मूळ रहिवाशी :-
..
..
४०-५० च्या दशकातली गोष्ट आहे.खेडोपाडी वीज पोचली नव्हती आणि गावाच्या आसपासची जंगल झाडी समृद्ध होती.....हि गोष्ट .माझ्या आजोबांसोबत घडलेली,मी माझ्या आज्जीकडून ऐकलेली.
...
....
............शाळा सुटून आवरासावर होईपर्यंत दिवस मावळायला गेला.आप्पा मास्तर लगबगीनं पाय उचलत ३ कोसावरच्या मामाच्या गावाकडे निघाले,जायलाच हवं होतं !...नव्या खोदलेल्या विहिरीला पाणी लागलं होतं.त्याची परडी जेवायला मामाने आग्रहानं सांगावा धाडला होता जाणं भागच होतं.खरं तर मास्तरांचं नवीनच लग्न झालं होतं,त्यामुळे तसा जायचा फारसा उत्साह नव्हताच.पण लहानपणीच आई-बापाचं छत्र हरपल्यापासून मामा-मामीनेच लहानाचं मोठं केलं होतं.त्यामुळे त्यांना दुखवणं मास्तरांच्या संस्कारात बसत नव्हतं.शाळा तशी गावाच्या एका टोकाला.मास्तर फाटकातून बाहेर पडले तेंव्हा बाजूच्या ओढ्याकाठच्या महाकाय वडाच्या सावल्या लांबवर पसरल्या होत्या आणि त्याच्यावर वसाहत करून असणारी वट वाघळे पंख फडफडत जागा सोडायच्या तयारीत होती.कडोनिकडीने चालूनही वाडीत पोचायला दिवस बुडाला.कडूसं पडायच्या सुमारास मंडळी हारयात सगळं जेवण-सामान भरून विहिरीकडे निघाली.परडी गावापासून कोसभर अंतरावर असणाऱ्या गव्हळीच्या शिवारात होती.दुसऱ्या दिवशी अमावस्या असल्याने अंधार दाट होता.त्यामुळे जेवणे कंदिलाच्या उजेडात चाचपडतच पार पडली.मग शिळोप्याच्या,भुताखेतांच्या ( उद्या अमावस्या असल्याची कुणीतरी आठवण करून दिल्याने !)
गप्पा,जुन्या दोस्तांची थट्टा मस्करी पार पडेपर्यंत चांगला आठचा सुमार झाला.मुक्कामाचा आग्रह झाला पण नवी नवरी घरी एकटीच असल्याने मास्तर आग्रह मोडून निघालेच.अंतरही तसं तासाभराचं म्हणजे फार नाही,आणि रस्ताही लहानपणापासून पायाखालचा.तेंव्हा torch वगैरेही नव्हती.
.... वाडीच्या बाहेर पडून मास्तर वाटेला लागले तसा अंधार अगदी अंगावर यायला लागला.मास्तर तसे धीट,शिवाय पैलवानकीचा शौक,त्यामुळे एक आत्मविश्वास होता. वाट बरीचशी पान्दीतून जाणारी.त्यामुळे काळोखाची तीव्रता अजून वाढत होती.
