🙏 पोरकं प्रारब्ध🙏
"वहमो गुमा से दूर दूर
यकी के हदसे पास पास
दिल को भरम ये हो गया
उनको हमसे प्यार है...."
यकी के हदसे पास पास
दिल को भरम ये हो गया
उनको हमसे प्यार है...."
आज खरातवाडीत येऊन निलेश राणास सहा महिने झाले होते.एम.बी.बी.एस झालं नी इंटर्नशीप साठी खरातवाडी पी.एच.सी.ला तो वैद्यकीय सेवा करतोय.सुसरी नदीच्या काठा -काठानं खरातवाडी सहा हजार लोकवस्तीचं बारा पगड जातीचं गाव वसलेलं.नदीकाठावर जुन्या काळातील सुलतानाची नांदती गढी आज भग्न झालीय.काटेरी बाभुळबनानं वेढली गेलीय.त्या जवळचीच जागा लेव्हलींग करुन शासनानं हे आरोग्य केंद्र उभारलं दोन-तीन वर्षांपुर्वी.खरातवाडीच्या आजुबाजुला सारा परिसर छोट्या छोट्या आदिवासी पाड्याचा.पावसाळ्यात सुसरी नदी चार महिने तट्ट फुगून वाहु लागली की गावात साऱ्या चिखल व रोगराईचं साम्राज्य पसरायचं त्यात आजुबाजुच्या पाड्यावरिल लोकांचं अज्ञानी वागणं .म्हणुन शासनानं गैरसोय टाळावी व लगोलग उपचार मिळावेत यासाठी या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारलं.सुरवातीस निलेश राणा केंद्रातील क्वार्टर मध्येच राहत सेवा बजावू लागला.पण नंतर रुग्णाची सततची रीघ व वरिष्ठांचा नविन पोरगं म्हणुन सतत जुपणं यामुळे अतिरिक्त ताणानं तब्येतीवर परिणाम झाल्यानं नाईलाजानं गावात खोली केली.गावात गाव दरवाजातुन प्रवेश करताच मोठा चौक लागायचा.त्या चौकात बबनराव अगासेची दुमजली प्रशस्त हवेली समोरच दिसे.त्याच हवेलीत वरच्या मजल्यावर निलेश राणाची व्यवस्था झाली.सकाळ ते संध्याकाळ केंद्रात रुग्ण तपासुन तो रात्री गावात परते.तर कधी रात्रभर थांबुन दिवसा परते.परंतू दिवसा खोलीवर ही गावातील रुग्ण येतच राहत.राणा नविन असला तरी त्याचं निदान चपखल असे व त्याच्या हातासही गुण होता.शिवाय बोलका, नर्म विनोदी स्वभाव,मऊ बोलणं रुग्णास भुरळ घाली.म्हणुन केंद्रात वा घरी ही सतत रुग्णाचा गराडा त्याभोवती असे.पावसाळा संपला तसा हळूहळू रोगराईला खंड पडला मग दुपारी त्याला उसंत मिळू लागली.
दुपारी तो मग मस्तपैकी गॅलरित चटई टाकुन एखादं पुस्तक वाची. तर कधी चौकातल्या येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या गमजा पाही.
आजही भिमा ड्रायव्हर दुपारी जेवायला घरी आला होता व ट्रक तो घराजवळ लावत होता.ट्रक रिव्हर्स घेतांना चौकातले चारपाच जण फुशारकीनं अनाहुतपणे
"आन्दो ,आन्दो"
"बस","बस"
"अरे पिछे लगेगी ,आगे मारो"
"नही लगेगी चाचा मेरी सुनो आन्दो तुम "सलमाचं बारकं अन्वर सांगत हातवारे करत होतं.
भिमाला रोजचा सराव असल्यानं कुणाच्याच आगे पिछे कडं लक्ष न देता तो त्याचं काम करत होता.तोच भिमाची पोर 'लाभा' हातात तांब्या घेऊन थकून आलेल्या आपल्या बापास पाणी देण्यासाठी दारात आली.
निलेशच्या हातुन पुस्तक केव्हाच खाली पडलं होतं व त्यानं काटकोन साधला होता.
