🙏जिव्हाई(जिव्हाळा)🙏
जिव्हाळा-A Marathi Suspence story |
सदा व मधा चं हाडवैर अख्ख्या गावाला ठाऊक होतं.दोघे सख्खे भाऊ पण पक्के वैरी.असा एक ही दिवस जायचा नाही की त्यांच्यात वा कमली व सुलीमध्ये कुरबुर झाली नसेल.कुरबुरही साधी नसायची.सुरु झाली की आख्खी गल्ली दणकायची.पण आताशा लोक ही जमायचे नाहीत.यांचं नेहमीचच मग आपले उद्योग सोडून फुका का जात बसायचं,म्हणत भली बायाबापडी आपल्या कामाला लागत.तर काही हौसे नवसे गवसे मुद्दाम 'इकडंनं जात होतो तर ऐकु आलं म्हणुन आलो' या अविर्भात येत व "वहिनी जाऊ द्या ना!तुम्ही शहाण्या सुरत्या ,कशाला नादी लागता?"असं म्हणत .पण त्याच वेळेस दुसरा तिकडं सुलीला "वहिनी तुमची काहीच चूक नाही पण तरी प्रत्येक वेळी तुम्हीच नमतं घेता,असं कुठवर सहन करणार"म्हणत आगीचा भडका उठवायचा. नी मग सुलीला चेव येऊन आवाज वाढायचा.मग कमली ही "बघा भावजी आता तुम्हीच!तुमचं ऐकून घेतलं ना मी नमतं! पण आटोपते का ती? म्हणुन मग अंगाची लाही होते "म्हणत कमली कंबर खोसत उठायची.
"वहिनी खरच हो आता माझाही नाईलाज आहे "म्हणत तो शहाणा हळूच कल्टी मारायचा मग पुढचा अर्धा तास आगठा धगधगत रहायचा.त्यात आपसुक सदा व मधा ही मग उतरत.भांडणाला निमीत्त ही अतिशय क्षुल्लक असायचं.वाटे पडतांना भिकाबाच्या चार येली घराची दोन -दोन येलीमध्ये विभागणी झाली. होती मध्ये भिंत चढत एका भागात सदा व दुसऱ्या भागात मधा.या धक्क्यानं भिकाबा गेला नी ओटा अखंड चार येलीचा राहिला.मग ओट्यावर कधी मधाकडं कुणी शहाणंसुरतं बसलं असलं की सुली मुद्दाम झाडायला निघत धूळ उडवे नी मग कमली धूरळा उठवे.कधी सदाकडं कुणी ओट्यावर बसलेलं असलं की मग कमली कुरबुर काढे.
कधी कधी मागच्या गटारीचं पाणी अंगणात आलं यावरुनही पानीपत उभं राही.नळ सामाईक होता कमळीचे चार हंडे भरले की सुली चार हंडे भरे.कधी मध्येच नळ फुस्स झाले की मला कमी हंडे पाणी मिळालं यावरूनही पाणी पेटे.तर कधी विजेचं मीटर सामाईक असल्यानं कमलीनं हिटर लावलं की सुली शेगडी लावे नी मग महिन्यानंतर अव्वाच्या सव्वा फुगलेलं बील आलं की गल्लीत महिनाभर 'तु काय काय काय वापरलं याचा दोघी पाढा वाचत.घरी या बायांचं चालायचं तर यामुळे शेतात भावा- भावांचा 'लख्या दांगडो' चालायचा.सदाचा बैल चरता चरता मधाच्या शेतात आला की मधा सरळ कोंडवाड्यात कोंडे .सदाचं दुपारुन औतच बंद.मग तो शोध शोध शोधी व बैलाला कोंडवाड्यातून सोडत घरला आणी.पुढच्या वेळी तो पाळतीवरच राही.मधाचं लक्ष नाही पाहुन तो मग याची दुभती गाय, म्हैस गावच्या कोंडवाड्याऐवजी चार पाच मैलावरील दुसऱ्या गावच्या कोंडवाड्यात कोंडून यायचा व दूध काढायच्या वेळी जोरानं "सुली म्हैस आली का बघ तं धार काढायची आहे"म्हणत मधाला मिरची चोळी.हे सतत चालायचं.