उजव्या अंगाला रस्त्यापासून अर्धा फर्लांग नदी होती तिच्या काठची झाडीही दाट.....वाडी सोडून पहिल्या ओढ्याच्या खळग्यात आले तसा अचानक पलीकडच्या उसाच्या शेतातून लहान मुल रडण्याचा आवाज आला तसे मास्तर दचकून थांबलेच.मग लक्षात आलं हा दोन रानबोक्यांच्या कळवंडण्याचा(भांडणाचा)आवाज! तसे सुस्कारा सोडून मास्तर स्वतःशीच हसत पुढे निघाले.तरी पण नाही म्हटलं तरी धसकाच बसला होता.मास्तर सावध,कानोसा घेत अजून वेगाने पाय उचलू लागले..अजून दोन पांदी,एक ओढा ओलांडला आणि उजवीकडे लांबवर गावाचा मिणमिणता उजेड दिसू लागला.'अजून १५-२० मिनिटे चाललं कि पोचलोच ! '..मास्तर मनाशी म्हणाले.कापूरओढ्यातून पुढे निघाले कि डाव्या हाताला पिराची मशीद,त्याला लागून मुसलमानांचं कब्रस्तान याच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून चोरटा कटाक्ष टाकत मास्तर झपाझप पावले टाकत पुढे वाण्यांच्या कब्रस्तानापासून उजवीकडे वळले.पुढे २-३०० पावलांवर उजवीकडे पिंपळेश्वराचं मंदिर अंधारात पुसटसं दिसू लागलं आणि त्याच्या मागचं पिंपळाचं बन अंधारात अजूनच गडद भासू लागलं.इतक्यात अंधारातून आल्यासारखा आवाज आला-‘कोन चाललंय ते ?’..स्वतःच्या तंद्रीत असलेले आप्पा मास्तर एकदम दचकलेच,पण आवाज बाईचा होता,तसे सावरून म्हणाले.’मी हाय आप्पा मास्तर,कोण हाय ते ?’.आणि आवाजाच्या दिशेनं निरखून पाहिलं तर रस्त्यापासून थोडं आत एका धोंड्यावर बसलेली ती बाई पुढे आली आणि अंतर राखून उभी राहून म्हणाली-‘आवं ,कवाधरनं वाट बगतीया.हितं पडयाल जळनाचं वजं बांदून ठिवलया पन उचलू लागायंच कुनी भेटंना .’ मास्तरांना आवाज तर ओळखीचा वाटेना पण बोलण्याचा बाज त्यांच्या आजीसारखा वाटला.अंधारात नीट दिसत नव्हतं,पण वय साधारण ४० च्या आसपास असावं .मात्र तिनं नेसलेलं लुगडं अगदी जुन्या धाटणीचं वाटत होतं.मास्तरांना याचंही आश्चर्य वाटलं कि एवढा अंधार पडेपर्यंत कसं कुणी भेटलं नाही या बिचारीला...’बर चला मावशी ‘मास्तर म्हणाले तसं ती बाई देवळाच्या मागच्या बाजूकडे चालू लागली.मास्तर तिच्या पाठी चाचपडत चालले होते पण ती बाई मात्र सराईतपणे चालत होती.
मास्तर दोनदा ठेचकाळलेदेखील.’कुठाय ओझं ?’-पिंपळाचं बन समोर जवळ दिसू लागल्यावर मास्तरांनी पुढे चाललेल्या बाईला विचारलं.’हि काय हितं बांधाच्या पडयाल’.उत्तर आलं .मास्तर एव्हाना काहीसे घाबरे झाले होते.परत फिरायचीपण भीती वाटत होती.कुणीतरी खेचत असल्यासारखे मागे मागे चालले होते.विचारात मग्न असताना अचानक पुढे केतकडीचं कुंपण आलं तसे मास्तर दचकून थांबले.इतक्यात पलीकडून आवाज आला-‘या कि वो .इथं हाय बगा .’.मास्तरांनी बघितलं,समोरचं केतकडीचं कुंपण पुरुषभर उंच आणि आडवं अखंड आहे आणि हेही आठवलं कि बनात शिरायला रस्ता तर एकच,तोही पलीकडून आहे !.आता मात्र मास्तरांचं अवसान गळायला लागलं आणि एवढा वेळ न सुचलेला प्रश्न मनात उमटला...चाचरतच विचारलं ‘आवो मावशी पण तुमी कुणाच्या घरातल्या वो ?’तसं पलीकडून मोकळ्या,हसऱ्या आवाजात उत्तर आलं-‘मी वय ?.मी हितली मूळ रहिवासी हाय वो ’क्षणार्धात सगळ्या कड्या जुळल्या ,आणि मास्तरांची बोबडीच वळली.उलटे माघारी फिरून जी धूम ठोकली ती पडत उठत कशीबशी मुख्य सडक गाठली तरी मागून हाका जवळून आल्यासारख्या येतंच होत्या,आणि खिदळण्याचा आवाज पण !.मुख्य सडकेला लागल्यावर त्या हाका थांबल्या.पण मास्तरांच्या जीवात जीव नव्हता.
