बाहेरची बाधा.. सत्य घटना..!!
नमस्कार, मि मिहिर भिडे,आम्ही पुण्यात रहायला आलो त्या वेळची ही गोष्ट आहे. साधारणपणे 1992 ला आम्ही सगळे पुण्यात रहायला आलो आणि ही गोष्ट 1993 च्या आसपासची आहे.तर झाले असे आम्ही त्या वेळेस लक्ष्मी नगर पर्वती येथे हाऊसींग बोर्ड काॅलनी येथे रहात असु, आणि मी त्या वेळेस साधारण 16 वर्षाचा असेन मला त्या वेळी आणि आताही व्यायाम करायला फार आवडत, त्यामुळे कॉलनीतील काही मुले आणि मी समोर असलेल्या शाळेच्या मोकळ्या पटांगणात जोर,बैठका मारत असु. तसेच मग त्या अनुषंगाने इतरही व्यायाम करत असु आणि साधारणपणे रोज संध्याकाळी साडेसहा ते सात च्या आसपास अम्ही जात असु..
मस्त पैकी व्यायाम झाली की घरी येऊन जेवणार ताव मारत होतो,त्या मुळे लवकरच माझी तब्येत छान सुधारली होती..
आता खरी गोष्ट सुरू होते,असच एक दिवस मी भरपूर व्यायाम करून आलो अणि जेवण केलं अणि मग लगेचच भडा भडा उलट्या सुरू झाल्या,आईला वाटल मी दिवसभर काही तरी उलट सुलट खालल असेल, पण मी तर अस काहीच खाल्ल नव्हत,मग तरीही का त्रास व्हावा?
असो त्या रात्री मी पाणी पिऊन झोपलो.सकाळी उठल्यावर मग सर्व झाल्यावर आईन चहा दिला तो घेतला आणि परत तेच, परत भडाभडा उलटी झाली, अता मात्र आई अणि घरातले थोडे चिंतीत झाले हा काय प्रकार आहे, काल सकाळ पर्यंत नीट खाणारा माणूस अस काय झाल की पोटात अन्न टिकत नाही?
मग मला आई म्हणाली की तु डॉक्टरकडे जाऊन दाखवुन ये त्या प्रमाणे मी आमच्या फॅमिली डॉक्टर कडे गेलो त्यांनी नीट तपासलं, पण ते म्हणाले मला तर काही वेगळ वाटत नाही पोट तर ठीक आहे. मी म्हणालो अहो काही खालल की लगेच उलटून पडत. ते म्हणाले ठीक आहे मि काही गोळ्या देतो त्या काही खाण्या आधी साधारणपणेदहा मिनिट अधि घ्या व नंतर खा, मग बर वाटेल आणि तिन दिवसांनी फरक पडत नाही अस वाटल तर परत या.
मग मी घरी परतलो आईला सांगतल आणि म्हणालो आता मि गोळ्या घेतो आणि तु जेवायला वाढ आईनं जेवणं वाढल,थोडसं भित भित केल अणि पुढच्या पाच मिनिटात परत उलटी झाली, आता मात्र हद्द झाली.
काय करावं काही सुचेनासं झालं..
आई म्हणाली आता काही खाऊ नको संध्याकाळी परत एकदा गोळ्या घे अणि मग बघु,संध्याकाळी परत एकदा तसच झाल..
मग मात्र आई घाबरली...!
त्या वेळेस आमच्या घरी आमचे गुरू श्री मामा महाराज अणि त्यांच्या पत्नी मामी असे काही दिवस आमच्या कडे रहायला आलो होते. ते फार मोठे श्री दत्त भक्त होते त्यांना साक्षात श्री दत्त गुरूनी दर्शन दिले होते. ते मला प्रेमाने सायबा म्हणत असत, ते हा जो काही माझा त्रास आहे ते पहात होते अत्तापर्यत ते काहीच बोलले नव्हते अत्ता संध्याकाळी परत एकदा तसेच झाल्यावर ते आईला म्हणाले सुनबाई हा जो काही प्रकार आहे तो बाहेरचा आहे.
मला मामा म्हणले सायबा माझ्या समोर येउन बस, आई आणि मामीना म्हणले तुम्ही त्याच्या मागे उभे रहा,ति वेळ साधारण पणे तिन्ही सांजची होती.आता मि मामा महाराज समोर बसलो होते त्यानि माझ्या कपाळावर अंगारा लावला आणि काही अंगारा माझ्या अंगावर फुंकला आणि त्यानंतर ते माझ्या कडे डोळे मोठे करून एकटक पाहू लागले,ते जसे माझ्या कडे पाहू लागले तसा मी त्याच्याकडे पाहून हसू लागलो आणि आणि त्यांना काही बाही बोलू लागलो..त्यांना जा काय करणार आहेस मला त्रास देऊ नका असे म्हणत त्यांच्या अंगावर ओरडु लागलो, मग जेव्हा मामा त्यांच्या पुर्ण शक्तीने माझ्याकडे पाहू लागले तेव्हा मात्र मी पुरता घाबरलो आणि रडू लागलो. मग मामा म्हणाले चल निघ इथुन आणि परत माझ्या सायबाला त्रास देऊ नकोस,असे म्हणताच मी मामांच्या पायावर पडलो व पुढचे दहा मिनिटे मी त्यांच्या चरणांनवर डोक ठेवून रडत होतो.
मग सगळं झाल्यावर मामा मामींना म्हणाले गुळ खोबरे आणि एक फुल आण,आणि आणि मग मामींनी माझी दुष्ट काढली आणी बाहेर मि जिथे रोज व्यायाम करायला जात असे तिथे बाहेरच्या बाजूला ठेवून आल्या.
इकडे मामा आईला म्हणाले अग सुनबाई त्याला भुक लागली असेल त्याच्या करता मुगाच्या डाळीची खिचडी कर, आणि काय सांगू तुम्हाला आईनं केलेली ती पातेलंभर खिचडी मी एकट्याने फस्त केली आणि मला काहीही त्रास झाला नाही..
मग मला मामा म्हणले सायबा तु जिथं व्यायाम करायला जायचास तिथे तुला बाहेरची बाधा झाली होती, त्यामुळे तिथे तिन्ही सांजाला जाऊ नको गेलास तर उघड्या अंगाने व्यायाम करायचा नाही, अन्यथा सकाळी गेलास तर उत्तम..!
अजूनही खुप भुतांच्या गोष्टी आहेत सांगिन हळूहळू..!!
वाचकहो मी पहिल्यांदाच लिखाणचा प्रयत्न करत आहे,तरी कृपया लिखाणातील चुकांबद्दल क्षमस्व....