मोगऱ्याचा गजरा,मंद अत्तराचा सुवास ,त्यात गरगर बुबुळं फिरवत फिरणारे भिंगार नयन पाखरं सदाला नशा चढवू लागले.त्यात मंदसं खोडकर स्वार्थी हास्याची धुंद लकेर सदाला बावचळू लागली.नलू मॅम आता डुलकी देत असल्यानं सलिताला फावत होतं.पण सदानं मुद्दाम बापाचा चेहरा आठवत काबू ठेवण्याचा प्रयत्न केला.
"सदा, मधा !हा तुमचा बाप नपुसक ठरला रे! नाही थांबवू शकला तुमच्या आईला!......"अगतिक,असहाय रामजी शिंदे !"आता सदाला आरशात लहानपणीपासुन जो चेहरा आपण आठवण्याचं टाळतोय तोच .....आईचा चेहरा दिसू लागला.त्यानं नलू मॅमला उठवत गाडी थांबवली.सलिता बावरली.ढाब्यावर गाडी थांबवत चहा घेतला.नी सदानंच गाडी चालवायला घेतली.सदा ड्रायव्हिंग करत असावा हे सलिताला माहितच नव्हतं.सदानं गाडी तुफान दामटवत आरशाचा कोन बदलूच दिला नाही.पण तरीही त्याचं मनाचं पाखरूही उंडारलंच.सलितानं त्याला इतकं उंच उडवलं की महत प्रयासानं ही त्याला बापाचा चेहरा आठवेच ना नी मग तो बावचळला.त्यातच संध्याकाळी महाराष्ट् ओलांडून गाडीनं आंध्रात प्रवेश केला.सर्वत्र अंधार नी थंड स्पर्श लागताच सदानं मधला लाईट लावत मुक्कामाचं ठाव शोधत गाडी थांबवली.जेवण करतांना नलू लवकर आटोपून हात धुवायला उठली.संधी साधत सलितानं सदाला टोकलं.
"संवेदना आहेत की नाही सदा तुला!"
आपला एकेरी उल्लेख इतक्या लवकर तो ही सलिता कडुन व्हावा यानं सदाला सोलगडीचा घोट घेतांना जोराचा ठसका लागला.तो काही न बोलता हात धुवायला उठला.
तिथं नलू मॅम त्याला क्राॅस झाल्या.
"मॅम मला वाचवा!"
नलूला दिवसभरात शंका आलीच होती.पण तिचा विश्वास बसत नव्हता या वाक्यासरशी खात्री होताच "प्रसंगातून ज्यानं त्यानं संयम दाखवायचा असतो सर"म्हणत कढं दाबत नलू तुझं अस्तित्व क:पदार्थ एवढं ही नसतांना तू?मनातल्या मनात म्हणत नलू मॅम पुढे निघाल्या.
प्रदर्शन आटोपलं.दोघा उपकरणांना तृतीय क्रमांक मिळाला.सलितानं संधी साधत सदास मिठी मारली.सदा मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करु लागला. परततांना
सलितानं विद्यार्थ्यांसोबतच नलूला परत पाठवलं ती व सदा दोघेच मागे थांबले.सदालाही हे प्रकरण इकडेच संपुष्टात आणायचं असेल तर सलिताला स्पष्ट नकार द्यावाच लागेल म्हणून तो ही नाईलाजानं थांबला.
एक दिवस उटीत घालवला.रात्री चांदण्या रात्रीत बोटींगचा बेत सलितानं आखला.
त्रयोदशीचा चांद निलगिरी पर्वतातून वर आला.उन्हाळ्यातही थंड गारवा अंगास झोंबत होता.बोटीत दोघेच.
"सलिता मॅम मला काही सांगायचंय म्हणून मी एकटा थांबलो अन्यथा नलू मॅडमांना जाऊच दिलं नसतं!"
"काय सांगायचंय मला माहित आहे!"ती हसत म्हणाली.
"ऐका तसं काही नाही"तो शांत निश्चलतेने म्हणाला.
"मग मी सांगते आधी!"
"मॅम तुम्ही जे समजता आहेत ते मुळीच नाही.कारण माझ्या आयुष्याला कुणाला माहित नाही अशी काळ्या इतिहासाची झालर आहे"
"मला ती झालर नाही पहायची सदा!मला उज्वल भविष्यकाळासाठी फक्त सदा हवा!"