शेताची वाटणी होऊनही मधा 'मला कमी मिळालं 'म्हणे तर सदा 'मला हलकं मिळालं'असं टुमणं लावत.गावातले पुढारी बोलवुन दोन दा नव्याने वाटणी होऊन ही दोघांनी कोर्टात केस टाकली.दोघं तारखावर जाऊ लागले.गावाला पुरतं समजून चुकलं की आता याचं सात जन्मात सख्य होणार नाही.दिवस वर्ष जात राहिले दोघांचा संसार चालत फुलत राहिला.मधाच्या मुलीचं पुण्याला लग्न जमलं.कमळी मुलीच्या सासरच जावयाचं कौतुक ओट्यावर उभं राहत सुलीला ऐकवू लागली.सुलीही नवऱ्याला 'अजिबात मदत द्यायची नाही व लग्नाला ही जायचं नाही' म्हणुन सुनवू लागली.हे ऐकुन कमळी आडपडद्यानं बोलवणारच नाही तुला असं सुनवू लागली. पण तरी लोक लाजेस्तव मधानं पुढारी हाताशी घेत सदाला निमंत्रण दिलं तर सदा ही ऐनवेळी मंडपात अक्षता टाकायला गेलाच. मधावर पोरीच्या लग्नाचं कर्ज झालं त्यानं शेत गहाण टाकलं. पुढे पडलेला दुष्काळ व व्याज यानं शेत विकावंच लागणार दिसू लागलं.सदा मात्र दिवसेंदिवस शिल्लकी होत गेला.
भांडणं रुसवे फुगवे सुरूच राहिले.त्यातच मधाच्या मुलाला डोक्यात मेंदुला गाठ झाली. त्याचं मोठं आॅपरेशन करावं लागणार होतं.जावई-मुलीनं त्याला अॅडमीट केलं.पण खर्च लाखोवर लागणार होता.जावई ही जेमतेम .कितीक देणार .दोनक लाख जमवले.बाकीचा कुठुन उभा करणार मधापुढं प्रनश्न उभा राहिला.शेत तर आधीच गहाण ,व्याज फुगलेलं.विकुनही किती पैसा हातात राहिल.तरी विकल्या शिवाय पर्याय नव्हता.पण विकायचं तर सावकाराला कशाला.कसं ही झालं तरी वडिलोपार्जित वतन आहे दुसऱ्याच्या घशात घालण्यापेक्षा सद्यालाच देऊ.घरातच राहिल.मपण त्याच्या दारात जायचं कसं?म्हणुन मध्ये गावातल्या भल्याला टाकत सदाला छेडलं.सदाला मुलाची काहीच कल्पना नव्हती.त्यानं सपशेल "त्याची जमीन त्यानं कुणालाही विकावी.मला ऐपत नाही.व मी घेणार नाही.स्पष्ट शब्दात सुनावलं.त्यामागं भावानं कसं ही करुन व्याज लावुन धकवावं व या वर्षी नाही तर पुढचं वर्ष चांगलं उत्पन्न येईन व कर्ज फिटेल जमीन राहील तशीच हा त्याचा हेतू.मधल्या माणसांनं निरोप आणताच मधाच्या आतड्याला पिळ पडला.संकटात देखील सदानं असं बोलावं याचं त्याला वाईट वाटलं व तो पुण्याला निघून गेला.जावयाची विनवणी करत पावसाळ्यात जमीनीला गिऱ्हाईक नाही तुर्त काही तरी तजवीज करा म्हणुन पाया पडला.जावईला प्रश्न पडला.त्यानं सेवाभावी संस्थाना मदतीचं आवाहन केलं.व बॅंकेतही कर्ज प्रकरण टाकलं.कारण आॅपरेशनला ब्रिटनहून तज्ञ डाॅक्टर येणार होता.व ही तारीख टळली तर दोन महिन्यानंतरच येणार होता.तो पावेतो गाठ राहणं मुश्कील होतं.
इकडं तीन वर्षांनंतर च्या दुष्काळानंतर या वर्षी आभाळानं बरसायला सुरुवात जी केली ती आज तिसरा दिवस उगवूनही उघडायचं नाव घेईना.नाले ओहोळ नद्या तट्ट फुगून वाहू लागले.विहीरींना डोंगरांना जिव्हाळा फुटुन सबडब करू लागले.जिकडे-तिकडे पाणीच पाणी . हाहाकार माजला.रस्ते तुटले,वाहुन गेले.वाहतुक बंद झाली.
