मीरा आणि अक्का दोघी मंदिरातून चालत वाड्याबाहेर येतात. वाड्याबाहेर गावातल्या लोकांची खुप गर्दी जमलेली असते. गर्दी पाहुन दोघी घाबरतात. लोकांच्या बोलन्यातून वाड्यात आग लागल्याचे समजले. वाड्याच्या एकदम वरच्या मजल्यावरुन, जिथे मीरा आणि संग्रामची खोली आहे तिथून धुर बाहेर येत होता. सगळ्यात वरच्या मजल्यावर आग लागल्याचे एकाने सांगितले. गावातल्या काही लोकांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणली खरी पण आग कशामुळे लागली याचे कारण कोणालाच समजले नाही. मीरा संग्रामजवळ जाऊन वर खोलीत जाण्याचा हट्ट करू लागली. दोघे वर येऊन पाहतात तर त्यांना लग्नात मिळालेले सगळे नवीन सामान जळून ख़ाक झाले होते. पाठोपाठ अक्का वर आल्या. मीरा अककांच्या गळ्यात पडून रडु लागली. उरले सुरले सगळे चांगले सामान हळू हळू वरतून खाली आनण्यात आले. आग कशी लागली याचे कारण कोणालाही स्पष्ट झाले नाही. आग लागली तेव्हा संग्रामचे वडील तात्या खाली बैठकीत बसले होते. वरती काहीतरी आवाज झाला असे ते सांगत होते. वर गेल्यावर आग पसरली होती मग गावकरयांना बोलवुन पाणी टाकले असे ते सांगत होते. संग्राम आणि मीराला वाड्यात खाली बैठकीजवळच कोपर्यात एक खोली देण्यात आली. देवयानीनेच काहीतरी केले असणार मीराला शंका येऊ लागली. संध्याकाळ होत आली होती, मीराचे लक्ष सारखे घड्याळाकड़े जायचे. मीरा किचनमध्ये काम आवरत होती आणि देवयानी मीराच्या पुढे येऊन उभी राहिली. मीरा घाबरली. देवयानी हसत म्हणाली," काय मीरा कस वाटतंय आता वरतून खाली आल्यावर?" देवयानी मीराची कुचेष्टा करत होती. मीरा म्हणाली," हे बघ देवयानी, प्लीज तू हां वाड़ा सोडुन जा माझ्या घरच्या लोकांना त्रास देऊ नकोस." एवढ्यात घड्याळाने 7 चा टोल दिला आणि देवयानीने मीराच्या शरीरात प्रवेश केला. मीराचे डोळे पांढरे झाले. तिचे एक वेगळेच हिंस्र रूप दिसू लागते. तीने गॅसवर ठेवलेले दूध जोरात खाली जमिनीवर फेकून दिले.. आवाज ऐकून अक्का किचनमध्ये आल्या. " बाई काय चाललाय या वाड्यात, मीरा हे काय केले तू?"अक्का म्हणाल्या. मीरा त्यांना उद्धटपणे बोलली" काय करायचे आणि काय नाही हे तुम्ही सांगू नका मला समजलं." आणि तिथून निघुन गेली. मीराचे अशी उर्मट भाषा ऐकून अककांना नवल वाटले. अक्कांच्या नंतर लक्षात येते की मीराने मंदिरात जे सांगितले होते ते बहुतेक खरे असेल. मीरा अस उद्धटपणे कधीच नाही बोलणार. ही नक्कीच देवयानी असणार. सकाळी वाड्यात आग हिनेच लावली असणार. रात्री सगळ्यांची जेवणं झाली पण मीरा खोली बाहेर आली नाही आणि अककांची ही हिम्मत झाली नाही तिच्या खोलीत जाण्याची. ही चेटकिन कधी काय करेन सांगता येत नाही, अक्का खुप घाबरल्या होत्या. संग्राम बाहेर शतपाऊली करत होता. मीरा अजुन जेवली नाही म्हणून अक्काने संग्रामला आत बोलावले. मीराच्या खोलीत लाईट चालू बंद होत होती. संग्राम आत खोलीत येतो. मीरा मोकळे केस सोडून मुद्दाम बेड जवळची लाईट चालु बंद करत होती. संग्राम म्हणाला," मीरा काय आहे हे? आणि तू जेवली का नाहीस?" मीरा (देवयानी) उठली आणि संग्रामचा हाथ पकडून त्याला जवळ ओढले. त्याला बेडवर घेऊन गेली आणि लाईट बंद केली. संग्रामला पाहुन देवयानीची वासना अजुन रंगत