हि गोष्ट नाही तर मी अनुभवलेला प्रसंग आहे ...साल २०१० ऑगस्ट महिन्यात मी माझ्या पहिल्या बाळाचे जावळ देवीला
वहायचे म्हणून आम्ही यमाई देवी औंध सातारा येथे नाशिकहुन गाडी ठरवुन निघालो होतो. त्यावेळेस रस्ते पण एवढे चांगले नव्हते ,आणि छोटे बाळ सोबत असल्याने थांबत थांबत जावे लागेल अशा हि शक्यता गृहित धरुन साधारण दहा तासांचा प्रवासाचा वेळ धरला होता.साधारण दुपारी साडेअकरा बारा वाजता आम्ही निघालो... त्याचदिवशी सकाळीच मला मंगळागौरी पुजेचे आमंत्रण होते म्हणून मी पुजेला पाठ नको दाखवायला असा विचार करुन पुजा करुन जेवण करुन मग आम्ही निघालो ... कोकणस्थ ब्राह्मणांकडे च पुजा असल्याने सगळेच कसे अगदी वेळेवर पार पडले आणि आम्ही निघालो .. मी , माझे अहो, आई , बाळ आणि बाळाची देखभाल करणार्या बाई ( हिला देवीचे वारे येत असे)असे आम्ही सगळेच निघालो गाडी ठरवलेली असल्याने ड्रायव्हर पण सोबत होता...फारतर रात्री दहापर्यंत आम्ही पोहोचणार होतो...आणि पहाटे चार वाजता आमची भोगीची पुजा असल्याने रस्त्यात ढाब्यावर जेवण करुन आम्ही फक्त झोपायला गुरुजींच्या घरी जायचे असे ठरले होते...तशी त्यांनी व्यवस्था केली होती...साधारण दोन ठिकाणी आम्ही थांबत थांबत साडेआठ पावणेनऊच्या दरम्यान सातारा सोडले आणि औंधचा रस्ता धरला....एके ठिकाणी तिन रस्ते एकत्र होते आणि ड्रायव्हर ला समजेचना की कोणता रस्त्याने जावे कारण दिशादर्शक फलक सुद्धा कुठेच नव्हते....त्यावेळेस गुगल पण वापरायची पद्धत नव्हती किंवा आम्हाला माहीत नव्हते....आणि तो एरिया ड्रायव्हर साठी तर कायमचाच ओळखीचा होता....त्यामुळे नकाशाची पण काही गरज आहे असे नाही वाटले.....असो ...तेथेच त्या तिन रस्त्यावर उजव्या बाजुला कोपर्यात एक खुपच मिणमिणता दिवा लावलेली टपरीसदृश जागा होती तेथे एक जाड माणूस , एक मध्यमवयीन खेडुत बाई आणि एक नोकरासारखा दिसणारा बुटका माणूस असे तिघे उभे होते ड्रायव्हर ने तिकडे गाडी वळवली आणि त्यांना औंधाकडे जाणारा रस्ता कोणता ते विचारले....त्या तिघांनी एकमेकांकडे पाहीले आणि तो जाडा माणूस बोलला की तसे हे तिनही रस्ते तेथेच जातात पण तुम्ही या मधल्या रस्त्याने जा ...लवकरच पोहोचाल...त्यांचे ऐकुन ड्रायव्हर ने गाडी त्याच रस्त्याने पुढे घातली.....आणि सुरु झाला आमच्या आयुष्यातील एक भयंकर थरार......चकवा.... हो .....चकवा...आम्ही चाललो तर होतो पण रस्ता संपतच नव्हता.....तो पुर्ण अंधारा रस्ता... दुरदूरपर्यंत कुठेच एकही दिवा दिसत नव्हता.....एकही घर, झोपडी. ... माणुस. ....काहिच दिसत नव्हते.....त्यात दोन्ही बाजुंनी अंगावर येईल आणि भिती वाटेल इतके झाडीच झाडी दिसत होती भयंकर घुबडांचे आवाज आणि टिटवीचे कर्ण कर्कश ओरडणे तेवढे ऐकु येत होते ...गाडी एसी नव्हती त्यामुळे खिडक्या थोड्या ओपनच ठेवल्या होत्या. ...भयानक थंडगार वारे अचानक वाहु लागले. ...आम्ही खिडक्या लावुन घेतल्या. ...पण ड्रायव्हर काहि खिडकी बंद करेना. ...शेवटी माझ्या अहोंनी ओरडुन बोलले तेव्हाच त्याने खिडकी बंद केली...हे असे जवळपास तिन तास चालु होते ....माझ्या मांडीत बाळ होते आणि मी मागच्या सिटवर मध्य भागी बसले होते. ...पायाला अगदी कळ लागली होती. ..