गावाला,मुंबईला शिक्षण घेत असतांना जात्याच हुशार ,तल्लख व देखण्या निलेश भोवती सतत पोरीचा घोळखा वावरे पण निलेशला त्यांचा उबग वाटे .तो कधीच त्यांना फडकू देत नसे वा तो ही असल्या उचापती करत नसे.मेडीकल काॅलेजला तर मित्र मैत्रिणींचं वागणं पाहुन त्याला एक प्रकारची घिण वाटे.त्यामुळं तो असल्या प्रकारापासुन चार हात दुरच होता.
पण काही दिवसांपासून त्याला ही कळून चुकलं होतं की काहीतरी तंत्र चुकतंय.आपण टाळण्याचा भरपूर प्रयत्न करतोय पण तरी अनामिक ओढीनं पुन्हा पुन्हा मन तिकडंच धावतंय की आपल्यालाच धावावसं वाटतंय.
भिमानं खाली उडी मारली तोच लाभानं दिलेला तांब्या घटाघटा खाली केला.निलेश बावळट ध्यानासारखा एकसारखा टकाटका पाहू लागला.लाभाचं लक्ष गेलं हे ध्यान अजुन पाहतंच आहे यानं ती संतापली व जळजळीत कटाक्ष टाकत ती घरात घुसली.
आरोग्य केंद्रात ले बरेचशे लोक भिमाकडचेच खानावळीतले डबे नेत वा कधी कधी काही जण घरीच जेवायला येत.त्यांना सरी आजी डबे देई वा वाढे.निलेश सुरुवातीस केंद्रातच डबा मागवी पण हल्ली मुद्दाम तो रात्री लाभा घरी असतेच म्हणुन खानावळीत सरी आजीकडंच जेवायला जाई.जेवतांना तो सारखा लाभा दिसते का डोकावून डोकावून पाही.पण लाभा घरातच पोळ्या, भात करणं वा इतर कामं करी पण जेवणाऱ्याकडं फिरकेच ना.
दिवस जाऊ लागले.डाॅ. राणा साऱ्या परिसरात प्रसिद्ध होऊ लागले.पुर्वी केंद्राऐवजी खाजगी डाॅंक्टराकडे जाणारे खरातवाडीतले लोक ही आता केंद्रातच येऊ लागले व राणा डाॅक्टराचा सल्ला वा उपचार घेऊ लागले.सारा गाव त्यांना मानू लागला.एक आदर्श व होतकरू व्यक्तीमत्व म्हणुन त्यांच्याकडं पाहू लागले.निलेशला मात्र मनात खंत वाटू लागली .आपण लाभाबाबत का असं वागतोय.
रात्री जेवण आटोपलं.तो आज मुद्दाम उशिरा जेवायला आला होता.भिमा ड्रायव्हर ही आज नव्हता.सरी आजीनं वाढलं.त्यानं जेवण आटोपलं.जेवणारी सारी परतली होती.लाभा नं मागं भांडी घासायला काढली.निलेशनं संधी साधत हात धुवायला मागं निघाला.लाभानं त्याला पाहताच तशाच ओल्या हातानं उभं राहत "अय,इथं कुठं!माघारी फिर हात धुवायचं तर पुढं जायचं.नाहीतर अंधाऱ्यात टाळकंच फोडीन काठीनं!"
निलेशला हसू आलं.
"अय!हातच धुतोय.उचलून नाही नेत तुला.उचलायला तुला काय मवाली वाटलो काय?डाॅक्टर हाय मी.आणि उचलायचं म्हटलं तर भिमा मामाकडं रितसर मागणी घालीन मी,घाबरू नको"
आपल्या बाबास मामा म्हणतोय हे ऐकल्याबरोबर लाभानं खरकटं खाण्यास येणाऱ्या कुत्र्यांना हाकलण्यासाठी ठेवलेली काठी उचलली व तिच्यानं निलेशला माघारी ढकलत मुकाट्यानं निघायचं इथनं,मामा म्हणतोय शहाणा कुठला!"म्हणत धक्का दिला.
निलेशचा तोल भांड्यावर पडला तोच धडधड गडगड आवाजानं.सरी आजी येत "काय झालं गं लाभे ?कसला आवाज येतोय?"
