♣ साथसहेली ♣
【भाग ११】
【भाग ११】
संध्याकाळी अक्का गावातल्या मंदिरात भजन ऐकन्यासाठी गेल्या होत्या, संग्राम अजुन आला नव्हता त्याला उशीर होणार होता. मीराने दिवसभर निरंकार उपवास केला होता, काहीही अन्न पोटात जाऊ दिले नाही. मीराने स्वतः देवघरात संध्याकाळी देवीची पूजा मांडली. पिंपळवाडयाला या देवयानीच्या भुतापासून लवकर मुक्त कर अशी प्रार्थना केली. देवीच्या कथेचे वाचन सुरु केले आणि तेवढ्यात घड्याळात 7 वाजले. मीराने थोडावेळ वाचन थांबवले आणि देवघरातून बाहेर पाहिले. बाहेर कोणीच नव्हते. मीराने पुन्हा कथा वाचन सुरु केले. देवयानी मीराला पूर्ण वाड्यात शोधु लागली. मीरा देवघरात बसलेली तिला दिसली. मांडलेली देव पूजा पाहुन देवयानीला भयंकर राग आला पण तिला आज मीरापर्यन्त पोहचने कठीण होते. देवयानी एक भूताटकी आत्मा होती. आयुष्यभर तिने काळ्या चेटकीनीची उपासना करून लोकांवर जादूटोना केला. पण शेवटी देवासमोर तिची ताकद कमीच होती. तिला देवघरात जाता येत नव्हते. मीराचे कथा वाचन ऐकून तिच्या कानाला त्रास होऊ लागला आणि क्षणार्धात ती गायब झाली. काहीवेळाने मीराची कथा वाचून पूर्ण झाली. तिला देवयानी अजुन दिसली नाही. तीने देवासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. देवासाठी बनवलेला नैवेद्य आणन्यासाठी ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाताच तिच्यासमोर देवयानी आली. मीरा घाबरली. मीरा देवघरातून बाहेर पडल्याचा देवयानीने फायदा घेतला, अचानक मीराच्या शरीरात झड़प घातली. मीराचे डोळे पांढरे झाले आणि ती हसु लागली. तीने फ्रिज उघडले, त्यात ठेवलेले कच्चे मांस बघुन हिच्या जीभेला पाणी सुटले. हातात मांस घेऊन एखाद्या हिंस्र प्राण्यासारख खाऊ लागली. साडीवर रक्ताचे दाग़ दिसू लागले. मीराचा दिवसभर केलेला निरंकार उपवास देवयानीने कच्चे मांस भक्षण करून मोडला. मीराची पूजा अर्धवट राहिली. ती सरळ तिच्या खोलीत निघुन गेली आणि आतून दार लावून घेतले. काहीवेळाने संग्रामसोबत अक्का वाड्यात आल्या. संग्राम किचनमध्ये पाणी प्यायला गेला. अक्का देवघरात मीराची पूजा बघायला गेल्या. संग्रामला किचनमध्ये फरशीवर सांडलेले कच्चे मांस दिसले. त्यांने अक्काला आवाज दिला. अक्काला तो सर्व राडा बघुन धक्काच् बसला. अक्काला माहिती होते हे सगळे देवयानीचे काम असणार पण त्यांनी संग्रामसमोर काही बोलून दाखवले नाही. संग्राम मीराच्या अचानक बदललेल्या वागणुकीमुळे खोलीत जात नव्हता. खोलीत गेल्यावर मीरा (देवयानी) त्याला पुन्हा बाहेर येऊ देत नसे. म्हणून तो बैठकीतच झोपला. आपल्या पोटच्या पोराला या त्रासात बघुन अककांच्या डोळ्यांत पाणी आले. परवा डमरूबाबाला वाड्यात बोलवुन या देवयानीला कायमचे बाहेर काढायचे त्यांनी ठरवले. उद्याची रात्र देवयानीची शेवटची रात्र असणार या वाड्यात अककांनी मनाशी ठरवले...
तिसऱ्या दिवशी सकाळी अक्का आणि मीरा संग्रामला सांगून डमरूबाबांकड़े दर्शनासाठी जायला निघाल्या.