"सलिता मॅम उज्वल भविष्य!"सदा रजत चांदण्यात पांढरंफटक हसला.
"सलिता हा चांदणचुरा पहायला किती सुंदर वाटतो!पण तो वाटणारा चांदाचा काळा डाग लोक विसरत नाही हो!"
"मला चंद्र डागाळला आहे याच्याशी घेणं नाही.सदारूपी नाजुक चंद्रकोर जरी मिळाली तरी पुरे!" सलिता निग्रहानं म्हणाली.
"सलिता मॅम काळा डाग जिणं मुश्कील करतो हो!त्याच्या यातना माझ्या बापाला भोगणं असह्य झालं नी ते..!माझं तर बालपणच तिरस्काराच्या भट्टीत शेकलं गेलं! निदान एकदा ऐका मग आपोआप आपण माघार घेणार"
"मला नाही डोकायचं इतिहासात"
"मॅम!प्लिज!....ऐका ना "नी तो ढसाढसा रडायला लागला.
त्याला कुठुन सुरूवात करावी तेच समजेना.रावसाहेब कदम? आई...नाही रेवती?.....रामोजी अपघात?की विषबाधेनं आजी गेल्यापासून.......?
दत्ता व सलिता हे अप्पांचे निकटवर्तीय असल्याने व अप्पांचं वय थकल्याने याच्याच ताब्यात संस्था.पण दोघात वर्चस्वावरुन वैर.तसं पाहता दत्तानं रक्ताचं पाणी करून संस्था उभारली.मात्र सलिता आयतीच येऊन 'कानामागून आली नी तिखट झाली'या प्रमाणं वरटांग करत होती हेच दत्ताला सलत होतं.
सदानं दोघांच्या राजकारणापासून दूर राहत कामास प्राधान्य देत कठोर मेहनत करण्यास सुरुवात केली.चार पाच महिन्यातच तो विद्यार्थ्यात व इतर शिक्षकातही आवडता झाला.पण सलिता त्याला दत्ताचा मित्र म्हणून मुद्दाम डिवचत असे.
सलितानं मावशीला मध्यस्थी करत सर्व संस्थेचे आर्थिक व्यवहार आपल्याकडं मिळवले.म्हणून ज्युनिअर कॉलेज व प्राथ.ताब्यात असुनही दत्ताला अडचणी येऊ लागल्या.त्याचा त्रास नलू मॅडमांनाही होऊ लागला. सलिता नलू,सदा व दत्ता यांना सतत काहीना काही कारणानं सर्वासमोर डिवचत असे. पण सदात वेगळंच पाणी आहे हे तिने ओळखलं.
सदा व दत्तानं पोरांची तयारी प्राथ. व माध्य.स्तरावरच पक्की व्हावी म्हणून यावर काय काम करता येईल याचा प्लॅन आखला.पण त्यांना हायस्कूल मध्ये हस्तक्षेप करता येईना म्हणून त्यांनी पोराना येता जाता,उठता-बसता अभ्यासक्रम दिसावा म्हणून घर,गल्ली ,गाव रंगवायचं ठरवलं.त्याच्या नशिबाने नुकतच घरकुलाचं काम पुर्ण होऊन निम्याच्या वर गाव झोपड्या जाऊन पक्की घरकुलं बांधली गेली होती.मग त्यांनी नलू मॅडम व काही शिक्षकांना मदतीला घेत शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हे काम करण्याचं ठरवलं.पण पैशासाठी सलितानं स्पष्ट नकार दिला.दत्ता अप्पाकडे गेले पण तो पावेतो मावशीमार्फत अप्पांचे कान भरले गेल्याने अप्पांनी ही वाटाण्याच्या अक्षता लावल्यात.सदा व दत्ताला कुठल्याही स्थितीत काम करायचंच होतं.मार्च महिना असल्यानं लग्न सिजन सुरू होता.सदाला अन्वर मियाची आठवण आली.त्यांनी नाशिकला येत अगदी जवळच्या चार-पाच तारखा घ्यायला लावल्या.मध्यंतरी सदा चार-पाच वेळा नाशिकला जाऊन आला.अन्वर मियानं आपल्या हिश्शाचे पैशे ही सदाकडंच दिले .पैशाचा प्रश्न सुटताच सदा व दत्ता कामाला लागले. लोकांनाही मदतीला घेतलं.घराच्या भिंतींना भराभर कलर मारला जाऊ लागला.सदा सर, दत्ता सर, ड्राईंगचे साठे,निकम सर भराभर विषयवार अभ्यासक्रम भिंतीवर,झाडाच्या खोडावर उतरवू लागले.जेथे जागा मिळेल तेथे अभ्यासक्रम उतरवला.सारं गाव रंगीत दिसू लागलं.येता जाता मुलं , पालक वाचू लागले.जे अडू लागलं त्याची चर्चा होऊ लागली.या कामाची दखल वृत्तपत्रांनी घेतली.सदा सर, दत्ता सरांचं नाव झालं.पुढच्या चार पाच महिन्यात मुलांमध्ये यांचे परिणाम झिरपायला लागले.मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढू लागली.सलिता मात्र यानं दुखावली गेली.सदा सर,दत्तासर,नलू मॅडम अधिक जोमानं कामाला लागले.