"काय नाय गं आज्जे कुत्रं हाय अंधारात मस्ती करतंय "
निलेश हसतच निघाला.
निलेशला कळुन चुकलं लाभा नितांत सुंदरच नाही तर जहाल पण आहे.आपणास जोडीदार अशीच हवी.
लाभाचं बी.फार्म होण्यातच होतं.तिला हे नवं डाॅक्टर मागं का लागतंय कळेना.व तिला कळुनही घ्यायचं नव्हतं.आपल्या बापाच्या खस्ता,संघर्ष व आपलं पोरकं बालपण तिनं सोसलं होतं .'आई'...
नावच नको.हा शब्द वेदना देतोय आपणास व यामुळंच मनात कितीही लिप्सा असल्या तरी आपण दाबतच आलोय.कुणा एकाच पाप दुसऱ्याला का बरं छळत असावं.काय गुन्हा आपला?आपल्या बापाचा?
तोच बाहेर आवाज आला म्हणुन ती बाहेर आली तर समोर अगासेच्या हवेलीच्या गॅलरीकडं तिचं लक्ष गेलचं बावळट ध्यान बसलंच होतं.ती लगेच घरात घुसली.दररोजच्या या खेळास ती कंटाळली.चौकात कुणी पाहिलं तर?तिला बालपण व बापाच्या अपरोक्षचे ते बोल आठवू लागले.
'आई',
'हात धरुन गेलीय'
'भाग गई'
या बोलानं संतापानं ती लाल झाली.त्यात भर समोरच निलेश टक लावून पाहत होता.
ती तडक बाहेर पडली.दुपारी चौकात शांतता होती.अगासेच्या हवेलीचा जिना ताड ताड चढत निलेश समोर उभी राहिली.या अवचित धक्क्यानं निलेशची बोबडी वळली.
"काय लावलंय हे?तुला कळतंय का?
ही असली थेरं करायला तुला मुंबई वाटली का?याद राख यापुढं असं टक लावुन पाहिलंस वा घरी जेवायला येतांना डोकावून पाहिलंस तर माज चौकात ओढुन टाळकंच फोडीन"लाभा थरथरत धाडधाड बोलत होती.
"पहिल्यांदा आलीस ,आधी पाणी घे,मग चौकात जाऊ.मग तुला हवं ते कर.पण लक्षात ठेव मी बदफैली मुळीच नाही.तु हो म्हण फक्त आठ दिवसात मी परततोय गावाला आई-वडिलांना आणतो व रितसर मागणी घालतो लग्नाची"निलेश नर्म बोलांनी शांतपणे बोलला.
"खेटरानं हाणीन ! हे बंद नाही केलं तर .मागणी घालतोय शहाणा"संतापातच आली तशी ती निघून गेली.
आठ दिवसात
इंटर्नशीप संपली.निलेश राणा घरी परतला.त्याला एम.डी.करायचं होतं पण एक वर्ष घरी थांबावं लागणार होतं.काय कराव?कुठं प्रॅक्टीस करावी की पुढची एम.डी ची तयारी करावी घरच्यांना निर्णय घेता येईना.पण त्याचं पक्कं होतं की खरातवाडीतच खाजगी दवाखाना थाटायचा तुर्तास.
निलेश गेला नी लाभानं सुटकेचा निःश्वास टाकला.पण प्रयत्न करुनही तिची नजर दुपारी गॅलरीत जाईच व रिकाम्या मनानं परत येई.मग मनात कालवाकालव होई.रात्रीही तो जेवायला बसायचा त्या जागेकडं ती पुन्हा पुन्हा पाही.आपण नाहक दुखवलं त्यास.कारण एवढा गुणी डाॅक्टर ,सारं गाव नाव काढतंय नी आपण किती पाण उतारा केला.तिला रुख रुख वाटु लागली.पण तोच आईचा विचार येताच ती पुन्हा ते विचार ती झटके.