सदाला मुलाला अॅडमीट केलंय व त्याला लाखो रूपये खर्च येतोय म्हणुन भाऊ शेत विकतोय हे कळताच तो सैर बैर झाला.त्याला आपला बा भिकुबाचे "पोरा तोरणाला नाही पण मरणाला जावचं माणसानं मग ते दुश्मनाचं का असेना"बोल आठवू लागले. पण आता पुण्याला जायचं कसं?तितक्यात जावयानं फेसबुक वर मदतीचं आवाहन केलेलं आवाहनाचं नोटिफिकेशन दिसलं.त्यानं अकाउंट नंबर घेतला.व कसं तरी तालुक्याला पोहोचला.बॅकेतुन अकाउंटला पैशे ट्रांसफर केले व तो परतला तो तसाच शेतात.कापुसाचं शेत पाण्यात बुडालं होतं.त्यानं बांध फोडले व पाणी बाहेर काढलं.भावाच्या शेतातही तीच गत .भाऊ इथं असता तर त्यानं ढुंकुनही पाहिलं नसतं पण तो आता नाही म्हणुन त्याच्या शेतातलेही बांध फोडत पाणी काढलं.संध्याकाळ झाली.काळ्या ढगानं भरलेल्या आभाळात श्रावणी पुनव असुनही लवकर झाकोळ झाला.सदा नाल्याच्या छातीइतक्या पाण्यातुन उतरत घरी परतू लागला.पण तोच त्या नाल्यावरील वरच्या बाजूचा बांध फुटल्यानं अचानक पाण्याचा लोट रों रों रों करत आला व सदाचे पाय वर उठले काही कळायच्या आत सदा प्रवाहात वाहू लागला.पोहता येत नसल्यानं गटांगळ्या खाऊ लागला. अंधार पसरत होता.लोटाबरोबर सदा वाहत होता.तोच त्याला छोटंसं झाड प्रवाहात अंधुकसं दिसलं.ते पकडत तो वाहू लागला.नाला तेथून सहा सात मैलावर तापीला भेटण्याआधी मावळतीकडुन असाच एक मोठा नाला येऊन मिळायचा.व या संगमाच्या पुढे जुन उठलेल्या गावाचं गावठाण लागे.दोन्ही प्रवाह एक होताच सदा आठ दहा फूट वर तरंगायला लागला.सारीकडं अंधार पण प्रवाहावरून त्याला दुसऱ्या नाल्याचा प्रवाह मिळाल्याचं समजून चुकला.तोच झाडाची फांदी कशात तरी अडकुन थांबली होती.आधीचं गाव उठून दुर वसलं होतं पण मारीतीचं देऊळ तिथंच नाल्याच्या काठावर होतं गावकऱ्यांनी जिर्णोध्दार करत त्याला सजवलं होतं त्याच मंदिराच्या कळसावरील झेंड्याचा लोखंडी अॅंगलमध्ये फांदी अडकली होती.सदानं अॅंगल पकडत प्रवाहाच्या लाटेनं कळसावर चढत बसला.त्यानं रात्र काढली.दिवसा त्याला जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागलं.हा भाग गावापासून बराच लांब असल्यानं व सतत मुसळधार पडणाऱ्या पावसानं इकडं कुणी फिरकण्याचा प्रश्नच नव्हता.
आॅपरेशन तर पुरेसे पैशे नसतांनाही उरकलं होतं.पण अकाउंटला आलेली रक्कम पाहुन जावयाला सुखद धक्का बसला.त्याला वाटलं एखाद्या सेवाभावी संस्थेनं टाकली असावी.घाईत त्यानं कुणी टाकली हे पाहिलंच नाही.व सदानं "बापु भावाचं शेत घेण्याइतपत मी मोठा नाही व दुसऱ्यला विकु देईल इतका लहानही नाही.पैसे पाठवलेत भावाला सांगू नका .परत नाही मिळाले तरी चालतील पण आमचं पोरगं वाचलं पाहिजे",हा पाठवलेला मॅसेज ही पाहिला नाही.आॅपरेशन होताच मधा पावसाच्या व पैशाच्या चिंतेनं बाईला ठेवत घराकडं परतला.परततांना शेत सावकाराला घालतो व येतो सांगितलं.रेल्वे सुरु असल्यानं जेमतेम कसाबसा जिल्ह्याला आला पण तालुक्याला गाडीच नव्हती कसा बसा ट्रक ,पायी करत तो तालुका व गावी पोहोचला.तोच सुली रडतच सामोरी आली."काल सकाळनं तालुक्याला गेलेले हे परत आलेच नाही,काहींनी काल संध्याकाळी शेताकडं जातांना ओझरतं पाहिलंय"
पोरांच्या काळजीनं व शेत विकत घेऊन मदत न केल्यानं मधा संतापातच होता."तो आला नाही तर मी काय करू.जा शोधा .मला काय सांगता"म्हणत संतापात त्यानं दार उघडलं.कालपासून त्यानं काहीच खाल्लं नसल्यानं पिठाचं डब्बं उतरवत भाकरी बडवली.भाकरी तिखट तेल टाकत तो खाण्यासाठी बसला.तोच त्याला आतचन गलबलून आलं "मध्या लेका ,तु जेवायला बसला पण सदा कुठं असेल.कालपासुन तो आला नाही. व हा मरणाचा पाऊस कुठं अडकला असेल तर?"त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.त्यानं एक घास उचलला.भाकरीचा पाया पडला व ढसाढसा पाणी पिऊन तसाच बाहेर पडला.