विज्ञान प्रदर्शन आलं. सदा सर व दत्ता सरांनी उपकरण बनवायला सुरुवात केली.पण सदा सरांच्या मनात वेगळंच होतं.त्यांनी प्राथमिक व माध्यमिक गटात एकाच विषयावर वेगवेगळं उपकरण बनवायचं ठरवलं.त्यांनी प्राथ. गटात पदार्थाच्या तीन अवस्था ,त्यांच्या अवस्थांतरणात उष्णतेचा रोल व मानवी जिवन यावर उपकरण बनवायचं तर माध्यमिक गटात पदार्थांच्या पाच अवस्था, त्यांचे अवस्थांतरणात उष्णतेचा रोल व मानवी जीवन यावर उपकरण बनवलं.एकच विषय पण काठिण्य पातळीत फरक.पण पुन्हा प्रश्न तोच आला.हायस्कुलनं वेगळंच उपकरण बनवलं.यावेळेस सदानं स्वत:हून सलिता मॅडमची भेट घेतली.
"मॅडम उपकरण बनवलंय फक्त विद्यार्थी द्या"
"काय नाव तुमचं?सदा शिंदे ना?सध्या आपली खूप फडफड चाललीय.चांगलं आहे उडण्याची उर्मी असली की पंख फडफडावे लागतातच .पण मि. शिंदे!नविन माणसांनी मोठ्यांच्या भानगडीत पडायचं नसतं.तुम्ही उपकरण तयार करू शकतात नी आमच्या हाताला काय काकणं बांधली आहेत"
"मॅम तसं नाही नाव तुमचंच राहिल फक्त संस्थेत एकसुत्रता नी दोन्ही गटात एकाच विषयावर उपकरण म्हणून.."
"मि.शिंदे नावासाठी तुमची मदत घेण्या इतपत नादार वाटलो का आम्ही तुम्हास?,चालते व्हा"सलिताचा स्वर चढला.
"तसं नाही मॅम. पण राज्यावर राष्ट्रीय पातळीवर मोठी चुरस असते म्हणुन विषय व उपकरण ही त्या तोडीचं असावं व संस्थेसाठीच विनंती होती.."
"मि. शिंदे तालुक्याचा जिल्ह्याचा विचार करा आधी.कुठं राष्ट्रीय पातळीच्या भराऱ्या मारता आहेत"डिवचत सलिता उद्गारली.
"नाही मॅम हे उपकरण घेतलं तर निवड तर होईलच"ठाम निर्धारानं डोळ्यात लाली उतरवत सदा म्हणाला.
"आणि नाही झाली निवड तर?"सलिताचा स्वरही अधिक चढला.
"मी ही संस्थाच काय पण अध्यापणाचं हे क्षेत्रच सोडेल" थरथरत्या सर्वांगानं सदा उद्गारला.
"तसं असेल तर मग तुमचं चॅलेंज स्विकारण्यासाठी दिलीत मुलं तुम्हास.हवे ते विद्यार्थी घ्या नी तालुकास्तरीय नंतर शब्दाला जागून घाशा गुंडाळा तुमचा".