मीराने आधी तिच्या घरी न जाता सरळ डमरूबाबांचा मठ गाठला. आज जास्त गर्दी नव्हती, बाबा आत द्यान करत एकटेच बसले होते. त्यांचे शिष्य बाहेर गो-वासरांना चारा देत होते. अक्का संग्रामच्या लग्नानंतर पहिल्यांदाच डमरूबाबांच्या मठात आल्या होत्या. बाबांसमोर जाऊन दोघींनी दर्शन घेतले. बाबांनी हात वर करुन आशीर्वाद दिला. डमरूबाबांनी मीराला पाहिल्यावर ओळखले. हास्य करत विचारले," कशी आहेस बाळ तू?"..मीरा पुन्हा हात जोडून बोलली," मी बरी आहे बाबा, या माझ्या सासुबाई आहेत. यांना तुमच्या दर्शनासाठी घेऊन आले.." डमरूबाबांनी दोघींच्या हातावर प्रसाद ठेवला आणि आत जाऊ लागले. अक्का म्हणाल्या," बाबा थांबा. आम्ही खुप भयान संकटात हायत बाबा, आमची मदत करा.." बाबांनी मागे वळून पाहिले. अक्का हात जोडून बोलत होत्या. मीराचा उदास चेहरा बघुन बाबा त्यांच्यासमोर येऊन बसले. डमरूबाबा म्हणाले," असं वाटतंय की तुम्हाला कोणीतरी एखाद्या वाईट हेतुने त्रास देत आहे..."..अक्का सांगू लागल्या," होय बाबा, या पोरीवर एकीची काळी नजर पडली हाय, आमच्या पिंपळवाड़याला चेटकीनीने झपाटलं हाय बाबा, रात्री या पोरीच्या अंगात घुसून ती सगळ्यांना त्रास देत हाय..आमचं जगणं मुश्किल केलय त्या भुताटकीने.." बाबा दीर्घ श्वास घेत सांगू लागले," भुतं स्वतःहुन मागे लागत नसतात, त्यांना बोलवलं तरच ते येतात आणि मग जोपर्यन्त त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आपल्याला सोडत नाहीत..चूक आपल्याकडूनच झाली असणार..." मीरा फुसफुस रडत बोलू लागली," हो बाबा, ते भुत माझ्या सहेलीच आहे, देवयानी नाव आहे तीच, मीच तिच्या भुताला लग्नाची पत्रिका देऊन आमंत्रण दिलं..आणि आता ती माझं शरीर आणि माझा नवरा मागत आहे मला..बाबा यावर काहीतरी उपाय सांगा बाबा.." मीरा रडु लागली, अककांनी तिला खांद्याशी घेतले. डमरूबाबा म्हणाले," यावर एकच उपाय आहे, तिच्या आत्म्याला मुक्ती देने.." अक्का आणि मीराला काही समजले नाही. "मुक्ती म्हणजे नेमकं काय कराव लागेल बाबा?" मीराने विचारले. डमरूबाबा सांगू लागले,"माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीराचा शेवटचा भाग उरतो तो म्हणजे 'अस्थि'..त्यावर रितसर संस्कार झाले तर त्या माणसाचा जीव कशात रहात नाही, म्हणजेच त्याला मुक्ती मिळते.." अक्काने विचारले,"पण मग आपण या चेटकीन देवयानीला मुक्ती कशी द्यायची बाबा?"..बाबा पुढे सांगू लागले,"मीरा तुला यासाठी खुप कठीण काम करावे लागेल, अमावस्येनंतर पाचव्या रात्री, देवयानीचा मृत्यु ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जाऊन तिच्या शरीराचा शेवटचा उरलेला भाग, म्हणजे तिची हाडं गोळा करून मला आणून द्यावी लागतील..पण बाळा जरा जपून, त्या रात्री तुला भूतं-खेतं त्या ठिकाणी गेल्यावर भुलवन्याचा प्रयत्न करतील, किंवा स्वतः देवयानी तुझ्याशी चकवा खेळेल, तुला भीती दाखवून अडवन्याचा प्रयन्त करेंन पण तू तिच्या अस्थि गोळा करे पर्यन्त इकडे तिकडे कुठेही वळून पाहू नकोस..