तुम्ही कधी पाहिलंय कुणाला? स्वतःच्या घराच्या भिंती काळ्या रंगाने रंगवताना.जशी ही म्हातारी स्वतःच्याच विचारात मग्न होत रंगवतेय.बाहेर जोरदार पाऊस पडतोय, जीवघेण्या विजा चमकत आहेत पण त्याचं तिला काहीच नाही.तिच्यासाठी भिंत काळ्या रंगाने रंगवणे जास्त महत्वाचंय.पाऊस आज काहीतरीच जोरदार पडतोय.कोकणातला पाऊस हा असाच बेभान असतो.आणि त्यात जर आषाढ अमावस्या असेल तर त्या पावसाला वेळ काळ नसतोच.असतो तो फक्त काळोख करून पडणारा वेडापिसा पाऊस.आता संध्याकाळचे पाच वाजलेत पण ढगांनी काळोख एवढा केलाय की ह्या संध्याकाळची ओळखच पुसली गेलीय.दिवस हा फक्त नावासाठी एका जागी स्तब्ध उभाय.आणि पाऊस त्या काळोखाच्या पडछायेत ह्या दिवसावर हुकुमत गाजवतोय.वेळ झाली की दिवस निमूटपणे चालता होईल .आणि मग असेल तो फक्त काळोख .....फणा काढलेल्या अजस्त्र नागासारखा काळाकुट्ट काळोख....कोकणातला काळोख हा असाच असतो.आणि त्यात जर आषाढ अमावस्या असेल तर तो काळोख तळ नसलेल्या समुद्रासारखा खोल आणि दिशाहीन असतो.
असं म्हणतात की आषाढ अमावस्येला पृथ्वीवर वाईट, सैतानी शक्तींचा मुक्त वावर असतो.थोडक्यात सांगायचं झालं तर;आषाढी अमावस्येची रात्र ही सैतानाची रखेल असते .....आणि ह्या दिवशी जो सैतानाची पूजा करतो,त्याची भूख, तहान भागवतो त्याच्या सर्व इच्छा सैतान पुर्ण करतो.आणि ह्याच इच्छेपूर्तिसाठी मानव एक अमानवीय अघोरी कृत्य करतो.
असं म्हणतात की आषाढ अमावस्येला पृथ्वीवर वाईट, सैतानी शक्तींचा मुक्त वावर असतो.थोडक्यात सांगायचं झालं तर;आषाढी अमावस्येची रात्र ही सैतानाची रखेल असते .....आणि ह्या दिवशी जो सैतानाची पूजा करतो,त्याची भूख, तहान भागवतो त्याच्या सर्व इच्छा सैतान पुर्ण करतो.आणि ह्याच इच्छेपूर्तिसाठी मानव एक अमानवीय अघोरी कृत्य करतो.
म्हातारी अजूनही शून्यात बघत एखादया यंत्रासारखी भिंत रंगवतेय .म्हातारा दारात उभाय यांचंही तिला भान नाहीये.
म्हातारा-झालं का ?
म्हातारा-झालं का ?
म्हातारी लगेच भानावर येत उठून त्यांच्याकडील पिशवी घेतेय
म्हातारा -स्वामी योगेंद्रने सांगितल्याप्रमाणे सगळं आणलंय.दहा नारळ , दहा लिंबू , हळद .काळी मिर्ची , काळे धने , काळ लुगडं आणि काळ धोतर .बस्स आत्ता तो यायला हवा.दहा वर्षे झाली इथे कुणी फिरकलच नाही .
म्हातारी-आज तो नक्की येईल .बाहेर पाहिलंत का? वडाच्या झाडावर.
म्हातारा -काय आहे वडाच्या झाडावर ?
म्हातारी -कावळे .कधी नव्हे ते आज वीस पंचवीस तरी कावळे असतील.बघा कसे ओरडत आहेत .बघा आज तो नक्की येईल.त्याला यावंच लागेल.......