होती. आता ती संग्रामचे कपडे काढू लागली. संग्रामला मीराचे हे वागने खुप विचित्र वाटू लागले. त्याने मीराला बाजूला करुन सरळ खोली बाहेर आला. अक्का बाहेरच उभ्या होत्या. "काय रे येतीये ना ती जेवायला?" अक्कानी विचारले. संग्राम थोडं रागात बोलला," नाही तिला भूक नाहिये, तू झोपी जा." अस बोलून तो बैठकींत झोपायला जातो. या देवयानीची काहीतरी नक्कीच गड़बड़ आहे वाड्यात अक्काला वाटू लागते. यावर नक्कीच काहीतरी उपाय करावा लागेल. अक्का देवघरात जाऊन वेगवेगळे ग्रंथ चाळु लागल्या. सगळे धार्मिक पुस्तके बाहेर काढली. त्यांना यावर काहीतरी उपाय माहिती असेल पण त्यांना तो ग्रंथ सापडत नव्हता. शेवटी सगळं पुन्हा वर ठेवून दिले आणि एक ग्रंथ अक्काकडून खालीच राहतो. 'ब्रम्हयज्ञ' नावाच्या त्या ग्रंथात या अनाठायी भयानक गोष्टींचा उल्लेख आहे अककांना माहिती होते. अक्का रात्रभर तो ग्रंथ वाचत बसतात.
देवयानीची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली होती तसा ती मीराला अजुन त्रास देऊ लागली. रात्रभर संग्रामसोबत राहून तिने मीराचा बायको असण्याचा हकक हिरावुन घेतला होता. रात्री मीराच्या शरीरात प्रवेश करुन सगळे नवरा-बायकोचे सुख देवयानीला मिळत होते. संग्रामला याबद्दल काहीच माहिती नव्हते, मीरा पूर्णपणे एकटी पडली होती. सकाळी मीरा अंघोळ वगैरे आवरून देवघरात आली. आज मीराने माता चंडाईच्या उपासनेचा निरंकार उपवास धरला होता. अककांची देवपुजा चालली होती. पुजा संपल्यावर अक्कानी मीराच्या हातावर उपवासाचा प्रसाद दिला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी मीरा रडु लागली, तिच्या डोळ्यांतून पाणी आले. मीरा रडत म्हणाली,"अक्का मला यातून बाहेर काढ़ा अक्का..काहीतरी करा नाहीतर ही चेटकिन आपल्या कोणालाच जिवंत सोडणार नाही." अक्का म्हणाल्या," घाबरु नको पोरी, आपण लवकरच यावर उपाय करू. हां देव आहे आपल्या पाठीशी." मीरा सांगू लागली," लग्न होऊन दोन महीने होतील आता तशी ही देवयानी या पींपळवाड्यात भटकत आहे. माझं जगणं मुश्किल केल आहे या भुताटकीने"... अक्का म्हणाल्या,"मीरा, रात्री एक ग्रंथ वाचला मी, त्यात तुमच्या गावाकडच्या डमरूबाबांचा उल्लेख आहे..त्यांना जमतो हां खेळ असं वाचलय मी त्यात..त्यांना या गोष्टींचे खुप ज्ञान आहे, यासाठी मोठे मोठे हवन, यज्ञ करतात असे ऐकले पण आहे मी.." मीरा म्हणाली," हो डमरूबाबांची बुद्धी खुप चालाख आहे याबाबतीत अस आई सांगायची. आपण जावुयात का त्यांच्याकडे?"...अक्का म्हणाल्या," अगं मीरा, उद्या अमावस्या आहे. आपल्याला त्यांच्याकडे जायला रात्र होईल..ही देवयानी तुझा तिथेही पीछा सोडणार नाही, उगच प्रवासात तीने डाव खेळला तर अवघड होईल.. आपण परवा सकाळी लवकर निघुया आणि डमरूबाबांना पिंपळवाड्यात घेऊन येउयात, तेच आपल्याला बाहेर काढतील यातून.." मीराला अक्काचे म्हणणे पटले. मीराला आज रात्री देवयानी माझ्या शरीरात घुसून माझ्याकडून काय करून घेईल याचा प्रश्न सतावत होता. आज संध्याकाळी देवघरात मीराने दिवसभर उपवास करून शेवटी उद्यापन करायचे ठरवले होते. मीरा आज रात्रीचा विचार करत होती, आज मी देवघरातून बाहेर निघणारच नाही, बघू ही देवयानी कशी येते माझ्या अंगात....