'ओझरतं शेताकडं जातांना पाहिलं' हे वाक्य त्याच्या मन:पटलावर घिरट्या घालत होतं.पाड्याची रात्र चढत होती.पावसानं झडकनानं गारठलेली कुत्री त्राण नसतांनाही जिवाचा आकांत करत भुंकत होती.वाटेतल्या किसनबाच्या वडावरच्या ढोलीतलं ओलेतं घुबड घुत्कारू लागलं.झोपडीवर झोपलेल्या किसनबानं मधाला कुठं चालला म्हणुन टोकलं.मधानं सदाला हुडकायला इतकं सांगत निघाला.मधानं चपखल अंदाज बांधला.तालुक्यावरनं हा थेट शेतात गेला असावा बांध फोडायला.व नाला बांध फुटून अचानक आल्यानं व पोहता येत नसल्यानं.....
मधा नाल्याजवळ आला.विजेरी चमकवत त्यानं नाल्याकडं पाहिलं.तो धास्तावला.तो आरोळ्या ठोकत ठोकत नाल्याच्या काठा काठानं जुन्या गावाकडं सरकू लागला.पायात पाण्यात वाहून आलेलं किडूक अडकलं.त्यानं पायाला हिसका देत झटकलं.रात्रीच्या एक वाजेपर्यत तो चिखल तुडवत काट्या कुट्यातून गावठाणात आला."सदा,सद्या भावा"घोष सुरुच होता.मंदिराच्या आसपास आला.अर्धवठ झोपेत अॅंगल धरलेल्या सदाला मधाचा आवाज ऐकू येताच तो बेंबीच्या देठापासून रडतच"दादा,दादा"आरडू लागला.थंडीचा बसलेला आवाज ऐकताच आपला सद्या जिवंत आहे यानं उपाशी मधाला हत्तीचं बळं आलं.
"सदा, भावा घाबरू नको तुझा दादा आला ना!"
"दादा लवकर कर माझे हात सुटायला आलेत आता"सदा ओक्साबोक्शी रडत विनवू लागला.
मधा उफराटा वर बरच अंतर चालत गेला व पाण्यात उडी मारली.भर पुरात अंधारात भावाची जिव्हाई,आतड्याचा जिव्हाळाच त्याला दिसत होता.पोहत पोहत तो कळसापर्यत पोहोचला.त्यानं सदाला पाठीवर घेत अॅंगल धरला व उजाडण्याची वाट पाहू लागला.पण पाणी वाढतच असल्यानं लवकरच अॅंगल सोडावा लागेल याची त्याला जाणीव झाली.त्यानं सदाला पक्क मानगूट पकडायला लावलं व भर पुरात उडी मारली .पोहत पोहत तो काठ जवळ करू लागला.सदाला आता ग्लानी यायला लागली.काठ काही फूटावर बाकी असतांना त्याचे पाय पाण्यात टेकले गेले तेच गाळात.तो ते काढु लागताच जासृत फसू लागले.त्यानं गांभिर्य ओळखलं.तोच लाकुड वाहत येतांना दिसलं त्यानं शिताफीनं पकडत काठावर टेकवलं.सदाला त्यावर चढवत काठावर काढलं.पण त्याला निघता येईना.लाकुड पकडून वाहता पण येईना.सदा सुखरुप निघताच त्याला हायसं वाटलं.सदा ग्लानी येऊन काठावर पडला व इकडं मधा गाळात फसतच चालला.