मानवाचं अस्तित्व हे एका कुणाच्यातरी अस्तित्वावर टिकत आलंय.स्वतःची प्रगती करण्यासाठी, हव्यासपूर्तीसाठी त्याला कोणत्यातरी अस्तित्वाची गरज भासत आलीय .देव आणि सैतान ही दोन अस्तित्व मानव अनंत काळापासून मानत आलाय.स्वतःच्या हव्यासापायी मानव देवाला साकडं घालतो.देवाकडे जर त्यांची हव्यासप्राप्ती नाही झाली तर तो सैतानाला साकडं घालतो."हव्यास" .प्रेमाचा, वासनेचा, संपत्तीचा आणि वंशाचा .....तो प्राप्त करण्यासाठी मनुष्य काहीही करायला तयार होतो ......
सावंत दांपत्याला तीन मुलींनंतर मुलगा झाला.त्याच नाव शेखर .पण शेखर वीस वर्षांपूर्वी ह्या दोघांना वैतागून बायकोला घेवून कायमचा शहरात निघून गेला.तेव्हापासून हे दोघं ह्या घरांत एकटे राहतात.
पावसाचा जोर आता आणखीनच वाढलाय.म्हातारा, म्हातारी कुणीतरी येईल म्हणून दरवाज्यात डोळे लावून बसलेत.देवार्यातील समईतला मिणमिणत्या प्रकाशांत देवार्यातील विचित्र काळ्या मूर्तीं अजूनच भयंकर दिसत आहेत.
दरवाजात कोणतरी उभंय.जाडजूड शरीरयष्टीचा पोरकट तरुण वाटतोय.जेमतेम वीस वय असेल....
नमस्कार मी अर्नव देसाई.पुण्याहून आलोय.मी फिल्म इंस्टीटयूटचा स्टूडेंट आहे.माझ्या शॉर्ट फिल्मच लोकेशन बघायला मला वेंगुर्ला जायचंय पण वाटेत माझी bike बिघडली आणि पाऊसही खूप आहे.तुमची हरकत नसेल तर आज रात्री मी इथे थांबू का?
नमस्कार मी अर्नव देसाई.पुण्याहून आलोय.मी फिल्म इंस्टीटयूटचा स्टूडेंट आहे.माझ्या शॉर्ट फिल्मच लोकेशन बघायला मला वेंगुर्ला जायचंय पण वाटेत माझी bike बिघडली आणि पाऊसही खूप आहे.तुमची हरकत नसेल तर आज रात्री मी इथे थांबू का?
दहा वर्ष ज्याची वाट पाहत होते "तो "आलाच.आत्तापर्यंत नऊजणं यांच्या तावडीत सापडले होते.....
स्वामी योगेंद्रने सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुमचे दहा नरबळी पूर्ण होतील तेव्हाच सैतान तुमची इच्छा पुर्ण करेल.आणि मग सुरू झाला एक अघोरी खेळ.ज्यात जिवंत माणसाचा बळी घेवून त्याचा रक्ताचा नैवेद्य सैतानाला दिला जातो.आणि मग दर आषाढ अमावस्येला ह्या घरात मध्यरात्री रक्ताचा सडा पडू लागला.दर आषाढ अमावस्येला कुणीतरी वाट चुकलेला वाटसरू इथे यायचा आणि सापडायचा यांच्या तावडीत .पण त्यानंतर दहा आषाढ अमावस्या गेल्या. त्यादरम्यान इथे कुणीच फिरकले नाही.
आता या वास्तूला पण मानवी रक्ताची चटक लागलीय.
आता ह्या वास्तुचा आकार ही एखादया नरभक्षकासारखा झालाय.ही वास्तुही गेली दहा वर्षे कुणाची तरी वाट पाहत इथे उभीय.
स्वामी योगेंद्रने सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुमचे दहा नरबळी पूर्ण होतील तेव्हाच सैतान तुमची इच्छा पुर्ण करेल.आणि मग सुरू झाला एक अघोरी खेळ.ज्यात जिवंत माणसाचा बळी घेवून त्याचा रक्ताचा नैवेद्य सैतानाला दिला जातो.आणि मग दर आषाढ अमावस्येला ह्या घरात मध्यरात्री रक्ताचा सडा पडू लागला.दर आषाढ अमावस्येला कुणीतरी वाट चुकलेला वाटसरू इथे यायचा आणि सापडायचा यांच्या तावडीत .पण त्यानंतर दहा आषाढ अमावस्या गेल्या. त्यादरम्यान इथे कुणीच फिरकले नाही.