अस्थि घेतल्यावर जेवद्या लवकर होईल तेवढं त्या ठिकाणापासून लांब जा" मीरा मन लावून ऐकत होती पण तिला थोड़ी भीतीही वाटत होती. पण तिला वाड्यातून बाहेर काढण्याचा हाच एक मार्ग होता. मीरा म्हणाली," बाबा मी हे करायला तयार आहे आणि मला तिची अस्थि कुठे मिळेल हे सुद्धा माहिती आहे. पण रात्री कस जाऊ मी? देवयानी माझ्या अंगात असते रात्रभर.." डमरूबाबा म्हणाले," त्यासाठी मला तुमच्या पिंपळवाड्यावर यावे लागेल, एक यज्ञ करावा लागेल, त्यानंतर देवयानी तुझ्या आत प्रवेश करू शकणार नाही, तुझ्या शरीराचे रक्षण होईल." अक्का म्हणाल्या," बाबा कालच अमावस्या होऊन गेली हाय, आपण लवकर आमच्या पिंपळवाड्यावर चला.."..डमरूबाबांनी मीराकडून वाड्याची सगळी माहिती घेतली आणि अजुन चार दिवसानंतर सकाळी पिंपळवाड्यावर येईल असे म्हणाले. बाबांचा उपाय सफल होईल याची दोघींना आशा होती. डमरूबाबांच्या पायावर डोकं ठेवून मीराने नमस्कार केला आणि अक्काला घेऊन मठाच्या बाहेर पडली. दुपार झाली होती, मीराला आई-बापाला भेटायची ओढ़ लागली होती. मठापासून घर जवळच होते. दोघी चालत चालत पंतांच्या घरी येतात. रमाबाई मीराला दारात पाहुन खुश होतात, पंत बाहेर येतात, अक्काला नमस्कार करतात आणि आत बोलवतात. अचानक ताई घरी आल्यावर बाळू सुद्धा खुश होतो. मीरा घरात कोणाला काही सांगत नाही, डमरूबाबांच्या दर्शनाला आलतो अस सांगते आणि शांत होते. आता आई-बापाच घर परकं असल्यासारखं सासुसमोर मुकाट्यानं जेवण करते. संध्याकाळी 7 च्या आधी पिंपळवाड्यात पोहचावे म्हणून लवकर निरोप घेते...
(क्रमशः)
तिसऱ्या दिवशी सकाळी अक्का आणि मीरा संग्रामला सांगून डमरूबाबांकड़े दर्शनासाठी जायला निघाल्या.
मीराने आधी तिच्या घरी न जाता सरळ डमरूबाबांचा मठ गाठला. आज जास्त गर्दी नव्हती, बाबा आत द्यान करत एकटेच बसले होते. त्यांचे शिष्य बाहेर गो-वासरांना चारा देत होते. अक्का संग्रामच्या लग्नानंतर पहिल्यांदाच डमरूबाबांच्या मठात आल्या होत्या. बाबांसमोर जाऊन दोघींनी दर्शन घेतले. बाबांनी हात वर करुन आशीर्वाद दिला. डमरूबाबांनी मीराला पाहिल्यावर ओळखले. हास्य करत विचारले," कशी आहेस बाळ तू?"..मीरा पुन्हा हात जोडून बोलली," मी बरी आहे बाबा, या माझ्या सासुबाई आहेत. यांना तुमच्या दर्शनासाठी घेऊन आले.." डमरूबाबांनी दोघींच्या हातावर प्रसाद ठेवला आणि आत जाऊ लागले. अक्का म्हणाल्या," बाबा थांबा. आम्ही खुप भयान संकटात हायत बाबा, आमची मदत करा.." बाबांनी मागे वळून पाहिले. अक्का हात जोडून बोलत होत्या. मीराचा उदास चेहरा बघुन बाबा त्यांच्यासमोर येऊन बसले. डमरूबाबा म्हणाले," असं वाटतंय की तुम्हाला कोणीतरी एखाद्या वाईट हेतुने त्रास देत आहे..."..अक्का सांगू लागल्या," होय बाबा, या पोरीवर एकीची काळी नजर पडली हाय, आमच्या पिंपळवाड़याला चेटकीनीने झपाटलं हाय बाबा, रात्री या पोरीच्या अंगात घुसून ती सगळ्यांना त्रास देत हाय..आमचं जगणं मुश्किल केलय त्या भुताटकीने.." बाबा दीर्घ श्वास घेत सांगू लागले," भुतं स्वतःहुन मागे लागत नसतात, त्यांना बोलवलं तरच ते येतात आणि मग जोपर्यन्त त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आपल्याला सोडत नाहीत..