सदाला शुद्ध येताच तो आजुबाजुला पाहू लागला पण मधा कुठं होता.त्यानं आक्रोश करत काठ धुंडाळला पण व्यर्थ.
पाणी उतरताच किसनाबा लोकांना घेऊन आला तोच मधाचे केस उघडे पडले.गाळात गळ्यापर्यत रुतलेला मधा उघड्या डोळ्यांनी समाधानानं पाहत असल्याचा दिसत होता........
सदानं हंबरडा फोडताच भावा भावाच्या जिव्हाईनं सारा काठ शहारला व पूर ओसरला.
सदानं बोंब ठोकत मडकं सोडलं व भावाला अग्नीडाग दिला.त्याच वेळी मॅसेज पाहताच जावयानं डोळ्याच्या कडा पुसत सदामामाचा हात हातात धरला.
"वहिनी खरच हो आता माझाही नाईलाज आहे "म्हणत तो शहाणा हळूच कल्टी मारायचा मग पुढचा अर्धा तास आगठा धगधगत रहायचा.त्यात आपसुक सदा व मधा ही मग उतरत.भांडणाला निमीत्त ही अतिशय क्षुल्लक असायचं.वाटे पडतांना भिकाबाच्या चार येली घराची दोन -दोन येलीमध्ये विभागणी झाली. होती मध्ये भिंत चढत एका भागात सदा व दुसऱ्या भागात मधा.या धक्क्यानं भिकाबा गेला नी ओटा अखंड चार येलीचा राहिला.मग ओट्यावर कधी मधाकडं कुणी शहाणंसुरतं बसलं असलं की सुली मुद्दाम झाडायला निघत धूळ उडवे नी मग कमली धूरळा उठवे.कधी सदाकडं कुणी ओट्यावर बसलेलं असलं की मग कमली कुरबुर काढे.
कधी कधी मागच्या गटारीचं पाणी अंगणात आलं यावरुनही पानीपत उभं राही.नळ सामाईक होता कमळीचे चार हंडे भरले की सुली चार हंडे भरे.कधी मध्येच नळ फुस्स झाले की मला कमी हंडे पाणी मिळालं यावरूनही पाणी पेटे.तर कधी विजेचं मीटर सामाईक असल्यानं कमलीनं हिटर लावलं की सुली शेगडी लावे नी मग महिन्यानंतर अव्वाच्या सव्वा फुगलेलं बील आलं की गल्लीत महिनाभर 'तु काय काय काय वापरलं याचा दोघी पाढा वाचत.घरी या बायांचं चालायचं तर यामुळे शेतात भावा- भावांचा 'लख्या दांगडो' चालायचा.सदाचा बैल चरता चरता मधाच्या शेतात आला की मधा सरळ कोंडवाड्यात कोंडे .सदाचं दुपारुन औतच बंद.मग तो शोध शोध शोधी व बैलाला कोंडवाड्यातून सोडत घरला आणी.पुढच्या वेळी तो पाळतीवरच राही.मधाचं लक्ष नाही पाहुन तो मग याची दुभती गाय, म्हैस गावच्या कोंडवाड्याऐवजी चार पाच मैलावरील दुसऱ्या गावच्या कोंडवाड्यात कोंडून यायचा व दूध काढायच्या वेळी जोरानं "सुली म्हैस आली का बघ तं धार काढायची आहे"म्हणत मधाला मिरची चोळी.हे सतत चालायचं.
शेताची वाटणी होऊनही मधा 'मला कमी मिळालं 'म्हणे तर सदा 'मला हलकं मिळालं'असं टुमणं लावत.गावातले पुढारी बोलवुन दोन दा नव्याने वाटणी होऊन ही दोघांनी कोर्टात केस टाकली.दोघं तारखावर जाऊ लागले.गावाला पुरतं समजून चुकलं की आता याचं सात जन्मात सख्य होणार नाही.दिवस वर्ष जात राहिले दोघांचा संसार चालत फुलत राहिला.मधाच्या मुलीचं पुण्याला लग्न जमलं.कमळी मुलीच्या सासरच जावयाचं कौतुक ओट्यावर उभं राहत सुलीला ऐकवू लागली.सुलीही नवऱ्याला 'अजिबात मदत द्यायची नाही व लग्नाला ही जायचं नाही' म्हणुन सुनवू लागली.हे ऐकुन कमळी आडपडद्यानं बोलवणारच नाही तुला असं सुनवू लागली. पण तरी लोक लाजेस्तव मधानं पुढारी हाताशी घेत सदाला निमंत्रण दिलं तर सदा ही ऐनवेळी मंडपात अक्षता टाकायला गेलाच. मधावर पोरीच्या लग्नाचं कर्ज झालं त्यानं शेत गहाण टाकलं. पुढे पडलेला दुष्काळ व व्याज यानं शेत विकावंच लागणार दिसू लागलं.सदा मात्र दिवसेंदिवस शिल्लकी होत गेला.