सदा निघाला.हायस्कुलातून इतर शिक्षकांच्या मदतीनं आठ दहा हजरजबाबी ,हुशार मुलं निवडली.
आठ दहा दिवस त्यांची तयारी करवून दोन मुलं निवडली.उच्च गटात ज्युनीअरची मुलं होतीच.
दत्ता व सदाला जवळ पाहताच सलितानं क्लर्कला सांगत तोफ डागली.
"मि. माने जाहीरात तयार करा ज्युनिअर सेक्शनला एक जागा लवकरच रिक्त होतेय नविन कॅन्डीडेट भरायचाय".
सदाला समजलं पण दत्ताला समजलं नाही.पण ज्यावेळेस समजलं त्या वेळेस त्यानं सदाला बोलवत"सद्या फसलास ना तिच्या डिवचण्यावर?मर आता!"संतापातच तो उद्वेगानं म्हणाला.
"दत्ता पाहूया!त्या शिवाय पर्यायच नव्हता.ही तेढ, काटशहाचं राजकारण संपवण्यासाठी.नी गेली तर गेली नोकरी.वयाच्या दहाव्या वर्षापासून संघर्ष करून पोट भरतोच आहे ना मग पुढे भरणार नाही का?"
या बोलण्यानं व सदानं एखादी गोष्ट ठरवली तर तो कोणत्याही स्थितीच करतोच यावर दत्ताचा पक्का भरोसा असल्यानं दत्ता शांत झाला.पण दोन्ही गटातून राष्ट्रीय पातळी गाठणं स्वप्नच आहे ही वास्तविकता दत्ताची झोप उडवून गेली.
तालुकास्तरीय, जिल्हास्तरावर दोन्ही गटात 'अप्पासाहेब विंचुर्णीकर'संस्थेनं प्रथमच प्रथम क्रमांक पटकावला.सलिताला आश्चर्य वाटलं.दत्ता व सदाची जोड केव्हा फुटेल याची वाट पाहायला तिला मजा वाटू लागली.विभागावर निभाव लागणारच नाही याची तिला खात्री होती.
आता स्पर्धेत चुरस वाढेल.एरवी जिल्ह्यात क्रमांक आला असता तर कोण आनंद झाला असता पण क्रमांक येऊनही पुढच्या चिंतेंनं दत्ता बावचळला.सदानं मात्र शांतता ठेवत मुलांची कोण काय विचारू शकतो व त्यांना नेमकी चपखल उत्तरं कशी द्यायची याची रात्रंदिवस तयारी करवून घेतली.
विभागावरही निवड होताच दत्तानं सदाला उचलत गच्च मिठी मारली.दोन्ही उपकरण पुढच्या स्तरावर सरळ जात राहिली.मध्यंतरी अप्पांनी दोघांचा विद्यार्थ्यांसहित मोठा सत्कार करत आर्थिक मदत देण्याच्या सुचना सलिताला केल्या.सलितानं वेगळचं आखलं होतं नी घडत वेगळंच होतं.तरी राज्यावर डावललं गेलं तरी सदा जाईल ही आशा होतीच. सदानं आता राहुरी विद्यापीठ, मुंबई विज्ञान केंद्रास भेट देऊन पदार्थांच्या अवस्थांबाबत विविध रिसर्च व थेसीसचा अभ्यास केला व विद्यार्थ्यांची तयारी करत राज्यावर उपकरण नेलं.राज्यावर माध्यमिक गटाचं उपकरण सलिताच्या (मार्गदर्शन)नावारच असल्यानं ती ही ऐनवेळी उपस्थित राहिली.तिला निवड न झाल्यावर सदा व दत्ताचा चेहरा पहायचा होता.
तिन दिवसात उपकरणास चांगला प्रतिसाद मिळाला पण परिक्षकांवर सारं काही होतं.परिक्षण झालं.सदानं निवड झाली नाहीच तर मुंबईहूनच परस्पर नाशिकला अन्वर मियाकडच परतायचं ठरवलं होतं.कारण दिलेल्या शब्दानुसार थरवाडीत परतणं शक्यच नव्हतं.सदा व दत्ता एकमेकाकडं पाहण्याचं टाळू लागले.निकालाच्या वेळी सदा मुद्दाम मागेच बसला.दत्ताला विद्यार्थ्यांसोबत पुढे बसवलं.