भिमा सकाळी ट्रक सुरु करुन कामावर जायची तयारी करु लागला.अगरबत्ती लावुन केबीनमधल्या गणपतीस ओवाळु लागला तोच त्याच्या छातीत कळा सुरू झाल्या.लगोलग केंद्रात व तेथुन जिल्ह्याला नेलं.तीन दिवस उपचार चालले.ह्रदय विकाराच्या झटक्यातुन थोडक्यात बचावला पण पुढे मुंबई ला रेफर केलं.लाभा,सरू आजी तर धाय मोकलून रडू लागल्या.केंद्रातल्या एका डाक्टरानं निलेशला कळवलं.निलेशनं हाॅस्पीटल गाठलं.पुढच्या साऱ्या टेस्ट व नंतर बायपास सारं सारं करेपर्यंत त्यानंच धावपळ केली.सोबत लाभा एकटीच होती.बायपासचा सारा खर्च वडिलांमार्फत निलेशनंच केला.लाभाला निलेश कडं पाहण्याचं ही धाडस होईना.बायपास होऊन पेशंट धोक्याच्या पातळीबाहेर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितल्यावर निलेशनं लाभाला त्याच्या घरी जायला सांगितलं.पण ती ऐकेना.
"अगं तु आज घरी जाऊन आराम कर.मग उद्या तु थांब मी घरी जाईन."
"तु जा मी थांबते"लाभा इतकंच म्हणाली.
निलेशला तिला एकटीला सोडुन जाणं जिवावर येत होतं.तो गेलाच नाही.तो ही थांबला.भिमा निवांत पहुडलेला.रात्रीचे अकरा वाजले असतील.लाभा आय. सी.यु.च्या बाहेर निलेश जवळ अंतर राखून बसलेली.ती विचार करु लागली.जर हा राहिला नसता तर? आपण इथं हे सारं कसं पार पाडलं असतं?इतक्या तातडीनं आर्थिक तजवीज कशी केली असती? याचा आपण इतका पाण उतारा करुनही हा इतकी धावपळ करतोय काळजी घेतोय.नी आपण!
तिला जोराचा हुंदका दाटून आला ती तशीच उठली व बाहेर पळाली.निलेशला हिला अचानक काय झालं?वडिलांची आठवण आली असावी म्हणुन तो तिच्या मागोमाग गेला.आवारात शांतता होती.लाईट पिवळा प्रकाश फकफक फेकत होता.पतंग त्या भोवती फिरत खाली पडत होते.निलेशला आपल्याकडं येतांना पाहताच लाभानं त्याला गच्च आवळलं व ती मुसमुसुन रडू लागली.
"राणा"
"राणा"
निलेशनं भरपुर आवरलं पण तरी ही आपसुक त्यानं तिला मिठीत घेतली.
रडण्याचा आवेग ओसरल्यावर "लाभा मी राणा असलो तरी माझं नाव निलेश आहे"मिश्कीलपणे निलेश म्हणाला.
लाभा पुन्हा "राणा"म्हणत रडु लागली.
बायपास होउन ठणठणीत होत दहा बारा दिवसांनी निलेशच्या गाडीत भिमा, लाभा खरातवाडीत परतले.
भिमाचा पुनर्जन्मच झाला.
निलेशनं त्यानंतर खरातवाडीतच प्रायव्हेट दवाखाना थाटला.
लाभाचं डाॅक्टराप्रती बदललेलं वागणं सरी आजी ,भिमाला समजलं नसलं तरी त्याचाच शेजारी व कट्टर वैरी बबन बाणाईतला समजलं नी इथेच घात झाला.भिमाच्या ,लाभाच्या पोरक्या प्रारब्धाची धग ठणठणत ज्वाला धरणार हे येणाऱ्या काही दिवसातच समजणार होतं.तिच्या आईचं काळं कर्तृत्व ........नक्कीच तिला छळणार.
दुपारी तो मग मस्तपैकी गॅलरित चटई टाकुन एखादं पुस्तक वाची. तर कधी चौकातल्या येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या गमजा पाही.
आजही भिमा ड्रायव्हर दुपारी जेवायला घरी आला होता व ट्रक तो घराजवळ लावत होता.ट्रक रिव्हर्स घेतांना चौकातले चारपाच जण फुशारकीनं अनाहुतपणे
"आन्दो ,आन्दो"
"बस","बस"
"अरे पिछे लगेगी ,आगे मारो"
"नही लगेगी चाचा मेरी सुनो आन्दो तुम "सलमाचं बारकं अन्वर सांगत हातवारे करत होतं.