भांडणं रुसवे फुगवे सुरूच राहिले.त्यातच मधाच्या मुलाला डोक्यात मेंदुला गाठ झाली. त्याचं मोठं आॅपरेशन करावं लागणार होतं.जावई-मुलीनं त्याला अॅडमीट केलं.पण खर्च लाखोवर लागणार होता.जावई ही जेमतेम .कितीक देणार .दोनक लाख जमवले.बाकीचा कुठुन उभा करणार मधापुढं प्रनश्न उभा राहिला.शेत तर आधीच गहाण ,व्याज फुगलेलं.विकुनही किती पैसा हातात राहिल.तरी विकल्या शिवाय पर्याय नव्हता.पण विकायचं तर सावकाराला कशाला.कसं ही झालं तरी वडिलोपार्जित वतन आहे दुसऱ्याच्या घशात घालण्यापेक्षा सद्यालाच देऊ.घरातच राहिल.मपण त्याच्या दारात जायचं कसं?म्हणुन मध्ये गावातल्या भल्याला टाकत सदाला छेडलं.सदाला मुलाची काहीच कल्पना नव्हती.त्यानं सपशेल "त्याची जमीन त्यानं कुणालाही विकावी.मला ऐपत नाही.व मी घेणार नाही.स्पष्ट शब्दात सुनावलं.त्यामागं भावानं कसं ही करुन व्याज लावुन धकवावं व या वर्षी नाही तर पुढचं वर्ष चांगलं उत्पन्न येईन व कर्ज फिटेल जमीन राहील तशीच हा त्याचा हेतू.मधल्या माणसांनं निरोप आणताच मधाच्या आतड्याला पिळ पडला.संकटात देखील सदानं असं बोलावं याचं त्याला वाईट वाटलं व तो पुण्याला निघून गेला.जावयाची विनवणी करत पावसाळ्यात जमीनीला गिऱ्हाईक नाही तुर्त काही तरी तजवीज करा म्हणुन पाया पडला.जावईला प्रश्न पडला.त्यानं सेवाभावी संस्थाना मदतीचं आवाहन केलं.व बॅंकेतही कर्ज प्रकरण टाकलं.कारण आॅपरेशनला ब्रिटनहून तज्ञ डाॅक्टर येणार होता.व ही तारीख टळली तर दोन महिन्यानंतरच येणार होता.तो पावेतो गाठ राहणं मुश्कील होतं.
इकडं तीन वर्षांनंतर च्या दुष्काळानंतर या वर्षी आभाळानं बरसायला सुरुवात जी केली ती आज तिसरा दिवस उगवूनही उघडायचं नाव घेईना.नाले ओहोळ नद्या तट्ट फुगून वाहू लागले.विहीरींना डोंगरांना जिव्हाळा फुटुन सबडब करू लागले.जिकडे-तिकडे पाणीच पाणी . हाहाकार माजला.रस्ते तुटले,वाहुन गेले.वाहतुक बंद झाली.