निकाल लागला उच्चगटात प्रथम व प्राथ. गटात द्वितीय क्रमांक येताच सदाच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली. त्याला हरणाऱ्या आपल्या बापाचा चेहरा पुन्हा पुन्हा दिसू लागला. एकांतात हताश रडणाऱ्या बापाचा चेहरा दिसला की मग तो अधिकच पेटे नी मग काही तरी अचाट बोलून जाई.त्या दिवशीही सलिता बोलली होती तेव्हा तेच घडलं होतं. त्याला हाॅलमधलं काहीच दिसेना.विद्यार्थ्यांनी सदाला बिलगत मिठी मारली.दत्ता तर रडतच गर्दीतच सदावर खेकसला "सद्या मुर्ख लेका यापुढे केव्हाही काही ठरवतांना आधी या दत्त्याला निदान एक वेळा तरी आठव!माझी शपथ आहे.जीव टांगणीला लावून मला ही मारतोस."
सदानं त्याला गच्च छातीशी आवळत "दत्ता माझ्यावर भरोसा नाही का?"
"एक वेळा स्वत:वर भरोसा नाही पण तुझ्या कर्तृत्वावर त्यापेक्षा ही जास्त!म्हणूनच लोकांच्या नजरा तुला लागू नयेत म्हणून जीव तुटतो रे!"सलिताला जवळ येतांना पाहताच दत्ता बोलला.पण त्या आधीच सलिताच्या नजरेत सदा भरल्यानं तिची नजर तर लागणारच होती.
”मि. शिंदे सर हार्दिक अभिनंदन"
सलितानं हातात हात घेत शुभेच्छा दिल्या.
गरमीतही त्या थंड स्पर्शानं सदा शहारला.त्यानं हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत "मॅम आपणासही शुभेच्छा!"म्हणत प्रथमच नजरेत नजर मिळवली.
सलितानं हातानं हात दाबत हात सोडला.
राष्ट्रीय पातळीचं प्रदर्शन उटीत होणार होतं.पण आता सदाला ,दत्ताला मुळीच फिकीर नव्हती.कारण या पातळीवर निवड होवो अथवा न होवो सदाच्या नोकरीवर परिणाम होणार नव्हता.सदालाही आता जाणवू लागलं आपण भावनेच्या भरात किती मोठा धोका पतकरला होता.पण पदार्थाच्या अवस्था मांडतांना त्यानं प्लाझमा व बोस-आईनस्टाईन कन्डेनसेट अवस्था बाबत जी माहिती प्रस्तुत केली होती त्याबाबत आजपावेतो बरीच अनभिज्ञता होती.
सलिता बक्षिस समारंभात मोठमोठ्या मान्यवरांनी सदाचं केलेलं अभिनंदन व कौतुक यानं भारली.शिवाय राज्यातल्या दैनिकात त्याचं होणारं नाव यानं तिचं मन सदाकडं कसं झुकू लागलं ते तिलाही कळेना.आता सदाला नाही काढता आलं पण यालाच साथीला घेत दत्ताला आपल्या मार्गातून काढायचं.
दत्ताला तीन महिन्यासाठी अमरावतीच्या संस्थेत जाण्याचा अप्पासाहेबांचा निरोप ऐन उटीला जायच्या वेळीच आल्यानं तिथं जावं लागलं.सदाला सोबत कुणाला न्यावं हा मोठा पेच पडला.उपकरणासाठी तर कुणाची तरी मदत हवीच.पण कुणालाही घेतलं तरी दत्ता किंवा सलिता मॅम नाराज होईलच.दत्तानं नलू मॅडमचं नाव सुचवलं.पण सदास वस्तू उचलणं पटकणं यासाठी जेन्ट शिक्षक हवा होता.त्यातच सलिताचं त्याला बोलावणं आलं.
"या शिंदे सर! बसा!"
सदा बसायला संकोच करू लागला.ते पाहून "अहो तुम्ही आता मोठ्या हस्ती झाल्यात निसंकोच बसा" सलितानं गाॅगल्सच्या कोपऱ्यातून निरखतच म्हटलं.
"काय ठरवलं उटीला जायचं"
"तेच कोण येणार सोबतीला काहीच कळत नाही"सदा सरळतेने म्हणाला.