धावत पिंपळश्वराचा परिसर ओलांडला.आता समोर ३-४०० पावलांवर गावची हद्द.उजव्या टेकडावरचं नागनाथाचं मंदिर ओलांडलं ,शेजारची विहीर आणि बाजूचा सतीचा पार गेला कि निर्धोक झालो असा विचार मास्तर करतायत तोवर सतीच्या पाराआडून हाक आली ‘कोन ते ?का पळताय?’..मास्तरांना फेफरंच यायचं बाकी ! ..कधी रस्ता कापला आणि कधी घरी येऊन दडपून झोपलो ते काही मास्तरांना कळलंदेखील नाही.....
.....४ दिवसांनी पिंपळेश्वराजवळ घर असलेला मास्तरांचा दोस्त म्हादूआण्णा भेटला तेंव्हा मास्तर त्यांची चित्तरकथा सांगायला लागले.शेवटच्या टप्प्यातली घटना ऐकून मात्र आण्णा एकदम हसायला लागला.म्हणाला ‘लेका तितं आमचं म्हातारं हुतं सतीच्या पारापशी , परसाकडं गेलवतं नदीला.येताना तुलाच बगितलं बहुतेक ...तरी म्हनत हुतं कुनीतरी पळताना दिसलं अंधारात म्हणून....’......मग एकाएकी गंभीर होऊन म्हणाला-‘पीपळाच्या बनात मातुर कायतरी भानगड हाय बाबा..आमचा आजाबी यकडाव सांगत हुता कायबाय .’......... .
..
..
४०-५० च्या दशकातली गोष्ट आहे.खेडोपाडी वीज पोचली नव्हती आणि गावाच्या आसपासची जंगल झाडी समृद्ध होती.....हि गोष्ट .माझ्या आजोबांसोबत घडलेली,मी माझ्या आज्जीकडून ऐकलेली.
...
....
............शाळा सुटून आवरासावर होईपर्यंत दिवस मावळायला गेला.आप्पा मास्तर लगबगीनं पाय उचलत ३ कोसावरच्या मामाच्या गावाकडे निघाले,जायलाच हवं होतं !...नव्या खोदलेल्या विहिरीला पाणी लागलं होतं.त्याची परडी जेवायला मामाने आग्रहानं सांगावा धाडला होता जाणं भागच होतं.खरं तर मास्तरांचं नवीनच लग्न झालं होतं,त्यामुळे तसा जायचा फारसा उत्साह नव्हताच.पण लहानपणीच आई-बापाचं छत्र हरपल्यापासून मामा-मामीनेच लहानाचं मोठं केलं होतं.त्यामुळे त्यांना दुखवणं मास्तरांच्या संस्कारात बसत नव्हतं.शाळा तशी गावाच्या एका टोकाला.मास्तर फाटकातून बाहेर पडले तेंव्हा बाजूच्या ओढ्याकाठच्या महाकाय वडाच्या सावल्या लांबवर पसरल्या होत्या आणि त्याच्यावर वसाहत करून असणारी वट वाघळे पंख फडफडत जागा सोडायच्या तयारीत होती.कडोनिकडीने चालूनही वाडीत पोचायला दिवस बुडाला.कडूसं पडायच्या सुमारास मंडळी हारयात सगळं जेवण-सामान भरून विहिरीकडे निघाली.परडी गावापासून कोसभर अंतरावर असणाऱ्या गव्हळीच्या शिवारात होती.दुसऱ्या दिवशी अमावस्या असल्याने अंधार दाट होता.त्यामुळे जेवणे कंदिलाच्या उजेडात चाचपडतच पार पडली.मग शिळोप्याच्या,भुताखेतांच्या ( उद्या अमावस्या असल्याची कुणीतरी आठवण करून दिल्याने !)
