ही माझ्यासोबत घडलेली घटना असून जर विश्वास नसेल तर कृपया कथा म्हणून आस्वाद घ्यावा ही विनंती😊
हा प्रसंग घडून एक आठवडा झाला आहे साधारण पण पहिल्यांदा असा अनुभव आल्याने अजूनही सगळं आठवतंय
आमच्या घरापासून पासून काही अंतरावर असलेलं छोटस गाव आहे.या गावाला तस निसर्गाने भरपूर दिल आहे.बऱ्यापैकी झाडी रस्त्याच्या लगत शेतजमीन बैठी घर आणि मुख्य म्हणजे डोंगरावरील खंडोबाच मंदिर.बऱ्याच उंचावर असलेलं हे मंदिर म्हणजे भाविक आणि ज्यांना व्यायामाची हौस आहे अश्या लोकांसाठी हक्काची जागा आहे.मंदिर तस उंचावर असल्याने बऱ्याच पायऱ्या चढून जावं लागतं पण अनेक जण हे आव्हान पेलून वर चढतातच.
आदल्या दिवशी माझ्या मित्राची परीक्षा संपली होती.खूप वेळ विचार करून आम्ही शेवटी ठरवलं की दुसऱ्यादिवशी पहाटे 7ला घरून बाईक वरून निघायचं मंदिर गाठायच दर्शन घेऊन मस्त मुळगावचा प्रसिद्ध वडापाव खाऊन ऊन व्हायच्या आत परत यायचं असा सरळ साधा बेत.फक्त दर्शन घ्यायचं म्हणून निघताना अंघोळ केली आणि प्रवासाला निघालो माझ्या घरापासून त्या मंदिराच्या पायथ्याशी पोचायला 20-25 मिनिटे लागत असतील पण आम्ही दोघेच होतो वर परीक्षा संपलेली त्यामुळे नुकताच उगवलेला सूर्य (आमच्यासाठी तरी होता) आजूबाजूची झाडी बघत आणि अर्थात इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही चाललो होतो.बोलण्याच्या नादात आम्ही लांबचा रस्ता धरला आहे हे आमच्या लक्षातच आलं नाही.मुळगाव मंदिर आहे तो एक रस्ता मध्ये वस्ती आणि दुसऱ्या बाजूला यालाच समांतर रस्ता होता.आम्ही त्या समांतर रस्त्याने येत होतो.रस्त्याला गर्दी नव्हती म्हणून गाडी पण बऱ्यापैकी वेगाने चालली होती.त्या दोन्ही समांतर रस्त्यांना जोडणारी वाट त्या वस्तीमधून जाते तिथे आठवणीने turn घ्यायचा या बेताने मी गाडी वळवली आणि अगदी turn घेत असताना वस्तीच्या वेशीसमोर माझी गाडी बंद पडली.मला वाटलं की कदाचित नीट ताकद दिली नाही म्हणून बंद झाली असेल गाडी म्हणून मी परत button दाबून गाडी चालू करायचा प्रयत्न केला.बराच प्रयत्न करून ही गाडी चालू झाली नाही.तिथला एक रिक्षावाला म्हणाला "भाऊ गाडीत कचरा गेला असेल फुंकर मारून बघ" मग ते ही करून झालं.शेवटी मी आणि माझ्या मित्राने ठरवलं की गाडी लोटत न्यायची आणि बघायच काही मदत मिळते का म्हणून आम्ही ती गाडी लोटत लोटत 100-200 मीटर आणली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून चालू केली आणि जणू काही गाडीला काही झालंच नाही अशी ती गाडी चालू झाली.
मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊन गाडी पार्क करून आम्ही पायऱ्या चढू लागलो.मी दर महिन्यातून एकदा जात असल्याने दम लागत नव्हता पण माझा मित्र मात्र अर्धा भाग चढल्यावर दमला आणि म्हणाला तू एकटाच जा वरती.पण काय माहीत माझ्या मनात काय आले आणि मी त्याला म्हणालो नाही आपण इथूनच घरी जाऊया.