आता या वास्तूला पण मानवी रक्ताची चटक लागलीय.
आता ह्या वास्तुचा आकार ही एखादया नरभक्षकासारखा झालाय.ही वास्तुही गेली दहा वर्षे कुणाची तरी वाट पाहत इथे उभीय.
अर्नवला पाहताच सुतकी झालेला दोघांचा चेहरा लालसेच्या आनंदाने फुललाय
म्हातारा -बाळ आत ये.बाहेर भिजत का उभा आहेस, आत ये.
म्हातारी -आमची काही हरकत नाही .तू आज रात्री थांब इथे.
म्हातारा -अगं बोलत काय बसलीयेस .जा गरमागरम चहा आणि भजी बनव.
आता चहा होईल , मस्त गप्पा होतील, पोटभर जेवण होईल मग ह्याला झोपायला अंथरूण देतील.मस्त ह्याला छान झोप लागेल.आणि अचानक ..........अचानक मध्यरात्री ..........अर्नवला जाग येईल.घरात संपूर्ण अंधार असेल.आणि ह्याला जाणवेल की आपले हात , पाय घट्ट बांधलेत आणि तोंडात कापसाचा गोळा कोंबलाय.कसलीच हालचाल करता येत नाहीये आणि तेवढ्यात बाजूला आगीचा भडका उडेल .....
म्हातारी -आमची काही हरकत नाही .तू आज रात्री थांब इथे.
म्हातारा -अगं बोलत काय बसलीयेस .जा गरमागरम चहा आणि भजी बनव.
आता चहा होईल , मस्त गप्पा होतील, पोटभर जेवण होईल मग ह्याला झोपायला अंथरूण देतील.मस्त ह्याला छान झोप लागेल.आणि अचानक ..........अचानक मध्यरात्री ..........अर्नवला जाग येईल.घरात संपूर्ण अंधार असेल.आणि ह्याला जाणवेल की आपले हात , पाय घट्ट बांधलेत आणि तोंडात कापसाचा गोळा कोंबलाय.कसलीच हालचाल करता येत नाहीये आणि तेवढ्यात बाजूला आगीचा भडका उडेल .....
जळत हवनकुंड आणि हवनकुंडाभोवती काळी वस्त्र परिधान करून बसलेले म्हातारा , म्हातारी कसला तरी मंत्र उच्चारत आहेत.अर्नव डोळे विस्फारून हे सगळं पाहतोय.त्याच्या मेंदूची विचारशक्तीच थांबलीय , त्याच जाडजूड शरीर एवढं गच्च बांधलंय की तो कसलीच हालचाल करू शकत नाहीये .त्याच्याकडं एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे जे काही अनपेक्षित , अकल्पित घडतंय ते निमूटपणे पाहणं आणि त्याला सामोरं जाणं ..
बाहेर प्रचंड पाऊस कोसळतोय आणि आत म्हातारा त्या विचित्र काळ्या मूर्तींची पूजा करतोय.म्हातारी हवनकुंडाच्या बाजूला बसलीय आणि अर्नवच्या माथ्यावर हळद , काळ शेंदूर फासतेय.
म्हातारी -अरे रेड्या;कशाला चुळबुळ करतोयस, तू आत्ता नाही वाचणार चांगला तावडीत सापडलायेस.दहा वर्षे वाट पाहिली तुझी .तुला आमची इच्छा पुर्ण करण्यासाठी मरावंच लागेल कळलं.
बाहेर पावसाचा प्रचंड आवाज आणि घरांत कर्कश मंत्रघोष.असं वाटतंय निसर्गाच्या आवाजाची आणि म्हाताराच्या कर्कश मंत्रघोषाची जुगलबंदी सुरुय.
म्हातारी अर्नवला फरफटत देवार्यात नेतेय.
म्हातारी -अरे रेड्या;कशाला चुळबुळ करतोयस, तू आत्ता नाही वाचणार चांगला तावडीत सापडलायेस.दहा वर्षे वाट पाहिली तुझी .तुला आमची इच्छा पुर्ण करण्यासाठी मरावंच लागेल कळलं.