सदाला मुलाला अॅडमीट केलंय व त्याला लाखो रूपये खर्च येतोय म्हणुन भाऊ शेत विकतोय हे कळताच तो सैर बैर झाला.त्याला आपला बा भिकुबाचे "पोरा तोरणाला नाही पण मरणाला जावचं माणसानं मग ते दुश्मनाचं का असेना"बोल आठवू लागले. पण आता पुण्याला जायचं कसं?तितक्यात जावयानं फेसबुक वर मदतीचं आवाहन केलेलं आवाहनाचं नोटिफिकेशन दिसलं.त्यानं अकाउंट नंबर घेतला.व कसं तरी तालुक्याला पोहोचला.बॅकेतुन अकाउंटला पैशे ट्रांसफर केले व तो परतला तो तसाच शेतात.कापुसाचं शेत पाण्यात बुडालं होतं.त्यानं बांध फोडले व पाणी बाहेर काढलं.भावाच्या शेतातही तीच गत .भाऊ इथं असता तर त्यानं ढुंकुनही पाहिलं नसतं पण तो आता नाही म्हणुन त्याच्या शेतातलेही बांध फोडत पाणी काढलं.संध्याकाळ झाली.काळ्या ढगानं भरलेल्या आभाळात श्रावणी पुनव असुनही लवकर झाकोळ झाला.सदा नाल्याच्या छातीइतक्या पाण्यातुन उतरत घरी परतू लागला.पण तोच त्या नाल्यावरील वरच्या बाजूचा बांध फुटल्यानं अचानक पाण्याचा लोट रों रों रों करत आला व सदाचे पाय वर उठले काही कळायच्या आत सदा प्रवाहात वाहू लागला.पोहता येत नसल्यानं गटांगळ्या खाऊ लागला. अंधार पसरत होता.लोटाबरोबर सदा वाहत होता.तोच त्याला छोटंसं झाड प्रवाहात अंधुकसं दिसलं.ते पकडत तो वाहू लागला.नाला तेथून सहा सात मैलावर तापीला भेटण्याआधी मावळतीकडुन असाच एक मोठा नाला येऊन मिळायचा.व या संगमाच्या पुढे जुन उठलेल्या गावाचं गावठाण लागे.दोन्ही प्रवाह एक होताच सदा आठ दहा फूट वर तरंगायला लागला.सारीकडं अंधार पण प्रवाहावरून त्याला दुसऱ्या नाल्याचा प्रवाह मिळाल्याचं समजून चुकला.तोच झाडाची फांदी कशात तरी अडकुन थांबली होती.आधीचं गाव उठून दुर वसलं होतं पण मारीतीचं देऊळ तिथंच नाल्याच्या काठावर होतं गावकऱ्यांनी जिर्णोध्दार करत त्याला सजवलं होतं त्याच मंदिराच्या कळसावरील झेंड्याचा लोखंडी अॅंगलमध्ये फांदी अडकली होती.सदानं अॅंगल पकडत प्रवाहाच्या लाटेनं कळसावर चढत बसला.त्यानं रात्र काढली.दिवसा त्याला जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागलं.हा भाग गावापासून बराच लांब असल्यानं व सतत मुसळधार पडणाऱ्या पावसानं इकडं कुणी फिरकण्याचा प्रश्नच नव्हता.
आॅपरेशन तर पुरेसे पैशे नसतांनाही उरकलं होतं.पण अकाउंटला आलेली रक्कम पाहुन जावयाला सुखद धक्का बसला.त्याला वाटलं एखाद्या सेवाभावी संस्थेनं टाकली असावी.घाईत त्यानं कुणी टाकली हे पाहिलंच नाही.व सदानं "बापु भावाचं शेत घेण्याइतपत मी मोठा नाही व दुसऱ्यला विकु देईल इतका लहानही नाही.पैसे पाठवलेत भावाला सांगू नका .परत नाही मिळाले तरी चालतील पण आमचं पोरगं वाचलं पाहिजे",हा पाठवलेला मॅसेज ही पाहिला नाही.आॅपरेशन होताच मधा पावसाच्या व पैशाच्या चिंतेनं बाईला ठेवत घराकडं परतला.परततांना शेत सावकाराला घालतो व येतो सांगितलं.रेल्वे सुरु असल्यानं जेमतेम कसाबसा जिल्ह्याला आला पण तालुक्याला गाडीच नव्हती कसा बसा ट्रक ,पायी करत तो तालुका व गावी पोहोचला.तोच सुली रडतच सामोरी आली."काल सकाळनं तालुक्याला गेलेले हे परत आलेच नाही,काहींनी काल संध्याकाळी शेताकडं जातांना ओझरतं पाहिलंय"
पोरांच्या काळजीनं व शेत विकत घेऊन मदत न केल्यानं मधा संतापातच होता."तो आला नाही तर मी काय करू.जा शोधा .मला काय सांगता"म्हणत संतापात त्यानं दार उघडलं.कालपासून त्यानं काहीच खाल्लं नसल्यानं पिठाचं डब्बं उतरवत भाकरी बडवली.भाकरी तिखट तेल टाकत तो खाण्यासाठी बसला.तोच त्याला आतचन गलबलून आलं "मध्या लेका ,तु जेवायला बसला पण सदा कुठं असेल.कालपासुन तो आला नाही. व हा मरणाचा पाऊस कुठं अडकला असेल तर?"त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.त्यानं एक घास उचलला.भाकरीचा पाया पडला व ढसाढसा पाणी पिऊन तसाच बाहेर पडला.