भिमाला रोजचा सराव असल्यानं कुणाच्याच आगे पिछे कडं लक्ष न देता तो त्याचं काम करत होता.तोच भिमाची पोर 'लाभा' हातात तांब्या घेऊन थकून आलेल्या आपल्या बापास पाणी देण्यासाठी दारात आली.
निलेशच्या हातुन पुस्तक केव्हाच खाली पडलं होतं व त्यानं काटकोन साधला होता.
गावाला,मुंबईला शिक्षण घेत असतांना जात्याच हुशार ,तल्लख व देखण्या निलेश भोवती सतत पोरीचा घोळखा वावरे पण निलेशला त्यांचा उबग वाटे .तो कधीच त्यांना फडकू देत नसे वा तो ही असल्या उचापती करत नसे.मेडीकल काॅलेजला तर मित्र मैत्रिणींचं वागणं पाहुन त्याला एक प्रकारची घिण वाटे.त्यामुळं तो असल्या प्रकारापासुन चार हात दुरच होता.
पण काही दिवसांपासून त्याला ही कळून चुकलं होतं की काहीतरी तंत्र चुकतंय.आपण टाळण्याचा भरपूर प्रयत्न करतोय पण तरी अनामिक ओढीनं पुन्हा पुन्हा मन तिकडंच धावतंय की आपल्यालाच धावावसं वाटतंय.
भिमानं खाली उडी मारली तोच लाभानं दिलेला तांब्या घटाघटा खाली केला.निलेश बावळट ध्यानासारखा एकसारखा टकाटका पाहू लागला.लाभाचं लक्ष गेलं हे ध्यान अजुन पाहतंच आहे यानं ती संतापली व जळजळीत कटाक्ष टाकत ती घरात घुसली.
आरोग्य केंद्रात ले बरेचशे लोक भिमाकडचेच खानावळीतले डबे नेत वा कधी कधी काही जण घरीच जेवायला येत.त्यांना सरी आजी डबे देई वा वाढे.निलेश सुरुवातीस केंद्रातच डबा मागवी पण हल्ली मुद्दाम तो रात्री लाभा घरी असतेच म्हणुन खानावळीत सरी आजीकडंच जेवायला जाई.जेवतांना तो सारखा लाभा दिसते का डोकावून डोकावून पाही.पण लाभा घरातच पोळ्या, भात करणं वा इतर कामं करी पण जेवणाऱ्याकडं फिरकेच ना.
दिवस जाऊ लागले.डाॅ. राणा साऱ्या परिसरात प्रसिद्ध होऊ लागले.पुर्वी केंद्राऐवजी खाजगी डाॅंक्टराकडे जाणारे खरातवाडीतले लोक ही आता केंद्रातच येऊ लागले व राणा डाॅक्टराचा सल्ला वा उपचार घेऊ लागले.सारा गाव त्यांना मानू लागला.एक आदर्श व होतकरू व्यक्तीमत्व म्हणुन त्यांच्याकडं पाहू लागले.निलेशला मात्र मनात खंत वाटू लागली .आपण लाभाबाबत का असं वागतोय.
रात्री जेवण आटोपलं.तो आज मुद्दाम उशिरा जेवायला आला होता.भिमा ड्रायव्हर ही आज नव्हता.सरी आजीनं वाढलं.त्यानं जेवण आटोपलं.जेवणारी सारी परतली होती.लाभा नं मागं भांडी घासायला काढली.निलेशनं संधी साधत हात धुवायला मागं निघाला.लाभानं त्याला पाहताच तशाच ओल्या हातानं उभं राहत "अय,इथं कुठं!माघारी फिर हात धुवायचं तर पुढं जायचं.नाहीतर अंधाऱ्यात टाळकंच फोडीन काठीनं!"
निलेशला हसू आलं.