बाहेर पावसाचा प्रचंड आवाज आणि घरांत कर्कश मंत्रघोष.असं वाटतंय निसर्गाच्या आवाजाची आणि म्हाताराच्या कर्कश मंत्रघोषाची जुगलबंदी सुरुय.
म्हातारी अर्नवला फरफटत देवार्यात नेतेय.
मगापासून चाललेला तो कर्कश मंत्रघोष थांबला.फक्त आता प्रचंड कोसळणाऱ्या पावसाचा आवाज येतोय .अर्नव देवार्यात लोळागोळा होऊन जमिनीवर पडलाय .त्याच संपूर्ण शरीर घामाने वितळून गेलंय .दोघंही भीतीने थरथरणार्या अर्नवला रोखून बघत आहेत.
म्हातारी -आता वेळ घालवू नका.थोडाच वेळ शिल्लक राहिलाय अमावस्या संपायला.उचला ती कुऱ्हाड आणि एका घावात याच शिर शरीरापासून वेगळं करा म्हणत म्हातारी देवार्यात कोपऱ्यात ठेवलेल्या ट्रंकेतून मानवी कवट्या काढतेय .ह्या कवट्या त्या नऊ लोकांचे आहेत जे अर्नवप्रमाणे आषाढ अमावस्येला इथे आले होते .......नऊ मानवी कवट्या गोल रचल्या आहेत आणि त्यांच्यामधे लोळागोळा पडलेला अर्नव.
म्हातारी -आता वेळ घालवू नका.थोडाच वेळ शिल्लक राहिलाय अमावस्या संपायला.उचला ती कुऱ्हाड आणि एका घावात याच शिर शरीरापासून वेगळं करा म्हणत म्हातारी देवार्यात कोपऱ्यात ठेवलेल्या ट्रंकेतून मानवी कवट्या काढतेय .ह्या कवट्या त्या नऊ लोकांचे आहेत जे अर्नवप्रमाणे आषाढ अमावस्येला इथे आले होते .......नऊ मानवी कवट्या गोल रचल्या आहेत आणि त्यांच्यामधे लोळागोळा पडलेला अर्नव.
दोघंही देवार्याकडे हात जोडत पुनः तोच कर्कश मंत्रघोष करत आहेत.अर्नव डोळे विस्फारत त्यांना पाहतोय.कर्कश मंत्रघोषाच्या आवाजाने त्यांचं हृदय छातीतून बाहेर पडेल की काय एवढा भीतीनं थरथरतोय.
म्हातारी -उचला ती कुऱ्हाड आणि संपवून टाका ह्या रेड्याला.
म्हातारीने एक लाथ मारून अर्नवला पालथा झोपवला आणि त्याच्या पाठीवर पाय ठेवून उभी राहून म्हाताऱ्या उद्युक्त करतेय.
म्हाताऱ्याने कुऱ्हाड उचलत मानेवर एक जोरदार प्रहार केला आणि बघतो तर काय ?ती कुऱ्हाड अर्नवच्या जाडजूड मानेत अडकलीय.हा प्रहार इतका जबरदस्त होता की अर्नवच्या तोंडात कोंबलेला गोळा बाहेर पडून तो प्रचंड ववेदनेने विव्हळत मोठ्यानं ओरडतोय.पण त्याचा भयानक आक्रोश पावसाच्या आवाजात दाबला जातोय.अर्नव वेदनेने थरथर माश्यासारखा तडपडतोय.दोघंही कुऱ्हाड काढण्याचा प्रयत्न करत आहेत पण ती निघतच नाहीये.
म्हातारीने एक लाथ मारून अर्नवला पालथा झोपवला आणि त्याच्या पाठीवर पाय ठेवून उभी राहून म्हाताऱ्या उद्युक्त करतेय.