"त्यात काय एवढं.नलू मॅडम व श्री. ठाकूर सर व एक शिपाई जातील विद्यार्थी व साहित्य घेऊन रेल्वेने .नी मग माझ्या गाडीनं आपण सोबत निघू" , सलिता वेध घेत बोलली.
"क्काय आपण?येणार आधी?" विस्मयानं सदा उद्गारला.
"का मला नाही न्यायचं का सोबत?"
"नाही मॅम मला तसं नव्हतं म्हणायचं"
"मग काय म्हणायचं होतं?"
"मला आपलंच मार्गदर्शन असल्यानं आपण ही येऊ शकता हे कळलंच नाही!"
"नाही तरी आपणास बऱ्याच गोष्टी कुठं कळतात!"सलितानं फासा टाकून वाघरू कितपत अडकतंय याचा अदमास काळ्या गाॅगल्समधून घेऊ घेतला.
सदानं मात्र काही तरी वेगळच घडतंय म्हणून बापाचा हताश चेहरा आठवत चेहऱ्यावर वेगळाच ताठर भाव आणत "आपण ठरवाल तसं!पण तरी नलू मॅम आपल्या सोबत असल्या तर त्यांचाही रेल्वेचा त्रास वाचेल" इतकंच त्रोटकपणे बोलत निघू लागला.
रेल्वेने बाकी गेल्यावर सलिताच्या स्काॅर्पियोने दुसऱ्या दिवशी नलू, सदा, सलिता निघाली.सलितानं काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.पुढच्या सीटवर स्वत: गाडी चालवायला सलिता बसली.नलू मॅम ही तिच्या शेजारी पुढेच बसली.मागच्या सीटवर सदा बसला.गाडी धावू लागली.सदानं मस्त ताणून दिली. तसा आरशाचा अॅंगल झोपलेल्या सदाच्या चेहऱ्यावर होऊ लागला.सदा मागं गाढ झोपलेला.नलू अनभिज्ञ.पण सलिताचं सारखं कोन साधणं सुरूच होतं.गौर वर्णीय उणापुरा सहा फूट उंच, कष्टानं कमावलेला तगडा देह दोन नयन सारखे प्राशत होते.सूर्य वर चढू लागताच सदा उठला.त्याचं लक्ष समोर आरशात गेलं.भेदक डोळे पाठशिवणीचा खेळ खेळू लागले.तो सावध झाला.त्यानं आळस झटकत सीटवर जागा किचींतशी बदलवत आरशाचा कोन घालवला.पण काही वेळच.पुन्हा सलितानं आरसा फिरवला.तोच पाठशिवणीचा खेळ.काळ्या पैठणीच्या पार्श्वभुमीवर
सुवर्ण कांती, त्यावर डाळिंबी ओठाची लाली.काळ्या झाकेचे आय ब्रो,बट मोगऱ्याचा गजरा,मंद अत्तराचा सुवास ,त्यात गरगर बुबुळं फिरवत फिरणारे भिंगार नयन पाखरं सदाला नशा चढवू लागले.त्यात मंदसं खोडकर स्वार्थी हास्याची धुंद लकेर सदाला बावचळू लागली.नलू मॅम आता डुलकी देत असल्यानं सलिताला फावत होतं.पण सदानं मुद्दाम बापाचा चेहरा आठवत काबू ठेवण्याचा प्रयत्न केला.
"सदा, मधा !हा तुमचा बाप नपुसक ठरला रे! नाही थांबवू शकला तुमच्या आईला!......"अगतिक,असहाय रामजी शिंदे !"आता सदाला आरशात लहानपणीपासुन जो चेहरा आपण आठवण्याचं टाळतोय तोच .....आईचा चेहरा दिसू लागला.त्यानं नलू मॅमला उठवत गाडी थांबवली.सलिता बावरली.ढाब्यावर गाडी थांबवत चहा घेतला.नी सदानंच गाडी चालवायला घेतली.सदा ड्रायव्हिंग करत असावा हे सलिताला माहितच नव्हतं.सदानं गाडी तुफान दामटवत आरशाचा कोन बदलूच दिला नाही.पण तरीही त्याचं मनाचं पाखरूही उंडारलंच.सलितानं त्याला इतकं उंच उडवलं की महत प्रयासानं ही त्याला बापाचा चेहरा आठवेच ना नी मग तो बावचळला.त्यातच संध्याकाळी महाराष्ट् ओलांडून गाडीनं आंध्रात प्रवेश केला.सर्वत्र अंधार नी थंड स्पर्श लागताच सदानं मधला लाईट लावत मुक्कामाचं ठाव शोधत गाडी थांबवली.जेवण करतांना नलू लवकर आटोपून हात धुवायला उठली.संधी साधत सलितानं सदाला टोकलं.