(कदाचित ही माझी चूक होती अस मला वाटत.डोंगरावर आरती च्या वेळी अंगात आलेलं मी पाहिलं आहे तिथे भंडारा लावला की शांत होतात हे ही पाहिलं आहे)
इथून पुढे खरा घटनाक्रम सुरू झाला....
नेहमी प्रमाणे घरी आलो तेव्हा काहीच जाणवलं नाही मला नेहमीप्रमाणे दिवस घालवून रात्री झोपायला गेलो तेव्हा कधी नव्हे ते डोळे जाम जड व्हायला लागले होते.मी विचार केला की डोंगर चढल्यामुळे अस झालं असेल म्हणून मी डोळे मिटले आणि बहुतेक 1-2 मिनिटात झोप लागली असेल मला.साधारण 12:30 वैगरे झाले असतील.मला अचानक जाग आली जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या अंगावर भीतीने येतो तसा शहारा आला होता आणि पायाला अगदी वरून पडल्याचं स्वप्न बघितल्यावर जस वाटत तसच वाटत होतं.मला वाटलं horror कथा वाचण्याचा परिणाम असेल म्हणून मी स्वप्न आठवायचा प्रयत्न करू लागलो शक्यतो अश्यावेळी मला स्वप्न आठवत पण यावेळी मात्र आठवलं नाही.पाणी पियुन मी झोपी गेलो दुसऱ्या दिवशी बाबांना पहाटे लवकर जायचं होतं तेव्हा त्यांच्या कामासाठी मला त्यांनी उठवलं काम करून मी परत झोपी गेलो पुन्हा उठताना सुद्धा मला तीच परिस्थिती जाणवली.सकाळी मी काही काम करायला गेलो पण जे काम मी करायला गेलो ते ही झालं नाही म्हणून मला खूप राग येत होता.अगदी स्वतःचा राग,चीड आणि खूप नैराश्य भरलेले विचार येत होते त्यामुळे मी तसाच घरी आलो आणि आई ला म्हणालो मी थोडावेळ झोप घेतो जाम चिडचिड होत आहे माझी अस म्हणून मी दार लावून घेतलं आणि झोपी गेलो पण प्रकरण एव्हड्यावर थांबेल हा माझा अंदाज चुकला मला तोच प्रकार त्याच संवेदना पुन्हा जाणवल्या आणि मला परत जाग आली.आता मात्र माझ्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं आहे पण कारण शोधायची माझी मनस्थिती नव्हती.मी उठलो ती वेळ 6 ची होती थोड्यावेळाने तिन्हीसांज म्हणजे 6:30-7 ची वेळ होईल हे माझ्या लक्षात आलं.
जेव्हा जेव्हा मी बाहेर वैगरे जाऊन यायचो तेव्हा माझी आजी माझी दृष्ट काढायची ती ही याच वेळी.मी अजूनही काही काम करून आलं की दृष्ट काढून घेतो आई कडून.मी आई ला म्हंटल की आई माझी आज दृष्ट काढ वेळ पण आहे तर काढून टाक दृष्ट सहज म्हणून.शेवटी आईने एक ताटली तापत ठेवली आणि हातात मीठ मोहरी घेऊन माझी दृष्ट काढली दृष्ट काढून ती ताटलीत जाळायला टाकायच्या आधीच मला एक चांगली संवेदना आली आणि ताटलीत टाकल्या टाकल्या आख्या घरभर घाण वास पसरला.खरतर आईने एक्झॉस्ट चालू केला होता तरी पूर्ण घरभर वास पसरला होता.(आमचं किचन घराच्या एका कोपर्याला आहे) शेवटी आम्ही खिडकी सुद्धा उघडली बराच वेळ म्हणजे 15-20 मिनिटं तो वास टिकला आणि हळू हळू कमी झाला.त्या नंतर मी हे सगळं आई ला सांगितल पण या नंतर मला त्रास झाला नाही.