म्हाताऱ्याने कुऱ्हाड उचलत मानेवर एक जोरदार प्रहार केला आणि बघतो तर काय ?ती कुऱ्हाड अर्नवच्या जाडजूड मानेत अडकलीय.हा प्रहार इतका जबरदस्त होता की अर्नवच्या तोंडात कोंबलेला गोळा बाहेर पडून तो प्रचंड ववेदनेने विव्हळत मोठ्यानं ओरडतोय.पण त्याचा भयानक आक्रोश पावसाच्या आवाजात दाबला जातोय.अर्नव वेदनेने थरथर माश्यासारखा तडपडतोय.दोघंही कुऱ्हाड काढण्याचा प्रयत्न करत आहेत पण ती निघतच नाहीये.
सगळं शांत झालंय.अर्नव किंचाळन , विव्हळन तो आक्रोश .....
ती कुऱ्हाड अर्नवच्या जाडजूड मानेतून निघत नव्हती.
म्हातारीने बघून बघून घेतलं आणि तडक बाहेर जावून एक मोठा दगड आणून त्या कुऱ्हाडीवर टाकला आणि .....आणि बघता बघता अर्नवच शिर शरीरापासून वेगळं झालं ......
अर्नवच शिर त्या काळ्या मूर्तीसमोर ठेवून म्हातारा अर्नवच्या रक्ताचा नैवेद्य त्या काळ्या मुर्तीना देतोय.
ती कुऱ्हाड अर्नवच्या जाडजूड मानेतून निघत नव्हती.
म्हातारीने बघून बघून घेतलं आणि तडक बाहेर जावून एक मोठा दगड आणून त्या कुऱ्हाडीवर टाकला आणि .....आणि बघता बघता अर्नवच शिर शरीरापासून वेगळं झालं ......
अर्नवच शिर त्या काळ्या मूर्तीसमोर ठेवून म्हातारा अर्नवच्या रक्ताचा नैवेद्य त्या काळ्या मुर्तीना देतोय.
म्हातारा -तुला दहा नरबळी हवे होते ना.घे आज तुझे दहा नरबळी पुर्ण झाले .आत्ता तुला आमची इच्छा पुर्ण करावीच लागेल.करावीच लागेल आमची इच्छा पुर्ण.सैताना दाखव तुझी ताकद .......
म्हातारीला भीतीनं एवढं किंचाळायला काय झालं ?
म्हातारी -अहो इकडे या .....
म्हातारी -अहो इकडे या .....
म्हातारीच्या हातात मोबाईल आहे.बहुतेक हा अर्नवचा मोबाईल आहे.मगाशी धडपडीत खाली पडला असेल.पण म्हातारीने असं मोबाईलमधे काय पाहिलंय?
म्हातारा -काय झालं ?
म्हातारी -हे बघा
म्हातारा -काय झालं ?
म्हातारी -हे बघा
अर्नवच्या मोबाईल स्क्रीनवरचा आई वडिलांसोबतचा फोटो पाहून म्हाताराही स्तब्ध झालाय.दोघंही दाराकडे बघत आहेत .वीस वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आता स्पष्ट दिसतोय
शेखर बायकोबरोबर bag हातात घेवून दरवाजात उभाय .
म्हातारा - कुठे निघालायेस ?
शेखर बायकोबरोबर bag हातात घेवून दरवाजात उभाय .
म्हातारा - कुठे निघालायेस ?
शेखर -मी घर सोडून जातोय कायमचं .मला
तुमच्यासोबत नाही रहायचंय
तुमच्यासोबत नाही रहायचंय
म्हातारी-अरे बाळा पण का ?
बायको -कारण मी तुम्हांला राजूला मारताना शेतात
पाहिलंय
पाहिलंय
शेखर -कालपर्यंत लोकांच्या दारात लिंबू , नारळ टाकून
करणीसारखे प्रकार करत होता आणि आज
तुम्ही आपल्या पाळीव कुत्र्याचा जीव घेतलात?
किळस येते तुम्हांला आई वडील बोलायला.
करणीसारखे प्रकार करत होता आणि आज
तुम्ही आपल्या पाळीव कुत्र्याचा जीव घेतलात?
किळस येते तुम्हांला आई वडील बोलायला.
म्हातारा-अरे शेखर पण हे तुझ्या बाळासाठीच केलं.
तुम्हांला मूल होत नव्हतं.स्वामी योगेंद्रने
सांगितलेल्या विधिमुळेच तुझी बायको गरोदर
झाली आणि तुम्हांला मुलगा झाला.