"संवेदना आहेत की नाही सदा तुला!"
आपला एकेरी उल्लेख इतक्या लवकर तो ही सलिता कडुन व्हावा यानं सदाला सोलगडीचा घोट घेतांना जोराचा ठसका लागला.तो काही न बोलता हात धुवायला उठला.
तिथं नलू मॅम त्याला क्राॅस झाल्या.
"मॅम मला वाचवा!"
नलूला दिवसभरात शंका आलीच होती.पण तिचा विश्वास बसत नव्हता या वाक्यासरशी खात्री होताच "प्रसंगातून ज्यानं त्यानं संयम दाखवायचा असतो सर"म्हणत कढं दाबत नलू तुझं अस्तित्व क:पदार्थ एवढं ही नसतांना तू?मनातल्या मनात म्हणत नलू मॅम पुढे निघाल्या.
प्रदर्शन आटोपलं.दोघा उपकरणांना तृतीय क्रमांक मिळाला.सलितानं संधी साधत सदास मिठी मारली.सदा मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करु लागला. परततांना
सलितानं विद्यार्थ्यांसोबतच नलूला परत पाठवलं ती व सदा दोघेच मागे थांबले.सदालाही हे प्रकरण इकडेच संपुष्टात आणायचं असेल तर सलिताला स्पष्ट नकार द्यावाच लागेल म्हणून तो ही नाईलाजानं थांबला.
एक दिवस उटीत घालवला.रात्री चांदण्या रात्रीत बोटींगचा बेत सलितानं आखला.
त्रयोदशीचा चांद निलगिरी पर्वतातून वर आला.उन्हाळ्यातही थंड गारवा अंगास झोंबत होता.बोटीत दोघेच.
"सलिता मॅम मला काही सांगायचंय म्हणून मी एकटा थांबलो अन्यथा नलू मॅडमांना जाऊच दिलं नसतं!"
"काय सांगायचंय मला माहित आहे!"ती हसत म्हणाली.
"ऐका तसं काही नाही"तो शांत निश्चलतेने म्हणाला.
"मग मी सांगते आधी!"
"मॅम तुम्ही जे समजता आहेत ते मुळीच नाही.कारण माझ्या आयुष्याला कुणाला माहित नाही अशी काळ्या इतिहासाची झालर आहे"
"मला ती झालर नाही पहायची सदा!मला उज्वल भविष्यकाळासाठी फक्त सदा हवा!"
"सलिता मॅम उज्वल भविष्य!"सदा रजत चांदण्यात पांढरंफटक हसला.
"सलिता हा चांदणचुरा पहायला किती सुंदर वाटतो!पण तो वाटणारा चांदाचा काळा डाग लोक विसरत नाही हो!"
"मला चंद्र डागाळला आहे याच्याशी घेणं नाही.सदारूपी नाजुक चंद्रकोर जरी मिळाली तरी पुरे!" सलिता निग्रहानं म्हणाली.
"सलिता मॅम काळा डाग जिणं मुश्कील करतो हो!त्याच्या यातना माझ्या बापाला भोगणं असह्य झालं नी ते..!माझं तर बालपणच तिरस्काराच्या भट्टीत शेकलं गेलं! निदान एकदा ऐका मग आपोआप आपण माघार घेणार"
"मला नाही डोकायचं इतिहासात"
"मॅम!प्लिज!....ऐका ना "नी तो ढसाढसा रडायला लागला.
त्याला कुठुन सुरूवात करावी तेच समजेना.रावसाहेब कदम? आई...नाही रेवती?.....रामोजी अपघात?की विषबाधेनं आजी गेल्यापासून.......?
क्रमश:
naveen horrer stories lihun post kara
ReplyDelete