(क्रमश:)
देवयानीची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली होती तसा ती मीराला अजुन त्रास देऊ लागली. रात्रभर संग्रामसोबत राहून तिने मीराचा बायको असण्याचा हकक हिरावुन घेतला होता. रात्री मीराच्या शरीरात प्रवेश करुन सगळे नवरा-बायकोचे सुख देवयानीला मिळत होते. संग्रामला याबद्दल काहीच माहिती नव्हते, मीरा पूर्णपणे एकटी पडली होती. सकाळी मीरा अंघोळ वगैरे आवरून देवघरात आली. आज मीराने माता चंडाईच्या उपासनेचा निरंकार उपवास धरला होता. अककांची देवपुजा चालली होती. पुजा संपल्यावर अक्कानी मीराच्या हातावर उपवासाचा प्रसाद दिला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी मीरा रडु लागली, तिच्या डोळ्यांतून पाणी आले. मीरा रडत म्हणाली,"अक्का मला यातून बाहेर काढ़ा अक्का..काहीतरी करा नाहीतर ही चेटकिन आपल्या कोणालाच जिवंत सोडणार नाही." अक्का म्हणाल्या," घाबरु नको पोरी, आपण लवकरच यावर उपाय करू. हां देव आहे आपल्या पाठीशी." मीरा सांगू लागली," लग्न होऊन दोन महीने होतील आता तशी ही देवयानी या पींपळवाड्यात भटकत आहे. माझं जगणं मुश्किल केल आहे या भुताटकीने"... अक्का म्हणाल्या,"मीरा, रात्री एक ग्रंथ वाचला मी, त्यात तुमच्या गावाकडच्या डमरूबाबांचा उल्लेख आहे..त्यांना जमतो हां खेळ असं वाचलय मी त्यात..त्यांना या गोष्टींचे खुप ज्ञान आहे, यासाठी मोठे मोठे हवन, यज्ञ करतात असे ऐकले पण आहे मी.." मीरा म्हणाली," हो डमरूबाबांची बुद्धी खुप चालाख आहे याबाबतीत अस आई सांगायची. आपण जावुयात का त्यांच्याकडे?"...अक्का म्हणाल्या," अगं मीरा, उद्या अमावस्या आहे. आपल्याला त्यांच्याकडे जायला रात्र होईल..ही देवयानी तुझा तिथेही पीछा सोडणार नाही, उगच प्रवासात तीने डाव खेळला तर अवघड होईल.. आपण परवा सकाळी लवकर निघुया आणि डमरूबाबांना पिंपळवाड्यात घेऊन येउयात, तेच आपल्याला बाहेर काढतील यातून.." मीराला अक्काचे म्हणणे पटले. मीराला आज रात्री देवयानी माझ्या शरीरात घुसून माझ्याकडून काय करून घेईल याचा प्रश्न सतावत होता. आज संध्याकाळी देवघरात मीराने दिवसभर उपवास करून शेवटी उद्यापन करायचे ठरवले होते. मीरा आज रात्रीचा विचार करत होती, आज मी देवघरातून बाहेर निघणारच नाही, बघू ही देवयानी कशी येते माझ्या अंगात....
(क्रमश:)