मूल जन्मल्याबरोबर त्याच्या दीर्घआयुष्यासाठी
स्वामी योगेंद्रने कुत्र्याचा बळी द्यायला सांगितला
होता .
तुम्हांला मूल होत नव्हतं.स्वामी योगेंद्रने
सांगितलेल्या विधिमुळेच तुझी बायको गरोदर
झाली आणि तुम्हांला मुलगा झाला.
मूल जन्मल्याबरोबर त्याच्या दीर्घआयुष्यासाठी
स्वामी योगेंद्रने कुत्र्याचा बळी द्यायला सांगितला
होता .
शेखर - बस्स ....आता तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ
नाही .खरं तर मला तुमची आता भीती
लागलीय.मला तुमच्याशी कसलेच संबंध
ठेवायचे नाहियेत.मी तुमचं आडनाव पण
लावणार नाही .बँकेत तुमच्या अकौंटमधे
दहा लाख जमा केले आहेत.ते मरेपर्यंत
जपून वापरा .निघतो मी ......................
नाही .खरं तर मला तुमची आता भीती
लागलीय.मला तुमच्याशी कसलेच संबंध
ठेवायचे नाहियेत.मी तुमचं आडनाव पण
लावणार नाही .बँकेत तुमच्या अकौंटमधे
दहा लाख जमा केले आहेत.ते मरेपर्यंत
जपून वापरा .निघतो मी ......................
आता दोघंही देवार्यात बघत आहेत आणि तिथे त्यांना वीस वर्षांपूर्वीचा स्वामी योगेंद्र दिसतोय.
योगेंद्र -हा अघोरी मार्ग आहे तुम्हांला जमणार नाही.
दोघं - आम्ही काहीही करायला तयार आहोत मग तो
मार्ग अघोरी का असेना .
मार्ग अघोरी का असेना .
योगेंद्र-पण तुम्हांला खूप प्रतिक्षा करावी लागेल
दोघं -आमची तयारी आहे
योगेंद्र-ठीक आहे.सर्वप्रथम तुम्हांला घरांत सैतानाच्या
मूर्तींची प्रतिष्ठापना करावी लागेल.आणि मग
दर आषाढ अमावस्येला तुम्हांला सैतानाला
मानवी रक्ताचा नैवेद्य द्यावा लागेल.
मूर्तींची प्रतिष्ठापना करावी लागेल.आणि मग
दर आषाढ अमावस्येला तुम्हांला सैतानाला
मानवी रक्ताचा नैवेद्य द्यावा लागेल.
दोघं- म्हणजे ?
योगेंद्र -म्हणजे तुम्हांला वर्षातून एकदा येणाऱ्या आषाढ
अमावस्येला मध्यरात्री एक नरबळी
द्यावा लागेल........करू शकता हे ?
घेऊ शकाल निरपराध माणसांचा बळी?
अमावस्येला मध्यरात्री एक नरबळी
द्यावा लागेल........करू शकता हे ?
घेऊ शकाल निरपराध माणसांचा बळी?
दोघं -होय स्वामीजी
योगेंद्र -ठीक आहे.तर मग ऐका ...जेव्हा तुमचे दहा
नरबळी पुर्ण होतील.तेव्हा सैतान तुमची
इच्छा पुर्ण करेल आणि तुमचा नातू,तुमचा वंश
आई वडिलांना सोडून तुमच्याकडे स्वतःहून
कायमचा येईल ...........कधीही माघारी न
जाण्यासाठी ..........
नरबळी पुर्ण होतील.तेव्हा सैतान तुमची
इच्छा पुर्ण करेल आणि तुमचा नातू,तुमचा वंश
आई वडिलांना सोडून तुमच्याकडे स्वतःहून
कायमचा येईल ...........कधीही माघारी न
जाण्यासाठी ..........
अंधारमय झालेल्या आयुष्यात प्रकाश शोधण्यासाठी काही लोकं अंधश्रद्धेचा हात पकडतात पण त्यांच्या नशिबी काळोखच लागतो .
अंधश्रद्धेचा काळोख हा असाच निर्जीव असतो .............
लेखन
K sawool
K sawool
(कथा रजिस्टर्ड आहे )