"अय!हातच धुतोय.उचलून नाही नेत तुला.उचलायला तुला काय मवाली वाटलो काय?डाॅक्टर हाय मी.आणि उचलायचं म्हटलं तर भिमा मामाकडं रितसर मागणी घालीन मी,घाबरू नको"
आपल्या बाबास मामा म्हणतोय हे ऐकल्याबरोबर लाभानं खरकटं खाण्यास येणाऱ्या कुत्र्यांना हाकलण्यासाठी ठेवलेली काठी उचलली व तिच्यानं निलेशला माघारी ढकलत मुकाट्यानं निघायचं इथनं,मामा म्हणतोय शहाणा कुठला!"म्हणत धक्का दिला.
निलेशचा तोल भांड्यावर पडला तोच धडधड गडगड आवाजानं.सरी आजी येत "काय झालं गं लाभे ?कसला आवाज येतोय?"
"काय नाय गं आज्जे कुत्रं हाय अंधारात मस्ती करतंय "
निलेश हसतच निघाला.
निलेशला कळुन चुकलं लाभा नितांत सुंदरच नाही तर जहाल पण आहे.आपणास जोडीदार अशीच हवी.
लाभाचं बी.फार्म होण्यातच होतं.तिला हे नवं डाॅक्टर मागं का लागतंय कळेना.व तिला कळुनही घ्यायचं नव्हतं.आपल्या बापाच्या खस्ता,संघर्ष व आपलं पोरकं बालपण तिनं सोसलं होतं .'आई'...
नावच नको.हा शब्द वेदना देतोय आपणास व यामुळंच मनात कितीही लिप्सा असल्या तरी आपण दाबतच आलोय.कुणा एकाच पाप दुसऱ्याला का बरं छळत असावं.काय गुन्हा आपला?आपल्या बापाचा?
तोच बाहेर आवाज आला म्हणुन ती बाहेर आली तर समोर अगासेच्या हवेलीच्या गॅलरीकडं तिचं लक्ष गेलचं बावळट ध्यान बसलंच होतं.ती लगेच घरात घुसली.दररोजच्या या खेळास ती कंटाळली.चौकात कुणी पाहिलं तर?तिला बालपण व बापाच्या अपरोक्षचे ते बोल आठवू लागले.
'आई',
'हात धरुन गेलीय'
'भाग गई'
या बोलानं संतापानं ती लाल झाली.त्यात भर समोरच निलेश टक लावून पाहत होता.
ती तडक बाहेर पडली.दुपारी चौकात शांतता होती.अगासेच्या हवेलीचा जिना ताड ताड चढत निलेश समोर उभी राहिली.या अवचित धक्क्यानं निलेशची बोबडी वळली.
"काय लावलंय हे?तुला कळतंय का?
ही असली थेरं करायला तुला मुंबई वाटली का?याद राख यापुढं असं टक लावुन पाहिलंस वा घरी जेवायला येतांना डोकावून पाहिलंस तर माज चौकात ओढुन टाळकंच फोडीन"लाभा थरथरत धाडधाड बोलत होती.
"पहिल्यांदा आलीस ,आधी पाणी घे,मग चौकात जाऊ.मग तुला हवं ते कर.पण लक्षात ठेव मी बदफैली मुळीच नाही.तु हो म्हण फक्त आठ दिवसात मी परततोय गावाला आई-वडिलांना आणतो व रितसर मागणी घालतो लग्नाची"निलेश नर्म बोलांनी शांतपणे बोलला.
"खेटरानं हाणीन ! हे बंद नाही केलं तर .मागणी घालतोय शहाणा"संतापातच आली तशी ती निघून गेली.
आठ दिवसात
इंटर्नशीप संपली.निलेश राणा घरी परतला.त्याला एम.डी.करायचं होतं पण एक वर्ष घरी थांबावं लागणार होतं.काय कराव?कुठं प्रॅक्टीस करावी की पुढची एम.डी ची तयारी करावी घरच्यांना निर्णय घेता येईना.पण त्याचं पक्कं होतं की खरातवाडीतच खाजगी दवाखाना थाटायचा तुर्तास.
निलेश गेला नी लाभानं सुटकेचा निःश्वास टाकला.पण प्रयत्न करुनही तिची नजर दुपारी गॅलरीत जाईच व रिकाम्या मनानं परत येई.मग मनात कालवाकालव होई.रात्रीही तो जेवायला बसायचा त्या जागेकडं ती पुन्हा पुन्हा पाही.आपण नाहक दुखवलं त्यास.कारण एवढा गुणी डाॅक्टर ,सारं गाव नाव काढतंय नी आपण किती पाण उतारा केला.तिला रुख रुख वाटु लागली.पण तोच आईचा विचार येताच ती पुन्हा ते विचार ती झटके.