गप्पा,जुन्या दोस्तांची थट्टा मस्करी पार पडेपर्यंत चांगला आठचा सुमार झाला.मुक्कामाचा आग्रह झाला पण नवी नवरी घरी एकटीच असल्याने मास्तर आग्रह मोडून निघालेच.अंतरही तसं तासाभराचं म्हणजे फार नाही,आणि रस्ताही लहानपणापासून पायाखालचा.तेंव्हा torch वगैरेही नव्हती.
.... वाडीच्या बाहेर पडून मास्तर वाटेला लागले तसा अंधार अगदी अंगावर यायला लागला.मास्तर तसे धीट,शिवाय पैलवानकीचा शौक,त्यामुळे एक आत्मविश्वास होता. वाट बरीचशी पान्दीतून जाणारी.त्यामुळे काळोखाची तीव्रता अजून वाढत होती.
उजव्या अंगाला रस्त्यापासून अर्धा फर्लांग नदी होती तिच्या काठची झाडीही दाट.....वाडी सोडून पहिल्या ओढ्याच्या खळग्यात आले तसा अचानक पलीकडच्या उसाच्या शेतातून लहान मुल रडण्याचा आवाज आला तसे मास्तर दचकून थांबलेच.मग लक्षात आलं हा दोन रानबोक्यांच्या कळवंडण्याचा(भांडणाचा)आवाज! तसे सुस्कारा सोडून मास्तर स्वतःशीच हसत पुढे निघाले.तरी पण नाही म्हटलं तरी धसकाच बसला होता.मास्तर सावध,कानोसा घेत अजून वेगाने पाय उचलू लागले..अजून दोन पांदी,एक ओढा ओलांडला आणि उजवीकडे लांबवर गावाचा मिणमिणता उजेड दिसू लागला.'अजून १५-२० मिनिटे चाललं कि पोचलोच ! '..मास्तर मनाशी म्हणाले.कापूरओढ्यातून पुढे निघाले कि डाव्या हाताला पिराची मशीद,त्याला लागून मुसलमानांचं कब्रस्तान याच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून चोरटा कटाक्ष टाकत मास्तर झपाझप पावले टाकत पुढे वाण्यांच्या कब्रस्तानापासून उजवीकडे वळले.पुढे २-३०० पावलांवर उजवीकडे पिंपळेश्वराचं मंदिर अंधारात पुसटसं दिसू लागलं आणि त्याच्या मागचं पिंपळाचं बन अंधारात अजूनच गडद भासू लागलं.इतक्यात अंधारातून आल्यासारखा आवाज आला-‘कोन चाललंय ते ?’..स्वतःच्या तंद्रीत असलेले आप्पा मास्तर एकदम दचकलेच,पण आवाज बाईचा होता,तसे सावरून म्हणाले.’मी हाय आप्पा मास्तर,कोण हाय ते ?’.आणि आवाजाच्या दिशेनं निरखून पाहिलं तर रस्त्यापासून थोडं आत एका धोंड्यावर बसलेली ती बाई पुढे आली आणि अंतर राखून उभी राहून म्हणाली-‘आवं ,कवाधरनं वाट बगतीया.हितं पडयाल जळनाचं वजं बांदून ठिवलया पन उचलू लागायंच कुनी भेटंना .’ मास्तरांना आवाज तर ओळखीचा वाटेना पण बोलण्याचा बाज त्यांच्या आजीसारखा वाटला.अंधारात नीट दिसत नव्हतं,पण वय साधारण ४० च्या आसपास असावं .मात्र तिनं नेसलेलं लुगडं अगदी जुन्या धाटणीचं वाटत होतं.मास्तरांना याचंही आश्चर्य वाटलं कि एवढा अंधार पडेपर्यंत कसं कुणी भेटलं नाही या बिचारीला...’बर चला मावशी ‘मास्तर म्हणाले तसं ती बाई देवळाच्या मागच्या बाजूकडे चालू लागली.मास्तर तिच्या पाठी चाचपडत चालले होते पण ती बाई मात्र सराईतपणे चालत होती.