चूक आपल्याकडूनच झाली असणार..." मीरा फुसफुस रडत बोलू लागली," हो बाबा, ते भुत माझ्या सहेलीच आहे, देवयानी नाव आहे तीच, मीच तिच्या भुताला लग्नाची पत्रिका देऊन आमंत्रण दिलं..आणि आता ती माझं शरीर आणि माझा नवरा मागत आहे मला..बाबा यावर काहीतरी उपाय सांगा बाबा.." मीरा रडु लागली, अककांनी तिला खांद्याशी घेतले. डमरूबाबा म्हणाले," यावर एकच उपाय आहे, तिच्या आत्म्याला मुक्ती देने.." अक्का आणि मीराला काही समजले नाही. "मुक्ती म्हणजे नेमकं काय कराव लागेल बाबा?" मीराने विचारले. डमरूबाबा सांगू लागले,"माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीराचा शेवटचा भाग उरतो तो म्हणजे 'अस्थि'..त्यावर रितसर संस्कार झाले तर त्या माणसाचा जीव कशात रहात नाही, म्हणजेच त्याला मुक्ती मिळते.." अक्काने विचारले,"पण मग आपण या चेटकीन देवयानीला मुक्ती कशी द्यायची बाबा?"..बाबा पुढे सांगू लागले,"मीरा तुला यासाठी खुप कठीण काम करावे लागेल, अमावस्येनंतर पाचव्या रात्री, देवयानीचा मृत्यु ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जाऊन तिच्या शरीराचा शेवटचा उरलेला भाग, म्हणजे तिची हाडं गोळा करून मला आणून द्यावी लागतील..पण बाळा जरा जपून, त्या रात्री तुला भूतं-खेतं त्या ठिकाणी गेल्यावर भुलवन्याचा प्रयत्न करतील, किंवा स्वतः देवयानी तुझ्याशी चकवा खेळेल, तुला भीती दाखवून अडवन्याचा प्रयन्त करेंन पण तू तिच्या अस्थि गोळा करे पर्यन्त इकडे तिकडे कुठेही वळून पाहू नकोस..अस्थि घेतल्यावर जेवद्या लवकर होईल तेवढं त्या ठिकाणापासून लांब जा" मीरा मन लावून ऐकत होती पण तिला थोड़ी भीतीही वाटत होती. पण तिला वाड्यातून बाहेर काढण्याचा हाच एक मार्ग होता. मीरा म्हणाली," बाबा मी हे करायला तयार आहे आणि मला तिची अस्थि कुठे मिळेल हे सुद्धा माहिती आहे. पण रात्री कस जाऊ मी? देवयानी माझ्या अंगात असते रात्रभर.." डमरूबाबा म्हणाले," त्यासाठी मला तुमच्या पिंपळवाड्यावर यावे लागेल, एक यज्ञ करावा लागेल, त्यानंतर देवयानी तुझ्या आत प्रवेश करू शकणार नाही, तुझ्या शरीराचे रक्षण होईल." अक्का म्हणाल्या," बाबा कालच अमावस्या होऊन गेली हाय, आपण लवकर आमच्या पिंपळवाड्यावर चला.."..डमरूबाबांनी मीराकडून वाड्याची सगळी माहिती घेतली आणि अजुन चार दिवसानंतर सकाळी पिंपळवाड्यावर येईल असे म्हणाले. बाबांचा उपाय सफल होईल याची दोघींना आशा होती. डमरूबाबांच्या पायावर डोकं ठेवून मीराने नमस्कार केला आणि अक्काला घेऊन मठाच्या बाहेर पडली. दुपार झाली होती, मीराला आई-बापाला भेटायची ओढ़ लागली होती. मठापासून घर जवळच होते. दोघी चालत चालत पंतांच्या घरी येतात. रमाबाई मीराला दारात पाहुन खुश होतात, पंत बाहेर येतात, अक्काला नमस्कार करतात आणि आत बोलवतात. अचानक ताई घरी आल्यावर बाळू सुद्धा खुश होतो. मीरा घरात कोणाला काही सांगत नाही, डमरूबाबांच्या दर्शनाला आलतो अस सांगते आणि शांत होते. आता आई-बापाच घर परकं असल्यासारखं सासुसमोर मुकाट्यानं जेवण करते. संध्याकाळी 7 च्या आधी पिंपळवाड्यात पोहचावे म्हणून लवकर निरोप घेते...
(क्रमशः)