भिमा सकाळी ट्रक सुरु करुन कामावर जायची तयारी करु लागला.अगरबत्ती लावुन केबीनमधल्या गणपतीस ओवाळु लागला तोच त्याच्या छातीत कळा सुरू झाल्या.लगोलग केंद्रात व तेथुन जिल्ह्याला नेलं.तीन दिवस उपचार चालले.ह्रदय विकाराच्या झटक्यातुन थोडक्यात बचावला पण पुढे मुंबई ला रेफर केलं.लाभा,सरू आजी तर धाय मोकलून रडू लागल्या.केंद्रातल्या एका डाक्टरानं निलेशला कळवलं.निलेशनं हाॅस्पीटल गाठलं.पुढच्या साऱ्या टेस्ट व नंतर बायपास सारं सारं करेपर्यंत त्यानंच धावपळ केली.सोबत लाभा एकटीच होती.बायपासचा सारा खर्च वडिलांमार्फत निलेशनंच केला.लाभाला निलेश कडं पाहण्याचं ही धाडस होईना.बायपास होऊन पेशंट धोक्याच्या पातळीबाहेर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितल्यावर निलेशनं लाभाला त्याच्या घरी जायला सांगितलं.पण ती ऐकेना.
"अगं तु आज घरी जाऊन आराम कर.मग उद्या तु थांब मी घरी जाईन."
"तु जा मी थांबते"लाभा इतकंच म्हणाली.
निलेशला तिला एकटीला सोडुन जाणं जिवावर येत होतं.तो गेलाच नाही.तो ही थांबला.भिमा निवांत पहुडलेला.रात्रीचे अकरा वाजले असतील.लाभा आय. सी.यु.च्या बाहेर निलेश जवळ अंतर राखून बसलेली.ती विचार करु लागली.जर हा राहिला नसता तर? आपण इथं हे सारं कसं पार पाडलं असतं?इतक्या तातडीनं आर्थिक तजवीज कशी केली असती? याचा आपण इतका पाण उतारा करुनही हा इतकी धावपळ करतोय काळजी घेतोय.नी आपण!
तिला जोराचा हुंदका दाटून आला ती तशीच उठली व बाहेर पळाली.निलेशला हिला अचानक काय झालं?वडिलांची आठवण आली असावी म्हणुन तो तिच्या मागोमाग गेला.आवारात शांतता होती.लाईट पिवळा प्रकाश फकफक फेकत होता.पतंग त्या भोवती फिरत खाली पडत होते.निलेशला आपल्याकडं येतांना पाहताच लाभानं त्याला गच्च आवळलं व ती मुसमुसुन रडू लागली.
"राणा"
"राणा"
निलेशनं भरपुर आवरलं पण तरी ही आपसुक त्यानं तिला मिठीत घेतली.
रडण्याचा आवेग ओसरल्यावर "लाभा मी राणा असलो तरी माझं नाव निलेश आहे"मिश्कीलपणे निलेश म्हणाला.
लाभा पुन्हा "राणा"म्हणत रडु लागली.
बायपास होउन ठणठणीत होत दहा बारा दिवसांनी निलेशच्या गाडीत भिमा, लाभा खरातवाडीत परतले.
भिमाचा पुनर्जन्मच झाला.
निलेशनं त्यानंतर खरातवाडीतच प्रायव्हेट दवाखाना थाटला.
लाभाचं डाॅक्टराप्रती बदललेलं वागणं सरी आजी ,भिमाला समजलं नसलं तरी त्याचाच शेजारी व कट्टर वैरी बबन बाणाईतला समजलं नी इथेच घात झाला.भिमाच्या ,लाभाच्या पोरक्या प्रारब्धाची धग ठणठणत ज्वाला धरणार हे येणाऱ्या काही दिवसातच समजणार होतं.तिच्या आईचं काळं कर्तृत्व ........नक्कीच तिला छळणार.
क्रमश:..........
✒वासुदेव पाटील