मास्तर दोनदा ठेचकाळलेदेखील.’कुठाय ओझं ?’-पिंपळाचं बन समोर जवळ दिसू लागल्यावर मास्तरांनी पुढे चाललेल्या बाईला विचारलं.’हि काय हितं बांधाच्या पडयाल’.उत्तर आलं .मास्तर एव्हाना काहीसे घाबरे झाले होते.परत फिरायचीपण भीती वाटत होती.कुणीतरी खेचत असल्यासारखे मागे मागे चालले होते.विचारात मग्न असताना अचानक पुढे केतकडीचं कुंपण आलं तसे मास्तर दचकून थांबले.इतक्यात पलीकडून आवाज आला-‘या कि वो .इथं हाय बगा .’.मास्तरांनी बघितलं,समोरचं केतकडीचं कुंपण पुरुषभर उंच आणि आडवं अखंड आहे आणि हेही आठवलं कि बनात शिरायला रस्ता तर एकच,तोही पलीकडून आहे !.आता मात्र मास्तरांचं अवसान गळायला लागलं आणि एवढा वेळ न सुचलेला प्रश्न मनात उमटला...चाचरतच विचारलं ‘आवो मावशी पण तुमी कुणाच्या घरातल्या वो ?’तसं पलीकडून मोकळ्या,हसऱ्या आवाजात उत्तर आलं-‘मी वय ?.मी हितली मूळ रहिवासी हाय वो ’क्षणार्धात सगळ्या कड्या जुळल्या ,आणि मास्तरांची बोबडीच वळली.उलटे माघारी फिरून जी धूम ठोकली ती पडत उठत कशीबशी मुख्य सडक गाठली तरी मागून हाका जवळून आल्यासारख्या येतंच होत्या,आणि खिदळण्याचा आवाज पण !.मुख्य सडकेला लागल्यावर त्या हाका थांबल्या.पण मास्तरांच्या जीवात जीव नव्हता.
धावत पिंपळश्वराचा परिसर ओलांडला.आता समोर ३-४०० पावलांवर गावची हद्द.उजव्या टेकडावरचं नागनाथाचं मंदिर ओलांडलं ,शेजारची विहीर आणि बाजूचा सतीचा पार गेला कि निर्धोक झालो असा विचार मास्तर करतायत तोवर सतीच्या पाराआडून हाक आली ‘कोन ते ?का पळताय?’..मास्तरांना फेफरंच यायचं बाकी ! ..कधी रस्ता कापला आणि कधी घरी येऊन दडपून झोपलो ते काही मास्तरांना कळलंदेखील नाही.....
.....४ दिवसांनी पिंपळेश्वराजवळ घर असलेला मास्तरांचा दोस्त म्हादूआण्णा भेटला तेंव्हा मास्तर त्यांची चित्तरकथा सांगायला लागले.शेवटच्या टप्प्यातली घटना ऐकून मात्र आण्णा एकदम हसायला लागला.म्हणाला ‘लेका तितं आमचं म्हातारं हुतं सतीच्या पारापशी , परसाकडं गेलवतं नदीला.येताना तुलाच बगितलं बहुतेक ...तरी म्हनत हुतं कुनीतरी पळताना दिसलं अंधारात म्हणून....’......मग एकाएकी गंभीर होऊन म्हणाला-‘पीपळाच्या बनात मातुर कायतरी भानगड हाय बाबा..आमचा आजाबी यकडाव सांगत हुता कायबाय .’......... .