पण याच कारण मला आजपर्यंत तरी समजलेले नाही
हा प्रसंग घडून एक आठवडा झाला आहे साधारण पण पहिल्यांदा असा अनुभव आल्याने अजूनही सगळं आठवतंय
आमच्या घरापासून पासून काही अंतरावर असलेलं छोटस गाव आहे.या गावाला तस निसर्गाने भरपूर दिल आहे.बऱ्यापैकी झाडी रस्त्याच्या लगत शेतजमीन बैठी घर आणि मुख्य म्हणजे डोंगरावरील खंडोबाच मंदिर.बऱ्याच उंचावर असलेलं हे मंदिर म्हणजे भाविक आणि ज्यांना व्यायामाची हौस आहे अश्या लोकांसाठी हक्काची जागा आहे.मंदिर तस उंचावर असल्याने बऱ्याच पायऱ्या चढून जावं लागतं पण अनेक जण हे आव्हान पेलून वर चढतातच.
आदल्या दिवशी माझ्या मित्राची परीक्षा संपली होती.खूप वेळ विचार करून आम्ही शेवटी ठरवलं की दुसऱ्यादिवशी पहाटे 7ला घरून बाईक वरून निघायचं मंदिर गाठायच दर्शन घेऊन मस्त मुळगावचा प्रसिद्ध वडापाव खाऊन ऊन व्हायच्या आत परत यायचं असा सरळ साधा बेत.फक्त दर्शन घ्यायचं म्हणून निघताना अंघोळ केली आणि प्रवासाला निघालो माझ्या घरापासून त्या मंदिराच्या पायथ्याशी पोचायला 20-25 मिनिटे लागत असतील पण आम्ही दोघेच होतो वर परीक्षा संपलेली त्यामुळे नुकताच उगवलेला सूर्य (आमच्यासाठी तरी होता) आजूबाजूची झाडी बघत आणि अर्थात इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही चाललो होतो.बोलण्याच्या नादात आम्ही लांबचा रस्ता धरला आहे हे आमच्या लक्षातच आलं नाही.मुळगाव मंदिर आहे तो एक रस्ता मध्ये वस्ती आणि दुसऱ्या बाजूला यालाच समांतर रस्ता होता.आम्ही त्या समांतर रस्त्याने येत होतो.रस्त्याला गर्दी नव्हती म्हणून गाडी पण बऱ्यापैकी वेगाने चालली होती.त्या दोन्ही समांतर रस्त्यांना जोडणारी वाट त्या वस्तीमधून जाते तिथे आठवणीने turn घ्यायचा या बेताने मी गाडी वळवली आणि अगदी turn घेत असताना वस्तीच्या वेशीसमोर माझी गाडी बंद पडली.मला वाटलं की कदाचित नीट ताकद दिली नाही म्हणून बंद झाली असेल गाडी म्हणून मी परत button दाबून गाडी चालू करायचा प्रयत्न केला.बराच प्रयत्न करून ही गाडी चालू झाली नाही.तिथला एक रिक्षावाला म्हणाला "भाऊ गाडीत कचरा गेला असेल फुंकर मारून बघ" मग ते ही करून झालं.शेवटी मी आणि माझ्या मित्राने ठरवलं की गाडी लोटत न्यायची आणि बघायच काही मदत मिळते का म्हणून आम्ही ती गाडी लोटत लोटत 100-200 मीटर आणली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून चालू केली आणि जणू काही गाडीला काही झालंच नाही अशी ती गाडी चालू झाली.
मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊन गाडी पार्क करून आम्ही पायऱ्या चढू लागलो.मी दर महिन्यातून एकदा जात असल्याने दम लागत नव्हता पण माझा मित्र मात्र अर्धा भाग चढल्यावर दमला आणि म्हणाला तू एकटाच जा वरती.पण काय माहीत माझ्या मनात काय आले आणि मी त्याला म्हणालो नाही आपण इथूनच घरी जाऊया.