'ओझरतं शेताकडं जातांना पाहिलं' हे वाक्य त्याच्या मन:पटलावर घिरट्या घालत होतं.पाड्याची रात्र चढत होती.पावसानं झडकनानं गारठलेली कुत्री त्राण नसतांनाही जिवाचा आकांत करत भुंकत होती.वाटेतल्या किसनबाच्या वडावरच्या ढोलीतलं ओलेतं घुबड घुत्कारू लागलं.झोपडीवर झोपलेल्या किसनबानं मधाला कुठं चालला म्हणुन टोकलं.मधानं सदाला हुडकायला इतकं सांगत निघाला.मधानं चपखल अंदाज बांधला.तालुक्यावरनं हा थेट शेतात गेला असावा बांध फोडायला.व नाला बांध फुटून अचानक आल्यानं व पोहता येत नसल्यानं.....
मधा नाल्याजवळ आला.विजेरी चमकवत त्यानं नाल्याकडं पाहिलं.तो धास्तावला.तो आरोळ्या ठोकत ठोकत नाल्याच्या काठा काठानं जुन्या गावाकडं सरकू लागला.पायात पाण्यात वाहून आलेलं किडूक अडकलं.त्यानं पायाला हिसका देत झटकलं.रात्रीच्या एक वाजेपर्यत तो चिखल तुडवत काट्या कुट्यातून गावठाणात आला."सदा,सद्या भावा"घोष सुरुच होता.मंदिराच्या आसपास आला.अर्धवठ झोपेत अॅंगल धरलेल्या सदाला मधाचा आवाज ऐकू येताच तो बेंबीच्या देठापासून रडतच"दादा,दादा"आरडू लागला.थंडीचा बसलेला आवाज ऐकताच आपला सद्या जिवंत आहे यानं उपाशी मधाला हत्तीचं बळं आलं.
"सदा, भावा घाबरू नको तुझा दादा आला ना!"
"दादा लवकर कर माझे हात सुटायला आलेत आता"सदा ओक्साबोक्शी रडत विनवू लागला.
मधा उफराटा वर बरच अंतर चालत गेला व पाण्यात उडी मारली.भर पुरात अंधारात भावाची जिव्हाई,आतड्याचा जिव्हाळाच त्याला दिसत होता.पोहत पोहत तो कळसापर्यत पोहोचला.त्यानं सदाला पाठीवर घेत अॅंगल धरला व उजाडण्याची वाट पाहू लागला.पण पाणी वाढतच असल्यानं लवकरच अॅंगल सोडावा लागेल याची त्याला जाणीव झाली.त्यानं सदाला पक्क मानगूट पकडायला लावलं व भर पुरात उडी मारली .पोहत पोहत तो काठ जवळ करू लागला.सदाला आता ग्लानी यायला लागली.काठ काही फूटावर बाकी असतांना त्याचे पाय पाण्यात टेकले गेले तेच गाळात.तो ते काढु लागताच जासृत फसू लागले.त्यानं गांभिर्य ओळखलं.तोच लाकुड वाहत येतांना दिसलं त्यानं शिताफीनं पकडत काठावर टेकवलं.सदाला त्यावर चढवत काठावर काढलं.पण त्याला निघता येईना.लाकुड पकडून वाहता पण येईना.सदा सुखरुप निघताच त्याला हायसं वाटलं.सदा ग्लानी येऊन काठावर पडला व इकडं मधा गाळात फसतच चालला.
सदाला शुद्ध येताच तो आजुबाजुला पाहू लागला पण मधा कुठं होता.त्यानं आक्रोश करत काठ धुंडाळला पण व्यर्थ.
पाणी उतरताच किसनाबा लोकांना घेऊन आला तोच मधाचे केस उघडे पडले.गाळात गळ्यापर्यत रुतलेला मधा उघड्या डोळ्यांनी समाधानानं पाहत असल्याचा दिसत होता........
सदानं हंबरडा फोडताच भावा भावाच्या जिव्हाईनं सारा काठ शहारला व पूर ओसरला.
सदानं बोंब ठोकत मडकं सोडलं व भावाला अग्नीडाग दिला.त्याच वेळी मॅसेज पाहताच जावयानं डोळ्याच्या कडा पुसत सदामामाचा हात हातात धरला.
✒वासुदेव पाटील.