नैवेद्य पार्ट 3
घाबरून त्याने भीमा कडे पहिले तर भीमा निवांत घोरत पडला होता . त्याला वाटले भीमाला उठवून आपल्याला पडलेल्या स्वप्ना बद्दल सांगावे पण त्याने परत विचार केला भीमा परत आपल्याला खुळ्यात काढेल आणि डरपोक ठरवेल म्हणून त्यानं तस काहीच केल नाही आणि परत झोपी गेला . थोड्या वेळानी रामाला माने पाशी काही तरी टोचल्या सारखे वाटले तो मान चोळत उठला आणि त्याला अर्धवट ग्लानी आली , अर्धवट शुद्धीत त्याला दिसले की भीमा उभा आहे पण त्याचे डोळे बंद आहेत तोच जमिनीतुन झाडाचे एक मोठे टोकदार मुळ बाहेर आले आणि भीमाच्या मानेतुन आरपार गेले , रामाच्या डोळ्या देखत भीमा चे मुंडके धडा वेगळे झाले . भीमाचे धड एकीकडे पडले आणि मुंडके एकीकडे . भीमाचे मुंडके आणि ते झाडाचे मोठे मुळ हळू - हळू आपोआप जमिनीत आत जात होते . पुढच्या क्षणी रामाच्या मानेतुन दुसरे मुळ आर - पार गेले आणि भीमा सारखेच रामाचे धड एकीकडे आणि मुंडके एकीकडे पडले . रामाचे मुंडके आणि ते मुळ जमिनीत आपोआप आत गेले . तिकडे धानदेवीच्या पाया जवळ भीमा आणि रामाच्या मुंडक्याचा प्रसाद होता . झाडाच्या मुळानी देवीला नैवेद्य द्यायचे त्यांचे काम आज पण प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने पूर्ण केले होते . आज किती तरी दिवसांनी देवी च्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती . आवडता नैवेद्य खूप दिवसांनी मिळाल्याचे समाधान होते . तिकडे देवी ला नैवेद्य दाखवल्या नंतर झाडाच्या मुळानी उरलेल्या धडातील सर्व रक्त शोशून घेतले आणि उसाच्या चीपाडा सारखी आकासलेली ती बिन धडाची शरीरे झाडाच्या मुळान बरोबर जमिनीत आता गेली . आता परत कधीच रामा आणि भीमा चा कुणाला त्रास होणार न्हवता . रामा आणी भीमा कधीच त्यांच्या गावी परतणार न्हवते .
खुप वर्षा पूर्वी त्या धानदेवी च्या देवळाच्या जागी एक बाई राहत होती . ती कुठून आली ,कधी आली , तिच्या कुटुंबा बद्दल कुणाला काहीच माहित न्हवते . ती लोकांना स्वतःचे नाव कव्वा सांगत . कव्वा ची मातीची एक छोटी खोली होती . खोलीत एका देवींची दगडी मूर्ती , काळ्या जादू साठी लागणाऱ्या वस्तू , आणि कव्वाचे किरकोळ साहित्य एवढंच होते . कव्वा काळी विद्या करत असे . दूर माळ रानात त्या मातीच्या छोट्या खोलीत ती एकटीच राहत असे . कुठल्यातरी जवळपासच्या गावात जाऊन एखादा एकटा माणूस हेरत असे आणि त्याला काही बाही खोटे सांगून स्वतःच्या मातीच्या घरी आणत असे . त्याला खाण्यातून डोकं सुंद करणारी आणि हात पाय बधिर करणारी चूर्ण खायला देत असे . माणूस बेशुद्ध झाला की कव्वा त्या अघोरी देवीच्या पूजेची तयारी चालू करी . त्या देवींची यथासांग पूजा झाली की नैवेद्य म्हणून त्या माणसाचे मुंडके देत असे . आणि उरलेल्या शरीराचा भाग कव्वा स्वतः खात असे . तिची अशी धारणा होती की देवीला नरबळी देऊन ती अमर होईल आणि त्या मोहापाई ती निरपराध लोकांचा बळी देई . हळू हळू लोकांच्या लक्षात येऊ लागले की कव्वा बरोबर गेलेली माणसे अचानक गायब होत आहेत तेव्हा गाववाल्यानी तिला गावात येण्यासाठी बंदी घातली . खूप प्रयत्न करून पण जेव्हा कव्वा ला नरबळीसाठी कुणीच भेटले नाही तेव्हा कव्वाने घरात असलेल्या कोयत्याने स्वतःचे मुंडके छाटले आणि कव्वाचे मुंडके बरोब्बर देवीच्या पायावर पडले . अचानक आभाळात ढग दाटून आले , वीजा चमकु लागल्या आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला . त्या मातीच्या घरातील बाकीच्या सर्व वस्तू , कव्वाचे मुंडके , जमिनीत आत जाऊ लागल्या . फक्त त्या देवींची मूर्ती आणि कव्वाचे धड तेवढे वर राहिल . घराच्या खिडकीतुन इतका सोसाट्याचा वारा आत शिरला की कव्वाचे बाकीचे धड त्या छोट्या फाट्यावर पडले . त्या ठिकाणी ते आपोआप जमिनीत पुरले गेले आणि एका रात्रीत ते रक्ता सारख्या लाल फुलाचे झाड उगवले . आणि त्याच कव्वा च्या झोपडीतील देवीला लोक धानदेवी म्हणत कारण त्यांना माहीतच न्हवते ती मूर्ती ही अघोरी होती . कव्वा ला अमर करून त्या अशुभ शक्तीने स्वतःच्या नैवेद्याची व्यवस्था करून ठेवली होती .
समाप्त .....
Written By - सायली कुलकर्णी ....