कधी एकदा गाडीतुन उतरेन असे झाले होते... आईला आणि मीराबाईंना पण वाॅशरुम जायचे होते ...लहान बाळ सोबत आहे आणि तु रस्ता कसा चुकवला असे माझे अहो ड्रायव्हर शी बोलतच होते ...मी सतत श्री स्वामी समर्थ हा जप अखंड करत होते ....ड्रायव्हर अचानक विचित्र वागु लागला .... काहीही बोलु लागला. ...तेव्हाच एक ढाबा दिसला आम्ही उतरणारच होतो ...पण काय माहिती मला आणि त्या कामवाल्या बाईंना अचानक काय वाटले आम्ही दोघी बोललो की नाही उतरायचे ... आता थेट मंदिराच्या च गावात जायचे. .. कारण हे जे काही चाललंय ते काहितरी भयंकर आहे याची कल्पना आम्हाला आली होती. ...सगळ्यांचेच त्रासिक चेहरे सहन करुन न उतरता आम्ही निघालो माझ्याकडे कायम श्री स्वामी समर्थ आणि कालभैरवाचा अंगारा असतो ...मला अचानक काय वाटले काय माहिती पण मी गाडीत अंगारा फुंकला. .. बाळाच्या आणि सगळ्यांनाच कपाळी लावला. ...त्यानंतर सतत विनवणी करत राहिले की श्री भैरवनाथा, देवा श्री स्वामी समर्था ....या प्रसंगातुन सोडवा ....आता तुम्हीच मार्ग दाखवा. ...मी तुमची कणभर जरी भक्ती केली असेल तर माझ्या बाळाला वाचवा. ...आम्हाला वाचवा. .. त्या प्रवासात खरंच मी जवळपास लाखभर तरी जप केलाच असेल. ....आज आठवलं तरी सगळ्यांनाच अंगावर काटा येतो. ...आम्ही त्या ढाब्यापासुन दूर गेलो होतो तरी सारखं कोणीतरी पाठीमागुन येतंय असं वाटत होतं. ....असाच अजुन बराच वेळ गेला. ...आता ड्रायव्हर सकट सगळेच घाबरले होते कारण काही केल्या गाव येत नव्हते. ...मी स्वामींना साकडे घातले, स्वामी तुम्ही असाल तेथुन या. ..मी विनवणी करते या , तुमचे अस्तित्व दाखवा. ...आणि असे बोलत असतांना एक काळा आणि एक पांढरा कुत्रा गाडीसमोर दिसले. ...अरे जंगलात कुत्रे कसे आले ???तेही पट्टेवाले???असा आम्ही विचारच करत असतांना समोरच गावाची कमान दिसली. ...वडाची झाडे दिसली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. .....किती वाजले त म्हणून घड्याळ पाहिले तर आश्चर्यचकित झालो पहाटेचे सव्वातीन वाजले होते....
अजुनही कमाल वाटते की जास्तीत जास्त उशीर जरी म्हटलं तरी आम्ही रात्री साडेअकरा पर्यंत तेथे पोहोचायलाच हवे होतो. ....मग हे चार तास आम्ही कुठे फिरत होतो????गाडीतले पेट्रोल पण जेवढे संपायला हवे तेवढेच संपले होते. ....मग चार तास गाडी काय हवेवर चालत होती?????खरंतर पाऊस आणि ऊन असं वातावरण असल्याने उबट वाटायला हवं होतं. ..पण बर्फगार वातावरण कसे काय होते????रस्त्यावर तो ढाबा दिसला ते नक्की काय होते????सांगा???कि आम्हाला पकडायला सापळा रचला होता????बरं मी आणि कामवाल्या बाई सगळ्यांनाच उद्देश्शुन थांबायचे नाही असे कसे काय बोललो???आणि कदाचित त्यांना देवीचे वारे असल्याने आणि माझ्याकडे अंगारा असल्याने कोणी असे बोलायला भाग पाडले????सगळ्यात महत्वपूर्ण कि ड्रायव्हर विचित्र पद्धतीने कसा बोलु लागला?बरं दुसर्याच दिवशी जातांना आम्ही चौकशी केली तर असा झाडी आणि घनदाट जंगल असलेला भागच तेथे अस्तित्वात नाहीये असे समजले. ....दैव बलवत्तर म्हणून वाईट प्रसंगातुन सुखरुप बाहेर पडलोत. ....धन्यवाद. ....श्री स्वामी समर्थ. ....श्री भैरवनाथ महाराज की जय. .....जय श्री यमाई माता...
सौ.विदुला वैभव अष्टेकर
नाशिक