(कदाचित ही माझी चूक होती अस मला वाटत.डोंगरावर आरती च्या वेळी अंगात आलेलं मी पाहिलं आहे तिथे भंडारा लावला की शांत होतात हे ही पाहिलं आहे)
इथून पुढे खरा घटनाक्रम सुरू झाला....
नेहमी प्रमाणे घरी आलो तेव्हा काहीच जाणवलं नाही मला नेहमीप्रमाणे दिवस घालवून रात्री झोपायला गेलो तेव्हा कधी नव्हे ते डोळे जाम जड व्हायला लागले होते.मी विचार केला की डोंगर चढल्यामुळे अस झालं असेल म्हणून मी डोळे मिटले आणि बहुतेक 1-2 मिनिटात झोप लागली असेल मला.साधारण 12:30 वैगरे झाले असतील.मला अचानक जाग आली जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या अंगावर भीतीने येतो तसा शहारा आला होता आणि पायाला अगदी वरून पडल्याचं स्वप्न बघितल्यावर जस वाटत तसच वाटत होतं.मला वाटलं horror कथा वाचण्याचा परिणाम असेल म्हणून मी स्वप्न आठवायचा प्रयत्न करू लागलो शक्यतो अश्यावेळी मला स्वप्न आठवत पण यावेळी मात्र आठवलं नाही.पाणी पियुन मी झोपी गेलो दुसऱ्या दिवशी बाबांना पहाटे लवकर जायचं होतं तेव्हा त्यांच्या कामासाठी मला त्यांनी उठवलं काम करून मी परत झोपी गेलो पुन्हा उठताना सुद्धा मला तीच परिस्थिती जाणवली.सकाळी मी काही काम करायला गेलो पण जे काम मी करायला गेलो ते ही झालं नाही म्हणून मला खूप राग येत होता.अगदी स्वतःचा राग,चीड आणि खूप नैराश्य भरलेले विचार येत होते त्यामुळे मी तसाच घरी आलो आणि आई ला म्हणालो मी थोडावेळ झोप घेतो जाम चिडचिड होत आहे माझी अस म्हणून मी दार लावून घेतलं आणि झोपी गेलो पण प्रकरण एव्हड्यावर थांबेल हा माझा अंदाज चुकला मला तोच प्रकार त्याच संवेदना पुन्हा जाणवल्या आणि मला परत जाग आली.आता मात्र माझ्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं आहे पण कारण शोधायची माझी मनस्थिती नव्हती.मी उठलो ती वेळ 6 ची होती थोड्यावेळाने तिन्हीसांज म्हणजे 6:30-7 ची वेळ होईल हे माझ्या लक्षात आलं.
जेव्हा जेव्हा मी बाहेर वैगरे जाऊन यायचो तेव्हा माझी आजी माझी दृष्ट काढायची ती ही याच वेळी.मी अजूनही काही काम करून आलं की दृष्ट काढून घेतो आई कडून.मी आई ला म्हंटल की आई माझी आज दृष्ट काढ वेळ पण आहे तर काढून टाक दृष्ट सहज म्हणून.शेवटी आईने एक ताटली तापत ठेवली आणि हातात मीठ मोहरी घेऊन माझी दृष्ट काढली दृष्ट काढून ती ताटलीत जाळायला टाकायच्या आधीच मला एक चांगली संवेदना आली आणि ताटलीत टाकल्या टाकल्या आख्या घरभर घाण वास पसरला.खरतर आईने एक्झॉस्ट चालू केला होता तरी पूर्ण घरभर वास पसरला होता.(आमचं किचन घराच्या एका कोपर्याला आहे) शेवटी आम्ही खिडकी सुद्धा उघडली बराच वेळ म्हणजे 15-20 मिनिटं तो वास टिकला आणि हळू हळू कमी झाला.त्या नंतर मी हे सगळं आई ला सांगितल पण या नंतर मला त्रास झाला नाही.
पण याच कारण मला आजपर्यंत तरी समजलेले नाही